वेध माझा ऑनलाईन।
महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या थेट वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चुलत्या-पुतण्याचं मला नका सांगू असे म्हणत त्यांनी एका कार्यकर्त्याला थांबवले आणि यावर बोलण्यास महत्त्व न देण्याचे आवाहन केले. माध्यमांना २४ तास कार्यक्रम चालवण्यासाठी असे विषय लागतात, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या बदललेल्या भूमिकेवर बोलताना अजित पवारांनी सांगितले की, पूर्वी साहेब (शरद पवार) त्यांच्या चुकांवर पांघरूण घालायचे, पण आता सर्व काही स्वतःच सांभाळावे लागते. पक्षात कोणीही वाईट विधान करू नये आणि जनमानसात चांगली प्रतिमा असलेल्या व्यक्तींनाच पक्षात घ्यावे, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
दरम्यान पुणे येथे अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी एका स्वच्छता करणाऱ्या आजीबाईंच्या ई-केवायसी संबंधित तक्रारीची दखल घेतली. सुरुवातीला काहीसे संतापलेले असले तरी, त्यांनी आजींची समस्या शांतपणे ऐकून घेतली आणि डीबीटीच्या पैशांसाठी ई-केवायसी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment