Wednesday, May 13, 2026

कराडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पी. ए. नी पत्रकार परिषद बोलावली...पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करताच पत्रकार परिषदेतून चक्क पळच काढला...!!

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधरांची प्रलंबित शासकीय कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सेवा अभियान कार्यक्रमाचे आयोजन आज हॉटेल फर्न, कराड येथे करण्यात आले होते यानिमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक पत्रकारांशी संवाद साधणार असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली...आणि  पत्रकारांच्या प्रश्नाच्या माऱ्यापुढे उत्तरे न देता आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे पी ए साखरे हे तिथून अक्षरशः पळून गेले... 

त्याचे झाले असे की...
आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए श्री संतोष साखरे पत्रकार परिषद घेणार  असा निरोप होता...शिक्षकांच्या प्रश्नावर ते बोलणार असंही सांगण्यात आले होते...त्यांच्याबरोबर शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते...प्रत्यक्षात पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा मात्र पत्रकारांच्या प्रश्नावर त्या संघटनेचे कोणीही पदाधिकारी किंवा स्वतः रवींद्र चव्हाण यांचे पी ए काही बोलू शकले नाहीत...त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडिमाराचा अंदाज घेत त्याठिकाणहुन पळून जाणे पसंत केले...

काही महिन्यांपूर्वी साताऱ्या जिलह्यात काही शिक्षकांनी विद्यार्थीनीशी गैर वागणुकीबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या... त्यावर चर्चा झाल्या...मात्र तुमची कोणतीच भूमिका  त्यावेळी स्पष्ट दिसली नाही.. याबाबत तुम्ही आज भूमिका स्पष्ट करा...जसे तुम्ही शिक्षकांच्या प्रश्नावर बोलता तसे शिक्षक चुकीचे वागतात त्यावरही तुम्ही बोललं पाहिजे...असे पत्रकारांनी विचारले असता...पत्रकार परिषदेत उपस्थित रवींद्र चव्हाण यांच्या पी ए ना याबाबत काहीच माहीत नाही असे दिसून आले...काहीही माहिती नसताना उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी तिसरच बरळत त्यांनी थातूरमातूर उत्तरे द्यायला सुरुवात केली...प्रॉपर काही माहिती नसताना माहिती घेऊन त्याविषयी बोलू...अशी भूमिका न घेता उगाचच फालतू बडबड करत त्यांनी वेळ घालवायला सुरुवात केली...हे पत्रकारांच्या लक्षात आले...

त्यानंतर...
सातारा जिल्ह्यात व राज्यात दिव्यांग शिक्षकांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून  आरोग्य विभागाने  दिव्यांग ठरवलेले शिक्षक आता ठरवले आहेत.   अनेक शिक्षक या विरोधात कोर्टात दाद मागत असून याकडे प्रशासन ठोस उपाययोजना करता दिसत नाही. त्यामुळे वर्षभरापासून या कोर्टात गेलेल्या शिक्षकांना बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागली आहे. या शिक्षकांच्या बदलीबाबत प्रशासनाने ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही... याहीविषयी त्यांना विचारले असता...याबाबतही ते काही उत्तर देऊ शकले नाहीत...पुन्हा काहीतरी फालतू बडबड करू लागताच... ही पत्रकार परिषद घेतलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या पी ए ना याबाबतही काहीच माहिती नाही हेही पत्रकारांच्या लक्षात आले...मग... काही माहिती नसताना उगीचच वेळ जात नाही... म्हणून पत्रकारांशी संवाद साधत आहात का? शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या मार्केटिंगसाठी तुम्ही इथे आलाय का? असे अनेक विषय त्याठिकाणी चर्चेत येऊ लागतच... भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए संतोष साखरे...ज्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती...त्यानी थातूरमातूर कारण सांगून पत्रकार परिषदेमधून अक्षरशः पळ काढला... 

त्यावेळी पत्रकारांनी त्यांना अडवून...तुम्ही पत्रकार परिषद बोलावली आहे...आणि तुम्हीच अस मधून पळून जाताय... हे बरोबर नाही...असे त्याना सुनावले असता....काहीतरी फालतू कारण सांगून ते निघून गेले...ज्या विषयी पत्रकार परिषद घेतली आहे...त्या विषयीची प्रॉपर माहिती आपल्याला नाही...यापुढे आपण पत्रकारांना उत्तर देऊ शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि म्हणूनच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए चक्क पत्रकारांसमोरच पळून गेले...त्यामुळे ही पत्रकार परिषद त्याठिकाणीच थांबली... पुढे झालीच नाही...
आज


सातारा जिल्ह्यात व राज्यात दिव्यांग शिक्षकांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून  आरोग्य विभागाने  दिव्यांग ठरवलेले शिक्षक आता ठरवले आहेत.   अनेक शिक्षक या विरोधात कोर्टात दाद मागत असून याकडे प्रशासन ठोस उपाययोजना करता दिसत नाही. त्यामुळे वर्षभरापासून या कोर्टात गेलेल्या शिक्षकांना बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागली आहे. या शिक्षकांच्या बदलीबाबत प्रशासनाने ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही

Tuesday, May 12, 2026

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांचा कराड नगरपालिकेतर्फे मानपत्र देऊन सन्मान ;


वेध माझा ऑनलाईन।
ज्येष्ठ साहित्यिक  श्रीनिवास कुलकर्णी यांना कराड नगरपालिकेतर्फे मानपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व शहरातील आजी माजी नगरसेवक मुख्याधिकारी उपस्थित होते 

श्रीनिवास कुलकर्णी यांना राज्य शासनाच्या वतीने साहित्य क्षेत्रातील मानाचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेदेण्यात आला आहे. यानिमित्त कराड नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत कृलकर्णी यांच्या अभिनंदनाचा ठराव करून मानपत्र देण्याचा निर्णय घेतला होता.

मंगळवारी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे,लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी शहरातील आजी- माजी नगरसेवकांसाहित श्रीनिवास कृलकर्णी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन मानपत्र प्रदान केले, स्मृतिचिन्ह,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. 

सन्मानाबद्धल प्रतिक्रिया व्यक्त करताना उदयन कुलकणी म्हणाले की, वडीलश्रीनिवास कलकर्णी हे नोकरीच्या निमित्ताने कराडला आले. १९६५ साली त्यांची डोह ही कादंबरी प्रकाशित झाली, ती बाचून यशवंतराव चब्हाण यांनी त्यांनाबोलावून घेतले, पूढ़े हा स्नेह वाढत गेला. कुलकर्णी यांच्या कादंबरीस पहिला राज्यपुरस्कार मिळाला, त्याविळी तत्कालीन नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांनी त्यांचानगरपालिकेतर्फ सत्कार केला. आज पुन्हा नगरपालिकेतर्फ सत्कारा होत आहे.यशबंतराव च्हाण याच्यामुळेच बडिलांना धर मिळाले कराडशी आमचा ऋणकायम राहिला आहे.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले की, श्रीनिवास कुलकर्णीं हे कराड शहराच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य ठेवा आहेत. त्यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी शहरासाठीगौरवास्पद आहे. उत्तम साहित्यकृती त्यांनी निर्माण केल्या. शहरातील दोन साहित्यसंमेलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता, त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदानमूषणावह असून शासनानेही त्यांचा उचित सन्मान केला आहे.कराड नगरपालिकेनेही शहराच्या या सुपुत्रास मानपत्र देऊन गौरविले आहे.

 सौरभ पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले

नीट पेपरफुटीचे नाशिक कनेक्शन आलं समोर ; राज्यात खळबळ ; परीक्षा रद्द ;

वेध माझा ऑनलाईन
नीट पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन समोर आलं आहे. केरळ आणि राजस्थान पाठोपाठ आता नाशिक कनेक्शन देखील असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नीट पेपर ३ मे रोजी पार पडला, मात्र तो पेपर ४२ तास आधीच विद्यार्थ्यांच्या व्हाट्स अप आणि टेलिग्रामवर आला होता.600 मार्कांचा पेपर एकदम तंतोतंत असल्याचं समोर आलं होतं. यामुळे आता पेपर लीक प्रकरणी नीट परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

हे नाशिक कनेक्शन आहे काय ?

फुटलेल्या पहिल्या पेपरची कॉपी ही नाशिकमध्ये पोहोचली आणि तिथून हरियाणापर्यंत गेल्याची माहिती मिळाली आहे. नाशिकमध्ये ही पेपरफुटी झाली पहिली प्रत तयार झाली आणि इतर ठिकाणी या प्रती पोहोचवण्यात आल्या होत्या.नाशिकमध्ये पुन्हा हे कांड समोर आल्यानं खळबळ उडाली आहे  3 मे रोजी झालेल्या पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा झाली. राजस्थानमध्ये परीक्षेच्या एक दिवसआधी एक गेस पेपर बाहेर आला. गेस पेपरमधील तब्बल 125 प्रश्न नीट पेपरमध्ये आले. फिजिक्स आणि बायोलॉजी विषयांतील अनेक प्रश्न जुळले.
परीक्षेच्या दिवशीच राजस्थानच्या सीकर पोलिसात तक्रार दाखल केली. विद्यार्थ्यांनी पुराव्यांसह एनटीएकडे तक्रार केली. एनटीएकडून राजस्थानच्या डीजीपींना पत्र देण्यात आलं. स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपनं चौकशी सुरू केली.
विद्यार्थ्यांच्या मोबाईल चॅट आणि पुराव्यांची चौकशी केली. या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी 10 हून अधिक लोक ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.


कराडात किरण मुळे मित्र परिवाराच्या वतीने प्रभाग 10 मधील दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव ; विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व भेटवस्तू प्रदान ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या वॉर्ड क्रमांक 10 मधील दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भाजपचे कार्यकर्ते व आमदार अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक किरण मुळे मित्र परिवाराच्या वतीनेभेटवस्तू व सन्मानपत्र देऊन या विद्यार्थ्यांचा  गौरव करण्यात आला. 
यावेळी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देण्यात आली.
तुमचे हे यश असेच उंच भरारी घेत राहो,
आणि आयुष्यातील प्रत्येक ध्येय तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करो, अशा शुभेच्छा देखील किरणं मुळे मित्र परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या
किरण मुळे मित्र परिवाराने राबवलेल्या या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे

राष्ट्रवादीच्या नव्या यादीतून प्रफुल पटेल यांना डावललं?

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेषतः पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचे नाव पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
“एवढ्या सिनिअर माणसाला तुम्ही घेतलं कसं नाही, हा प्रश्न मी आज विचारतो,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी प्रफुल पटेल यांना डावलण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या नव्या पदाधिकारी यादीत अनेक बदल करण्यात आले असून, त्यात काही जुन्या नेत्यांना स्थान न मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, प्रफुल पटेल यांचे नाव वगळण्यामागे नेमके कारण काय, याबाबत पक्षाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, या निर्णयामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या ; ईडीचं समन्स? साडेपाच तासांची चौकशी ; चौकशीत काय घडलं?

वेध माझा ऑनलाईन।
भोंदू अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला, इतकेच नाही तर अनेकांच्या जमिनीही हडपल्या. या प्रकरणात राजकीय कनेक्शन उघड झाल्यानंतर काही नेत्यांवर मोठे आरोप झाले. शिवनिका ट्रस्टच्या माध्यमातून काहींचे थेट खरातशी व्यवहारिक संबंध समोर आल्याचं सांगितलं जात होतं. या दरम्यान महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या चौकशीची सातत्याने मागणी होत होती. दोन दिवसांआधी त्यांची तब्बल साडेपाच तास एसआयटी चौकशी सुरु होती. यानंतर आता सूत्रांकडून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स जारी झाल्याची माहिती आहे. इतकेच नाही तर पदाचा गैरवापर करुन आर्थिक व्यवहार झाले का, याचा सखोल तपास होणार आहे. सूत्रांच्याच माहितीनुसार, शिवनिका संस्थेत सहभाग का आणि कसा झाला याबाबतही चौकशी होणार असं समोर आलं आहे.