Wednesday, September 9, 2026

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले... डीजेमुळे 40 टक्के ऐकू कमी येतय ; जळगावातील एका कार्यक्रमात संवाद साधताना सांगितली आपबिती ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यभरात डीजेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे. अनेक जिल्ह्यांनी डीजे बंदी केली आहे. मात्र, पुण्यासारख्या शहरात डीजे बंदीचा घोळ अद्याप कायम आहे. या डीजेमुळे कुणा कुणाला काय काय अनुभव आलाय याचे किस्सेही समोर येत आहेत. राज्याच्या मंत्री मेघना बोर्डिकर यांनी त्यांच्या सख्ख्या चुलत भावाचा डीजेमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. तर सरकारमधील दुसरे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही डीजेमुळे त्यांना 40 टक्के ऐकू कमी येत असल्याचं सांगितलंय. गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात संवाद साधताना आपबिती सांगितली आहे.

माझ्या पुतण्याचं लग्न होतं. डीजे लावण्यात आलेला होता. मला लोकांनी सांगितलं तुम्ही नाचा आणि मला नाचण्यासाठी ओढलं. त्यामुळे पुतण्याच्या लग्नात नाचलो. पण सप दिशी डीजेचा आवाज माझ्या कानावर आदळला. या डीजेच्या आवाजामुळे मला एका कानाने चाळीस टक्के ऐकू येणे बंद झाले. काहींनी मला कानाला मशीन लावायला सांगितलं. पण बहिरं वाटतं म्हणून मी मशाीन लावली नाही. त्यामुळे येत्या गणेशोत्सात तरुणांनी डीजे नाही लावला तर चांगलं होईल, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. पाटील यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कराडमध्ये कोल्ड मिक्सचा वापर करून खड्यांची दुरुस्ती ; ;

वेध माझा ऑनलाईन।
गणेशोत्सवाच्या पार्मूमीवर येथील नगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरूस्ती सुरू केलीआहे. पावसाळ्यामुळे डांबराऐवजी कोल्डमिक्स डांबराने खड्डे बुजवण्यात येत आहेत. मंगळवारी सायंकाळीपाटण कॉलनीनजीक याचा शुभारंभनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्याहस्ते झाला.

राजेंद्रसिंह यादव म्हणालेकी नगरपालिकेने प्रथमच खडेबुजवण्यासाठी कोल्ड मिक्सडांबराचाकेलाआहे. पावसाळ्यामुळे नेहमीच्यापद्धतीने खड्े बुजवण्यात अडचणीयेतात, कोल्ड मिक्स डांबरानेपावसाक्यातही व भर पावसात खड्डे बुजवता येतात. त्यामुळे शहरातील संपूर्ण मिरवणूक मार्ग कोल्डमिक्स डॉंबराने खड़डेमुक्त करण्यातयेणार आहे. टप्याटप्याने संपूर्णशहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यातयेणार आहेत.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष प्रतापरावसाकुंखे, लोकशाही आघाडीचेअध्यक्ष जयंतकाका पाटील, माजीनगराध्यक्ष जयवंतराव पाटील,सभापती अल्ताफ शिकलगार,अख्तर आंबेकरी, रूपाली माने,अरूणा पाटील, आशा मुळे,विजयसिंह यादव, फारूकपटवेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुखजयवंतराव शेलार, मुख्याधिकारीप्रशांत व्हटकर, अभियंता चव्हाणयांच्यासह पालिकेचे अधिकारी वकर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, September 8, 2026

अभिजीत दिपकेंना मोठा धक्का, भाजप नेत्यानं कोर्टात खेचलं; सीजेपीपुढं नवं संकट

वेध माझा ऑनलाईन।
सोशल मीडियावरील वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यासह प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याविरोधात गौरव भाटिया यांनी 2 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

 सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही या खटल्यामध्ये प्रतिवादी करण्यात आलं आहे. दरम्यान, मानहानीचा हा दावा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. आज 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी दोन कोटींच्या मानहानीचा दावा ठोकल्याचं सांगितलं आहे.
त्यांनी लिहिलं की, “जेव्हा मर्यादा ओलांडून तुम्ही आरोप करता, तेव्हा कायदा त्यासाठी कामी येतो. 2 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला उद्या दिल्ली उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी घेतला केला जाणार आहे. ना सोशल मीडियावरची कुरघोडी आणि ना कुठले शाब्दिक युद्ध. फक्त तथ्य, पुरावे आणि कायदा त्याचे काम करणार आहे. त्यामुळे आता सत्याची पडताळणी जिथे व्हायला हवी तिथेच होईल, म्हणजेच न्यायालयात.”
काय आहे  प्रकरण?
दरम्यान, गौरव भाटिया आणि सौरव दास यांच्यामधील सोशल मीडियावरील वाद पाच सप्टेंबरला सुरु झाला. यामध्ये AI-निर्मित बनावट ग्राफिकद्वारे भाटिया यांच्या नावावर स्वातंत्र्य भारद्वाज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. या ग्राफिकमध्ये भारद्वाज यांना ‘दिमागी नक्षल’ आणि ‘जातिवादी’ म्हटल्याचं भासवण्यात आल्याचा दावा भाटिया यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी माफी मागण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला होता.
दरम्यान, सौरव दासकडून पोस्ट हटवण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाटियांना आव्हानही दिलं होतं. त्यांनी सांगितलेलं की, मला वाटलेलं की हे सगळं एआयने बनवलं असेल. पण तरीही मी भाजप नेत्यांना या गोष्टी पुन्हा बोलण्याचं आव्हान देतो. मला नाही वाटतं असं करण्यात त्यांना काही अडचण असेल.
दरम्यान, सौरव यांच्याकडून ही पोस्ट डिलिट केल्यानंतर गौरव भाटिया यांनी म्हटलं होतं की, “पोस्ट फक्त 83 मिनिटांमध्ये हटवली, माफी मागितली नाही. त्यामुले पुढील काळात गुन्हा दाखल करु शकतो. त्यांनी पुढे सांगितलं की, तुम्ही बदनामी करणार, प्रोपोगेंडा सेट करणार आणि मग पोस्ट डिलिट करुन पळून जाणार, हे सगलं एवढं सोप नाही.” त्यामुळे आता या सर्व प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वेध माझा ऑनलाईन।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप केला. शिंदेंचे दोन मंत्री आणि दोन प्रवक्ते आपले आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. मुंबईकडे निघाल्यानंतर मराठ्यांवर हल्ला करून मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या माणसांचा पण हाच प्रयत्न आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. 

मुंबईत एकाही मराठा आंदोलकाचे रक्त निघाले तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद झालाच पाहिजे. पोलिसांनी हल्लाच केला तर पळू नका, चेंगराचेंगरी होते. येत्या १२ तारखेला राज्यभरातील मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

शिवसेना ठाकरे गटाचे १६ नगरसेवक गोत्यात?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर मुंबईत नवे आव्हान उभे राहिले आहे. दोन नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर आता ठाकरे गटाच्या आणखी १६ नगरसेवकांच्या विजयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी या नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. निवडणूक अर्जात जात प्रमाणपत्र, संपत्तीची माहिती, शिक्षण आणि गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित माहिती लपवल्याचे आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये मतमोजणीवेळी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत संगनमत केल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या १६ नगरसेवकांचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार. मुंबईतील या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींमुळे ठाकरे गटासमोरील अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

डॉ. अतुलबाबांच्या सूचनेनंतर शाहू चौक रस्त्याचे खड्डे बुजवले ;

वेध माझा ऑनलाइन।
शहरातील शाहू चौक ते जुना कोयना पूल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व दुरुस्तीचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सूचना दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम मिळालेल्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती सुरू केली आहे.

शाहू चौक ते जुना कोयना पूल हा शहरातील वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर शासकीय विश्रामगृह आहे. त्यामुळे अनेक महनीय व्यक्तींची ये जा या रस्त्यावरून होत असते. शिवाय जुन्या कोयना पुलापासून शहरात येण्याचा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ जास्त असते. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना होत होता. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत होती.
 या रस्ता नव्याने कारपेट करण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुमारे 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र पावसाळ्यामुळे हे काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान शहरात बीपीसीएल कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार असल्याने शहरातील रस्त्यांची कामे नगरपालिकेने थांबवली  आहेत. मात्र या रस्त्यावर गॅस पाईपलाईन टाकणार नसल्याने पावसाळा थांबल्यानंतर तातडीने रस्ता कारपेट करण्याचे काम सुरू आहे होणार आहे. तुर्तास वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबांनी ठेकेदारास या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक काम सुरू झाले होते. मात्र पाऊस आल्याने हे काम थांबवण्यात आले होते. मंगळवारी पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने हे काम सुरू करण्यात आले.
 नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय वाटेगावकर , नगरसेवक शिवाजी पवार नगरसेवक आशुतोष डुबल यांनी कामाची पाहणी केली.

सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शासनाने ४.५० कोटींचा निधी मंजूर करावा; आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची मागणी ;


वेध माझा ऑनलाइन।
कराड शहरासह तालुक्यातील तसेच लगतच्या ग्रामीण व डोंगरी भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र असलेल्या स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरणासाठी शासनाने ४.५० कोटींचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज मुंबई येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

कराड येथील स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, या रुग्णालयाची मुख्य इमारत तसेच आवारातील इतर इमारती जुन्या झाल्या असून, त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड व झीज झाली आहे. इमारतीच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती होते. तसेच भिंतींना तडे गेले असून, जुने झालेले विद्युत व प्लंबिंगचे जाळे आणि स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था यामुळे रुग्ण, डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अशावेळी या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, तातडीची दुरुस्ती, वॉटरप्रूफिंग, सिव्हिल व इलेक्ट्रिकल नूतनीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व कामांसाठी शासनाकडून ४.५० कोटींचा निधी तातडीने मंजूर करून उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. भोसले यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. तसेच रुग्णालयाच्या इमारतीची सुरक्षितता आणि तेथील आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी या कामांना प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.

यावेळी आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी कराड उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाच्या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन, आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांना दिली.

अतुलबाबा भोसले यांची प्रतिक्रिया ; 
कराड येथील स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयावर कराड शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. त्यामुळे  या रुग्णालय इमारतीच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निधी मिळावा, याबाबत आरोग्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच हा प्रश्न मार्गी लागून रुग्णांना अधिक सुरक्षित व चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.





डॉ. अतुलबाबांच्या सूचनेनंतर शाहू चौक रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरू


शहरातील शाहू चौक ते जुना कोयना पूल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व दुरुस्तीचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सूचना दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम मिळालेल्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती सुरू केली आहे.

शाहू चौक ते जुना कोयना पूल हा शहरातील वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर शासकीय विश्रामगृह आहे. त्यामुळे अनेक महनीय व्यक्तींची ये जा या रस्त्यावरून होत असते. शिवाय जुन्या कोयना पुलापासून शहरात येण्याचा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ जास्त असते. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना होत होता. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत होती.
 या रस्ता नव्याने कारपेट करण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुमारे 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र पावसाळ्यामुळे हे काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान शहरात बीपीसीएल कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार असल्याने शहरातील रस्त्यांची कामे नगरपालिकेने थांबवली  आहेत. मात्र या रस्त्यावर गॅस पाईपलाईन टाकणार नसल्याने पावसाळा थांबल्यानंतर तातडीने रस्ता कारपेट करण्याचे काम सुरू आहे होणार आहे. तुर्तास वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबांनी ठेकेदारास या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक काम सुरू झाले होते. मात्र पाऊस आल्याने हे काम थांबवण्यात आले होते. मंगळवारी पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने हे काम सुरू करण्यात आले.
 नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय वाटेगावकर , नगरसेवक शिवाजी पवार नगरसेवक आशुतोष डुबल यांनी कामाची पाहणी केली.