Wednesday, August 26, 2026

मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाकेंसाठी मोठा झटका ; मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही आंदोलन करण्यास मनाई ; राज्याच्या गृह विभागाचे तातडीचे आदेश :

वेध माझा ऑनलाइन
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबर रोजी मुंबईत महामोर्चा आयोजित केला आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांना आंदोलनापूर्वीच मोठा झटका बसला आहे. राज्याच्या गृह विभागाने तातडीचे आदेश काढून मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही आंदोलन करण्यास मनाई केली आहे. आझाद मैदानातही एका दिवसाच्यावर आंदोलन करता येणार नाही. तसेच आखून दिलेल्या वेळेतच आंदोलन करता येणार आहे. त्यामुळे जरांगे आणि हाकेंसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

राज्याच्या गृह विभागाने मुंबईतील आंदोलनाबाबतचे आदेश काढले आहेत. आझाद मैदान वगळता मुंबईत कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे आणि जाहीर सभा घेण्यास राज्याच्या गृह विभागाने पूर्णपणे बंदी घातली आहे. आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी दिली जाईल. त्यानंतर मैदानात थांबल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

नेपाळमध्ये महापुरामुळे हाहाकार! तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; त्यामध्ये 105 भारतीयांचा समावेश ; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त ;

वेध माझा ऑनलाइन।
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे खळबळ उडाली आहे. या पुरामुळे रसुवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर समोर आलेल्या व्हिडिओंमधून या नैसर्गिक आपत्तीची भीषणता दिसून येत आहे.

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे खळबळ उडाली आहे. या पुरामुळे रसुवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर समोर आलेल्या व्हिडिओंमधून या नैसर्गिक आपत्तीची भीषणता दिसून येत आहे. काही ठिकाणी शांत वाहणाऱ्या नद्या काही क्षणांतच रौद्र रूप धारण करताना दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी पूल, रस्ते, वाहने आणि इमारती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाताना दिसत आहेत. आतापर्यंत या पुरामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पुरात 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले आहेत.

105 भारतीयांसह 400 लोक बेपत्ता
नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 31 तीर्थयात्रींचा समावेश असून ते मानसरोवर यात्रेसाठी जात होते. ही माहिती नेपाळ टुरिझम बोर्डाने दिली आहे. बोर्डाकडून बेपत्ता झालेल्या भारतीय पर्यटकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. नेपाळ टुरिझम बोर्डाच्या माहितीनुसार, पुरात एकूण सुमारे 400 पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 291 परदेशी पर्यटक आहेत, तर 90 हून अधिक पर्यटक नेपाळचे नागरिक आहेत. नेपाळ न्यूजच्या माहितीनुसार, बेपत्ता पर्यटकांपैकी 37 जण भारतीय वंशाचे एनआरआय आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचाही बेपत्ता पर्यटकांमध्ये समावेश आहे.

Tuesday, August 25, 2026

मलकापूर रस्ता : भूसंपादनाआधीच टेंडर; उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या भूमिकेवर जागेचे मिळकतदार वसीम सय्यद यांचे प्रश्नचिन्ह ; न्यायिक लढा देण्याचा इशारा ;

वेध माझा ऑनलाईन।
मलकापूर नगरपरिषद हद्दीतील वाखानवस्ती ते कराड-ढेबेवाडी रस्ता (एमडीआर-५५, किमी ७/२०० ते ८/०००) या प्रस्तावित रस्त्याच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू असताना संबंधित जमिनींचे भूसंपादन अद्याप पूर्ण झाले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सुमारे ७ कोटी ८२ लाख ८४ हजार ७७८ रुपयांच्या या कामासाठी शासनाकडून दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. मात्र, बाधित शेतकरी व मिळकतधारकांचे प्रश्न अद्याप प्रलंबित असताना प्रक्रिया पुढे नेण्याऐवजी प्रथम संबंधित जमिनींचे मालकी हक्क व कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते वसीम सय्यद यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले...
मलकापूर रस्त्याच्या प्रस्ताव व प्रक्रियेबाबत २२ मार्च २०२२ रोजी लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास चार वर्षे उलटूनही या प्रश्नावर ठोस तोडगा निघालेला नसल्याचेही सय्यद यांनी सांगितले. 
दरम्यान, मलकापूरचे तत्कालीन व विद्यमान उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी ठराविक मिळकतधारकांसोबत बैठका घेतल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. ५ एप्रिल २०२६ रोजी मलकापूर नगरपरिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या बैठकांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी भूसंपादन व मिळकतधारकांच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटल्यानंतरही एकही बैठक झाली नसल्याचे सय्यद यांनी नमूद केले.
या प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मलकापूर रस्ता, भूसंपादन, जमिनींचे मालकी हक्क, ट्रस्टची भूमिका तसेच बाधित शेतकरी व मिळकतधारकांच्या अडचणी याबाबत माहिती देण्यात आल्याचेही सय्यद यांनी सांगितले.
गट क्रमांक २७६ वरून वाद
मलकापूर रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या गट क्रमांक २७६ मधील जमिनीच्या मोबदल्यावरूनही वाद असल्याचे सांगण्यात आले. नोव्हेंबर २०२२ मध्ये १७०/२०२२ क्रमांकाने जुम्मा मस्जिद (मनोरे) ट्रस्ट, कराड यांनी भूसंपादनातून मिळणारा मोबदला ट्रस्टला मिळावा, असा दावा दाखल केल्याचे नमूद करण्यात आले.
याच काळात वक्फ बोर्ड, औरंगाबाद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन गट क्रमांक २७६ ही संपूर्ण मिळकत वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचा दावा केला आणि भूसंपादनाचा मोबदला वक्फ बोर्डाकडे जमा करण्याची मागणी केल्याचे सांगण्यात आले.
संबंधित मिळकत सुमारे १७ ते १८ एकर असून ती देवस्थान इनाम वर्ग-३ची आहे. ही जमीन सेवेकरी यांना मुलाणकी म्हणून देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे जुन्या महसूल नोंदी, मालकी हक्क आणि त्यानंतर झालेले जमीन व्यवहार यांची अधिकृत अभिलेखांच्या आधारे सखोल तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या भूमिकेवर प्रश्न
मलकापूर रस्त्याच्या कामाच्या संपूर्ण प्रक्रियेशी नगरपरिषदेचा थेट संबंध नसल्याचे मुख्याधिकारी जितेंद्र जगताप यांनी सांगितल्याचा दावा सय्यद यांनी केला. मात्र, रस्ता नगरपरिषद हद्दीतून जात असल्याने नगरपरिषद संबंधित प्रक्रियेत उपस्थित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्याकडून संबंधित व्यक्तींसोबत बैठका घेतल्या जात असल्याने त्यांच्या भूमिकेबाबत खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखालील बैठक संपल्यानंतरही उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, ट्रस्टच्या काही व्यक्तींमध्ये बैठक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिकृत बैठक संपल्यानंतर अशा बैठका कशासाठी झाल्या, त्यामध्ये कोणती चर्चा झाली, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.

जुन्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी
१९२० पासून विविध व्यवहार झाल्याने सध्याच्या मालकी हक्काचा गुंता निर्माण झाल्याचे वसीम सय्यद यांनी सांगितले. पूर्वीच्या हक्कदारांनी केलेल्या जमीन विक्री व्यवहारांसह त्यानंतर झालेल्या हस्तांतरणांची महसूल अभिलेखांच्या आधारे तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
२८ डिसेंबर २०१७ रोजी मलकापूर नगरपरिषदेने केलेल्या करारात जुम्मा मशीद ट्रस्टने संबंधित जमिनीचे बागायती पीक घेत असल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले. त्याच ट्रस्टने २०१९ मध्ये वक्फ ट्रिब्युनल न्यायालयात दावा दाखल केल्याचेही नमूद करण्यात आले.
गट क्रमांक २७६, वक्फ बोर्ड व ट्रिब्युनलमधील प्रकरणे तसेच संबंधित विश्वस्तांची कायदेशीर पात्रता यांची कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
‘आपले सरकार’वर तक्रार
सातारा जिल्हा वक्फ अधिकारी म्हणून काम पाहणारे इम्रान अस्लम मुलाणी यांच्या नियुक्तीच्या अधिकृततेबाबत ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार दाखल केल्याचे सय्यद यांनी सांगितले. या तक्रारीवर आवश्यक कार्यवाहीसाठी वक्फ बोर्डाला आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र त्यानंतर नेमकी काय कार्यवाही झाली, याबाबत स्पष्टता नसल्याचा दावा त्यांनी केला.
वक्फ बोर्डाच्या कार्यपद्धतीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित प्रश्न सोडविण्याऐवजी कार्यपद्धतीमुळे अनेक प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचा आरोप त्यांनी केला.असेही वसीम सय्यद म्हणाले...

विकासाला विरोध नाही’
मलकापूर रस्त्याच्या कामाला विरोध नाही. मात्र, शासनाचा निधी योग्य पद्धतीने खर्च व्हावा आणि कोणत्याही शेतकरी अथवा मिळकतधारकावर अन्याय होऊ नये, यासाठी प्रथम मालकी हक्क व भूसंपादनाची कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी. बाधितांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि कायदेशीर मालक निश्चित करून नियमानुसार त्यांनाच मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
“रस्ता झाला पाहिजे; विकासकामाला विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली कोणत्याही शेतकरी अथवा मिळकतधारकाच्या मालकी हक्कावर गदा येता कामा नये. संबंधित कागदपत्रांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी झाल्याशिवाय पुढील भूसंपादन व रस्त्याचे काम सुरू करू नये. विकास हवा; मात्र हक्क अबाधित ठेवूनच,” अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार वसीम सय्यद यांनी मांडली.
या प्रकरणात मलकापूर नगरपरिषदेने केलेल्या कराराची कायदेशीरता, संबंधित ट्रस्टची अधिकृतता, वक्फ बोर्डाचे दावे, गट क्रमांक २७६ची मालकी तसेच उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची भूमिका या सर्व बाबींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रश्न सुटला नाही तर न्यायालयीन मार्गाने लढा देणार असल्याचेही वसीम सय्यद यांनी स्पष्ट केले.

जनतेच्या मनातला "आपला माणूस' ; सतीश भोंगाळे ; सतीश भोंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या राजकीय क्षेत्रात नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहणारे सतीश भोंगाळे यांनी पद नसतानाही जनसेवेची आपली वाटचाल कायम ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांची "आपला माणूस' म्हणून ओळख  निर्माण झाली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून लोकशाही आघाडीच्या माध्यमातून, विशेषतः मार्केट यार्ड परिसरातील आपल्या प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी भोंगाळे सातत्याने उपलब्ध राहिले आहेत. 
परिसरातील नागरी समस्या, छोट्या-मोठ्या विकासकामांचे प्रश्न किंवा एखाद्या नागरिकाची वैयक्तिक अडचण असो, त्यासाठी ते संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असतात.
नगरपालिका राजकारणात सक्रिय असलेल्या अनेक लोकप्रतिनिधींसोबतच नागरिकांच्या प्रश्नांसाठी पद नसतानाही उपलब्ध राहणाऱ्या कार्यकर्त्यांचीही स्वतंत्र ओळख निर्माण होते. सतीश भोंगाळे हे त्याचे उदाहरण ठरत आहेत. नगरसेवक पदावर नसतानाही नागरिक स्वतःहून त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या अडचणी मांडतात, ही त्यांच्या सामाजिक कार्याची पावती मानली जात आहे.
गेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, निवडणुकीतील पराभवाने भोंगाळे यांच्या सार्वजनिक जीवनातील सक्रियता कमी झालेली नाही. पद गेले, मात्र जनसेवेची भावना कायम राहिली, अशीच त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.
दरम्यान, सतीश भोंगाळे यांची मित्रपरिवारातही स्वतंत्र ओळख आहे अनेक मित्रांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेम, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि चित्रपटांविषयीची आवड या माध्यमातून या मित्रपरिवाराची वीण अधिक घट्ट झाली आहे.
सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक नातेसंबंध जपत नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून सतीश भोंगाळे यांची आपला माणूस ओळख निर्माण झाली आहे. 
निवडणुकीचा निकाल बदलला, पण नागरिकांशी असलेले नाते बदलले नाही, हे त्यांच्या आजवरच्या कार्यातून अधोरेखित होते.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना जुलैचा हप्ता; रक्षाबंधनामुळे ३ हजार रुपये मिळणार?

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी आणि गेमचेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे देऊन महिलांच्या खात्यावर ३ हजार रुपये जमा केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ३ हजार रुपये देण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

२०२४ मध्ये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्यात आले होते. त्यामुळे यंदाही जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अंतिम निर्णय शासनाकडून अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता येणार आहे.
दरम्यान, जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी महायुती सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून तब्बल ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत. या निधीचा वापर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी करण्यात येणार आहे. निधी वर्ग करण्यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागातील निधी वळवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या निधी वळवण्याचा परिणाम संबंधित विभागांच्या इतर योजनांवर होत असल्याची चर्चा आहे.
यापूर्वीही लाडकी बहीण योजनेसाठी विविध विभागांमधून निधी वळवण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये जानेवारीच्या हप्त्यासाठी ९८.४५ कोटी रुपये, तर जून २०२५ मध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी ४१० कोटी रुपये वळवण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
आता जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने लाभार्थी महिलांचे लक्ष हप्ता कधी जमा होणार याकडे लागले आहे. त्यातच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देऊन ३ हजार रुपये मिळणार असल्याची चर्चा असल्याने महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. मात्र, ३ हजार रुपयांच्या हप्त्याबाबत अधिकृत निर्णय होईपर्यंत केवळ चर्चेवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र सरकारसाठी गेमचेंजिंग ठरलेली आणि अति महत्त्वकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ओळखली जाते. या योजनेअंतर्गत, पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत मिळते. पण या महिन्यामध्ये रक्षाबंधन असल्यामुळे महिलांना 3000 रुपये मिळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

2024मध्ये लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपये मिळाले होते. त्यामुळे आता या महिन्यातदेखील जुलै आणि ऑगस्टचा हफ्ता मिळून महिलांना 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
2024मध्ये लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपये मिळाले होते. त्यामुळे आता या महिन्यातदेखील जुलै आणि ऑगस्टचा हफ्ता मिळून महिलांना 3000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत.
सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय  जारी करण्यात आला. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाचा हजारो कोटींचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे.
सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाचा हजारो कोटींचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे.
यापूर्वी लाडकी बहिण योजनेसाठी वळवलेला निधींमध्ये फेब्रुवारी २०२६ जानेवारीच्या हप्त्यासाठी ९८.४५ कोटी रुपये, जून २०२५ एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी ४१० कोटी रुपये निधी वळवल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी लाडकी बहिण योजनेसाठी वळवलेला निधींमध्ये फेब्रुवारी २०२६ जानेवारीच्या हप्त्यासाठी ९८.४५ कोटी रुपये, जून २०२५ एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी ४१० कोटी रुपये निधी वळवल्याचे समोर आले आहे.




Saturday, August 22, 2026

ग्रामस्थांच्या हृद्य सत्काराने भारावल्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनी ; माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि वीरपत्नी विनिता कामटे यांचा ग्रामस्थांकडून गौरव

वेध माझा ऑनलाईन।
रेठरे बुद्रुक, ता. २२ : राजकीय क्षेत्रात, न्यायव्यवस्थेत आणि साहित्य क्षेत्रात आपल्या अतुलनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनींचा आज ग्रामस्थांनी भव्य नागरी सत्कार केला. या हृद्य सत्काराने रेठरे बुद्रुकच्या कर्तृत्ववान माहेरवाशिणी माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती सौ. रेवती मोहिते-डेरे आणि सुप्रसिद्ध लेखिका वीरपत्नी विनिता अशोक कामटे या तिघी बहिणी भारावून गेल्या. 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते तसेच आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भावपूर्ण सोहळा पार पडला. फेटा, शाल, श्रीफळ, मानपत्र, रेठरे बासमती तांदूळ, रेठरा पेढा आणि रेठरा तूप देऊन तिन्ही भगिनींचा गौरव करण्यात आला.

माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण यांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या कृष्णाघाटाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त व कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित कार्यक्रमानिमित्त ॲड. चव्हाण यांच्यासह त्यांच्या भगिनी रेवती मोहिते-डेरे आणि विनिता कामटे आज कराड येथे आल्या होत्या. यानिमित्ताने रेठरे बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. 

या सत्काराला उत्तर देताना बालपणींच्या आठवणींना उजाळा देत ॲड. वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, आमच्या मूळ गावात होत असलेला हा सत्कार आमच्यासाठी खूप विशेष आहे. रेठरे बुद्रुकला मोठी नैसर्गिक समृद्धी लाभली आहे. अनेक थोर व्यक्ती या गावाला लाभल्या आणि त्यांनी गावाची ओळख देशभर निर्माण केली. आम्ही तिघी बहिणी अनेक वर्षांनी एकत्र गावी आलो. आज गावकऱ्यांनी दिलेला प्रेमाचा ओलावा अनुभवला. त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. यापुढे वारंवार गावाला यावे लागेल. आम्ही पुण्यात वाढलो, तरी आम्ही रेठरे बुद्रुकच्या आहोत, हे अभिमानाने सांगतो.

आजचा सत्कार हा केवळ आम्हा तिघींचा सत्कार नाही. तर ज्या पालकांनी आपल्या मुलींना स्वप्ने पाहायला शिकवले आणि ती स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी बळ दिले, त्या सर्व पालकांचा हा सत्कार आहे. आमच्या वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळे व शिक्षणामुळेच आम्ही या उंचीवर पोहचू शकलो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरातील मुलींना आणि महिलांना पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या भाषणात या तिन्ही कर्तृत्वान भगिनींच्या कार्याचा विशेष गौरव करत, त्या रेठरे बुद्रुकच्या आहेत ही गावासाठी अभिमानास्पद बाब आहे. लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा सत्कार आयोजित घेण्यात आला आहे. मुली शिक्षणात पुढे जात असून, नवीन पिढीला अधिकाधिक संधी देण्याची गरज आहे. कृष्णा समूहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत असून, महिलांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, रेठरे बुद्रुकला प्रगत गाव करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपल्या गावाचा आणि मतदारसंघाचा देशात आदर्श निर्माण करणे, हा आमचा संकल्प आहे. 

डॉ. इंद्रजित मोहिते यांनी तिन्ही बहिणींच्या कर्तृत्वाचा उल्लेख करताना, राजकारण, न्यायव्यवस्था, लेखन अशा विविध क्षेत्रांत त्यांनी आपला ठसा उमटविला असून, चांगले संस्कार आणि उत्तम शिक्षणामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले. 

सरपंच हणमंत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी मानपत्राचे वाचन केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. जि. प. सदस्य सौ. प्रियांका साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ॲड. हेमंत चव्हाण, राहुल कामटे, जि. प. सदस्य शैलजा शिंदे, पं. स. सभापती नंदाताई यादव, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, कराडचे नगरसेवक शिवाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सांगली महिला जिल्हाध्यक्ष सौ. सुश्मिता जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



लहानपणीच्या आठवणींना उजाळा

रेठरे बुद्रुकमधील लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, लहानपणी आम्ही चुलत भावंडांसोबत शेतात जायचो. शेजाऱ्यांकडे पोहे खायचो. आमचे वडील आम्हाला मंदिर आणि नदीजवळ घेऊन यायचे. आम्ही या निसर्गाचा आनंद लुटायचो. आमचे वडील या नदीत पोहले आहेत. ज्या नदीचा आम्ही लहानपणी आनंद घेतला, त्याच नदीवर घाट बांधण्याचे भाग्य मला लाभले, याचा विशेष अभिमान आहे.