वेध माझा ऑनलाईन।
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे कालपासुन मुंबईत आंदोलनास बसले आहेत. तेथील आंदोलनकर्त्यांच्या जेवण व पाण्याच्या सोयीसाठी भाकरी, पाणी जमा करण्याचे आवाहन कराडच्या मराठा समन्वयकांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत शहर परिसरातून २५ हजारांवर भाकरी-चपाती व जेवणाचे साहित्य जमा झाले कराडच्या दत्त चौकातुन शनिवारी रात्री मुंबईकडे ते सर्व साहित्य रवाना करण्यात आले.
मुस्लीम समाजासह इतर अन्य समाजांनीही भाकरी व जेवणाचे साहित्य आणुन येथील दत्त चौकात थांबलेल्या समन्यवकांकडे जमा केले. हे सर्व साहित्य आज मुंबईला रवाना करण्यात आले.
No comments:
Post a Comment