Sunday, June 28, 2026

राज्यात पुन्हा होणार राजकीय खळबळ!आता फुटणार 24 आमदार ?

वेध माझा ऑनलाईन -
राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत, नुकतीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली, त्या -त्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडका सुरू आहे. दरम्यान ज्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती,  या बैठकीला 4 आमदारांनी दांडी मारली होती, त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं

दरम्यान त्यानंतरची मोठी बातमी म्हणजे महाविकास आघाडीने आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला 24 आमदार गैरहजर असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीची मुंबईमध्ये जी बैठक झाली त्यानंतर ऑपरेशन आमदार याची चर्चा सुरू आहे. या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते,  या आमदारांच्या मनात नक्की काय आहे?हे विचारलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरती सगळे नाराज आहेत,  स्वतःहून जर कोणी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत असतील तर त्याला आम्ही कशाला नाही म्हणू,  24 आमदार गैरहजर राहिले त्यांच्याशी आम्ही चर्चा करू त्यांची नाराजी काय आहे ते जाणून घेऊ असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Saturday, June 27, 2026

कराड उत्तरला 286 कोटींचा विकासनिधी मंजूर रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड काँक्रीट रस्त्याला ऐतिहासिक मंजुरी ;

वेध माझा ऑनलाईन। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड या महत्त्वाच्या रस्त्याला काँक्रीटीकरणासाठी तब्बल 286 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या या निधीमुळे कराड उत्तरमधील प्रवास वेगवान होणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. सदर रस्ता काँक्रीट झाल्याने स्थानिक नागरिकांसह शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

पाठपुरावा यशस्वी

कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मतदारसंघातील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.याबत बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, कराड उत्तर हा भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ आहे. ग्रामीण भागातील दळणवळण वेगवान व्हावे, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी या रस्त्याचे काँक्रीटीकरण अत्यावश्यक होते. 286 कोटींच्या निधीमुळे कराड उत्तरच्या विकासाला नवी दिशा मिळेल.” तसेच उर्वरित रस्त्यांच्या निधीसाठी प्रयत्नशील आहेया काँक्रीट रस्त्यामुळे वेळेची बचत होणार असून अपघाताचे प्रमाणही कमी होणार आहे. ग्रामीण भागातील कृषी माल बाजारपेठेपर्यंत जलद पोहोचल्याने शेतकण्यांना आर्थिक फायदा होणार आहे. तसेच पर्यटकांचा ओघ वाढल्याने स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळणार आहे.कराड उत्तरच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध असून यापुढेही विकासकामांचा धडाका सुरूच राहणार असल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले.



पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पुराच्या पाण्याचा निचरा तसेच नालेसफाई व्यवस्थापन आतापासूनच चोख ; कृष्णा नदीच्या सध्याच्या प्रदूषण सदृश स्थितीचा शहराच्या पाणी व्यवस्थेशी संबंध नाही; नागरिकांनी घाबरू नये ; नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांची स्पष्टोक्ति ;


वेध माझा ऑनलाइन। 
पावसाळा सुरू झाला आहे त्या पार्श्वभूमीवर कराड शहरात जर भविष्यात पुर परिस्थिती निर्माण झालीच तर त्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन केले आहे तसेच गटर, ओढे व नालेसफाई करून शहराच्या दळणवळणाला कोणतीही अडचण येणार नाही अशी चोख व्यवस्था शहरासाठी आतापासूनच आम्ही करून ठेवली असल्याने शहरवासीयांना कसल्याही प्रकारच्या अडचणीला पावसाळ्यात तोंड द्यायची वेळ येणार नाही अशी ग्वाही शहराचे नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी वेध-माझा शी बोलताना दिली
तसेच कृष्णा नदीच्या पाण्यात सध्या प्रदूषण सदृश स्थिती निर्माण झाली आहे त्याचा शहरातील पाणी व्यवस्थापनेशी कसलाही संबंध नाही कारण शहरासाठी पिण्याचे पाणी कोयना नदीतून आणले जाते त्यामुळे "कृष्णे'च्या प्रदूषण स्थितीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम नाहीये त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही अशी स्पष्टोक्तीही नगराध्यक्ष यादव यांनी यावेळी बोलताना दिली

सध्या कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याबाबत नागरिकांनी वारंवार चिंता व्यक्त केली असून  या गंभीर विषयाची अद्याप संबंधित प्रशासनाने दखल घेतलेली नसल्याचे चित्र आहे.
कृष्णा नदी ही नागरिकांच्या जीवनाशी जोडलेली आहे. पिण्याचे पाणी, शेती, पशुपालन आणि विविध उद्योगांसाठी या नदीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याची बाब समोर आल्यानंतर तातडीने या पाण्याची तपासणी होणे अपेक्षित होते. परंतु याबाबतची अधिकृतरीत्या कोणतीही ठोस माहिती प्रशासनाने अजूनही जाहीर केलेली नाही 
त्यामुळे वेध-माझा ने हा विषय उचलून धरला आहे...
दरम्यान या संपूर्ण विषयावर बोलताना नगराध्यक्ष यादव यांनी कृष्णे'च्या प्रदूषण स्थितीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम नाहीये कारण शहरासाठी पिण्याचे पाणी कोयना नदीतून आणले जाते
त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही अशी स्पष्टोक्तीही याबाबत बोलताना दिली आहे


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पुराच्या पाण्याचा निचरा तसेच नालेसफाई व्यवस्थापन आतापासूनच चोख ; कृष्णा नदीच्या सध्याच्या प्रदूषण सदृश स्थितीचा शहराच्या पाणी व्यवस्थेशी संबंध नाही; नागरिकांनी घाबरू नये ; नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांची स्पष्टोक्ति ;

वेध माझा ऑनलाइन। 
पावसाळा सुरू झाला आहे त्या पार्श्वभूमीवर कराड शहरात जर भविष्यात पुर परिस्थिती निर्माण झाली तर पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन केले आहे तसेच गटर, ओढे व नालेसफाई देखील करून शहराच्या दळणवळणाला कोणतीही अडचण येणार नाही अशी चोख व्यवस्था शहरासाठी आतापासूनच आम्ही करून ठेवली असल्याने शहरवासीयांना कसल्याही प्रकारच्या अडचणीला पावसाळ्यात तोंड द्यायची वेळ येणार नाही अशी ग्वाही शहराचे नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी वेध-माझा शी बोलताना दिली

तसेच कृष्णा नदीच्या पाण्यात सध्या प्रदूषण सदृश स्थिती निर्माण झाली आहे त्याचा शहरातील पाणी व्यवस्थापनेशी कसलाही संबंध नाही कारण शहरासाठी पिण्याचे पाणी कोयना नदीतून आणले जाते त्यामुळे "कृष्णे'च्या प्रदूषण स्तिथीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम नाहीये त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही अशी स्पष्टोक्तीही नगराध्यक्ष यादव यांनी यावेळी बोलताना दिली




Friday, June 26, 2026

कृष्णा नदीच्या रंगबदलाची चौकशी कधी? प्रशासनाचे मौन का ? त्यामागचे कारण काय ? नागरिक संतप्त' ;वेध माझा'चा सलग पाठपुरावा सुरूच राहणार ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या अनेक दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे चित्र कायम आहे. अद्याप नदीच्या पाण्याची अधिकृत तपासणी, अहवाल किंवा कारणमीमांसा जाहीर करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळे वेध माझा' हा विषय लावून धरणार आहे...कारण प्रश्न लोकांच्या आरोग्याचा आहे...

कृष्णा नदीवर परिसरातील लाखो नागरिकांचे पिण्याचे पाणी, शेती, पशुपालन आणि विविध उद्योग अवलंबून आहेत. अशा महत्त्वाच्या नदीच्या पाण्याचा रंग अचानक बदलल्यानंतर तातडीने वैज्ञानिक तपासणी होणे अपेक्षित होते. मात्र अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नदीकाठच्या विविध भागांत अजूनही पाण्यावर हिरवट थर दिसून येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. काही ठिकाणी पाणी पूर्णपणे निळसर-हिरव्या रंगाचे दिसत असल्याने जलप्रदूषण, शैवालांची वाढ, रासायनिक घटकांचे प्रमाण किंवा औद्योगिक अथवा सांडपाण्याचा परिणाम अशा विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र याबाबत कोणताही अधिकृत खुलासा नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे.विशेष म्हणजे, इतका संवेदनशील विषय समोर आल्यानंतरही आमदार खासदार  लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी करून प्रशासनाकडून अहवाल मागविल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे "नदीचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा नाही, तर जनतेच्या आरोग्याचा आहे," अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि नदीकाठच्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे तातडीने पाण्याचे नमुने तपासून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, तसेच रंगबदलामागील नेमके कारण जाहीर करून आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.

दरम्यान, 'वेध माझा'कडून या गंभीर विषयाचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

कराडच्या समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उत्साहात ;


वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्था यांच्या वतीने नुकताच सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला. या प्रसंगी बटूंना उपनयन संस्कार देण्यात आले.यावेळी उपस्थित ब्रह्मवृंदांनी बटूंना आशीर्वाद दिले. 

ब्राह्मण समाजात उपनयन संस्काराला अत्यंत महत्त्व असून हा संस्कार व्यक्तीच्या धार्मिक, सांस्कृतिक व वैदिक जीवनाचा प्रारंभ मानला जातो. वेदाध्ययनाची सुरुवात, शिस्त, संस्कार आणि कर्तव्यबुद्धी यांचा पाया या संस्कारातून घातला जातो. त्यामुळे उपनयन संस्कार हे समाजाच्या परंपरेचे आणि संस्कृतीचे जतन करणारे एक अत्यंत आवश्यक व महत्त्वपूर्ण संस्कार आहे.
समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्था, कराड ही संस्था समाजोपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबवत असून समाजातील सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक परंपरा जपण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. प्रतिवर्षी संस्था समाजहिताचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करून समाजबांधवांना एकत्र आणण्याचे कार्य करत आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री. जयंत बेडेकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच उपाध्यक्ष श्री. विकास देशपांडे, सचिव श्री. ओंकार आपटे गुरुजी खजिनदार श्री. प्रशांत कुलकर्णी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या  योगदानाने विविध उपक्रम यशस्वीपणे पार पाडले जातात
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असून भविष्यातही असेच उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील, असे यावेळी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

कराडच्या प्रीतिसंगम बागेत...लोकांचा वावर कमी...गाढवांचाच वावर जास्त !...बागेतील दोन दिवसांपासूनची परिस्थीती !


वेध माझा ऑनलाईन।
काल पासून कराडच्या प्रीतिसंगम बागेत गाढवांचा वावर अचानक वाढलेला दिसला.हा वावर वाढल्याने शहरातील नागरिकांनी असचर्य व्यक्त करत बागेच्या व्यवस्थापनेबाबत चिंता व्यक्त केली आहे असे चालू राहिल्यास शहरातील लोकांसाठी ही बाग आहे की गाढवांसाठी?  असा प्रश्न यानिमित्ताने लोकांना पडला आहे

प्रीतिसंगम बाग हा शहराच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्याठिकाणी स्व यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे त्याठिकाणी पावित्र्य राखणे जितके गरजेचे आहे तितकेच त्याठिकाणी चोख व्यवस्थापन असणे देखील  गरजेचे आहे 
दुपारपासून तेथे अनेकजण जेवणासाठी डबे घेऊन सहकुटुंब येत असतात... असे बऱ्यापैकी रोजचेच चित्र असते...सकाळी देखील लोकांची त्याठिकाणी फिरण्यासाठी गर्दी असते. ...संध्याकाळी तर पाय ठेवायला जागा उरत नाही इतकी त्याठिकाणी गर्दी होत असते...त्यामुळे त्याठिकाणचे व्यवस्थापन व्यवस्थित व चोख असणे गरजेचे आहे... जेणेकरून त्याठिकाणी नागरिकांना सुरक्षित आणि आनंदी वाटेल... पण तसे होताना दिसत नाही...

येथील प्रीतिसंगम बाग ,टाऊन हॉल, आणि स्व पी डी पाटील उद्यान या एकूण 3 ठिकाणचे व्यवस्थापन पालिकेकडून दिले गेले आहे...त्यापैकी प्रीतिसंगम बाग येथे काल अचानकपणे कळपाने गाढवं जमल्याचे दिसल्याने त्याठिकाणचे व्यवस्थापन ढिसाळ का असावे? अशी यानिमित्ताने चर्चा आहे...
याविषयी विरोधी गट आपला आवाज उठवेल तेव्हा उठवू दे...पण...कराडकर नागरिक वेध माझा शी संपर्क करून या विषयाला तोंड फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि  याठिकाणचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत...

ही परिस्थिती यापुढे बदलली गेली पाहिजे जेणेकरून त्याठिकाणी असलेले ढिसाळ व्यवस्थापनाचे चित्र संपूर्ण शहरासमोर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे...कारण प्रीतिसंगम बाग शहराचे नाक आहे...अनेक परिसरातून त्याठिकाणी विविध सहली तसेच अभ्यास दौऱ्यासाठी अनेक लोक विविध भागातून येत त्याठिकाणी असतात...याचे भान प्रशासनाला असले पाहिजे... 
त्यामुळे  पालिका प्रशासन यापुढे अशा चुका येथे होऊ देणार नाही आणि बागेमधील माणसांचा वावर कमी...आणि गाढवांचा वावर जास्त...अशा परिस्थितीला आळा घालण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल अशी लोकांना अपेक्षा आहे...