वेध माझा ऑनलाइन। चळवळीतील एका साध्या कार्यकर्त्या महिलेपासून महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या उपसभापती पदापर्यंत डॉ. निलम गोऱ्हे यांचा आजवरचा सामाजिक, राजकीय प्रवास आहे. सुरुवातीच्या काळात युवक क्रांती दल, भारिप बहुजन महासंघ, शिवसेना असा मोठा सामाजिक, राजकीय पटावर त्यांनी आजवर नेतृत्व केले आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाला तशी मोठी प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आजवरचा त्यांचा जीवनपट आता पुस्तक रुपात आला असून, ‘ऐस पैस गप्पा नीलमताईंशी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.
महाराष्ट्रात 70 ते 80 च्या दशकात महिला अत्याचाराविरधातील लढे, समाजवादी चळवळ, दलित चळवळींच्या माध्यमातू सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात निलम गोऱ्हे यांनी काम करायला सुरुवात केली. सुरुवातील समाजवादी चळवळीशी संबंधित असलेल्या युवक क्रांती दलात त्या कार्यकर्त्या म्हणून सहभागी झाल्या. महिला अत्याचार असोत की सामाजिक सांस्कृतिक लढे निलमताई या लढ्यात अग्रभागी असत. युवक क्रांती दलातून निलम गोऱ्हे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला. दलित चळवळीत देखील त्यांनी काम केले.स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी महिला अत्याचारावरील प्रश्नांना वाचा फोडली. पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची महिला आघाडी, प्रवक्त्या, विधान परिषद आमदार, विधान परिषदेच्या उपसभापती असा त्यांचा आजवरचा प्रवास. शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आजवरचा हा सगळा सामाजिक राजकीय पट त्याच्यां पुस्तकात वाचायला मिळणार आहे.
No comments:
Post a Comment