Thursday, June 11, 2026

शरद पवार राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार ! जोरदार हालचाली सुरू !

वेध माझा ऑनलाईन।
पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कधीकाळी बंगालमध्ये सत्तेत असणारा तेथील माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची शकलं झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 80 आमदारांपैकी 50 पेक्षा जास्त आमदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडली आहे. 19 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांचा उरलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवूननी देणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही काँग्रेस पक्षात विलीन होण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी राष्ट्रवादीच्या पवार गटाला काँग्रेसचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तशी माहिती मिळाली आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती समोर आल्याने आता हालचाली वाढल्या आहेत.

Wednesday, June 10, 2026

राज्यात मॉन्सूनचा पाऊस लांबणीवर ;


वेध माझा ऑनलाइन।
मॉन्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाला. मात्र, त्यानंतर चांगली वाटचाल केली. आता मॉन्सून रेंगाळताना दिसत आहे. राज्यात मॉन्सून दाखल होण्याकरिता उशिरा लागत आहे. ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पेरण्या रखडल्या आहेत.
राज्यात मोसमी पाऊस लांबणीवर पडला आहे. ज्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.  पुढील 3 ते 4 दिवसात आणखीन काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. देशातील ईशान्येकडील भागांसह पश्चिम बंगालमधील काही भागात मोमसी पावसाने वाटचाल केली आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून राज्यात मॉन्सूनचा पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे येथे स्थिर असून मॉन्सूनचा पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मॉन्सून पुढे सरकत नसल्याने एक संकट निर्माण झाले. त्यामुळे राज्यात मॉन्सूनचा पाऊस काहीसा लांबण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील इतर भागात मॉन्सून पाऊस दाखल होण्याची स्थिती अनुकूल आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणासह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मॉन्सूनचा पाऊस दाखल होण्याचा सरासरी कालावधी हा साधारणपणे 7 ते 11 जून मानला जातो.
राज्यात वादळी पावसाचा प्रभाव कमी होणार असल्याची चिन्हे आहेत. मात्र, आजही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील काही भागात मॉन्सून दाखल झाला असून काही भागात मान्सून पूर्व पावसाची नोंद होत असून जवळपास भागात वादळी पावसाची स्थिती आहे. पुढील काही दिवसात राज्यातील वादळी पावसाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मान्सूनची वाटचाल संथगतीने होत असून पुढील 3 ते 4 दिवसात राज्याच्या आणखीन काही भागात मान्सून दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सध्या दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची नोंद होत आहे.  मुंबईतही नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे.
मॉन्सून 6 जून रोजी तळकोकणात दाखल झाला असून सध्या मॉन्सूनची उत्तर सीमा कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरमधील काही भागात स्थिर आहे. मॉन्सूनची राज्यातील वाटचाल काहीशी संथगतीने सुरु असून पुढील काही दिवस नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भातही पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवत असून शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई शहरात अद्याप पावसाची इंट्री झाली नाहीये. प्रचंड ऊकाडा आणि हवेतील आर्द्रता वाढल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. आज उपनगरांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस आणि 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.


कृष्णा कारखाना निवडणूक ; सहकार पॅनेलला ‘कप-बशी’ तर संस्थापक पॅनेलला ‘नारळ’ हे चिन्ह ;

वेध माझा ऑनलाइन।
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सहकार पॅनेलला ‘कप-बशी’ तर संस्थापक पॅनेलला ‘नारळ’ हे चिन्ह मिळाले आहे. कारखान्याच्या २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख पॅनेलचे उमेदवार निश्चित झाले असून आता प्रचाराच्या रणधुमाळीला वेग येणार आहे.
सहकार पॅनेलकडून गट क्रमांक १ मध्ये धोंडीराम जाधव, जगदीश जगताप व आनंद खबाले, गट क्रमांक २ मध्ये अरविंद पाटील, दयाराम पाटील व बाजीराव थोरात, तर गट क्रमांक ३ मध्ये दत्तात्रय देसाई, लिंबाजी पाटील व संभाजीराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गट क्रमांक ४ मध्ये जयवंत मोरे, सत्यजीत पाटील व सुनील पाटील, गट क्रमांक ५ मध्ये बाबासो शिंदे व संग्राम पाटील, तर गट क्रमांक ६ मध्ये सुरेश भोसले व बाजीराव निकम हे निवडणूक रिंगणात आहेत.
महिला राखीव गटातून सुजाता जाधव व सुनिता शेवाळे, अनुसूचित जाती-जमाती गटातून छबन कांबळे, भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून अविनाश खरात आणि इतर मागास प्रवर्ग गटातून बाळासो जगताप यांना सहकार पॅनेलने उमेदवारी दिली आहे.
संस्थापक पॅनेलकडून गट क्रमांक १ मध्ये आनंदा तुकाराम जगताप, प्रताप धोंडीराम जगताप व दुर्योधन खबाले, गट क्रमांक २ मध्ये संतोष थोरात, प्रतापराव पाटील व शांताराम पाटील, तर गट क्रमांक ३ मध्ये सुरेश बाबुराव पाटील, सुभाष पाटील व किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गट क्रमांक ४ मध्ये जयकर शिंदे, महेश पवार, महेश पाटील व उदयसिंह शिंदे, गट क्रमांक ५ मध्ये सुरेश पाटील व माणिकराव मोरे, तर गट क्रमांक ६ मध्ये अविनाश मोहिते व दीपक कणसे हे उमेदवार आहेत. महिला राखीव गटातून अर्चना मोहिते व विजया पाटील, अनुसूचित जाती-जमाती गटातून सुधीर रोकडे, भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून दिलीप गलांडे आणि इतर मागास प्रवर्ग गटातून प्रकाश श्रीखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, गट क्रमांक १ मधून विश्वास जाधव यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. 

कराडच्या वीरपुत्राला कर्तव्य बजावताना वीरमरण :

वेध माझा ऑनलाईन।
कराड तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव हे शहिद झाले आहेत. या दुर्घटनेत आणखी एका जवानालाही वीरमरण आले आहे. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अर्जुन जाधव यांनी सर्वोच्च बलिदान दिल्याने शहापूर गावासह संपूर्ण कराड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

आर्जून चव्हाण यांच्या पश्चात पत्नी सायली, आई- वडिल, 11 महिन्याचे बाळ सर्वेश, दोन भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. आर्जूनचा धाकटा भाऊ इंडियन नेव्हीमध्ये आहे. अर्जून आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी 15 दिवसानी येणार होता. 25 जूनला मुलाला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, त्याअगोदरच चिमुकल्याचा बाबा शहिद झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आगामी १५ दिवसांत पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याचे रोहित पवारांनी दिले संकेत ;

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी आगामी १५ दिवसांत पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, महागाई व शेतमालाच्या मुद्द्यावरून ते सरकारवर सातत्याने टीका करत आहेत।पक्षातील आगामी बदलरोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षात संघटनात्मक बदल केले जातील। यामध्ये नव्या चेहऱ्यांना आणि राजकारणाशी थेट संबंध नसलेल्या विविध क्षेत्रांतील तरुणांना पक्षात संधी दिली जाणार आहे।

तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार ? ममता बॅनर्जी यांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांची काँग्रेसकडे मागणी ; केली आहे.; सध्या मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ;

वेध माझा ऑनलाईन
काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला. राज्यात भाजपची सत्ता आली. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे. 58 पेक्षा अधिक आमदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सडोली आहे. त्यांनी वेगळा गट स्थापना केला, आणि या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार 20 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना तृणमूल पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी या हा प्रस्ताव स्विकारण्यास तयार आहेत. परंतु त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी त्यासाठी एक अट ठेवली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधींकडे मल्लिकार्जुन खरगे यांचं पद मागितलं आहे.
काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना राज्यसभेवर पाठवावं आणि त्यांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसकडे केली आहे. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र त्यासाठी त्यांनी आता ही अट घातल्यामुळे काँग्रेस ही अट मान्य करणार का? आणि तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या असे समजते

तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार ? ममता बॅनर्जी यांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांची काँग्रेसकडे मागणी ; केली आहे.; सध्या मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ;

वेध माझा ऑनलाईन
काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला. राज्यात भाजपची सत्ता आली. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे. 58 पेक्षा अधिक आमदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सडोली आहे. त्यांनी वेगळा गट स्थापना केला, आणि या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार 20 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना तृणमूल पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी या हा प्रस्ताव स्विकारण्यास तयार आहेत. परंतु त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी त्यासाठी एक अट ठेवली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधींकडे मल्लिकार्जुन खरगे यांचं पद मागितलं आहे.
काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना राज्यसभेवर पाठवावं आणि त्यांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसकडे केली आहे. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र त्यासाठी त्यांनी आता ही अट घातल्यामुळे काँग्रेस ही अट मान्य करणार का? आणि तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या असे समजते