राज्यातील मराठा आंदोलकांनी मुंबई धडक दिली असून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू झाले आहे. या उपोषणाला महाविकास आघाडीतील अनेक नेते, आमदार, खासदार भेट देऊन आपली भूमिका मांडत आहेत. शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल आणि आजही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट देत त्यांच्यासमवेत चर्चा केली. विशेष म्हणजे आजच्या भेटीत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी फोनवर बोलणंही करुन दिलं. विशेष म्हणजे दीड ते 2 मिनिटे मनोज जरांगे पाटील यांचं उद्धव ठाकरेंसोबत फोनवर बोलणं झालं आहे. त्यामुळे, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय बोलणं झालं याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र, मराठा आंदोलकांच्या मुंबई राहण्यासाठी आणि सोयी-सुविधेबाबत चर्चा झाल्याचे समजते.
No comments:
Post a Comment