वेध माझा...
Tuesday, March 10, 2026
शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता मिळणार ; शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपयांची रक्कम थेट जमा केली जाणार ;
भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता ; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय ;
संयुक्त अरब अमिरातीचे माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा म्हणाले; .हे युद्ध केवळ नरेंद्र मोदीच थांबवू शकतात ;
वेध माझा ऑनलाइन।
गेल्या आठवड्याभरापासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. दिवसेंदिवस हे युद्ध अधिकच तीव्र होत चाललं आहे.युद्धामध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचं पाहयला मिळालं. या संघर्षामुळे संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग दाटले आहेत. अशातच हे युद्ध केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच थांबवू शकतात असा मोठा दावा संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील पहिले उच्चायुक्त आणि माजी राजदूत हुसैन हसन मिर्झा यांनी केला आहे.
हुसैन हसन मिर्झा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर भाष्य केले. त्यांच्या मते, “भारत एक महान देश आहे. पंतप्रधान मोदींचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांशी अत्यंत मजबूत आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मोदी नुकतेच इस्रायल दौऱ्यावर होते, तर दुसरीकडे भारत हा इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. त्यामुळे मोदींनी केवळ एक फोन कॉल केल्यास या रक्तरंजित युद्धावर नक्कीच तोडगा निघू शकतो आणि हा विनाश थांबू शकतो.”