Monday, May 18, 2026

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांचा उमेदवारी अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
रेठरे बुद्रुक (शिवनगर) तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज पासून  उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ जून असून २१ जून ला मतदान तर २३ जूनला मतमोजणी होणार आहे. 
आज पहिल्या दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांनी गट क्रमांक २ काले-कार्वे उत्पादक सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत कारखान्याचे संचालक जगदीशदादा जगताप, कराड पंचायत समितीचे सदस्य पै. धनंजय पाटील आदींसह कारखान्याचे माजी संचालक, सहकार पॅनलचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे यांनी टेंडर मिळवण्‍यासाठी झटणाऱ्या नगरसेवकांचा घेतला समाचार ; सभागृहात शिस्‍त पाळण्‍यासह दुजाभाव न करता एकोप्‍याने राहण्याच्या केल्या सूचना ;

वेध माझा ऑनलाइन
सातारा पालिकेच्‍या सभागृहात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी त्‍यांचे नेतृत्‍व मानणाऱ्या नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीत त्‍यांनी नगरसेवकांना सभागृहात शिस्‍त पाळण्‍यासह दुजाभाव न करता एकोप्‍याने राहण्‍याच्‍या सूचना केल्‍या. याच बैठकीदरम्‍यान त्‍यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्‍याशी चर्चा करण्‍याचे संकेत दिले.दरम्यान यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी टेंडर मिळवण्‍यासाठी झटणाऱ्या नगरसेवकांचाही समाचार घेतला


सातारा पालिकेच्‍या नुकत्‍याच झालेल्‍या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्‍यात वाद झाला होता. या वादामुळे पालिकेतील बेबनाव, कुरघोड्या, जिरवाजिरवीच्‍या राजकारणाच्‍या चर्चेला उधाण आले होते. याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्‍यांचे नेतृत्‍व मानणाऱ्या नगरसेवकांची बैठक घेत मते जाणून घेतली होती
या बैठकीत देखील उदयनराजेंसमोर मोठ्या प्रमाणात खदखद समोर आली होती. याच अनुषंगाने रविवारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठक घेत नगरसेवक, पदाधिकारी तसेच इतरांची मते जाणून घेत वादामागील नेमक्‍या मुद्द्यांची माहिती करून घेतली. यानंतर त्‍यांनी नगरसेवकांचे कान टोचत त्‍यांना सभागृहात शिस्‍त बाळगण्‍यासह सर्वांचा आदर राखण्‍याचा सल्‍ला देत झालेला प्रकार चुकीचा असल्‍याचे सांगितले.
याचवेळी त्‍यांनी सर्व नगरसेवक भाजपाच्‍या चिन्‍हावर निवडून आले असल्‍याने आघाडी किंवा इतर भेद बाळगणे चुकीचे असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. यापुढील काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्‍पष्‍ट करत शहरातील विकासकामांवर भर देण्‍याचे तसेच टेंडर मिळवण्‍यासाठी झटणाऱ्या नगरसेवकांचाही समाचार घेतला. बैठकीत नगरसेवकांनी प्रशासन सहकार्य करत नसल्‍याचा उपस्‍थित केलेल्‍या मुद्द्यावर लवकरच तशा सूचना देत प्रशासनासमवेत बैठक घेण्‍याचेही जाहीर केले

Saturday, May 16, 2026

कृष्णा कारखाना निवडणुक कार्यक्रम जाहीर ; 21 जूनला मतदान; 23 जूनला मतमोजणी ;

वेध माझा ऑनलाईन।
सातारा- सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे 

सोमवार (दि 18 ) पासून
अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे 21 जूनला मतदान होणार आहे तसेच
23 जूनला मतमोजणी होईल,अशी माहिती  निवडणूक अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली आहे

Wednesday, May 13, 2026

वेध माझा ऑनलाईन
साहित्य, संस्कृती आणि लोककलेचा संगम अनुभवण्याची संधी कराडकरांना २४ मे रोजी मिळणार आहे. येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यावतीने स्व.सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्व.सौ. वेणूताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सोमवार पेठेतील नव्या श्री कृष्णाबाई प्रीतिसंगम सांस्कृतिक हॉलमध्ये सकाळी १० वाजता या संमेलनाचा शुभारंभ होणार आहे.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा श्री कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी चेअरमन राजन वेळापुरे, उपाध्यक्ष अनिल सोनावणे, संचालक अरुण जाधव, संजीव मोहिरे, कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे, तसेच समन्वयक प्रा. अशोककुमार चव्हाण उपस्थित होते.

या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत भूषविणार आहेत. उद्घाटक म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथील कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून कराड तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सूरज जमदाडे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार साळुंखे सहभागी होणार आहेत.

संमेलनात दिवसभर विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ कथाकथनकार हिम्मत पाटील यांचे कथाकथन रंगणार आहे. त्यानंतर रेडिओ व दूरदर्शनवरील लोकप्रिय शाहीर कळसकर भेदीक शाहीर मंडळ, कवठे यांचा शाहिरी कार्यक्रम सादर होईल. पुढील सत्रात प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांचा ‘गझल रंग’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. तर समारोपानंतर प्रसिद्ध दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांच्या दमदार दंगल कवितांनी संमेलनाची सांगता होणार आहे. कराड, पाटण आणि परिसरातील सुमारे ४०० साहित्यप्रेमी या संमेलनास उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी ८.३० ते १० या वेळेत संमेलनस्थळी नोंदणी करावी. नोंदणीनंतर उपस्थितांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेस संचालक डॉ. संतोष मोहिरे, शरदचंद्र देसाई, सुरेश भंडारी, राजेंद्रकुमार यादव, निरंजन मोहिरे, डॉ. जयवंत सातपुते, जयाराणी जाधव, सीमा विभुते, सुरेश कोळेकर, पारस विजापुरे तसेच संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

कराडमध्ये “सेवा अभियान” उपक्रम; शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना मिळणार गती ; आमदार डॉ अतुल भोसले

वेध माझा ऑनलाईन।
आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए कराडमध्ये आले आहेत शिक्षकांच्या प्रश्नाबाबत असणारे शासन स्तरावरचे काही प्रश्न तसेच आणखी इतरही महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे नक्कीच कराडमध्ये “सेवा अभियान” उपक्रम अंतर्गत शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांना गती मिळणार आहे आणि याचा नक्कीच फायदा या ठिकाणच्या शिक्षक मतदार संघासाठी महायुतीला नक्कीच होईल असा विश्वास आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे

शिक्षक व पदवीधर मतदार संघातील विविध प्रश्नांवर संबंधित लोकांशी चर्चा झाल्यानंतर आमदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

कराडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पी. ए. संतोष साखरेंनी पत्रकार परिषद बोलावली...पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करताच पत्रकार परिषदेतून त्यांनी चक्क पळच काढला...!!

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधरांची प्रलंबित शासकीय कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सेवा अभियान कार्यक्रमाचे आयोजन आज हॉटेल फर्न, कराड येथे करण्यात आले होते यानिमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक पत्रकारांशी संवाद साधणार असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली...आणि  पत्रकारांच्या प्रश्नाच्या माऱ्यापुढे उत्तरे देता न आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे पी ए साखरे हे तिथून अक्षरशः पळून गेले... 

त्याचे झाले असे की...
आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए श्री संतोष साखरे पत्रकार परिषद घेणार  असा निरोप होता...शिक्षकांच्या प्रश्नावर ते बोलणार असंही सांगण्यात आले होते...त्यांच्याबरोबर शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते...प्रत्यक्षात पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा मात्र पत्रकारांच्या प्रश्नावर त्या संघटनेचे कोणीही पदाधिकारी किंवा स्वतः रवींद्र चव्हाण यांचे पी ए काही बोलू शकले नाहीत...त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडिमाराचा अंदाज घेत त्याठिकाणहुन पळून जाणे पसंत केले...

काही महिन्यांपूर्वी साताऱ्या जिलह्यात काही शिक्षकांनी विद्यार्थीनीशी केलेल्या काही गैर वागणुकीबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या... त्यावर चर्चा देखील झाल्या...मात्र तुमची कोणतीच भूमिका  त्यावेळी स्पष्ट दिसली नाही.. याबाबत तुम्ही आज भूमिका स्पष्ट करा...जसे... तुम्ही शिक्षकांच्या प्रश्नावर बोलता तसे शिक्षक चुकीचे वागतात त्यावरही तुम्ही बोललं पाहिजे...असे पत्रकारांनी विचारले असता...पत्रकार परिषदेत उपस्थित रवींद्र चव्हाण यांच्या पी ए ना याबाबत काहीच माहीत नाही असे दिसून आले...काहीही माहिती नसताना उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी तिसरच बरळत त्यांनी थातूरमातूर उत्तरे द्यायला सुरुवात केली...प्रॉपर काही माहिती नसताना माहिती घेऊन त्याविषयी बोलू...अशी भूमिका न घेता उगाचच फालतू बडबड करत त्यांनी वेळ घालवायला सुरुवात केली...हे पत्रकारांच्याही लक्षात आले...

त्यानंतर...
सातारा जिल्ह्यात व राज्यात दिव्यांग शिक्षकांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून  आरोग्य विभागाने  दिव्यांग ठरवलेले शिक्षक आता ठरवले आहेत.   अनेक शिक्षक या विरोधात कोर्टात दाद मागत असून याकडे प्रशासन ठोस उपाययोजना करता दिसत नाही. त्यामुळे वर्षभरापासून या कोर्टात गेलेल्या शिक्षकांना बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागली आहे. या शिक्षकांच्या बदलीबाबत प्रशासनाने ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही... याहीविषयी त्यांना विचारले असता...याबाबतही ते काही उत्तर देऊ शकले नाहीत...पुन्हा काहीतरी फालतू बडबड करू लागताच... ही पत्रकार परिषद घेतलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या पी ए ना याबाबतही काहीच माहिती नाही हेही पत्रकारांच्या लक्षात आले...मग... काही माहिती नसताना उगीचच वेळ जात नाही... म्हणून पत्रकारांशी संवाद साधत आहात का? शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या मार्केटिंगसाठी तुम्ही इथे आलाय का? असे अनेक विषय त्याठिकाणी चर्चेत येऊ लागतच... संतोष साखरे यांनी थातूरमातूर कारण सांगून पत्रकार परिषदेमधून अक्षरशः पळ काढला... 

त्यावेळी पत्रकारांनी त्यांना अडवून...तुम्ही पत्रकार परिषद बोलावली आहे...आणि तुम्हीच अस मधून पळून जाताय... हे बरोबर नाही...असे त्याना सुनावले असता.... फालतू कारण सांगून ते निघून गेले...

ज्या विषयी पत्रकार परिषद घेतली आहे...त्या विषयीची प्रॉपर माहिती आपल्याला नाही...यापुढे आपण पत्रकारांना उत्तर देऊ शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि म्हणूनच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए चक्क पत्रकारांसमोरच पळून गेले...त्यामुळे ही पत्रकार परिषद त्याठिकाणीच थांबली...
आज


सातारा जिल्ह्यात व राज्यात दिव्यांग शिक्षकांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून  आरोग्य विभागाने  दिव्यांग ठरवलेले शिक्षक आता ठरवले आहेत.   अनेक शिक्षक या विरोधात कोर्टात दाद मागत असून याकडे प्रशासन ठोस उपाययोजना करता दिसत नाही. त्यामुळे वर्षभरापासून या कोर्टात गेलेल्या शिक्षकांना बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागली आहे. या शिक्षकांच्या बदलीबाबत प्रशासनाने ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही