Friday, August 7, 2026

लोकशाही आघाडी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहे; –पत्रकार परिषदेत गुंड्याभाऊ वाटेगावकर यांचा आरोप ;

वेध माझा ऑनलाईन।
: कराड नगरपालिकेतील राजकारण दिवसेंदिवस अधिकच तापत असून भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. विरोधी गटनेते गुंड्याभाऊ वाटेगावकर यांनी लोकशाही आघाडीवर टीका करत, शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून पालिकेतील राजकारण घडवून आणले जात असल्याचा आरोप केला. तसेच नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे चुकीची उत्तरे देऊन कराडकर नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

वाटेगावकर म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे संपूर्ण राज्याचे दैवत असून त्यांच्या समाधीलगत होणाऱ्या नेकलेस रोडसाठी आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. हा मार्ग शहराच्या विकासाला चालना देणारा ठरेल. शहरातील विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध होत असतानाही सत्ताधारी खोटे आरोप करून त्या निधीचा उपयोग टाळत आहेत. यामध्ये विकासापेक्षा राजकारणच अधिक दिसत असून त्यामुळे शहराचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कराड नगरपालिकेच्या विकासाची तुलना आजूबाजूच्या पालिकांशी केली असता कराड विकासाच्या बाबतीत मागे पडल्याचेही त्यांनी नमूद केले. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कथित गैरव्यवहाराचा पुनरुच्चार करत, सध्या सुरू असलेल्या कामकाजातही त्याच प्रकारच्या अनियमितता सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
आपल्यावर खंदारे यांच्या वाहनातून प्रवास केल्याचा करण्यात आलेला आरोप फेटाळून लावत वाटेगावकर म्हणाले, "हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. मी त्यांच्या गाडीत बसण्याचा प्रश्नच येत नाही."
नगराध्यक्षांकडून आमदार डॉ. अतुल भोसले यांना चुकीची माहिती दिली जात असल्याच्या आरोपावर ते म्हणाले, "नगराध्यक्ष आरोप करत असले तरी स्वतः आमदारांनी कधीही असे आरोप केलेले नाहीत. खोटे आरोप करून शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे."
उर्दू शाळा, ४० फुटी रस्ता तसेच शहरातील अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर भाजप सातत्याने आवाज उठवत राहील. शहराच्या विकासासाठी जेव्हा गरज भासेल तेव्हा आम्ही ठामपणे भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नगरसेवक अजय पावसकर म्हणाले, सोमवार पेठेतील वादग्रस्त रस्त्याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले होते. मात्र, चर्चेच्या नावाखाली वेळकाढूपणा करण्यात आला 
नगरसेवक शिवाजी पवार आणि आशुतोष डूबल तसेच अतुल शिंदे यांनीही सत्ताधाऱ्यांचे आरोप फेटाळून लावत, भाजप आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
शेवटी अतुल शिंदे म्हणाले...आमदार साहेबांच्या गुडबुक मध्ये आम्ही सगळे नगरसेवक आहोतच शिवाय आम्ही सगळे लोकांच्या गुडबुकमध्येही आहोत त्यामुळेच लोकांनी मोठ्या मतांनी आम्हाला निवडून देत पालिकेत पाठवलं आहे त्यामुळे आम्ही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत

पत्रकार परिषदेचे आभार शहराध्यक्ष सुषमा लोखंडे यांनी मानले.
कराड पालिकेतील राजकारण आता अधिकच तापू लागल्याचे दिसत आहे सेना भाजप च्या संघर्षात आता विरोधी गट नेते गुंड्याभभाऊ वाटेगावकर यांनी लोकशाही आघाडी शिवसेनेचे च्या खांद्यावर बंदूक ठेवून पालिकेत राजकारण घडवून आणत असल्याचा आरोप केलात्यामुळे आता सेना-भाजप च्या अंतर्गत धुस्फुसित लोकशाही आघाडी ला वाटेगावकर यांनी ओढून घेत शहराच्या राजकारणात नवी वाट चोखाळली आहे दरम्यान कराडचे नगराध्यक्ष यादव यांनी केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळून नगराध्यक्ष  आमच्या प्रश्नांची चुकुची उत्तरे देत कराडच्या नागरिकांना भरकटत ठेवत आहेत त्यात शहराचे नुकसानच असल्याचे सूतोवाच गुंड्याभभाऊ वाटेगावकर यांनी केले
सर्किट हौस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

वाटेगावकर पुढे म्हणाले...यशवंतराव चव्हाण हे आमचे व सर्व राज्याचे दैवत आहे त्यांच्या समधीलगत होणाऱ्या नेकलेस रोड साठी अतुलबाबांनी मोठा निधी आणला आहे तिथून होणार हा मार्ग शहराच्या विकासात भर घालणारा ठरणार आहे अनेक ठिकाणी अतुलबाबांच्या माध्यमातून शहरात निधी येत असताना सत्ताधारी मात्र खोटे आरोप करत तो निधी शहरांसाठी वापरण्याचे टाळत आहेत यामध्ये विकासापेक्षा राजकारण दिसत आहे आणि हे शहराच्या भविष्यासाठी योग्य होणार नाही आपल्या आसपास असणाऱ्या अनेक पालिकेच्या विकासाचा रेशीओ पहिला तर कराड पालिका खूप मागे असल्याचे दिसते हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले

घनकचरा प्रकल्पाच्या घोटाळ्याचा पुनरुचार करत त्यांनी सध्या देखील याच भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती चालू असल्याचे आताच्या कामकाजावर टीका करत पटवून दिले 
ते म्हणाले...माझ्यावर खंदारे यांच्या गाडीत बसून जाण्याचा आरोप होतो तो पूर्ण खोटा आहे मी त्या खंदारे च्या तोंडाकडे पण पहात नव्हतो... गाडीत बसण्याचा प्रश्नच येत नाही
अतुल बाबांना तुम्ही खोटी माहिती देता...या आरोपावर बोलताना वाटेगावकर म्हणाले...नगराध्यक्षनी काही आरोप केले तरी स्वतः अतुलबाबा याबाबत कधी काही बोलले आहेत का? असे खोटे आरोप करून नगराध्यक्ष शहराला भरकटवत आहेत...

शहरातील उर्दू शाळा, असेल किंवा 40 फुटी रस्त्याचा विषय असेल तसेच अनेक अशा शहरातील अनेक चर्चेच्या विषयांना हात घालत आपण कराडच्या विकासासाठी नेहमीच आग्रही राहणार असून त्यासाठी ज्यावेळी बोलायची गरज भासेल तेव्हा नक्कीच बोलणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले

नगरसेवक अजय पावसकर म्हणाले...सोमवार पेठेतील त्या वादग्रस्त रस्त्याबाबत तोडगा काढू असे सांगत नगराध्यक्ष यादव यांनी मला सांगितलं होतं पण चर्चेला बसू बसू अस करत त्यांनी वेळ घालवला व त्यानंतर हा विषय सभेत पार पडला
नगरसेवक शिवाजी पवार व आशुतोष दुबल यांनीही चर्चेत सहभागी होत सत्ताधारी पार्टीच्या आरोपांना फेटाळले व पालिकेतील भाजप पार्टी अतुलबाबांच्या नेतृत्वात शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले

आभार शहराध्यक्ष सुषमा लोखंडे यांनी मानले


Thursday, August 6, 2026

कराडातील दोन हॉटेल्सना टाळे; मुदतबाह्य व संशयास्पद खाद्यपदार्थ आढळलेउपशीर्षक : अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी; अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, पुढील आदेशापर्यंत हॉटेल्स बंद

वेध माझा ऑनलाइन।
: सातारा जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने कराड शहरातील विविध हॉटेल्समध्ये विशेष तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान दोन हॉटेल्समध्ये मुदतबाह्य तसेच संशयास्पद खाद्यपदार्थ आढळून आल्याने संबंधित हॉटेल्सना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तपासणीदरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आले. आढळून आलेल्या खाद्यपदार्थांची तपासणी व पुढील कायदेशीर कार्यवाही अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती मिळाली.

या कारवाईनंतर शहरात कोणत्या हॉटेल्सवर कारवाई झाली, याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली. तसेच नागरिकांनी अन्नाच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कऱ्हाडमध्ये दोन हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; संबंधित हॉटेल केली सील !कोणकोणत्या हॉटेलवर झाली कारवाई ?



वेध माझा ऑनलाइन
जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने कराड शहरातील विविध हॉटेलची तपासणी मोहीम राबविली असता या कारवाईत दोन हॉटेलमध्ये मुदतबाह्य आणि संशयास्पद खाद्यपदार्थ आढळून आले त्यामुळे संबंधित हॉटेल पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणी दरम्यान काही ठिकाणी अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक स्वरूपात निदर्शनास आले. 
दरम्यान ही कारवाई शहरातील कोण- कोणत्या हॉटेलवर  झाली याबाबत शहरात चर्चा सुरू झाली आहे

दरम्यान
नागरिकांनी केलेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी ही विशेष तपासणी करण्यात आली. अशी  माहिती सातारा जिल्ह्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी दिली.

मराठी साहित्यविश्वाने एक सर्जनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक गमावला - आमदार डॉ अतुल भोसले यांची लेखक श्रीनिवास कुलकर्णी यांना श्रद्धांजली ;

वेध माझा ऑनलाईन।
मराठी साहित्यविश्वातील ख्यातनाम ललित लेखक, संवेदनशील शब्दशिल्पकार आणि 'डोह'कार म्हणून सर्वदूर परिचित असलेले कराडचे ज्येष्ठ साहित्यिक मा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक सर्जनशील, अभ्यासू आणि व्रतस्थ साहित्यिक गमावला आहे अशा शब्दात आमदार अतुलबाबा भोसले यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

'डोह', 'सोन्याचा पिंपळ', 'पाण्याचे पंख' आणि 'कोरडी भिक्षा' यांसारख्या अजरामर साहित्यकृतींमधून त्यांनी मराठी भाषेला समृद्ध केले. त्यांच्या लेखणीतून ग्रामीण जीवन, मानवी संवेदना आणि निसर्गाशी असलेले नाते अत्यंत प्रभावीपणे उभे राहिले. त्यांचे साहित्य महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभर पोहोचले आणि इंग्रजीसह अन्य भाषांमध्येही अनुवादित झाले, ही मराठी साहित्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

महाराष्ट्र शासनाचा २०२५ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार तसेच अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. अर्धशतकाहून अधिक काळ त्यांनी अखंड साहित्यसाधना करत मराठी वाङ्मयाला मोलाचे योगदान दिले.

मा. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत, त्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना तसेच असंख्य साहित्यप्रेमींना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने साहित्यविश्वाची मोठी हानी –कुलकर्णी कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वाहिली श्रद्धांजली ;

वेध माझा ऑनलाईन।
कराडचे ज्येष्ठ साहित्यिक, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या शोकसंदेशात श्री. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि मूल्यनिष्ठ साहित्यिक हरपला आहे. पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा, डोह आणि सोन्याचा पिंपळ यांसारख्या साहित्यकृतींमधून त्यांनी आपल्या वेगळ्या अनुभवविश्वाचा अत्यंत प्रभावी आविष्कार वाचकांसमोर मांडला. त्यांच्या लेखनाला चित्रदर्शी शब्दकलेची लाभलेली जोड, चित्रकलेतील संस्कारातून आलेली दृष्यमयता, निसर्गाच्या सूक्ष्म निरीक्षणातून वर्णनात उतरलेला बारकावा आणि अनुभवाच्या तळाशी पोहोचणारी पारदर्शी लेखनशैली यामुळे त्यांच्या साहित्याने एक वेगळीच उंची गाठली."

"ललित लेखनाला नवे परिमाण देणारे लेखक म्हणून श्रीनिवास कुलकर्णी यांचे नाव साहित्य क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचे साहित्य मराठीपुरते मर्यादित न राहता कानडी, बंगाली तसेच इंग्रजी भाषेतही पोहोचले. महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्यरत्न पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा 'विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार' प्राप्त होणे ही त्यांच्या अर्धशतकाहून अधिक काळाच्या साहित्यसेवेची योग्य पावती होती. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा समस्त कराडकरांना नेहमीच सार्थ अभिमान राहिला आहे."

"श्रीनिवास कुलकर्णी यांच्या निधनाने सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल मी तीव्र शोक व्यक्त करतो. कुलकर्णी कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना," अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली.

Wednesday, August 5, 2026

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ भारत सरकारचे स्वतंत्र संचालक भरत पाटील (नाना) यांचे स्व जयवंतराव भोसले यांना अभिवादन । कराडचे माजी नगरसेवक हणमंतराव पवार, बापूसाहेब सावंत, आप्पा सावंत यांची उपस्थिती ।

वेध माझा ऑनलाईन।
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देणारे आणि कृष्णा उद्योग समूहाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावणारे सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (भारत सरकार)चे स्वतंत्र संचालक भरत पाटील (नाना), कराडचे माजी नगरसेवक हनुमंतराव पवार, बापूसाहेब सावंत, आप्पा सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, उद्योग, शेती, आरोग्य, शिक्षण आणि समाजकारण या विविध क्षेत्रांत भरीव योगदान देत ग्रामीण विकासाची व्यापक संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांच्या नेतृत्वातून उभ्या राहिलेल्या विविध संस्था आणि उपक्रमांमुळे अनेकांना विकासाची संधी मिळाली.
आप्पासाहेबांनी जपलेली सहकाराची मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या विकासाची भूमिका आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या कार्याचा हा समृद्ध वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.