वेध माझा ऑनलाइन
पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे, हवामान विभागाकडून देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं असून, या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळामुळे उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
यासोबतच अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार वीजा आणि मेघगर्जनेची देखील शक्यता आहे, असंही आयएमडीनं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पूर्वोत्तर भारतामधील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये पुढील सात दिवस मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
उत्तर भारतामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम पावसासोबतच बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार पुढील काही दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव राहणार असून, काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढू शकतो.
No comments:
Post a Comment