Monday, July 6, 2026

कृष्णा नदीच्या रंगबदलामागील सत्य का दडवल जातंय? कराड दक्षिण आणि उत्तरचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अजूनही गप्प का? याप्रकरणी 'वेध माझा' चा पाठपुरावा सुरूच राहील ;कारण हा लाखो नागरिकांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग सलग अनेक दिवस निळसर-हिरवा होत असताना आता पावसामुळे नदी गढूळ होऊन प्रदूषण अधिकच वाढेल की काय अशी भीती आहे? दरम्यान संबंधित यंत्रणांकडून अद्यापही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की सत्य दडपण्याचा प्रयत्न? असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. आणि कराड उत्तर आणि दक्षिण चे लोकप्रतिनिधी अजूनही याविषयी गप्प का आहेत... हाही जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे...

या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या 'वेध माझा' मुळे हा विषय लोकचळवळीचे स्वरूप धारण करू लागला असून, प्रशासनावरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे.

नागरिकांच्या मते, लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी, शेतीशी आणि पर्यावरणाशी संबंधित इतक्या गंभीर प्रश्नावर संबंधित विभागांचे मौन अत्यंत संशयास्पद आहे. पाण्याचे नमुने नमुने घेतले का ? ते  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले का? अहवाल तयार झाला आहे का? झाला असेल तर तो जनतेपासून का लपवला जात आहे? अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने तातडीने द्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
'वेध माझा' ने सातत्याने नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करून हा विषय जिवंत ठेवला आहे. त्यामुळे अनेक वर्षे दुर्लक्षित राहणारा प्रश्न आता सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे. "हा पाठपुरावा थांबवू नका; सत्य बाहेर येईपर्यंत आवाज उठवत राहा," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आता हा लढा अधिक व्यापक करण्याची तयारी सुरू झाली आहे. नागरिकांनी थेट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर मागवून अहवाल प्रसिद्ध करण्यास भाग पाडावे, अशी भूमिका पुढे येत आहे.

याशिवाय, हजारो नागरिकांच्या सहभागातून सही मोहीम राबवून प्रशासनाला निवेदन देण्याची तयारी सुरू असून, हा प्रश्न केवळ वृत्तांकनापुरता मर्यादित न राहता जनआंदोलनात रूपांतरित करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
स्थानिक महाविद्यालये, पर्यावरण अभ्यासक आणि मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या माध्यमातून नदीच्या पाण्याचे स्वतंत्र वैज्ञानिक परीक्षण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्याचीही मागणी होत आहे. अधिकृत अहवाल आणि स्वतंत्र परीक्षणाची तुलना झाल्यास सत्य अधिक स्पष्ट होईल, असे नागरिकांचे मत आहे.

प्रशासनाला थेट सवाल...
पाण्याचा रंग बदलून अनेक दिवस झाले, तरी अधिकृत अहवाल का नाही?
पाण्याचे नमुने तपासले की नाही?
तपासणी झाली असेल तर निष्कर्ष जनतेपासून लपवले का जात आहेत?
नदी प्रदूषित नसेल, तर प्रशासन स्पष्टपणे सांगण्यास का टाळाटाळ करत आहे?
आणि प्रदूषण झाले असेल, तर जबाबदारांवर कारवाई कधी होणार?
या प्रश्नांची स्पष्ट आणि लेखी उत्तरे मिळेपर्यंत नागरिक शांत बसणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

'वेध माझा'चा निर्धार
कृष्णा नदीच्या रंगबदलामागील सत्य, अधिकृत तपासणी अहवाल आणि जबाबदारांवरील कारवाई जनतेसमोर येईपर्यंत 'वेध माझा' चा पाठपुरावा आणखी तीव्रपणे सुरू राहील. 
कारण हा केवळ एका नदीचा प्रश्न नाही तर हा लाखो नागरिकांच्या आरोग्याचा, पर्यावरणाचा आणि प्रशासनाच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न आहे.

कोयना धरणात एका रात्रीत पाणीसाठा 5 टीएमसीने वाढला ; मुसळधार सुरूच ! या पार्श्वभूमीवर एनडीआरएफला पाचारण ;

वेध माझा ऑनलाईन।
झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील जनजीवन सुरळित करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं असून एक तुकडी कराडमध्ये दाखल झाली आहे.दरम्यान पश्चिम घाटमाथ्याला ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आल्यानं पाच तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांना आजदेखील सुट्टी देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 93 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे एका रात्रीत पाणीसाठा 5 टीएमसीनं वाढला आहे. कोयना आणि कृष्णा नद्यांची पाणी पातळीही झपाट्यानं वाढत आहे.

Saturday, July 4, 2026

कृष्णा नदीचा रंग हिरवा झाल्याच्या प्रश्नावर 'वेध माझा'चा धडाकेबाज पाठपुरावा; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव; : अधिकृत अहवाल येईपर्यंत वेध माझा ने पाठपुरावा सुरू ठेवावा ; नागरिकांची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होत असल्याच्या गंभीर आणि पर्यावरणाशी निगडित प्रश्नावर सातत्याने वृत्तांकन करून हा विषय जनतेसमोर प्रभावीपणे मांडल्याबद्दल 'वेध माझा' चे नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. लोकहिताचा प्रश्न धैर्याने आणि सातत्याने मांडणाऱ्या या पत्रकारितेमुळे प्रशासनावर योग्य तो दबाव निर्माण होत असून, नागरिकांनाही वस्तुस्थितीची माहिती वेळेवर मिळत असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की... 
संवेदनशील पण काही प्रमाणात दुर्लक्षित राहिलेल्या कृष्णा नदीच्या रंगबदलाच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडल्यामुळे हा विषय जनतेच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. लोकहिताची जाणीव ठेवून केलेली निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याचबरोबर नागरिकांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही मांडल्या आहेत. 
कृष्णा नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची अंतिम जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) कडे थेट तक्रार दाखल करून अधिकृत व ठोस उत्तर मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच नदी संवर्धनासाठी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवून व्यापक जनमत तयार करावे, जेणेकरून प्रशासनाला या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही, असेही मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. स्थानिक महाविद्यालये किंवा पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्थांच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी परीक्षण करून वैज्ञानिक पुरावेही उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलामागील नेमके कारण स्पष्ट होईपर्यंत, संबंधित यंत्रणांनी अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करेपर्यंत आणि दोषींवर आवश्यक कारवाई होईपर्यंत या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवावा, अशी अपेक्षा नागरिकांनी 
'वेध माझा' कडून व्यक्त केली आहे.

कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय,?तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे,? तो जनतेपासून का लपविला जात आहे? "लोकप्रतिनिधी' या प्रश्नावर गप्प का? जनतेत चर्चा; वेध माझा चा पाठपुरावा चालूच राहणार...

 वेध माझा ऑनलाईन।
: कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा झाल्याची घटना समोर येऊन अनेक आठवडे उलटले. या काळात नागरिकांनी वारंवार प्रश्न उपस्थित केले, पर्यावरणप्रेमींनी तपासणीची मागणी केली आणि 'वेध माझा'ने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, संबंधित विभागांकडून अद्यापही अधिकृत तपासणी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. परिणामी, हा विलंब नेमका कशामुळे होत आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय,?

त्या पाण्याचा तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे,?

तो जनतेपासून का लपविला जात आहे? 

आणि या विलंबाची जबाबदारी कोण स्वीकारणार? 

 लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प का?

या सगळ्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत या प्रकरणावरील संशय कायम राहणार आहे.

आणि 'वेध माझा' या संपूर्ण प्रकरणाचा पुढेही पाठपुरावा करत राहील आणि तपासणी अहवाल, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक घडामोड जनतेसमोर आणत राहील.

दरम्यान या प्रकरणात संबंधित विभागांना नदीच्या पाण्याचे नमुने घेण्याची मागणी करण्यात येत आहे. 
मात्र, ती तपासणी करण्यात आली का? 
आली असेल तर त्या नमुन्यांचे निष्कर्ष काय आले? 
तपासणी पूर्ण झाली की नाही ? 
कोणत्या प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली? 
आणि अहवाल कोणाकडे प्रलंबित आहे?  याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांसमोर अद्यापही ठेवण्यात आलेली नाही. सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अशा संवेदनशील विषयात प्रशासनाची ही भूमिका अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.

सध्या पावसाळा सुरू असून नदीत विविध नाले, सांडपाणी आणि शेतीमधून वाहून येणारे पाणी मिसळत आहे. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक असताना अधिकृत माहितीचा अभाव चिंतेत भर घालत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या नदीबाबत पारदर्शकता ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, नदीकाठच्या काही नागरिकांनी अद्यापही काही ठिकाणी पाण्यावर हिरवट थर किंवा रंगातील बदल दिसत असल्याचा दावा केला आहे. या दाव्यांची शासकीय स्तरावर पडताळणी झाली आहे का, याचाही खुलासा झालेला नसल्यामुळे रंगबदलाची कारणे नैसर्गिक आहेत की प्रदूषणाशी संबंधित आहेत?, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.

या संपूर्ण प्रकरणात आणखी एक बाब प्रकर्षाने समोर येत आहे. कराड परिसरातील लाखो नागरिकांचे पिण्याचे पाणी, शेती आणि दैनंदिन जीवन कृष्णा नदीवर अवलंबून असताना या विषयावर लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांकडून संयुक्त पत्रकार परिषद किंवा अधिकृत निवेदनही जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे माहितीच्या अभावातून अफवा आणि संभ्रम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे तपासणी अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नदीच्या पाण्याचे नियमित परीक्षण करून त्याचे अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणीही पुढे येत आहे.

कृष्णा नदीच्या रंगबदलाचे नेमके कारण काय, तपासणी अहवाल कोणाकडे अडकला आहे, तो जनतेपासून का लपविला जात आहे आणि या विलंबाची जबाबदारी कोण स्वीकारणार? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत या प्रकरणावरील संशय कायम राहणार आहे.
आणि 'वेध माझा' या संपूर्ण प्रकरणाचा पुढेही पाठपुरावा करत राहील आणि तपासणी अहवाल, संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक घडामोड जनतेसमोर आणत राहील.

कराडच्या मुख्य रस्त्यावरील भाजी मंडई उठवा... अन्यथा पालिकेच्या आवारात बसून भाजी विक्री करु ; सामाजिक कार्यकर्ते अभिषेक भोसले यांचा पालिका प्रशासनाला निवेदन देऊन इशारा ;

वेध माझा ऑनलाईन
कराडमधील बुधवार पेठेतील साठे इमारत मुख्य रस्त्यापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा ते नगरपालिका गेट या परिसरात रस्त्यावर भाजी मंडई बसूदेऊ नये या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक अभिषेक भोसले यांनी नुकतेच पालिका मुख्याधिकारी याना दिले यावेळी त्या परिसरातील असंख्य रहिवासी उपस्थित होते........

सदर निवेदनात म्हटले आहे की
आम्ही सर्व रहिवासी अर्जदार आपणास कळवितो की, बुधवार पेठ मधील वर नमूद केलेल्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडील कायमचे रहिवासी आणि व्यावसायिक (भाडे तत्वावर / मालकी हक्क) आहे.
कराड नगरपरिषद कराड यांनी भाजी मंडई ही वर नमूद केलेल्या रस्त्यावर बसू नये कारण या ठिकाणी मुख्य रस्ता, रहिवासी आणि व्यावसायिक गाळे, बाजार पेठ मुख्य रस्ता व मेडिकल आहेत व ते शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत.
त्यामुळे जे या वरील रस्त्यामध्ये येताना-जाताना सदरची मंडई येथे भरत असल्यामुळे त्यासोबत गाड्यांवरून महिला आणि पुरुष व्यक्ती भाजी मंडईतील बाजार घेत असल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम होत आहे याकडे नगरपरिषद कराड मधील संबंधित विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर दरवाजामध्ये शेतकरी/व्यापारी बाजार घेऊन, टेम्पो/बोलेरो/कृजर या सारख्या मोठ्या गाड्या घेऊन बसल्यामुळे घरातील व्यक्तींना ये जा करता येत नाही. भाग हा गावठाण असल्यामुळे अडचणींचा रस्ता आहे त्याभागात जर अचानक सिलेंडर स्फोट किंवा आग लागली तर अग्निशामक गाडी येणे खूप कठीण होते आणि इमर्जन्सी पेशंट आला तर पेशंटचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आपण सदर प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी अन्यथा नगरपरिषदेच्या आवारात भाजी विक्री करण्यासाठी आम्ही बसू असा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे 


Friday, July 3, 2026

श्री. अभिषेक भोसले

office_of_abhishek bhosale

+919096665511

युवा उद्योजक समाजसेवक

प्रति

मा. मुख्याधिकारी साहेब

कराड नगरपरिषद कराड

दि: 29-06-2026

विषय :- बुधवार पेठ मधील साठे इमारत मुख्य रस्ता ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा ते नगरपालिका गेट यांच्या समोरील रस्त्यावर भाजी मंडई बसून न देणे बाबत........

महोदय,

आम्ही सर्व अर्जदार आपणास कळवितो की, बुधवार पेठ मधील वर नमूद केलेल्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूकडील कायमचे रहिवासी आणि व्यावसायिक (भाडे तत्वावर / मालकी हक्क) आहे.

कराड नगरपरिषद कराड यांनी भाजी मंडई ही वर नमूद केलेल्या रस्त्यावर बसू नये कारण या ठिकाणी मुख्य रस्ता, रहिवासी आणि व्यावसायिक गाळे, बाजार पेठ मुख्य रस्ता व मेडिकल आहेत व ते शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत.

त्यामुळे जे या वरील रस्त्यामध्ये येताना-जाताना सदरची मंडई येथे भरत असल्यामुळे त्यासोबत गाड्यांवरून महिला आणि पुरुष व्यक्ती भाजी मंडईतील बाजार घेत असल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम होत आहे याकडे नगरपरिषद कराड मधील संबंधित विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर दरवाजामध्ये शेतकरी/व्यापारी बाजार घेऊन, टेम्पो/बोलेरो/कृजर या सारख्या मोठ्या गाड्या घेऊन बसल्यामुळे घरातील व्यक्तींना ये जा करता येत नाही. भाग हा गावठाण असल्यामुळे अडचणींचा रस्ता आहे त्याभागात जर अचानक सिलेंडर स्फोट किंवा आग लागली तर अग्निशामक गाडी येणे खूप कठीण होते आणि इमर्जन्सी पेशंट आला तर पेशंटचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आपण सदर प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी.


Thursday, July 2, 2026

कृष्णा नदीच्या रंगबदलाचे गूढ कायम; तपासणी अहवाल कुठे अडकला?अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून मौन; कराड उत्तर व दक्षिणचे आमदार सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार का? परिसरात जोरदार चर्चा सुरू..

वेध माझा ऑनलाईन
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा झाल्याची घटना समोर येऊन अनेक दिवस उलटले आहेत. या काळात नागरिकांनी वारंवार चिंता व्यक्त केली, पर्यावरणप्रेमींनी तपासणीची मागणी केली आणि 'वेध माझा'नेही या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, आजतागायत संबंधित विभागांकडून तपासणीचा अधिकृत अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे या अहवालाचे नेमके काय झाले, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.

दरम्यान कराड उत्तर व दक्षिणचे आमदार सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लोकांच्या जीवनाशी निगडित असलेला हा मुद्दा मांडणार का? ही चर्चा देखील परिसरात जोरदार सुरू आहे

सध्या पावसाळा सुरू असून नदीत गढूळ पाण्याचा प्रवाह वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते अशा काळात नदीत वाहून येणारे सांडपाणी, रासायनिक घटक किंवा इतर प्रदूषक मिसळल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी होणे अत्यावश्यक असताना संबंधित यंत्रणांची शांत भूमिका नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहे.
कृष्णा नदी ही कराडसह परिसरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. शेती, पशुपालन आणि विविध उद्योगही या नदीवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत नदीच्या रंगबदलाचे कारण तातडीने शोधून नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप अधिकृत निष्कर्ष जाहीर न झाल्याने प्रश्न अनुत्तरितच आहेत.

नदीकाठच्या काही भागांमध्ये आजही पाण्यावर हिरवट थर दिसत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. हा रंगबदल नैसर्गिक कारणांमुळे आहे की शैवालांची वाढ, रासायनिक प्रदूषण अथवा सांडपाण्यामुळे झाला आहे, याबाबत अधिकृत खुलासा नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

या संपूर्ण प्रकरणात आणखी एक बाब लक्षवेधी ठरत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या विषयावर कराड उत्तर व कराड दक्षिण मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी अद्याप ठोस सार्वजनिक भूमिका घेतलेली दिसून आलेली नाही. प्रशासनाकडून तपासणी अहवाल तातडीने जाहीर करण्यासाठी किंवा संबंधित विभागांची बैठक घेण्याबाबतही कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तरीत्या तपासणी करून संपूर्ण अहवाल जनतेसमोर ठेवावा. जर पाण्याची गुणवत्ता सुरक्षित असेल तर ते स्पष्ट करावे आणि प्रदूषण आढळल्यास त्यामागील कारणांसह जबाबदारांवर कारवाई करावी.

आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे—कृष्णा नदीच्या रंगबदलाचा तपास पूर्ण झाला आहे का? झाला असेल तर अहवाल सार्वजनिक का केला जात नाही? आणि झाला नसेल तर इतक्या संवेदनशील विषयात झालेल्या विलंबाला जबाबदार कोण? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे मिळेपर्यंत नागरिकांच्या मनातील संशय कायम राहणार, हे निश्चित आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा 'वेध माझा'  सातत्याने पाठपुरावा करणार असून, प्रशासनाकडून होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहे