Friday, May 30, 2025

डॉ सुरेश भोसले यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कर्करोग आधार गटाच्या विशेष बैठकीचे आयोजन ; मला जेव्हा कॅन्सर झाल्याचं समजलं तेव्हा मी प्रचंड घाबरले मात्र,सुरेशबाबांच्या रुपाने साक्षात देव भेटला.; ...काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
 ‘मला जेव्हा कॅन्सर झाल्याचं समजलं तेव्हा मी प्रचंड घाबरले. आता आणखी किती दिवसांचं आयुष्य जगायला मिळणार या भितीनं कॅन्सरच्या उपचारांसाठी मी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखवायला आले. पण इथं आल्यावर मात्र मला डॉ. सुरेशबाबांच्या रुपाने साक्षात देव भेटला. एवढा मोठा व्याप सांभाळणाऱ्या सुरेशबाबांनी माझ्यासारख्या सामान्य रुग्णावर केवळ उपचार केले नाहीत. तर या सगळ्या भितीच्या काळात मला वडिलांच्या मायेने धीर दिला.. आधार दिला.. आणि या संकटातून मला सहीसलामत बाहेर काढलं. आज त्यांच्यामुळे मी कॅन्सरमुक्त झाले असून, पूर्णपणे निरोगी व आत्मविश्वासाने आनंदी आयुष्य जगत आहे’, अशा भावोत्कृट शब्दांमध्ये अनेक माता-भगिनींनी डॉ. सुरेश भोसले यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती आणि प्रख्यात कर्करोग उपचार तज्ज्ञ डॉ. सुरेश भोसले यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त कर्करोग आधार गटाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमध्ये कर्करोगाबाबत जागृती व्हावी आणि योग्य उपचाराने कर्करोगापासून मुक्त झालेल्या महिलांच्या अनुभवांतून सध्या कॅन्सरग्रस्त असलेल्या रूग्णांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी राज्याचे माजी क्रीडा मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सौ. उत्तरा भोसले, सौ. सुवर्णादेवी देशमुख, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कर्करोग विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्मी गुडूर आदी मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात डॉ. सुरेश भोसले यांनी केलेल्या उपचारामुळे कर्करोगमुक्त झालेल्या अनेक महिलांनी कर्करोगाविरुद्धची लढाई कशी जिंकली, याबद्दल आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील कृष्णा हॉस्पिटलमधील कॅन्सर टीम वर्ल्ड क्लास असून, एक कुटुंबप्रमुख म्हणून ते नेहमी प्रत्येक रुग्णाला धीर देतात. कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते आपुलकीने काळजी घेतात. कॅन्सर म्हणजे फुलस्टॉप नाही, तर विश्रांतीचा एक स्वल्पविराम आहे. त्यामुळे सकारात्मक आयुष्य जगा. कृष्णा हॉस्पिटल माझ्यासाठी मंदिर आहे आणि सुरेशबाबा हे त्या मंदिरातील देव आहेत. अशा भावना व्यक्त करत या महिलांनी त्यांना उपचारकाळात डॉ. सुरेशबाबांनी दिलेला आधार व नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच केलेले सुयोग्य उपचार याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. 

यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, रुग्णाला जेव्हा कॅन्सर झाल्याचे समजते तेव्हा साहजिकच त्याच्या मनात दु:खाची भावना निर्माण होते. आपण आणखी किती वर्षे जगणार, या भितीने रुग्ण नैराश्येकडे ढकलला जातो. पण आजच्या काळात वैद्यकीय शास्त्र अधिक प्रगत बनले आहे. वेळेवर निदान, योग्य उपचाराने दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगता येते. त्यामुळे कॅसरग्रस्त रुग्णांनी भिती न बाळगता उपचारासाठी पुढे यावे आणि आनंदी आयुष्य जगण्याचा आनंद घ्यावा. 

याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई, वसंतराव शिंदे, ज्येष्ठ उद्योजक आर. टी. स्वामी, कृष्णा विद्यापीठाच्या संशोधन संचालिका ब्रिगेडियर डॉ. जी. हिमाश्री, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, प्राचार्य डॉ.सौ. वैशाली मोहिते, डॉ. जी. वचरदराजूलू, रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रामचंद्र लाखोले, सेक्रेटरी आनंदा थोरात, रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे अध्यक्ष चंद्रशेखर दोडमणी, विजय चव्हाण, सलीम मुजावर, राहुल जामदार यांच्यासह मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

डॉ. प्रणिता पाटील यांनी स्वागत केले. मुख्य नर्सिंग ऑफिसर रोहिणी बाबर यांनी प्रास्तविक केले. डॉ. सुजाता कानिटकर यांनी आभार मानले. 

Monday, May 26, 2025

डॉ. सुरेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ३० व ३१ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन ; नामवंत गायक-गायिकांच्या उपस्थितीत भव्य संगीतरजनी; शेतकरी मेळाव्याचेही आयोजन

वेध माझा ऑनलाइन
कृष्णाकाठचे शांत, संयमी नेतृत्व आणि कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा ७० वा वाढदिवस ३० मे रोजी साजरा होत आहे. यानिमित्त दि. ३० व ३१ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

आरोग्य, शिक्षण, सहकार, अर्थकारण, साखर उद्योग, पर्यावरण अशा विविधांगी क्षेत्रामध्ये अतुल्य योगदान देणारे आणि कृष्णाकाठी समृद्धीच्या दिशा विस्तारणारे नेतृत्व म्हणून डॉ. सुरेश भोसले यांना ओळखले जाते. प्रख्यात कर्करोग उपचार तज्ज्ञ, एक निष्णात सर्जन, ज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनाला चालना देणारे शिक्षणतज्ज्ञ, सहकाराला नवसंजीवनी देणारे सहकारतपस्वी, साखर उद्योगाला विधायक दिशा देणारे नेतृत्व आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारे पर्यावरणप्रेमी म्हणून डॉ. सुरेश भोसले यांनी त्या-त्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. 
त्यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजता मलकापूर येथे अभिष्टचिंतन सोहळा आणि भव्य संगीतरजनीचे आयोजन करण्यात आले आहे. मलकापूर-बैलबाजार रोडवरील श्री गणेश मंदिरामागील भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात माजी राज्यपाल तथा माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आणि माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुरेश भोसले यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यादिवशी ‘सुरों का उत्सव’ या भव्य संगीतरजनीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये नामवंत गायक ऋषिकेश रानडे, अमेय दाते, सागर केंदूरकर, गायिका कोमल कृष्णा, संपदा गोस्वामी हे बहारदार हिंदी व मराठी गीते सादर करणार आहेत. याचबरोबर शनिवारी ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर भव्य शेतकरी मेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शेतकरी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दिलीपराव देशमुख व कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी ए.आय. तंत्रज्ञान, ठिबक सिंचन याची माहिती देणारे स्टॉल्स् असणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. सुरेश भोसले वाढदिवस सोहळा समितीने केले आहे.


हार-तुरे, भेटवस्तू न आणण्याचे आवाहन 
या दोन्ही अभिष्टचिंतन सोहळ्यात मान्यवरांच्या शुभ हस्ते व सर्व लोकांच्या उपस्थितीत एकच भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाला येताना कुणीही हार, तुरे अथवा भेटवस्तू आणू नयेत, असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. 

Sunday, May 25, 2025

पाटण चे राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर या महिनाअखेरीस भाजपावासी होणार ; मोठी बातमी;

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी सर्वप्रथम शरद पवारांसोबत गेलेले पाटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे सुपूत्र सत्यजितसिंह पाटणकर या महिनाअखेरीस भाजपावासी होणार आहेत. निकटवर्तीयांचा हा प्रवेश शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या प्रवेशामुळं पाटण तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार आहे काँग्रेसमधून  बाहेर पडून शरद पवारांनी १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातून सर्वप्रथम विक्रमसिंह पाटणकर हे पवारांबरोबर गेले होते. त्याही आधीपासून ते शरद पवारांचे विश्वासू होते. १९९९ साली सत्तेवर आलेल्या विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीतून विक्रमसिंह पाटणकरांना सार्वजनिक बांधकाम खात्याचं कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं. राजकीय चढ उतारात पाटणकर घराणं कायम पवारांच्या पाठीशी राहिलं.

वाल्मीक कराडला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट / त्याच्यासाठी स्पेशल चहाची सोय /

वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याने केला आहे. त्याच्यासाठी स्पेशल चहा दिला जातो, त्याला चांगल्या चपात्या दिल्या जातात. स्वतः सह इतर कैद्यांच्या नावावर तो 25 हजारांची खरेदी कारागृहातील कँटीनमधून करत असल्याचा आरोप बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला आहे. कासलेनं काल (शनिवारी) याबाबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मीक कराडला तुरुंगात मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चर्चा सुरू झाली आहे. तप पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

good news. महाराष्ट्रात मान्सून दाखल /

वेध माझा ऑनलाइन।
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे राज्यात आज रविवारी (दि.25) आगमन झाले. हवामान खात्याकडून रविवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली. कालच मान्सून केरळात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून राज्यात दाखल झाला आहे. काही वेळातच हवामान खाते याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहे.

एका नेत्याचा दिल्ली-मुंबई हायवेवरच गर्लफ्रेन्डसोबत संबंध ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल ; कोण आहे हा नेता ?

वेध माझा ऑनलाइन
मध्य प्रदेशच्या एका नेत्याने दिल्ली-मुंबई हायवेवरच गर्लफ्रेन्डसोबत संबंध ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मनोहरलाल धाकड असं त्या नेत्याचं नाव असून तो भाजपशी संबंधित असल्याची चर्चा सुरू झाली. 
परंतु भाजपने लगेचच तो आपल्या पक्षाचा नेता नसल्याचं जाहीर केलं. मनोहरलाल धाकडची पत्नी ही मंदसोर जिल्हा पंचायतीची भाजप समर्थित सदस्या आहे. 

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरील भानपुराजवळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये मनोहरलाल धाकड हा नेता त्याच्या गाडीतून उतरतो आणि त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत रस्त्यावरच शारिरीक संबंध ठेवतो. असे एकूण दोन वेळा तो शारिरीक संबंध ठेवताना दिसतो. हा व्हिडीओ 13 मे रोजीचा असल्याचं सांगितलं जातंय. 
मनोहरलाल धाकड हा मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील बनी गावचा रहिवासी आहे. त्याची पत्नी ही जिल्हा पंचायत सदस्या आहे. मंदसोर जिल्हा पंचायतीच्या वार्ड क्रमांक 8 मधून ती भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आली आहे

Saturday, May 24, 2025

नागपुरात चक्क घोडीवर बलात्कार ; सीसीटीव्ही मध्ये घटना कैद ; आरोपीला अटक ;

वेध माझा ऑनलाइन
राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एका वर्षाची चिमुरडी ते 60-65 वर्षांची वृद्ध महिलाही त्याला बळी पडताना दिसत आहे. परंतु नागपूरमध्ये विकृतीचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षांच्या तरुणाने चक्क घोडीवर बलात्कार केल्याची घटना घडली. शहरातील घोडेस्वारी अकादमीमध्ये ही घटना घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली. या अकादमीतील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली. 

छोट्या सुंदर खोब्रागडे असं या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पाकिस्तानात सिंधू नदीच्या पाण्यावरून वाद पेटला / मंत्र्यांचे घर जाळले!

वेध माझा ऑनलाइन । पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची मुलगी आणि खासदार आसिफा भुट्टो यांच्या ताफ्यावर शुक्रवारी जमावाने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ शनिवारी समोर आला. पोलिसांच्या माहितीनुसार, आसिफा कराचीहून नवाबशाहला जात होती. दरम्यान, निदर्शकांनी त्यांचा ताफा थांबवला आणि सिंधू नदीवरील वादग्रस्त कालवा प्रकल्प आणि कॉर्पोरेट शेतीविरोधात घोषणाबाजी केली. काही लोकांनी ताफ्यातील वाहनांवर काठ्यांनी हल्ला केला. आसिफा आणि हैदराबाद पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांचे वाहन तेथून सुरक्षितपणे हटवले. या संपूर्ण घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पाकिस्तान सरकार सिंधू नदीवर कालवा बांधण्याचा विचार करत आहे. स्थानिक लोक यामुळे संतप्त आहेत. मंगळवारी सिंधचे गृहमंत्री झियाउल हसन लंजर यांचे घर जाळले होते.

लाडक्या बहि‍णींना मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार ; राज्यात चर्चा

वेध माझा ऑनलाइन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीला पुन्हा सत्तेत बसवण्यामध्ये गेमचेंजर ठरली होती. या योजनेनुसार पात्र लाडक्या बहि‍णींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडक्या बहि‍णींना एप्रिल महिन्याचा हप्ता 7 मे  दरम्यान देण्यात आला होता. आता लाडक्या बहि‍णींना मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागानं आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मे महिन्याच्या लाभाचे वितरण करण्यासाठी 335 कोटी 70 लाखांच्या लाभाचं वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. या नव्या अपडेटनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.

नव्याने मंत्री झालेले भुजबळ म्हणाले...जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन

वेध माझा ऑनलाइन।
राज्याच्या मंत्रिमंडळात नव्याने मंत्री झालेल्या छगन भुजबळांनी एक मोठं वक्तव्य केलं. धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्याने त्या ठिकाणी भुजबळांची वर्णी लागली अशी चर्चा सुरू  आहे. पुढे जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर मी राजीनामा देईन असं छगन भुजबळ म्हणाले. काँग्रेस फुटली त्यावेळी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत गेलो असंही छगन भुजबळ म्हणाले.

भविष्यात धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर भुजबळ काय करणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, "उद्या जर धनंजय मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठरलं तर माझी काही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलोय, सन्मानाने मला परत बोलवलं. धनंजय मुंडे सगळ्यातून मुक्त झाले, त्यांची सगळी लाईन क्लिअर झाली तर मी राजीनामा देईन."
मंत्रिपद देताना या गोष्टीवर चर्चा झाली होती का या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अशा पद्धतीची चर्चा होऊ अगर न होवो, राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार.


मंत्री गिरीश महाजन म्हणाले... देवेंद्र फडणवीसांनी मनात आणलं तर ते छगन भुजबळांना राज्याचा तिसरा उपमुख्यमंत्रीही करतील ...

वेध माझा ऑनलाइन
नाशिकच्या पालकमंत्रिपदावर कुणीही दावा करू शकतो, पण पालकमंत्री कुणाला करायचं हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे असं राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनात आणलं तर ते छगन भुजबळांना पालकमंत्री करतील, राज्याचा तिसरा उपमुख्यमंत्रीही करतील असं वक्तव्यही गिरीश महाजन यांनी केलं. त्यावर नंतर त्यांनी सारवासारवही केल्याचं दिसून आलं.

छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर ते आता नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा करणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर गिरीश महाजन म्हणाले की, "पालकमंत्रीपदावर कुणीही दावा करू शकतो. त्याला काहीच हरकत नाही. पण हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे. त्यांनी जर मनात आणलं तर भुजबळांना पालकमंत्री करतील. फडणवीस भुजबळांना राज्याचे तिसरे उपमुख्यमंत्रीही करू शकतील."


मयुरी हगवणेंच्या आई आणि भावाचे राज्य महिला आयोगाला पत्र ; पत्रात म्हटलंय - मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला ; आणखी वाचा काय म्हटलंय पत्रात -

वेध माझा ऑनलाइन।
 मयुरी हगवणेंच्या आई आणि भावाने राज्य महिला आयोगाला लिहिलेले सहा महिन्यापूर्वी एक पत्र पाठवले होते. या पत्रात हगवणे कुटुंबीयांकडून त्यांच्या मुलीवर होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला होता. माझी मुलगी सौ. मथुरी सुशील हरवणे हीचे 20 मे 2022 रोजी श्री. सुशील राजेंद हगवणे रा. भुकुम ता. मुळशी यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर लग्नाच्या काही कालावधी नंतर तिचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे व सासू लता राजेंद्र हगवणे यांनी आम्हाला फ़ॉच्यूनर पाहिजे व पैसे पाहिजे, असा मोठ्या गाड्यांच्या व रोख रकमेची मागणी करूण तिला त्रास देऊ लागले. तुला, वडिलांना तुझ्या अपंग भावास व आईस आम्ही मारहाण करू. आमच्याकडे बंदुका आहेत. काही वाकड करू शकत नाही. माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे. आमच्या मागे मोठा राजकीय पाठींबा आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते

आम्ही पौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी तेथील पोलिस अधिकाऱ्यांनी समाज देऊन मध्यस्थी केली. त्यानंतर सासू व सासऱ्यांनी तिच्या पतीकडे माझ्या मुलीला सोडण्याची वारंवार मागणी करू लागले. त्याच्या पतीचा या गोष्टीस नकार असल्याने त्याचा राग हा मुलीवर काढत होते.  दि. 06/11/2024 रोजी तिचे पती घरी नसताना सासू, सासरे, दीर व नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले. मुलीच्या छातीला सासऱ्याने हात लावला व दिराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली.  तुला मुलगा होत नाही तर आमच्या कडे ये या भाषेत मुलीला शिवीगाळ केला. हे सर्व होत असताना मुलीने मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग चालू केले होते. हे कळताच तिचा दीर शशांक राजेंद्र हगवणे यांनी तिचा  मोबाईल हिसकावून पळ काढला, असेही या पत्रात म्हटले होते.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात ; पोलिसांनी पत्रकार परिषद 1 मिनिट, 10 सेकंदात आटोपली ;

वेध माझा ऑनलाइन। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हगवणे कुटुंबाच्या विरोधात त्यांच्या सुनांकडून वेळोवेळी आलेल्या तक्रारींची दखल पोलिसांनी घेतली नाही. वैष्णवीच्या बाळाचं अपहरण झाल्यानंतरही पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे पोलिसांनी एकप्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हगवणे कुटुंबीयांनीच पाठीशी घातल्याचा आरोप होतोय. आता कामात हयगय करणाऱ्या पोलिसांवर सरकार कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला जातोय.

वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झाली. यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पण ती केवळ १ मिनिटं १० सेकंदात आटोपली. एवढ्या संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी सव्वा मिनिटही न देणारे पुणे पोलीस टीकेचे धनी बनलेत. मुळातच वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली. वैष्णवीचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबीयांनी मोठी सून मयुरीचाही अतोनात छळ केला होता. मयुरीनं नोव्हेंबर २०२४ मध्ये मारहाणीची पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली.  गुन्हा दाखल होऊनही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी कारवाई केली नाही. मयुरीच्या मारहाणीपासून वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत पुणे पोलिसांनी पावलापावलाला हलगर्जीपणा केलाय. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळाची सहा दिवस आबाळ झाली.
 

राज्याला रेड अलर्ट; मंगळवारपर्यंत मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, कोणकोणत्या जिल्ह्याला दिलाय इशारा ?

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील शेतकऱ्यांसाठीची दिलासादायक बातमी आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचे  काल (शुक्रवारी दि. 23) तीव्र कमी दाबाच्या पट्टयात रूपांतर झालं आहे. मात्र, अजून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झालेलं नाही. मात्र, या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 24 ते 28 मेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रामुख्याने रविवारी (दि. 25) अवघ्या राज्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. काल (शुक्रवारी) दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र स्वरूपात परिवर्तित झाले. ते पुढील 24 तासांमध्ये उत्तरेकडे सरकणार आहेत. त्यामुळे कोकण किनाऱ्यावरील पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे मोठे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगण ओलांडून दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे.

मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असून पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्येही हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.विदर्भातही पावसाचे वातावरण निर्माण झाले असून अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

गुड न्यूज ; मान्सून केरळमध्ये दाखल : 1जूनला मुंबईत येणार :

वेध माझा ऑनलाइन
राज्यात गेल्या आठवड्यापासून पूर्वमान्सूनने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनने केरळमध्ये आठ दिवस आधीच सरप्राईज एन्ट्री घेतली आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने  केली आहे. 

यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. आता पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु असून. मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो.

कृष्णा बँकेला उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार जाहीर ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने, दरवर्षी राज्यातील विविध सहकारी बँकांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेत खास पुरस्कार दिले जातात. सन २०२३-२४ सालचा ‘पद्मभूषण कै. वसंतराव पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी बँकेला जाहीर करण्यात आला आहे.
सहकार क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांना पुरस्काराने गौरविण्यात येते. असोसिएशनने नुकत्याच घेतलेल्या उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेच्या स्पर्धेत, पुणे विभागातून रु. ५०० कोटी ते रु. १००० कोटीपर्यंच्या ठेवी असलेल्या बँकांमधून, सन २०२३-२४ सालच्या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची निवड केली आहे. कृष्णा बँकेला प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘पद्मभूषण कै. वसंतराव पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्कार जाहीर केला आहे. 

कृष्णा सहकारी बँकेने चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा मोठा विस्तार केला आहे. सामान्य माणसांसाठी कार्य आणि सभासद हिताचा कारभार या उद्दिष्टाने बँकेने वाटचाल सुरु ठेवली आहे. तसेच बँकेने सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत, ग्राहकांना मोबाईल बँकींगसारख्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध करुन देत ग्राहकहित जपले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे अशा ४ जिल्ह्यात २२ शाखा व १ विस्तारीत कक्षाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या, कृष्णा सहकारी बँकेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १२११ कोटी ७४ लाख रुपयांचा एकूण व्यवसाय केला आहे. ग्राहक सेवा, आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर या चतु:सुत्रीचा अवलंब करत बँक आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देत आहे.

लवकरच होणाऱ्या एका शानदार सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कारामुळे कृष्णा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, याबद्दल बँकेचे सर्व सभासद, संचालक मंडळ, ग्राहक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

Friday, May 23, 2025

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट वैष्णवीच्या वडिलांना फोन ; काय म्हणाले दादा?

वेध माझा ऑनलाइन
वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणावरुन राज्यभरात संताप व्यक्त होत असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी असल्यानेच राजेंद्र हगवणे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. वैष्णवीच्या वडिलांना आपली कैफियत मांडताना स्वत: अजित पवार वैष्णवीच्या लग्नाला उपस्थित होते, तेव्हा त्यांनी देखील फॉर्च्युनर कार पाहून खोचकपणे प्रश्न विचारल्याची माहिती दिली होती. तसेच, अजित पवारांच्याच हस्ते फॉर्च्युनरची चावी हगवणेंना दिल्याचे फोटोही समोर आले होते. त्यानंतर, मीडियात आणि समाजमाध्यमांतून अजित पवारांना देखील लक्ष्य करण्यात आलं होत. आता, अजित पवार यांनी एका भाषणात आपली भूमिका मांडली. तर, वैष्णवीच्या वडिलांना फोन करुन देखील मी तुमच्या पाठीशी आहे, वैष्णवीला न्याय मिळवून देणार असे आश्वासन दिले

वैष्णवी हगवणे प्रकरणात अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा : काय म्हणाल्या :

वेध माझा ऑनलाइन
पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली असून याप्रकरणी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांना निर्देश दिले आहेत. कारण, राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यामुळेच, पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्याकडून हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. आता, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणी एका आयजी अधिकाऱ्याकडे अंगुलीनिर्देश केले आहेत. 

वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे IG म्हणजेच पोलीस महानिरीक्षक आहेत, मी माहिती घेतली असून या मांमांचा धाक दाखवून दोन्ही सुनेवर हगवणे कुटुंबीयांनी अत्याचार केल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. जालिंदर सुपेकर या शशांकच्या IG मामावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे,

 एवढच नाहीतर जळगाव मध्ये सासरे होते त्यांना, या IG नेच त्रास दिल्याचे पत्र लिहून त्यांनी आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं, अशी माहिती अंजली दमानिया यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक :

वेध माझा ऑनलाइन
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. 

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवसांपासून कुठे लपून बसले होते, सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी याआधीच अटक करण्यात आली होती. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. 


सुर्यप्रभा फाॅर्मकेन कंपनीतून ६ कोटी ३५ लाखांचे कोकेन जप्त ; कराड- तासवडे एमआयडीसीतील सदर काळे धंदे चव्हाट्यावर ! ;

वेध माझा ऑनलाइन।

तासवडे ता. कराड एम आय डी सी तील शेतीचे खते बनवणाऱ्या सुर्यप्रभा फाॅर्मकेन कंपनीतून ६ कोटी ३५ लाखांचे कोकेन तळबीड पोलीसांनी जप्त केले आहे. शुक्रवारी २३ रोजी ही घटना ह उघडकीस आली असून कमालीची गोपनीयता पाळून तळबीड पोलीसांनी १२७० ग्रॅम कोकेन जप्त केले असून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तासवडे एम आयडीसीतील बी- ५६ ब्लाॅकमध्ये ही कंपनी असून येथे विक्रीच्या दृष्टीने सदरचे कोकेन बाळगल्याचे पोलीसांनी सांगितले. या कारवाईने तासवडे एम आयडीसीतील काळे धंदे चव्हाट्यावर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तासवडे एमआयडीसी येथील २१ मे रोजी सायंकाळी ४.२५ च्या सुमारास तासवडे हद्दीत अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव ता. जिल्हा सातारा यांच्या मालकीचे सूर्यप्रभा फार्म केम कंपनीत ६ कोटी ३५ लाख रुपये किमंतीचे १२७० ग्रॅमच्या कोकेन विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीर रित्या कंपनीत मिळून आले. कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव, समीर सुधाकर पडवळ राहणार वृंदावन सिटी मलकापूर कराड, रमेश शंकर पाटील राहणार मल्हारपेठ ता. पाटण, जीवन चंद्रकांत चव्हाण रा. आवार्डे ता. पाटण, विश्वनाथ शिपणकर रा. दौंड जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की तळबीड पोलीस प्लॉट नंबर बी. ५६ येथे पेट्रोलिंग करत असताना सुरक्षितता व नियमावलीनुसार कामकाज होत नसल्याबाबत माहीती मिळाली. संशय बळावल्याने तळबीड पोलीस ठाण्याचे सपोनि किरण भोसले यांनी पथकासह बी ५६ मधील सूर्यप्रभा कंपनीत काहीतरी संशयास्पद केमिकल होत असल्याची पाहणी केली. तेथील संशयित पदार्थ ताब्यात घेतला. सदर कंपनीत शेतीसाठी लागणारे औषधे तयार केले जातात असे सांगितले जाते होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस किरण भोसले यांनी पथकासमवेत कंपनीत जाऊन तपासणी व पंचनामा केला असता तेथे फिनिक्स ऍसिटिक ऍसिड असल्याचे सांगण्यात आले. कपाटात प्लास्टिकच्या चार पिशव्याची पाहणी केली असता त्यामध्ये स्फटिक सारखा पदार्थ आढळून आला. या संदर्भात पोलिसांनी विचारणा केल्या असता त्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली. या कपाटात पांढरा पिवळसर रंगाचा स्पटिक सारखा पदार्थ आढळून आल्याने पोलीसांनी ताब्यात घेवून चौकशी केला असता ते कोकेन असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचे वजन १३७० ग्रॅम असून सदरचे कोकेन सहा कोटी ३५ लाखाचे असल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

Thursday, May 22, 2025

राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली कराड शहरातून भव्य तिरंगा बाईक रॅली ;

वेध माझा ऑनलाइन
शिवसेना व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या वतीने कराड शहरातून शिवसेनेचे नेते कराड नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली कराड शहरातून भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली .रॅलीचा प्रारंभ शिवतीर्थ अर्थात दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण व अभिवादन करून कराडचे प्रांतअधिकारी अतुल म्हात्रे कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख pi ताशीलदार तहसीलदार कल्पना ढवळे , आरटीओ निरीक्षक कणसे साहेब मलकापूर नगरपरिषद मुख्याधिकारी प्रताप कोळी क न प बांधकाम विभागाचे अभियंता आर डी गायकवाड,उपअभियंता सपना भोरे  शिवसेना नेते राजेंद्रसिंह यादव,
रणजीत पाटील गट विकास अधिकारी प्रताप पाटील शिवसेना व यशवंत विकास आघाडीचे नगरसेवक विजय वाटेगावकर,हणमंतराव पवार, स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, बाळासाहेब यादव, किरण पाटील, निशांत ढेकळे, राहुल खराडे , विनोद भोसले, ओंकार मुळे,तसेच  शिवसेना कराड शहर प्रमुख राजेंद्र माने सातारा उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते व शंकर वीर उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी सुलोचना पवार उपतालुकाप्रमुख भानुदास पोळ,काकासाहेब जाधव , हरी कुलकर्णी वीज महामंडळ सदस्य गुलाबराव पाटील, मा नगरसेवक प्रमोद वेर्नेकर सातारा जिल्हा मागासवर्गीय प्रमुख अजित भोसले उपशहर प्रमुख राजू खराडे,अशोक शिंदे या यांच्या उपस्थितीमध्ये व कराड नगर परिषद चे आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आशा सेविका फायर ब्रिगेड यंत्रणा आरोग्य सेवेसाठी ॲम्बुलन्स तसेच शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले
हजारो गाड्यांच्या संख्येने शिवसेना तिरंगा बाईक रॅली ची सुरुवात झाली कराड शहरातून, चावडी चौक, कन्या शाळा ,कृष्णा नाका, येथून विजय दिवस चौकात रॅली आल्यानंतर विजय दिवस स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले व पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना दोन मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली
पाकिस्तानचे कंबरडे मोडून ऑपरेशन सिंदूर यशस्वी पार पाडणाऱ्य भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ शिवसेना तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती रॅलीत कराड शहर व तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय खाजगी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक पदाधिकारी विद्यार्थी मित्र सर्व सामाजिक संस्था गणेश व नवरात्र मंडळे तसेच पोलीस प्रशासन व सैन्य भरती प्रशिक्षण संस्था माजी सैनिक यांनी भारतीय सैन्यांच्या समर्थक सन्मानार्थ मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता


भारतीय सैन्य दलाचा अभिमान सर्व देशवासीयांना आहे या देशाच्या अस्मितेवर कोणी घाला घालत असेल तर हा देश छातीचा कोट करून उभा राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी रॅलीच्या सांगता प्रसंगी केले व शिवसेना तिरंगा बाईक रॅलीची सांगता केली.

सातारा जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखपदी तुषार दोषी

वेध माझा ऑनलाइन।
राज्य सरकारकडून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुखपदी तुषार दोषी यांची लोहमार्ग, पुणे पोलीस अधीक्षक येथून सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. तर समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे.
तुषार दोशी हे २००१ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले. मी पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली आणि पोलीस खात्यात भरती झालो, असं तुषार दोषींनी नवी मुंबईत पोलीस उपायुक्तपदी असताना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
राज्य सरकारने २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज काढले असून, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी तुषार दोषी यांना सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पदी बदली देण्यात आले आहे. तात्काळ बदली ठिकाणी हजर होण्याचे आदेश राज्य सरकारच्या वतीने बजावण्यात आले आहेत.

Tuesday, May 20, 2025

विदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळात ठाकरेंच्या खासदाराला स्थान; दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन... काय म्हणाले केंद्रीयमंत्री ?

वेध माझा ऑनलाइन।
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आणि सैन्य दलाच्या कारवाईसंदर्भात जगभरातील विविध देशांत जाऊन सत्यता व माहिती देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यासाठी, सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ तयार करण्यात आले असून शिवसेना शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांचा सहभाग झाला आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाकडून एकाही खासदाराचा सहभाग या शिष्टमंडळात करण्यात आला नव्हता. त्यावरुन, खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. संसदेतील आपल्या खासदारांचं संख्याबळ सांगत त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षात भेदभाव केल्याचेही म्हटले होते. त्यानंतर, आता केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन सर्वपक्षीय शिष्टमंडळ संदर्भात माहिती दिली. तसेच, या शिष्टमंडळात शिवसेना युबीटी पक्षाच्या खासदाराचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.  केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काल उद्धव ठाकरे जी यांच्याशी या शिष्टमंडळासंदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला. देशाचे हे शिष्टमंडळ दहशतवादाविरुद्ध आहे आणि याची खात्री मिळाल्यावर, आम्ही सरकारला आश्वासन दिले आहे की आम्ही या शिष्टमंडळाद्वारे आपल्या देशासाठी जे योग्य आणि आवश्यक ते करू इच्छितो. त्यानुसार, खासदार प्रियंका चतुर्वेदी देशभरातील इतर खासदारांसह या शिष्टमंडळाचा भाग असतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, या शिष्टमंडळात शिवसेना युबीटीकडून खा. प्रियंका चतुर्वेदी यांची वर्णी लागली आहे.

भारतात सापडले कोरोना रुग्ण ; कोणत्या राज्यात सापडले ?

वेध माझा ऑनलाइन।
हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या आशियातील देशांमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भारतात देखील कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कोविड डॅशबोर्ड नुसार देशात गेल्या आठवड्यात 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 इतकी झाली आहे. भारतात करोना चाचण्यांची संख्या कमी आहे अशा वेळी रुग्णसंख्या वाढलेली आहे. काही रुग्णांमध्ये व्हायरल ताप आणि कोरोना सारखी लक्षणं आढळून येत असताना त्यांच्या कोरोना तपासणी चाचण्या करण्याचा सल्ला दिला जात नसल्याचं चित्र आहे. मात्र, डॉक्टर्स आणि आरोग्य तज्ज्ञांनी लोकांना घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.  

बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्य कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, घाबरण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार सतर्क आहे. सध्या नव्या मार्गदर्शक सूचना आणि योजना लागू करण्याची आवश्यकता नाही.  हाँगकाँग, सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं रुग्णसंख्या वाढली आहे. रिपोर्टस नुसार सिंगापूरमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत 28 टक्क्यांची वाढ झाली असून रुग्णसंख्या 14200 वर पोहोचली आहे. हाँगकाँगमध्ये कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. चाचण्यांचं प्रमाण 13.66 टक्क्यांवर पोहोचलं आहे.  दरम्यान भारतात कोरोनाची स्थिती  स्थिर आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी आहे. केरळ, तामिळनाडू या सारख्या राज्यात अधिक तपासणी होत असल्यानं तिथं संख्या अधिक असल्याचं ते म्हणाले.

कराड येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार : आ डॉ अतुल भोसले यांची याबाबत जिल्हा नियोजन बैठकीत महत्वाची मागणी ;


वेध माझा ऑनलाइन
कराड येथील श्री शंभुतीर्थ परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक साकारले जात आहे. पण याठिकाणी असलेल्या विद्युत तारांच्या स्ट्रस्टरमुळे या स्मारकाच्या कामाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचे तातडीने स्थलांतर करावे, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सातारा येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. यावेळी बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री ना. शंभुराज देसाई यांनी या मागणीची तातडीने दखल घेत, एम.एस.ई.बी.ला या विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे श्री शंभुतीर्थ परिसरात साकारल्या जात असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक कामातील अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे.

सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्यासह आ. डॉ. अतुलबाबा भोसले, आ. मनोज घोरपडे, आ. सचिन पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कराडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून कराडकरांमधून केली जात होती. या मागणीची दखल घेत, गेल्या महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी या स्मारकासाठी ८ कोटींचा निधी मंजूर केला. या निधीतून सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. पण या स्मारक परिसरात असलेल्या विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचा अडथळा निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून हे काम रखडले होते. विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचे स्थलांतर करण्यासाठी सुमारे ९२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

दरम्यान, आज झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. स्मारकाचे काम वेगाने प्रगतीपथावर असून, विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचा अडथळा दूर झाल्यास या कामाला आणखी गती मिळू शकेल, असे मत व्यक्त केले. याची दखल घेत, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी एम.एस.ई.बी.ला देखभाल दुरुस्ती खर्चातून या विद्युत तारांच्या स्ट्रक्चरचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या.

कराड तालुक्यातील वानरवाडी बंधाऱ्याचा प्रश्नही आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या बैठकीत उपस्थित केला. वानरवाडी येथे मातीचा बंधारा गेली अनेक वर्ष पूर्ण आहे. परंतु त्या बंधार्‍यामध्ये पाणी साठवता येत नाही; कारण त्या बंधार्‍याच्या सांडव्याच्या कामासाठी वन खात्याच्या अखत्यारितील जमीन लागणार आहे. ही जमीन न मिळाल्यामुळे गेली अनेक वर्ष हा मातीचा बंधारा पाणी साठवण्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे येथील वनजमीन तातडीने मिळावी, अशी जोरदार मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवित, याप्रश्नी जिल्हाधिकारी, वनाधिकारी तसेच जलसंधारण विभागाचे अधिकारी यांची आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश दिले.


लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा सौ. विद्या मोरे “हिरो डिस्ट्रिक्ट अवॉर्ड”ने सन्मानीत ;

वेध माझा ऑनलाईन।
 लायन्स क्लब नक्षत्रच्या माजी अध्यक्षा आणि रिजन कॅबिनेट कोऑर्डिनेटर (GMT) सौ. विद्या मोरे यांना लायन्स इंटरनॅशनल मल्टिपलच्या वतीने “हिरो डिस्ट्रिक्ट अवॉर्ड”ने नुकताच सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सौ. मोरे यांची निवड करण्यात आली होती. या कार्यक्रमात संपूर्ण राज्यभरातून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना सौ. विद्या मोरे म्हणाल्या, “माझा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच उत्साह राहिला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात मी सक्रिय राहते. या कार्याची दखल घेत आजवर मला 36 पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मात्र आजचा हा ‘हिरो डिस्ट्रिक्ट अवॉर्ड’ माझ्यासाठी विशेष सन्मान आहे. हा सन्मान मला अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणा देईल.”

या पुरस्कार सोहळ्यात PID संतोषकुमार चौहान, MCC सुनील देसरदा व सौ. देसरदा, मल्टीपल सेक्रेटरी बलबीरसिंग विज, MVCC भोजराज नाईक निंबाळकर, GMT MD 3234 जगदीश पुरोहित, PID डॉ. नवल मालू, PID प्रेमचंद बाफना, कन्वेंशन अध्यक्ष पीडीजी राजेश राऊत, D1 चे डीजी एम.के. पाटील, H2 चे डीजी गिरीश सिसोदिया, H1 चे डीजी डॉ. रिपल राणे आणि D2 चे डीजी विजय सारदा आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. मोरे यांचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Saturday, May 17, 2025

कराड एस.टी. आगाराला मिळणार नवीन बसेस ; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीला परिवहन मंत्र्यांचा हिरवा कंदील

वेध माझा ऑनलाइन।
कराड तालुक्यातील प्रवाशांना दर्जेदार व वेळेवर एस.टी. सेवा मिळावी, यासाठी कराड आगाराला नवीन बसेस मिळाव्यात, अशी मागणी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. आ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, ना. सरनाईक यांनी सध्या पहिल्या टप्प्यात शक्य तितक्या उपलब्ध बसेस तातडीने कराड आगाराला देण्याचे निर्देश राज्याच्या परिवहन आयुक्तांना दिले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे व्यावसायिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या कराड तालुक्यातील लोकांचा दैनंदिन प्रवास वाढतच आहे. कराड हे केवळ सातारा जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कृषी, शिक्षण, आरोग्य, साखर उद्योग अशा विविध क्षेत्रांत अग्रगण्य आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे.

सध्या कराड एस.टी. आगारातून दररोज अंदाजे ५० ते ६० हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र आगाराकडे केवळ ५० बसेसच उपलब्ध असून, त्या सर्वच जुन्या आणि देखभाल अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेकदा बसेस वेळेवर धावत नाहीत. तसेच बऱ्याचदा ब्रेकडाउन होत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.

ही बाब लक्षात घेऊन, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मुंबईत मंत्रालयात राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, कराड आगाराला नवीन किमान ३० बसेस उपलब्ध करून देण्याचे निवेदन सादर केले. या निवेदनाची तातडीने दखल घेत ना. सरनाईक यांनी कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या परिवहन आयुक्तांना देत, सध्या पहिल्या टप्प्यात शक्य तितक्या उपलब्ध बसेस तातडीने कराड आगाराला देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच कराड एस.टी. आगाराला नवीन बसेस मिळणार आहेत.

या निर्णयामुळे कराडमधील एस.टी. सेवा अधिक सक्षम होणार असून, प्रवास अधिक सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायक होईल. याचा थेट फायदा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.


आ डॉ अतुलबाबा भोसले यांची प्रतिक्रिया...
एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे की, नागरिकांच्या अडचणी शासन दरबारी पोहोचवाव्यात आणि त्यावर त्वरित निर्णय घडवून आणावेत. कराड तालुकावासियांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी मी सदैव तत्पर असून, त्यांच्यासाठी सकारात्मक बदल घडवण्याचा माझा प्रयत्न सुरूच राहील

"एक राज्य एक दस्त" व पॉवर ऑफ ऍटर्णी हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे निवेदन ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या "एक राज्य एक दस्त" व  पॉवर ऑफ ऍटर्णी हा कायदा रद्द करावा यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढारे साहेब यांच्या सूचनेनुसार व अखिल भारतीय मराठा महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ यांच्या नेतृत्त्वात कराड चे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना निवेदन देण्यात आले.

 या वेळी, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी माने, जिल्हा सरचिटणीस विवेक कुराडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष युवराज कुराडे जिल्हा सोशल मिडिया प्रमुख सुरज जाधव, कराड द.तालुका उपाध्यक्ष अमर पाटील,  जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, विद्या मोरे, अर्चना जाधव,  जयवंत पाटील,  दिलीप पाटील, संदीप जाधव इत्यादी उपस्थितीत होते.

यावेळी राज्यात बनावट व्यक्ती उभी करून बोगस दस्त करणे, मृत व्यक्ती जिवंत दाखवून दस्त नोंदणी होणे, शेतकऱ्यांच्या विशेषतः डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्पांच्या लगतच्या जमिनी खरेदी करून फसवणूक करणे, कुटुंबातील हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील व्यक्तीचे हिस्से विकणे  अशा अनेक विषयावरती चर्चा करण्यात आल्या.

Tuesday, May 13, 2025

भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आ डॉ अतुल भोसले ; डॉ अतुलबाबा म्हणाले...सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहणार ;

वेध माझा ऑनलाइन
 सातारा जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ.अतुल भोसले यांची मंगळवारी निवड जाहीर करण्यात आली. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी ही निवड जाहीर केली. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी यापूर्वी भाजप प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकसभा मतदारसंघाचे  प्रमुख म्हणून त्यांनी चांगले काम करून दाखवले होते.त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली होती. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मोठ्या मताधिक्याने कराड दक्षिण मधून विजय संपादन केला आहे.या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करूनच त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे मानले जात आहे.

खरंतर जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये मी कोठेही नव्हतो.मात्र पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. अशी प्रतिक्रिया डॉ.अतुल भोसले यांनी दिली आहे

दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ अतुलबाबांची झालेली निवड महत्त्वाची मानली जाते.

Sunday, May 11, 2025

युद्धबंदी जाहीर, तरी ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार ; कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं भारतीय वायुसेनेच आवाहन :

वेध माझा ऑनलाइन
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने काल (10 मे) सायंकाळी युद्धबंदी जाहीर केली. मात्र युद्धबंदीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार असल्याचं भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, अशी अधिकृत भूमिका भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायूदलानं चोखपणे बजावली आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील भारतीय वायुसेनेने म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले...पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील; अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर नव्हे तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ऑपरेशन सिंदूर थांबणार नसून ते सुरुच असल्याचं भारताने स्पष्ट केलं. तसेच अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर नव्हे तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याची माहिती आहे. 
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानवर अशा जखमा केल्या आहेत ज्या भरून येण्यास बराच वेळ लागेल. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने 100 हून अधिक दहशतवाद्यांना नरकात पाठवले आणि 9 दहशतवादी तळ आणि पाकिस्तानचे लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्या.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने जगभरातील मित्र राष्ट्रांशी चर्चा केली होती. या संभाषणात ऑपरेशन सिंदूरबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी, भारताने ज्या देशांशी चर्चा केली त्या सर्व देशांना स्पष्टपणे सांगण्यात आले की यावेळी कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात भारताची भूमिका अगदी स्पष्ट होती.

100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल,: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वेध माझा ऑनलाइन।
मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानुसार, आज सिंधुदुर्गातील मालवण किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण झाले. सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय. जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आला आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा अनावरण सोहळ्यानंतर बोलताना दिली.

100 हून जास्त दहशतवाद्यांचा खात्मा / 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांसह अनेक अधिकारीही मारले गेले;

वेध माझा ऑनलाइन।
पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरिदके, भावलपूरसह नऊ ठिकाणी हल्ले करुन 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणे हेच ऑपरेशन सिंदूरचे ध्येय असल्याचंही ते म्हणाले. भारतीय सेनेच्या कारवाईत 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला असून त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे अशी माहिती देण्यात आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी लष्कराच्या तीनही दलांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

" ब्रह्मस्त्र ' न केलीे दहशतवादी तळांची राखरांगोळी ; पाकिस्तानला भारताचा स्पष्ट इशारा

वेध माझा ऑनलाइन
 भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय देखील समाविष्ट होते. ते नष्ट करण्यासाठी भारताने त्याचे सर्वात शक्तिशाली शस्त्र वापरले.
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला भारताविरोधात बळ दिलं. त्यामुळेच भारताला त्यावर कडक उपाययोजना करत त्याच्या सर्वात शक्तिशाली शस्त्राचा वापर करावा लागला. पण हे सर्वात शक्तिशाली अस्त्र कोणतं हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ यांनी रविवारी संवाद साधताना काही संकेत दिले. ते म्हणाले की, "भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी ब्राह्मोसचा वापर केला. ब्राह्मोसचा आवाज रावळपिंडीपर्यंत ऐकू येत होता."

Thursday, May 8, 2025

दहशतवाद खपऊन घेणार नाही : सुधरा नाहीतर संपवून टाकू ; भारताचा पाकिस्तानला इशारा ;

वेध माझा ऑनलाइन
भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केलं. यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं.गेल्या 65 वर्षांमध्ये सिंधू कराराचं पालन करणे ही भारताची सहनशिलता आहे. यापुढे भारत आपल्या हक्काचे पाणी वापरणार असंही या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आलं. 
पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याला भारताने चोख उत्तर देत लाहोरसह अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने तो हल्ला उधळून लावला आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या रडार यंत्रणा निष्क्रिय करुन दिला असल्याची माहिती देण्यात आली. भारताच्या या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे अधिकाऱ्यांनी दिली

पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर ताब्यात ; असीम मुनीर याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जाणार असल्याची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन
भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर तो देश अनागोंदीच्या दिशेने चालला असल्याचं चित्र आहे. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची उचलबांगडी केली जाणार आहे. असीम मुनीर याच्या हेकेखोरीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याचं मत तिथल्या नागरिकांचे आणि सत्ताधाऱ्यांचं झाल्याची माहिती आहे. त्याचमुळे असीम मुनीर याच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालवला जाणार असल्याची माहिती आहे. पाकिस्ताच्या लष्करप्रमुखपदी आता शमशाद मिर्झा यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे. असीम मुनीर हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याची भावना भारताची आहे. त्याच्या चिथावणीनंतरच दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांना चिथवायचं आणि नंतर भारताने प्रतिक्रिया दिल्यावर भारतावर हल्ला करायचा असा असीम मुनीर याचा डाव होता. पाकिस्तानी जनतेची आणि राज्यकर्त्यांची इच्छा नसतानाही असीम मुनीरच्या खुमखुमीमुळे पाकिस्तानवर युद्धाची वेळ आली असल्याची समज सर्वत्र आहे. आधीच पाकिस्तानची परिस्थिती ही डबघाईला आली होती. त्यात भारतासोबत कुरापत काढून असीम मुनीरने ही परिस्थिती आणल्याची भावना तिथल्या लोकांची आहे. 

पाकिस्तानचा ड्रोन हल्ला ; जम्मूत ब्लॅक आऊट ; भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडले;

वेध माझा ऑनलाइन।
ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आगळीक केली असून त्याने भारतावर ड्रोन हल्ले केले. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला.  पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे.  

भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने लागोलाग उत्तर दिलं असून थेट इस्लामाबाद आणि लाहोरवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर स्फोट ; पाकिस्तानचे पंतप्रधान बंकर मध्ये लपले..

वेध माझा ऑनलाइन
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून योग्य उत्तर दिलं जात आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर स्फोट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान घाबरुन बंकरमध्ये लपल्याची माहिती मिळत आहे.

भारताने केला इस्लामाबाद आणि लाहोरवर क्षेपणास्त्र हल्ला ; पाकिस्तान बिथरला -

वेध माझा ऑनलाइन
ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आगळीक केली असून त्याने भारतावर ड्रोन हल्ले केले. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला.  पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे.  भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने लागोलाग उत्तर दिलं असून थेट इस्लामाबाद आणि लाहोरवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे. 


अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर त्याचं स्वागतच करेल ; रोहित पवार असं का म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन
मलाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण योग जुळून येत नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025’च्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले होते. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलंय. जर या सरकारमध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली तर पुतण्या म्हणून मी त्याचं स्वागतच करेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. 
ते म्हणाले...  ते अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्या पदाच्या वर मुख्यमंत्रीपदच राहते. सहाजिकच तुम्ही इतके वर्ष दोन नंबरच्या पदावर राहिला असाल तर तुमची इच्छा मुख्यमंत्रीपदाची व्हावी. 
या सरकारच्या माध्यमातून अजितदादा यांना संधी दिली जात असेल तर त्यांना आवडेलच. तसेच कुटुंबाला आणि कार्यकर्त्यांना देखील आवडेल. मी त्यांचा पुतण्या म्हणून मला सुद्धा ती गोष्ट आवडेल. ते आता वेगळ्या सरकारमध्ये आहेत.  पण अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळत असेल तर त्या गोष्टीचं मी नक्कीच स्वागत करेल. आनंद देखील व्यक्त करेल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

पाकिस्तान लाहोरमधील अमेरिकन नागरिकांना हाय अलर्ट, पाकिस्तान सोडण्याच्या सूचना

वेध माझा ऑनलाइन
पाकिस्तानच्या आगळीकतेनंतर भारताने लाहोरमधील रडार यंत्रणा उद्ध्वस्त करुन त्या देशाला इशारा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन देशभर सायरनचा वाजवण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना हाय अलर्टचे निर्देश दिले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या सीमाभागात जाऊ नका, लाहोरमध्ये लपण्यासाठी सुरक्षित आश्रय शोधा, तसेच देश सोडण्यासाठी सर्व कागदपत्रं तयार ठेवा असे आदेश अमेरिकेने दिले आहेत. पाकिस्तानमधील पंजाबच्या लाहोरमधील अमेरिकन नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेच्या लाहोरस्थित वाणिज्यदूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेने त्यांच्या पाकिस्तानमधील नागरिकांना दिलेल्या या सूचनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध अटळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी लाहोरमध्ये कुठेही फिरू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लाहोरच्या विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर हा रिकामा केला जाऊ शकतो असंही अमेरिकेने सांगितलं आहे. पाकिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी प्लॅन तयार करा, सर्व आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा असंही अमेरिकेने सांगितलं आहे. कुणाच्याही मदतीच्या भरवशावर थांबू नका. स्थानिक माध्यमांतील बातम्यांवर लक्ष ठेवा असंही सांगण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान दिनेश कुमार शहीद, 15 नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आली समोर ;

वेध माझा ऑनलाइन
भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या मोहीमेला ऑपरेशन सिंदूर  असे नाव देण्यात आले होते. या ऑपरेशनतंर्गत पीओकेमधील 9 ठिकाणी क्षेपणास्त्रांचा मारा करुन दहशतवादी तळ बेचिराख करण्यात आले. अवघ्या 25 मिनिटांत भारतीय वायूदलाने ही सगळी कामगिरी पार पाडत पाकिस्तानी सैन्याला चपराक लगावली. भारताची क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या रडारला पत्ता लागून न देता अचूक जाऊन लक्ष्यावर आदळली. भारतीय वायूदलाच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रचंड धास्तावले होते. त्यामुळे पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी रात्री ब्लॅकआऊट  करण्यात आला होता
दरम्यान पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान दिनेश कुमार शहीद, 15 नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे

"ऑपरेशन सिंदूर' ; सानिया मिर्झाने केली खास पोस्ट ;

वेध माझा ऑनलाईन
भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भातील दोन महिला अधिकाऱ्यांच्या सहभागाबद्दल सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत  सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासमवेत 'ऑपरेशन सिंदूर' विषयी माहिती दिली होती. सानिया मिर्झा  हिने दोन महिला अधिकाऱ्यांचा पत्रकार परिषद घेतानाचा फोटो शेअर केलाय. सानिया मिर्झा  हिने या पोस्टला शेअर करून महिला अधिकाऱ्यांच्या योगदानाचे समर्थन केले. सानिया म्हणाली, हा फोटो परफेक्ट आहे, आपण देश म्हणून काय आहोत हे दाखवणारा आहे..

मसूद अजहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा खात्मा

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील बहवालपूरमधील दहशतवादी मसूद अझहरच्या जैश-ए- मोहम्मदचं मुख्यालय मरकज सुबहान अल्लाहवर हल्ला करत मसूद अझहरचं कंबरडं मोडलं. यात मसूद बचावला असला तरी त्याच्या कुटुंबातल्या 14 जणांचा खात्मा झाला. भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित दहशतवादी नेता मसूद अझहरच्या लपण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनाश केला.  भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या आत 100 किमी अंतरावर असलेल्या बहावलपूरमधील जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर आणि इतर 8 तळांवर हल्ला केला. दरम्यान, कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या घरी मृतदेहाची रांग लागली आहे. पाकिस्तानातून बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त झाल्यानंतर बहावलपूरमधून फोटो आले आहेत.

पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त ; भारतीय लष्कराची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
पाकिस्तानी सैन्याने भारतातील अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने 7 आणि 8 मे2025 च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशनन विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केलेला.

भारतीय लष्कराने दिलेली माहिती पुढीलप्रमाणे...
ऑपरेशन सिंदूर संदर्भात 7 मे 2025 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईला केवळ लक्ष्य केंद्रीत मोजकी आणि तणाव न वाढवणारी अशी भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. पाकिस्तानातील लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेले नाही, हेही ठामपणे सांगण्यात आले होते. भारतातील लष्करी ठिकाणांवर कोणताही हल्ला झाल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, हेही पुन्हा अधोरेखित करण्यात आले.

पाकिस्तानमधील मोठमोठी शहरं ड्रोन हल्ल्यानं हादरली ;

वेध माझा ऑनलाइन।
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील मोठमोठी शहरं ड्रोन हल्ल्यानं हादरल्याची पाहायला मिळत आहे. भारताने पाकिस्तानमधील 9 शहरांत ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे. लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. 

लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचंही पाकिस्तानने म्हटलं आहे. 
भारताने पाकिस्तानमधील 9 शहरांत ड्रोन हल्ले केले आहे. लाहोर, रावळपिंडी,कराची या शहारांत भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले आहे. लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचा पाकिस्तानने दावा केलाय. गुजरानवाला आणि अटक शहरांवरही भारताकडून ड्रोन हल्ले झाल्याचा दावा पाकिस्तानच्या आयएसपीआरचे महासंचालक ले.जन.अहमद शरीफ यांनी केला आहे. भारताचे 12 ड्रोन पाडल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे.

Wednesday, May 7, 2025

पालिका - महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, जाणून घ्या... ओबीसी आरक्षणावरील सुनावणी संदर्भातील माहिती...

वेध माझा ऑनलाइन
कोरोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना लवकरच मुहूर्त लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला येत्या चार महिन्यात रखडलेल्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच चार आठवड्यांमध्ये निवडणुकीबाबत अधिसूचनाही काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे चार महिन्यात निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2022 मधील ओबीसी राजकीय आरक्षणासह या निवडणुका पार पडणार आहेत. सध्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय कारभार सुरू आहे.
 
 दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण किती असावं हे नव्याने निश्चित करण्यात यावं या मागणीसाठी विकास गवळी यांच्याकडून 2018 मध्ये नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. 2019 मध्ये ही याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली.

महाराष्ट्रात ओबीसींचे प्रमाण सध्या लागू असलेल्या 27 टक्के आरक्षणापेक्षा अधिक असल्याने हे आरक्षण वाढवून मिळावे अशी या याचिकेत मागणी होती.

नंदुरबार, गडचिरोली आणि पालघर या तीन आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये ST , SC आणि OBC आरक्षण मिळून पन्नास टक्क्यांच्या पुढे जात होते हे देखील यामध्ये नमूद करण्यात आले होते. 

सर्वोच्च न्यायालयाने याबाबत राज्य सरकारला माहिती देण्याचे आदेश दिल्यावर राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाने गोळा केलेला डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर केला. 

 मात्र हा डेटा फेटाळताना 4 मार्च 2021 ला सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणासाठी स्वतंत्र समर्पित आयोग नेमण्याचे आदेश दिले. 

 11 मार्च 2022 ला उद्धव ठाकरे सरकारने माजी सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या नेतृत्वाखाली बांठिया आयोगाची स्थापना केली. 

 मात्र 2022 च्या जून महिन्यात उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं आणि 30 जूनला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले.

 बांठिया आयोगाच्या शिफारशी 12 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारल्या. 

 मात्र बांठिया आयोगाच्या शिफारशींमुळे ओबीसींच्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमी होत होत्या. त्यामुळे अनेक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संथांच्या निवडणुका रखडल्या.

राज्यातील 34 जिल्हा परिषदा, 29 महापालिका , 22 नगरपालिका, 41 नगरपरिषदा आणि 289 पंचायत समितीच्या निवडणुका यामुळे रखडल्या . 

 तीन वर्षे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संथांमध्ये प्रशासक राज राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा 2022 च्या आधी ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात होत्या. त्याच पद्धतीने म्हणजे ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.  या सर्वातून काहीच साध्य झालेले नाही. ना OBC आरक्षण वाढले ना OBC आरक्षण कमी झाले

तर पाकिस्तान पाऊल उचलणार नाही ; पाकिस्तान घाबरला!

वेध माझा ऑनलाईन।
भारतीय लष्कराकडून 15 दिवसात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 2 टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात आला आहे. मुरिदकेच्या मरकझ तय्यबा मशिदीवरील हल्ल्यात अब्दुल मलिक आणि मुदस्सीर ठार झाल्याची माहिती मिळत आहे. फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे जबरदस्त कामगिरी केली. स्काल्प क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चांगलाच घाबरल्याचे दिसून आले. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारतानं कारवाई थांबवली तर पाकिस्तान देखील पाऊल उचलणार नाही, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ म्हणाले. 
भारताच्या या कारवाईवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची शहबाझ शरीफ यांनी पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी भारतानं काही ठिकाणांवर हल्ले केले आहेत. भारताकडून करण्यात आलेल्या युद्धासारख्या कृतीचं जोरदार उत्तर देण्याचा पाकिस्तानला पूर्ण अधिकार आहे. जोरदार उत्तर दिलं जाईल.  संपूर्ण पाकिस्तानी देश सशस्त्र दलांसोबत उभा आहे. पाकिस्तान देशाचं मनोबल उच्च आणि भावना देखील जोरात आहेत. पाकिस्तानी राष्ट्र आणि पाकिस्तानी लष्कर चांगल्या प्रकारे जाणते की दुश्मनांचा सामना कशा प्रकारे करावा. दुश्मन त्यांच्या इराद्यामध्ये यशस्वी होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया शहबाझ शरीफ यांनी दिली.

Tuesday, May 6, 2025

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे निर्देश ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं जारी केलेत. येत्या चार आठवड्यांत याबाबतची अधिसूचना जारी करत पुढील चार महिन्यांत या निवडणूका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. त्यामुळं राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आहे.राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भात येत्या चार आठवड्यांत अधिसूचना जारी करत पुढील चार महिन्यांत या निवडणूका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर या निवडणुकांचं घोंगडं इतकी वर्ष प्रलंबित होतं. मात्र, यंदाच्या निवडणुका साल २०२२ मध्ये सादर झालेल्या बांठिया कमिशनच्या रिपोर्ट आधी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणानुसारच घेण्याचे निर्देश देखिल सर्वोच्च न्यायालयाकडून जारी करण्यात आले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन.के. सिंह यांच्या खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिलेत की, येत्या महिन्याभरात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणं आवश्यक आहे. जेणेकरून पुढील चार महिन्यांत राज्यातील सर्व प्रलंबित स्थानिक स्वराज्य निवडणुका घेता येतील. ओबीसी आरक्षणाशी संबंधित कुठल्याही याचिकेचा या निवडणुकांवर परिणाम होणार नाही. कारण येणारे निकाल हे न्यायालयाच्या अंतिम निकालावर अवलंबून असतील. आरक्षणाच्या मुद्द्यावर इतकी वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेणं हे योग्य नाही. भारतीय संविधानानं नागरीकांना दिलेल्या मुलभूत अधिकारांचं रक्षण होणंही तितकंच गरजेचं आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

कराडच्या यशवंत सहकारी बँकेच्या १४० कोटीपैकी १२७ कोटींचे कर्ज तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगवाकर व त्यांचा कुटूबियांच्या नावे ; चरेगाकरांनी काही बोगस कम्पन्या स्थापन केल्या ; अॅड. निलेश जाधव यांची पत्रकार परिषदेत माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या यशवन्त बँकेच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. त्यात अन्य बँकाही अडकल्या आहेत.  त्यांच्या नावाने ती कर्जे वितरीत केली आहेत.असे असतानाही बँकेचे संचालक व कर्मचारी जबरदस्तीने कर्ज वसुलीसाठी दबाव तंत्राचा वापर करीत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून शासनाने सीबीआय व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे योग्य चौकशी व्हायला हवी. त्यासाठी ठेवीदार व सभासद व फसलेले कर्जदार प्रयत्न करत आहेत. मात्र त्याचा फारसा प्रभाव पडताना दिसत नाही अशी माहिती ठेवीदार संघटनेचे अॅड. निलेश जाधव, एस. डी. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दरम्यान यशवंत सहकारी बँकेच्या १४० कोटीपैकी १२७ कोटींचे कर्ज बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगवाकर व त्यांचा कुटूबियांसह त्यांनी स्थापन केलेल्या बनावट संस्थांच्या नावावर आहेत. त्या संबधितांच्या नावावर व्यवहार झाल्याचे ऑडीट रिपोर्टही आहेत असेही एडव्होकेट जाधव म्हणाले  

यशवंत बँकेच्या विरोधात ठेवीदार, कर्जदार न्यायालयासहीत पोलिस व अन्य पातळ्यांवर लढा देत आहेत. त्याची माहिती देण्यासाठी अॅड. जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फसवणुक झालेले ठेवीदाार, कर्जदारही उपस्थित होते. 

अॅड. निलेश जाधव म्हणाले, सुमारे दिड वर्षापासून सातत्याने यशवंत बँकेचे सभासद, ठेवीदार व कर्जदार बँकेतील घोटाळ्याबाबत पाठपुरावा करीत आहोत. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री शाह यांची राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने दोन दिवसापूर्वी भेट झाली. त्यांच्याशी बैठक झालेल्या बैठकीत खासदार डॉ. कुलकर्णी, मी स्वतः व बँकेचे सभासद संजीव कुलकर्णी उपस्थित होतो. यावेळी गृहमंत्री शाह यांच्याबरोबर बँकेत झालेल्या प्रकाराबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. 

यशवंत सहकारी बँकेच्या १४० कोटीपैकी १२७ कोटींचे कर्ज बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगवाकर व त्यांचा कुटूबियांसह त्यांनी स्थापन केलेल्या बनावट संस्थांच्या नावावर आहेत. त्या संबधितांच्या नावावर व्यवहार झाल्याचे ऑडीट रिपोर्टही आहेत. त्यामुळे बँकेत आर्थिक घोटाळा झाला आहे, त्याची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय सहकारी मंत्री अमित शाह यांना भेटून केली आहे. यासाठी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचे महत्वाचे सहकार्य मिळाले आहे, गृहमंत्री शाह यांनीही दोन महिन्यात सिबीआयतर्फे त्या सगळ्याची चौकशी करू, असे अश्वासन दिले आहे, अशीही माहिती ठेवीदार संघटनेचे अॅड. निलेश जाधव, एस. डी. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Saturday, May 3, 2025

औषध देण्याच्या बहाण्याने तीन दिवसांचे बाळ पळवले ; मिरजेच्या शासकीय रुग्णालयात खळबळ ;

वेध माझा ऑनलाइन।
मिरजेच्या शासकीय रुग्णालयात तीन दिवसाच्या नवजात बाळाला अज्ञात महिलेनं पळवून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. दोन दिवस प्रसूती विभागात फिरुन रुग्णांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर आरोपी महिलेने बाळाला पळवल्याचं स्पष्ट झालं. रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये ही महिला कैद झाली असून पोलिस तपास करत आहेत. मात्र या प्रकारवरुन रुग्णालय प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

दोन दिवस रुग्णालयात मुक्तपणे फिरत होती
कविता समाधान अलदर (कोळे, ता.सांगोला, जि. सोलापूर) या महिलेला प्रसूतीनंतर मुलगा झाला होता. शनिवारी सकाळी 11 वाजता औषध देण्याच्या बहाण्याने एक अनोळखी महिला बाळ घेऊन पसार झाली. दोन दिवसांपासून ती महिला प्रसूती विभागात फिरत होती आणि नातेवाईकांचा विश्वास संपादन करत होती.  

सदरची महिला रुग्णालयात जाताना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. ती महिला दोन दिवस रुग्णालयात मुक्तपणे फिरत होती अशी माहिती समोर येत आहे. यामुळे या घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली आहे.
मिरज शासकीय रुग्णालयात तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अर्भक चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. प्रसूती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्भक चोरून नेले. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कविता समाधान आलदर ही महिला तीन दिवसापूर्वी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला. सिजेरियन प्रसूती झाली असल्याने आलदर यांच्यावर वार्डात उपचार सुरु होते. शनिवारी सकाळी कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना त्या ठिकाणी एक अज्ञात महिला आली.  बाळाला डोस द्यायचं असल्याचं सांगून तिने त्या बाळाला नेले. मात्र तासाभरानंतरही बाळ परत आले नसल्याने सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. 
बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीचा उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. रुग्णालयातील सीसीटीव्हीत संशयित महिलेचे चित्रण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरु केला आहे.

मुंबई इंडियन्स संघातील माजी खेळाडू शिवालीक शर्मावर बलात्कारासाठी गुन्हा दाखल ;

वेध माझा ऑनलाइन।
आयपीएल 2025 च्या लीग टप्प्यात 19 सामने आता बाकी आहेत आणि आता प्लेऑफची शर्यत मनोरंजक बनली आहे. सीएसके आणि राजस्थान दोन फ्रँचायझी दरम्यानचा प्रवास संपला आहे. आता टॉप -4 पर्यंत पोहोचण्यासाठी 8 संघांमध्ये जोरदार शर्यत चालू आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघातील माजी खेळाडू शिवालीक शर्मावर जोधपूरमधील कुडी भगतसानी पोलिस ठाण्यात बलात्कारासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2024 मध्ये शिवालीक शर्मा मुंबई इंडियन्सच्या टीमचा एक भाग होता आणि रणजी ट्रॉफीमध्ये बारोडाकडून खेळला आहे.

महिलेचे खळबळजनक आरोप
सहाय्यक पोलिस आयुक्त बोरानदा आनंदसिंग राजपुरोहित म्हणाले की, कुडी भगतसानी येथील रहिवासी असलेल्या महिलेने शिवालीक शर्मावर आरोप केला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये ती महिला आपल्या मित्रांसह बडोदा फिरायला गेली होती, तेव्हा तिची शिवालिकशी ओळख झाली. मैत्री हळूहळू वाढली आणि मग दोघांनी मोबाइलवर बोलू लागले. यानंतर, दोन्ही कुटुंबे ऑगस्ट 2023 मध्ये भेटली आणि 2023 मध्येच त्यांचा साखरपुडा झाला. मग 2024 शिवालीक शर्मा तिला भेटण्यासाठी जोधपूरला तिच्या घरी आला. जिथे कोणीही नव्हते, महिलेचा नकार असूनही, शिवालीकने लग्न केल्याचे आमिश दाखवले आणि मुलीवर बलात्कार केला. यानंतर, त्याच्याबरोबर बर्‍याच वेळा चुकीचे काम केले. असा आरोप आहे की, शिवालिकने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत गैरकृत्य केले. या काळात शिवालीकने मुलीला मेहंदीपूर बालाजी, जयपूर आणि उज्जैनला फिरायला घेऊन गेला. असा आरोप केला जात आहे की, लग्नाचे आमिष दाखवून शिवालीकने जोधपूरसह अनेक ठिकाणी महिलेशी संबंध ठेवले. 
गेल्या वर्षी जून रोजी, शिवालीक शर्माने लग्नाविषयी बोलण्यासाठी मुलीला वडोदराला बोलावले. जेव्हा ती तरूणी वडोदरात गेली तेव्हा शिवालिकचे वागणे बदललेले दिसत होते. त्यावेळी शिवालिकच्या आई-वडिलांनी तिला खुप सुनावले आणि त्रास पण दिला. त्यांनी सांगितले की, शिवालिक आता क्रिकेटपटू झाला आहे आणि त्याच्यासाठी अनेक मुलींचे प्रस्ताव येत आहेत. असे म्हणत त्यांनी तिच्याशी नाते तोडले आणि मुलीच्या कुटूंबालाही फोनवर माहिती देण्यात आली. इतकेच नव्हे तर त्याने मुलीला घराबाहेर ढकलले. आता पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

2024 मध्ये मुंबई संघात...
शिवालीक शर्माने रणजी ट्रॉफीमध्ये फलंदाजीने शानदार कामगिरी केली. 2018 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने 18 सामन्यांच्या 27 डावांमध्ये 43.48 च्या सरासरीने 3 शतके आणि 5 अर्धशतकांसह 1087 धावा केल्या. एकेकाळी तो भारतीय क्रिकेटचा उदयोन्मुख स्टार मानला जात असे. या कामगिरीच्या आधारे, मुंबई इंडियन्सने त्याला 2024 मध्ये 20 लाख रुपयांना खरेदी केले. पण, त्याने अलिकडच्या काळात क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे आणि या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला सोडले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदेबाबत अभिनेते नाना पाटेकर काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाईन।
राज्याच्या राजकारणात खूप कमी मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणताही ठपका नाही, त्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला.  काही मित्र असे असतात ज्यांच्याकडे पाहून समाधान वाटतं, एकनाथ शिंदे हे त्यापैकीच एक असल्याचं नाना पाटेकर म्हणाले. नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरण परिसरात 'गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार' ही योजना राबवली जात आहे. त्याचा शुभारंभ हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. 

नाना पाटेकर म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यापासून ओळखत आहे. आमची मैत्री जुनी आहे, मी त्याच्यांकडे काही मागत नाही. काही राजकीय मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणतेही ठपके नाहीत, त्यांच्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. शिंदेंनी मुख्यमंत्रिपद भूषवलं, पण कुणीही त्याच्याकडे बोट दाखवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांना सुद्धा मी जवळून ओळखतो. त्यांचे सुद्धा काम चांगले आहे."

शिवसेना नेते दीपक केसरकर यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत ! ; म्हणाले...मी कोणतीही निवडणूक हरलो नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. तुमचे कायम प्रेम ठेवा."

वेध माझा ऑनलाइन
शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. राजकारण हे निवडणुकांपुरतं असते, पदाला चिकटून राहणारा मी नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असं जाहीर वक्तव्य दिपक केसरकर यांनी केलं. सावंतवाडीतील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे मत व्यक्त केलं. त्यामुळे दीपक केसरकर राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

"निवडणुका आल्यावर विरोधकांना थोडी भीती वाटणार आहे. पण भीती बाळगू नका. मी काही पदाला चिकटून राहणार नाही. जनतेची शक्ती कोणी ओळखू शकत नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाही ती ओळखता आली नाही. त्यामुळे मला पक्ष बदलावा लागला. पण कुठेही गेलो तरी निवडून आलो."दीपक केसरकर म्हणाले की, "स्वार्थासाठी राजकारण करु नका, लोकांसाठी राजकारण करा. तसे केल्यास तुम्ही कोणतीही निवडणूक हरणार नाही. मी कोणतीही निवडणूक हरलो नाही. यापुढे निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. तुमचे कायम प्रेम ठेवा." 

माजी मुख्यमंत्र्यांची अजित पवारांनी मागितली माफी ; काय आहे बातमी?

 वेध माझा ऑनलाइन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात राज्याच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री  नारायण राणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाला मविआशी संबंधित माजी मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहिले नाहीत. शरद पवार यांच्याकडून निमंत्रण मिळालं नसल्यानं उपस्थित राहण्याचा प्रश्न नाही असं सांगण्यात आलं. याचाच धागा पकडत अजित पवार यांनी आपण माजी मुख्यमंत्री यांना बोलावल होतं. यदा कदाचित आमच्याकडून चुकून कुणाला माजी मुख्यमंत्री यांना निमंत्रण देण राहिलं असेल तर माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हटलं. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

गेली 35 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. राजीव गांधी यांच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिली संधी मिळाली. सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात काम केलं. शरद पवारांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पाहिला, असं अजित पवार म्हणाले. आज बरेच मुख्यमंत्री इथ नाहीत. मी अशोक चव्हाण यांचा कार्यकाळ पाहिला. विदर्भाला चांगल्या प्रकारे संधी मिळाली मराठवाड्यात देखील मान्यवरांना संधी मिळाली पश्चिम महाराष्ट्रात देखील संधी मिळाली. कोकणालही संधी मिळाली.  ६५ वर्षानंतर महिला मुख्यमंत्री झाली नाही. आम्हालाही वाटत महिला मुख्यमंत्री व्हायला हवी. केवळ उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही. 2004 साली ती संधी आली होती मात्र काय झालं हे प्रफुल पटेल यांना माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो हे मी नारायण राणे यांच्या रूपाने पाहिलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा मी पाहिलं नारायण राणे यांनी सभागृहात नुसतं मागे पाहिलं तरी सगळे शिवसेना आमदार चिडीचूप होऊन जायचे, असं अजित पवार म्हणाले. अशोक चव्हाण आणि मी एकाच बॅचचे आहोत, त्यांना कमी कार्यकाळ मिळाला, असं अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी प्रकाश जाधव यांची निवड

वेध माझा ऑनलाइन।
परिट समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन 9 मार्च 2025 रोजी शिर्डी येथे संपन्न झाले होते. यावेळी नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून खंडेराव कडलग यांची बिनविरोध निवड झाली होती. यावेळी राज्य कार्यकारिणी निवडीचे अधिकार प्रदेशाध्यक्ष कडलग यांना देण्यात आले होते. यावेळी प्रत्येक पदासाठी राज्यातून सुमारे पाच ते दहा अर्ज व शिफारशी आलेल्या होत्या. परीट समाजाची माजी प्रदेशाध्यक्ष, ज्येष्ठ पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शन व विचाराने या राज्याच्या निवडी करण्यात आल्या असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश जाधव मेहरबान हे गेली 14 वर्षे काम पाहत असून त्यांनी या काळात परीट समाजासाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानामुळे त्यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून समाजाचे काम राज्य पातळीवर दखलपात्र झाले असून समाजाने दिलेल्या संधीचे सोने करत समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन प्रकाश जाधव यांनी काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्य कार्यकारिणीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आले आहे. यावेळी बोलताना प्रकाश जाधव म्हणाले की महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे नूतन प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग, माजी प्रदेशाध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार   , राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे सर, कार्याध्यक्ष सनथ वाढाई (गोंदिया), प्रदेश महासचिव सुनील फंड (अहिल्या नगर), सहसचिव रवींद्र कणेकर (कोकण), सहसचिव रवींद्र अंदुरेकर (अकोला), कोषाध्यक्ष सुधीर पाटोळे (पुणे) यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवत प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्या विश्वासात पात्र राहून यापुढेही समाजासाठी काम करणार आहे. 
सातारा जिल्ह्यातील मला साथ देणारे आमचे मार्गदर्शक बबनराव शिंदे आप्पा,संत गाडगे महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष शामराव सोनटक्के,माजी अध्यक्ष भिकू राक्षे,दिलीप नलवडे, व जिल्हा पदाधिकारी व समाज बांधव 
यांचे बहुमोल मार्गदर्शन निश्चित राहील व यांच्या पाठिंब्यावरच समाजासाठी भरीव काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. 
या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते उदयसिंह पाटील, कराड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील व जिल्ह्यातील परीट समाजांनी या निवडीबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.