Sunday, June 14, 2026

सातारा- सांगली विधानपरिषद निवडणूक अपडेट ; भाजप नगरसेवकाना "गोवा ट्रिप' ? ; आजच झाले रवाना; !!

वेध माझा ऑनलाईन।
विधान परिषद निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागल्याने सातारा- सांगली मतदार संघात आपल्या   विजयासाठी भाजपने मतांची जमवाजमव करण्यास जोरदार सुरुवात करत त्या प्रयत्नात प्राथमिक यश देखील मिळवलं असलयाचे दिसते आहे
त्याची सुरुवात म्हणून  सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आपल्या मतदारांना गोव्याला एका रिसोर्टमध्ये आजच पाठवलं गेलं आहे? अशी माहिती मिळते आहे
त्यांना आता थेट निवडणुकीदिवशी मतदान केंद्रावर हजर करण्यात येणार आहे असेही समजते यापुढे देखील इतर आणखी काही संबंधित मतदार पुढील दिवसात गोव्यालाच रवाना केले जाणार आहेत असेही समजते

रोहित पवारांची मंत्री महाजन लवकरच भेट घेणार...रोहित पवार म्हणाले...जोपर्यंत महाजन येत नाहीत तोपर्यंत मी सलाइन, ग्लुकोज लावणार नाही, कारण सरकारशी चर्चा होणं गरजेचं आहे.

वेध माझा ऑनलाईन।
सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान रोहित पवार यांच्या रक्तातील साखर कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. रोहित पवार आंदोलन करत असलेल्या ठिकाणी रोहित पवारांच्या पत्नी कुंती त्यांच्या भगिनी आणि त्यांच्या मोतोश्री दाखल झाल्या 
यावेळी रोहित पवारांची अवस्था पाहुन त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले .

दरम्यान रोहित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, 
त्यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला होता. ते जळगावहुन रवाना झाले आहेत आणि लवकरच रोहित पवारांना भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढे रोहित पवार म्हणालेत, जोपर्यंत महाजन येत नाहीत तोपर्यंत मी सलाइन, ग्लुकोज लावणार नाही, कारण सरकारशी चर्चा होणं गरजेचं आहे.

रोहित पवारांची तब्येत खालावली; बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती ; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांची घेतली भेट ;

वेध माझा ऑनलाईन।
सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु त्यामध्ये अशी एक अट आहे, की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांना आधी ही उर्वरीत रक्कम भरावी लागणार आहे, त्यानंतरच शेतकऱ्यांना या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. मात्र ही अट सरकारने रद्द करावी आणि सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे, त्यांनी आपल्या या मागणीसाठी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची तब्येत खालावली आहे, बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपूर येथे रोहित पवार यांची भेट घेतली आहे.

शेतकरी वाचला नाही तर राज्य, देश कसा चालणार? असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना तुम्ही कितीही पोटतिडकीनं आंदोलन केलं तरी लोकं त्याला राजकारणच समजणार.  या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पाहिलं पाहिजे, शेतकरी म्हणून रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा.  रोहित पवारांनी जीआरमध्ये शब्दचा खेळ कसा असतो ते दाखवून दिलं. मी इथे आलो, त्यामुळे आता काही लोक  मला  रोहित पवारांचा माणूस म्हणून बोलायला लागतील असेही ते म्हणाले

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी ; भीषण अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू ; काय आहे बातमी?


वेध माझा ऑनलाईन

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहन विहिरीत कोसळून 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 

Just breaking...


जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; जोरदार चर्चा! ;

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही सदिच्छा भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

जितेंद्र आव्हाड हे सकाळी शिवतीर्थ येथे दाखल झाले. त्यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच काही वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली. मात्र या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे म्हणून पाहिले जात आहे

Saturday, June 13, 2026

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले...महायुती एकसंघच आहे ; धैर्यशील कदम मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,;

वेध माझा ऑनलाईन।
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना सर्व मित्र पक्षांचा भक्कम पाठिंबा असून, ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. 
आज हॉटेल फर्न येथे महायुतीची पत्रकार परिषद पार पडली दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी यावेळी बैठकही झाली यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती . 
दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी आम्ही महायुती म्हणून सगळे  सक्रिय आहोत. मात्र आमच्यात मतभेद असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे 


सुरेश भोसले म्हणाले...; अविनाश मोहितेंची ओळख... "घोटाळेबाज' म्हणूनच ... ; अविनाश मोहितेंनी केलेल्या घोटाळ्यांच्या पैशांतून नवा कारखाना निघाला असता ; ऍड उदयदादा म्हणाले...सहकार पॅनेलला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या ;

वेध माझा ऑनलाइन।
विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना डॉ. सुरेश भोसले यांनी कार्वे येथे झालेल्या कालच्या सभेत सांगितले की अविनाश मोहितेंच्या काळात तोडणी-वाहतूक संघटनेत सुमारे ६० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. तसेच ७७८ सभासदांच्या कथित बनावट सह्यांद्वारे कर्जप्रकरणे, ३२०० कामगारांची भरती आणि नोंदणी नसलेल्या १४०० कामगारांवर दरमहा सुमारे ५० लाखांचा खर्च झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या व्यवहारांमधील कोट्यवधी रुपयांचा हिशेब अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगत, ‘या घोटाळ्यांच्या पैशांतून एक नवा साखर कारखाना उभा राहिला असता,’ अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान कारखाना आमच्या ताब्यात आला तेव्हा आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. राज्यभर झालेली बदनामी दूर करून कारखाना पुन्हा उभा करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागल्याचेही सुरेशबाबांनी सांगितले 

अविनाश मोहितेंची ओळख  घोटाळेबाज म्हणूनच संपूर्ण परिसरात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्वे (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, पै. आनंदराव मोहिते, प्रा. शरद काटकर, उमेदवार बी. एन. थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 डॉ. सुरेश भोसले पुढे म्हणाले
सहकाराची लढाई ही स्वातंत्र्यलढ्याइतकीच कठीण आहे. आमच्या व उदयदादांच्या वडिलांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यातून शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग मिळाला. आता तोच वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आप्पासाहेब आणि विलासकाका शेवटपर्यंत एकत्र राहिले. आज आम्हालाही एकत्र काम करण्याची संधी मिळाली आहे. साखर कारखाने, बाजार समिती, खरेदी विक्री संघ, बँका, पतसंस्था, तसेच इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून परस्पर सहकार्य कायम राहील. . विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पश्चात ॲड. उदयसिंह पाटील यांनी संघटना, कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे प्रभावी नेतृत्व केले असून, लोकांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे गौरवोद्गार डॉ. सुरेश भोसले यांनी काढले. पुढील निवडणुकांपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडतील. त्याअनुषंगाने भविष्यातील चित्र स्पष्ट दिसत असून, उदयदादांना उज्ज्वल भविष्य आहे, असे सांगत त्यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत सकारात्मक संकेत दिले. 

यावेळी बोलताना 
ऍड उदयसिंह पाटील उंडाळकर म्हणाले...
स्व. जयवंतराव भोसले आणि स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी उभ्या केलेल्या सहकार चळवळीचा वारसा पुढे नेण्यासाठी संघर्षाऐवजी सहकार्याची भूमिका स्वीकारण्याची वेळ आली आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासाच्या त्या वाटा पुन्हा रुंदावण्यासाठी सहकार पॅनेलला मोठ्या मताने निवडून देण्याचे आवाहन रयत संघटनेचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले. 
ते पुढे म्हणाले, स्व. विलासकाकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि सर्व कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक वेळी संघर्षातूनच यश मिळते असे नाही अनेकदा सहकार्यातूनही मोठे यश मिळते, असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. 
राजकीय भूमिका वेगवेगळ्या असू शकतात; मात्र सहकारी संस्था टिकवण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. आमदार डॉ. अतुल भोसले आणि मी आज महायुतीच्या माध्यमातून एकत्र काम करत आहोत. कृष्णा कारखान्याच्या सभासदांनीही सहकार्याचा हा विचार स्वीकारला आहे. विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा विकासासाठी सहकार्य करणे अधिक महत्त्वाचे आहे. 

यावेळी  प्रा. धनाजी काटकर डॉ. सुधीर जगताप सुजित थोरात, रंगराव थोरात (सावकार) आणि प्रताप कणसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदराव जानुगडे यांनी केले, तर आभार अशोकराव थोरात (बापू) यांनी मानले.