Monday, March 23, 2026

सातारा पोलीस अधीक्षकांना आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा; नीलम गोरे यांचे आदेश ; वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे दिले? मंत्री जयकुमार गोरेंचा सवाल ; निलंबन तात्काळ स्थगित करण्याचे गोरेंची मागणी;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष  भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीचे पडसाद आज विधिमंडळात उमटल्याचं पाहायला मिळालं. सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विधान परिषदेत भाजप आणि शिवसेनेत जुंपली. सातारा पोलीस अधीक्षकांना आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही फुटेज सादर करावं. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावं, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. पण, आता निलम गोऱ्हे यांनी दिलेले आदेश कायम राहणार का?  असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभापती राम शिंदे निलम गोऱ्हे यांच्या आदेशाला स्थगिती देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा SP यांच्या निलंबनाचे आदेश कायम राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभापती राम शिंदे हे, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देणार की, आदेश कायम ठेवणार? याबाबत चर्चा सुरू आहेत. 
भाजपच्या करारनाम्याचा शिवसेनेकडून हिशेब घेण्यात आला.  भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'मुळे महायुतीतील शिंदेसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य फुटल्याने भाजपची सत्ता आली. या घडामोडींचे विधिमंडळात आणि राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. 
 सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विधान परिषदेत भाजप शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. एसपीचं निलंबन करण्याचे आदेश उपसभापती निलम गोऱ्हेंनी सरकारला दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्री गोरे म्हणाले...
दरम्यान  वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे दिले? असा सवाल मंत्री जयकुमार गोरेंनी केलाय. एसपींचं निलंबन तात्काळ स्थगित करण्याची मागणी जयकुमार गोरेंनी केलीये.
 
जयकुमार गोरेंचे आक्षेप...
शंभुराज देसाई,मकरंद पाटील हे मंत्री जि.प.आवारात गेलेच कसे?
देसाई,पाटील या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश का मोडले? 
वस्तुस्थिती समजून न घेता चर्चेवर आधारीत निलंबनाचे आदेश कसे दिले?
जि.परिषद निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था का मोडली?
बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ का केली?
पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश स्थगित करा
जि.परिषद आवारात पाच हजार कार्यकर्ते कोणाच्या आदेशाने आले?

सातारा जि. परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी युतीनं 65 पैकी 35 जागा मिळवून बहुमत स्पष्ट केलं. तर, भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. साताऱ्यात बहुमतासाठी 33 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपनं 6 सदस्य फोडून स्वतःचा अध्यक्ष बनवला. भाजपनं शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडले. भाजपनं एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. तर, इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.


Sunday, March 22, 2026

जि प च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांची मदत झाल्याचं प्रिया शिंदेंनी केलं कबूल ;


वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रिया शिंदे विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विजयी झाले आहेत. भाजपनं जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पराभव केला. यानंतर दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भोसले यांनी कराड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केलं. यावेळी प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश शिंदे यांची मदत झाल्याचं कबूल केलं. याशिवाय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे पाईक असून त्यामुळंच त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याचं प्रिया शिंदे म्हणाल्या.   

सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. 

प्रिया शिंदे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणिमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या सहकार्यानं संधी मिळाल्याचं म्हटलं. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे.  2014 पासून भाजप सत्तेत आल्यानंतर विकासाचा डोंगर  उभा राहिलेला आहे. आमच्या मतदारसंघाची आणि भागाची प्रगती वेगानं झाली आहे.  आज प्रथम जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आलेली आहे. देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारानं पूर्ण जिल्हा विकासाच्या दृष्टीनं महाराष्ट्रात आयडॉल होईल यासाठी जिल्हा परिषद सदस्यांना समवेत घेऊन विकासात्मक आणि संघटनात्मक काम मोठ्या पद्धतीनं करणार आहोत.  आमदार महेश शिंदे यांची मदत झालेली आहे. त्यांच्यामुळंच आम्ही इथं आहोत, असं प्रिया शिंदे यांनी म्हटलं.   

आम्ही यशवंत विचारांचे पाईक आहोत, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करुन, त्यांचे विचार पुढं नेण्यासाठी, त्यांच्या विचारानं जिल्हा परिषद चालवण्यासाठी त्यांची प्रेरणा घेण्यासाठी इथं आलो आहे. यशवंत विचारांचा खून केल्याचा भाजपवर होणारा आरोप चुकीचा असल्याचं ही प्रिया शिंदे यांनी म्हटलं. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा आदर करुन आमचं प्रत्येक पाऊल असेल, असं शिंदेंनी म्हटलं.


मंत्री शंभूराज देसाई म्हणाले...सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी प्रशासन,पोलीस घरगड्यासारखे वागले...लोकशाहीचा गळा घोटाळा गेला...

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी प्रशासन भाजपच्या बाजूने घरगडी असल्यासारखे वागले मी आणि मकरंद आबा असे आम्ही दोन मंत्री जिल्ह्यात असताना आम्हाला 10, 10 पोलिस मागे ओढत होते आमचे सदस्य संख्या सर्वाधिक होती लोकांनी आम्हाला कौल दिला असताना लोकशाहीचा गळा घोटून भाजपने सत्ता स्थापन केली जरी हे क्षणिक सुख भाजपला झाले असले तरी यापुढे सातारा जिल्ह्यात याचे पडसाद नक्कीच उमटणार आहेत असा इशारा देत झालेल्या एकूणच या घटनेबाबत ना शंभराज देसाई यांनी जाहीर निषेध केला तसेच जे या निवडीवेळी  सभासद फुटले त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही ते म्हणाले खोट्या केसेस टाकून या निवडणुकीसाठी प्रशासनाने लोकशाहीचा खून केला असा आरोपही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे
पालकमंत्री शंभूराजे देसाई हे देवदर्शनला आले तरी संपूर्ण सातारा शहराला वेठीस धरतात 

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले...अपयश झाकण्यासाठी पालकमंत्री खोटे आरोप करत आहेत ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया लोकशाही पद्धतीनेच पार पडली आहे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम अजिबात या प्रक्रियेत झालेले नाही आपले अपयश झाकण्यासाठी आमचे विरोधक आमच्यावर खोटे आरोप करत आहेत असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे विरोधक जिंकले तर ती लोकशाही आणि आम्ही जिंकलो तर ती दांडगाई हा कुठला न्याय असा सवाल ही त्यांनी यावेळी केला
यावेळी मंत्री जयकुमार गोरे कराडचे आमदार मनोज घोरपडे डॉ अतुल भोसले विक्रम पावसकर तसेच भाजपचे साताऱ्याचे विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते 

ना भोसले म्हणाले आम्ही लोकशाही पद्धतीनेच ही निवडणूक लढलो आहे आम्ही भाजप चे मंत्री कोणीही त्या ठिकाणी आवारात आमचे वाहन घेऊन गेलो नाही फक्त निवडीनंतर अभिनंदन करायला आम्ही दोघे मंत्री त्याठिकाणी गेलो
आमच्या सदस्यांनी मतदान केले त्यानंतर सेने-राष्ट्रवादी चा लोकांनी आम्हाला मतदान केले ते त्यांना न करता आम्हाला का केले? याचा अर्थ त्या सदस्यांवर दबाव होता असाच त्याचा अर्थ होतो, आणि शंभूराजे देसाई आपले अपयश लपवण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करत आहेत असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले आहेत

Saturday, March 21, 2026

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे पडसाद राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटणार ? शंभूराज देसाई भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार ?

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे. या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ 28 सदस्यांपर्यंत मर्यादित असतानाही, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रणनीती आखत अतिरिक्त पाठिंबा मिळवला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भाजपला एकूण 33 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आणि सत्ता हस्तगत करण्यात यश आले. या पार्श्वभूमीवर प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, या निकालामुळे शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. या निकालाचे पडसाद आता थेट राज्याच्या कॅबिनेट बैठकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे  
दरम्यान या बैठकीत शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री प्रशासनाच्या भूमिकेबाबत तसेच भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार आहेत.

या निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, शेवटच्या क्षणी भाजपने राजकीय डावपेच रचत काही सदस्यांना आपल्या बाजूला वळवले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या ‘पळवापळवी’मुळे महायुतीतील समन्वयावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे या शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी असल्याने या निकालाला अधिक राजकीय रंग चढला आहे. एका बाजूला भाजपचा विजय, तर दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजी, अशा दुहेरी परिस्थितीत साताऱ्यातील राजकारण तापले आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीदरम्यान पोलिसांच्या मदतीने राजकीय खेळी करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे हा मुद्दा आता केवळ स्थानिक पातळीवर न राहता राज्याच्या सत्ताकेंद्रात पोहोचण्याची चिन्हे आहेत. येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री प्रशासनाच्या भूमिकेबाबत तसेच भाजपच्या काही मंत्र्यांच्या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त करणार आहेत. त्यामुळे ही बैठक केवळ नियमित कामकाजापुरती मर्यादित न राहता राजकीय वादांनी गाजण्याची शक्यता आहे.


Friday, March 20, 2026

मंत्री शंभूराजे देसाई, मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना अस्मान दाखवत भाजपने सातारा जिल्हा परिषद केली काबीज ; राज्यभरात झाला चर्चेचा विषय ;

वेध माझा ऑनलाइन
32 जागांवर संख्याबळ दाखवत भाजपकडून सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड करण्यात आली. राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
 
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. कोणालाही बहुमत नसल्याने अध्यक्षपदावर कोण बाजी मारणार याची उत्सुकता असताना भाजपने शेवटच्या क्षणी आपला अध्यक्ष केला. त्यामुळे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना अस्मान दाखवत भाजपने सातारा जिल्हा परिषद काबीज केली आहे. त्यामुळे सिनेस्टाईल थरार जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत दिसून आला. 32 जागांवर संख्याबळ दाखवत भाजपकडून अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड करण्यात आली. राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करूनही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे संख्याबळ 31 दाखवू शकले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते 35 चे बहुमत असतानाही भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत.