Saturday, July 4, 2026

कृष्णा नदीचा रंग हिरवा झाल्याच्या प्रश्नावर 'वेध माझा'चा धडाकेबाज पाठपुरावा; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव; : अधिकृत अहवाल येईपर्यंत वेध माझा ने पाठपुरावा सुरू ठेवावा ; नागरिकांची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होत असल्याच्या गंभीर आणि पर्यावरणाशी निगडित प्रश्नावर सातत्याने वृत्तांकन करून हा विषय जनतेसमोर प्रभावीपणे मांडल्याबद्दल 'वेध माझा' चे नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. लोकहिताचा प्रश्न धैर्याने आणि सातत्याने मांडणाऱ्या या पत्रकारितेमुळे प्रशासनावर योग्य तो दबाव निर्माण होत असून, नागरिकांनाही वस्तुस्थितीची माहिती वेळेवर मिळत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की... 
संवेदनशील पण काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या कृष्णा नदीच्या रंगबदलाच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडल्यामुळे हा विषय जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. लोकहिताची जाणीव ठेवून केलेली निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याचबरोबर नागरिकांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही मांडल्या आहेत. 
कृष्णा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची अंतिम जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडे थेट तक्रार दाखल करून अधिकृत व ठोस उत्तर मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच नदी संवर्धनासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून व्यापक जनमत तयार करावे, जेणेकरून प्रशासनाला या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही, असेही मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक महाविद्यालये किंवा पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी परीक्षण करून वैज्ञानिक पुरावेही उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलामागील नेमके कारण स्पष्ट होईपर्यंत, संबंधित यंत्रणांनी अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करेपर्यंत आणि दोषींवर आवश्यक कारवाई होईपर्यंत या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवावा, अशी अपेक्षा नागरिकांनी 
'वेध माझा' कडून व्यक्त केली आहे.

कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय,?तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे,? तो जनतेपासून का लपविला जात आहे? "लोकप्रतिनिधी' या प्रश्नावर गप्प का? जनतेत चर्चा; वेध माझा चा पाठपुरावा चालूच राहणार...

 वेध माझा ऑनलाईन।
: कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा झाल्याची घटना समोर येऊन अनेक आठवडे उलटले. या काळात नागरिकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले, पर्यावरणप्रेमींनी तपासणीची मागणी केली आणि 'वेध माझा'ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, संबंधित विभागांकडून अद्यापही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. परिणामी, हा विलंब नेमका कशामुळे होत आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय,?

त्या पाण्याचा तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे,?

तो जनतेपासून का लपविला जात आहे? 

आणि या विलंबाची जबाबदारी कोण स्वीकारणार? 

 लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प का?

या सगळ्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत या प्रकरणावरील संशय कायम राहणार आहे.

आणि 'वेध माझा' या संपूर्ण प्रकरणाचा पुढेही पाठपुरावा करत राहील आणि तपासणी अहवाल, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक घडामोड जनतेसमोर आणत राहील.

दरम्यान या प्रकरणात संबंधित विभागांना नदीच्या पाण्याचे नमुने घेण्याची मागणी करण्यात येत आहे. 
मात्र, ती तपासणी करण्यात आली का? 
आली असेल तर त्या नमुन्यांचे निष्कर्ष काय आले? 
तपासणी पूर्ण झाली की नाही ? 
कोणत्या प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली? 
आणि अहवाल कोणाकडे प्रलंबित आहे?  याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांसमोर अद्यापही ठेवण्यात आलेली नाही. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अशा संवेदनशील विषयात प्रशासनाची ही भूमिका अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.

सध्या पावसाळा सुरू असून नदीत विविध नाले, सांडपाणी आणि शेतीमधून वाहून येणारे पाणी मिसळत आहे. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक असताना अधिकृत माहितीचा अभाव चिंतेत भर घालत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या नदीबाबत पारदर्शकता ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, नदीकाठच्या काही नागरिकांनी अद्यापही काही ठिकाणी पाण्यावर हिरवट थर किंवा रंगातील बदल दिसत असल्याचा दावा केला आहे. या दाव्यांची शासकीय स्तरावर पडताळणी झाली आहे का, याचाही खुलासा झालेला नसल्यामुळे रंगबदलाची कारणे नैसर्गिक आहेत की प्रदूषणाशी संबंधित आहेत?, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

या संपूर्ण प्रकरणात आणखी एक बाब प्रकर्षाने समोर येत आहे. कराड परिसरातील लाखो नागरिकांचे पिण्याचे पाणी, शेती आणि दैनंदिन जीवन कृष्णा नदीवर अवलंबून असताना या विषयावर लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांकडून संयुक्त पत्रकार परिषद किंवा अधिकृत निवेदनही जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे माहितीच्या अभावातून अफवा आणि संभ्रम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे तपासणी अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियमित परीक्षण करून त्याचे अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणीही पुढे येत आहे.

कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय, तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे, तो जनतेपासून का लपविला जात आहे आणि या विलंबाची जबाबदारी कोण स्वीकारणार? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत या प्रकरणावरील संशय कायम राहणार आहे.
आणि 'वेध माझा' या संपूर्ण प्रकरणाचा पुढेही पाठपुरावा करत राहील आणि तपासणी अहवाल, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक घडामोड जनतेसमोर आणत राहील.

कराडच्या बुधवार पेठेतील मंडई उठवा... अन्यथा पालिकेच्या आवारात बसून भाजी विक्री करु ; सामाजिक कार्यकर्ते अभिषेक भोसले यांचा पालिका प्रशासनाला निवेदन देऊन इशारा ;

वेध माझा ऑनलाईन
कराडमधील बुधवार पेठेतील साठे इमारत मुख्य रस्त्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा ते नगरपालिका गेट या परिसरात रस्त्यावर भाजी मंडई बसूदेऊ नये या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते अभिषेक भोसले यांनी नुकतेच पालिका मुख्याधिकारी याना दिले यावेळी त्या परिसरातील असंख्य रहिवासी उपस्थित होते........

सदर निवेदनात म्हटले आहे की
आम्ही सर्व रहिवासी अर्जदार आपणास कळवितो की, बुधवार पेठ मधील वर नमूद केलेल्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडील कायमचे रहिवासी आणि व्यावसायिक (भाडे तत्वावर / मालकी हक्क) आहे.
कराड नगरपरिषद कराड यांनी भाजी मंडई ही वर नमूद केलेल्या रस्त्यावर बसू नये कारण या ठिकाणी मुख्य रस्ता, रहिवासी आणि व्यावसायिक गाळे, बाजार पेठ मुख्य रस्ता व मेडिकल आहेत व ते शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत.
त्यामुळे जे या वरील रस्त्यामध्ये येताना-जाताना सदरची मंडई येथे भरत असल्यामुळे त्यासोबत गाड्यांवरून महिला आणि पुरुष व्यक्ती भाजी मंडईतील बाजार घेत असल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम होत आहे याकडे नगरपरिषद कराड मधील संबंधित विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर दरवाजामध्ये शेतकरी/व्यापारी बाजार घेऊन, टेम्पो/बोलेरो/कृजर या सारख्या मोठ्या गाड्या घेऊन बसल्यामुळे घरातील व्यक्तींना ये जा करता येत नाही. भाग हा गावठाण असल्यामुळे अडचणींचा रस्ता आहे त्याभागात जर अचानक सिलेंडर स्फोट किंवा आग लागली तर अग्निशामक गाडी येणे खूप कठीण होते आणि इमर्जन्सी पेशंट आला तर पेशंटचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आपण सदर प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी अन्यथा नगरपरिषदेच्या आवारात भाजी विक्री करण्यासाठी आम्ही बसू असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे 


Friday, July 3, 2026

श्री. अभिषेक भोसले

office_of_abhishek bhosale

+919096665511

युवा उद्योजक समाजसेवक

प्रति

मा. मुख्याधिकारी साहेब

कराड नगरपरिषद कराड

दि: 29-06-2026

विषय :- बुधवार पेठ मधील साठे इमारत मुख्य रस्ता ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा ते नगरपालिका गेट यांच्या समोरील रस्त्यावर भाजी मंडई बसून न देणे बाबत........

महोदय,

आम्ही सर्व अर्जदार आपणास कळवितो की, बुधवार पेठ मधील वर नमूद केलेल्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडील कायमचे रहिवासी आणि व्यावसायिक (भाडे तत्वावर / मालकी हक्क) आहे.

कराड नगरपरिषद कराड यांनी भाजी मंडई ही वर नमूद केलेल्या रस्त्यावर बसू नये कारण या ठिकाणी मुख्य रस्ता, रहिवासी आणि व्यावसायिक गाळे, बाजार पेठ मुख्य रस्ता व मेडिकल आहेत व ते शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत.

त्यामुळे जे या वरील रस्त्यामध्ये येताना-जाताना सदरची मंडई येथे भरत असल्यामुळे त्यासोबत गाड्यांवरून महिला आणि पुरुष व्यक्ती भाजी मंडईतील बाजार घेत असल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम होत आहे याकडे नगरपरिषद कराड मधील संबंधित विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर दरवाजामध्ये शेतकरी/व्यापारी बाजार घेऊन, टेम्पो/बोलेरो/कृजर या सारख्या मोठ्या गाड्या घेऊन बसल्यामुळे घरातील व्यक्तींना ये जा करता येत नाही. भाग हा गावठाण असल्यामुळे अडचणींचा रस्ता आहे त्याभागात जर अचानक सिलेंडर स्फोट किंवा आग लागली तर अग्निशामक गाडी येणे खूप कठीण होते आणि इमर्जन्सी पेशंट आला तर पेशंटचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आपण सदर प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी.


Thursday, July 2, 2026

कृष्णा नदीच्या रंगबदलाचे गूढ कायम; तपासणी अहवाल कुठे अडकला?अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून मौन; कराड उत्तर व दक्षिणचे आमदार सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार का? परिसरात जोरदार चर्चा सुरू..

वेध माझा ऑनलाईन
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा झाल्याची घटना समोर येऊन अनेक दिवस उलटले आहेत. या काळात नागरिकांनी वारंवार चिंता व्यक्त केली, पर्यावरणप्रेमींनी तपासणीची मागणी केली आणि 'वेध माझा'नेही या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, आजतागायत संबंधित विभागांकडून तपासणीचा अधिकृत अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे या अहवालाचे नेमके काय झाले, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.

दरम्यान कराड उत्तर व दक्षिणचे आमदार सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लोकांच्या जीवनाशी निगडित असलेला हा मुद्दा मांडणार का? ही चर्चा देखील परिसरात जोरदार सुरू आहे

सध्या पावसाळा सुरू असून नदीत गढूळ पाण्याचा प्रवाह वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते अशा काळात नदीत वाहून येणारे सांडपाणी, रासायनिक घटक किंवा इतर प्रदूषक मिसळल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी होणे अत्यावश्यक असताना संबंधित यंत्रणांची शांत भूमिका नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहे.
कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. शेती, पशुपालन आणि विविध उद्योगही या नदीवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत नदीच्या रंगबदलाचे कारण तातडीने शोधून नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप अधिकृत निष्कर्ष जाहीर न झाल्याने प्रश्न अनुत्तरितच आहेत.

नदीकाठच्या काही भागांमध्ये आजही पाण्यावर हिरवट थर दिसत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. हा रंगबदल नैसर्गिक कारणांमुळे आहे की शैवालांची वाढ, रासायनिक प्रदूषण अथवा सांडपाण्यामुळे झाला आहे, याबाबत अधिकृत खुलासा नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

या संपूर्ण प्रकरणात आणखी एक बाब लक्षवेधी ठरत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या विषयावर कराड उत्तर व कराड दक्षिण मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी अद्याप ठोस सार्वजनिक भूमिका घेतलेली दिसून आलेली नाही. प्रशासनाकडून तपासणी अहवाल तातडीने जाहीर करण्यासाठी किंवा संबंधित विभागांची बैठक घेण्याबाबतही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तरीत्या तपासणी करून संपूर्ण अहवाल जनतेसमोर ठेवावा. जर पाण्याची गुणवत्ता सुरक्षित असेल तर ते स्पष्ट करावे आणि प्रदूषण आढळल्यास त्यामागील कारणांसह जबाबदारांवर कारवाई करावी.

आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे—कृष्णा नदीच्या रंगबदलाचा तपास पूर्ण झाला आहे का? झाला असेल तर अहवाल सार्वजनिक का केला जात नाही? आणि झाला नसेल तर इतक्या संवेदनशील विषयात झालेल्या विलंबाला जबाबदार कोण? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत नागरिकांच्या मनातील संशय कायम राहणार, हे निश्चित आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा 'वेध माझा'  सातत्याने पाठपुरावा करणार असून, प्रशासनाकडून होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहे

Wednesday, July 1, 2026

कराड परिसरातील नागरिकांच्या संयमाची परीक्षा :पावसाळ्यात प्रदूषणाचा धोका वाढण्याची भीती; प्रशासनासह कराड दक्षिण - उत्तरचे लोकप्रतिनिधी अजूनही गप्प का ? ; कृष्णा नदीच्या रंगबदलाचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा झाल्याची घटना समोर येऊन अनेक दिवस उलटले असतानाही संबंधित यंत्रणांकडून अद्याप तपासणीचा अधिकृत अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण, त्याचा पिण्याच्या पाण्यावर होणारा परिणाम आणि भविष्यातील उपाययोजना याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका कधी मांडली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून, या विषयाचा 'वेध माझा' सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

सध्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याने नदीत गढूळ पाण्याचा प्रवाह वाढला आहे. अशा परिस्थितीत नदीतील संभाव्य प्रदूषणाचे स्वरूप अधिक गंभीर होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाच्या पाण्यासोबत विविध नाले, सांडपाणी आणि इतर घटक नदीत मिसळत असल्याने जलगुणवत्तेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.

कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. याच नदीवर शेती, पशुपालन आणि विविध उद्योग अवलंबून असल्याने या प्रश्नाकडे केवळ पर्यावरणीय नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, नदीकाठच्या काही भागांमध्ये आजही पाण्यावर हिरवट थर दिसत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. मात्र या रंगबदलामागे शैवालांची वाढ, रासायनिक प्रदूषण, सांडपाणी की अन्य कोणते कारण आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अफवा आणि तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणावर कराड उत्तर आणि कराड दक्षिण मतदारसंघातील लोकप्रतिनिधींकडून अद्याप ठोस भूमिका मांडण्यात आलेली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 

पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तरीत्या नदीच्या पाण्याचे नमुने तपासून सविस्तर वैज्ञानिक अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, तसेच आवश्यक असल्यास नागरिकांसाठी सावधगिरीच्या सूचना जारी कराव्यात, अशी मागणी पुन्हा केली आहे.
कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण, त्याचा पिण्याच्या पाण्यावर होणारा परिणाम आणि भविष्यातील उपाययोजना याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका कधी मांडली जाते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून, या विषयाचा 'वेध माझा' सातत्याने पाठपुरावा करणार आहे.

दरम्यान नदीच्या प्रश्नावर प्रशासनाकडून तातडीने उत्तरदायित्व निश्चित करून तपासणी अहवाल जाहीर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कृष्णा नदीच्या रंगबदलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरउपशीर्षक :अनेक दिवस उलटूनही तपासणी अहवाल गुलदस्त्यात; 'वेध माझा'चा पाठपुरावा कायम

वेध माझा ऑनलाईन ।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होण्याची घटना समोर येऊन अनेक दिवस उलटले तरी संबंधित यंत्रणांकडून अद्याप कोणताही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता दिवसेंदिवस वाढत असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.दरम्यान सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे निर्माण होणाऱ्या गढूळ पाणी पाण्यातील प्रदूषण वाढीस कारणीभूत ठरण्याची शक्यता बोलली जात आहे तरीही या प्रकाराबाबत कराड दक्षिण आणि उत्तरच्या आमदारांचे मौन असणे ही बाब सध्या चर्चेत आहे

कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. याच नदीवर शेती, पशुपालन आणि विविध उद्योगही अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग अचानक बदलल्यानंतर तातडीने वैज्ञानिक तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जनतेसमोर येणे अपेक्षित होते. मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती न दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे.
नदीकाठच्या अनेक भागांत आजही पाण्यावर हिरवट थर दिसत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. काही ठिकाणी पाणी निळसर-हिरव्या रंगाचे दिसत असल्याने जलप्रदूषण, शैवालांची वाढ, रासायनिक घटकांचे प्रमाण किंवा सांडपाण्याचा परिणाम अशा विविध शक्यता व्यक्त होत आहेत. मात्र यापैकी नेमके कारण कोणते, याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही.
विशेष म्हणजे, हा विषय सातत्याने चर्चेत असतानाही संबंधित विभागांकडून संयुक्त पाहणी, जनजागृती किंवा नागरिकांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. लोकप्रतिनिधींनीही या विषयावर ठोस भूमिका घेऊन प्रशासनाकडून उत्तरदायित्वाची मागणी करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासून सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा, तसेच नदीतील रंगबदलामागील नेमके कारण जाहीर करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.
दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर विषयाचा 'वेध माझा'कडून सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून, प्रशासन याबाबत नेमकी कोणती भूमिका घेते आणि तपासणी अहवाल कधी जाहीर होतो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

आज रविवारची बातमी🙏