Saturday, March 14, 2026

भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी दिलेला शब्द पाळला ; काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
उंब्रज परिसरात छ शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहत आहे,  मी याकामी नक्कीच मदत करणार... असा शब्द मी दिला होता... तो शब्द पाळण्यासाठी आज मी पुन्हा येथे आलो आहे... असे म्हणत भाजप चे कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी या पुतळ्याच्या मूर्तिकारास  5 लाख रुपयांचा चेक देत... दिलेला आपला शब्द पाळला आहे... तसेच याकामी सर्वांनी मदत करावी अशी हाकदेखील त्यांनी यावेळी परिसरातील जनतेला दिली... 

दरम्यान...  याकामी दिलेला शब्द रामकृष्ण वेताळ यांनी पाळला आहे,... त्यामुळे परिसरातील पुढारी म्हणवणाऱ्या इतरांनीदेखील आपली जबाबदारी ओळखून या कामासाठी सढळ हाताने मदत करावी अशी अपेक्षा याच परिसरातील जनतेकडून व्यक्त होताना दिसत आहे...

इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यावर भीषण हल्ला; नेता गंभीर जखमी? अमेरिकेनं पुरावा दिला ;

वेध माझा ऑनलाइन।
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका आणि इस्त्रायलचे इराणवर भीषण हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनेई हे देखील जखमी झाल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि 28 फेब्रुवारी रोजी मध्य पूर्वेत एका भीषण युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली. अमेरिकेनं त्यापूर्वीच युद्धाची तयारी पूर्ण केली होती. दरम्यान युद्धाच्या दुसऱ्या दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर जोरदार हल्ले करण्यात आले आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यानंतर इराण जेवढ्यावेळेस नव्या सर्वोच्च नेत्याची निवड करेल तेवढ्यावेळेस आम्ही त्याला मारू अशी धमकी इस्त्रायलकडून इराणला देण्यात आली होती. मात्र इराणने पुन्हा एकदा आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची निवड केली. आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान काही दिवसांपूर्वी मोजतबा खामेनेई हे देखील अमेरिका आणि इराणच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असल्याची बातमी समोर आली होती. त्यावर आता अमेरिकेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी मोठा दावा केला आहे, इरानचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई हे युद्धात जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा चेहरादेखील पूर्णपणे खराब झाल्याची शक्यता आहे, असं हेगसेथ यांनी म्हटलं आहे. मोजतबा खामेनेई सध्या अशा अवस्थेमध्ये आहेत की ते आता त्यांच्या देशाचं नेतृत्व देखील करू शकणार नाहीत, इराणचं नेतृत्व भित्र आहे. लपून बसलं आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा आणि त्यांच्या काही नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याचा एकही फोटो किंवा व्हिडीओ समोर आला नसल्याचे पीट हेगसेथ यांनी म्हटलं आहे.

नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब - गॅस टंचाईवरून राऊतांचा हल्लाबोलसंजय राऊत

वेध माझा ऑनलाइन।
आखाती युद्धाचा भारतावर, विशेषतः गॅस टंचाईच्या रूपात, गंभीर परिणाम होत आहे. यामुळे नागरिक आणि हॉटेल व्यवसायिक त्रस्त आहेत, अनेकांना गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या परिस्थितीवरून सरकार आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे, कोविड काळातील परिस्थितीची आठवण करून देत सरकारच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आखाती देशातील युद्धाच संपूर्ण जगावर परिणाम होत असून भारतातही लोकांच्या आयुष्यावर परिणाम होताना दिसत आहे. एकीकडे युद्धामुळे निर्यातीवर परिणाम झाला असून अनेक शतकऱ्यांचा माल देशात अडकून सडत चालला आहे, त्यांचं नुकसान होतंय. तर दुसरीकडे गॅस टंचाई असून लोकांना गॅस सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहवा लागतंय, हॉटेल मालकांना चुलीचा सहारा घ्यावा लगोतय. तर काहींवर हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे. देशात गोंधळाची परिस्थिती असून महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हे चित्र दिसत आहे. गॅस टंचाईच्या याच मुद्यावरू शिवसेना ठाके गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.
माझ्या घरात ही परिस्थिती आहे, माझ्या पत्नीला दोन दिवसांपासून सिलेंडर मिळत नाहीये सकालपासून मला 60-70 लोकं भेटले, सिलेंडर कुठून मिळवायचा विचारत होते. राजधानी दिल्लीत एका घोषणेने धूम माजवली आहे, ती म्हणजे नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब.. त्याचं उत्तर नरेंद्र मोदीनी दिलं पाहिजे असा टोला राऊतांनी मारला.
देशभरात मोठमोठ्या रांगा लागल्या आहे सिलेंडरसाठी. लखनऊ, मुंबई, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली ते अगदी जम्मूपर्यंत हीच स्थिती आहे. नोदबंदीनंतर आता लोकं सिलेंडरसाठी लाईनीत उभे आहेत. नोटबंदीच्या वेळेस ज्या रांगा लागल्या, त्या रांगेत लोकं मारली गेली, तेच आता सिलेंडरच्या रांगेत होऊ शकतं अशी भयंकर स्थिती निर्माण झाल्याचं चित्र देशभरात दिसतंय.  हे  सरकार जनता विरोधी आहे, आंतराराष्ट्रीय राजकारणात सरकार संपूर्ण अपयशी ठरल्यामुळे आपल्या देशावर ही परिस्थिती ओढावली आहे. लोकांना रांगेत उभं करणं आणि मारणं हा भारतीय जनता पार्टीचा छंद आहे, असा घणाघाती हल्लााही राऊतांनी चढवला.

मोदींंवर खोचक शब्दांत टीका
कोविडच्या काळात जसं सांभाळून घेतलं, ही परिस्थिती देखील सांभाळेन, असं म्हणत पंतप्रधानांनी लोकांना न घाबरण्याचं आवाहन केलं. मात्र त्यांच्या या विधानावरूनही राऊतांनी मोदींवर जोरदार टीका केली. हो, हो, कोविडच्या काळात त्यांनीदेश सांभाळला ना. गंगा नदीत लोकांची प्रेतं वहात होती, गुजरातमध्ये चिता जाळण्यासाठी स्मशानभूमीत लोकांना जागा मिळत नव्हती ..,  असा खोचक टोला हाणत, काय सांभाळलं यांनी असा रोकठोक सवाल राऊत यांनी विचारला.




Friday, March 13, 2026

कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार / आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

वेध माझा ऑनलाइन।
 कराड दक्षिणमधील सुमारे २५ गावांतील हजारो शेतकरी व ग्रामस्थांच्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फीडरवर आणावी, अशी आग्रही मागणी भाजपाचे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी  विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली. आ.डॉ. भोसले यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत, राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वाकुर्डे योजना येत्या काळात सोलर फिडरवर आणण्याची घोषणा सभागृहात केली.
दरम्यान वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आल्यास, कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या लाभ मिळणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सकाळच्या सत्रातील कामकाजावेळी आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून, वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या महत्वपूर्ण प्रश्नाकडे राज्याचे लक्ष वेधले. 

ते म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना राबविण्यात येत असून, या योजनेला १९ डिसेंबर १९९८ रोजी मान्यता देण्यात आली. त्यानंतर २००४ मध्ये पहिली सुधारित मान्यता, तर २०२१ मध्ये दुसरी सुधारित मान्यता शासनाकडून देण्यात आली. आतापर्यंत या योजनेवर सुमारे १,३४९ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून, या योजनेमुळे सुमारे २८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. कराड तालुक्यातील सुमारे २५ गावांतील हजारो ग्रामस्थ शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी वाकुर्डे योजनेवर अवलंबून आहेत. दरवर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने, हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. 

या योजनेतील विजेच्या खर्चाबाबत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी ८१-१९ टक्क्यांचे सूत्र लागू करुन, शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. ज्यामध्ये वीज बिलातील ८१ टक्के खर्च शासनाकडून आणि १९ टक्के खर्च शेतकऱ्यांकडून भरण्याची व्यवस्था केली. मात्र १९ टक्के हा खर्चदेखील अनेक लहान व गरीब शेतकऱ्यांना पेलवणे कठीण जाते. त्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील या योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांच्या वीज बिलातील काही हिस्सा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भरला जात असल्याचे आ.डॉ. भोसले यांनी सांगितले. 

या योजनेसाठी एकूण १६.३३ मेगावॅट विजेची आवश्यकता असून, १४ पंपांसाठी मोठ्या प्रमाणावर वीज खर्च होत असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारचे सौरऊर्जा निर्मिती वाढविण्याचे धोरण लक्षात घेता, वाकुर्डे उपसा सिंचन योजना सोलर फीडर आणावी, अशी आग्रही मागणी आ.डॉ. भोसले यांनी केली. ही योजना सोलर फिडरवर आणल्यास विजेवरील खर्च कमी होऊन, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी मांडलेल्या या लक्षवेधीची तत्काळ दखल घेत, याला उत्तर देताना राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील सर्व वीजपंप सोलरवर आणण्याचे धोरण घेत असल्याचे सांगितले. तसेच येत्या काळात वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आणण्याची घोषणा करत, त्यामुळे शेतकऱ्यांवर कुठलाही भार पडणार नसल्याची ग्वाही दिली.

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागणार असून, त्याचा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या निर्णयाबद्दल जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे व भाजपा- महायुती सरकारचे आभार मानले आहेत. 

चौकट 

४१ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार लाभ
वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात २८ हजार हेक्टर क्षेत्र येते. तसेच येत्या काळात शासनाच्या प्रस्तावित शिराळा उपसा जलसिंचन योजनेत १३ हजार हेक्टर लाभक्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना सोलर फिडरवर आल्यास, कराड व शिराळा तालुक्यातील एकूण ४१ हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना या लाभ मिळणार असल्याचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले. 


सर्वात मोठी बातमी ! आता चीनकडून मोठ्या युद्धाची तयारी सुरू? ;जगभरात खळबळ ; वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाइन।
एकीकडे अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 14 वा दिवस आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. जर अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर जगात तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं अशी स्थिती निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे संपूर्ण जगभरात इंधनाचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. जग सध्या वेगळ्याच तणावात असातना आता चीनने जगाचं टेन्शन आणखी वाढवलं आहे. आता चीनकडून आशिया खंडात मोठ्या युद्धाची तयारी सुरू झाली आहे. इस्ट चायनाच्या एका सॅटेलाइट इमेजमुळे हा मोठा खुलासा झाला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या इमेजमध्ये चीनचे एकाचवेळी तब्बल दोन हजार मासे पकडणारे जहाजं सोबत दिसत आहेत. या जहाजांच्या माध्यमातून चीन ईस्ट चायनाचा समुद्र ब्लॉक करण्याचा अभ्यास करत असल्याचा दावा केला जात आहे.

वृत्तसंस्था एएफपीने नासाच्या हवाल्यानं हे सॅटेलाईट चित्र प्रसारित केलं आहे. हे चित्र समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे. या जहाजांच्या माध्यमातून चीन ईस्ट चायनाचा समुद्र ब्लॉक करण्याचा अभ्यास करत असल्याचा दावा केला जात आहे. युद्धाच्या वेळी जपान, फिलिपाइन्स आणि तैवान यांचा मार्ग एकाच वेळी या ठिकाणावरून रोखता यावा यासाठी ही चीनची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चीनने पूर्व चीनी समुद्रात 400 किलोमीटरपर्यंत या जहाजांची अशा पद्धतीने रचना केली आहे की, कोणत्याही दिशेनं शत्रू राष्ट्रांवर सहज हल्ला केला जाऊ शकतो. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, चीन सध्या एका मोठ्या युद्धाची तयारी करत आहे. हे युद्ध भविष्यात तैवान, जपान किंवा फिलिफिन्सविरोधात होऊ शकतं.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची चव्हाण साहेबांना आदरांजली ; समाधीस्थळी येऊन झाल्या नतमस्तक...म्हणाल्या...समाधीस्थळी येताच मनात ऊर्जा, धैर्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते : चव्हाण साहेबांच्या आदर्शांवर राज्याच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.”

वेध माझा ऑनलाइन।
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीती संगमावर श्रद्धेचा अनोखा संगमअनुभवायला मिळाला.उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी समाधीसमोर नतमस्तक होऊन पुष्पचक्र अर्पण केले, काही क्षण शांत उभ्या राहून महान नेत्याच्या स्मृतींना विनम्र वंदन केले आणि त्यांच्या आदर्शांच्या मार्गावर चालण्याचे संकल्प व्यक्त केला. 

यावेळी प्रीतीसंगम परिसरात सकाळपासूनच श्रद्धा, आदर आणि भावनांनी भारलेले वातावरण निर्माण झाले होते.उपस्थितांनी , यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. विद्यार्थी, नागरिक आणि मान्यवर एकत्र येऊन भावपूर्ण अभिवादन करताना दिसले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
“स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य महाराष्ट्रासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या समाधीस्थळी येताच मनात ऊर्जा, धैर्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. त्यांच्या आदर्शांवर चालत राज्याच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी आदरांजली ठरेल.”

एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार ; राज्यभरात पुरवठा विभागाची धडाधड कारवाई सुरू;

वेध माझा ऑनलाईन
एकीकडे  घरगुती गॅस सिलेंडर मिळवा यासाठी नागरीक लांबच लांब रांगामध्ये उभे ठाकले आहे. भर उन्हात अबालवृद्ध आणि महिलांना गॅस एजन्सीबाहेर सिलेंडर नोंदणीसाठी उभे राहावे लागत आहेत. तीन चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर सिलेंडर मिळत असल्याची ओरड नागरीक करत आहेत. त्यातच एलपीजी सिलेंडरचा काळाबाजार आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी राज्यभरात पुरवठा विभागाने धडाधड कारवाई सुरू केली आहे. घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.