Wednesday, July 15, 2026

:कराड पालिकेत घनकचरा प्रकल्पासह विकासकामांत घोटाळा?' नगरसेवक वाटेगावकर यांचा थेट आरोप; सात दिवसांत खुलासा नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा :

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासह विविध विकासकामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजपचे गटनेते गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी बुधवारी पालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. घनकचरा प्रकल्पातील कामांपासून ते रखडलेल्या विकासकामांपर्यंत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले त्यांनी यामध्ये घोटाळा झाल्याची शंका व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. 
यावेळी नगरसेवक शिवाजी पवार, सुमित शिंदे, अजय पावसकर, आशुतोष डुबल, किशोरी शिंदे, वैष्णवी वायदंडे, शारदा माने, वर्षा वास्के, सुहास जगताप उपस्थित होते.

वाटेगावकर म्हणाले, 
घनकचरा प्रक्रिया केंद्रात बगिचा विकसित करणे, अंतर्गत रस्ते, तांबडी माती टाकणे, शोभेची झाडे लावणे आणि परिसराचे सुशोभीकरण यासाठी ठराव क्रमांक १६३ अंतर्गत सुमारे ₹१ कोटी ८१ लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला. कागदोपत्री ही कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष पाहणीत अशी कोणतीही कामे दिसून आली नाहीत. त्यामुळे संबंधित कामांचे मोजमाप, बिले आणि देयकांची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.

बायोगॅस प्रकल्प परिसरातील काही रस्त्यांची कामेही प्रत्यक्षात न होता कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आल्याची शंका व्यक्त करत, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या कारभारावरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. ओल्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया होत नसल्याने, मनुष्यबळाची कमतरता, बेल्ट वाहिनीची दुरवस्था आणि कचऱ्याचे वाढते ढीग यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.याशिवाय बीपीसीएल आणि एअरटेलच्या वाटाघाटींमध्ये हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त करत त्या व्यवहारांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शहरातील विकासकामांसाठी मंजूर झालेल्या ₹११ कोटींच्या निधीबाबत खुलासा मागण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले होते. मात्र, तीन तास प्रतीक्षा करूनही बैठक न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप वाटेगावकर यांनी केला. "सात महिन्यांपूर्वी टेंडर होऊन वर्क ऑर्डर निघालेली अनेक विकासकामे अद्याप सुरू झालेली नाहीत. हा केवळ प्रशासकीय हलगर्जीपणा आहे की यामागे दुसरे काही कारण आहे?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

नगरसेवक शिवाजी पवार यांची टिका 
नगरसेवक शिवाजी पवार यांनीही पालिका प्रशासनावर टीका करत, "पालिका निवडणुकीनंतर सहा महिने उलटले, मात्र आतापर्यंत केवळ एकच सर्वसाधारण सभा झाली आहे. विकासकामांवर चर्चा होण्यासाठी नियमित सभा होणे आवश्यक आहे. अन्यथा शहराचा विकास ठप्प होईल," असे सांगितले.
शेवटी, घनकचरा प्रकल्प, विकासकामे आणि कथित आर्थिक अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर भाजपच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवकांनी दिला. पालिकेतील कथित गैरव्यवहारांबाबत भाजपने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेची कराडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे 

Tuesday, July 14, 2026

मनसे कराड शहर अध्यक्ष सागर बर्गे यांचे वडील भिकाजी बर्गे यांचे निधन ; उद्या रक्षाविसर्जन ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कराड शहर अध्यक्ष सागर बर्गे व छ. शिवाजी महाराज रिक्षा युनियनचे अध्यक्ष राहुल बर्गे यांचे वडील भिकाजी गोविंद बर्गे (वय 79) यांचे रविवार दि.12 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. 

रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम 
उद्या बुधवार दि.15 रोजी सकाळी 10 वाजता वैकुंठधाम स्मशानभूमी कराड येथे होणार आहे.

पर्यावरण रक्षण"चा संदेश देत कराड सायकल क्लबची पंढरपूर सायकल वारी ५१ सायकलिस्टांचा १४३ किमी प्रवास; राज्यस्तरीय सायकल संमेलन, प्रदक्षिणा व सायकल रिंगणात :

वेध माझा ऑनलाईन।
"होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी..." या भक्तिभावाने कराड सायकल क्लबतर्फे आयोजित श्रीक्षेत्र पंढरपूर सायकल वारी उत्साहात पार पडली. या वारीत पाच बाल सायकलिस्टांसह एकूण ५१ सायकलिस्ट सहभागी झाले होते.

शनिवार, ११ जुलै रोजी पहाटे चार वाजता कराड येथून सायकल वारीचे प्रस्थान झाले. कराड–शामगाव घाट–मायणी–दिघंची मार्गे सुमारे १४३ किलोमीटरचा आठ ते नऊ तासांचा प्रवास पूर्ण करून दुपारी दोन वाजता सायकलिस्ट श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दाखल झाले. वर्दीश विजय लिगाडे, अवनीश मयूर माने, शौर्य क्षितिज बेलापुरे, अनुष्का रणजित धारवट व संहिता समीर करमरकर या बाल सायकलिस्टांसह डॉ. माणिक बनकर, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, सुनील बुधे, विनोद सावंत, अभय नांगरे, विजय मोहिते, राजू रेके, अनिल कुलकर्णी, डॉ. राहुल फासे, डॉ. संतोष टकले यांच्यासह अन्य सायकलिस्ट सहभागी झाले.

नाशिक सायकलिस्ट क्लब व पंढरपूर सायकल क्लब आयोजित राज्यस्तरीय पाचव्या सायकल संमेलनात राज्यातील १३२ सायकल क्लब सहभागी झाले होते. रविवारी सकाळी सायकल प्रदक्षिणा, रेल्वे मैदानावरील भव्य सायकल रिंगण आणि हरिनामाच्या गजरात सर्वांनी सहभाग नोंदविला. त्यानंतर संमेलनात सहभागी होऊन सायकलिस्ट कराडकडे रवाना झाले.


प्रतिकूल परिस्थितीत १४ जणांनी रिटर्न सायकल वारी
पंढरपूरहून कराडकडे प्रचंड ऊन आणि जोरदार हेडविंडचा सामना करत जय पोद्दार, वेदांत रावळ, मनोज कुलकर्णी, प्रा. ज्ञानेश्वर भोईटे, प्रा. सदाशिव आवळेकर, डॉ. माणिक बनकर, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, सुनील बुधे, अभय नांगरे, डबल एसआर रविराज जाधव, मुकुंद पोद्दार, प्रा. अर्जुन भिंगारे, वैभव गुरसाळे आणि चंद्रजीत पाटील या १४ सायकलिस्टांनी रिटर्न सायकल वारी पूर्ण करत जिद्द, चिकाटी आणि शारीरिक क्षमतेचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला.

Monday, July 13, 2026

११ कोटींचा निधी, ४४ कामे आणि सात महिन्यांची प्रतीक्षा; कराड पालिकेला आमदार डॉ. अतुल भोसले यांचा थेट कराडच्या मुख्याधिकारी व्हटकर यांना जाब :भाजप नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेनंतर आमदारांचे पत्र; कराडचे राजकारण तापले ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन तब्बल सात महिने उलटले. ४४ विकासकामांना मंजुरी, निधी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली; मात्र प्रत्यक्षात अनेक कामे अजूनही सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी थेट हस्तक्षेप करत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून रखडलेल्या कामांचा खुलासा मागितला आहे.

कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी व्हटकर यांना घेराव घालत मंजूर कामांबाबत जाब विचारला होता. त्यानंतर आता आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाला थेट प्रश्न विचारल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यामुळे कराड पालिकेतील प्रशासकीय कारभार आणि राजकीय संघर्ष दोन्ही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

पालिकेच्या कामकाजात आमदार भोसले यांनी थेट लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर भाजप नगरसेवक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत. 

आमदार भोसले यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून ६६८.८८ लाख रुपयांची ३० विकासकामे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून ३९५ लाख रुपयांची १४ विकासकामे मंजूर झाली आहेत. म्हणजेच एकूण ४४ कामांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही बहुतांश कामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत.
यामध्ये शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचाही समावेश आहे. कराड–मलकापूर बैलबाजार रस्त्यासाठी १५७ लाख रुपयांचा निधी मंजूर असतानाही रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मोठमोठे खड्डे, वाहतुकीचा वाढता धोका आणि नागरिकांचा रोजचा मनस्ताप यामुळे मंजूर निधीचा उपयोग नेमका कधी होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

आमदार भोसले यांनी आपल्या पत्रात प्रशासनाकडे तीन स्पष्ट प्रश्न उपस्थित केले आहेत...
मंजूर कामे नेमकी का रखडली?
विलंबामागील जबाबदार कारणे कोणती? 
आणि ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार? 
याबाबत नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे कराडच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विकासकामांचा मुद्दा आता केवळ प्रशासनापुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट राजकीय जबाबदारीचा विषय बनला आहे. त्यामुळे कराडचे राजकारण आता याच मुद्यावरून तापण्याची शक्यता आहे

११ कोटींचा निधी मंजूर; ४४ विकासकामे रखडली ;आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून विचारला जाब - सात महिने उलटूनही कामे सुरू का नाहीत? कराड पालिकेचे राजकारण तापणार! यापुढे अतुलबाबा पालिकेत लक्ष घालणार ; गावात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन तब्बल सात महिने उलटले. ४४ विकासकामांना मंजुरी, निधी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली; मात्र प्रत्यक्षात अनेक कामे अजूनही सुरूच झालेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आमदार डॉ. अतुल भोसले यांनी थेट हस्तक्षेप करत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून रखडलेल्या कामांचा खुलासा मागितला आहे.

कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी व्हटकर यांना घेराव घालत मंजूर कामांबाबत जाब विचारला होता. त्यानंतर आता आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाला थेट प्रश्न विचारल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यामुळे कराड पालिकेतील प्रशासकीय कारभार आणि राजकीय संघर्ष दोन्ही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.राजकीय वर्तुळात याकडे केवळ विकासकामांचा प्रश्न म्हणून नव्हे, तर बदलत्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. 

पालिकेच्या कामकाजात आमदार भोसले यांनी थेट लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर भाजप नगरसेवक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला प्रशासनाला वेळ देणारे नगरसेवक आता थेट उत्तराची मागणी करत असल्याने पालिका प्रशासनावरचा दबाव वाढला आहे.

आमदार भोसले यांनी पत्रात नमूद केल्यानुसार, 
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानातून ६६८.८८ लाख रुपयांची ३० विकासकामे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून ३९५ लाख रुपयांची १४ विकासकामे मंजूर झाली आहेत. म्हणजेच एकूण ४४ कामांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही बहुतांश कामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत.
यामध्ये शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांचाही समावेश आहे. कराड–मलकापूर बैलबाजार रस्त्यासाठी १५७ लाख रुपयांचा निधी मंजूर असतानाही रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मोठमोठे खड्डे, वाहतुकीचा वाढता धोका आणि नागरिकांचा रोजचा मनस्ताप यामुळे मंजूर निधीचा उपयोग नेमका कधी होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

आमदार भोसले यांनी आपल्या पत्रात प्रशासनाकडे तीन स्पष्ट प्रश्न उपस्थित केले आहेत—
मंजूर कामे नेमकी का रखडली? विलंबामागील जबाबदार कारणे कोणती? आणि ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार? 
याबाबत नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे कराडच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. विकासकामांचा मुद्दा आता केवळ प्रशासनापुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट राजकीय जबाबदारीचा विषय बनला आहे. मंजूर निधी असूनही विकासकामे रखडणे हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की त्यामागे अन्य कारणे आहेत, याकडे आता नागरिकांचेही लक्ष लागले आहे.

११ कोटींचा निधी मंजूर; ४४ विकासकामे रखडली ;आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून विचारला जाब - सात महिने उलटूनही कामे सुरू का नाहीत? कराड पालिकेचे राजकारण तापणार! यापुढे अतुलबाबा पालिकेत लक्ष घालणार ; गावात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड नगरपरिषदेला महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन सात महिने उलटले आहेत. या योजनांतील ४४ विकासकामांसाठी निधी उपलब्ध असूनही अनेक कामांना अद्याप सुरुवात झालेली नसल्याने आमदार डॉ. अतुल भोसले यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना पत्र पाठवून याबाबत खुलासा मागितला आहे.
एकूणच मंजूर कामे सात महिने उलटूनही का सुरू नाहीत? याबाबत आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराड पालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून जाब विचारल्याच्या कारणाने यापुढे... अतुलबाबा पालिकेत थेट लक्ष घालणार हे निश्चितच आहे... आणि  याचनिमित्ताने कराड पालिकेचे राजकारण तापणार अशीही शक्यता आहे

कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून विकासकामांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनी मुख्याधिकारी व्हटकर यांना घेराव घालत मंजूर कामांबाबत जाब विचारला होता. त्यानंतर आता आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाला थेट प्रश्न विचारल्याने हा वाद आणखी तीव्र झाला आहे. यामुळे कराड पालिकेतील प्रशासकीय कारभार आणि राजकीय संघर्ष दोन्ही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
दरम्यान पालिकेच्या कामकाजात आमदार भोसले यांनी थेट लक्ष घालण्यास सुरुवात केल्यानंतर भाजप नगरसेवक अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या नगरसेवकांचा पालिका प्रशासनावरचा दबाव वाढला आहे.

आमदार भोसले यांनी पत्रात नमूद केले आहे की... 
महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत ६६८.८८ लाख रुपयांची ३० विकासकामे, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत ३९५ लाख रुपयांची १४ विकासकामे मंजूर झाली आहेत. या सर्व कामांसाठी प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध असूनही बहुतांश कामे प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत.

शहरातील कराड–मलकापूर बैलबाजार रस्त्याच्या कामासाठी १५७ लाख रुपयांचा निधी मंजूर असूनही रस्त्याची अवस्था अद्यापही खराब असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना व वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर मंजूर कामे रखडण्यामागील कारणे, त्यासाठी जबाबदार बाबी आणि ही कामे प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याबाबत नगरपरिषद प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी आमदार भोसले यांनी पत्राद्वारे केली आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भाजप नगरसेवकांनीही रखडलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन कामे तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदारांनीही अधिकृत पत्राद्वारे प्रशासनाकडे खुलासा मागितल्याने शहरातील रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Saturday, July 11, 2026

देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीकरीता आलेल्या चौघांना अटक ; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे हस्तगत : कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई;

वेध माझा ऑनलाईन।
 देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीकरीता आलेल्या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली. यामध्ये चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा सुमारे साडेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती डीवायएसपी राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अफताब बादशाह मोमीन (वय 24), रोहन मेहबुब शेख (वय 19, दोघेही रा. रा. मुजावर कॉलनी, कराड), अमर रघुनाथ पाटील (वय 23, रा. काले, ता. कराड) व ओंकार प्रकाश हिंगणे (वय 25, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.
डीवायएसपी राजश्री पाटील पुढे म्हणाल्या, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील यांनी कराड शहर व परिसरात बेकायदा पिस्टल बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कराड शहर पोलिसांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस हवालदार संदीप कुंभार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत चौघेजण विनापरवाना पिस्टल विक्रीकरीता थांबले आहेत. त्या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शासकीय रत्नागिरी गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या ईदगाह मैदानाच्या मोकळ्या जागेत छापा टाकला असता तेथे अफताब मोमीन, रोहन शेख, अमर पाटील व ओंकार हिंगणे यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता चौघांकडे चार देशी बनावटीचे पिस्टल व आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा 3 लाख 58 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रमुखचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम, पोलीस हवालदार सतिश पाटील, संदीप कुंभार, अशोक वाडकर, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, धिरज कोरडे, दिग्विजय सांडगे, निलेश विभुते, अमोल देशमुख, मुकेश मोरे, मोहसीन मोमीन, आनंदा जाधव, महेश पवार, विजय गुरव, सोनाली पिसाळ यांनी केली.