Wednesday, May 13, 2026

वेध माझा ऑनलाईन
साहित्य, संस्कृती आणि लोककलेचा संगम अनुभवण्याची संधी कराडकरांना २४ मे रोजी मिळणार आहे. येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने स्व.सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्व.सौ. वेणूताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सोमवार पेठेतील नव्या श्री कृष्णाबाई प्रीतिसंगम सांस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता या संमेलनाचा शुभारंभ होणार आहे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी चेअरमन राजन वेळापुरे, उपाध्यक्ष अनिल सोनावणे, संचालक अरुण जाधव, संजीव मोहिरे, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे, तसेच समन्वयक प्रा. अशोककुमार चव्हाण उपस्थित होते.

या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत भूषविणार आहेत. उद्घाटक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथील कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून कराड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सूरज जमदाडे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार साळुंखे सहभागी होणार आहेत.

संमेलनात दिवसभर विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कथाकथनकार हिम्मत पाटील यांचे कथाकथन रंगणार आहे. त्यानंतर रेडिओ व दूरदर्शनवरील लोकप्रिय शाहीर कळसकर भेदीक शाहीर मंडळ, कवठे यांचा शाहिरी कार्यक्रम सादर होईल. पुढील सत्रात प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांचा ‘गझल रंग’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. तर समारोपानंतर प्रसिद्ध दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या दमदार दंगल कवितांनी संमेलनाची सांगता होणार आहे. कराड, पाटण आणि परिसरातील सुमारे ४०० साहित्यप्रेमी या संमेलनास उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी ८.३० ते १० या वेळेत संमेलनस्थळी नोंदणी करावी. नोंदणीनंतर उपस्थितांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेस संचालक डॉ. संतोष मोहिरे, शरदचंद्र देसाई, सुरेश भंडारी, राजेंद्रकुमार यादव, निरंजन मोहिरे, डॉ. जयवंत सातपुते, जयाराणी जाधव, सीमा विभुते, सुरेश कोळेकर, पारस विजापुरे तसेच संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

कराडमध्ये “सेवा अभियान” उपक्रम; शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना मिळणार गती ; आमदार डॉ अतुल भोसले

वेध माझा ऑनलाईन।
आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए कराडमध्ये आले आहेत शिक्षकांच्या प्रश्नाबाबत असणारे शासन स्तरावरचे काही प्रश्न तसेच आणखी इतरही महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे नक्कीच कराडमध्ये “सेवा अभियान” उपक्रम अंतर्गत शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना गती मिळणार आहे आणि याचा नक्कीच फायदा या ठिकाणच्या शिक्षक मतदार संघासाठी महायुतीला नक्कीच होईल असा विश्वास आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे

शिक्षक व पदवीधर मतदार संघातील विविध प्रश्नांवर संबंधित लोकांशी चर्चा झाल्यानंतर आमदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

कराडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पी. ए. संतोष साखरेंनी पत्रकार परिषद बोलावली...पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करताच पत्रकार परिषदेतून त्यांनी चक्क पळच काढला...!!

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधरांची प्रलंबित शासकीय कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सेवा अभियान कार्यक्रमाचे आयोजन आज हॉटेल फर्न, कराड येथे करण्यात आले होते यानिमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक पत्रकारांशी संवाद साधणार असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली...आणि  पत्रकारांच्या प्रश्नाच्या माऱ्यापुढे उत्तरे देता न आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे पी ए साखरे हे तिथून अक्षरशः पळून गेले... 

त्याचे झाले असे की...
आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए श्री संतोष साखरे पत्रकार परिषद घेणार  असा निरोप होता...शिक्षकांच्या प्रश्नावर ते बोलणार असंही सांगण्यात आले होते...त्यांच्याबरोबर शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते...प्रत्यक्षात पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा मात्र पत्रकारांच्या प्रश्नावर त्या संघटनेचे कोणीही पदाधिकारी किंवा स्वतः रवींद्र चव्हाण यांचे पी ए काही बोलू शकले नाहीत...त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडिमाराचा अंदाज घेत त्याठिकाणहुन पळून जाणे पसंत केले...

काही महिन्यांपूर्वी साताऱ्या जिलह्यात काही शिक्षकांनी विद्यार्थीनीशी केलेल्या काही गैर वागणुकीबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या... त्यावर चर्चा देखील झाल्या...मात्र तुमची कोणतीच भूमिका  त्यावेळी स्पष्ट दिसली नाही.. याबाबत तुम्ही आज भूमिका स्पष्ट करा...जसे... तुम्ही शिक्षकांच्या प्रश्नावर बोलता तसे शिक्षक चुकीचे वागतात त्यावरही तुम्ही बोललं पाहिजे...असे पत्रकारांनी विचारले असता...पत्रकार परिषदेत उपस्थित रवींद्र चव्हाण यांच्या पी ए ना याबाबत काहीच माहीत नाही असे दिसून आले...काहीही माहिती नसताना उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी तिसरच बरळत त्यांनी थातूरमातूर उत्तरे द्यायला सुरुवात केली...प्रॉपर काही माहिती नसताना माहिती घेऊन त्याविषयी बोलू...अशी भूमिका न घेता उगाचच फालतू बडबड करत त्यांनी वेळ घालवायला सुरुवात केली...हे पत्रकारांच्याही लक्षात आले...

त्यानंतर...
सातारा जिल्ह्यात व राज्यात दिव्यांग शिक्षकांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून  आरोग्य विभागाने  दिव्यांग ठरवलेले शिक्षक आता ठरवले आहेत.   अनेक शिक्षक या विरोधात कोर्टात दाद मागत असून याकडे प्रशासन ठोस उपाययोजना करता दिसत नाही. त्यामुळे वर्षभरापासून या कोर्टात गेलेल्या शिक्षकांना बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागली आहे. या शिक्षकांच्या बदलीबाबत प्रशासनाने ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही... याहीविषयी त्यांना विचारले असता...याबाबतही ते काही उत्तर देऊ शकले नाहीत...पुन्हा काहीतरी फालतू बडबड करू लागताच... ही पत्रकार परिषद घेतलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या पी ए ना याबाबतही काहीच माहिती नाही हेही पत्रकारांच्या लक्षात आले...मग... काही माहिती नसताना उगीचच वेळ जात नाही... म्हणून पत्रकारांशी संवाद साधत आहात का? शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या मार्केटिंगसाठी तुम्ही इथे आलाय का? असे अनेक विषय त्याठिकाणी चर्चेत येऊ लागतच... संतोष साखरे यांनी थातूरमातूर कारण सांगून पत्रकार परिषदेमधून अक्षरशः पळ काढला... 

त्यावेळी पत्रकारांनी त्यांना अडवून...तुम्ही पत्रकार परिषद बोलावली आहे...आणि तुम्हीच अस मधून पळून जाताय... हे बरोबर नाही...असे त्याना सुनावले असता.... फालतू कारण सांगून ते निघून गेले...

ज्या विषयी पत्रकार परिषद घेतली आहे...त्या विषयीची प्रॉपर माहिती आपल्याला नाही...यापुढे आपण पत्रकारांना उत्तर देऊ शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि म्हणूनच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए चक्क पत्रकारांसमोरच पळून गेले...त्यामुळे ही पत्रकार परिषद त्याठिकाणीच थांबली...
आज


सातारा जिल्ह्यात व राज्यात दिव्यांग शिक्षकांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून  आरोग्य विभागाने  दिव्यांग ठरवलेले शिक्षक आता ठरवले आहेत.   अनेक शिक्षक या विरोधात कोर्टात दाद मागत असून याकडे प्रशासन ठोस उपाययोजना करता दिसत नाही. त्यामुळे वर्षभरापासून या कोर्टात गेलेल्या शिक्षकांना बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागली आहे. या शिक्षकांच्या बदलीबाबत प्रशासनाने ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही

Tuesday, May 12, 2026

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांचा कराड नगरपालिकेतर्फे मानपत्र देऊन सन्मान ;


वेध माझा ऑनलाईन।
ज्येष्ठ साहित्यिक  श्रीनिवास कुलकर्णी यांना कराड नगरपालिकेतर्फे मानपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व शहरातील आजी माजी नगरसेवक मुख्याधिकारी उपस्थित होते 

श्रीनिवास कुलकर्णी यांना राज्य शासनाच्या वतीने साहित्य क्षेत्रातील मानाचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेदेण्यात आला आहे. यानिमित्त कराड नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत कृलकर्णी यांच्या अभिनंदनाचा ठराव करून मानपत्र देण्याचा निर्णय घेतला होता.

मंगळवारी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे,लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी शहरातील आजी- माजी नगरसेवकांसाहित श्रीनिवास कृलकर्णी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन मानपत्र प्रदान केले, स्मृतिचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. 

सन्मानाबद्धल प्रतिक्रिया व्यक्त करताना उदयन कुलकणी म्हणाले की, वडीलश्रीनिवास कलकर्णी हे नोकरीच्या निमित्ताने कराडला आले. १९६५ साली त्यांची डोह ही कादंबरी प्रकाशित झाली, ती बाचून यशवंतराव चब्हाण यांनी त्यांनाबोलावून घेतले, पूढ़े हा स्नेह वाढत गेला. कुलकर्णी यांच्या कादंबरीस पहिला राज्यपुरस्कार मिळाला, त्याविळी तत्कालीन नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांनी त्यांचानगरपालिकेतर्फ सत्कार केला. आज पुन्हा नगरपालिकेतर्फ सत्कारा होत आहे.यशबंतराव च्हाण याच्यामुळेच बडिलांना धर मिळाले कराडशी आमचा ऋणकायम राहिला आहे.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, श्रीनिवास कुलकर्णीं हे कराड शहराच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य ठेवा आहेत. त्यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी शहरासाठीगौरवास्पद आहे. उत्तम साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या. शहरातील दोन साहित्यसंमेलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता, त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदानमूषणावह असून शासनानेही त्यांचा उचित सन्मान केला आहे.कराड नगरपालिकेनेही शहराच्या या सुपुत्रास मानपत्र देऊन गौरविले आहे.

 सौरभ पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले

नीट पेपरफुटीचे नाशिक कनेक्शन आलं समोर ; राज्यात खळबळ ; परीक्षा रद्द ;

वेध माझा ऑनलाईन
नीट पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलं आहे. केरळ आणि राजस्थान पाठोपाठ आता नाशिक कनेक्शन देखील असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नीट पेपर ३ मे रोजी पार पडला, मात्र तो पेपर ४२ तास आधीच विद्यार्थ्यांच्या व्हाट्स अप आणि टेलिग्रामवर आला होता.600 मार्कांचा पेपर एकदम तंतोतंत असल्याचं समोर आलं होतं. यामुळे आता पेपर लीक प्रकरणी नीट परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

हे नाशिक कनेक्शन आहे काय ?

फुटलेल्या पहिल्या पेपरची कॉपी ही नाशिकमध्ये पोहोचली आणि तिथून हरियाणापर्यंत गेल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकमध्ये ही पेपरफुटी झाली पहिली प्रत तयार झाली आणि इतर ठिकाणी या प्रती पोहोचवण्यात आल्या होत्या.नाशिकमध्ये पुन्हा हे कांड समोर आल्यानं खळबळ उडाली आहे  3 मे रोजी झालेल्या पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा झाली. राजस्थानमध्ये परीक्षेच्या एक दिवसआधी एक गेस पेपर बाहेर आला. गेस पेपरमधील तब्बल 125 प्रश्न नीट पेपरमध्ये आले. फिजिक्स आणि बायोलॉजी विषयांतील अनेक प्रश्न जुळले.
परीक्षेच्या दिवशीच राजस्थानच्या सीकर पोलिसात तक्रार दाखल केली. विद्यार्थ्यांनी पुराव्यांसह एनटीएकडे तक्रार केली. एनटीएकडून राजस्थानच्या डीजीपींना पत्र देण्यात आलं. स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपनं चौकशी सुरू केली.
विद्यार्थ्यांच्या मोबाईल चॅट आणि पुराव्यांची चौकशी केली. या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी 10 हून अधिक लोक ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.


कराडात किरण मुळे मित्र परिवाराच्या वतीने प्रभाग 10 मधील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव ; विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व भेटवस्तू प्रदान ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या वॉर्ड क्रमांक 10 मधील दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भाजपचे कार्यकर्ते व आमदार अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक किरण मुळे मित्र परिवाराच्या वतीनेभेटवस्तू व सन्मानपत्र देऊन या विद्यार्थ्यांचा  गौरव करण्यात आला. 
यावेळी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देण्यात आली.
तुमचे हे यश असेच उंच भरारी घेत राहो,
आणि आयुष्यातील प्रत्येक ध्येय तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करो, अशा शुभेच्छा देखील किरणं मुळे मित्र परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या
किरण मुळे मित्र परिवाराने राबवलेल्या या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे