Tuesday, February 17, 2026

कराडला गुरुवारी साजरा होणार भव्य शिवजयंती सोहळा ; शहरात निघणार भव्य शोभायात्रा ; हजारो विद्यार्थी होणार सहभागी; सोहळ्यात विविध देखाव्यांच्या चित्ररथांचे आकर्षण ठरणार ;

वेध माझा ऑनलाइन/
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त कराड नगरपालिकेतर्फे गुरुवारी (दि. १९) शहरात भव्य आणि देखणी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण असून, विविध शाळांमधील सुमारे तीन हजार विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नगरपालिका व खाजगी मान्यताप्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, प्रशासन अधिकारी रमेश कांबळे, तसेच शिवजयंती शिवयात्रा समितीचे प्रमुख अर्जुन कोळी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष यादव म्हणाले, शासकीय शिवजयंतीनिमित्त सकाळी आठ वाजता शिवतीर्थ दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास नगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. यावेळी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर भव्य शोभायात्रेला प्रारंभ होईल.

शोभायात्रा दत्त चौकातील शिवस्मारक येथून सुरू होऊन एस.टी. बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय, कन्या प्रशाला, चावडी चौक, आझाद चौक मार्गे पुन्हा दत्त चौक येथे येऊन समारोप होईल. कार्यक्रमाची सुरुवात बँड पथकाच्या दिमाखदार सादरीकरणाने होणार असून, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, नगरपालिका अधिकारी व सर्व मुख्याध्यापक यांचा सहभाग असेल. त्यानंतर विविध शाळांकडून साकारण्यात येणारे आकर्षक चित्ररथ आणि पारंपरिक पथके शोभायात्रेची शोभा वाढवणार आहेत.
यावेळी शिवजन्म सोहळा, शिवरायांचे बालपण आणि स्वराज्याची प्रतिज्ञा यांसारखे प्रसंग जिवंत केले जाणार आहेत. मावळा पथक, लेझीम पथक, दांडपट्टा पथक आणि पाच घोड्यांची मिरवणूक या शोभायात्रेला ऐतिहासिक तेज देणार आहेत. नगरपालिका शाळा क्रमांक ७ कडून ‘कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग’ साकारला जाणार असून पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थी सहभागी होतील. शाळा क्रमांक १२ कडून ‘गड आला पण सिंह गेला’ हा हृदयस्पर्शी प्रसंग उभा केला जाणार आहे. शाळा क्रमांक ९ कडून अष्टप्रधान मंडळाचे दर्शन घडवले जाईल, तसेच धारकरी पथकाचे सादरीकरण होईल. एस.एम.एस. इंग्लिश मीडियम स्कूलकडून ‘स्वराज्याचे गुप्तहेर’ ही संकल्पना मांडली जाणार आहे. नूतन मराठी शाळेकडून महाराष्ट्रातील संत परंपरेचे दर्शन घडवले जाईल, तर आदर्श प्राथमिक शाळेकडून शिवराज्याभिषेक सोहळा साकारला जाईल. का. ना. पालकर शाळेकडून पावनखिंड प्रसंगाचे सादरीकरण करण्यात येणार असून, तलवार पथक विशेष आकर्षण ठरणार आहे.

Friday, February 13, 2026

मंत्री हसन मुश्रीफ यांचे महत्त्वपूर्ण विधान ; राजकीय वर्तुळात चर्चा ;

वेध माझा ऑनलाइन ।अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वपूर्ण विधान करत राजकीय वर्तुळात चर्चा रंगवली आहे.

बारामती येथे घडलेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत अपघाताबाबत शंका मांडल्या तसेच सविस्तर सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेच्या मनातील शंका दूर व्हाव्यात यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले होते. या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून तपास प्रक्रिया सुरू आहे.

रोहित पवारांना उद्देशून बोलताना मुश्रीफ म्हणाले की काकांच्या निधनामुळे त्यांना जसे दु:ख झाले आहे तसेच आम्हालाही वेदना झाल्या आहेत. अपघाताबाबत आम्हीही काही शंका मांडल्या आहेत; मात्र पक्षातील अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. रोहित पवार यांनी सध्या दिलेल्या माहितीसंदर्भात ते पाठपुरावा करत आहेत, हे समजू शकतो; पण पक्षाच्या अंतर्गत घडामोडींमध्ये सहभाग घेणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Monday, February 9, 2026

कराड उत्तरमध्ये आ.मनोजदादा घोरपडे यांचा करिष्मा ; भाजपची ताकद वाढली ;

वेध माझा ऑनलाइन।
आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या साथीने कराड उत्तरेतील नऊ जिल्हा परिषद गटांपैकी सहा गटांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे कराड तालुक्यातील पाचपैकी चार जिल्हा परिषद गट भाजपकडे आले असून ही कामगिरी ऐतिहासिक मानली जात आहे.दरम्यान या निवडणुकीत मानसिंगराव जगदाळे व देवराजदादा पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे 
यानिमित्ताने कराड उत्तरमध्ये आमदार मनोजदादा घोरपडे यांचा करिश्मा पहायला मिळाला आहे 

कराड उत्तरमध्ये भाजप विरोधी राष्ट्रवादी अशीच प्रामुख्याने लढत पहायला मिळाली. पण आ. मनोजदादा घोरपडे आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी भाजप उमेदवारांना निवडून आणत उत्तरेत भाजपाला राजकीय वैभव मिळवून दिले आहे.
कोपर्डे हवेली गटातून भाजपाचे नेते रामकृष्ण वेताळ यांच्या पत्नीला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडाचे निशान फडकावत या गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिवाय याच गणातील दोन्ही अपक्ष उमेदवारांना त्यांना सोबत घेतले होते. अटीतटीच्या लढतील त्यांच्या पत्नी विद्या रामकृष्ण वेताळ विजयी झाल्या. कोपर्डे हवेली गणात राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील गटाचे सिध्दार्थ चव्हाण विजयी झाले. तर वाघेरी गणात भाजपच्या अनिता वेताळ विजयी झाल्या आहेत. या गटात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. पण येथे अपक्ष उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली. राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर गेला आहे.
सैदापूर जि.प.गटात मोठी चूरस पहायला मिळाली. भाजपमधील अंतर्गत गटबाजीचा फटका भाजप उमेदवारांना बसणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र या गटात जि.प.व गणातील दोन्ही उमेदवार भाजपाचे निवडून आले. या गटात राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाने स्वतंत्र उमेदवार दिले होते. शिवाय दोन अपक्ष उमेदवार रिंगणात होते. मतविभागणीचा फायदा भाजप उमेदवारांना झाला. या जि.प. गटात भाजपाचे सागर शिवदास पुन्हा विजयी झाले. तर यावेळी पहिल्यांदाच सैदापूर गण व हजारमाची गणात भाजपाचे दोन्ही उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील गट व काँग्रेसच्या गटाची या ठिकाणी पिछेहाट झाली आहे.
मसूर गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण याला सुरूंग लावण्याचे काम भाजपने केले आहे. जि.प.चे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या ठिकाणी भाजपाचे लालासो जगदाळे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सोमनाथ चव्हाण व अपक्ष कुलदीप क्षीरसागर यांनी चांगली लढत दिली पण त्यांना पराभवाचा समाना करावा लागला. मसूर गट व त्या अंतर्गत मसूर गण व वडोली भिकेश्वर हे दोन्ही गण अशा तिन्ही जागेवर भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या पाल जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप यांच्या मध्ये झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार माधवराव उर्फ मदनभाऊ काळभोर विजयी झाले.  पाल गणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रताप चव्हाण तर चरेगांव गणात भाजपच्या धैर्यजा माने विजयी झाल्या आहेत. दरम्यान आतापर्यंत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला पाल जिल्हा परिषद गट भाजपच्या ताब्यात घेण्यात आमदार मनोजदादा घोरपडे यांना यश आले आहे.
पाल जिल्हा परिषदेचे उमेदवार मदनभाऊ काळभोर हे जवळपास  997 मतांनी विजय जाहीर होताच कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला. कराड उत्तर मतदार संघातील पाल गट हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माजी शिक्षण सभापती तथा पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, भाजपकडून माधवराव उर्फ मदनराव  काळभोर, शिवसेना शिंदे पक्षाकडून नयनेश निकम हे प्रमुख उमेदवार असले तरी खरी लढत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप यांच्यात झाली. कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पाल गटावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते.
उंब्रज जिल्हा परिषद गटात बहुरंगी लढत झाली असली तरी खरी लढत ही राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप यांच्या मध्ये अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत भाजपचे उमेदवार रणजित जाधव विजयी झाले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे  उमेदवार संग्रामसिंह जाधव यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. दरम्यान भाजपचे उमेदवार रणजित जाधव यांचे उंब्रज येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कराड उत्तर मतदार संघातील उंब्रज गट हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र गतवर्षी विधानसभा निवडणूकीत भाजपचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांनी  माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पराभव करून कराड उत्तर मतदार संघावर भाजपचे वर्चस्व प्रस्थापीत केले होते. याच अनुषंगाने कोणत्याही परिस्थितीत उंब्रज जिल्हा परिषद गट भाजपकडे आला पाहिजे यासाठी आ. मनोजदादा घोरपडे यांनी स्वत: लक्ष घातले होते.
उंब्रज जिल्हा परिषद गटासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार रणजित जाधव पहिल्या फेरी पासून कमीजास्त प्रमाणात आघाडीवर होते. दोन्ही उमेदवार यांच्या मतामधील कमी जास्त होणारी आघाडी ही दोघा उमेदवाराबरोबरच कार्यकर्ते यांची धाकधुक वाढवणारी होती. दरम्यान भाजपचे उमेदवार रणजीत जाधव विजयी झाल्याचे समजताच उंब्रज येथे कार्यकर्त्यानी फटाकांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. 

खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचे लग्न ठरलं ; मुख्यमंत्री फडणवीसांच्या मध्यस्थीने जुळली सोयरीक;

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचे लग्न ठरलं आहे. सारंग अरुण लखानी यांच्यासोबत रेवती सुळेंचं लग्न ठरलं आहे. सारंग लखानी हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळेंची मुलगी आता नागपूरची सून होणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने हि सोयरीक जुळली असल्याचं बोललं जात आहे.

सुशील कुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियात पोस्ट शेअर करत रेवती सुळे यांच्या लग्नाची गोड़ बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये स्मृती शिंदे यांनी सुप्रिया सुळे आणि सारंग लखाणी यांचा फोटो शेअर करत खाली कॅप्शन मध्ये लिहलं कि रेवती सुळे, सारंग लखानी आणि दोन्ही परिवाराचे अभिनंदन…. परंतु हे लग्न नेमकं कोणत्या दिवशी होणार आहे याबाबतची मात्र कोणतीही अपडेट अजून समोर आलेली नाही.

सातारा जिल्हा परिषद निवडणूक निकाल, जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असलेल्या सातारा जिल्हा परिषदेवर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सातारा जिल्ह्यातील मतदारांनी 67.80 टक्के मतदान केलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभारी निवडण्यासाठी जिल्ह्यातील 21 लाख 94 हजार 110 मतदारांपैकी 14 लाख 87 हजार 554 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.  
सातारा जिल्हा परिषदेसाठी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी लढत व्हायची. 2012 आणि 2017 ला राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवला होता. यावेळी भाजपनं ताकदीनं निवडणूक लढवली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन सातारा जिल्हा परिषद निवडणूक लढल्या. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं प्रचार साधेपणानं पार पडल्याचं पाहायला मिळालं. सातारा जिल्ह्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल त्रिशंकू लागला आहे. 

 सातारा जिल्हा परिषद गटनिहाय निवडणूक विजयी उमेदवार यादी
सातारा तालुका...पाटखळ:  शुभांगी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस ) लिंब: सर्जेराव सावंत (भाजप)  खेड:  कामेश कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)कोडोली(ओबीसी महिला): निता खरात (भाजप )कारी :  राजू भोसले (भाजप) शेंद्रे:  पूजा मोरे (भाजप) वर्णे:  राजेंद्र शेळके (स्वाभिमानी शेतकरी संघटना)राष्ट्रवादी पाठिंबानागठाणे:  अजित साळुंखे (भाजप) 

कराड तालुका... पाल:माधवराव काळभोर (भाजप)    उंब्रज:रणजीत जाधव (भाजप)   मसूर:लालासो जगदाळे (भाजप)   कोपर्डे हवेली: विद्या रामकृष्ण वेताळ (अपक्ष)  सैदापूर : सागर शिवदास (भाजप)  तांबवे: धनंजय ताटे (भाजप)   विंग(ओबीसी महिला) :शैलजा शिंदे (भाजप)  कार्वे: विजया थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस)  रेठरे बुद्रुक: प्रियांका साळुंखे (भाजप)  काले (ओबीसी महिला) : मनीषा पाटील (भाजप)येळगाव : उदयसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस )वारुंजी : सुनंदा पाटील (काँग्रेस)

पाटण तालुका... गोकुळ तर्फ हेळवाक:अशोक पाटील ( शिवसेना)     तारळे: स्वप्ना अभिजीत पाटील (शिवसेना)म्हावशी:राजेश पवार (भाजप)  मल्हार पेठ(ओबीसी महिला) :विजया कुंभार (शिवसेना)  मारुल हवेली (ओबीसी महिला): योगिता गिरी (शिवसेना)मंद्रुळकोळे:  मृणाल पाटील (शिवसेना) काळगाव: सुनीता चाळके (शिवसेना ) 

कोरेगांव तालुका.. पिंपोडे बुद्रुक :अमित चव्हाण (भाजप)     वाठार स्टेशन(ओबीसी महिला) :जयश्री भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)  सातारा रोड : सारिका फाळके (शिवसेना)  कुमठे : हणमंत जगदाळे (शिवसेना)  एकंबे :राजश्री भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)   वाठार किरोली :संध्या रजनी भोसले पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)  

जावळी तालुका... म्हसवे:  वसंतराव मानकुमरे (भाजप)   कुडाळ (ओबीसी महिला):  जयश्री गिरी (भाजप) कुसुंबी: कविता ओंबळे (शिवसेना)   वाई तालुका यशवंतनगर : दिनकर शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)     बावधन :   ऋतुजा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)ओझर्डे :  वृषाली चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)भुईंज:  दिलीप बाबर (भाजप)

खंडाळा तालुका... शिरवळ :  उदय कबुले (राष्ट्रवादी काँग्रेस)  भादे :  संतोष साळुंखे (राष्ट्रवादी काँग्रेस ) खेड बुद्रुक :  ऋषिकेश धायगुडे (भाजप)

फलटण तालुका... तरडगाव :गिरीश बनकर (शिवसेना)  साखरवाडी पिंपळवाडी : रुपाली सरगर (शिवसेना)  विडणी :  ज्योती गौतम मोरे (शिवसेना)गुणवरे :ऋतुजा अभिजीत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)    बरड :वैशाली संदीप कांबळे (शिवसेना)   कोळकी : सह्यादी कदम (शिवसेना)   वाठार निंबाळकर : विष्णू किसन लोखंडे (भाजप)   हिंगणगाव :किरण निलेश नलवडे (भाजप) 

खटाव तालुका बुध... लता कर्णे (राष्ट्रवादी काँग्रेस)   कातर खटाव: धनंजय जाधव (भाजप)   खटाव: डॉ. प्रिया शिंदे  (भाजप)  निमसोड: संदीप मांडवे (राष्ट्रवादी काँग्रेस)   औंध(ओबीसी महिला) :  मनिषा फडतरे (राष्ट्रवादी काँग्रेस)पुसेसावळी: तेजस्विनी कदम (भाजप)   मायणी:  सुरज पाटील (भाजप)

माण आंधळी... सोनल गोरे (भाजप)  बिदाल :अलका जगदाळे (भाजप)   मार्डी:सोनाली पोळ (राष्ट्रवादी काँग्रेस)   गोंदवले बुद्रुक :शीतल रणपिसे (राष्ट्रवादी काँग्रेस)  कुकुडवाड : अनिल देसाई (राष्ट्रवादी काँग्रेस)  

महाबळेश्वर 
तळदेव जिल्हा परिषद गट  : 
अजित सपकाळ (शिवसेना)भिलार जिल्हा परिषद गट : संजय केळगणे  (राष्ट्रवादी काँग्रेस)

महाबळेश्वर तालुका... पंचायत समिती गण तळदेव पंचायत समिती गण :
 संजय शेलार (शिवसेना)वाडा कुंभरोशी पंचायत समिती गण : संजय मोरे (शिवसेना)

भिलार जिल्हा... परिषद गट : 
संजय केळगणे  राष्ट्रवादी काँग्रेसमेटगुताड पंचायत समिती गण : शकुंचला चोरमले राष्ट्रवादी काँग्रेस

सातारा तालुका... पंचायत समिती निकाल : 
पाटखळ पंचायत समिती गण : 
राहुल शिंदे (भाजप)शिवथर पंचायत समिती गण : राजेश पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

लिंब गट जिल्हा परिषद गट : 
सर्जेराव सावंत (भाजप)लिंब पंचायत समिती गण : प्रभाकर पवार  (भाजप)कोंडवे पंचायत समिती गण : महेश गाडे (भाजप)

खेड जिल्हा परिषद गट : 
कामेश कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस)खेड  पंचायत समिती गण : कोमल अजित गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस)क्षेत्र माहुली पंचायत समिती गण : राणी अजय पवार (राष्ट्रवादी काँग्रेस

कोडोली पंचायत समिती गण : 
राहुल कापले (राष्ट्रवादी काँग्रेस)संभाजीनगर पंचायत समिती गण : विजया साळुंखे ( भाजप) परळी पंचायत समिती गण : वसंतराव भंडारे (भाजप)


काले गटात दयानंद पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील विजयी ;

वेध माझा ऑनलाइन।
 संपूर्ण भागाचे लक्ष्य लागलेल्या काले गटात दयानंद पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी पावणे यांचा दणदणीत पराभव केला. 
मनीषा पाटील यांच्या पराभवासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकत्रित आले होते. 
दरम्यान मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेत  मनिषा पाटील यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी थेट जिल्हा परिषदेत धडक मारली आहे.

ऍड उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा तब्बल 4338 इतक्या मतांनी विजय ;

वेध माझा ऑनलाईन।
येळगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि स्व. विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र उदयसिंह उंडाळकर यांनी तब्बल 4338 इतक्या मतांनी विजय मिळवत आपला बालेकिल्ला कायम राखला. याठिकाणी सख्खे चुलत बंधू अॅड. आनंदराव ऊर्फ राजाभाऊ उंडाळकर यांचा पराभव केला. खरं तर अपक्ष निवडणूक लढलेल्या राजाभाऊ उंडाळकर यांच्यामागे भाजपने ताकद उभी केल्याने निवडणुकीत मोठी रंगत आणली होती. राजाभाऊंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपने उदयसिंह उंडाळकर यांच्यावर नेम तर साधला होताच. मात्र उदयसिंह उंडाळकर यांच्या अचूक नियोजनामुळे भाजपचा डाव फसला.

खरं तर सातारा जिल्ह्यातील लक्षवेधी लढतीपैकी एक लढत म्हणून कराड तालुक्यातील येळगाव जिल्हा परिषद गटाकडे पाहिले जाते . मागील वेळी प्रमाणे यावेळीही उंडाळकर बंधूंमध्ये निवडणूक लागल्याने संपूर्ण परिसरात मागील महिन्यापासूनच निवडणुकीचे जोरदार वार होते. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या राजाभाऊंना आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या भाजपने पाठींबा दिल्याने निवडणूक रंगतदार अवस्थेत होती. आजच्या मतमोजणीत सुद्धा पहिल्या फेरीपासून उदयसिंह उंडाळकर आणि राजाभाऊ उंडाळकर यांच्या अगदीच कमी मतांचा फरक होता. मात्र अखेर उदयदादांनी विजय खेचुन आणला