पप्पा सांगा कुणाचे...पप्पा माझ्या मम्मी चे...मम्मी सांगा कुणाची... मम्मी माझ्या पप्पांची... हे जुने गीत आहे..आपण अनेक वर्षांपासून हे गाणे ऐकतो आहोत... पण जर तुम्ही मलकापुरात गेलात... तर ... मनोहर शिंदे सांगा कोणाचे... हे गाणे सध्या ऐकायला मिळत आहे ...त्याचे कारणही तसेच आहे...
काल संगम हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत मलकापूर चे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे याना... तुमच्या ड्रीष्टीने मलकापूरसाठी विकसनशील नेता कोण?...पृथ्वीराजबाबा की अतुलबाबा...? वेध- माझाच्या या प्रश्नावर गुळगुळीत उत्तर देत मनोहरभाऊनी पृथ्वीबाबा व अतुलबाबा या दोघांच्याही नावाचा उल्लेख करत बॅलन्स राखण्याचा प्रयत्न केला... पण...त्यांनी ठामपणे कोणा एकाचे नाव घेतलेच नाही... त्यावर तुमच्या ड्रीष्टीने...जो सत्तेत तोच तुमचा नेता, अस समजायचे का...?असे पुन्हा त्यांना विचारले असता...तुम्हीच सांगा असे ते पत्रकारांना म्हणाले...
यावर...तुम्ही कारभारी आहात... तुमचा नेमका नेता कोण हे तुम्हीच सांगा अस पत्रकारांनी म्हटले असता... ते निरुत्तर झाले... व त्यांनी नेहमीप्रमाणे तिसरीकडेच विषय नेत मूळ प्रश्नाला बगल दिली व विषय बदलण्याचा प्रयत्न केला ...
पत्रकारांना लक्षात आलं की त्यांना यावर ठोस उत्तर घ्यायचच नाहीये...म्हणून पत्रकारांनी हा प्रश्न ताणून धरला नाही...मात्र भाऊ नक्की कोणाचे ? ही चर्चा मात्र कालपासून रंगली आहे... मलकापुरात तर, पप्पा सांगा कोणाचे?...या गाण्यापेक्षा मनोहर भाऊ सांगा नक्की कोणाचे...? या गाण्याची धूम जोरात सुरू आहे...
खरतर... या प्रश्नाचे उत्तर देताना
त्यांनी त्यातील कोणा एका नेत्यांशी आपली निष्ठा आहे...हे सर्वांपुढे सांगायला पाहिजे होते...
पण तसे झाले नाही...त्यांनी सोईस्कर उत्तर दिले ...त्यामुळे ते चर्चेत आले...
दरम्यान मलकापूर शहराचा संपूर्ण देशात अत्यंत चांगला नावलौकिक आहे. 'क' वर्ग नगर परिषदांमध्ये टी डी आर देणारी राज्यातील मलकापूर पहिली नगरपरिषद आहे. शहराचा होत असलेला विकास व वाढत असलेली लोकसंख्या याचा विचार करता भविष्यात शहराला फाइव स्टार मॉडर्न शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कालच्या हॉटेल संगममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
मलकापूर नगरपरिषदेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष तेजस सोनावले, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, यांच्यासह सभापती हणमंत जाधव, सुरज शेवाळे, धनंजय येडगे, गीतांजली पाटील व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते टीडीआर प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, शहराचा विकास होत असताना अपुऱ्या जागेवरती टीडीआरच्या आधारावर मोठमोठ्या इमारती उभा करता येऊ शकतात. त्यामुळे शहराच्या विकासासाठी टीडीआर प्रदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. टीडीआर मिळाल्यानंतर आरक्षण पडलेल्या जागा मालकाला उदाहरणार्थ दहा गुंठ्याच्या बदल्यात 20 गुंठे टीडीआर मिळू शकतो. त्यामुळे शहराचा विकास गतीने केला जाऊ शकतो. शहराचा विकास करत असताना आरक्षणामध्ये जमीन गेली असली तरी जागा मालकाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. संबंधित जागा मालकाला टीडीआरच्या माध्यमातून चांगला मोबदला मिळू शकतो. कराड विमानतळामुळे केवळ सात मजल्यापर्यंत इमारतींना परवानगी दिली जाऊ शकते, याचा विचार मलकापूर नगर परिषदेने केला पाहिजे. मलकापूरची 24 बाय 7 योजना देशात नावाजलेली आहे. मात्र पुढील 25 वर्षांचा विचार करता या योजनेचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ही प्रयत्न केले जाणार आहेत. याशिवाय सांडपाणी योजना तसेच शहरातील इतर योजनांचाही विचार करून पुढील 25 वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येच्या आधारावर या योजनांचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे. सरकारकडून मलकापूरसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पुढील तीन महिन्यात मलकापूर नगरपरिषदेची इमारत पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. 'क' वर्ग नगरपरिषदांमध्ये राज्यातील सगळ्यात मोठी इमारत मलकापूरची असणार आहे. त्यामुळे या इमारतीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ही इमारत पूर्ण करत असताना इमारतीच्या बाजूलाच लॉन, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जागा तसेच नगरपालिका व नागरिकांमध्ये सुसंवाद रहावा म्हणून संपर्क वाढवला जाणार आहे.
नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे प्रत्येक घरातील नळाला स्वच्छ पाणी देण्यावर नगरपालिकेचा प्रयत्न राहणार आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या पैशावर अभ्यास सहल करण्यापेक्षा इतर खर्चातून अभ्यास दौरे केले पाहिजेत. जेणेकरून लोकांच्या पैशावरती पदाधिकारी फिरले असे आरोप होणार नाहीत. घनकचरा प्रकल्प भाड्याच्या जागेपेक्षा स्वतःच्या जागेवरती असावा. त्यासाठी जागा उपलब्ध करून घ्यावी, असा सूचनाही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी नगरपरिषदेच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांना केल्या.
मलकापूर शहराला स्वच्छ, सुंदर व देखणे शहर करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. नुसत्या इमारती बांधण्यापेक्षा लोकांना चांगल्या सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. शहराच्या विकासासाठी छोट्या छोट्या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. मलकापुरच्या झोपडपट्टीतील प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान आवास योजनेतून घर देण्यासाठी नगरपालिकेने सर्वे करून प्रस्ताव द्यावा.
त्याचबरोबर मलकापूर शहराची उपनगरे विकसित झाली पाहिजेत. जखिणवाडी, आगाशिवनगर यासह आजूबाजूंच्या गावांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उंडाळे पाणी योजना सुरू करून त्याचा लोकांना फायदा व्हावा यासाठीही प्रयत्न करणार आहे. नांदलापूरमध्ये भव्य व सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.