Tuesday, July 21, 2026

तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका ;

वेध माझा ऑनलाईन।
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अखिलेश यादव यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान प्रियंका गांधी यांना ज्या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, त्या पोलीस ठाण्यात सोनिया गांधी देखील पोहोचल्या . प्रियंका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं, त्यानंतर सोनिया गांधी देखील मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचल्या . शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंगळवारी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर तब्बल तीन तास आंदोलन केलं.  त्यानंतर आंदोलनस्थळी पोलीस दाखल झाले, पोलिसांनी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अखिलेश यादव यांना देखील ताब्यात घेतलं होतं.  यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं

वेध माझा ऑनलाईन।
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीमार नंतर आज पुन्हा एकदा आंदोलन चिघळलं आहे. तरुण आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदींच्या निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. तसेच प्रत्येक देशवासियांना मोदींच्या घरासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून हे आवाहन केलं आहे. मात्र अचानक आता राहुल गांधींचं आंदोलन चिघळल्याचं सांगितलं जात आहे.
आंदोलनस्थळी आता पोलीस दाखल झाले आहेत . 

एकूणच हे आंदोलन चिघळलं असून आंदोलन करणारे काही खासदार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी आंदोलन स्थळी सुप्रिया सुळे तसेच अखिलेश यादव देखील उपस्थित होते असं सांगितलं जात आहे.

राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर भाजप घेणार मोठा निर्णय ?;

वेध माझा ऑनलाईन।
राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलनानंतर केंद्र सरकारकडून महत्त्वाची हालचाल करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आंदोलनस्थळी जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. आता या भेटीनंतर जितेंद्र सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 
राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान एकूण 5 प्रमुख मागण्या मांडल्या. यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी पहिली मागणी करण्यात आली. तसेच NEET पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर संसदेत निवेदन द्यावे आणि संबंधित प्रकरणात पारदर्शक कारवाई करावी, अशाही मागण्या त्यांनी मांडल्या.

दरम्यान, जितेंद्र सिंह आता अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत राहुल गांधी यांनी मांडलेल्या मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुढे कोणता निर्णय घेणार, याकडे विद्यार्थी, पालक आणि देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन।
सीजेपीच्या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सीजेपीच्या 20 जुलै रोजीच्या संसद मार्चनंतर हे आंदोलन संपून जाईल, असे म्हटले जात होते. परंतु आता जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा सीजेपीचे आंदोलन जंतर-मंतरवर सुरूच आहे. दरम्यान, या आंदोलनात आता विरोधी पक्षदेखील सहभागी होत आहेत. एकीकडे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी हे देखील सामिल झाले आहेत. गांधी हे पंतप्रधांनाच्या निवासस्थान परिसरात ठिय्या आंदोलन करत असून आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी पोहोचले आहेत. या चर्चेत नेमकं काय घडणार या कडे देशाचे लक्ष लागून आहे.

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक ;

वेध माझा ऑनलाईन।
दिल्लीतील जंतर-मंतर येथे CJP आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी मुंबई बंदची हाक दिली आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी या मुंबई बंदमध्ये सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच नागरिकांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर यांनी पुढे आवाहन करत सांगितले की, नागरिकांनी स्वेच्छेने सेवा आणि कामकाजातून दूर राहावे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवावीत, तर टॅक्सी, ओला आणि उबेर सेवा देखील त्या दिवशी बंद ठेवाव्यात, असे त्यांनी म्हटले. तसेच बेस्टच्या बसेस डेपोतून बाहेर काढू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली.

सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त वक्तव्य ; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दिली दहशतवाद्यांची उपमा ;

वेध माझा ऑनलाईन।
शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांना दहशतवाद्यांची उपमा दिली आहे. त्यावर आता या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठी मुलांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार आता कोणाला आतंकवादी बोलायचं शिल्लक राहिलेलं नाही. जे सरकार विरोधात बोलतात त्यांना सरकार दहशतवादी म्हणतं. काल ही तरुण मुलं ही ग्रामीण भागातील मुलं होती. देशभरातून आलेली मुलं होती. शिक्षणासाठी लढणारी मुलं होती. त्यांना तुम्ही आतंकवादी म्हणत असाल तर तुम्ही फक्त देशभक्त. तुमचा भाजप फक्त देशभक्त दिसतो. बाकी सगळे लोक दहशतवादी वाटतात” अशा शब्दात या मुलांनी संताप व्यक्त केला. सदाभाऊ खोत यांना सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. देशद्रोही म्हणणं म्हणजे त्या आमदाराची लायकी नाही. त्यांना रस्त्यात पकडून जाब विचारला पाहिजे. मत घेताना लाज वाटली नाही का? असा सवाल या मुलाने विचारला.

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन ;

वेध माझा ऑनलाईन।
दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून झालेल्या आंदोलनादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. संसद मार्च रोखताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही आंदोलक संसद परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. या लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे.

दरम्यान, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेसच्या इतर खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. कॉक्रोज जनता पार्टी च्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करत त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे नीट पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. प्रियांका गांधी तसेच इतर नेत्या मांडी घालूनच बसल्या आहेत.