Thursday, May 21, 2026

संस्थापक पॅनेलच्या नेत्या सौ. अर्चनाताई मोहिते यांच्यासह पॅनेलच्या उमेदवारांनी भरले अर्जे ; कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका ; काय म्हणाले?

वेध माझा ऑनलाइन
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी कृषीमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. 

यावेळी माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या उपस्थितीत संस्थापक पॅनेलच्या नेत्या सौ. अर्चनाताई अविनाश मोहिते यांच्यासह पॅनेलच्या उमेदवारांनी  आपले उमेदवारी अर्ज भरले.

यावेळी माध्यमांशी बोलताना कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “संस्थापक पॅनेल पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरले असून सभासदांच्या न्याय हक्कासाठी आम्ही ही लढाई लढत आहोत. गेल्या अकरा वर्षांत कारखान्यात झालेल्या गलथान कारभाराविरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. सरकार आणि निवडणूक यंत्रणेकडून ही निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक व्हावी, एवढीच अपेक्षा आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पॅनेल प्रमुख सौ. अर्चनाताई मोहिते म्हणाल्या, 
आम्ही ही निवडणूक सत्ता किंवा राजकारणासाठी लढवत नाही, तर शेतकरी सभासदांच्या घामाला योग्य दाम मिळाले पाहिजे यासाठी लढवत आहोत तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी देखील आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, 

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार नाराज ? रोहित पवार यांची पोस्ट चर्चेत /

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत असून आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुंबईत बैठक पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्ष चांगलेच चर्चेत असून आधी अजित पवार गटातील नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे नाराज होते, अशा चर्चा होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र यामुळे शरद पवार गटात कुरबूर सुरू झाली. तटकरे आणि पटेल यांच्या भेटीमुळे शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यातच ते आज पक्षाच्या मुंबईतील बैठकीलाही अनुपस्थित असल्यामुळे नाराजच्या चर्चांना आणखीनच उधाण आलं. मुंबईला न जाता ते पुण्यात असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि चर्चा आणखीनच रंगली.
मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळताना दिसतोय, कारण खुद्द रोहित पवार यांनीच आपलं मौन सोडत या संपूर्ण मुद्यावर भाष्य केलं आहे. रोहित पवार यांनी ‘X’ वरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून (पूर्वीचं ट्विटर) एक पोस्ट लिहीत लांबलचक स्पष्टीकरण दिलं आहे. नाराजीच्या बातम्या निराधार असल्याचं त्यांनी या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे. तसेच आपण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार असल्याचं त्यांनी यातून नमूद केलं आहे.

रोहित पवार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला !! कारण अद्याप गुलदस्त्यात!

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील तीन बड्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. यानंतर लगेचच राष्ट्रवादीतील आणखी एका वरिष्ठ नेत्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. पार्थ पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
यानंतर मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवारदेखील रवाना झाले. ते मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं समोर आलं. मात्र ही भेट नेमकी कोणत्या कारणावरून घेतली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अनेकदा अशा भेटींनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडतात, त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांच्याच नजरा वळल्या आहेत. काहीवेळा ही भेट फक्त औपचारिक भेट देखील असते. एकूणच या भेटीमागचं कारण अजून गुलदस्त्यातच आहे.

मोठी बातमी ; रोहित पवार म्हणाले...जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होऊन एनडीएसोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडणार , भाजपसोबत जाणार नाही,;

वेध माझा ऑनलाईन।
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असून, राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत सत्तेत जाऊ शकतो अशी चर्चा अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झाली होती. अखेर बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विलिनीकरणावर चर्चा झाली. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे की नाही? यावर पक्षाच्या वरिष्ठांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावर अखेर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.पक्षाचं विलिनीकरण होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या बैठकीला शरद पवार यांची देखील उपस्थिती होती, मात्र यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया त्यावेळी दिली नाही, परंतु शरद पवार यांच्यासमोरच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये बोलताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

विलिनीकरणाची चर्चा आता थंड झाली आहे, परंतु तरी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीये, तुम्ही एकटे सोडले तर राष्ट्रवादी शरद पवार गटातील इतर कोणताही नेता सरकारवर फार काही टीका करताना दिसत नाहीये, त्यामुळे लोकांना अजूनही असं वाटतं की मागच्या दाराने चर्चा सुरू आहे, समजा विलिनीकरण होऊन राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत गेला तर तुमची भूमिका काय असणार? असा प्रश्न यावेळी रोहित पवार यांना विचारण्यात आला होता.
या प्रश्नला उत्तर देताना रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. जर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होऊन एनडीएसोबत गेला तर मी दुसरा पर्याय निवडेल, इतर पर्याय निवडेल पण भाजपसोबत जाणार नाही, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.  रोहित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, मात्र या प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं. मी बघेल दुसरा पर्याय निवडेल परंतु मी भाजपसोबत जाणार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.


कृष्णे ची निवडणूक वन- साईड जिंकणार ; डॉ सुरेश भोसलेंना विश्वास ; म्हणाले... कृष्णा कारखान्याचे विस्तारीकरण व नूतनीकरण केले ;उच्चांकी दर दिला; कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पगारवाढ दिली ; सभासदांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे;

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या 5 वर्षात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले उच्चांकी ऊसदर आम्ही दिला कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली अशा अनेकबाबी यशस्वीपणे करत आम्ही सभासदांना देखील सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील आम्ही कारखान्यात केलेलं आहे या व अशा बाबींमुळे कारखाना राज्यात अववल क्रमांकावर आहे त्यामुळे यावेळच्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही मागच्या वेळेप्रमाणे वन-साइड निवडून येऊ... असा विश्वास डॉ सुरेश भोसले यांनी आज व्यक्त केला

आज गुरुवारी दुपारी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते  यावेळी आमदार डॉ अतुल भोसले यांच्यासह कराडचे भाजपचे नगरसेवक आजी माजी पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी आमदार डॉ अतुल भोसले म्हणाले डॉ सुरेश भोसलेंच्या नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याची वेगळी अशी ओळख राज्यात निर्माण झाली आहे राज्यात साखर कारखानदारीत उच्चांकी दर देणारा आपला कारखाना आहे  कृष्णा कारखान्याची राज्यात अव्वल साखर कारखाना म्हणून देखील ओळख आहे यावेळच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचा मोठा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करत, जे कोणी कृष्णेच्या विजयात वाटेकरी राहण्यासाठी प्रयत्न करतील त्या सर्वांना कृष्णेच्या प्रवाहात सन्मानाने कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी देण्याचा आमचा मानस आहे सुरेशबाबांच्या नेतृत्वात सहकार पॅनेलच्या विजयाची घौडदौड कायम राहणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला

Tuesday, May 19, 2026

सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना पाठवण्याची तयारी सुरू ;

वेध माझा ऑनलाइन
सुनेत्रा पवार या विधानसभेच्या सदस्य झाल्याने त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठवण्याची तयारी पक्षाकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे

लोकसभा निवडणुकीपासून छगन भुजबळ दिल्लीच्या राजकारणात जाण्यास इच्छुक होते. स्वत: भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा यांनी त्यांचे नाव लोकसभेसाठी पुढे केले होते. मात्र, त्यावेळी महायुतीच्या वाटाघाटीचा घोळ सुरु होता, त्यातून जास्त उशीर झाल्याने भुजबळांनीच उमेदवारी करणार नसल्याचं जाहीर केलं होतं. आता याही वेळेला त्यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे. मात्र, सध्या ते राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत मंत्रीपद सोडून ते राज्यसभेचा पर्याय स्वीकारतील का, हा पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न आहे.
यावर मंत्री छगन भुजबळ यांनीच माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली होती. मी ज्येष्ठ मंत्री आहे. त्यामुळे मला राज्यसभेवरच पाठवा असा आग्रह धरणं चुकीचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं होतं. परंतु पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असही छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यामुळे पक्षाने निर्णय घेतल्यास भुजबळांना दिल्लीला जावे लागेल अशी शक्यता आहे. परंतु भुजबळांना पक्षाकडून विचारणा न झाल्यास भुजबळ स्वत:हुन राज्यसभेवर जाण्याची मागणी करण्याची शक्यता यावेळी जवळपास नाही. कारण त्यांच्यासाठी मंत्रिपद अधिक महत्वाचं आहे.

Monday, May 18, 2026

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज पहिल्याच दिवशी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांचा उमेदवारी अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
रेठरे बुद्रुक (शिवनगर) तालुका कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज पासून  उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ जून असून २१ जून ला मतदान तर २३ जूनला मतमोजणी होणार आहे. 
आज पहिल्या दिवशी सोमवारी सत्ताधारी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्यावतीने कारखान्याचे विद्यमान संचालक दयानंद भीमराव पाटील (काले) यांनी गट क्रमांक २ काले-कार्वे उत्पादक सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत कारखान्याचे संचालक जगदीशदादा जगताप, कराड पंचायत समितीचे सदस्य पै. धनंजय पाटील आदींसह कारखान्याचे माजी संचालक, सहकार पॅनलचे कार्यकर्ते उपस्थित होते.