Thursday, June 18, 2026

कृष्णा कारखाना निवडणुकीत परिवर्तनाची हाक; अर्चनाताई मोहिते यांच्या नेतृत्वाला सभासदांचा पाठिंबा द्या – शशिकांत शिंदे

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तनाची लाट निर्माण होत असून, सभासदांनी अर्चनाताई मोहिते यांना चेअरमनपदी निवडून देत नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. बोरगाव येथे कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी अर्चनाताई मोहिते, माजी चेअरमन अविनाश मोहिते, माजी व्हाइस चेअरमन सुरेश पाटील, उमेदवार महेश पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, बंडानाना जगताप, गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, २०१५ च्या निवडणुकीत प्रशासनाचा प्रभाव पडला नसता तर संस्थापक पॅनेलचा विजय निश्चित होता. सध्या विविध राजकीय पक्ष व गट एकत्र येत असल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये परिवर्तनाची भीती निर्माण झाल्याचे दिसून येते. अर्चनाताई मोहिते या सक्षम महिला नेतृत्व असून त्यांना संधी देण्याची वेळ आता आली आहे, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महिला सक्षमीकरणाचा पुरस्कार करणाऱ्यांनी महिला उमेदवाराला बिनविरोध संधी द्यायला हवी होती, अशी टिप्पणीही त्यांनी केली. कृष्णा कारखाना आणि विधान परिषद निवडणुकीचे निकाल सातारा-सांगलीच्या राजकीय ताकदीचा संदेश राज्यभर पोहोचवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्चनाताई मोहिते यांनी सभासदांना भावनिक साद घालत आपण सामान्य शेतकरी कुटुंबातील स्त्री म्हणून त्यांच्यासमोर उभे असल्याचे सांगितले. कारखान्याची आर्थिक व सहकारी परंपरा मजबूत ठेवण्यासाठी न्याय्य व पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी संस्थापक पॅनेलच्या पाच वर्षांच्या कामकाजाची तुलना सध्याच्या अकरा वर्षांच्या कारभाराशी करण्याचे आवाहन केले. सभासदांसाठी दरवर्षी १२० किलो मोफत साखर, एकरी ७५०० रुपये पाणीपट्टी, ऊस बियाणे उपलब्धता, मयत सभासदांच्या शेअर्सचे जलद हस्तांतरण, बैठी पाणीपट्टी माफी आणि एफआरपीपेक्षा अधिक ऊसदर देण्याची भूमिका त्यांनी पुन्हा मांडली.
बंडानाना जगताप यांनी कृष्णा कारखान्यावरील कर्जाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. राजारामबापू समूहाने विविध संस्था उभारल्या असताना कृष्णा कारखान्यावर मोठे कर्ज का आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच जयवंत शुगर कारखान्याचे उदाहरण देत विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
स्वाती मदने यांनी ही निवडणूक जनशक्ती आणि धनशक्ती यांच्यातील संघर्ष असल्याचे सांगितले. बालाजी जगताप यांनी महिला चेअरमन निवडून देण्याची ऐतिहासिक संधी सभासदांसमोर असल्याचे नमूद केले. प्रमोद पाटील यांनी सभासदांमध्ये वाढत्या असंतोषाचा उल्लेख केला, तर सचिन कदम यांनी जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, अपक्ष उमेदवार महेश पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला. तसेच लवंडमाची परिसरातील अनेक सभासदांनी पॅनेलमध्ये प्रवेश केला.
यावेळी उदय शिंदे यांनी कारखान्याच्या कारभारावर टीका करत सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच जयंतराव पाटील यांनी उघड पाठिंबा दिला नसला तरी त्यांची भूमिका सभासदांना समजल्याचे सूचक वक्तव्य केले. आगामी राजकीय परिवर्तनाचा केंद्रबिंदू वाळवा तालुका ठरेल, असा दावा त्यांनी केला.
महेश पवार यांनी वाळवा तालुक्यातील सभासद मतदानातून परिवर्तन घडवून आणतील आणि कारखान्यातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवतील, असा विश्वास व्यक्त केला.

Wednesday, June 17, 2026

कराड/प्रतिनिधी : - 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना केवळ ऊस उत्पादक न ठेवता महाराष्ट्रातील सर्वांत समृद्ध शेतकरी बनविण्याचे ध्येय समोर ठेवून कारखान्याच्या १७ पाणीपुरवठा योजनांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सोलर फिडरच्या माध्यमातून विजबिलमुक्ती, कमी पाणीपट्टी, ठिबक सिंचनाचा व्यापक वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकरी १५० ते २०० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काले (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन दयानंद पाटील, ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते, गीतांजली पाटील, उमेदवार नयन पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितले की, २०१५ मध्ये सहकार पॅनेलकडे कारखान्याची सत्ता आली तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. कामगारांचे वेतन देण्यासाठीही निधी उपलब्ध नव्हता आणि तब्बल ५८ कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र पुढील ११ वर्षांच्या कालावधीत कारखान्याची आर्थिक घडी सावरण्यात यश आले. सभासदांना ७८ कोटी रुपयांची साखर मोफत देण्यात आली, तर थकबाकी शून्यावर आणण्यात यश मिळाले. विरोधकांकडे आजही विकासाचा कोणताही अजेंडा नसून, त्यांच्या मनगटीवर बसलेले १०० कोटींचे भूत उतरवण्यासाठीच त्यांना सत्ता हवी असल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला काही लोकांनी तडा दिल्याची टीका करत त्यांनी सभासदांना विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.

कारखान्याच्या भविष्यातील योजनांचा ऊहापोह करताना त्यांनी वाकुर्डे योजनेवर ४५ मेगावॅट क्षमतेचा सोलर फिडर उभारण्याचा मानस व्यक्त केला. या माध्यमातून वीजनिर्मिती, तसेच ऊर्जास्वावलंबन साध्य करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पावसाळी अधिवेशनात यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी, कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेताना, यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने प्रगतीची वाटचाल केल्याचे सांगितले. आपल्या कार्यकाळात सभासदांच्या ठेवींमध्ये वाढ झाली आणि त्यांना चांगला परतावा मिळाला, अशी या सुवर्णकाळाची आठवण त्यांनी करून दिली. कारखाना चालविण्यासाठी अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकरी सभासदांना “एकदा झालेली चूक पुन्हा करू नका,” असे आवाहन केले. 

ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते यांनी, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने स्थैर्य आणि प्रगती साधल्याचा दावा केला. संस्थापक पॅनेल आणि कारखान्याच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनातील दृष्टिकोनात मोठा फरक असल्याचे सांगत त्यांनी सहकार पॅनेलला मिळालेल्या रयत संघटनेच्या पाठिंब्याचे स्वागत केले. 

व्हाईस चेअरमन दयानंद पाटील यांनी, संस्थापक पॅनेलच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारखान्याची आर्थिक स्थिती खालावण्यास त्यांचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला. तोडणी-वाहतूक निधी, कर्जवाढ आणि आर्थिक व्यवहारांबाबत विरोधकांनी मौन का बाळगले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मनोगतात गीतांजली पाटील यांनी शेतकरी आणि सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली दूरदृष्टी भोसले नेतृत्वाकडे असल्याचे सांगितले. डॉ. सुरेश सुकरे यांनी, गुऱ्हाळही न चालवलेले लोक निवडणुकीत पॅनल टाकत असल्याची टीका केली. तर डॉ. अतुल भोसले यांनी ऐन उन्हाळ्यात वाकुर्डे योजनेचे पाणी देऊन शेतकऱ्यांना तारल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे आभार अशोक माळी यांनी मानले. सभेस सुनीता शेवाळे, गोविंद गावडे, ॲड आत्माराम पाटील, प्रमोद पाटील, वैभव थोरात, बाळासाहेब गलांडे, शंकरराव थोरात, मारुती पाटील, प्रकाश पाटील, सुनील यादव आदींसह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

चौकट : 

प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विरोधी पॅनेलवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. विरोधकांनी कारखान्याच्या विकासापेक्षा विविध घोटाळ्यांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळविल्याचा दावा करत त्यांनी पाला-पाचोळा घोटाळा, खाजगी साखर विक्री व्यवहार, तोडणी-वाहतूक घोटाळा, इमारतींवरील कर्जे, बोगस कामगार मानधन, वाहन खर्च, विश्रामगृह खर्च आणि इंधन वापरातील अनियमितता यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला. कारखान्याच्या हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ जपणाऱ्या नेतृत्वापासून सभासदांनी सावध राहावे, असे आवाहन करत त्यांनी निवडणुकीत विकास आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

Tuesday, June 16, 2026

अविनाश मोहितेंनी अक्षरशः कारखान्याच्या पाला-पाचोळ्यात सुद्धा घोटाळा केलाय... ; त्यांचे इतर घोटाळे वेगळेच...अतुल भोसलेंचा घणाघात ;


वेध माझा ऑनलाईन।
काल काले येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विरोधी पॅनेलवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. अविनाश मोहितेंनी कारखान्याच्या विकासापेक्षा विविध घोटाळ्यांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळविल्याचा दावा करत त्यांनी कारखान्याच्या पाला-पाचोळ्यात सुद्धा घोटाळा केलाय इतर घोटाळे केले ते वेगळेच असा घणाघात डॉ अतुलबाबा यांनी काले येथील सभेत केला.

तसेच त्यांनी खाजगी साखर विक्री व्यवहार, तोडणी-वाहतूक घोटाळा, इमारतींवरील कर्जे, बोगस कामगार मानधन, वाहन खर्च, विश्रामगृह खर्च आणि इंधन वापरातील अनियमितता यांसारख्या मुद्द्यांचाही यावेळी उल्लेख केला. कारखान्याच्या हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ जपणाऱ्या नेतृत्वापासून सभासदांनी सावध राहावे, असे आवाहन करत डॉ अतुलबाबांनी निवडणुकीत विकास आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देण्याचे यावेळी आवाहन केले.

ते म्हणाले...यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना केवळ ऊस उत्पादक न ठेवता महाराष्ट्रातील सर्वांत समृद्ध शेतकरी बनविण्याचे ध्येय समोर ठेवून कारखान्याच्या १७ पाणीपुरवठा योजनांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सोलर फिडरच्या माध्यमातून विजबिलमुक्ती, कमी पाणीपट्टी, ठिबक सिंचनाचा व्यापक वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकरी १५० ते २०० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काले (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन दयानंद पाटील, ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते, गीतांजली पाटील, उमेदवार नयन पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना पुढे सांगितले की..., 
२०१५ मध्ये सहकार पॅनेलकडे कारखान्याची सत्ता आली तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. कामगारांचे वेतन देण्यासाठीही निधी उपलब्ध नव्हता आणि तब्बल ५८ कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र पुढील ११ वर्षांच्या कालावधीत कारखान्याची आर्थिक घडी सावरण्यात यश आले. सभासदांना ७८ कोटी रुपयांची साखर मोफत देण्यात आली, तर थकबाकी शून्यावर आणण्यात यश मिळाले. विरोधकांकडे आजही विकासाचा कोणताही अजेंडा नसून, त्यांच्या मनगटीवर बसलेले १०० कोटींचे भूत उतरवण्यासाठीच त्यांना सत्ता हवी असल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला काही लोकांनी तडा दिल्याची टीका करत त्यांनी सभासदांना विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.

कारखान्याच्या भविष्यातील योजनांचा ऊहापोह करताना त्यांनी वाकुर्डे योजनेवर ४५ मेगावॅट क्षमतेचा सोलर फिडर उभारण्याचा मानस व्यक्त केला. या माध्यमातून वीजनिर्मिती, तसेच ऊर्जास्वावलंबन साध्य करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पावसाळी अधिवेशनात यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी, कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेताना, कारखाना चालविण्यासाठी अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकरी सभासदांना “एकदा झालेली चूक पुन्हा करू नका,” असे आवाहन केले. 

ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते यांनी, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने स्थैर्य आणि प्रगती साधल्याचा दावा केला. संस्थापक पॅनेल आणि कारखान्याच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनातील दृष्टिकोनात मोठा फरक असल्याचे सांगत त्यांनी सहकार पॅनेलला मिळालेल्या रयत संघटनेच्या पाठिंब्याचे स्वागत केले. 

कार्यक्रमाचे आभार अशोक माळी यांनी मानले. सभेस सुनीता शेवाळे, गोविंद गावडे, ॲड आत्माराम पाटील, प्रमोद पाटील, वैभव थोरात, बाळासाहेब गलांडे, शंकरराव थोरात, मारुती पाटील, प्रकाश पाटील, सुनील यादव आदींसह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




कराडला सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशीर्वचन सोहळा उत्साहात

वेध माझा ऑनलाईन।
रुद्राक्ष धारण करणे म्हणजे एक कोटी गायी दान केल्याचे पुण्य प्राप्त होणे होय. इष्टलिंग हे केवळ दागिना नसून शिवतत्त्वाशी जोडणारा जिवंत दुवा आहे. श्रद्धेने इष्टलिंगाची पूजा केल्यास तेहतीस कोटी देवतांच्या पूजेइतके पुण्य लाभते असे प्रतिपादन केदार पिठाचे जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी केले.

कराड येथील कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर केदार जगद्गुरु भिमाशंकरलिंग महास्वामी यांच्या उपस्थितीत सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशिर्वचन सोहळा उत्साहात झाला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवलिंग शिवाचार्य, डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य म्हैसाळकर, महादेव शिवाचार्य वाईकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कराडच्या भूमीत धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्कारांचीही समृद्ध परंपरा जपली जात आहे. या परंपरेचेच दर्शन घडविणारा वीरशैव लिंगायत समाजाचा सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशीर्वचन सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विशेषतः नव्या पिढीला आपल्या धर्मातील तत्त्वज्ञान, संस्कार आणि आचार-विचारांची ओळख करून देणारा हा सोहळा ठरला.

भस्माचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, शरीरावरील विविध ठिकाणी लावले जाणारे भस्म हे केवळ धार्मिक प्रतीक नसून मानवी शरीर हेच एक ब्रह्मांड असल्याची जाणीव करून देणारे तत्त्वज्ञान आहे. एका बाजूला कुबेराची संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला भस्म ठेवले तरी भस्माचे महात्म्य श्रेष्ठ आहे असा उल्लेख धर्मग्रंथांत आढळतो, असेही त्यांनी नमूद केले.

 डॉ. शिवयोगी शिवाचार्य स्वामी (म्हैसाळ) म्हणाले की, संपत्ती, नाव, कीर्ती आणि मान-सन्मान माणूस आयुष्यात मिळवू शकतो; मात्र जीवनाचा शेवटचा प्रवास करताना त्याच्यासोबत केवळ त्याचे संस्कार आणि शिवभक्तीच जाते. ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे तो जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.

वीरशैव लिंगायत धर्मातील इष्टलिंग पूजा ही केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धी, समता, श्रमप्रतिष्ठा आणि शिवभक्ती यांचे प्रतीक मानली जाते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने धर्माबद्दल आत्मीयता बाळगून त्यामागील तत्त्वज्ञान समजून घेतले पाहिजे, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

विनायक विभुते,अनिल खुंटाळे यांच्या हस्ते महास्वामी यांचा सत्कार करण्यात आला.राजू शेटे, शिवानंद डुबल, भरत शेटे,चंद्रशेखर नखाते, विजय पट्टणशेट्टी या ५ दांपत्यांचे हस्ते इष्टलिंग महापूजेला सुरुवात करण्यात आली.नंदकुमार बटाणे,संजय शेटे, सुनील महाजन, धनंजय विभूते,सुनील चिंगळे, विजय भागवत, राजू खलीपे, गुरुनाथ कचरे,अशोक संसुद्दी, दिलीप चिंचकर,राजन धोकटे,गणेश शेटे यांनी उपस्थित शिवाचार्यांचे व मान्यवरांचे स्वागत केले.प्रा.प्रमोद सुकरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.


Monday, June 15, 2026

खासदारांच्या फुटीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...जे जातील त्यांना पश्चाताप होईल - ...

वेध माझा ऑनलाईन
पक्षातील खासदारांच्या संभाव्य फुटीवर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार बंड करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हे खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता याच पक्षफुटीबाबत दिल्लीमध्ये मोठ्या हलाचाली वाढल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या या पहिल्या प्रतिक्रियेचे अनेक अर्थ काढले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी खासदरांच्या फुटीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना जायचं आहे, त्यांनी खुशाल जावं, त्यांच भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही. पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जो सोडून जाईल, त्यांना एक दिवस नक्की पश्चात्ताप होईल, असे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी सहन करायला शिकावे, असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळेदेखील ठाकरे यांच्या पक्षातील फुटीबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण ;

वेध माझा ऑनलाईन 
कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना आंदोलनादरम्यान काही अज्ञातांकडून मारहाण झाल्याची व त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे, जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडली आहे. आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने अचानक अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला केला. त्या तरुणाने अभिजीत यांना एकामागून एक कानशि‍लात लगावल्या. या घटनेनंतर अभिजीत यांच्या समर्थकांनी तात्काळ संबंधित तरुणाला पकडले आणि त्याला मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांचे काही खासदार नवा गटा स्थापन करण्याच्या तयारीत !;

वेध माझा ऑनलाईन।
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. कालच ठाकरे यांच्या खासदारांची ठाकरे यांच्या खासदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर आमचे सर्वच खासदार आमच्यासोबत आहेत. ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. ऑपरेशन टायगर काहीही नाही. आता आम्हीच ऑपरेशन लांडगा सुरू करणार आहोत, असे राऊत म्हणाले होते. परंतु आता ठाकरे यांचे काही खासदार थेट नवा गटा स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, असे म्हटले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंचे काही खासदार हे लोकसभा अध्यक्षांना एक पत्र देण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचे काही खासदार हे दिल्लीमध्ये शिंदे यांच्या पक्षाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना भेटले आहेत. त्यामुळे लवकरच हे खासदार नवा गट स्थापन करू शकतात,