Sunday, April 12, 2026

आशा भोसलेंच्या निधनाचं कारण काय? काय म्हणाले डॉक्टर ?

वेध माझा ऑनलाईन।
भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी निधन झाले. मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी वयाच्या ९३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

आशा भोसलेंच्या निधनाचं कारण काय?
ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितले की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्कालीन वैद्यकीय विभागात उपचार सुरू असताना त्यांच्या शरीरातील अनेक अवयव निकामी झाले, त्यामुळे त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यानुसार, त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार असून, दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार पार पडतील.



क्रिकेटच्या मैदानातच वाहिली गायिका आशा भोसलेंना श्रद्धांजली ;

वेध माझा ऑनलाईन
आयपीएल 2026 मधील 20 व्या साखळी सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन दिग्गज संघ आमने-सामने आहेत. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून, सामन्याच्या सुरुवातीला एक अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळाला. 
 आशा ताईंच्या स्मृतीप्रित्यर्थ आजच्या सामन्यात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू आशा भोसले यांना श्रद्धांजली म्हणून हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. तर सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू, पंच आणि उपस्थित प्रेक्षकांनी एक मिनिटाचे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. मौन पाळल्यानंतर संपूर्ण स्टेडियममधील चाहत्यांनी टाळ्या वाजवून या महान गायिकेच्या योगदानाचे स्मरण केले.

 

जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दशकांपासून बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांचे निधन झाले आहे. काल संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Friday, April 10, 2026

तेजस्विनी घोरपडे यांची भाजपा महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कराडात स्वागत ;

वेध माझा ऑनलाइन।
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्षपदी मा. सौ. तेजस्विनी ताई संग्राम घोरपडे यांची निवड झाल्यानंतर कराड शहरात त्यांच्या स्वागताचा उत्साही कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

वेध माझा ऑनलाइन...वेध माझा ऑनलाइन...

यावेळी तेजस्विनी घोरपडे यांनी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी जाऊन अभिवादन केले. राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करत त्यांनी प्रेरणा घेतल्याचे सांगितले.

 वेध माझा ऑनलाईन... वेध माझा ऑनलाइन...

यानंतर बोलताना तेजस्विनी घोरपडे म्हणाल्या की, सातारा जिल्ह्यात महिला सबलीकरण, महिला संघटन आणि महिलांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात अधिक संधी मिळाव्यात यासाठी पुढील काळात विशेष भर दिला जाईल. महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला

वेध माझा ऑनलाइन... वेध माझा ऑनलाइन...

या प्रसंगी भारतीय जनता पार्टी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे हेही उपस्थित होते. त्यांनी तेजस्विनी घोरपडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

वेध माझा ऑनलाइन... वेध माझा ऑनलाइन...

कार्यक्रमाला कराड उत्तरमधील भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

Monday, April 6, 2026

विद्या मोरे यांना ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आणि सामाजिक उपक्रमांमध्ये प्रभावी योगदानाची दखल ;

वेध माझा ऑनलाइन।
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा अध्यक्ष आणि युथ पदावर कार्यरत लायन विद्या मोरे यांना फलटण येथे पार पडलेल्या रिजन कॉन्फरन्समध्ये ‘बेस्ट पीआरओ ऑफ रीजन’ हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी लायन्स क्लबच्या विविध विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय सभापती MJF लायन नीलम पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कार देताना त्यांनी विद्या मोरे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक केले आणि क्लबच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रभावी प्रचारासाठी त्यांचे विशेष योगदान मान्य केले

झोन चेअरमन मंजिरी खुस्पे यांनी ही त्यांच्या कार्याचे कौतुक केले .विद्या मोरे यांनी लायन्स सोशल उपक्रमांमध्ये उत्कृष्ट (पीआरओ) चे कार्य करत संस्थेची प्रतिमा मजबूत केली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे उपक्रमांना स्थानिक तसेच प्रादेशिक पातळीवर अधिक ओळख मिळाली असून, उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमात विद्या मोरे यांचे यश साजरे करत उपस्थितांनी त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या पुरस्काराने पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याला आणि सामाजिक उपक्रमांमध्ये केलेल्या योगदानाला मान्यता मिळाल्याचे ठळक उदाहरण निर्माण झाले आहे.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी असेही नमूद केले की, विद्या मोरे यांचे कार्य युवा वर्गासाठी प्रेरणादायी आहे आणि लायन्स क्लबच्या उद्दिष्टांची ओळख अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मोठे योगदान ठरते.

मनोहरभाऊ तुमच्या ड्रीष्टीने विकसनशील नेता कोण? पृथ्वीराजबाबा की अतुलबाबा?... वेध- माझा च्या प्रश्नावर मनोहरभाऊ निरुत्तर ! मलकापुरात चर्चा सुरू...मनोहरभाऊ नेमके कुणाचे?

वेध माझा ऑनलाइन।
पप्पा सांगा कुणाचे...पप्पा माझ्या मम्मी चे...मम्मी सांगा कुणाची... मम्मी माझ्या पप्पांची... हे जुने गीत आहे..आपण अनेक  वर्षांपासून हे गाणे ऐकतो आहोत... पण जर तुम्ही मलकापुरात गेलात... तर ... मनोहर शिंदे सांगा कोणाचे... हे गाणे सध्या  ऐकायला मिळत आहे ...त्याचे कारणही तसेच आहे...

काल संगम हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत मलकापूर चे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे याना...  तुमच्या ड्रीष्टीने मलकापूरसाठी विकसनशील नेता कोण?...पृथ्वीराजबाबा की अतुलबाबा...? वेध- माझाच्या या प्रश्नावर गुळगुळीत उत्तर देत मनोहरभाऊनी पृथ्वीबाबा व अतुलबाबा या दोघांच्याही नावाचा उल्लेख करत बॅलन्स राखण्याचा प्रयत्न केला... पण...त्यांनी ठामपणे कोणा एकाचे नाव घेतलेच नाही... त्यावर तुमच्या ड्रीष्टीने...जो सत्तेत तोच तुमचा नेता, अस समजायचे का...?असे पुन्हा त्यांना विचारले असता...तुम्हीच सांगा असे ते पत्रकारांना म्हणाले...
यावर...तुम्ही कारभारी आहात... तुमचा नेमका नेता कोण हे तुम्हीच सांगा अस पत्रकारांनी म्हटले असता... ते निरुत्तर झाले... व त्यांनी नेहमीप्रमाणे तिसरीकडेच विषय नेत मूळ प्रश्नाला बगल दिली व विषय बदलण्याचा प्रयत्न केला ...

पत्रकारांना लक्षात आलं की त्यांना यावर ठोस उत्तर घ्यायचच नाहीये...म्हणून पत्रकारांनी हा प्रश्न ताणून धरला नाही...मात्र भाऊ नक्की कोणाचे ? ही चर्चा मात्र कालपासून रंगली आहे... मलकापुरात तर, पप्पा सांगा कोणाचे?...या गाण्यापेक्षा मनोहर भाऊ सांगा नक्की कोणाचे...? या गाण्याची धूम जोरात सुरू आहे...
खरतर... या प्रश्नाचे उत्तर देताना
त्यांनी त्यातील कोणा एका नेत्यांशी आपली निष्ठा आहे...हे सर्वांपुढे सांगायला पाहिजे होते... 
पण तसे झाले नाही...त्यांनी सोईस्कर उत्तर दिले ...त्यामुळे ते चर्चेत आले...

दरम्यान मलकापूर शहराचा संपूर्ण देशात अत्यंत चांगला नावलौकिक आहे. 'क' वर्ग नगर परिषदांमध्ये टी डी आर देणारी राज्यातील मलकापूर पहिली नगरपरिषद आहे. शहराचा होत असलेला विकास व वाढत असलेली लोकसंख्या याचा विचार करता भविष्यात शहराला फाइव स्टार मॉडर्न शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कालच्या हॉटेल संगममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

मलकापूर नगरपरिषदेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, यांच्यासह सभापती हणमंत जाधव, सुरज शेवाळे, धनंजय येडगे, गीतांजली पाटील व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते टीडीआर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, शहराचा विकास होत असताना अपुऱ्या जागेवरती टीडीआरच्या आधारावर मोठमोठ्या इमारती उभा करता येऊ शकतात. त्यामुळे शहराच्या विकासासाठी टीडीआर प्रदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टीडीआर मिळाल्यानंतर आरक्षण पडलेल्या जागा मालकाला उदाहरणार्थ दहा गुंठ्याच्या बदल्यात 20 गुंठे टीडीआर मिळू शकतो. त्यामुळे शहराचा विकास गतीने केला जाऊ शकतो. शहराचा विकास करत असताना आरक्षणामध्ये जमीन गेली असली तरी जागा मालकाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. संबंधित जागा मालकाला टीडीआरच्या माध्यमातून चांगला मोबदला मिळू शकतो. कराड विमानतळामुळे केवळ सात मजल्यापर्यंत इमारतींना परवानगी दिली जाऊ शकते, याचा विचार मलकापूर नगर परिषदेने केला पाहिजे. मलकापूरची 24 बाय 7 योजना देशात नावाजलेली आहे. मात्र पुढील 25 वर्षांचा विचार करता या योजनेचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ही प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय सांडपाणी योजना तसेच शहरातील इतर योजनांचाही विचार करून पुढील 25 वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या आधारावर या योजनांचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे. सरकारकडून मलकापूरसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुढील तीन महिन्यात मलकापूर नगरपरिषदेची इमारत पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. 'क' वर्ग नगरपरिषदांमध्ये राज्यातील सगळ्यात मोठी इमारत मलकापूरची असणार आहे. त्यामुळे या इमारतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही इमारत पूर्ण करत असताना इमारतीच्या बाजूलाच लॉन, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जागा तसेच नगरपालिका व नागरिकांमध्ये सुसंवाद रहावा म्हणून संपर्क वाढवला जाणार आहे. 
नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे प्रत्येक घरातील नळाला स्वच्छ पाणी देण्यावर नगरपालिकेचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या पैशावर अभ्यास सहल करण्यापेक्षा इतर खर्चातून अभ्यास दौरे केले पाहिजेत. जेणेकरून लोकांच्या पैशावरती पदाधिकारी फिरले असे आरोप होणार नाहीत. घनकचरा प्रकल्प भाड्याच्या जागेपेक्षा स्वतःच्या जागेवरती असावा. त्यासाठी जागा उपलब्ध करून घ्यावी, असा सूचनाही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नगरपरिषदेच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांना केल्या.
मलकापूर शहराला स्वच्छ, सुंदर व देखणे शहर करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. नुसत्या इमारती बांधण्यापेक्षा लोकांना चांगल्या सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. शहराच्या विकासासाठी छोट्या छोट्या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. मलकापुरच्या झोपडपट्टीतील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान आवास योजनेतून घर देण्यासाठी नगरपालिकेने सर्वे करून प्रस्ताव द्यावा.
त्याचबरोबर मलकापूर शहराची उपनगरे विकसित झाली पाहिजेत. जखिणवाडी, आगाशिवनगर यासह आजूबाजूंच्या गावांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उंडाळे पाणी योजना सुरू करून त्याचा लोकांना फायदा व्हावा यासाठीही प्रयत्न करणार आहे. नांदलापूरमध्ये भव्य व सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.

Sunday, April 5, 2026

मलकापूर नगरपरिषदेचे सभापती सूरज शेवाळे यांच्या आगाशिवनगर- मलकापूर येथील जनसंपर्क कार्यालयाचे आमदार अतुल भोसल यांच्या हस्तेे उद्घाटन ;

वेध माझा ऑनलाइन।
मलकापूर नगरपरिषदेचे सभापती सूरज शेवाळे यांच्या आगाशिवनगर, मलकापूर येथील नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन  आज आमदार अतुलबाबा भोसले यांच्याहस्ते करण्यात आले. 

हे जनसंपर्क कार्यालय परिसरातील नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी आणि विविध शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक हक्काचे केंद्र ठरेल. लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा हाच यामागील मुख्य उद्देश आहे 
युवा नेते सूरज शेवाळे हे आमदार डॉ अतुलबाबांचे कट्टर समर्थक मानले जातात अतुलबाबांची पहिल्यापासूनच पाठराखण करत त्यांनी आपली निष्ठा सिद्ध केली आहे  सध्या ते मलकपूरचे नगरसेवक तथा सभापती म्हणून कार्यरत आहेत लोकांची सेवा करत शहराचे प्रश्न सोडवत त्यांनी आपली बांधीलकी जपली आहे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आले   
लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा हाच यामागील मुख्य उद्देश आहे असे युवा नेते नगरसेवक सूरज शेवाळे यांनी वेध माझा शी बोलताना सांगितले