Monday, February 9, 2026

सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असलेल्या सातारा जिल्हा परिषदेवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सातारा जिल्ह्यातील मतदारांनी 67.80 टक्के मतदान केलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभारी निवडण्यासाठी जिल्ह्यातील 21 लाख 94 हजार 110 मतदारांपैकी 14 लाख 87 हजार 554 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  
सातारा जिल्हा परिषदेसाठी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत व्हायची. 2012 आणि 2017 ला राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला होता. यावेळी भाजपनं ताकदीनं निवडणूक लढवली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सातारा जिल्हा परिषद निवडणूक लढल्या. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं प्रचार साधेपणानं पार पडल्याचं पाहायला मिळालं. सातारा जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल त्रिशंकू लागला आहे. 

 सातारा जिल्हा परिषद गटनिहाय निवडणूक विजयी उमेदवार यादी
सातारा तालुका...पाटखळ:  शुभांगी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस ) लिंब: सर्जेराव सावंत (भाजप)  खेड:  कामेश कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)कोडोली(ओबीसी महिला): निता खरात (भाजप )कारी :  राजू भोसले (भाजप) शेंद्रे:  पूजा मोरे (भाजप) वर्णे:  राजेंद्र शेळके (स्वाभिमानी शेतकरी संघटना)राष्ट्रवादी पाठिंबानागठाणे:  अजित साळुंखे (भाजप) 

कराड तालुका... पाल:माधवराव काळभोर (भाजप)    उंब्रज:रणजीत जाधव (भाजप)   मसूर:लालासो जगदाळे (भाजप)   कोपर्डे हवेली: विद्या रामकृष्ण वेताळ (अपक्ष)  सैदापूर : सागर शिवदास (भाजप)  तांबवे: धनंजय ताटे (भाजप)   विंग(ओबीसी महिला) :शैलजा शिंदे (भाजप)  कार्वे: विजया थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस)  रेठरे बुद्रुक: प्रियांका साळुंखे (भाजप)  काले (ओबीसी महिला) : मनीषा पाटील (भाजप)येळगाव : उदयसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस )वारुंजी : सुनंदा पाटील (काँग्रेस)

पाटण तालुका... गोकुळ तर्फ हेळवाक:अशोक पाटील ( शिवसेना)     तारळे: स्वप्ना अभिजीत पाटील (शिवसेना)म्हावशी:राजेश पवार (भाजप)  मल्हार पेठ(ओबीसी महिला) :विजया कुंभार (शिवसेना)  मारुल हवेली (ओबीसी महिला): योगिता गिरी (शिवसेना)मंद्रुळकोळे:  मृणाल पाटील (शिवसेना) काळगाव: सुनीता चाळके (शिवसेना ) 

कोरेगांव तालुका.. पिंपोडे बुद्रुक :अमित चव्हाण (भाजप)     वाठार स्टेशन(ओबीसी महिला) :जयश्री भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)  सातारा रोड : सारिका फाळके (शिवसेना)  कुमठे : हणमंत जगदाळे (शिवसेना)  एकंबे :राजश्री भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)   वाठार किरोली :संध्या रजनी भोसले पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)  

जावळी तालुका... म्हसवे:  वसंतराव मानकुमरे (भाजप)   कुडाळ (ओबीसी महिला):  जयश्री गिरी (भाजप) कुसुंबी: कविता ओंबळे (शिवसेना)   वाई तालुका यशवंतनगर : दिनकर शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)     बावधन :   ऋतुजा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)ओझर्डे :  वृषाली चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)भुईंज:  दिलीप बाबर (भाजप)

खंडाळा तालुका... शिरवळ :  उदय कबुले (राष्ट्रवादी काँग्रेस)  भादे :  संतोष साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस ) खेड बुद्रुक :  ऋषिकेश धायगुडे (भाजप)

फलटण तालुका... तरडगाव :गिरीश बनकर (शिवसेना)  साखरवाडी पिंपळवाडी : रुपाली सरगर (शिवसेना)  विडणी :  ज्योती गौतम मोरे (शिवसेना)गुणवरे :ऋतुजा अभिजीत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)    बरड :वैशाली संदीप कांबळे (शिवसेना)   कोळकी : सह्यादी कदम (शिवसेना)   वाठार निंबाळकर : विष्णू किसन लोखंडे (भाजप)   हिंगणगाव :किरण निलेश नलवडे (भाजप) 

खटाव तालुका बुध... लता कर्णे (राष्ट्रवादी काँग्रेस)   कातर खटाव: धनंजय जाधव (भाजप)   खटाव: डॉ. प्रिया शिंदे  (भाजप)  निमसोड: संदीप मांडवे (राष्ट्रवादी काँग्रेस)   औंध(ओबीसी महिला) :  मनिषा फडतरे (राष्ट्रवादी काँग्रेस)पुसेसावळी: तेजस्विनी कदम (भाजप)   मायणी:  सुरज पाटील (भाजप)

माण आंधळी... सोनल गोरे (भाजप)  बिदाल :अलका जगदाळे (भाजप)   मार्डी:सोनाली पोळ (राष्ट्रवादी काँग्रेस)   गोंदवले बुद्रुक :शीतल रणपिसे (राष्ट्रवादी काँग्रेस)  कुकुडवाड : अनिल देसाई (राष्ट्रवादी काँग्रेस)  

महाबळेश्वर 
तळदेव जिल्हा परिषद गट  : 
अजित सपकाळ (शिवसेना)भिलार जिल्हा परिषद गट : संजय केळगणे  (राष्ट्रवादी काँग्रेस)

महाबळेश्वर तालुका... पंचायत समिती गण तळदेव पंचायत समिती गण :
 संजय शेलार (शिवसेना)वाडा कुंभरोशी पंचायत समिती गण : संजय मोरे (शिवसेना)

भिलार जिल्हा... परिषद गट : 
संजय केळगणे  राष्ट्रवादी काँग्रेसमेटगुताड पंचायत समिती गण : शकुंचला चोरमले राष्ट्रवादी काँग्रेस

सातारा तालुका... पंचायत समिती निकाल : 
पाटखळ पंचायत समिती गण : 
राहुल शिंदे (भाजप)शिवथर पंचायत समिती गण : राजेश पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

लिंब गट जिल्हा परिषद गट : 
सर्जेराव सावंत (भाजप)लिंब पंचायत समिती गण : प्रभाकर पवार  (भाजप)कोंडवे पंचायत समिती गण : महेश गाडे (भाजप)

खेड जिल्हा परिषद गट : 
कामेश कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)खेड  पंचायत समिती गण : कोमल अजित गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस)क्षेत्र माहुली पंचायत समिती गण : राणी अजय पवार (राष्ट्रवादी काँग्रेस

कोडोली पंचायत समिती गण : 
राहुल कापले (राष्ट्रवादी काँग्रेस)संभाजीनगर पंचायत समिती गण : विजया साळुंखे ( भाजप) परळी पंचायत समिती गण : वसंतराव भंडारे (भाजप)


काले गटात दयानंद पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील विजयी ;

वेध माझा ऑनलाइन।
 संपूर्ण भागाचे लक्ष्य लागलेल्या काले गटात दयानंद पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी पावणे यांचा दणदणीत पराभव केला. 
मनीषा पाटील यांच्या पराभवासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकत्रित आले होते. 
दरम्यान मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेत  मनिषा पाटील यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी थेट जिल्हा परिषदेत धडक मारली आहे.

ऍड उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा तब्बल 4338 इतक्या मतांनी विजय ;

वेध माझा ऑनलाईन।
येळगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि स्व. विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर यांनी तब्बल 4338 इतक्या मतांनी विजय मिळवत आपला बालेकिल्ला कायम राखला. याठिकाणी सख्खे चुलत बंधू अॅड. आनंदराव ऊर्फ राजाभाऊ उंडाळकर यांचा पराभव केला. खरं तर अपक्ष निवडणूक लढलेल्या राजाभाऊ उंडाळकर यांच्यामागे भाजपने ताकद उभी केल्याने निवडणुकीत मोठी रंगत आणली होती. राजाभाऊंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपने उदयसिंह उंडाळकर यांच्यावर नेम तर साधला होताच. मात्र उदयसिंह उंडाळकर यांच्या अचूक नियोजनामुळे भाजपचा डाव फसला.

खरं तर सातारा जिल्ह्यातील लक्षवेधी लढतीपैकी एक लढत म्हणून कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटाकडे पाहिले जाते . मागील वेळी प्रमाणे यावेळीही उंडाळकर बंधूंमध्ये निवडणूक लागल्याने संपूर्ण परिसरात मागील महिन्यापासूनच निवडणुकीचे जोरदार वार होते. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या राजाभाऊंना आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या भाजपने पाठींबा दिल्याने निवडणूक रंगतदार अवस्थेत होती. आजच्या मतमोजणीत सुद्धा पहिल्या फेरीपासून उदयसिंह उंडाळकर आणि राजाभाऊ उंडाळकर यांच्या अगदीच कमी मतांचा फरक होता. मात्र अखेर उदयदादांनी विजय खेचुन आणला

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा पराभव ; मृणाल पाटील या 22 वर्षीय युवतीचा विजय ;

वेध माझा ऑनलाइन।
पाटणमधून मोठी राजकीय बातमी समोर येतेय. मुंद्रळ कोळे गटातून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील  यांच्या पत्नी प्राची पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्राची पाटील याना अवघ्या २२ वर्षाच्या मृणाल पाटील यांनी पराभव केला आहे. मृणाल पाटील या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उभ्या होत्या, तर प्राची पाटील भाजपच्या चिन्हावर उभ्या होत्या. अटीतटीच्या या लढतीत शंभूराज देसाई यांनी नरेंद्र पाटील यांच्यावर मात केली. निवडणुकीच्या तिकीट वाटपावेळीच नरेंद्र पाटील यांच्या पत्नीच्या विरोधात अवघ्या २२ वर्षांच्या मृणाल पाटील यांना तिकीट देऊन शिवसेनेने अचूक डाव टाकला होता. युवा मतदार २२ वर्षांच्या मृणाल पाटील यांच्याकडे आकर्षित झाला. तसेच शंभूराज देसाई यांची ताकद आणि पारंपारिक शिवसैनिकांच्या मतदारांच्या साथीच्या जोरावर मृणाल पाटील यांनी निवडणुकीत आघाडी घेतली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच मृणाल पाटील या आघाडीवर होत्या. त्यांची हि आघाडी शेवट्पर्यंत टिकली 

Monday, February 2, 2026

पार्थ पवार राज्यसभेवर जाणार!

वेध माझा ऑनलाईन।
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षातून महत्त्वाचा निर्णय समोर येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाची पुनर्रचना सुरू असून आता त्यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. 

राज्यसभेच्या रिक्त जागेवर पार्थ पवारांचे नाव :
अजित पवार  यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली होती. 31 जानेवारी रोजी झालेल्या शपथविधीनंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला, ज्यामुळे उच्च सभागृहातील जागा रिक्त झाली. या रिक्त जागेवर आता त्यांचा मुलगा पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची जोरदार शक्यता व्यक्त होत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या कार्यकाळाची अजून दोन वर्षे बाकी असून त्यांची मुदत 4 जुलै 2028 रोजी संपणार होती. मात्र, त्या जागेवर पाठवण्याऐवजी पार्थ पवार यांना सहा वर्षांच्या पूर्ण टर्मसाठी असलेल्या दुसऱ्या जागेवर पाठवण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. लवकरच ही जागा भरली जाणार असून त्या दृष्टीने पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण ; बिघाड लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली ;

वेध माझा ऑनलाइन
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. लातूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना होण्याआधीच हा बिघाड लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाण रद्द करण्यात आले असून त्या आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. 

उड्डाणाआधीच आढळला तांत्रिक दोष :
भाजप नेत्या पंकजा मुंडे या सध्या मराठवाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांसाठी त्या छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. मात्र हेलिकॉप्टरने आकाशात झेपावण्यापूर्वीच वैमानिकाच्या लक्षात तांत्रिक बिघाड आला.
तत्काळ सुरक्षेचा विचार करून उड्डाण रद्द करण्यात आले. यामुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे सांगण्यात येत आहे. पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही समस्या उड्डाणाच्या आधीच लक्षात आल्यामुळे प्रवास सुरू होण्याआधीच आवश्यक खबरदारी घेण्यात आली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विमानात ५ लोक होते की ६ ? उज्ज्वल निकम यांचा सर्वात मोठा खुलासा!

वेध माझा ऑनलाईन।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात तर्कवितर्क आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही नेत्यांकडून हा अपघात घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असताना, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी या चर्चांना थेट आव्हान देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोणताही ठोस पुरावा नसताना अशा गंभीर घटनेला वेगळी कलाटणी देणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

उज्ज्वल निकम यांनी अजित पवार  यांच्या अपघातासोबतच जस्टिस लोया यांच्या मृत्यूबाबत होणाऱ्या दाव्यांवरही भाष्य केले. पुराव्यांशिवाय केवळ संशयाच्या आधारावर निष्कर्ष काढणे हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये राजकारण टाळले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. 

त्या विमानात नेमके किती प्रवासी होते? :
विमानात 5 की 6 लोक होते, या प्रश्नावर उज्ज्वल निकम म्हणाले की, खासगी विमानाच्या प्रत्येक उड्डाणाची अधिकृत नोंद विमान प्राधिकरणाकडे असते. मात्र, त्या विमानात सहा प्रवासी होते, असा कोणताही अधिकृत पुरावा आजवर समोर आलेला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता तपास यंत्रणांच्या निष्कर्षांची वाट पाहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अपघाताच्या वेळी विमानात मोठ्या प्रमाणात इंधन असल्याने आग तीव्र झाली आणि त्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे यामागे कट असल्याचे म्हणणाऱ्यांनी ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे. केवळ संशय व्यक्त करून विषयाला वेगळी दिशा देणे योग्य नाही,