Saturday, May 23, 2026

एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना ;

वेध माझा ऑनलाईन
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासकरून जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 17 पैकी 16 जागांवर सर्व पक्षांचे एकमत झालेले आहे, मात्र एका जागेवर शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही पक्षांनी दावा केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता जागा वाटपाचा तिढा दिल्ली दरबारी सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे, कारण एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत.


breaking...

ईचलकरंजी महापालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार धैर्यशील माने यांची छायाचित्रे काढून टाकल्याने वाद ;

वेध माझा ऑनलाईन।
ईचलकरंजी महापालिकेतील स्थायी समितीच्या दालनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार धैर्यशील माने यांची छायाचित्रे काढून टाकल्याने संबंधित पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना शहरप्रमुखानी याबाबत विचारणा केली त्यामुळे पालिकेत वाद निर्माण झाला आहे शिवसेनेने या सर्व प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे

Breaking news...

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ. मनोजदादा घोरपडे यांचा पुढाकार ; कराड उत्तरसाठी तब्बल १७६ नवीन डी.पी. मंजूर ; शेतकरी व ग्रामस्थांना मिळणार मोठा दिलासा ;

वेध माझा ऑनलाइन। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पुढाकार घेतला असून, कराड उत्तरसाठी तब्बल १७६ नवीन डी.पी. मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतीसाठी ९७ तर गावठाण अंतर्गत ७९ डी.पी. बसविण्यात येणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा पूर्णतः ग्रामीण व शेतीप्रधान भाग असून या भागातील बहुतांश नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना वारंवार मोटार ट्रिप होणे, लाईट जाणे, डी.पी. जळणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शेतीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत होते.

या समस्येची गंभीर दखल घेत आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शेतातील जुने व कमी क्षमतेचे डी.पी. बदलण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या ठिकाणी ६० क्षमतेचे डी.पी. आहेत त्या ठिकाणी आता १०० क्षमतेचे डी.पी. बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त वीज भार कमी होऊन वीज पुरवठा अधिक सुरळीत व अखंडित होणार असल्याची माहिती आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

ग्रामीण भागातील गावठाण क्षेत्रातही वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून वारंवार वीज खंडित होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत होता. ही समस्या दूर करण्यासाठी गावठाण अंतर्गतही मोठ्या प्रमाणात नवीन डी.पी. बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये अतित अंतर्गत ८, खोजेवाडी अंतर्गत ८, काशीळ अंतर्गत ८, नागठाणे अंतर्गत ४, तारगाव अंतर्गत १०, किरोली अंतर्गत ११, आर्वी-नागझरी अंतर्गत ८, वाठार किरोली अंतर्गत ९, पाल अंतर्गत ६ तसेच मसूर अंतर्गत ७ डी.पी. मंजूर करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कराड उत्तरमधील शेती व गावठाण परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम होऊन शेतकरी व ग्रामस्थांना मोठा लाभ होणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

शरद पवार यांनी आमदार रोहित पवार यांना दिली मोठी जबाबदारी ;

वेध माझा ऑनलाईन।
शरद पवार यांनी एक मोठी जबाबदारी नातू आणि आमदार रोहित पवार यांना दिली आहे. जबाबदारी मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे साहेबांचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती, ज्यामुळे शरद पवार गटात अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा होती. या भेटीमुळे शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार नाराज असल्याच्या आणि पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी रोहित पवारांवर एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.


ती जबाबदारी कोणती ?
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड करण्यात आली असून, स्वतः रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. रोहित पवार मागील ६ वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेवर ‘सदस्य’ म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.
रोहित पवार म्हणाले
या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत रोहित पवारांनी पोस्टमध्ये, ‘बहुजन समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि आज आदरणीय पवार साहेबांच्या हाती धुरा असलेल्या ‘रयत शिक्षण संस्थे’च्या उत्तर विभागीय अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आदरणीय पवार साहेब आणि संस्थेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार! मागील गेली सहा वर्षे संस्थेवर सदस्य म्हणून आणि सर्वांना सोबत घेऊन केलेल्या कामाची ही पोचपावतीच आहे, असं मी मानतो. भविष्यातही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर चालताना आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली सर्वांच्या सहकार्याने अधिकाधिक चांगल्या कामाच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील’ असे म्हटले आहे.
दुसरीकडे, सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी शरद पवार यांची रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी केवळ त्यांचाच एक अर्ज आल्याने ही निवड निश्चित झाली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शरद पवारांनी संस्थेच्या भावी वाटचालीबद्दल महत्त्वाचे संकेत दिले:

Friday, May 22, 2026

...तर उद्या सकाळीच मी फाशी घेतो असे जरांगे पाटील का म्हणाले ?

वेध माझा ऑनलाइन।
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी विद्यार्थ्यांची अडकलेली शिष्यवृत्ती आणि आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज या मुद्द्यांवरून महायुती सरकारला लक्ष्य केले. आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रांना काही वाईट बोललो का? मग अंतरवाली सराटीत लाठीमार का करण्यात आला होता? आम्ही पैशाने किंवा पदाने फुटत नाही… 
दरम्यान मी कोणाकडून एक रुपयाही घेतल्याचे दाखवून द्या… तसे आढळल्यास उद्या सकाळीच फाशी घेतो, असे खुले आव्हान जरांगे यांनी लाड यांना दिले. 

त्यावर मी फक्त मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. कृपया आपण आंदोलन मागे घ्यावे, मराठ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मी स्वत:हून आमदारकीचा राजीनामा देईन, अशी विनंती लाड यांनी केली. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून आहे.

विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा गट फुटणार !

वेध माझा ऑनलाइन।
विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा गट फुटणार, असा खळबळजनक दावा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. दिवा विझताना जसा मोठा होतो, तशीच जयंत पाटील यांची अवस्था झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सांगली जिल्हा बँकेच्या विविध विषयावरून आमदार पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

सांगली महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन नगरसेवक भाजपामध्ये आलेत. यापुढेही अनेक गट जयंत पाटील यांची साथ सोडतील, असे पडळकर म्हणाले. कर्नाटकातील एका कारखान्याचे महाराष्ट्रात ऑफिस दाखवून त्यांना कर्ज देता, खासदार विशाल पाटील यांना कर्ज का देण्यात आले? पूर्वी थकीत असताना २७० कोटी कर्ज कसे देता? हे सारे प्रकार चौकशीत उघड होणार असल्यामुळे पळवाट शोधायला ते न्यायालयात गेले आहेत. जयंत पाटील यांचा पावडर लावलेला चेहरा उघडा पडणार आहे. रामाच्या मंदिरात हा रावण राहतो, हे लोकांच्या लक्षात येईल, अशी टीका पडळकर यांनी केली.

भाजपची शिवसेनाला 3 ते 4 जागा देण्याची तयारी - शिवसेनेचा 7 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लागलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याचं चित्र समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत 7 जागांवर आपला ठाम दावा केला आहे. शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या 5 आणि नव्याने ताकद वाढलेल्या 2 अशा एकूण 7 जागांचा अधिकृत प्रस्ताव ठेवला होता अशी माहिती समोर येत आहे. 

मात्र, भाजप कडून शिवसेनेच्या या प्रस्तावाला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. भाजपने शिवसेनाला केवळ 3 ते 4 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता शिवसेनेने 7 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय घेत भाजपची कोंडी केली आहे.

या सर्व राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. सरनाईक म्हणाले, "विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. यापूर्वी धुळे, कोकण या भागांत आमचे 5 आमदार होते. आता पक्षाची ताकद वाढलेली असल्यामुळेच आम्ही 7 जागांची मागणी केली आहे. यावर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील."