Monday, February 17, 2025

विद्यार्थ्यांनो पुस्तकांशी मैत्री करा ; कल्याण कुलकर्णी सरांचा विद्यार्थ्यांना सल्ला ;

वेध माझा ऑनलाइन।
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची दिशा ठरवली पाहिजे. मी कोण होणार? हे आत्ताच ठरवा. जर भविष्याचा वेध घेतला तरच जीवनात यश मिळू शकते. त्यासाठी आपल्या जीवनात मोबाईलचा वापर कमी करा,पुस्तकांशी मैत्री करा असे प्रतिपादन हौसाही विद्यालयाचे शिक्षक श्री कुलकर्णी यांनी केले 
ते दिगंबर काशिनाथ पालकर माध्यमिक विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या "सेंड ऑफ" कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते

ते म्हणाले ज्या शाळेने चांगले संस्कार, जीवन घडवण्याची प्रेरणा आपणास दिली त्या शाळेला कदापिही विसरू नका भारतीय संस्कृती ही आदर्श संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये आई, वडील यांच्यानंतर शिक्षकांचे महत्त्व आहे, शिक्षक हा तुमचे जीवन घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर रहा त्यामुळे आपण आपले खेळ संस्कृती, आपली नाती विसरत चाललो आहोत. त्यामुळे वाचाल तर वाचाल या संकल्पनेप्रमाणे पुस्तकांशी दोस्ती करा. असेही ते म्हणाले

No comments:

Post a Comment