Tuesday, June 16, 2026

अविनाश मोहितेंच्या काळात त्यांनी अक्षरशः पाला-पाचोळ्यात देखील घोटाळा केला ; अतुल भोसलेंचा घणाघात ;


वेध माझा ऑनलाईन।
काल काले येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विरोधी पॅनेलवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. विरोधकांनी कारखान्याच्या विकासापेक्षा विविध घोटाळ्यांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळविल्याचा दावा करत त्यांनी पाला-पाचोळा घोटाळा, खाजगी साखर विक्री व्यवहार, तोडणी-वाहतूक घोटाळा, इमारतींवरील कर्जे, बोगस कामगार मानधन, वाहन खर्च, विश्रामगृह खर्च आणि इंधन वापरातील अनियमितता यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला. कारखान्याच्या हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ जपणाऱ्या नेतृत्वापासून सभासदांनी सावध राहावे, असे आवाहन करत डॉ अतुलबाबांनी निवडणुकीत विकास आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले...यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना केवळ ऊस उत्पादक न ठेवता महाराष्ट्रातील सर्वांत समृद्ध शेतकरी बनविण्याचे ध्येय समोर ठेवून कारखान्याच्या १७ पाणीपुरवठा योजनांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सोलर फिडरच्या माध्यमातून विजबिलमुक्ती, कमी पाणीपट्टी, ठिबक सिंचनाचा व्यापक वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकरी १५० ते २०० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काले (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन दयानंद पाटील, ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते, गीतांजली पाटील, उमेदवार नयन पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना पुढे सांगितले की..., 
२०१५ मध्ये सहकार पॅनेलकडे कारखान्याची सत्ता आली तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. कामगारांचे वेतन देण्यासाठीही निधी उपलब्ध नव्हता आणि तब्बल ५८ कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र पुढील ११ वर्षांच्या कालावधीत कारखान्याची आर्थिक घडी सावरण्यात यश आले. सभासदांना ७८ कोटी रुपयांची साखर मोफत देण्यात आली, तर थकबाकी शून्यावर आणण्यात यश मिळाले. विरोधकांकडे आजही विकासाचा कोणताही अजेंडा नसून, त्यांच्या मनगटीवर बसलेले १०० कोटींचे भूत उतरवण्यासाठीच त्यांना सत्ता हवी असल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला काही लोकांनी तडा दिल्याची टीका करत त्यांनी सभासदांना विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.

कारखान्याच्या भविष्यातील योजनांचा ऊहापोह करताना त्यांनी वाकुर्डे योजनेवर ४५ मेगावॅट क्षमतेचा सोलर फिडर उभारण्याचा मानस व्यक्त केला. या माध्यमातून वीजनिर्मिती, तसेच ऊर्जास्वावलंबन साध्य करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पावसाळी अधिवेशनात यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी, कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेताना, कारखाना चालविण्यासाठी अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकरी सभासदांना “एकदा झालेली चूक पुन्हा करू नका,” असे आवाहन केले. 

ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते यांनी, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने स्थैर्य आणि प्रगती साधल्याचा दावा केला. संस्थापक पॅनेल आणि कारखान्याच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनातील दृष्टिकोनात मोठा फरक असल्याचे सांगत त्यांनी सहकार पॅनेलला मिळालेल्या रयत संघटनेच्या पाठिंब्याचे स्वागत केले. 

कार्यक्रमाचे आभार अशोक माळी यांनी मानले. सभेस सुनीता शेवाळे, गोविंद गावडे, ॲड आत्माराम पाटील, प्रमोद पाटील, वैभव थोरात, बाळासाहेब गलांडे, शंकरराव थोरात, मारुती पाटील, प्रकाश पाटील, सुनील यादव आदींसह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




कराडला सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशीर्वचन सोहळा उत्साहात

वेध माझा ऑनलाईन।
रुद्राक्ष धारण करणे म्हणजे एक कोटी गायी दान केल्याचे पुण्य प्राप्त होणे होय. इष्टलिंग हे केवळ दागिना नसून शिवतत्त्वाशी जोडणारा जिवंत दुवा आहे. श्रद्धेने इष्टलिंगाची पूजा केल्यास तेहतीस कोटी देवतांच्या पूजेइतके पुण्य लाभते असे प्रतिपादन केदार पिठाचे जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी केले.

कराड येथील कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर केदार जगद्गुरु भिमाशंकरलिंग महास्वामी यांच्या उपस्थितीत सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशिर्वचन सोहळा उत्साहात झाला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवलिंग शिवाचार्य, डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य म्हैसाळकर, महादेव शिवाचार्य वाईकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कराडच्या भूमीत धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्कारांचीही समृद्ध परंपरा जपली जात आहे. या परंपरेचेच दर्शन घडविणारा वीरशैव लिंगायत समाजाचा सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशीर्वचन सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विशेषतः नव्या पिढीला आपल्या धर्मातील तत्त्वज्ञान, संस्कार आणि आचार-विचारांची ओळख करून देणारा हा सोहळा ठरला.

भस्माचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, शरीरावरील विविध ठिकाणी लावले जाणारे भस्म हे केवळ धार्मिक प्रतीक नसून मानवी शरीर हेच एक ब्रह्मांड असल्याची जाणीव करून देणारे तत्त्वज्ञान आहे. एका बाजूला कुबेराची संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला भस्म ठेवले तरी भस्माचे महात्म्य श्रेष्ठ आहे असा उल्लेख धर्मग्रंथांत आढळतो, असेही त्यांनी नमूद केले.

 डॉ. शिवयोगी शिवाचार्य स्वामी (म्हैसाळ) म्हणाले की, संपत्ती, नाव, कीर्ती आणि मान-सन्मान माणूस आयुष्यात मिळवू शकतो; मात्र जीवनाचा शेवटचा प्रवास करताना त्याच्यासोबत केवळ त्याचे संस्कार आणि शिवभक्तीच जाते. ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे तो जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.

वीरशैव लिंगायत धर्मातील इष्टलिंग पूजा ही केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धी, समता, श्रमप्रतिष्ठा आणि शिवभक्ती यांचे प्रतीक मानली जाते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने धर्माबद्दल आत्मीयता बाळगून त्यामागील तत्त्वज्ञान समजून घेतले पाहिजे, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

विनायक विभुते,अनिल खुंटाळे यांच्या हस्ते महास्वामी यांचा सत्कार करण्यात आला.राजू शेटे, शिवानंद डुबल, भरत शेटे,चंद्रशेखर नखाते, विजय पट्टणशेट्टी या ५ दांपत्यांचे हस्ते इष्टलिंग महापूजेला सुरुवात करण्यात आली.नंदकुमार बटाणे,संजय शेटे, सुनील महाजन, धनंजय विभूते,सुनील चिंगळे, विजय भागवत, राजू खलीपे, गुरुनाथ कचरे,अशोक संसुद्दी, दिलीप चिंचकर,राजन धोकटे,गणेश शेटे यांनी उपस्थित शिवाचार्यांचे व मान्यवरांचे स्वागत केले.प्रा.प्रमोद सुकरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.


Monday, June 15, 2026

खासदारांच्या फुटीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...जे जातील त्यांना पश्चाताप होईल - ...

वेध माझा ऑनलाईन
पक्षातील खासदारांच्या संभाव्य फुटीवर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार बंड करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हे खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता याच पक्षफुटीबाबत दिल्लीमध्ये मोठ्या हलाचाली वाढल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या या पहिल्या प्रतिक्रियेचे अनेक अर्थ काढले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी खासदरांच्या फुटीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना जायचं आहे, त्यांनी खुशाल जावं, त्यांच भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही. पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जो सोडून जाईल, त्यांना एक दिवस नक्की पश्चात्ताप होईल, असे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी सहन करायला शिकावे, असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळेदेखील ठाकरे यांच्या पक्षातील फुटीबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण ;

वेध माझा ऑनलाईन 
कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना आंदोलनादरम्यान काही अज्ञातांकडून मारहाण झाल्याची व त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे, जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडली आहे. आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने अचानक अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला केला. त्या तरुणाने अभिजीत यांना एकामागून एक कानशि‍लात लगावल्या. या घटनेनंतर अभिजीत यांच्या समर्थकांनी तात्काळ संबंधित तरुणाला पकडले आणि त्याला मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांचे काही खासदार नवा गटा स्थापन करण्याच्या तयारीत !;

वेध माझा ऑनलाईन।
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. कालच ठाकरे यांच्या खासदारांची ठाकरे यांच्या खासदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर आमचे सर्वच खासदार आमच्यासोबत आहेत. ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. ऑपरेशन टायगर काहीही नाही. आता आम्हीच ऑपरेशन लांडगा सुरू करणार आहोत, असे राऊत म्हणाले होते. परंतु आता ठाकरे यांचे काही खासदार थेट नवा गटा स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, असे म्हटले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंचे काही खासदार हे लोकसभा अध्यक्षांना एक पत्र देण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचे काही खासदार हे दिल्लीमध्ये शिंदे यांच्या पक्षाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना भेटले आहेत. त्यामुळे लवकरच हे खासदार नवा गट स्थापन करू शकतात, 

शंभुराज देसाई यांचा भाजपला इशारा; म्हणाले, आम्हाला वेगळा विचार करावा लागेल ; देसाईंनी समन्वय बैठकीला भाजपमंत्र्यांनी प्रतिसाद न दिल्याची खदखद ;

वेध माझा ऑनलाईन।
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत, विशेषतः भाजप आणि शिंदे गटात, बिनसल्याचं दिसत आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. "आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल," असे म्हणत देसाईंनी समन्वय बैठकीला भाजपमंत्र्यांनी प्रतिसाद न दिल्याची खदखद व्यक्त केली.

सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीवरून मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असं सांगतानाच नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी तुम्ही प्रतिसाद दिला का? आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे, असा कडक इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला आहे.
राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभुराज देसाई हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपला सज्जड इशारा दिला आहे. सांगली- सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप त्यांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींना एकत्र पर्यटनासाठी नेणार आहे. मी त्याची माहिती घेतली नाही. आमची कोअर कमिटीची बैठक काल झाली. त्याप्रमाणे उद्या आमच्या सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत जे होईल ते वरिष्ठांना सांगितलं जाईल आणि त्यानंतर मुंबईत याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असं शंभुराज देसाई म्हणाले.
कराडमध्ये झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला शंभूराजे देसाई उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता, पालकमंत्री म्हणून मी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. पालकमंत्री समन्वय करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही येत नाही आणि समन्वय बैठकीच्या वेळीच तुम्ही जाहीर करता भाजप स्वबळावर लढेल. तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर आम्हाला ही विचार करावा लागणार आहे, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला. देसाई यांनी मनातील खदखद व्यक्त करत आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे, असा सूचक इशाराही दिला आहे.

दरम्यान, 13 तारखेला कराडमध्ये सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीकडे शिंदे गट आणि राष्ट्रवादीने पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कराडमध्ये भारतीय जनता पार्टीने बोलावलेल्या बैठकीला उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल बाबा भोसले आणि चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. या महायुतीच्या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील उपस्थित नव्हते. तर राष्ट्रवादीनेही बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीत अलबेल नसल्याचं समोर आलं आहे.


Sunday, June 14, 2026

सातारा- सांगली विधानपरिषद निवडणूक अपडेट ; भाजप नगरसेवकाना "गोवा ट्रिप' ? ; आजच झाले रवाना; !!

वेध माझा ऑनलाईन।
विधान परिषद निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागल्याने सातारा- सांगली मतदार संघात आपल्या   विजयासाठी भाजपने मतांची जमवाजमव करण्यास जोरदार सुरुवात करत त्या प्रयत्नात प्राथमिक यश देखील मिळवलं असलयाचे दिसते आहे
त्याची सुरुवात म्हणून  सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आपल्या मतदारांना गोव्याला एका रिसोर्टमध्ये आजच पाठवलं गेलं आहे? अशी माहिती मिळते आहे
त्यांना आता थेट निवडणुकीदिवशी मतदान केंद्रावर हजर करण्यात येणार आहे असेही समजते 
यापुढेदेखील इतर आणखी काही संबंधित मतदार नगरसेवक पुढील दिवसात काही गोव्यालाच रवाना केले जाणार आहेत असेही समजते