महाराष्टाच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आज बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे. काल परवा ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व शिवसेनेनं मान्य केल्या आहेत.बच्चू कडूचं काम प्रामाणिकपणे राहिल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे. तर प्रहार संघटना आहे तशीच राहणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं
वेध माझा...
Thursday, April 30, 2026
Wednesday, April 29, 2026
बच्चू कडू म्हणाले...आमदारकीसाठी शिंदेसोबत जाण्याइतका मी नालायक नाही
वेध माझा ऑनलाइन।
विधानपरिषदेत रिक्त झालेल्या ९ जागांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये शिवसेनेच्या कोट्यात दोन जागा आहेत. यापैकी एका जागेवर बच्चू कडूंना संधी देण्याची तयारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू त्यांचा पक्ष शिवसेना शिंदे गटात विलीन कऱणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र बच्चू कडू यांनी विलीनकरणाचा मुद्दा फेटाळून लावला आहे. आमदारकीसाठी शिंदेसोबत जाण्याइतका बच्चू कडू नालायक नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिलीय.
बच्चू कडूंची विधानपरिषदेवर वर्णी लागणार, विधान परिषदेवर आमदार होणार अशा चर्चा होत आहेत. या चर्चांबाबत विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, मी शेतकरी शेतमजूरांचा आवाज उठवणारा माणूस आहे. शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांचा सन्मान होईल. जाती धर्माच्या नावावर लोक मेंढरासारखे जातात. आमदारकीसाठी जाणार नाही.
पदासोबत युती करणारे आम्ही नाही.
विलीनकरणाच्या बातम्या वाचल्या. खरंतर मी शिवसैनिकच होतो, शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात गेलो नाही. प्रहार सुरू केली. पाठिंबा देतो म्हटलं तरी घेतला नाही. २५ वर्षे तटस्थ भूमिका घेतली. खासदारकी द्या युती करा असं म्हटलं नाही. जनतेसोबत काम केलं पाहिजे. सामान्य माणसाचा भिडू कोण असेल तर बच्चू कडू असा नारा तयार झालाय. विचारातून संघटना मोठी केलीय असंही बच्चू कडू म्हणाले
सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी भाजपच्या वाटेवर !
सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि औंध संस्थानाच्या पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी या भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या या पवित्र्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औंध परिसरातील विकासकामांना गती देण्यासाठी गायत्रीदेवींनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. गायत्रीदेवी या खटाव तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
Tuesday, April 28, 2026
कराडच्या मंगळवार पेठ परिसरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त... गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ; मोठ्या संख्येने उपस्थित रहा ; आयोजकांचे भाविकांना आवाहन ;
कराड येथील मंगळवार पेठ परिसरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात श्री नृसिंह जन्मोत्सवानिमित्त गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ६.३० ते ७.०० – पवमानसूक्त तसेच पंचसूक्त अभिषेक (नारायण सूक्त, विष्णू सूक्त, पुरुष सूक्त, श्री सूक्त व आमभृणी सूक्त) वेदशास्त्र संपन्न वरद वामन कुलकर्णी गुरुजी व मल्हारी उमराणी गुरुजी यांच्या उपस्थितीत
सकाळी ७.३० ते ८.०० – विष्णुसहस्रनाम पठण
सकाळी ८.३० ते ९.०० – वेदशास्त्र
पाठशाळेच्या वतीने मंत्रजागर
सकाळी ९.३० ते १०.०० – श्री नृसिंह बीज मंत्र जागर
सायंकाळी ४.०० ते ५.०० – शारदा भजनी मंडळ, कऱ्हाड यांचा भजन कार्यक्रम
सायंकाळी ५.३० ते ७.०० – सुप्रसिद्ध ह.भ.प. श्री. पित्रे गुरुजी, कासेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) यांचे सुमधुर कीर्तन (साथ: श्री ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ, कऱ्हाड)
सायंकाळी ७.०० ते ७.३० – श्री नृसिंह जन्मकाळ सोहळा
रात्री ८.०० ते ८.३० – हळदीकुंकू व तीर्थप्रसाद
रात्री ९.०० ते ९.३० – विष्णुसहस्रनाम मंत्रजागर
ज्या भाविकांना श्रीस अभिषेक करावयाचा आहे त्यांनी शनिवार, दिनांक २९ एप्रिल २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक जवळ, संत सखु मंदिराचे पुढीलबाजूस, मंगळवार पेठ, कऱ्हाड येथे करण्यात आले असून ॲड. विराग अरुण जांभळे यांचे वतीने धार्मिक कार्यांत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क: मो. ९४२२६०३३९१ / ८६६८६७००९.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, माधवी नाईक संजय भेंडे यांची नावे आघाडीवर ; प्रत्येकाने पक्षासाठी केलंय मोठं काम ;
वेध माझा ऑनलाइन ।
राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 5 नावांची घोषणा झाली आहे. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. त्यामध्ये, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना संधी विधानपरिषदेची संधी मिळाली आहे. सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विवेक कोल्हे यांचं नाव निश्चित झाल्याच्या कालपासून चर्चा सुरु होत्या. विवेक कोल्हे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. प्रमोद जठार हे सिंधुदुर्गमधील भाजप नेते असून त्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या 5 नावांमध्ये माधवी नाईक यांचंही नाव असून ते अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत काम करतात. तर, संजय भेंडे भाजपचे उपाध्यक्ष असून ते नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, प्रमोद जठार यांनाही भाजपने संधी दिली असून जठार हे कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भरुन काढण्याचा प्रयत्न भाजपकडून या उमेदवारीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
विवेक कोल्हे...
यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वाढदिवसानिमित्ताने ही भेट घेतली असल्याची सूत्रांची माहिती होती. कोल्हे परिवाराचे नगर जिल्ह्यात वर्चस्व मानले जाते. विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. अहिल्यानगरमधील कोपरगावात काळे-कोल्हे असा जुना संघर्ष आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आशुतोष काळे यांना राष्ट्रवादी कांग्रेसनं कोपरगावमधून संधी दिल्यानंतर भाजपकडून कोल्हे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले होते.
पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी
काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत प्रज्ञा सातव भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यांच्या रिक्त जागेवर भाजपनं त्यांना उमेदवारी दिली आहे.
बच्चू कडू आपला पक्ष शिवसेनेत विलीन करणार, ?...बच्चू कडू यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांची शिंदे गटाच्या ऑफरबाबत एक अट...
वेध माझा ऑनलाइन
सध्या राज्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्या-त्या पक्षाकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराचा शोध आणि निवड केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांना थेट विधानपरिषदेची आमदारकी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. मंत्रिपद घेऊन बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिंदे गटात विलीन करावा, असाही प्रस्ताव शिंदे यांनी बच्चू कडू यांच्यापुढे ठेवल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता मोठी माहिती समोर आली आहे. बच्चू कडू यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या ऑफरबाबत एक अट समोर ठेवल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईत एक बैठक झाली होती. या बैठकीत शिंदे यांनी बच्चू कडू यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिलेली आहे. सोबतच शिंदे यांनी कडू यांना मंत्रिपदही देण्यात येईल, असा प्रस्वात दिलेला आहे, असे सांगितले जात आहे. याबाबत बच्चू कडू यांनी अद्याप कोणतेही उघड भाष्य केलेले नाही. परंतु बच्चू कडू हे शिंदे गटाच्या ऑफरबाबत आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि सल्लामसलत करत असल्याचे बोलले जात आहे.
पक्ष शिवसेनेत विलीन करा... पण...
सूत्रांच्या माहितीनुसार बच्चू कडू यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यांनी मंत्रिपद दिले जाईल, अशी ऑफर देण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी सध्या विधानपरिषदेची आमदारकी घ्यावी. परंतु लगेच पक्षाचे विलिनीकरण करू नये. सहा महिन्यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतरच प्रहार जनशक्ती पक्षाचे शिंदे गटाच्या शिवसेनेत विलिनीकरण करावे, अशी भूमिका बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांची आहे.
एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं...पण...एकनाथ शिंदेंची एक अट आहे ! ...
वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच काही महत्वाच्या घडामोडी घडू शकतात. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर दिल्याच्या बातम्या सुरु आहेत. लवकरच विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आहेत. विधान परिषदेसाठी 28 मतांचा कोटा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन आमदार विधान परिषदेवर जाऊ शकतात. एकाजागेवर निलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. दुसऱ्या जागेवर कोणाला संधी मिळणार ? हा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकतं. तशी ऑफर त्यांना देण्यात आली आहे. यामुळे बच्चू कडू यांचं एकप्रकारे राजकीय पूनर्वसन होणार आहे. सध्या बच्चू कडू आमदार नाहीयत.
बच्चू कडू यांना विधान परिषदेची ऑफर देताना त्यांच्यासमोर पक्ष विलीनीकरणाची अट ठेवली आहे. बच्चू कडू यांना त्यांचा प्रहार पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते विलीन करावा लागेल, तरच बच्चू कडू यांची विधान परिषदेवर वर्णी लागले अशी माहिती आहे. प्रहार हा बच्चू कडू यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. विदर्भात या पक्षाचं चांगलं नेटवर्क आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणण्याची प्रहार पक्षाची क्षमता नाहीय. पण कार्यकर्त्यांचं चांगलं जाळं आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं बळ वाढू शकतं.
Subscribe to:
Posts (Atom)