Friday, September 11, 2026

अखेर बीपीसीएल पाइपलाइनच्या कामाला मिळणार गती !! वॉर्ड १३ व १४ मध्ये मोजणी पूर्ण; पाइपलाइनचे काम मार्गी लागल्यानंतर रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना मिळणार चालना !नगरपालिका प्रशासन व बीपीसीएल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
बीपीसीएलच्या गॅस पाइपलाइनचे काम अनेक दिवसांपासून रखडले होते मात्र याच पार्श्वभूमीवर प्रभाग  क्रमांक १३ व १४ मध्ये बीपीसीएल पाइपलाइन जाणाऱ्या मार्गाची नुकतीच मोजणी करण्यात आली असून, पाइपलाइनचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासन व बीपीसीएल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली.
मलकापूर हद्दीपासून बैल बाजार रोडमार्गे शंभूतीर्थ चौकापर्यंत जाणारी प्रमुख पाइपलाइन तसेच कोल्हापूर नाका येथील ‘आय लव्ह कराड’ परिसरातून सुरू होणारी पाइपलाइन—पोपटभाई पंप, पटेल पेट्रोल पंपमार्गे शंभूतीर्थ चौक आणि पुढे ईदगाह मार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियमपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी व मोजणी करण्यात आली आहे.
तसेच बीपीसीएलला आवश्यक वर्क ऑर्डर देण्याबाबत नगरपालिका प्रशासन व संबंधित बीपीसीएल अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली असून, त्यामुळे पाइपलाइनचे रखडलेले काम लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.

एचडीडी की ओपन कट? 
वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा
पाइपलाइनचे काम करताना एचडीडी तंत्रज्ञानाचा वापर करायचा की ओपन कट पद्धतीने काम करायचे, यासह कामासाठी लागणारा कालावधी, वापरण्यात येणारे साहित्य आणि कामाची कार्यपद्धती याबाबतही चर्चा करण्यात आली. कामाच्या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये तसेच नागरिकांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल, याची दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली.
पाइपलाइनचे काम वेळेत आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करून त्यानंतर रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत, यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला.
बैल बाजार रोडला मिळणार दिलासा
बीपीसीएल पाइपलाइनच्या कामामुळे विशेषतः बैल बाजार रोडचे रस्त्याचे काम रखडलेले आहे. पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या अवस्थेमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

यावेळी नगरसेवक शिवाजी पवार,आशुतोष डुबल , सचिन वास्के, रोहन विभुते तसेच नगरपालिकेचे अधिकारी व बीपीसीएलचे अधिकारी उपस्थित होते

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील गणपती विसर्जन मार्ग आणि प्रीतीसंगम घाट परिसरात प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षिततेचा आढावा ; यूवा नेते ओंकार मुळे यांची संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी ;

 वेध माझा ऑनलाईन।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील गणपती विसर्जन मार्ग आणि प्रीतीसंगम घाट परिसरात भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. युवा नेते ओमकार मुळे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करून विसर्जन मार्गावरील प्रकाशव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अमोल पवार , अब्राम मुजावर यांची उपस्थिती होती

या पाहणीस लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे मार्गदर्शन लाभले. गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रीतीसंगम घाट परिसरात हजारो भाविकांची गर्दी होते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन मार्गावर कुठेही अंधाराचे ठिकाण राहू नये, तसेच आवश्यक त्या सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्ष यादव यांनी दिल्या.

बंद पथदिव्यांचा मुद्दा महत्वाचा
नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार ओमकार मुळे यांनी विसर्जन मार्ग, प्रीतीसंगम घाट तसेच भाविकांच्या ये-जा करण्याच्या मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी काही ठिकाणी बंद असलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करण्याची आवश्यकता निदर्शनास आणून देण्यात आली.
गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार अतिरिक्त लाईटची व्यवस्था करणे, घाट परिसरात पुरेसा प्रकाश उपलब्ध राहील याची दक्षता घेणे, तसेच संपूर्ण विसर्जन मार्गावर प्रकाशव्यवस्था अखंडित ठेवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
दरम्यान गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रीतीसंगम घाटाकडे मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक येतात. विशेषतः रात्रीच्या वेळी गर्दी वाढत असल्याने प्रकाशव्यवस्था हा केवळ सुविधेचा विषय नसून भाविकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित प्रश्न आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेश मंडळांचे कार्यकर्ते, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच हजारो भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे मार्गावरील अंधाराचे ठिकाण, बंद पथदिवे किंवा अपुरी प्रकाशव्यवस्था यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

गणेशोत्सव उत्साहात, विसर्जन सुरक्षित वातावरणात व्हावे”
“गणेशोत्सव हा कराडकरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा सण आहे. विसर्जनाच्या वेळी भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. विशेषतः प्रकाशव्यवस्था सुरळीत ठेवून अंधाराची ठिकाणे दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल,” अशी भूमिका पाहणीदरम्यान मांडण्यात आली.दरम्यान, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विसर्जन मार्ग तसेच प्रीतीसंगम परिसरातील आवश्यक दुरुस्तीची कामे आणि प्रकाशव्यवस्थेची उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Wednesday, September 9, 2026

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले... डीजेमुळे 40 टक्के ऐकू कमी येतय ; जळगावातील एका कार्यक्रमात संवाद साधताना सांगितली आपबिती ;

वेध माझा ऑनलाइन।
राज्यभरात डीजेवर बंदी घालण्याची जोरदार मागणी होत आहे. अनेक जिल्ह्यांनी डीजे बंदी केली आहे. मात्र, पुण्यासारख्या शहरात डीजे बंदीचा घोळ अद्याप कायम आहे. या डीजेमुळे कुणा कुणाला काय काय अनुभव आलाय याचे किस्सेही समोर येत आहेत. राज्याच्या मंत्री मेघना बोर्डिकर यांनी त्यांच्या सख्ख्या चुलत भावाचा डीजेमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं. तर सरकारमधील दुसरे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही डीजेमुळे त्यांना 40 टक्के ऐकू कमी येत असल्याचं सांगितलंय. गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात संवाद साधताना आपबिती सांगितली आहे.

माझ्या पुतण्याचं लग्न होतं. डीजे लावण्यात आलेला होता. मला लोकांनी सांगितलं तुम्ही नाचा आणि मला नाचण्यासाठी ओढलं. त्यामुळे पुतण्याच्या लग्नात नाचलो. पण सप दिशी डीजेचा आवाज माझ्या कानावर आदळला. या डीजेच्या आवाजामुळे मला एका कानाने चाळीस टक्के ऐकू येणे बंद झाले. काहींनी मला कानाला मशीन लावायला सांगितलं. पण बहिरं वाटतं म्हणून मी मशाीन लावली नाही. त्यामुळे येत्या गणेशोत्सात तरुणांनी डीजे नाही लावला तर चांगलं होईल, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. पाटील यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कराडमध्ये कोल्ड मिक्सचा वापर करून खड्यांची दुरुस्ती ; ;

वेध माझा ऑनलाईन।
गणेशोत्सवाच्या पार्मूमीवर येथील नगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरूस्ती सुरू केलीआहे. पावसाळ्यामुळे डांबराऐवजी कोल्डमिक्स डांबराने खड्डे बुजवण्यात येत आहेत. मंगळवारी सायंकाळीपाटण कॉलनीनजीक याचा शुभारंभनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्याहस्ते झाला.

राजेंद्रसिंह यादव म्हणालेकी नगरपालिकेने प्रथमच खडेबुजवण्यासाठी कोल्ड मिक्सडांबराचाकेलाआहे. पावसाळ्यामुळे नेहमीच्यापद्धतीने खड्े बुजवण्यात अडचणीयेतात, कोल्ड मिक्स डांबरानेपावसाक्यातही व भर पावसात खड्डे बुजवता येतात. त्यामुळे शहरातील संपूर्ण मिरवणूक मार्ग कोल्डमिक्स डॉंबराने खड़डेमुक्त करण्यातयेणार आहे. टप्याटप्याने संपूर्णशहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यातयेणार आहेत.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष प्रतापरावसाकुंखे, लोकशाही आघाडीचेअध्यक्ष जयंतकाका पाटील, माजीनगराध्यक्ष जयवंतराव पाटील,सभापती अल्ताफ शिकलगार,अख्तर आंबेकरी, रूपाली माने,अरूणा पाटील, आशा मुळे,विजयसिंह यादव, फारूकपटवेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुखजयवंतराव शेलार, मुख्याधिकारीप्रशांत व्हटकर, अभियंता चव्हाणयांच्यासह पालिकेचे अधिकारी वकर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, September 8, 2026

अभिजीत दिपकेंना मोठा धक्का, भाजप नेत्यानं कोर्टात खेचलं; सीजेपीपुढं नवं संकट

वेध माझा ऑनलाईन।
सोशल मीडियावरील वाद आता थेट न्यायालयात पोहोचला आहे. सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्यासह प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याविरोधात गौरव भाटिया यांनी 2 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

 सीजेपी अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही या खटल्यामध्ये प्रतिवादी करण्यात आलं आहे. दरम्यान, मानहानीचा हा दावा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. आज 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी दोन कोटींच्या मानहानीचा दावा ठोकल्याचं सांगितलं आहे.
त्यांनी लिहिलं की, “जेव्हा मर्यादा ओलांडून तुम्ही आरोप करता, तेव्हा कायदा त्यासाठी कामी येतो. 2 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला उद्या दिल्ली उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी घेतला केला जाणार आहे. ना सोशल मीडियावरची कुरघोडी आणि ना कुठले शाब्दिक युद्ध. फक्त तथ्य, पुरावे आणि कायदा त्याचे काम करणार आहे. त्यामुळे आता सत्याची पडताळणी जिथे व्हायला हवी तिथेच होईल, म्हणजेच न्यायालयात.”
काय आहे  प्रकरण?
दरम्यान, गौरव भाटिया आणि सौरव दास यांच्यामधील सोशल मीडियावरील वाद पाच सप्टेंबरला सुरु झाला. यामध्ये AI-निर्मित बनावट ग्राफिकद्वारे भाटिया यांच्या नावावर स्वातंत्र्य भारद्वाज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. या ग्राफिकमध्ये भारद्वाज यांना ‘दिमागी नक्षल’ आणि ‘जातिवादी’ म्हटल्याचं भासवण्यात आल्याचा दावा भाटिया यांनी केला आहे. त्यानंतर त्यांनी माफी मागण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला होता.
दरम्यान, सौरव दासकडून पोस्ट हटवण्यात आली होती. यावेळी त्यांनी भाटियांना आव्हानही दिलं होतं. त्यांनी सांगितलेलं की, मला वाटलेलं की हे सगळं एआयने बनवलं असेल. पण तरीही मी भाजप नेत्यांना या गोष्टी पुन्हा बोलण्याचं आव्हान देतो. मला नाही वाटतं असं करण्यात त्यांना काही अडचण असेल.
दरम्यान, सौरव यांच्याकडून ही पोस्ट डिलिट केल्यानंतर गौरव भाटिया यांनी म्हटलं होतं की, “पोस्ट फक्त 83 मिनिटांमध्ये हटवली, माफी मागितली नाही. त्यामुले पुढील काळात गुन्हा दाखल करु शकतो. त्यांनी पुढे सांगितलं की, तुम्ही बदनामी करणार, प्रोपोगेंडा सेट करणार आणि मग पोस्ट डिलिट करुन पळून जाणार, हे सगलं एवढं सोप नाही.” त्यामुळे आता या सर्व प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
वेध माझा ऑनलाईन।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप केला. शिंदेंचे दोन मंत्री आणि दोन प्रवक्ते आपले आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. मुंबईकडे निघाल्यानंतर मराठ्यांवर हल्ला करून मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या माणसांचा पण हाच प्रयत्न आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. 

मुंबईत एकाही मराठा आंदोलकाचे रक्त निघाले तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद झालाच पाहिजे. पोलिसांनी हल्लाच केला तर पळू नका, चेंगराचेंगरी होते. येत्या १२ तारखेला राज्यभरातील मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

शिवसेना ठाकरे गटाचे १६ नगरसेवक गोत्यात?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर मुंबईत नवे आव्हान उभे राहिले आहे. दोन नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर आता ठाकरे गटाच्या आणखी १६ नगरसेवकांच्या विजयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी या नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. निवडणूक अर्जात जात प्रमाणपत्र, संपत्तीची माहिती, शिक्षण आणि गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित माहिती लपवल्याचे आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये मतमोजणीवेळी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत संगनमत केल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या १६ नगरसेवकांचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार. मुंबईतील या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींमुळे ठाकरे गटासमोरील अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

डॉ. अतुलबाबांच्या सूचनेनंतर शाहू चौक रस्त्याचे खड्डे बुजवले ;

वेध माझा ऑनलाइन।
शहरातील शाहू चौक ते जुना कोयना पूल रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व दुरुस्तीचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सूचना दिल्यानंतर सदर रस्त्याचे काम मिळालेल्या ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती सुरू केली आहे.

शाहू चौक ते जुना कोयना पूल हा शहरातील वर्दळीचा रस्ता असून या रस्त्यावर शासकीय विश्रामगृह आहे. त्यामुळे अनेक महनीय व्यक्तींची ये जा या रस्त्यावरून होत असते. शिवाय जुन्या कोयना पुलापासून शहरात येण्याचा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची वर्दळ जास्त असते. पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना होत होता. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत होती.
 या रस्ता नव्याने कारपेट करण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सुमारे 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र पावसाळ्यामुळे हे काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान शहरात बीपीसीएल कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होणार असल्याने शहरातील रस्त्यांची कामे नगरपालिकेने थांबवली  आहेत. मात्र या रस्त्यावर गॅस पाईपलाईन टाकणार नसल्याने पावसाळा थांबल्यानंतर तातडीने रस्ता कारपेट करण्याचे काम सुरू आहे होणार आहे. तुर्तास वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार डॉ. अतुलबाबांनी ठेकेदारास या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक काम सुरू झाले होते. मात्र पाऊस आल्याने हे काम थांबवण्यात आले होते. मंगळवारी पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने हे काम सुरू करण्यात आले.
 नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय वाटेगावकर , नगरसेवक शिवाजी पवार नगरसेवक आशुतोष डुबल यांनी कामाची पाहणी केली.