Sunday, May 31, 2026

80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ; राष्ट्रवादी च्या जयंत पाटील यांची टीका ;

वेध माझा ऑनलाईन।
महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’तून तब्बल 80 लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत. योजना सुरू झाल्यापासून 2 वर्षांनी आतापर्यंत 80 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे. ईकेवयासी योजनेनंतर लाखो महिलांना योजनेसाठी अपात्र ठरल्या असल्याने आता केवळ 1 कोटी 66 लाख बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. मात्र यावरून आताविरोधकांनी सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं असून लाखो लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्यावरून प्रश्न विचारण्यात येत आहेत. आधी शिवसेनेच्या सुषमा अंधारे, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी लाजकी बहीण योजनेवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
X या सोशल मीडिया अकाऊंटवरून जयंत पाटील यांनी एक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेली वाताहत पाहता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला. आता याच लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशीच काहीशी गत आहे असं जयंत पाटील म्हणाले.
देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे. ज्याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसला आहे. राज्याची वित्तिय तुट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात जागतिक मंदीने अधिक भर घातली आहे. आज ८० लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. उद्या आणखी काही लाख महिलांना काही कारणं दाखवून अपात्र केले जावू शकते आणि हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहेशासनाने या योजनेचे आधीच नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती, असा टोला जयंत पाटील यांनी सरकारला लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना भाजपकडून उमेदवारी ;

वेध माझा ऑनलाइन।
भाजपने जाहीर केलेल्या ११ उमेदवारांच्या यादीत नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि भाजपचे सह-कोषाध्यक्ष अरुण लखानी यांचा समावेश आहे. भाजपने अरुण लखानी यांना चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अरुण लखानी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही असून मुलगी रेवती सुळे यांचे होणारे सासरे आहेत. त्यामुळे या उमेदवारीची राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे

आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अरुण लखानी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाशी असलेल्या कौटुंबिक संबंधांवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फारच चोखपणे उत्तर दिले. मी भाजपचा जुना कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी भाजप पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. पवार साहेब हे देशातील आणि राज्यातील खूप मोठे नाव आहे. ते एक मोठे राजकीय कुटुंब आहे. त्या व्यतिरिक्त आमचे केवळ कौटुंबिक संबंध आहेत, त्यात कोणतेही राजकारण नाही, अशी प्रतिक्रिया अरुण लखानी यांनी दिली.

विधानपरिषदेसाठी सांगली-सातारा मधून भाजपकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर

वेध माझा ऑनलाइन।
भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सांगली-सातारा – मधून श्री धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे

तसेच धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच जळगाव मधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून डॉ.राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार आता उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


भाजपचे 11 उमेदवार 
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – श्री अरुण लखानी
भंडारा-गोंदिया – श्री अविनाश ब्राह्मणकर
अमरावती – श्री प्रविण पोटे पाटील
सांगली-सातारा – श्री धैर्यशील कदम
सोलापूर – श्री राजेंद्र राऊत
अहिल्यानगर – श्री प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना – श्री सुहास शिरसाट
नांदेड – श्री अमर राजूरकर
धाराशिव-लातूर-बीड – श्री बसवराज पाटील
जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन
नागपूर – डॉ.राजीव पोतदार

निर्भीड पत्रकारिता, समाजसेवा आणि लायन्स क्लबच्या उपक्रमांची प्रभावी मांडणी ; विद्या मोरे यांचा विशेष सत्कार

वेध माझा ऑनलाइन
पुणे येथे पार पडलेल्या लायन्स नॅशनल मल्टी अवॉर्ड 2026 सोहळ्यात पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल The News Bharat 24 संपादिका व अखिल भारतीय पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष  विद्या मोरे यांना लायन्स क्लब इंटरनॅशनल मल्टीपल डायमंड अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता. या उल्लेखनीय यशाबद्दल अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे तसेच सामाजिक कार्याला प्राधान्य देत सकारात्मक पत्रकारिता करण्याचे काम विद्या मोरे यांनी सातत्याने केले आहे. विशेषतः लायन्स क्लबच्या विविध सेवाभावी, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांना प्रभावीपणे समाजासमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना लायन्स राष्ट्रीय स्तरावरील डायमंड अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.

अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित सत्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विद्या मोरे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या निर्भीड, अभ्यासू व समाजाभिमुख पत्रकारितेचे कौतुक केले. पत्रकारिता ही समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून सकारात्मक कार्याला प्रसिद्धी देणारे पत्रकार समाजासाठी प्रेरणादायी ठरतात, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

तसेच पुढील काळातही त्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवत समाजहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे, अशा शुभेच्छाही मान्यवरांनी दिल्या.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती अत्तर आंबेकर, दिलीप गुरव पाटील, अशोकराव पाटील, सागर बर्गे, अतुल शिंदे, समाजसेवक आनंदराव लादे, नगरसेवक नरेंद्र लिबे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष घराळ बापू, अशोककुमार चव्हाण, विवेक कुराडे, किरण पाटील, सुरज जाधव, संदीप काळे, अमर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

अतुलबाबा विरोधकांवर तुटून पडले ; म्हणाले...अविनाश मोहितेना विचारा... तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं ? तुम्ही निर्दोष झालात का? कृष्णा कारखान्याच्या चेअरमनला जेलमध्ये जावं लागत... ही नामुष्कीचं...

वेध माझा ऑनलाईन।
अविनाश मोहिते जेलमध्ये गेले... आणि आता जामिनावर बाहेर आहेत ...त्यांना विचारा तुम्ही निर्दोष झालात का?...तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं ?...कृष्णा कारखान्याच्या चेअरमनला जेलमध्ये जावं लागलं... ही नामुष्की पहिल्यांदाच पहावी लागली आहे...
कृष्णा कारखाना नाथा च्या पायथ्याशी आहे म्हणून या कारखान्यात बेईमानी चालत नाही नीतिमत्ता चांगली असली पाहिजे विरोधकांना भानगडी करताना ते लक्षातच आलं नाही आणि त्यांना जेलमध्ये जावं लागलं असा घणाघात आमदार डॉ अतुल भोसले यांनी अविनाश मोहिते यांच्यावर केला 

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनेलचा प्रचार शुभारंभ काल - शनिवारी  वडगाव हवेली येथे पार पडला त्याप्रसंगी सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते  माजी चेअरमन मदनदादा मोहिते, डॉ सुरेश भोसले , जगदीश जगताप, रयत संघटनेचे धनाजी काटकर सर, व परिसरातील कार्यकर्ते सभासद  तसेच महिला, युवक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉ अतुलबाबा म्हणाले...
कष्टकरी शेतकऱ्यांच्या घामाची काळजी आत्ता त्यांना वाटतेय मग, तुमच्या पाच वर्षाच्या कालावधीत का शेतकऱ्याची काळजी केली नाही?... आपल्याला कारखाना चालवताना काही अडचण आली तर आपण तज्ञांचा सल्ला घेतो मात्र... आपले विरोधक देवरूषी बोलावतात... अंगारे धुपारे करतात... लिंबू टाचण्या कारखान्यावर फेकतात... असा कारखाना चालतो का?... अविनाश मोहिते हे साधे ग्रामपंचायत सदस्य झाले नाहीत...मग  त्यांना एवढ्या मोठ्या संस्थेचे काय कळणार? 
जेव्हा आपल्या हातात कारखाना आला तेव्हा आपल्याला कळलं की अविनाश मोहितेंनी कारखान्यात किती घोटाळा करून ठेवलाय... त्यावेळी कारखान्याची अर्थव्यवस्था बघणारे लोक यांचा कारभार बघून आपल्याला तेव्हा म्हणाले होते... की तोडणी वाहतूकीची रक्कम देण्यासाठी बँक तयार नाही... व्यापारी देणे झालेले द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत... अशी अवस्था करून या लोकांनी ठेवली होती... मी व सुरेश बाबांनी काही बँकांशी बोलणी केली तेव्हा अविनाश मोहितेंनी केलेल्या बोगस कर्जाच्या भानगडीच्या रकमेसकट पैसे आपल्याला भरायला लागणार होते... शेतकऱ्यांच्या घामाला दाम द्यायची भाषा आता हे लोक करत आहेत मग त्याचवेळी का नाही शेतकऱ्यांची काळजी केली ...? कारखान्याची अवस्था अशी का करून ठेवली? असा सवालही  आमदार भोसले यांनी केला
ते सध्या पाणीपट्टी कमी करण्याची व वीजबिल माफ करण्याच्या वलग्ना करत आहेत...हे सरकारच्या सहकार्याशिवाय शक्य नाहीये... या लोकाना शेतकरी सभासद नाकारणार असल्याने सभासदांना फसवण्यासाठी त्यांच्या या वलग्ना सुरू आहेत...

राजकारण विरहित असा सभासदांच्या हिताचा आपण नेहमीच कारभार केला आहे सहकारात नेहमीच एक न्यायाने आपले काम चालते त्यामुळे परिसरातील सर्वच राजकीय नेत्यांनी सुरेशबाबाना पाठिंबा दर्शवला आहे यावेळच्या कारखाना निवडणुकीसाठी इच्छुकांची उमेदवारीसाठी गर्दी होती...सगळ्यांना कारखान्यात संधी देणे शक्य नव्हते मात्र ज्यांना याठिकाणी संधी देता आली नाही, त्यांना इतर संस्थेत ऍडजस्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले
गेल्या 5 वर्षात आपल्या काळात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले आहे उच्चांकी ऊसदर आम्ही दिला आहे  कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली आहे सभासदांना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आहे तसेच कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे  गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील कारखान्यात केलेलं आहे अशा अनेक बाबींमुळे कारखाना आजच्या घडीला राज्यात अववल क्रमांकावर आहे . 
मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत सहकार पॅनलचा मोठ्या मताने विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला...

Saturday, May 30, 2026

डॉ सुरेश भोसले म्हणाले...अविनाश मोहितेंच्या काळात कारखाना विकावा लागला असता ; त्यांच्या काळात 1 हजार कामगार कामाला असल्याचे दाखवले, त्यांचा 5 हजार रुपये दरमहिना पगार दाखवला, कागदावर मात्र आजअखेर काहीच दिसत नाही, मग महिन्याला 50 लाख गेले कुठे?

वेध माझा ऑनलाईन।
अविनाश मोहिते कृष्णा कारखान्याचे चेअरमन असताना कारखान्याची अक्षरशः वाट लागली होती त्यांच्या सारखी प्रवृत्ती फोफावली तर कारखाना विकावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती 
मात्र आपण कारखाना हातात घेतल्यानंतर कारखाना पुन्हा सुस्थितीत आला असल्याचे डॉ सुरेश भोसले म्हणाले

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनेलचा प्रचार शुभारंभ काल - शनिवारी  वडगाव हवेली येथे पार पडला त्याप्रसंगी सभासद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते  माजी चेअरमन मदनदादा मोहिते, आमदार अतुल भोसले, जगदीश जगताप, रयत संघटनेचे धनाजी काटकर सर, व परिसरातील कार्यकर्ते सभासद  तसेच महिला युवक शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉ सुरेश भोसले म्हणाले
ज्या अविनाश मोहितेना साध्या सोसायटीच्या सदस्य पदाचा अनुभव नाही अशा माणसाला एवढी मोठी सहकारी संस्था कशी चालवता येणार? आणि त्याचमुळे खरतर कारखाना त्यांच्या काळात अडचणीत आला त्यांना कारखानदारी मधले काहीच कळत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली 

त्यांनी व्यापारी कर्ज 15 कोटी करून ठेवले, कारखान्याची वीज, तसेच पाणी कट करण्यात आले होते, तोडणी वाहतुकीला पैसेच शिल्लक नव्हते,अग्रीकल्चर कॉलेज बंद करण्यात आले होते, डिस्लरी बंद केली होती, तोडणी कामगारांना पैसे दिले नाहीत म्हणून त्या कामगारांनी संप केला होता, 
तसेच 1000 कामगार 5 000 रुपये महिना पगाराने कारखान्यात कामाला असल्याचे दाखवून महिन्याला 50 लाख रुपये त्यांच्या पगारापोटी खर्च केले... मात्र... हे कामगार आजअखेर कागदावर कुठेच दिसत नाहीत... मग हे प्रत्येक महिन्याला 50 लाख रुपये गेले कुठे?... असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ते म्हणाले... अशी बिकट परिस्थिती अविनाश मोहितेंच्या काळात होती आणि त्या परिस्थितीत हा कारखाना आपण ताब्यात घेतला मात्र अथक प्रयत्नाने हा कारखाना सध्या राज्यात अववल दर्जाचा म्हणून सध्या डौलाने उभा आहे, सुस्थितीत आहे... 
अविनाश मोहितें सारखी प्रवृत्ती फोफावली असती तर कारखाना विकावा लागला असता अशी भोतीही त्यांनी बोलून दाखवली 

ते म्हणाले
गेल्या 5 वर्षात आपल्या काळात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले आहे उच्चांकी ऊसदर आम्ही दिला आहे  कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली आहे सभासदांना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आहे तसेच कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे  गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील कारखान्यात केलेलं आहे या व अशा अनेक बाबींमुळे कारखाना आजच्या घडीला राज्यात अववल क्रमांकावर आहे . 
मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत सहकार पॅनलचा मोठ्या मताने विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला...

कराडमध्ये 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त ; कराड शहर पोलिसांची ड्रग्ज विरोधी जोरदार कारवाई ;

वेध माझा ऑनलाइन
कराड शहर पोलिसांनी 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले असून तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत अंमली पदार्थांसह मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा एकूण अंदाजे 18 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काही जण वारुंजी फाटा परिसरात इनोव्हा वाहनातून मेफेड्रोन विक्रीसाठी येणार आहेत.
अशी माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती 
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.या कारवाईत समीर गुलाब शेख (रा. कोयनावसाहत, कराड), नजर महम्मद आरिफ मुल्ला (रा. मुजावर कॉलनी, कराड) आणि फरदीन दादापीर शेख (रा. सूर्यवंशी मळा, कराड) या संशयितांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 2 लाख 87 हजार 340 रुपये किंमतीचे 95.78 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पोलिसांनी जप्त केले. तसेच तीन मोबाईल फोन आणि एक इनोव्हा कारही जप्त करण्यात आली.
तसेच ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस उपनिरीक्षक निखील मगदुम, हवालदार वाडकर, पाटील, कुंभार, महिला पोलीस सांळुखे, हवालदार स्वामी, कोरडे, सांडगे, मोरे, देशमुख, पवार, महिला पोलीस पिसाळ, हवालदार विभुते, चव्हाण, मोमीन, साळुंखे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे करत आहेत.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.