सातारा जिल्ह्यातील शिक्षक व पदवीधरांची प्रलंबित शासकीय कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सेवा अभियान कार्यक्रमाचे आयोजन आज हॉटेल फर्न, कराड येथे करण्यात आले होते यानिमित्ताने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक पत्रकारांशी संवाद साधणार असे सांगण्यात आले होते मात्र प्रत्यक्ष प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली...आणि पत्रकारांच्या प्रश्नाच्या माऱ्यापुढे उत्तरे न देता आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे पी ए साखरे हे तिथून अक्षरशः पळून गेले...
त्याचे झाले असे की...
आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए श्री संतोष साखरे पत्रकार परिषद घेणार असा निरोप होता...शिक्षकांच्या प्रश्नावर ते बोलणार असंही सांगण्यात आले होते...त्यांच्याबरोबर शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी देखील उपस्थित होते...प्रत्यक्षात पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा मात्र पत्रकारांच्या प्रश्नावर त्या संघटनेचे कोणीही पदाधिकारी किंवा स्वतः रवींद्र चव्हाण यांचे पी ए काही बोलू शकले नाहीत...त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडिमाराचा अंदाज घेत त्याठिकाणहुन पळून जाणे पसंत केले...
काही महिन्यांपूर्वी साताऱ्या जिलह्यात काही शिक्षकांनी विद्यार्थीनीशी गैर वागणुकीबद्दलच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या... त्यावर चर्चा झाल्या...मात्र तुमची कोणतीच भूमिका त्यावेळी स्पष्ट दिसली नाही.. याबाबत तुम्ही आज भूमिका स्पष्ट करा...जसे तुम्ही शिक्षकांच्या प्रश्नावर बोलता तसे शिक्षक चुकीचे वागतात त्यावरही तुम्ही बोललं पाहिजे...असे पत्रकारांनी विचारले असता...पत्रकार परिषदेत उपस्थित रवींद्र चव्हाण यांच्या पी ए ना याबाबत काहीच माहीत नाही असे दिसून आले...काहीही माहिती नसताना उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी तिसरच बरळत त्यांनी थातूरमातूर उत्तरे द्यायला सुरुवात केली...प्रॉपर काही माहिती नसताना माहिती घेऊन त्याविषयी बोलू...अशी भूमिका न घेता उगाचच फालतू बडबड करत त्यांनी वेळ घालवायला सुरुवात केली...हे पत्रकारांच्या लक्षात आले...
त्यानंतर...
सातारा जिल्ह्यात व राज्यात दिव्यांग शिक्षकांचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असून आरोग्य विभागाने दिव्यांग ठरवलेले शिक्षक आता ठरवले आहेत. अनेक शिक्षक या विरोधात कोर्टात दाद मागत असून याकडे प्रशासन ठोस उपाययोजना करता दिसत नाही. त्यामुळे वर्षभरापासून या कोर्टात गेलेल्या शिक्षकांना बदलीसाठी प्रतीक्षा करावी लागली आहे. या शिक्षकांच्या बदलीबाबत प्रशासनाने ठोस भूमिका अद्याप घेतलेली नाही... याहीविषयी त्यांना विचारले असता...याबाबतही ते काही उत्तर देऊ शकले नाहीत...पुन्हा काहीतरी फालतू बडबड करू लागताच... ही पत्रकार परिषद घेतलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या पी ए ना याबाबतही काहीच माहिती नाही हेही पत्रकारांच्या लक्षात आले...मग... काही माहिती नसताना उगीचच वेळ जात नाही... म्हणून पत्रकारांशी संवाद साधत आहात का? शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या मार्केटिंगसाठी तुम्ही इथे आलाय का? असे अनेक विषय त्याठिकाणी चर्चेत येऊ लागतच... भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए संतोष साखरे...ज्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती...त्यानी थातूरमातूर कारण सांगून पत्रकार परिषदेमधून अक्षरशः पळ काढला...
त्यावेळी पत्रकारांनी त्यांना अडवून...तुम्ही पत्रकार परिषद बोलावली आहे...आणि तुम्हीच अस मधून पळून जाताय... हे बरोबर नाही...असे त्याना सुनावले असता....काहीतरी फालतू कारण सांगून ते निघून गेले...ज्या विषयी पत्रकार परिषद घेतली आहे...त्या विषयीची प्रॉपर माहिती आपल्याला नाही...यापुढे आपण पत्रकारांना उत्तर देऊ शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि म्हणूनच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पी ए चक्क पत्रकारांसमोरच पळून गेले...त्यामुळे ही पत्रकार परिषद त्याठिकाणीच थांबली... पुढे झालीच नाही...