Tuesday, August 11, 2026

माजी पालकमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी फ्लेक्स लावता यावेत म्हणून पालिकेने केलेला ठराव बदलला ; झाकीर पठाण यांचा पत्रकार परिषदेत आरोप ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरात फ्लेक्स लावायला बंदी करण्याचा ठराव पालिकेने केला असता फक्त माजी पालकमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी फ्लेक्स लावता यावेत म्हणून हा ठराव पुन्हा बदलला गेला असा आरोप काँग्रेस अल्पसंख्याक नेते झाकीर पठाण यांनी पत्रकार परिषदेत केला

ते म्हणाले...
आपण सातत्याने अनधिकृत फ्लेक्सविरोधात आवाज उठविला असून, त्यामुळे नगरपरिषदेचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचा दावा त्यांनी केला.
काही महिन्यांपूर्वी आपण याबाबत तक्रार केली होती. काही नगरसेवकांनीच आपले फ्लेक्स लावून त्याचे भाडे पालिकेकडे भरले नसल्याचा आरोप करत, पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा आपण उपस्थित केला होता, असेही पठाण यांनी सांगितले.

दरम्यान शहराच्या विकासासाठी घेतलेला ठराव दुसऱ्याच दिवशी बदलून वाढदिवसाचे फ्लेक्स लावण्यास परवानगी देणे, हे कसले विकासाचे राजकारण?’ 
असा सवाल पठाण यांनी उपस्थित केला.

या ठरावात वाढदिवसानिमित्त फ्लेक्स लावण्यास परवानगी नेमकी कोणासाठी देण्यात आली? असा प्रश्नही उपस्थित करत माजी पालकमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी हा ठराव बदलला असा आरोप त्यांनी केला त्यानंतर त्यांचे बॅनर कराड शहरात लागले होते...याकडे पत्रकार परिषदेत लक्ष वेधले गेले

Monday, August 10, 2026

काँग्रेस नेते झाकीर पठाण आक्रमक ; म्हणाले...म्हणाले...कचरा डेपोलगत उर्दू शाळा होऊ देणार नाही... प्रश्न लहान मुलांच्या आरोग्याचा आहे...; जी पालिकेच्या मालकीची जागाच नाही... त्याठिकाणी शहरातला ठेकेदार डेव्हलप करतोय एक बाग ;...हा कसला कारभार ?

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील उर्दू शाळेच्या स्थलांतराचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला असून, कचरा डेपोलगत शाळा उभारण्याच्या विषयावरून राजकीय वातावरण तापले आहे. आता काँग्रेसने या विषयात उडी घेतली असून काँग्रेस चे अल्पसंख्यांक नेते झाकीर पठाण या प्रश्नी आक्रमक झाले आहेत

काही दिवसांपूर्वीपर्यंत उर्दू शाळा जुन्या जागेवरून हलविण्यास विरोध करणारे पालिकेचे विद्यमान बांधकाम सभापती आखतर आंबेकरी आता कचरा डेपोलगत शाळा करण्यासाठी आग्रही का आहेत? त्यांच्या भूमिकेत अचानक असा बदल कसा झाला? असा थेट सवाल झाकीर पठाण यांनी उपस्थित केलाय....‘खून की नदिया बहाऍंगे... वहासे स्कुल नहीं हिलायेगे...’ असे म्हणत शाळा स्थलांतराला विरोध करणाऱ्यांची भूमिका आता नेमकी कुठे बदलली? असा सवाल करत पठाण यांनी पत्रकार परिषदेत पालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

कचरा डेपोलगत शाळा होऊ देणार नाही, 
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न
कचरा डेपोलगत उर्दू शाळा उभारण्यास आपला तीव्र विरोध असल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले. कचरा डेपोमुळे परिसरातील लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी केला.‘विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करून विकासाच्या नावाखाली निर्णय घेता येणार नाही. कचरा डेपोलगत शाळा होऊ देणार नाही,’ असा इशाराही पठाण यांनी दिला.

फ्लेक्सच्या मुद्द्यावरून पालिकेला घेरले
शहरातील अनधिकृत फ्लेक्सचा मुद्दाही पठाण यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. आपण सातत्याने अनधिकृत फ्लेक्सविरोधात आवाज उठविला असून, त्यामुळे नगरपरिषदेचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचा दावा त्यांनी केला.
काही महिन्यांपूर्वी आपण याबाबत तक्रार केली होती. काही नगरसेवकांनीच आपले फ्लेक्स लावून त्याचे भाडे पालिकेकडे भरले नसल्याचा आरोप करत, पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा आपण उपस्थित केला होता, असे पठाण यांनी सांगितले.

फ्लेक्स नको’चा ठराव अन् दुसऱ्याच दिवशी बदल केला? कोणासाठी;? पठाण यांचा सवाल...
पालिकेच्या सभेतील फ्लेक्सच्या निर्णयावरही पठाण यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. शहरात फ्लेक्स लावण्यासंदर्भात पालिकेच्या सभेत ठराव करून फ्लेक्सला आळा घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाढदिवसाच्या फ्लेक्ससाठी हा ठराव बदलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
‘शहराच्या विकासासाठी घेतलेला ठराव दुसऱ्याच दिवशी बदलून वाढदिवसाचे फ्लेक्स लावण्यास परवानगी देणे, हे कसले विकासाचे राजकारण?’ असा सवाल पठाण यांनी उपस्थित केला.

या ठरावात वाढदिवसानिमित्त फ्लेक्स लावण्यास परवानगी नेमकी कोणासाठी देण्यात आली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या निर्णयानंतर... एका माजी आमदाराचा वाढदिवस पार पडला...
आणि त्यांचे बॅनर शहरात लागले होते...याकडे पत्रकार परिषदेत लक्ष वेधले गेले


प्रकाशनगरमधील बागेच्या कामावरही प्रश्नचिन्ह
प्रकाशनगर येथील एका जागेचा विषयही पठाण यांनी उपस्थित केला. संबंधित भाग पालिकेच्या मालकीचा नसताना तेथे पालिकेच्या माध्यमातून एका ठेकेदाराकडून बाग विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र, या कामासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का? संबंधित जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे? पालिकेने या जागेची मालकी व हद्द याची खातरजमा केली आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

‘पालिकेच्या पैशातून काम होत असेल तर जागा कोणाची, परवानगी कुणाची आणि निर्णय कुणाचा?’ असा सवाल करत पठाण यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

कराड पालिकेच्या कारभारातील विविध निर्णय, ठराव आणि विकासकामांबाबत प्रश्न उपस्थित करत पठाण यांनी प्रशासनाला लक्ष्य केले. शहराच्या विकासाच्या नावाखाली निर्णय घेताना पारदर्शकता आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे; अन्यथा प्रत्येक निर्णयाचा जाब विचारला जाईल, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
नेकलेस रोड होणारच आहे फक्त शासनाकडून येणाऱ्या यासाठीच्या निधीलबाबत सत्ताधार्यांना काय वाटत हे जाणून घेण्यासाठी आमच्या नगरसेवकांनी हा विषय पालिकेत नेला असा खुलासा आमदार डॉ अतुल भोसले यांनी अनौपचारिक चर्चेत केला

Friday, August 7, 2026

लोकशाही आघाडी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहे; –पत्रकार परिषदेत गुंड्याभाऊ वाटेगावकर यांचा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन।
: कराड नगरपालिकेतील राजकारण दिवसेंदिवस अधिकच तापत असून भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. विरोधी गटनेते गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी लोकशाही आघाडीवर टीका करत, शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून पालिकेतील राजकारण घडवून आणले जात असल्याचा आरोप केला. तसेच नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे चुकीची उत्तरे देऊन कराडकर नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वाटेगावकर म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे संपूर्ण राज्याचे दैवत असून त्यांच्या समाधीलगत होणाऱ्या नेकलेस रोडसाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा मार्ग शहराच्या विकासाला चालना देणारा ठरेल. शहरातील विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध होत असतानाही सत्ताधारी खोटे आरोप करून त्या निधीचा उपयोग टाळत आहेत. यामध्ये विकासापेक्षा राजकारणच अधिक दिसत असून त्यामुळे शहराचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कराड नगरपालिकेच्या विकासाची तुलना आजूबाजूच्या पालिकांशी केली असता कराड विकासाच्या बाबतीत मागे पडल्याचेही त्यांनी नमूद केले. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराचा पुनरुच्चार करत, सध्या सुरू असलेल्या कामकाजातही त्याच प्रकारच्या अनियमितता सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
आपल्यावर खंदारे यांच्या वाहनातून प्रवास केल्याचा करण्यात आलेला आरोप फेटाळून लावत वाटेगावकर म्हणाले, "हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मी त्यांच्या गाडीत बसण्याचा प्रश्नच येत नाही."
नगराध्यक्षांकडून आमदार डॉ. अतुल भोसले यांना चुकीची माहिती दिली जात असल्याच्या आरोपावर ते म्हणाले, "नगराध्यक्ष आरोप करत असले तरी स्वतः आमदारांनी कधीही असे आरोप केलेले नाहीत. खोटे आरोप करून शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे."
उर्दू शाळा, ४० फुटी रस्ता तसेच शहरातील अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर भाजप सातत्याने आवाज उठवत राहील. शहराच्या विकासासाठी जेव्हा गरज भासेल तेव्हा आम्ही ठामपणे भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक अजय पावसकर म्हणाले, सोमवार पेठेतील वादग्रस्त रस्त्याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले होते. मात्र, चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करण्यात आला 
नगरसेवक शिवाजी पवार आणि आशुतोष डूबल तसेच अतुल शिंदे यांनीही सत्ताधाऱ्यांचे आरोप फेटाळून लावत, भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
शेवटी अतुल शिंदे म्हणाले...आमदार साहेबांच्या गुडबुक मध्ये आम्ही सगळे नगरसेवक आहोतच शिवाय आम्ही सगळे लोकांच्या गुडबुकमध्येही आहोत त्यामुळेच लोकांनी मोठ्या मतांनी आम्हाला निवडून देत पालिकेत पाठवलं आहे त्यामुळे आम्ही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत

पत्रकार परिषदेचे आभार शहराध्यक्ष सुषमा लोखंडे यांनी मानले.
कराड पालिकेतील राजकारण आता अधिकच तापू लागल्याचे दिसत आहे सेना भाजप च्या संघर्षात आता विरोधी गट नेते गुंड्याभभाऊ वाटेगावकर यांनी लोकशाही आघाडी शिवसेनेचे च्या खांद्यावर बंदूक ठेवून पालिकेत राजकारण घडवून आणत असल्याचा आरोप केलात्यामुळे आता सेना-भाजप च्या अंतर्गत धुस्फुसित लोकशाही आघाडी ला वाटेगावकर यांनी ओढून घेत शहराच्या राजकारणात नवी वाट चोखाळली आहे दरम्यान कराडचे नगराध्यक्ष यादव यांनी केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळून नगराध्यक्ष  आमच्या प्रश्नांची चुकुची उत्तरे देत कराडच्या नागरिकांना भरकटत ठेवत आहेत त्यात शहराचे नुकसानच असल्याचे सूतोवाच गुंड्याभभाऊ वाटेगावकर यांनी केले
सर्किट हौस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

वाटेगावकर पुढे म्हणाले...यशवंतराव चव्हाण हे आमचे व सर्व राज्याचे दैवत आहे त्यांच्या समधीलगत होणाऱ्या नेकलेस रोड साठी अतुलबाबांनी मोठा निधी आणला आहे तिथून होणार हा मार्ग शहराच्या विकासात भर घालणारा ठरणार आहे अनेक ठिकाणी अतुलबाबांच्या माध्यमातून शहरात निधी येत असताना सत्ताधारी मात्र खोटे आरोप करत तो निधी शहरांसाठी वापरण्याचे टाळत आहेत यामध्ये विकासापेक्षा राजकारण दिसत आहे आणि हे शहराच्या भविष्यासाठी योग्य होणार नाही आपल्या आसपास असणाऱ्या अनेक पालिकेच्या विकासाचा रेशीओ पहिला तर कराड पालिका खूप मागे असल्याचे दिसते हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले

घनकचरा प्रकल्पाच्या घोटाळ्याचा पुनरुचार करत त्यांनी सध्या देखील याच भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती चालू असल्याचे आताच्या कामकाजावर टीका करत पटवून दिले 
ते म्हणाले...माझ्यावर खंदारे यांच्या गाडीत बसून जाण्याचा आरोप होतो तो पूर्ण खोटा आहे मी त्या खंदारे च्या तोंडाकडे पण पहात नव्हतो... गाडीत बसण्याचा प्रश्नच येत नाही
अतुल बाबांना तुम्ही खोटी माहिती देता...या आरोपावर बोलताना वाटेगावकर म्हणाले...नगराध्यक्षनी काही आरोप केले तरी स्वतः अतुलबाबा याबाबत कधी काही बोलले आहेत का? असे खोटे आरोप करून नगराध्यक्ष शहराला भरकटवत आहेत...

शहरातील उर्दू शाळा, असेल किंवा 40 फुटी रस्त्याचा विषय असेल तसेच अनेक अशा शहरातील अनेक चर्चेच्या विषयांना हात घालत आपण कराडच्या विकासासाठी नेहमीच आग्रही राहणार असून त्यासाठी ज्यावेळी बोलायची गरज भासेल तेव्हा नक्कीच बोलणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले

नगरसेवक अजय पावसकर म्हणाले...सोमवार पेठेतील त्या वादग्रस्त रस्त्याबाबत तोडगा काढू असे सांगत नगराध्यक्ष यादव यांनी मला सांगितलं होतं पण चर्चेला बसू बसू अस करत त्यांनी वेळ घालवला व त्यानंतर हा विषय सभेत पार पडला
नगरसेवक शिवाजी पवार व आशुतोष दुबल यांनीही चर्चेत सहभागी होत सत्ताधारी पार्टीच्या आरोपांना फेटाळले व पालिकेतील भाजप पार्टी अतुलबाबांच्या नेतृत्वात शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले

आभार शहराध्यक्ष सुषमा लोखंडे यांनी मानले


Thursday, August 6, 2026

कराडातील दोन हॉटेल्सना टाळे; मुदतबाह्य व संशयास्पद खाद्यपदार्थ आढळलेउपशीर्षक : अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी; अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, पुढील आदेशापर्यंत हॉटेल्स बंद

वेध माझा ऑनलाइन।
: सातारा जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने कराड शहरातील विविध हॉटेल्समध्ये विशेष तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान दोन हॉटेल्समध्ये मुदतबाह्य तसेच संशयास्पद खाद्यपदार्थ आढळून आल्याने संबंधित हॉटेल्सना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तपासणीदरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आले. आढळून आलेल्या खाद्यपदार्थांची तपासणी व पुढील कायदेशीर कार्यवाही अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती मिळाली.

या कारवाईनंतर शहरात कोणत्या हॉटेल्सवर कारवाई झाली, याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली. तसेच नागरिकांनी अन्नाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कऱ्हाडमध्ये दोन हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; संबंधित हॉटेल केली सील !कोणकोणत्या हॉटेलवर झाली कारवाई ?



वेध माझा ऑनलाइन
जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने कराड शहरातील विविध हॉटेलची तपासणी मोहीम राबविली असता या कारवाईत दोन हॉटेलमध्ये मुदतबाह्य आणि संशयास्पद खाद्यपदार्थ आढळून आले त्यामुळे संबंधित हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणी दरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आले. 
दरम्यान ही कारवाई शहरातील कोण- कोणत्या हॉटेलवर  झाली याबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे

दरम्यान
नागरिकांनी केलेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी ही विशेष तपासणी करण्यात आली. अशी  माहिती सातारा जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली.