Sunday, June 21, 2026

महावितरणच्या "स्मार्ट मीटर' च्या विरोधात कराडमध्ये उद्या (सोमवारी) जनआक्रोश आंदोलन/

वेध माझा ऑनलाईन।
स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत राज्यभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये सोमवारी (दि. २२ जून) महावितरणविरोधात जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वीज ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे, पूर्वकल्पना न देता वीज कनेक्शन खंडित करणे आणि ग्राहकांच्या शंकांचे समाधान न करणे या मुद्द्यांवर विविध सामाजिक, शेतकरी व राजकीय संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर सकाळी ११ वाजता हे आंदोलन होणार असून कराड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी केले आहे. वीज ग्राहकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणकडून स्मार्ट मीटरमुळे वीज वापराचे अचूक मोजमाप, बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणि तांत्रिक व्यवस्थापनात सुधारणा होईल, असा दावा केला जात आहे. मात्र या दाव्यांबाबत सर्वसामान्य ग्राहकांमध्ये अजूनही अनेक प्रश्न उपस्थित होत असून स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
अनेक भागांमध्ये ग्राहकांची पूर्ण संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याशिवाय मीटर बसविल्यानंतर अचानक वीजपुरवठा खंडित होणे, तक्रारींवर तत्काळ कार्यवाही न होणे आणि ग्राहकांशी पुरेसा संवाद न साधणे यामुळे असंतोष वाढत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
कराड शहरातील काही ग्राहकांचे वीज कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रासासह दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राहकांना विश्वासात न घेता राबविण्यात येणाऱ्या धोरणांविरोधात लोकांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही संघटनांनी सांगितले.
स्मार्ट मीटरमुळे भविष्यात प्रीपेड वीज प्रणाली लागू होणार का, ग्राहकांना आगाऊ रक्कम भरून वीज वापरावी लागणार का, तसेच यामुळे वीज बिलांमध्ये वाढ होणार का, अशा अनेक प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. शासन आणि महावितरणने या विषयावर अधिकृत भूमिका जाहीर करून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्मार्ट मीटरची सक्ती थांबविणे, आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर हटवून पारंपरिक मीटर पुन्हा बसविणे, ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय कोणतीही कारवाई न करणे आणि पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन खंडित करण्याची पद्धत बंद करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 

या जनआक्रोश आंदोलनाला भीमशक्ती सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी युवा काँग्रेस, जान फाउंडेशन तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा उभारण्यासाठी या संघटना पुढे सरसावल्या आहेत. या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, मनसेचे सागर बर्गे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आनंदराव लादे, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रशांत यादव तसेच जान फाउंडेशनचे जावेद नायकमडी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.


ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य ; ओमराजेंच्या निर्णयाबाबत उत्सुकता वाढली ;

वेध माझा ऑनलाईन।
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान दौंडमध्ये महत्त्वपूर्ण घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. दौंड येथील चतुर्थी हॉटेलमध्ये ओमराजे निंबाळकर आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची भेट झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. शिवसेनेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीत निंबाळकर यांनी पक्षातच राहावे, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, शिंदे गटाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील ओमराजे निंबाळकर यांच्या ताफ्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे. नाना भानगिरे हे देखील त्यांच्या ताफ्यासोबत धाराशिवकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत हे पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेतील सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या हालचालींमध्ये तानाजी सावंत यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याआधी खासदार ओमराजे निंबाळकर यांना विशेष विमानाने दिल्लीला नेण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

Friday, June 19, 2026

पृथ्वीराजबाबाबांचा अविनाश मोहितेना पाठिंबा...पण...।

वेध माझा ऑनलाईन।
नुकतीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडली त्यांनी यावेळी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आपण अविनाश मोहितेंना सर्व ताकदीने पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले... खरतर निवडणुकीला फ़क्त 2 दिवस बाकी असताना सगळ्या ताकदीने पाठिंबा देणार म्हणजे... नेमकं काय करणार... हे त्यांनी सांगितलेच नाही...यावेळी त्यांनी भोसले यांच्यासह  भाजप व मोदिंवर टीका केली... लाडकी बहीण योजनेची देखील त्यांनी खिल्ली उडवली...पण ही पत्रकार परिषद  अविनाश मोहितेना पाठिंबा देण्यासाठी घेतली असताना केवळ राजकीय स्टेटमेंट व त्यांचा भाजप विरोध दिसून आला...पाठिंबा कशासाठी ? आपल्या पुढाकारात या पॅनलचे शेतकरी सभासदांसाठी काय नवीन प्लॅन्स आहेत?कारखान्याचे उत्पन्न वाढीसाठी काय  करणार?अशा कोणत्याही विषयावर त्यांचे भाष्य नव्हते...यावरून त्यांनी फक्त दोन दिवस अगोदर पाठिंबा दाखवत भोसले व भाजप ला विरोध करण्यासाठी ही एक संधी समजून अविनाश  मोहितेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप व भोसलेंना निशाण्यावर घेतले आहे का  ?अशी यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे...

या पत्रकार परिषदेत बाबांना पत्रकारांनी विचारले...
अविनाश मोहितेंच्या काळात त्यांनी कारखान्याची अवस्था बिकट करून ठेवली असा आरोप होतो... त्यांनी कामगार संख्या 1 हजार हुन अधिक दाखवून त्यांच्या पगारापोटीची दरमहा रक्कम ही 50 लाख दाखवली... मात्र हे कामगार मस्टरवरच नाहीत...मग ...हे पाच वर्षांचे पैसे गेले कुठे...हा घोटाळा करण्यासह...बोगस सह्या घोटाळा.. .तसेच कृषी कॉलेज बंद करून टाकले, अल्कोहोलचे प्रोडक्शन बंद करून टाकले, कोणतेच उत्पादन नसल्याने व अवाढव्य खर्च करत बसल्याने कारखाना अडचणीत येऊन बंद पडेल किंवा विकावा लागेल अशा परिस्थितीत आला...
अविनाश मोहिते तुरुंगात गेले...ते सध्या जामिनावर बाहेर आहेत...या भोसलेंच्या टिकेवर काय सांगाल ? 
या प्रश्नाचे काहीही उत्तर न देता त्यांनी हा विषय भाजपवर टीका करण्याकडे नेला..

डॉ सुरेश बाबा यांनी हा कारखाना त्यानंतर स्वतः ताब्यात घेऊन पुन्हा सुस्थितीत आणला... अविनाश मोहितेंच्या काळात बंद पडलेले सर्व बाय प्रोडक्टचे प्रोडक्शन पुन्हा सुरू झाले...विस्तारीकरण झाले...नुतनीकरण झाले...चांगला दर मिळू लागला... कारखाना राज्यात दोन नंबरवर गेला...पुरस्कार मिळाले... असेही भोसले सांगतात...  मग... या दोन्ही अध्यक्षांच्या कारकीर्दविषयी तुमचे मत काय ? असे विचारले असता...
पृथ्वीराजबाबा म्हणाले... 
या कारखान्यात लिकेजेस करत भोसलेंनी आपल्या राजकारणासाठी याठिकाणच्या सत्तेचा उपयोग करून घेतला...याला चाप बसवण्यासाठी आपण अविनाश मोहितेना पाठिंबा देत आहोत...
पण अविनाश मोहितेंच्या वादग्रस्त कारकीर्दीवर कोणतेच मत त्यांनी व्यक्त केले नाही...

120 किलो साखर देण्याबाबत केलेल्या अश्वासनाबाबत विचारले असता...हो तेवढी साखर देता येते असे ते म्हणाले...पाणीपट्टी माफ केली...आणि बाहेर जाणारा ऊस थांबवला... तर ते शक्य असल्याचे ते म्हणाले ...पण टेक्निकली हे कसे इमलीमेण्ट होऊ शकते  हे  त्यांना सांगता आले नाही...ते सभेत बोलू असे सांगून त्यांनी यावेळी मोदी सरकारवर टीका करण्याकडे विषय फिरवला... 
लाडकी बहीण योजनेवर टीका करायला सुरुवात केली... चालू पत्रकार परिषदेशी या विषयाचा काहीही संबंध नव्हता...

कारखान्याचा उपयोग आमदार खासदार होण्यासाठीच होतोय... विचाराचे राजकारण आता राहिले नाही...असे सांगायला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले... असे असेल तर तुम्ही का कारखाना काढला नाही, पतसंस्था, बँका, शिक्षण संस्था असे काहीच तुम्ही एवढ्या वर्षात का काढू शकला नाही?यावर बोलताना त्यांनी पहिल्यांदा माझी चूक झाली...काढायला पाहिजे होता...असे म्हटले..
आणि काही वेळातच... तसे नाही केलं तेच बर केलं..कारण त्यामुळे मी दिल्लीत राजकारण करू शकलो असेही ते म्हणाले... सहकारात राजकारण आणू नये...या इंद्रजित मोहितेंनी केलेल्या विधानाचे त्यांनी खंडन केले, कारखाना निवडणुकीच्या राजकारणात कोण राजकारणी भाग घेत नाहीत ते दाखवा असे ते म्हणाले...
माझा अविनाश मोहितेना पाठिंबा आहे असे सांगत... कृष्णा कारखान्याचा मी सभासद नाही असेही ते म्हणाले ... 
मात्र कारखान्यात काही अडचण आली तर मी आहे असा विश्वास देखील त्यांनी दिला...
यावर पॅनेलचे पालकत्व तुम्ही घेता का ? असे विचारले असता.. नाही असे उत्तर त्यांनी दिले...

एकूणच..
त्यांच्या पाठिंबा देण्यामागे सभासद शेतकऱ्यांच्या भविषयासाठीचे कोणतेही भाष्य त्यांनी केले नाही... 
ही राजकीय विषयाबाबत पत्रकार परिषद नसताना या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीका केली,लाडकी बहीण या योजनेची खिल्ली उडवली भोसलेंवर  टीका केली... पण कारखान्याचे प्रश्न, शेतकरी सभासदांचे प्रश्न, त्यावरील तोडगा काय? किंवा आपला या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कसा सहभाग असणार ? यावर ते काहीच बोलले नाहीत...मात्र त्यांनी अविनाश मोहितेंच्या खांद्याचा पुरेपूर वापर करत या निवडणुकीला संधी समजून भाजप व भोसलेंवर यावेळी संधान साधले हे नक्की!...
त्यांच्या पाठिंब्यामुळे अविनाश मोहितेना काय मिळेल हे निकलादिवशी कळेलच!... मात्र  बऱ्याच गॅपनंतर  इथल्या राजकारणात आपले यशस्वीरीत्या "कम बॅक' झाल्याचे त्यांनी कृष्णा निवडणुकीत भाग घेऊन  प्रभावीपणे दाखवले... 
आणि एवढेच या पत्रकार परिषदेचे फलित म्हणावे लागेल...बाकी काहीच नाही...
अशी काही पत्रकारांच्यात त्यांनतर चर्चा रंगली होती...

Wednesday, June 17, 2026

कराड/प्रतिनिधी : - 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना केवळ ऊस उत्पादक न ठेवता महाराष्ट्रातील सर्वांत समृद्ध शेतकरी बनविण्याचे ध्येय समोर ठेवून कारखान्याच्या १७ पाणीपुरवठा योजनांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सोलर फिडरच्या माध्यमातून विजबिलमुक्ती, कमी पाणीपट्टी, ठिबक सिंचनाचा व्यापक वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकरी १५० ते २०० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काले (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन दयानंद पाटील, ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते, गीतांजली पाटील, उमेदवार नयन पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितले की, २०१५ मध्ये सहकार पॅनेलकडे कारखान्याची सत्ता आली तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. कामगारांचे वेतन देण्यासाठीही निधी उपलब्ध नव्हता आणि तब्बल ५८ कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र पुढील ११ वर्षांच्या कालावधीत कारखान्याची आर्थिक घडी सावरण्यात यश आले. सभासदांना ७८ कोटी रुपयांची साखर मोफत देण्यात आली, तर थकबाकी शून्यावर आणण्यात यश मिळाले. विरोधकांकडे आजही विकासाचा कोणताही अजेंडा नसून, त्यांच्या मनगटीवर बसलेले १०० कोटींचे भूत उतरवण्यासाठीच त्यांना सत्ता हवी असल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला काही लोकांनी तडा दिल्याची टीका करत त्यांनी सभासदांना विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.

कारखान्याच्या भविष्यातील योजनांचा ऊहापोह करताना त्यांनी वाकुर्डे योजनेवर ४५ मेगावॅट क्षमतेचा सोलर फिडर उभारण्याचा मानस व्यक्त केला. या माध्यमातून वीजनिर्मिती, तसेच ऊर्जास्वावलंबन साध्य करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पावसाळी अधिवेशनात यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी, कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेताना, यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने प्रगतीची वाटचाल केल्याचे सांगितले. आपल्या कार्यकाळात सभासदांच्या ठेवींमध्ये वाढ झाली आणि त्यांना चांगला परतावा मिळाला, अशी या सुवर्णकाळाची आठवण त्यांनी करून दिली. कारखाना चालविण्यासाठी अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकरी सभासदांना “एकदा झालेली चूक पुन्हा करू नका,” असे आवाहन केले. 

ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते यांनी, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने स्थैर्य आणि प्रगती साधल्याचा दावा केला. संस्थापक पॅनेल आणि कारखान्याच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनातील दृष्टिकोनात मोठा फरक असल्याचे सांगत त्यांनी सहकार पॅनेलला मिळालेल्या रयत संघटनेच्या पाठिंब्याचे स्वागत केले. 

व्हाईस चेअरमन दयानंद पाटील यांनी, संस्थापक पॅनेलच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारखान्याची आर्थिक स्थिती खालावण्यास त्यांचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला. तोडणी-वाहतूक निधी, कर्जवाढ आणि आर्थिक व्यवहारांबाबत विरोधकांनी मौन का बाळगले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मनोगतात गीतांजली पाटील यांनी शेतकरी आणि सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली दूरदृष्टी भोसले नेतृत्वाकडे असल्याचे सांगितले. डॉ. सुरेश सुकरे यांनी, गुऱ्हाळही न चालवलेले लोक निवडणुकीत पॅनल टाकत असल्याची टीका केली. तर डॉ. अतुल भोसले यांनी ऐन उन्हाळ्यात वाकुर्डे योजनेचे पाणी देऊन शेतकऱ्यांना तारल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे आभार अशोक माळी यांनी मानले. सभेस सुनीता शेवाळे, गोविंद गावडे, ॲड आत्माराम पाटील, प्रमोद पाटील, वैभव थोरात, बाळासाहेब गलांडे, शंकरराव थोरात, मारुती पाटील, प्रकाश पाटील, सुनील यादव आदींसह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

चौकट : 

प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विरोधी पॅनेलवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. विरोधकांनी कारखान्याच्या विकासापेक्षा विविध घोटाळ्यांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळविल्याचा दावा करत त्यांनी पाला-पाचोळा घोटाळा, खाजगी साखर विक्री व्यवहार, तोडणी-वाहतूक घोटाळा, इमारतींवरील कर्जे, बोगस कामगार मानधन, वाहन खर्च, विश्रामगृह खर्च आणि इंधन वापरातील अनियमितता यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला. कारखान्याच्या हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ जपणाऱ्या नेतृत्वापासून सभासदांनी सावध राहावे, असे आवाहन करत त्यांनी निवडणुकीत विकास आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

Tuesday, June 16, 2026

अविनाश मोहितेंनी अक्षरशः कारखान्याच्या पाला-पाचोळ्यात सुद्धा घोटाळा केलाय... ; त्यांचे इतर घोटाळे वेगळेच...त्यांना तुम्ही विचारा तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं ? अतुल भोसलेंचा घणाघात ;


वेध माझा ऑनलाईन।
काल काले येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विरोधी पॅनेलवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. अविनाश मोहितेंनी कारखान्याच्या विकासापेक्षा विविध घोटाळ्यांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळविल्याचा दावा करत त्यांनी कारखान्याच्या पाला-पाचोळ्यात सुद्धा घोटाळा केलाय इतर घोटाळे केले ते वेगळेच  त्यांना तुम्ही विचारा तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं?... असा घणाघात डॉ अतुलबाबा यांनी काले येथील सभेत केला.

तसेच त्यांनी खाजगी साखर विक्री व्यवहार, तोडणी-वाहतूक घोटाळा, इमारतींवरील कर्जे, बोगस कामगार मानधन, वाहन खर्च, विश्रामगृह खर्च आणि इंधन वापरातील अनियमितता यांसारख्या मुद्द्यांचाही यावेळी उल्लेख केला. कारखान्याच्या हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ जपणाऱ्या नेतृत्वापासून सभासदांनी सावध राहावे, असे आवाहन करत डॉ अतुलबाबांनी निवडणुकीत विकास आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देण्याचे यावेळी आवाहन केले.

ते म्हणाले...यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना केवळ ऊस उत्पादक न ठेवता महाराष्ट्रातील सर्वांत समृद्ध शेतकरी बनविण्याचे ध्येय समोर ठेवून कारखान्याच्या १७ पाणीपुरवठा योजनांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सोलर फिडरच्या माध्यमातून विजबिलमुक्ती, कमी पाणीपट्टी, ठिबक सिंचनाचा व्यापक वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकरी १५० ते २०० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काले (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन दयानंद पाटील, ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते, गीतांजली पाटील, उमेदवार नयन पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना पुढे सांगितले की..., 
२०१५ मध्ये सहकार पॅनेलकडे कारखान्याची सत्ता आली तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. कामगारांचे वेतन देण्यासाठीही निधी उपलब्ध नव्हता आणि तब्बल ५८ कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र पुढील ११ वर्षांच्या कालावधीत कारखान्याची आर्थिक घडी सावरण्यात यश आले. सभासदांना ७८ कोटी रुपयांची साखर मोफत देण्यात आली, तर थकबाकी शून्यावर आणण्यात यश मिळाले. विरोधकांकडे आजही विकासाचा कोणताही अजेंडा नसून, त्यांच्या मनगटीवर बसलेले १०० कोटींचे भूत उतरवण्यासाठीच त्यांना सत्ता हवी असल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला काही लोकांनी तडा दिल्याची टीका करत त्यांनी सभासदांना विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.

कारखान्याच्या भविष्यातील योजनांचा ऊहापोह करताना त्यांनी वाकुर्डे योजनेवर ४५ मेगावॅट क्षमतेचा सोलर फिडर उभारण्याचा मानस व्यक्त केला. या माध्यमातून वीजनिर्मिती, तसेच ऊर्जास्वावलंबन साध्य करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पावसाळी अधिवेशनात यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी, कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेताना, कारखाना चालविण्यासाठी अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकरी सभासदांना “एकदा झालेली चूक पुन्हा करू नका,” असे आवाहन केले. 

ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते यांनी, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने स्थैर्य आणि प्रगती साधल्याचा दावा केला. संस्थापक पॅनेल आणि कारखान्याच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनातील दृष्टिकोनात मोठा फरक असल्याचे सांगत त्यांनी सहकार पॅनेलला मिळालेल्या रयत संघटनेच्या पाठिंब्याचे स्वागत केले. 

कार्यक्रमाचे आभार अशोक माळी यांनी मानले. सभेस सुनीता शेवाळे, गोविंद गावडे, ॲड आत्माराम पाटील, प्रमोद पाटील, वैभव थोरात, बाळासाहेब गलांडे, शंकरराव थोरात, मारुती पाटील, प्रकाश पाटील, सुनील यादव आदींसह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




कराडला सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशीर्वचन सोहळा उत्साहात

वेध माझा ऑनलाईन।
रुद्राक्ष धारण करणे म्हणजे एक कोटी गायी दान केल्याचे पुण्य प्राप्त होणे होय. इष्टलिंग हे केवळ दागिना नसून शिवतत्त्वाशी जोडणारा जिवंत दुवा आहे. श्रद्धेने इष्टलिंगाची पूजा केल्यास तेहतीस कोटी देवतांच्या पूजेइतके पुण्य लाभते असे प्रतिपादन केदार पिठाचे जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी केले.

कराड येथील कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर केदार जगद्गुरु भिमाशंकरलिंग महास्वामी यांच्या उपस्थितीत सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशिर्वचन सोहळा उत्साहात झाला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवलिंग शिवाचार्य, डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य म्हैसाळकर, महादेव शिवाचार्य वाईकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कराडच्या भूमीत धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्कारांचीही समृद्ध परंपरा जपली जात आहे. या परंपरेचेच दर्शन घडविणारा वीरशैव लिंगायत समाजाचा सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशीर्वचन सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विशेषतः नव्या पिढीला आपल्या धर्मातील तत्त्वज्ञान, संस्कार आणि आचार-विचारांची ओळख करून देणारा हा सोहळा ठरला.

भस्माचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, शरीरावरील विविध ठिकाणी लावले जाणारे भस्म हे केवळ धार्मिक प्रतीक नसून मानवी शरीर हेच एक ब्रह्मांड असल्याची जाणीव करून देणारे तत्त्वज्ञान आहे. एका बाजूला कुबेराची संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला भस्म ठेवले तरी भस्माचे महात्म्य श्रेष्ठ आहे असा उल्लेख धर्मग्रंथांत आढळतो, असेही त्यांनी नमूद केले.

 डॉ. शिवयोगी शिवाचार्य स्वामी (म्हैसाळ) म्हणाले की, संपत्ती, नाव, कीर्ती आणि मान-सन्मान माणूस आयुष्यात मिळवू शकतो; मात्र जीवनाचा शेवटचा प्रवास करताना त्याच्यासोबत केवळ त्याचे संस्कार आणि शिवभक्तीच जाते. ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे तो जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.

वीरशैव लिंगायत धर्मातील इष्टलिंग पूजा ही केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धी, समता, श्रमप्रतिष्ठा आणि शिवभक्ती यांचे प्रतीक मानली जाते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने धर्माबद्दल आत्मीयता बाळगून त्यामागील तत्त्वज्ञान समजून घेतले पाहिजे, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

विनायक विभुते,अनिल खुंटाळे यांच्या हस्ते महास्वामी यांचा सत्कार करण्यात आला.राजू शेटे, शिवानंद डुबल, भरत शेटे,चंद्रशेखर नखाते, विजय पट्टणशेट्टी या ५ दांपत्यांचे हस्ते इष्टलिंग महापूजेला सुरुवात करण्यात आली.नंदकुमार बटाणे,संजय शेटे, सुनील महाजन, धनंजय विभूते,सुनील चिंगळे, विजय भागवत, राजू खलीपे, गुरुनाथ कचरे,अशोक संसुद्दी, दिलीप चिंचकर,राजन धोकटे,गणेश शेटे यांनी उपस्थित शिवाचार्यांचे व मान्यवरांचे स्वागत केले.प्रा.प्रमोद सुकरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.


Monday, June 15, 2026

खासदारांच्या फुटीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...जे जातील त्यांना पश्चाताप होईल - ...

वेध माझा ऑनलाईन
पक्षातील खासदारांच्या संभाव्य फुटीवर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार बंड करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हे खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता याच पक्षफुटीबाबत दिल्लीमध्ये मोठ्या हलाचाली वाढल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या या पहिल्या प्रतिक्रियेचे अनेक अर्थ काढले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी खासदरांच्या फुटीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना जायचं आहे, त्यांनी खुशाल जावं, त्यांच भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही. पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जो सोडून जाईल, त्यांना एक दिवस नक्की पश्चात्ताप होईल, असे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी सहन करायला शिकावे, असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळेदेखील ठाकरे यांच्या पक्षातील फुटीबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.