वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीला मोठा दणका बसला, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं, राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीमधील तीन्ही घटक पक्षांचे मिळून राज्यात 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावे लागले.विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातून अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीसमोर आहे.
No comments:
Post a Comment