वेध माझा ऑनलाइन।
मनोज जरांगेंना आझाद मैदानात पुढील दोन आठवडे आंदोलन करता येणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालायने दिला आहे. त्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावर टीका केली.
जरांगे माजला आहे, त्याची भाषा मग्रुरीची आहे, त्याला अटक झाल्यानंतरच कायदा कळेल अशा शब्दात सदावर्दे यांनी टीका केली. मनोज जरांगे, तू आता आंदोलन करु शकत नाहीस असं आव्हानही सदावर्तेंनी दिलं.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईंमध्ये आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. पण त्यापूर्वीच मनोज जरांगेंना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नसल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.
No comments:
Post a Comment