Saturday, February 29, 2020

अतिक्रमण कारवाई करताना यापुढे दुकानचे बोर्ड काढणार नाही - यशवंत डांगे यांनी हा निर्णय तात्पुरता असल्याचं सांगितलं...कारवाईची पद्धत चुकीची असल्याच्या व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया...

कराड
गेले तीन दिवसांपासून सुरू असणारी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम ही यापुढे ही अशीच चालू राहणार आहे. शहरातील व्यापाऱ्यांबरोबर या मोहिमे संदर्भात झालेल्या मीटिंग मधून व्यापाऱ्यांची सकारात्मक भूमिका समोर आली .ही मोहीम अशीच चालू ठेवा असे या व्यापाऱ्यांनि यावेळी सांगितले.ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या नुकसान भरपायीबद्दल हे व्यापारी रीतसर मागणी करणार आहेत मात्र या पुढे ही कारवाई होताना दुकानचे बोर्ड न काढण्याबाबत तात्पुरता निर्णय झाला असल्याचे कराड पालिकेचे c o यशवंत डांगे यांनी आज येथे सांगितले.दरम्यान ही  कारवाई  कौतुकास्पद आहे मात्र ती राबवण्याची पद्धत चुकीची असल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने दिल्या आहेत.

आज येथील व्यापारी पेठेतील अतिक्रमणे काढण्यात आली.त्यावेळी काही दुकानदारांच्या दुकानाच्या नावाच्या पाट्या असणाऱ्या बोर्डाचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी येथील काही व्यापाऱ्यांनि केल्या.काहींचे बोर्ड 20 ते 30 हजाराचे होते.तर काहींचे 50 हजार व त्याच्याही पेक्षा महाग होते अस सांगण्यात आले.त्या नुकसान भरपाईची व्यवस्था काय?हा प्रश्न या व्यापाऱ्यांना होता.त्या कारणाने नाराज होत या सर्व व्यापाऱ्यांनि आज प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला.त्यावेळी झालेल्या प्रशासनाबरोबरच्या मीटिंग मध्ये या विषयावर चर्चेतून पडदा पडला असे समजले.त्यामुळे ही मोहीम या पुढे अशीच चालू ठेवण्या बाबत व्यापाऱ्यांनि संमती दर्शवली असेही समजते.


गेली तीन दिवस सुरू असणारी ही मोहीम आता संभाजी मार्केट, पोपटभाई पेट्रोल पम्प, भेदा चौक या ठिकाणी आता आम्ही हाती घेतोय.आत्ता पर्यंत झालेली मोहीम व्यवस्थित पार पडली .शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याच टार्गेट ठेऊन आमची यापुढची  मोहीम शहरातून पार पडणारआहे असेही डांगे यांनी यावेळी सांगितले.दरम्यान ही चालू असलेली कारवाई कौतुकास्पद आहे,मात्र ती राबवण्याची पद्धत चुकीची असल्याच्या प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिल्या.



.

No comments:

Post a Comment