Sunday, March 1, 2020

कराडात...जे. सी. बी. च्या दहशतीची चर्चा .....!!

कराड-
(अजिंक्य गोवेकर यांजकडून)
आज रविवार, सुट्टीचा दिवस.आणि त्याचमुळे आज अतिक्रमण मोहीमेलाही सुट्टी. पण गेली चार दिवस अतिक्रमण मोहीम शहरात मोठ्या जोमाने चालू असल्यानं आजही ही मोहीम कुठे सुरू आहे का? अशी धास्ती सध्या लोकांमध्ये आहे.कोणत्याही गाडीचा आवाज ऐकला तर अतिक्रमण काढण्यासाठी वापरण्यात आलेला जे.सी. बी. आला की काय ?अशी भीती वाटून लोक घर अथवा दुकान बाहेर येऊन  jcb आला तर नाही ना ? याची खात्री करताना दिसत आहेत.त्यामुळे सध्या  त्याच जे. सी. बी. ची लोकांच्यात दहशत निर्माण झाली आहे...

गेली चार दिवस शहरातील अतिक्रमणे हटाव मोहीम पालिकेच्या व येथील पोलिसांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.शहरातील प्रमुख मार्गावरील बहुतेक अतिक्रमणे पालिका प्रशासनाने काढली आहेत.काही अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणची अतिक्रमणे ही वादाच्या भोवऱ्यातून सलामतपणे बाहेर निघाली असल्याचे आत्तापर्यंतचे चित्र आहे.येथील व्यापाऱ्यांचा मोठा रोष या मोहिमेवर आहे.आमचे मोठे नुकसान पालिकेने केल्याचा आरोप त्यांच्याकडून सध्या होताना दिसतोय.व्यापाऱ्यांच्या दुकानवरील फलकांचे, कोणाचे हजारात तर कोणाचे लाखात नुकसान झाल्याचे हे व्यापारी सांगत आहेत. अगोदर जरी सांगितले असते तरी आम्ही तुम्हाला आमची अतिक्रमणे काढून सहकार्य केले असत असा व्यापाऱ्यांनाचा पवित्रा आहे.त्यांचे झालेले नुकसान भरून मिळावे म्हणून त्यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेतली.शहरातून मोर्चा काढला.निवेदने दिली.या सगळ्या बाबी घडून झाल्यानंतर ही मोहीम आज सुट्टीच्या कारणाने थंड आहे.तरी लोकांना शहरातून फिरताना भकास झालेले रस्ते, बोडकी दुकाने,निराश व्यापारी,व हतबल झालेले किरकोळ व्यापारी पाहून नैराश्याच्या गर्तेत शहर बेवारसासारखं एकाकी उदास होऊन जगाच्या नकाशावरून एका कोपऱ्यात फेकलं गेलं आहे की काय अस वाटावं आशा परिस्थितीत सध्या दिसत आहे. एखाद्या ठिकाणची दहशतीच्या सावटाखालील वातावरणाची मानसिकता काय असू शकते हे सहज समजाव इतपत शहरातील व्यावहारिक वातावरण गढूळ झाल्याचे दिसून येतंय...
अनेक अतिक्रमणे शेड स्वरूपात,तर अनेक पक्की बांधकामे स्वरूपात पहायला मिळाली.त्यात कोणाचीच गय केली गेली नाही.एखादं,दुसर अतिक्रमण वशीलेबाजीच्या नावाखाली चर्चेत आल... मात्र बहुतेक सरसकट काढली गेली आणि तीही कोणत्याही अडचनिशिवाय...
अर्थातच jcb च्या साहाय्याने...
आणि म्हणूनच आज जरी या मोहिमेला सुट्टी असली तरी एखादं वाहन जोरात आवाज करत आलं तरी jcb आला की काय अशी धास्ती वाटून आजही अनेकजण पळत येऊन ...jcb आला नाही ना?...याची खात्री करताना दिसत आहेत......
याला म्हणायच जे सी बी ची दहशत...अशी शहरात चर्चा आहे.





No comments:

Post a Comment