Thursday, June 9, 2022

आज राज्यात 2813 नव्या रुग्णांची नोंद, तर 1047 रुग्ण बरे होऊन घरी परतले; सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील ; आज कोरोनाच्या एका मृत्यूची नोंद...

वेध माझा ऑनलाइन - राज्यात जून  महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे.  गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा दोन हजारापेक्षा  जास्त आहे. तर आज राज्यातील  कोरोना रुग्णसंख्या दररोज गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे.  गुरूवारी राज्यात तब्बल 2 हजार 813  रुग्ण आढळून आले आहेत.  तर मुंबईत 1702 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब  आहे.
आज राज्यात 2813 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 1047 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 1702  रुग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात आज कोरोनाच्या एका मृत्यूची नोंद झाली आहे. 

आज एका कोरोना मृत्यूची नोंद
राज्यात आज एकूण 1047 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,42, 190  जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.98 टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज एका कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. 

सक्रिय रुग्णसंख्या वाढली
राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 11571 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 7998 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 1984  इतके सक्रिय रुग्ण आहेत.

No comments:

Post a Comment