Tuesday, May 5, 2026

नसरापूर येथील घटनेविरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची कराडमध्ये निषेध रॅली ; शहरातील विविध संघटनांनी नोंदवला सहभाग ;

वेध माझा ऑनलाईन।
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या निष्पाप बालिकेवर ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर कराड ब्राम्हण महासंंघाच्या वतीने आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली रॅली काढून पोलीस अधीक्षक दराडे यांना निवेदन देण्यात आले.कराड मधील विविध संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवला

याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ही घटना अत्यंत निंदनीय असून समाजमनाला हादरवणारी आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. सरकारने प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतला असला, तरी न्याय प्रक्रियेत होणारा विलंब टाळून आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा सुनावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात आणि महाराष्ट्र शासनाने "शक्ती कायदा" तात्काळ अंमलात आणून त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. 
कराड मधील विविध संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवला रोटरी क्लब ,लायन्स क्लब ,इनरव्हील क्लब, सकल हिंदू समाज, जीवन विद्या मिशन, रणरागिणी महिला संस्था, समस्त ब्राह्मण संघटना, आस्था संस्था ,आदिवासी कल्याण आश्रम , अशा विविध संस्था सहभागी झाल्या होत्या 


Monday, May 4, 2026

पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट ; आसाममध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर ; पुडूचेरीमध्ये भाजप आघाडीवर; केरळमध्ये काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर; पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत ;,

वेध माझा ऑनलाईन।
पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहेत. आसाममध्ये भाजपने स्पष्ट बहुमताच्या दिशेनं वाटचाल केली आहे. आसाममध्ये भाजपचे उमेदवार 102 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेसचे उमेदवार 21 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता आसाममध्ये भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापण करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे पुडूचेरीमध्ये देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पुडूचेरीमध्ये 30 जागांपैकी 21 जागांवर भाजपेच उमेदवार आघाडीवर आहेत. तर केरळमध्ये मात्र मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. केरळ हा डाव्या पक्षांचा गड मानला जातो आणि डाव्या पक्षांच्या गडाला सुरूंग लावण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. केरळमध्ये काँग्रेसचे उमेदवार तब्बल 102 जागांवर आघाडीवर आहेत. केरळमध्ये डाव्या पक्षांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. अवघ्या 35 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
दरम्यान पश्चिम बंगालमध्ये देखील मोठा उलटफेर पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, भाजप पश्चिम बंगालमध्ये तब्बल 204 जागांवर आघाडीवर आहे. तर तृणमूल काँग्रेसची यावेळी मोठी पिछेहाट झाल्याचं पहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार केवळ 83 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये आता भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

आमदार मनोज घोरपडे म्हणाले...मसूर पूर्व भागासाठी येत्या 7 तारखेला शेतकऱ्यांना अरफळ कॅनॉल मधून कण्हेर धरणाचे पाणी सोडणार ;

वेध माझा ऑनलाईन।
मसूर पूर्व भागासाठी आरफळ कॅनल मधून येत्या सात तारखेला पाणी सोडणार असल्याची माहिती कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली. चालू वर्षी उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत आहे.परंतु कोपर्डी लिंक कॅनॉल चालू झाल्यापासून मसूर पूर्व भागाला कधीही पाणी कमी पडलेले नाही परंतु यावर्षी जास्त प्रमाणात उन्हाची दाहकता व तारळी धरणाची पाणी पातळी कमी झाल्यामुळे पाण्यासाठी अडचण तयार होत आहे मात्र येत्या 7 तारखेला शेतकऱ्यांना अरफळ कॅनॉल मधून कण्हेर धरणाचे पाणी सोडणार असल्याची माहिती आमदार घोरपडे यांनी दिली.

तारळी धरणाचे लिकेज काढण्याचे व आरफळ कालवा लायनींग करून पाणी गळती कमी करण्यासाठी उपयोजना केल्या जात आहेत.कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून आमदार मनोजदादा घोरपडे यांचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. मसूर पूर्व भागाचा दुष्काळ मिटवण्यासाठी हणबरवाडी धनगरवाडी ही महत्वकांक्षी उपसा सिंचन योजना कार्याविनित केली असून त्याला कोपर्डी लिंक कॅनॉलच्या माध्यमातून तारळी धरणाचे पाणी घेण्यात येत आहे. परंतु चालू वर्षी सर्व ठिकाणाहून पाण्याची मागणी असून एकाच वेळी सर्वांना पाणी देता येत नाही त्यामुळे पाण्याच्या रोटेशन मध्ये थोडासा विलंब होत आहे. यातून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता आमदार मनोजदादा घोरपडे हे सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्त पाणी कसे देता येईल यासाठी प्रयत्नशील असून येत्या सात तारखेला मसूर पूर्व भागासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. 

 शेतकऱ्यांना व्यवस्थित वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून 90 नवीन डीपी बसवण्याचे काम चालू झालेले आहे. ज्या ठिकाणी 65 चे डीपी आहे तिथे 100 चे डीपी बसवून ज्या ठिकाणी 100 चा आहे त्या ठिकाणी अतिरिक्त 100 बसवल्यामुळे वारंवार डीपी जळणे,फ्युज उडणे, लोड शेडिंग यापासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.

सुनेत्रा पवारांनी मोडले... अजित पवारांचे रेकॉर्ड ;

वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्र राज्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या विधानसभा क्षेत्रांच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज समोर आले असून बारामतीमध्ये राजकीय इतिहास झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला आहे आणि विजयाचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विजय
पवार कुटुंबाचा अभेद्य गड समजल्या जाणाऱ्या बारामतीत सुनेत्रा पवार यांनी आपल्या पतीचा अनेक वर्षांचा जुना रेकॉर्ड संपुष्टात आणला आहे. २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रतिस्पर्धी गोपीचंद पडळकर यांचा पराभव करताना १.६५ लाखांहून अधिक मताधिक्य मिळवले होते, जे त्यावेळी संपूर्ण राज्यासाठी एक उच्चांक होता. 

मात्र, या पोटनिवडणुकीत बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर मतदान केले आहे. त्यांच्या नावे 2 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयाची नोंद झाली आहे, हे रेकॉर्ड झाले आहे.

सुनेत्रा पवार २,१८,९३० एवढ्या प्रचंड मताधिक्याने विजयी ;

वेध माझा ऑनलाईन
अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक पार पडली. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेर आता या पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यातील विजयाचे सर्व विक्रम सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.  सुनेत्रा पवार या तब्बल  २,१८,९३० एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या आहेत. 

दरम्यान सुनेत्रा पवार या विजयी झाल्यानंतर 
आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे

बारामतीचा निकाल आला समोर ; 9 व्या फेरीच्या मतमोजणीनंतर सुनेत्रा पवार यांना 78 हजार 528 मतांची आघाडी; सुनेत्रा पवार पोस्ट करत काय म्हणाल्या ?

वेध माझा ऑनलाइन।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक  लागली होती. 23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचा निकाल हळूहळू समोर येत आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु आहे. 
बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाच्या 9 व्या फेरीच्या मतमोजणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना 78 हजार 528 मतांनी आघाडीवर आहेत. सुनेत्रा पवारांची ही आघाडी आणखी वाढत जाणार असून विजयही जवळपास निश्चित झाला आहे. 

यादरम्यान, सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

सुनेत्रा पवार यांची पोस्ट काय ? 
आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते, असं उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं. 

 सर्व बारामतीकरांचे आभार - सुनेत्रा पवार 
अजितदादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर  सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची...असं सुनेत्रा पवार पोस्टद्वारे म्हणाल्या. 



आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस अभिवादन

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद् पवार गट.) चे आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस अभिवादन केले.
लोकशाही आघाडीचे अध्यक्ष श्री जयंत काका पाटील यांनी श्री रोहित दादांचे कराडमध्ये स्वागत केले. 

यावेळी कराड नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष श्री प्रतापराव साळुंखे, श्री सौरभ पाटील तात्या (मा. नगरसेवक, संचालक पी. डी. पाटील साहेब बँक), माजी नगरसेवक नंदकुमार बटाणे, नगरसेवक श्री अल्ताफ शिकलगार, सुहास पवार, श्री सुरेश पाटील, श्री राहुल भोसले, श्री विनायक पाटील , श्री राकेश शाह, श्री राघवेंद्र कोल्हापुरे यांच्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.