वेध माझा ऑनलाइन।
ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ला यावर संसदेत चर्चा होत आहे. सोमवारपासून (28 जुलै) चालू झालेल्या या चर्चेत साधक-बाधक चर्चा होत आहे. हे ऑपरेशन राबवताना सत्ताधाऱ्यांनी केलेली चूक, मोदी सरकारचे धोरण यावर विरोधक बोट ठेवत आहेत. तर सत्ताधारीही विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. दरम्यान, आज (29 जुलै) खासदार तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारची लक्तरं काढली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरवर बोलतना मोदींमध्ये इंदिरा गांधीच्या तुलनेत 50 टक्के जरी हिंमत असेल तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत असं जाहीर करावं, असं थेट आव्हानच दिलंय.
पहलगावरील हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. भारताने हवाई हल्ल्यात अनेक तळ उद्ध्वस्त केले होते. यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले, असा दावा केंद्र सरकारकडून केला जातो. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही भारतावर हवाई हल्ले केले होते. दरम्यान, दोन्ही देशांत युद्ध भडकण्याची शक्यता लक्षात घेता अमेरिकेने मध्यस्थी केली होती. तसेच एकमत झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी झाल्याचे जाहीर केले होते. हाच मुद्दा राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केला. त्यांनी मोदींना थेट आव्हान दिले.
No comments:
Post a Comment