Friday, May 22, 2026

...तर उद्या सकाळीच मी फाशी घेतो असे जरांगे पाटील का म्हणाले ?

वेध माझा ऑनलाइन।
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी विद्यार्थ्यांची अडकलेली शिष्यवृत्ती आणि आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज या मुद्द्यांवरून महायुती सरकारला लक्ष्य केले. आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रांना काही वाईट बोललो का? मग अंतरवाली सराटीत लाठीमार का करण्यात आला होता? आम्ही पैशाने किंवा पदाने फुटत नाही… 
दरम्यान मी कोणाकडून एक रुपयाही घेतल्याचे दाखवून द्या… तसे आढळल्यास उद्या सकाळीच फाशी घेतो, असे खुले आव्हान जरांगे यांनी लाड यांना दिले. 

त्यावर मी फक्त मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. कृपया आपण आंदोलन मागे घ्यावे, मराठ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मी स्वत:हून आमदारकीचा राजीनामा देईन, अशी विनंती लाड यांनी केली. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून आहे.

विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा गट फुटणार !

वेध माझा ऑनलाइन।
विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा गट फुटणार, असा खळबळजनक दावा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. दिवा विझताना जसा मोठा होतो, तशीच जयंत पाटील यांची अवस्था झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सांगली जिल्हा बँकेच्या विविध विषयावरून आमदार पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

सांगली महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन नगरसेवक भाजपामध्ये आलेत. यापुढेही अनेक गट जयंत पाटील यांची साथ सोडतील, असे पडळकर म्हणाले. कर्नाटकातील एका कारखान्याचे महाराष्ट्रात ऑफिस दाखवून त्यांना कर्ज देता, खासदार विशाल पाटील यांना कर्ज का देण्यात आले? पूर्वी थकीत असताना २७० कोटी कर्ज कसे देता? हे सारे प्रकार चौकशीत उघड होणार असल्यामुळे पळवाट शोधायला ते न्यायालयात गेले आहेत. जयंत पाटील यांचा पावडर लावलेला चेहरा उघडा पडणार आहे. रामाच्या मंदिरात हा रावण राहतो, हे लोकांच्या लक्षात येईल, अशी टीका पडळकर यांनी केली.

भाजपची शिवसेनाला 3 ते 4 जागा देण्याची तयारी - शिवसेनेचा 7 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लागलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याचं चित्र समोर येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीत 7 जागांवर आपला ठाम दावा केला आहे. शिवसेनेने भाजपसमोर आधीच्या 5 आणि नव्याने ताकद वाढलेल्या 2 अशा एकूण 7 जागांचा अधिकृत प्रस्ताव ठेवला होता अशी माहिती समोर येत आहे. 

मात्र, भाजप कडून शिवसेनेच्या या प्रस्तावाला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. भाजपने शिवसेनाला केवळ 3 ते 4 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता शिवसेनेने 7 जागांवर ठाम राहण्याचा निर्णय घेत भाजपची कोंडी केली आहे.

या सर्व राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. सरनाईक म्हणाले, "विधानपरिषदेसाठी कोणाला उमेदवारी द्यायची, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. यापूर्वी धुळे, कोकण या भागांत आमचे 5 आमदार होते. आता पक्षाची ताकद वाढलेली असल्यामुळेच आम्ही 7 जागांची मागणी केली आहे. यावर महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून अंतिम निर्णय घेतील."

एकनाथ शिंदे खवळले ; संजय शिरसाट यांना 'फोन' करून कडक भाषेत दिली समज ;

वेध माझा ऑनलाइन।
गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं चित्र आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. शिरसाट यांच्या या विधानामुळे महायुतीत खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संजय शिरसाट यांना थेट फोन करून कडक शब्दांत समज दिली असून, महायुतीत फूट पडेल असे कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटामध्ये अंतर्गत कलह असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना डावलून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे पक्षाची सूत्रे जात असल्याच्या चर्चांना एका व्हायरल पत्रामुळे उधाण आले होते. त्यातच सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले.
याच घडामोडींवर भाष्य करताना संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक दावा केला होता. "कोणाची काही चूक झाली या वादात्मक गोष्टी आहेत. अंतर्गत गोष्ट वेगळी, पक्षातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही लोकं आमच्या संपर्कात असून आमच्याशी बोलतात. कोणाच्या नेतृत्वात काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडला आहे हे नाकारता येत नाही, त्यांच्या पक्षात काय घडतंय हे काही दिवसांत कळेल," असे संजय शिरसाट यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.
संजय शिरसाट यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र आक्षेप घेतला. "संजय शिरसाट आमच्या पक्षावर कसे बोलू शकतात?" असा थेट सवाल त्यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे यांना विचारला. तसेच, "यापूर्वी समज दिल्यानंतरही शिरसाट पुन्हा राष्ट्रवादीवर भाष्य करत आहेत. यापुढे त्यांनी असे वक्तव्य केल्यास आम्ही त्यांची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करू," असा इशारा मुश्रीफ यांनी दिला होता. 

राजकारणातील कट्टर वैरी चहाच्या निमित्ताने आले एकत्र ; सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी आज दिसले एकत्र;

वेध माझा ऑनलाईन।
स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यातील राजकीय वैर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एकेकाळी मित्र असणारे हे दोन्ही नेते आता एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र, हे दोन्ही नेते आज चक्क एकमेकांना भेटून चहाचा आनंद घेताना पाहायला मिळाले.त्यामुळे त्यांच्या भेटीची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.
यापूर्वीही राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर न्यायालयात तारखांच्या निमित्ताने एकत्र आले होते. शेतकरी संघटनेच्या आंदोलनांच्या तारखेसाठी एकत्र आलेल्या या दोघा मित्रांनी त्यावेळी मात्र एकमेकांकडे पाहणे देखील टाळले होते.
यापूर्वीही राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर न्यायालयात तारखांच्या निमित्ताने एकत्र आले होते. शेतकरी संघटनेच्या आंदोलनांच्या तारखेसाठी एकत्र आलेल्या या दोघा मित्रांनी त्यावेळी मात्र एकमेकांकडे पाहणे देखील टाळले होते
 पण आज त्यांनी पु्न्हा एकत्र येत एका टेबलावर चहा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्यामुळे राजकारणातील हे कट्टर वैरी चहाच्या निमित्ताने तरी एकत्र आल्याने उपस्थितांमध्ये एकच कुतूहल निर्माण झाले. 
पण आज त्यांनी पु्न्हा एकत्र येत एका टेबलावर चहा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
2011 मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनातून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातून इंदापूर न्यायालयामध्ये या संदर्भातील खटला सुरू आहे, या खटल्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते तब्बल 14 वर्षांनंतर इंदापूरच्या न्यायालयात एकत्रित आले. त्यानंतर दोघांनीही एकत्रित न्यायालयामध्ये हजेरी लावली. 

गेल्या दोन वर्षात नव्याने सुरु केलेल्या नवीन ठिकाणच्या कराड अर्बन बँकेच्या शाखेतून बँकेने .४५० कोटींचा अतिरिक्त व्यवसाय मिळवला - ,चेअरमन समीर जोशी यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कराड (शेड्यूल्ड बँक) या अग्रगण्य बँकेच्या संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्रात वाढ करण्याच्या महत्त्वपूर्ण पोटनियम दुरुस्तीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार विभागाने मान्यता दिली आहे. सध्या बँकेचे कार्यक्षेत्र आठ जिल्ह्यात ७२ शाखाद्वारे पसरले असून आता संपूर्ण महाराष्ट्रात बँकेला शाखा विस्तार करून महाराष्ट्रातील अनेक शहरात ग्राहक सेवेच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे बँकेच्या व्यवसाय वाढीला मोठी चालना मिळणार असून, गेल्या दोन वर्षात नव्याने सुरु केलेल्या नवीन ठिकाणच्या शाखेतून बँकेने रु.४५० कोटींचा अतिरिक्त व्यवसाय मिळवला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष समीर जोशी यांनी दिली.

बँकेने डिजीटल चॅनेलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अत्यावश्यक अशा यू.पी.आय. सारख्या सेवा दिल्या असून बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी डिजीटल माध्यमांचा वापर पर्याप्त प्रमाणात करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाने निर्णय घेतले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना डिजीटल प्लॅटफॉर्मवरील सर्व सेवासुविधा एकत्र मिळणार आहेत, असे प्रतिपादन बँकेचे उपाध्यक्ष शशांक पालकर यांनी केले.

गेल्या शंभर वर्षांहून अधिक वाटचालीत कराड अर्बन बँकेने प्रगतीची परंपरा कायम राखत व्यवसायामध्ये गत संपलेल्या आर्थिक वर्षात रु.७५० कोटी वाढीचा विक्रम साध्य केला आहे. तसेच वसुलीच्या आघाडीवर देखील नक्त एन.पी.ए.चे प्रमाण सलग तीन वर्षे 'शून्य' टक्के राखण्यात यश मिळविले आहे. मार्च २०२६ अखेर बँकेने व्यवसायाचा रु.६५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शून्य टक्के एनपीए कायम राखणे, व्यवसाय वाढीत सातत्य ठेवणे व बँकेचा महाराष्ट्रभर विस्तार करून बँकेचा नावलौकिक वाढविणे, हेच मुख्य ध्येय ठेवून बँकेने चालू आर्थिक वर्षात आपली वाटचाल सुनिश्चित केली आहे, अशी माहिती बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम यांनी दिली.

युध्दाच्या पार्श्वभूमीमुळे पेट्रोल व डिझेल मध्ये झालेली वाढ आणि राष्ट्रीय हित लक्षात घेता, बँकेने विद्युत गाड्या घेणाऱ्या ग्राहकांसाठी तत्काळ कर्ज पुरवठ्यासाठी कमी व्याजदराची कर्ज योजना तयार केली आहे. याअंतर्गत दुचाकी वाहनांसाठी ७.७५ टक्के तर चार चाकी वाहनांसाठी ८.२५ टक्के व्याज दराने कर्जपुरवठा केला जाणार असून हा सवलतीचा व्याजदर फक्त बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांसाठी मिळणार आहे. नव्या कर्ज योजनेचा लाभ घेऊन ग्राहकांनी राष्ट्रीय हित जोपासण्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी केले.


Thursday, May 21, 2026

माजी आमदार बाळासाहेब पाटील विधान परिषदेवर जाणार ? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून चाचपणी ?

वेध माझा ऑनलाईन।
सांगली- सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे दरम्यान संख्याबळानुसार भाजप शिवसेना व अजितदादा गटाकडून एकीकडे याठिकाणी दावा केला जात असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बाळासाहेब पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे याअगोदर या भागात सांगलीचे मोहनराव कदम निवडून आले होते या जागेवर आता राष्ट्रवादी चा दावा होऊ शकतो
शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा याठिकाणी होत आहे असे वृत्त आहे