Monday, June 22, 2026

कृष्णा नदीच्या पाण्यात काय मिसळले आहे? पाण्याचा रंग हिरवा झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण! साथीचे रोग पसरणार नाही...यासाठी शासनाने उपाययोजना करणे महत्वाचे ; अन्यथा जनआंदोलन उभे राहणार ; खात्रीलायक वृत्त:

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीचे पाणी दूषित झाले आहे. पाण्यात केमिकल युक्त सांडपाणी सोडल्याने पाण्याचा कलर हिरवा गार झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका गंभीर बनत चाललेला आहे.सध्या हे पाणी वापरासाठी नदीकाठच्या गावांना पुरवले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत अद्याप कोणतेही गांभीर्य पूर्वक पाऊस शासनाने उचलून याबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याने हा प्रश्न भविष्यात गंभीर झाल्यास याची जबाबदारी प्रशासन घेणार का? हाच प्रश्न आहे...

उंब्रज शिवडे हनुमानवाडी वडोली भिकेश्वर या गावांमध्ये या पाण्याचा पुरवठा केला जात आहे त्यामुळे आता प्रशासनाने हे पाणी फिल्टर करून नागरिकांना पुरवठा करणेचे आदेश ग्रामपंचायतना देणे गरजेचे आहे.
मात्र या पाण्यात काय मिश्रण झाले आहे याचा खुलासा संबंधित पोल्युशन खात्याने करण्यासाठी पुढे आले पाहिजे अद्याप त्यांनी याबाबत कोणताही खात्रीलायक खुलासा सादर केलेला नाही त्यामुळे साथीचे रोग तसेच पाण्यातील जलचर प्राण्यांच्या जीवाशी खेळ करणारे हे नदीच्या पाण्यात मिसळलेले मिश्रण काय आहे? हे पुराव्यासाहित कळणार कधी? व कसे? हेही समजणे महत्वाचे आहे आणि हे पाण्यात मिसळलेले जे काही मिश्रण असेल ते मिश्रण व त्यासाठी जबाबदार कोणती संस्था आहे? याची माहिती देखील कळणेही तितकेच महत्वाचे आहे 
दरम्यान यापुढे  हे मिश्रण पाण्यात मिसळू नये म्हणून संबंधित प्रशासनाने काही उपाययोजना केल्या नाहीत तर कृष्णाकाठच्या जनतेकडून या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्यात येणार आहे असेही खात्रीलायक समजते

म.वि. आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची तब्बल १०० मते फोडली? :

वेध माझा ऑनलाईन
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला. त्यांना ५९३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी २९२ मते मिळवली त्यांनी महायुतीची सुमारे १०० मतं फोडून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. 
दरम्यान सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजप ३२५, राष्ट्रवादी (अ. प.) २०५, शिवसेना (शिंदे गट) ११६, राष्ट्रवादी (श. प.) १२०, काँग्रेस ७४, शिवसेना उबाठा १, स्थानिक आघाड्या आणि अपक्ष ५४, असं पक्ष निहाय संख्याबळ होतं. महायुतीच्या मतांचा आकडा ६४६ होता, तर महाविकास आघाडीकडे १९५ मते होती. स्थानिक आघाड्या आणि अपक्षांपैकी बहुतांश मते ही महायुतीच्या गोटातील होती. तरी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची तब्बल १०० मते फोडल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे.

कृष्णा’मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ‘दुहेरी कक्ष लीडलेस पेसमेकर’ प्रत्यारोपण यशस्वी : सुमारे १७ लाखांची अत्याधुनिक शस्त्रक्रिया ई.सी.एच.एस. योजनेतून पूर्णपणे मोफत

वेध माझा ऑनलाईन।
पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अत्याधुनिक दुहेरी कक्ष (ड्युएल चेंबर) लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे, साधारणपणे १७ लाख रुपयांपर्यंत खर्चाची ही शस्त्रक्रिया संबंधित रुग्णावर माजी सैनिक अंशदान आरोग्य योजना (ई.सी.एच.एस.) अंतर्गत कृष्णा हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत करण्यात आली.

कराड येथील ७१ वर्षीय माजी सैनिक रुग्णाला संपूर्ण हृदय अवरोध म्हणजेच कम्पलीट हार्ट ब्लॉक असल्याने पूर्वीच कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्यात आला होता. पण कालांतराने पेसमेकर बसविण्यात आलेल्या छातीच्या दोन्ही बाजूंना वारंवार संसर्ग होऊ लागल्याने त्याच्यावर उपचाराचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या संसर्गामुळे रुग्णावर दोनदा पेसमेकरशी संबंधित शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या होत्या. अशा परिस्थितीत पुन्हा पारंपरिक पेसमेकर बसविणे धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने, अत्याधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे होते. 

संबंधित रुग्ण कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात तपासणीसाठी दाखल झाला असता, योग्य चाचण्यानंतर त्याच्यावर दुहेरी कक्ष लीडलेस पेसमेकर प्रणालीचा पर्याय निवडण्यात आला. या तंत्रज्ञानामध्ये छातीवर कोणतीही चिरफाड न करता, मांडीतील रक्तवाहिनीतून कॅथेटरच्या सहाय्याने थेट हृदयामध्ये सूक्ष्म उपकरणे बसविली जातात. या ‘ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर’ प्रणालीमध्ये हृदयाच्या वरच्या व खालच्या कक्षात दोन स्वतंत्र उपकरणे बसविण्यात आली. ही उपकरणे वायरलेस तंत्रज्ञानाद्वारे परस्पर समन्वय साधून हृदयाची नैसर्गिक गती अबाधित ठेवतात. त्यामुळे पारंपरिक पेसमेकरमधील तारा, छातीवरील शस्त्रक्रिया आणि पेसमेकर पिशवीतील संसर्गाशी संबंधित गुंतागुंत टाळणे शक्य झाले. उपचारानंतर रुग्णात संसर्गाचा धोका कमी झाला असून, कमी वेदनांमध्ये जलद पुनर्वसनास मदत झाली. या रुग्णाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यामध्ये डॉ. सोमनाथ, डॉ. प्रशांत पवार, डॉ. रमेश कवडे, कॅथलॅबमधील तांत्रिक कर्मचारी व परिचारिका यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच, ई.सी.एच.एस. योजनेअंतर्गत आवश्यक प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. एस. ए. माशाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले; ज्यामुळे रुग्णावर सुमारे १७ लाखांची ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली. 

याबाबत बोलताना कृष्णा हॉस्पिटलचे हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके म्हणाले, लीडलेस पेसमेकर तंत्रज्ञान हे पेसमेकर उपचार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विशेषतः पेसमेकरशी संबंधित संसर्ग झालेले रुग्ण, रक्तवाहिन्यांमधील अडथळे असलेले रुग्ण, वारंवार पेसमेकर बदलण्याची आवश्यकता असलेले रुग्ण किंवा पारंपरिक पेसमेकरमुळे गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असलेल्या निवडक रुग्णांमध्ये ही पद्धत अधिक सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय ठरू शकते. 



‘कृष्णा’ : प्रगत इलेक्ट्रोफिजिओलॉजी सेवांचे महत्वपूर्ण केंद्र
कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेल्या ११ वर्षांपासून स्वतंत्र इलेक्ट्रोफिजिओलॉजी विभाग कार्यरत असून, हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा येथे उपलब्ध आहेत. या विभागाच्या माध्यमातून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांबरोबरच उत्तर कर्नाटक आणि गोवा येथील रुग्णांनाही सेवा पुरविण्यात येतात. या विभागात इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी, रेडिओफ्रिक्वेन्सी एब्लेशन, आयसीडी प्रत्यारोपण, सीआरटी उपकरणे, अत्याधुनिक पेसमेकर प्रणाली तसेच जटिल हृदय गतीविकारांवरील विविध उपचार परवडणाऱ्या खर्चात उपलब्ध आहेत. सुसज्ज कॅथलॅब, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आणि दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे कृष्णा हॉस्पिटलने प्रगत हृदयविकार उपचारांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.


Sunday, June 21, 2026

सातारा- सांगली विधानपरिषद निवडणूक ; धैर्यशील कदम विजयी ; कार्यकर्त्यांचा जल्लोष ;

वेध माझा ऑनलाईन।
सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय झाला आहे. धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केला. भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम हे विजय झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची अतिषबाजी करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

महावितरणच्या "स्मार्ट मीटर' च्या विरोधात कराडमध्ये उद्या (सोमवारी) जनआक्रोश आंदोलन/

वेध माझा ऑनलाईन।
स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत राज्यभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये सोमवारी (दि. २२ जून) महावितरणविरोधात जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वीज ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे, पूर्वकल्पना न देता वीज कनेक्शन खंडित करणे आणि ग्राहकांच्या शंकांचे समाधान न करणे या मुद्द्यांवर विविध सामाजिक, शेतकरी व राजकीय संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर सकाळी ११ वाजता हे आंदोलन होणार असून कराड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी केले आहे. वीज ग्राहकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणकडून स्मार्ट मीटरमुळे वीज वापराचे अचूक मोजमाप, बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणि तांत्रिक व्यवस्थापनात सुधारणा होईल, असा दावा केला जात आहे. मात्र या दाव्यांबाबत सर्वसामान्य ग्राहकांमध्ये अजूनही अनेक प्रश्न उपस्थित होत असून स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
अनेक भागांमध्ये ग्राहकांची पूर्ण संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याशिवाय मीटर बसविल्यानंतर अचानक वीजपुरवठा खंडित होणे, तक्रारींवर तत्काळ कार्यवाही न होणे आणि ग्राहकांशी पुरेसा संवाद न साधणे यामुळे असंतोष वाढत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
कराड शहरातील काही ग्राहकांचे वीज कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रासासह दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राहकांना विश्वासात न घेता राबविण्यात येणाऱ्या धोरणांविरोधात लोकांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही संघटनांनी सांगितले.
स्मार्ट मीटरमुळे भविष्यात प्रीपेड वीज प्रणाली लागू होणार का, ग्राहकांना आगाऊ रक्कम भरून वीज वापरावी लागणार का, तसेच यामुळे वीज बिलांमध्ये वाढ होणार का, अशा अनेक प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. शासन आणि महावितरणने या विषयावर अधिकृत भूमिका जाहीर करून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्मार्ट मीटरची सक्ती थांबविणे, आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर हटवून पारंपरिक मीटर पुन्हा बसविणे, ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय कोणतीही कारवाई न करणे आणि पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन खंडित करण्याची पद्धत बंद करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 

या जनआक्रोश आंदोलनाला भीमशक्ती सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी युवा काँग्रेस, जान फाउंडेशन तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा उभारण्यासाठी या संघटना पुढे सरसावल्या आहेत. या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, मनसेचे सागर बर्गे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आनंदराव लादे, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रशांत यादव तसेच जान फाउंडेशनचे जावेद नायकमडी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.


ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य ; ओमराजेंच्या निर्णयाबाबत उत्सुकता वाढली ;

वेध माझा ऑनलाईन।
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान दौंडमध्ये महत्त्वपूर्ण घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. दौंड येथील चतुर्थी हॉटेलमध्ये ओमराजे निंबाळकर आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची भेट झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. शिवसेनेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीत निंबाळकर यांनी पक्षातच राहावे, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, शिंदे गटाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील ओमराजे निंबाळकर यांच्या ताफ्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे. नाना भानगिरे हे देखील त्यांच्या ताफ्यासोबत धाराशिवकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत हे पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेतील सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या हालचालींमध्ये तानाजी सावंत यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याआधी खासदार ओमराजे निंबाळकर यांना विशेष विमानाने दिल्लीला नेण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

Friday, June 19, 2026

पृथ्वीराजबाबाबांचा अविनाश मोहितेना पाठिंबा...पण...।

वेध माझा ऑनलाईन।
नुकतीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडली त्यांनी यावेळी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आपण अविनाश मोहितेंना सर्व ताकदीने पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले... खरतर निवडणुकीला फ़क्त 2 दिवस बाकी असताना सगळ्या ताकदीने पाठिंबा देणार म्हणजे... नेमकं काय करणार... हे त्यांनी सांगितलेच नाही...यावेळी त्यांनी भोसले यांच्यासह  भाजप व मोदिंवर टीका केली... लाडकी बहीण योजनेची देखील त्यांनी खिल्ली उडवली...पण ही पत्रकार परिषद  अविनाश मोहितेना पाठिंबा देण्यासाठी घेतली असताना केवळ राजकीय स्टेटमेंट व त्यांचा भाजप विरोध दिसून आला...पाठिंबा कशासाठी ? आपल्या पुढाकारात या पॅनलचे शेतकरी सभासदांसाठी काय नवीन प्लॅन्स आहेत?कारखान्याचे उत्पन्न वाढीसाठी काय  करणार?अशा कोणत्याही विषयावर त्यांचे भाष्य नव्हते...यावरून त्यांनी फक्त दोन दिवस अगोदर पाठिंबा दाखवत भोसले व भाजप ला विरोध करण्यासाठी ही एक संधी समजून अविनाश  मोहितेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप व भोसलेंना निशाण्यावर घेतले आहे का  ?अशी यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे...

या पत्रकार परिषदेत बाबांना पत्रकारांनी विचारले...
अविनाश मोहितेंच्या काळात त्यांनी कारखान्याची अवस्था बिकट करून ठेवली असा आरोप होतो... त्यांनी कामगार संख्या 1 हजार हुन अधिक दाखवून त्यांच्या पगारापोटीची दरमहा रक्कम ही 50 लाख दाखवली... मात्र हे कामगार मस्टरवरच नाहीत...मग ...हे पाच वर्षांचे पैसे गेले कुठे...हा घोटाळा करण्यासह...बोगस सह्या घोटाळा.. .तसेच कृषी कॉलेज बंद करून टाकले, अल्कोहोलचे प्रोडक्शन बंद करून टाकले, कोणतेच उत्पादन नसल्याने व अवाढव्य खर्च करत बसल्याने कारखाना अडचणीत येऊन बंद पडेल किंवा विकावा लागेल अशा परिस्थितीत आला...
अविनाश मोहिते तुरुंगात गेले...ते सध्या जामिनावर बाहेर आहेत...या भोसलेंच्या टिकेवर काय सांगाल ? 
या प्रश्नाचे काहीही उत्तर न देता त्यांनी हा विषय भाजपवर टीका करण्याकडे नेला..

डॉ सुरेश बाबा यांनी हा कारखाना त्यानंतर स्वतः ताब्यात घेऊन पुन्हा सुस्थितीत आणला... अविनाश मोहितेंच्या काळात बंद पडलेले सर्व बाय प्रोडक्टचे प्रोडक्शन पुन्हा सुरू झाले...विस्तारीकरण झाले...नुतनीकरण झाले...चांगला दर मिळू लागला... कारखाना राज्यात दोन नंबरवर गेला...पुरस्कार मिळाले... असेही भोसले सांगतात...  मग... या दोन्ही अध्यक्षांच्या कारकीर्दविषयी तुमचे मत काय ? असे विचारले असता...
पृथ्वीराजबाबा म्हणाले... 
या कारखान्यात लिकेजेस करत भोसलेंनी आपल्या राजकारणासाठी याठिकाणच्या सत्तेचा उपयोग करून घेतला...याला चाप बसवण्यासाठी आपण अविनाश मोहितेना पाठिंबा देत आहोत...
पण अविनाश मोहितेंच्या वादग्रस्त कारकीर्दीवर कोणतेच मत त्यांनी व्यक्त केले नाही...

120 किलो साखर देण्याबाबत केलेल्या अश्वासनाबाबत विचारले असता...हो तेवढी साखर देता येते असे ते म्हणाले...पाणीपट्टी माफ केली...आणि बाहेर जाणारा ऊस थांबवला... तर ते शक्य असल्याचे ते म्हणाले ...पण टेक्निकली हे कसे इमलीमेण्ट होऊ शकते  हे  त्यांना सांगता आले नाही...ते सभेत बोलू असे सांगून त्यांनी यावेळी मोदी सरकारवर टीका करण्याकडे विषय फिरवला... 
लाडकी बहीण योजनेवर टीका करायला सुरुवात केली... चालू पत्रकार परिषदेशी या विषयाचा काहीही संबंध नव्हता...

कारखान्याचा उपयोग आमदार खासदार होण्यासाठीच होतोय... विचाराचे राजकारण आता राहिले नाही...असे सांगायला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले... असे असेल तर तुम्ही का कारखाना काढला नाही, पतसंस्था, बँका, शिक्षण संस्था असे काहीच तुम्ही एवढ्या वर्षात का काढू शकला नाही?यावर बोलताना त्यांनी पहिल्यांदा माझी चूक झाली...काढायला पाहिजे होता...असे म्हटले..
आणि काही वेळातच... तसे नाही केलं तेच बर केलं..कारण त्यामुळे मी दिल्लीत राजकारण करू शकलो असेही ते म्हणाले... सहकारात राजकारण आणू नये...या इंद्रजित मोहितेंनी केलेल्या विधानाचे त्यांनी खंडन केले, कारखाना निवडणुकीच्या राजकारणात कोण राजकारणी भाग घेत नाहीत ते दाखवा असे ते म्हणाले...
माझा अविनाश मोहितेना पाठिंबा आहे असे सांगत... कृष्णा कारखान्याचा मी सभासद नाही असेही ते म्हणाले ... 
मात्र कारखान्यात काही अडचण आली तर मी आहे असा विश्वास देखील त्यांनी दिला...
यावर पॅनेलचे पालकत्व तुम्ही घेता का ? असे विचारले असता.. नाही असे उत्तर त्यांनी दिले...

एकूणच..
त्यांच्या पाठिंबा देण्यामागे सभासद शेतकऱ्यांच्या भविषयासाठीचे कोणतेही भाष्य त्यांनी केले नाही... 
ही राजकीय विषयाबाबत पत्रकार परिषद नसताना या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीका केली,लाडकी बहीण या योजनेची खिल्ली उडवली भोसलेंवर  टीका केली... पण कारखान्याचे प्रश्न, शेतकरी सभासदांचे प्रश्न, त्यावरील तोडगा काय? किंवा आपला या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कसा सहभाग असणार ? यावर ते काहीच बोलले नाहीत...मात्र त्यांनी अविनाश मोहितेंच्या खांद्याचा पुरेपूर वापर करत या निवडणुकीला संधी समजून भाजप व भोसलेंवर यावेळी संधान साधले हे नक्की!...
त्यांच्या पाठिंब्यामुळे अविनाश मोहितेना काय मिळेल हे निकलादिवशी कळेलच!... मात्र  बऱ्याच गॅपनंतर  इथल्या राजकारणात आपले यशस्वीरीत्या "कम बॅक' झाल्याचे त्यांनी कृष्णा निवडणुकीत भाग घेऊन  प्रभावीपणे दाखवले... 
आणि एवढेच या पत्रकार परिषदेचे फलित म्हणावे लागेल...बाकी काहीच नाही...
अशी काही पत्रकारांच्यात त्यांनतर चर्चा रंगली होती...