वेध माझा ऑनलाईन।
काल पासून कराडच्या प्रीतिसंगम बागेत गाढवांचा वावर अचानक वाढलेला दिसला.हा वावर वाढल्याने शहरातील नागरिकांनी असचर्य व्यक्त करत बागेच्या व्यवस्थापनेबाबत चिंता व्यक्त केली आहे असे चालू राहिल्यास शहरातील लोकांसाठी ही बाग आहे की गाढवांसाठी? असा प्रश्न यानिमित्ताने लोकांना पडला आहे
प्रीतिसंगम बाग हा शहराच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्याठिकाणी स्व यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे त्याठिकाणी पावित्र्य राखणे जितके गरजेचे आहे तितकेच त्याठिकाणी चोख व्यवस्थापन असणे देखील गरजेचे आहे
दुपारपासून तेथे अनेकजण जेवणासाठी डबे घेऊन सहकुटुंब येत असतात... असे बऱ्यापैकी रोजचेच चित्र असते...सकाळी देखील लोकांची त्याठिकाणी फिरण्यासाठी गर्दी असते. ...संध्याकाळी तर पाय ठेवायला जागा उरत नाही इतकी त्याठिकाणी गर्दी होत असते...त्यामुळे त्याठिकाणचे व्यवस्थापन व्यवस्थित व चोख असणे गरजेचे आहे... जेणेकरून त्याठिकाणी नागरिकांना सुरक्षित आणि आनंदी वाटेल... पण तसे होताना दिसत नाही...
येथील प्रीतिसंगम बाग ,टाऊन हॉल, आणि स्व पी डी पाटील उद्यान या एकूण 3 ठिकाणचे व्यवस्थापन पालिकेकडून दिले गेले आहे...त्यापैकी प्रीतिसंगम बाग येथे काल अचानकपणे कळपाने गाढवं जमल्याचे दिसल्याने त्याठिकाणचे व्यवस्थापन ढिसाळ का असावे? अशी यानिमित्ताने चर्चा आहे...
याविषयी विरोधी गट आपला आवाज उठवेल तेव्हा उठवू दे...पण...कराडकर नागरिक वेध माझा शी संपर्क करून या विषयाला तोंड फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याठिकाणचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत...
ही परिस्थिती यापुढे बदलली गेली पाहिजे जेणेकरून त्याठिकाणी असलेले ढिसाळ व्यवस्थापनाचे चित्र संपूर्ण शहरासमोर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे...कारण प्रीतिसंगम बाग शहराचे नाक आहे...अनेक परिसरातून त्याठिकाणी विविध सहली तसेच अभ्यास दौऱ्यासाठी अनेक लोक विविध भागातून येत त्याठिकाणी असतात...याचे भान प्रशासनाला असले पाहिजे...
त्यामुळे पालिका प्रशासन यापुढे अशा चुका येथे होऊ देणार नाही आणि बागेमधील माणसांचा वावर कमी...आणि गाढवांचा वावर जास्त...अशा परिस्थितीला आळा घालण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल अशी लोकांना अपेक्षा आहे...