Thursday, July 31, 2025

माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री, तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला कराडकर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिराचे उद्घाटन कराड नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार, सुरेश पाटील व राहुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून करण्यात आले.
शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. विशेषतः महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत समाजासमोरील आपले कर्तव्य पार पाडले. प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
हा उपक्रम राहुल भोसले आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजात रक्तदानाबाबत जागरूकता वाढवण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

Wednesday, July 30, 2025

डॉ अतुलबाबा भोसले यांचे कट्टर समर्थक रोखठोक युवा नेते समाधान चव्हाण(बापू)यांचा वाढदिवस दणक्यात साजरा ; विविध स्तरातील मान्यवरांच्या "बापू' ना शुभेच्छा...

वेध माझा ऑनलाइन
आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांचे कट्टर समर्थक व युवा नेते समाधान चव्हाण (बापू)यांचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला आमदार अतुल भोसले यांनी युवा नेते श्री चव्हाण याना भेटून शुभेच्छा दिल्या 
सर्व स्तरातील मान्यवरांनी श्री चव्हाण यांना यावेळी शुभेच्छा देत शुभचिंतन केले

युवा नेते समाधान चव्हाण हे आमदार अतुल भोसले यांचे अतिशय जवळचे व कट्टर कार्यकर्ते मानले जातात मनाने अतिशय मनमोकळा स्वभाव असणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे जे मनात ते मुखात असा त्यांचा स्वभाव आहे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो मागील एका नगरपरिषद निवडणुकित थोड्या फरकाने त्यांची विजयश्री हुकली होती शाहूंचौक मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजू लोकांना मदतीचा हात देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे कोविड च्या काळात त्यांनी खूप मोठे काम केले आहे त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे सर्व स्तरातील लोकांमध्ये त्यांना सन्मानाचे स्थान आहे
भाजप चे आमदार डॉ अतुल भोसले यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात त्यांच्या आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत श्री चव्हाण यांनी डॉ भोसले यांच्या झेंड्याला खांद्यावर घेत किल्ला लढवला आहे आमदार भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी  सकाळीच भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या श्री चव्हाण यांना शहरातील नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते तसेच मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांचे शुभचिंतन केले  
त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले गेले

माजी नगरसेवक सुहास पवार ऍक्शनमोड मध्ये... थेट कराड पालिकेत जाऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी ;

वेध माझा ऑनलाइन 
कराड शहरात वाखान परिसरासह अनेक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे  अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे त्याठिकाणी नागरिकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक सुहास पवार यांनी थेट पालिका गाठत प्रशासनाला केली आहे

माजी नगरसेवक सुहास पवार यांनी शहरासह वाखान परिसरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिकेला केली आहे त्याकरिता त्यांनी कराड पालिकेत जाऊन मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या समस्येवर उपाय काढण्याची विनंती केली आहे
या मोकाट कुत्र्यांनी शहरातील विविध भागातील वृद्ध तसेच महिला व लहान मुलांना झुंडीने हल्ला करत चावा घेतल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत
दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील मोकाट कुत्र्यांनी वाखाण परिसरातील लहान मुले व काही महिलांना चावा घेतल्याची घटना घडल्याने त्याठिकाणी घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याठिकाणच्या रहिवास्यानी सुहास पवार यांना भेटून या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केल्याने सुहास पवार यांनी पालिका गाठत संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या समस्येबाबत उपाययोजना करा असे सांगितले आहे त्यानंतर पालिकेने या मोकाट कुत्र्यांची धरपकड करत त्यांची नसबंदी देखील करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे त्यामुळे आता ही समस्या आटोक्यात येण्यास मदत होणार आहे   

Tuesday, July 29, 2025

दहशतवाद्यांना मातीत गाडलं; संसदेतील नरेंद्र मोदींचे खणखणीत भाषण ; म्हणाले ... काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही ; ट्रम्प यांनी मध्यस्ती केल्याचं फेटाळलं ; काँग्रेस पाकिस्तानवर निर्भर होत चाललंय ; काँग्रेसने पाकिस्तानने केलेले खोटे दावे पसरवले ;

वेध माझा ऑनलाइन
पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला आम्ही घेतला, 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने 22 मिनिटात घेतला आणि दहशतवाद्यांना गाढलं असा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना पोसणाऱ्या आकांची आजही झोप उडाली असं नरेंद्र मोदी म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पासून ते सिंधूरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला असं नरेंद्र मोदी संसदेत आपल्या भाषणात म्हणाले. 

मोदी म्हणाले
पहलगामवरील हल्ला म्हणजे भारताला हिंसेचा खाईत लोटण्याचं आणि देशात दंगे करण्याचा प्रयत्न होता. पण देशवासियांच्या एकीमुळे तो प्रयत्न फसला. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाढणार असा संकल्प मी त्यावेळी केला होता. या हल्ल्याची सजा दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना मिळणार. 22 एप्रिल रोजी हा हल्ला झाल्यानंतर मी परदेशातून लागोलाग आलो. त्या दिवशी एक बैठक बोलावली आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणार असा निश्चय केला.
आमच्या सैन्यबलाच्या संकल्पावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिली. त्यांनीच ठरवावं की कुठे आणि कधी हल्ला करायचा, सैन्याला सर्व अधिकार दिले. त्यानंतर सैन्याने अशी कारवाई केली की त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणारे आजही थरथरतात.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर केवळ तीन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. तर भारताच्या बाजूने जगभरातून पाठिंबा मिळाला. जगभरातून समर्थन मिळालं पण माझ्या देशातील विरांना काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही हे दुर्दैव.पहलगामच्या हल्यानंतर मोदींची 56 इंच छाती कुठे गेली असा प्रश्न विचारण्यात आला. दहशतवादी हल्ल्यानंतरही काँग्रेसने राजकारण केलं. काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाच्या सैन्यबलाचे मनोबल कमी होत होतं. काँग्रेसला ना भारताच्या समार्थ्यावर विश्वास आहे ना भारतीय सैन्यावर.आमचा हल्ला निश्चित होता, आमचे ध्येय निश्चित होतं. भारताने ते लक्ष्य पूर्ण केलं. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं. जगातल्या कोणत्याही नेत्याने हा हल्ला थांबवण्यासाठी विनंती केली नाही हे मी जबाबदारीने सांगतोय.
9 मे रोजी अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे सातत्याने मला फोन करत होते. तीन-चार वेळा फोन केल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, असं जर झालं तर पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल. भारत त्यापेक्षाही मोठा हल्ला करेल. आम्ही गोळीला उत्तर गोळीने देणार.

पाकिस्तानने जर यापुढे असं काही केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल. आजचा भारत हा आत्मविश्वासाने भरला आहे. आजचा भारत हा आत्मनिर्भर आहे. एकीकडे भारत गतीने पुढे जात आहे, पण दुसरीकडे काँग्रेस मतांसाठी पाकिस्तानवर निर्भर होत आहे. काँग्रेसकडून राजकारणासाठी जनतेमध्ये अविश्वास निर्माण केला जात आहे.

सातत्याने भारतीय सैन्याच्या कामगिरीवर काँग्रेसने अविश्वास दाखवला आहे. देशाने नुकताच कारगिल विजय दिवस साजरा केला. पण काँग्रेसने कधीही कारगिर विजय दिवस साजरा केला नाही. ज्या वेळी डोकलाममध्ये भारतीय सैन्य धाडस दाखवत होतं, त्यावेळी काँग्रेसचे नेते कुणाकडून छुपी माहिती घेत होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. आताही काँग्रेसने पाकिस्तानला क्लीन चिट दिली. पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा पुरावा काँग्रेस मागत आहे. नेमकी हीच मागणी पाकिस्तान करत आहे. आज ज्यावेळी त्यांना सगळे पुरावे दिले तर त्यांची अवस्था बिथरल्यासारखी झाली आहे. 

भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले. 9 मे रोजी पाकिस्तानने एक हजार ड्रोन मिसाईलच्या माध्यमातून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे मिसाईल भारताच्या कोणत्याही ठिकाणी पडू शकत होते. पण ते सर्व मिसाईल भारताने हवेतच नष्ट केले. भारतीयांना याचा अभिमान वाटला. पण काँग्रेसने पाकिस्तानने केलेले खोटे दावे पसरवण्याचा प्रयत्न केला असंही मोदी म्हणाले.

केंद्र सरकारसोबत पत्र व्यवहार करण्यासाठी हिंदी भाषा सक्तीची नाही :

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी आणि मराठी भाषेचा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शाळेत इयत्ता 1 ली पासून त्रिभाषा सूत्रीचा निर्णय घेत हिंदी भाषा सक्तीची करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विरोधकांनी केला होता. तसेच, या निर्णयाविरुद्ध रस्त्यावर उतरत विरोध केल्यानंतर सरकारने हा निर्णय माघारी घेतला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारनेही काही दिवसांपूर्वी हिंदी भाषा केंद्राने सक्तीची केली नसून त्रिभाषासूत्री सक्तीची असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर, आता पुन्हा एकदा हिंदी भाषा सक्तीची नसल्याचे केंद्र सरकारने म्हटलं आहे. केंद्र सरकारसोबत पत्र व्यवहार करण्यासाठी हिंदी भाषा सक्तीची नसून पत्रव्यवहार करणाऱ्या राज्यांना त्यांच्या मातृभाषेत पत्रव्यवहार करता येणार आहे.

यापुढे चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत: फडणवीस यांची सर्वच मंत्र्यांना तंबी ;

वेध माझा ऑनलाइन
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही मंत्री चांगलेच वादात सापडले आहेत. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा बेडरुममधला एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत त्यांच्या खोलीत पैशांनी भरलेली एक बॅग होती. त्यानंतर पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन रमी गेम खेळताना दिसले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.  या सर्व बाबी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच मंत्र्यांना तंबी दिली आहे. यापुढे चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत, असं फडणवीसांनी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे.फडणवीसांनी घेतला मंत्र्यांचा क्लासराज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगल्या खात्यांसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी,  ग्रामविकास विभाग, विधी व न्याय विभागाअंतर्गत वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आल्या. दरम्यान, याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांचा क्लास घेतला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले ... माझ्यावर पाळत का? माझं तोंड बंद करण्याचा प्रयत्न होतोय…सरकार कशाला आणि का घाबरतंय?खडसे भडकले;

वेध माझा ऑनलाइन
एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केली. यासंदर्भात बोलताना एकनाथ खडसेंनी माझ्या जावयाला अडकवण्यात येत असल्याचा दावा केलाय. एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी एक मोठा आरोप केला.माझ्या स्वत:च्या घराबाहेर साध्या वेशात आठ ते दहा पोलीस पत्रकार परिषदेत पाळत ठेऊन होते आणि पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांसोबत आत येऊन बसले. माझ्यावर पाळत ठेवण्याचे काय कारण? असा सवाल एकनाथ खडसेंनी उपस्थित केला. खडसे पुढे असेही म्हणाले की, हे पोलीस असा वेशात घरामध्ये येऊन बसले आणि पोलिसांना पत्रकार परिषदेमध्ये येऊन बसण्याचा कोणी अधिकार दिला. या राज्यात काय सुरू आहे? मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि बोलण्याचा अधिकार असताना माझं तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होतोय? असा सवाल करत खडसेंनी सरकारवरच निशाणा साधला. माझ्या छातीवर दहा-दहा पोलीस का आणून ठेवले जाताय? यामागे नेमकं कारण काय? सरकार कशाला आणि का घाबरतंय? असे सवाल उपस्थित करत खडसेंनी सरकारकडे या प्रश्नांवरील उत्तरांची मागणी केली आहे.