वेध माझा ऑनलाइन - गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 11 हजार 394 नव्या रुग्णांची भर पडली असून 68 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 21 हजार 667 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत मात्र राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 68 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख 13 हजार 436 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.40 टक्के आहे. सध्या राज्यात 7 लाख 95 हजार 422 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2447 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 54 लाख 10 हजार 043 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
No comments:
Post a Comment