*यापुढे सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा म्हणाल्या कि,* प्रत्येक दुष्काळात माण तालुक्यात चारा छावण्या उघडल्या जातच होत्या या चारा छावण्यांना फक्त भेट देणे आणि दुष्काळग्रस्तांच्या भावना समजून घेणे फार वेगळी गोष्ट आहे. दुष्काळग्रस्तांच्या भावना तेच समजून घेऊ शकतात जो मनातून शेतकरी आहे यामुळेच त्यावेळी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी दुष्काळग्रस्तांची मने जाणून घेतली व पूर्ण दुष्काळ छावण्यांची पाहणी केली आणि त्यावर उपाय सुचवून निधी सुद्धा उपलब्ध केला. अत्यंत संवेदनशील मन असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी माणगंगा नदी प्रवाहित केली यासाठी त्यांनी त्या भागात उभारलेले साखळी बंधारे आजहि कार्यान्वित आहेत. तसेच त्या पुढे म्हणाल्या कि, महिलांचे सक्षमीकरण हेच माणदेशी फाउंडेशन चा उद्देश असल्याने त्यानुसारच संस्था कार्यरत आहे. आजच्या युगात महिलांना डिजिटल ज्ञान मिळण्यासाठी जवळपास १ लाख ग्रामीण भागातील महिलांना संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
*याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि,* माणदेशी फाउंडेशनचे महिला सक्षमीकरणाचे काम अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. महिला सक्षमीकरण हा शासनासाठी महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पहिले महिला धोरण मांडले त्यानंतर २००१ साली स्व विलासराव देशमुख यांनी दुसरे महिला धोरण मांडले व त्यानंतर तिसरे महिला धोरण २०१४ साली मी मुख्यमंत्री असताना मांडण्यात आले. या धोरणांमुळे उद्दिष्टे जरी मांडली जात असली तरी त्याचे ग्रामपंचायत पर्यंत अंमलबजावणी होते का ? तसेच आज खरंच महिलांना समानतेची वागणूक दिली जात आहे का? घरातील सर्व कामे न चुकता करणारी गृहिणी तिच्या कामाचे मूल्य तिला कधी मिळणार आहे का ? असे अनेक प्रश्न महिला सबलीकरणात येतात.महिलांना ५०% आरक्षण जरी दिले गेले असले तरी ते अधिकार नक्की काय आहेत ते प्रशिक्षण महिलांना दिल्याशिवाय समजणार नाही. समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर महिला सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. १८ व्या शतकात स्त्री शिक्षणाची बीज पेरणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे योगदान महिला सक्षमीकरणाकडे पहिले पाऊल होते.
या कार्यक्रमाचे आभार कराड दक्षिण महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment