Thursday, October 30, 2025

पत्रकार विद्या मोरे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

वेध माझा ऑनलाइन
कराड येथील News Bharat 24 च्या ब्युरो चीफ आणि Daily Latest News च्या प्रतिनिधी पत्रकार विद्या मोरे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सातारा जिल्हा उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अमरावती येथे पार पडलेल्या संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. या बैठकीस केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे, केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे, केंद्रीय संपर्कप्रमुख रवींद्र मेंढे, सातारा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे हे उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार ही नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीबद्दल कराड ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पत्रकार विद्या मोरे यांचे अभिनंदन केले. तसेच आमदार डॉ. अतुल बाबा भोसले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवासजी पाटील, रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील, डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार, तहसीलदार कल्पना ढवळे, प्रांत अधिकारी अतुल म्हेत्रे, यशवंत आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, लोकशाही आघाडीचे नेते सुभाषराव पाटील, लोकसेवा आघाडीचे नेते जयवंत पाटील, तसेच कराडमधील सर्व आजी-माजी नगरसेवक आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्ह्याचे माजी पदाधिकारी यांनीही सौ. विद्या मोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Monday, October 27, 2025

महिला स्वयंरोजगार व उद्योग मेळावा कराडमध्ये — 28 ऑक्टोबर रोजी भव्य आयोजन

वेध माझा ऑनलाइन।
अखिल भारतीय मराठा महासंघ आणि शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला स्वयंरोजगार व उद्योग मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा मंगळवार, दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता होणार असून, कराड अर्बन बँक हेड ऑफिस, शताब्दी हॉल, कराड येथे पार पडणार आहे.

या मेळाव्याचा उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी मार्गदर्शन करणे, लघुउद्योग व गृहउद्योगाची माहिती देणे आणि त्यांच्यात उद्यमशीलतेची जाणीव निर्माण करणे असा आहे. तसेच या मेळाव्यात सहभागी महिलांना विविध उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती, प्रशिक्षण, मार्केटिंग संधी आणि सरकारी योजना यांची माहितीही दिली जाईल.


‘जिजाऊ सर्व्हिसेस’ — घरबसल्या उत्पादनासाठी सुवर्णसंधी

कराड शहरातील महिला आणि युवकांसाठी ‘जिजाऊ सर्व्हिसेस’ यांनी घरबसल्या लघुउद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या संस्थेचा मुख्य उपक्रम म्हणजे Buy Back Agreement, ज्यामध्ये तयार केलेला माल संस्थेकडून परत खरेदी केला जातो. त्यामुळे उत्पादकांना विक्री किंवा मार्केटिंगची चिंता करण्याची गरज नाही.

संस्थेच्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहे —

पूर्णपणे भारतीय मशिन प्रॉडक्शन

सर्वाधिक मोबदल्याचे बायबॅक अॅग्रीमेंट

देशभर मालवाहतूक सुविधा

मशीन मेंटेनन्स व प्रशिक्षणासाठी 100% मार्गदर्शन

सध्या चालू असलेले प्रकल्प:
1. फुल्ली ऑटोमॅटिक कपूर मेकिंग प्रोजेक्ट – कच्चा माल पुरवला जातो, मजुरी प्रती किलो ५० रुपये; तयार मालाचे दर प्रती किलो ५० रुपये

2. साबराणी धूप कप प्रोजेक्ट – तयार मालाचे दर प्रती किलो ३० रुपये

यामुळे महिलांना घरबसल्या उद्योग सुरु करून नियमित उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होते.

‘जिजाऊ सक्सेस’ व ‘भारत ई-सेवा केंद्र’ — स्वावलंबन आणि रोजगारासाठी नवे मार्ग

आजच्या महागाईच्या काळात घरगुती उत्पन्न वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. या उद्देशाने ‘जिजाऊ सक्सेस’ या संस्थेमार्फत महिलांना, युवकांना व उद्योजक वृत्ती असलेल्या नागरिकांना रोजगारनिर्मितीची संधी देण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत इच्छुक नागरिकांना “भारत ई-सेवा केंद्र” सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांद्वारे नागरिकांना बँकिंग सेवा, सरकारी योजना, पॅन, पासपोर्ट, विमा, आरटीओ, पेन्शन, जॉब कार्ड, हेल्थ कार्ड, मोबाइल रिचार्ज अशा विविध ऑनलाइन सेवा एका ठिकाणी मिळतात.

यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सुविधा मिळतील तसेच इच्छुकांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्याची संधी उपलब्ध होईल.


उद्योगाधारित प्रशिक्षण व मार्गदर्शन
‘जिजाऊ सक्सेस’ संस्थेमार्फत महिलांना व युवकांना खालील क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे:

सेंद्रिय शेती उत्पादन उद्योग

अन्न प्रक्रिया व दुग्ध प्रक्रिया उद्योग

ग्रामीण लघु व कुटीर उद्योग

फॅब्रिकेशन उद्योग

बाळ व महिलांसाठी हस्तकला उत्पादन उद्योग


संस्थेचे उद्दिष्ट आहे घरबसल्या आर्थिक स्वावलंबन निर्माण करणे, महिला आणि युवकांना सशक्त करणे, आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना देणे.

संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की —

> “स्वावलंबन हा खरा सशक्तीकरणाचा मार्ग आहे. आपल्या कौशल्यांचा वापर करून घरबसल्या आर्थिक स्वावलंबन साधता येऊ शकते, आणि या उपक्रमांमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला मोठा चालना मिळणार आहे.”

आज कराडच्या "जनशक्ती' च्या समर्थकांसह आणखी कोण- कोण भाजपमध्ये प्रवेश करणार?

वेध माझा ऑनलाइन
शहरातील संपूर्ण जाधव गटासह जनशक्तीचे  समर्थक काल सकाळी मुंबईला रवाना झाले जनशक्ती आघाडीसह काही इतर पार्टीतले माजी नगरसेवक देखील आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वात व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत दरम्यान मंगळवारी हा प्रवेश होणार असे नक्की झाले होते मुंबईत हा प्रवेश होईल असेही समजले होते या विषयाबाबत आमदार अतुल भोसले यांनी जाधव यांच्याशी चर्चाही केली होती ती चर्चा यशस्वी झाली होती  यासाठी माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी मध्यस्थी केली होती त्यानुसार आज हे सर्व प्रवेश होणार आहेत दरम्यान अतुल शिंदे यांनी यापूर्वीच भाजप चे सदस्यपद स्वीकारले आहे
दरम्यान काल मुंबईत पोहोचल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कराडातून आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन त्याठिकाणी स्वागत केले
 
आज भाजपमध्ये कोण, कोण प्रवेश करणार? ...त्यांची नावे पुढीलप्रमाणे...

 अरुण  जाधव (माजी नगरसेवक)
 शारदाताई जाधव (माजी नगराध्यक्षा)
 आशुभाऊ जाधव 
 विनायक विभुते (माजी नगरसेवक)
आर जी लुणिया 
श्रीमती अरुणताई शिंदे (माजी नगरसेविका)
सौ चंदाराणी लुणिया (माजी नगरसेविका)
सतिश यादव 
सुनील निगडीकर
गिरीष शहा 
सूर्यकांत काटू 
बागडी मॅडम 
शिवाजी पवार (तात्या)
संजय पवार 
अशोक भोसले (माजी नगराध्यक्ष)
आनंदराव पालकर (माजी नगरसेवक)


यासह आणखी एका नगरसेवकचा प्रवेश आजच होणार होता...मात्र तब्बेत बरी नसल्याने हा प्रवेश पुढे ढकलण्यात आल्याचे समजले...हा नगरसेवक कोण? याची चर्चा सध्या कराडमध्ये सुरू आहे

अरुण जाधव, शारदाताई जाधव, आशुतोष जाधव यांच्यासह 16 जनशक्ती आघाडीचे समर्थक मुंबईल झाले रवाना; आज आमदार अतुल भोसलेंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्याशी करणार चर्चा ; उद्या होणार जाहीर प्रवेश ;

वेध माझा ऑनलाईन
कराड शहरातील संपूर्ण जाधव गटासह एकूण 16 जनशक्तीचे समर्थक आज सकाळी मुंबईला रवाना झाले उद्या जनशक्ती आघाडी आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत त्यापूर्वी आजच्या दिवशी सायंकाळी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी जाधव गट आपल्या जनशक्तीच्या सहकाऱ्यांसह मुंबईला रवाना झाला आहे 

दरम्यान मंगळवारी हा प्रवेश मुंबईत होणार असे नक्की झाले होते या विषयाबाबत आमदार अतुल भोसले यांनी जाधव यांच्याशी चर्चाही केली होती ती चर्चा यशस्वी झाली होती त्यासाठी माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी मध्यस्थी केली होती त्यानुसार आज  संपूर्ण जनशक्ती आघाडीचे सर्व मेम्बर्स  मुंबईला रवाना झाले आहेत उद्या मंगळवारी हा प्रवेश होणार आहे 

कराडच्या राजकारणात ऐन दिवाळीत आता रंग भरू लागले आहेत शहरात नगराध्यक्ष पदासाठी ओपन आरक्षण पडले असल्याने या निवडणुकीत अनेकजण इच्छुक आहेत त्यातच माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव यांच्या समवेत माजी नगरसेवक अतुल शिंदे यांच्या मध्यस्थीने काही दिवसापूर्वी बैठक पार पडली होती आमदार डॉ अतुल भोसले हे स्वतः बैठकीस हजर होते बैठकीतील चर्चेनंतर या महिन्याच्या अखेरीस जाधव गट संपूर्ण जनशक्ती आघाडीसह भाजप मध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळाली होती
दरम्यान शहरातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजप सहित शिवसेना व काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांची गर्दी आहे तसेच आणखी बरीच नावे चर्चेत आली आहेत त्यामध्ये या रेसमध्ये किती जण राहतात व कितीजण नुसतीच चर्चा करतात हे लवकरच कळणार आहे त्यातच शहरांतील जाधव गटाची एन्ट्री भाजप मध्ये होणार अशीही चर्चा बरेच दिवस होत आहे मात्र भाजप बरोबर जाधव गटाची बैठक होऊन उद्या (मंगळवारी) संपूर्ण जनशक्ती चा मुंबईत भाजप प्रवेश होईल यावर आता शिक्का मोर्तब झाले आहे
अरुण जाधव शारदाताई जाधव व आशुतोष जाधव यांच्यासह एकूण 15 ते 16 प्रमुख मान्यवर हा प्रवेश करतील असे वृत्त आहे
या सर्वांनी भाजप मध्ये यावे यासाठी स्वतः आमदार डॉ अतुल भोसले प्रयत्नशील व  इच्छुक आहेत आणि त्यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे जनशक्तीचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी यासाठी यशस्वी मध्यस्थी व प्रयत्न केले आहेत.

Sunday, October 26, 2025

कराड पालिका निवडणुक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार - दिवाळी फराळ कार्यक्रमात काँग्रेसचा निर्धार ;

वेध माझा ऑनलाइन
 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार असून याबाबत कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम न बाळगता एकजुटीने कामाला लागावे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जनतेच्या सहकार्याने विजय मिळवेल,  असा विश्वास कराड दक्षिण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पाटील यांनी व्यक्त केला. दिवाळी निमित्त आयोजित फराळ संवाद कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, युवानेते इंद्रजीत चव्हाण, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा वैशाली जाधव, गजानन आवळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रदीप जाधव, कराड दक्षिण काँग्रेसचे उपाध्यक्ष नानासो जाधव, सातारा जिल्हा काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष दिग्विजय सूर्यवंशी, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऍड. अमित जाधव, कराडचे माजी नगरसेवक अशोकराव पाटील, शिवाजी जमाले, रवि बडेकर, सुरेश भोसले, प्रदीप शिर्के आदीसह काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील म्हणाले की, काँग्रेस हा जुना व अनुभवी पक्ष असून आपल्याला या मतदार संघात काँग्रेसचे अनुभवी नेते लाभले आहेत यामुळे आजपर्यंत कराड दक्षिणचा योजनापूर्ण असा विकास होत गेला आहे. कराडला पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या रूपाने मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला आणि त्या काळात व नंतरच्या आमदारकीच्या कार्यकाळात पृथ्वीराज बाबांनी कराड दक्षिणमध्ये करोडो रुपयांची विकासकामे आणली व कराडचा चेहरा-मोहराच बदलला. अजूनही अनेक विकास कामांची भूमिपूजन व उदघाट्न सुरु आहेत. 
यावेळी इंद्रजीत चव्हाण, ऍड. अमित जाधव, अजितराव पाटील, वैशाली जाधव, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव दिग्विजय सूर्यवंशी आदींची भाषणे झाली. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.

Saturday, October 25, 2025

कराडात आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांचे रस्त्यात पडलेल्या खड्डयात बसून आंदोलन ; त्याठिकाणी रांगोळी काढून फटाकेही वाजवले ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील अनेक रस्त्यावर मोठयाप्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी खड्डयामधे बसून यमाच्या प्रतिमेचे पुजन केले. तसेच खड्डयांभोवती रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी, भिमशक्ती सामाजीक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आनंदराव लादे, जान फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेद नायकवडी, दत्तात्रय दुपटे, विजय काटरे, संजय कांबळे, विकास लोंढे, दत्तात्रय पवार, मल्हारी गुजले, आसिफ मुल्ला व कार्यकर्ते उपस्थित होते.शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठयाप्रामणात खड्डे पडल्याने दुचाकीस्वारांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. तर अपघातात शारीरीक दुखापतीबरोबरच वाहनांचेही नुकसान होत आहे. याबाबत अनेकदा मागणी करूनही खड्डे मुजवले जात नसल्याने शहरातील आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनोखे आंदोलन करून पालिकेचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान रस्ते खड्डेमय झाल्याने पालिका प्रशासनाने संमंधित ठेकेदारावर कारवाई करावी तसेच खड्डयांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

विश्वनाथ फुटाणे यंदा कराड पालिकेची निवडणूक लढवणार ; ते म्हणाले...भाजप ने तिकीट दिल्यास प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक ;

वेध माझा ऑनलाईन।
भाजपचे कराड शहर सरचिटणीस व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अनुलोम संघटनेचे सदस्य अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे कराड शहर अध्यक्ष विश्वनाथ फुटाणे कराडच्या प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास ते त्याठिकाणी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असे त्यांनी म्हटले आहे

विश्वनाथ फुटाणे हे गेली 15 वर्षे  भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत फडणवीस यांच्या अनुलोम संघटनेचे ते सदस्य आहेत आर एस एस चे विचार उराशी बाळगणारे फुटाणे हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शहर अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत  भाजप नेते विक्रम पावसकर व आमदार डॉ अतुल भोसले यांचे नेतृत्व ते मानतात ते स्वतः ओबीसी समाजाचे आहेत ओबीसी समाजाचे युवा कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित आहेत त्यांना भाजपचे निष्ठावन्त म्हणून ओळखले जाते कोणाला कसलीही अडचण असेल तर ते मदतीसाठी नेहमी पुढे असतात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजपचे आमदार डॉ अतुल भोसले यांचा जोमाने प्रचार केल्याचे दिसले

त्यांचे समाजकार्य अनेकवर्षं सातत्याने प्रभाग क्रमांक 15 मध्ये सुरू आहे कोविड मध्ये त्यांनी केलेलं काम न विसरता येण्यासारखे आहे वार्डात लसीकरण मोहीम असेल मतदार नोंदणी मोहीम असेल तसेच परिसरातील महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी त्याठिकाणी राबवले आहेत तसेच विविध  शासकीय योजनांचा जनतेला लाभ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न दिसले आहेत 
त्यांनी प्राथमिक सदस्यापासून सुरुवात करत भाजप मधून आपले कार्य चालू ठेवले आहे प्रथम बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख. तसेच तीन वर्ष कामगार मोर्चा शहर अध्यक्ष आणि मागील तीन वर्षांपासून भाजपचे कराड शहर सरचिटणीस म्हणून ते काम पहात आहेत लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबविण्यामध्ये ते सक्रिय होते मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुलोम या संस्थेत कार्यरत आहेत फडणवीस यांनी स्वतः त्यांना रामाची मूर्ती भेट दिली आहे 
प्रभाग क्र 15 मध्ये सर्व रोग निदान शिबीर, आयुष्मान कार्ड शिबीर, रेशन कार्ड विषयक शिबीर, आधार अपडेट्स इ सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून विशेष ओळख आहे  टोलमाफी संदर्भात आंदोलन करत त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता
ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह एका छोट्या व्यवसायातून करतात आणि त्यातूनच आर्थिक बचत करत सामाजिक कार्यासाठी ते आपली तरतूद करून स्वखर्चाने अनेक सामाजिक उपक्रमांना मूर्त स्वरूप देताना दिसतात त्यांना असणारी सामाजिक कार्याची आवड एवढंच त्यामागाचे कारण आहे 15 नंबर प्रभागात ओबीसी आरक्षण पडले आहे त्यासाठी त्यांनी आपली मोर्चेबांधणी त्याठिकाणी केली आहे भाजप पक्षाने तिकीट दिल्यास त्याठिकाणी ते निवडणूक लढवणार आहेत असे ते म्हणाले आहेत

Friday, October 24, 2025

या महिनाखेरीस... जाधव गटासह संपूर्ण जनशक्ती आघाडी भाजपमध्ये प्रवेश करणार ! मुंबईत होणार प्रवेश सोहळा ! 8 ते 10 जणांचा होणार प्रवेश!

वेध माझा ऑनलाईन।
अखेर जाधव गटासह संपूर्ण जनशक्ती आघाडीचा भाजप मध्ये प्रवेश होणार हे आता नक्की झालं आहे अशी माहिती आहे या महिना अखेरीस म्हणजे येत्या मंगळवारी हा प्रवेश होणार आहे मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होईल असे समजते या विषयाबाबत आमदार अतुल भोसले यांनी जाधव यांच्याशी चर्चा केली होती ती चर्चा यशस्वी झाली असल्याची माहिती आहे माजी नगरसेवक अतुल शिंदे यांनी यासाठी मध्यस्थी केली होती दरम्यान संपूर्ण जनशक्ती आघाडीचे सर्व मेम्बर्स भाजप मध्ये मुंबईत जाऊन प्रवेश करणार आहेत अशी माहिती आहे

कराडच्या राजकारणात ऐन दिवाळीत आता रंग भरू लागले आहेत शहरात नगराध्यक्ष पदासाठी ओपन आरक्षण पडले असल्याने या निवडणुकीत अनेकजण इच्छुक आहेत त्यातच माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव यांच्या समवेत माजी नगरसेवक अतुल शिंदे यांच्या मध्यस्थीने 2 दिवसापूर्वी बैठक पार पडली होती आमदार डॉ अतुल भोसले हे स्वतः बैठकीस हजर होते बैठकीतील चर्चेनंतर या महिन्याच्या अखेरीस जाधव गट संपूर्ण जनशक्ती आघाडीसह भाजप मध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळाली होती
दरम्यान कराडच्या नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे नगराध्यक्ष पदासाठी ओपन आरक्षण पडले आहे त्यामुळे भाजप सहित शिवसेना व काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी आहे बरीच नावे चर्चेत आली आहेत त्यामध्ये या रेसमध्ये किती जण राहतात व कितीजण नुसतीच चर्चा करतात हे लवकरच कळणार आहे त्यातच शहरांतील जाधव गटाची एन्ट्री भाजप मध्ये होणार अशीही चर्चा बरेच दिवस होत आहे मात्र भाजप बरोबर जाधव गटाची बैठक होऊन या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात संपूर्ण जनशक्ती चा मुंबईत भाजप प्रवेश होईल यावर शिक्का मोर्तब झाले आहे असे कळते
अरुण जाधव शारदाताई जाधव व आशुतोष जाधव यांच्यासह एकूण 8 ते 10 जण हा प्रवेश करतील असे समजते
या सर्वांनी भाजप मध्ये यावे यासाठी स्वतः आमदार डॉ अतुल भोसले प्रयत्नशील व  इच्छुक आहेत आणि त्यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे जनशक्तीचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक अतुल शिंदे यांच्यावर जाधव गटाच्या भाजप प्रवेशाची जबाबदारी आहे आणि अतुल शिंदे यांच्याच मध्यस्थीने यासंबंधीची बैठक 2 दिवसापूर्वी पार पडली होती ती बैठक यशस्वी होऊन मुंबईत या संपूर्ण गटाचा शेवटच्या आठवड्यात भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे 
 

Thursday, October 23, 2025

दिवाळी सण झाला ; आता... प्रतीक्षा "त्या' "नवीन चेहऱ्याच्या' उमेदवाराची ; भाजपचे नेतृत्व कोणाचे नाव जाहीर करणार ? कोण आहे "तो' नवीन चेहरा? शहरात जोरदार चर्चा;

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या रिंगणात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अनेकजण शड्डू ठोकून उमेदवारीसाठी तयार आहेत भाजप मात्र या निवडणुकीत नवीन चेहरा उमेदवार म्हणून बाहेर काढून सर्वांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे तो नवीन चेहरा कोण?याचीच चर्चा यानिमित्ताने शहरात सुरू आहे
दरम्यान ओपन नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत असल्याने कोणतीच पार्टी किंवा राजकीय पक्ष युती किंवा आघाडी करण्याच्या मनस्थितीत नाहीये कारण प्रत्येकाला या पदासाठी निवडणूक लढवायची आहे... कारण एखाद्या पार्टीकडे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार नसेल... तर ती नामुष्कजनक बाब असल्याने प्रत्येकाला यात स्वतंत्रपणे उतरावे लागणार आहे

दरम्यान शहरातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना,लोकशाही आघाडी तसेच एम आय एम तसेच काँग्रेस व भाजप हे सगळे राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत त्यामुळे यासाठी इच्छुक उमेदवारांची नावे देखील पुढे आली आहेत त्यातील कोण उमेदवार चालेल हे आताच सांगू शकत नाही, आता या उमेद्वारांबद्दल शहरात फक्त चर्चा सुरू आहेत त्यात आता भाजप कडून एका नव्या चेहऱ्याला उमेदवार म्हणून पुढे करून धक्कातंत्र अवलंबल जाईल अशी शक्यता  आहे 
भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक उमेदवार इच्छुक आहेत जिल्ह्यात खासदार भाजप चा... सर्वाधिक आमदार भाजप चे... अशी अवस्था आहे... आणि माजी नगराध्यक्षा देखील बऱ्यापैकी भाजपच्याच होत्या... असे असल्यामुळे एकूण जिल्ह्यात भाजप कडून या पदासाठी क्लेम सांगितला जात आहे....
कराडात भाजप कडून याच धर्तीवर राजकीय ड्रीष्ट्या "कोरी पाटी' असलेला उमेदवार  जाहीर होणार अशी दाट शक्यता आहे
त्यातच आता दिवाळी सण नुकताच संपन्न झाला आहे त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी खर्या अर्थाने आता सुरू होणार आहे त्यामुळे भाजप नेतृत्वाकडून कधी एकदा त्या "नवीन' चेहऱ्याच्या उमेदवाराची घोषणा होते याचीच शहराला प्रतीक्षा लागली आहे
भाजप ने अनेक ठिकाणी असे प्रयोग करत राज्यभरात नवीन चेहरे दिले आणि निवडूनही आणले आहेत...
ही स्टेटजी राबवताना भाजप ने अनेक स्थानिक स्वराज संस्थेत व इतर निवडणुकीतदेखील यापूर्वी हा प्रयोग ऐनवेळी केलाय आणि धक्काही दिला आहे...असाच प्रयोग कराड पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत भाजप करेल अशी अशी माहिती मिळत आहे...आमदारकी आणि खासदरकीच्या निवडणुकीला देखील भाजपने हीच स्टेटजी बऱ्याच ठिकाणी  अवलंबली आहे
कराड चे भाजप शहर अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी पेच निर्माण झाला असता तो निर्णय बराच काळ प्रलंबित ठेवला गेला त्यानंतर मात्र राष्ट्रवादी च्या नगराध्यक्षा म्हणून कराडमध्ये ज्यांनी यापूर्वी  यशस्वीपणे काम पाहिले आहे अशा सौ सुषमा लोखंडे यांची अचानकपणे वर्णी लावून भाजप ने शहराला धक्काच दिला...असाच धक्का शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबद्दल भाजप  यावेळी देणार असेही वृत्त आहे

सुनील नाकोड प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक ; म्हणाले...भाजपचे तिकीट मिळाले तर निवडणूक लढवणार...

वेध माझा ऑनलाईन
भाजपचे कराड शहर सचिव व भाजप च्या ओबीसी विभागाचे माजी शहर अध्यक्ष सुनील नाकोड यांनी कराडच्या प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे
स्वतः ओबीसी असूनही ओपन प्रवर्गामधून त्याठिकाणी आपण तिकीट मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले

सुनील नाकोड हे गेली 15 वर्षे  भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत हिंदू एकता आंदोलनाचे ते सक्रिय कार्यक्रर्ते देखील आहेत भाजप नेते विक्रम पावसकर व आमदार डॉ अतुल भोसले यांचे नेतृत्व ते मानतात सुनील नाकोड हे ओबीसी समाजाचे युवा नेते म्हणूनही परिचित आहेत भाजपचे निष्ठावन्त म्हणून ते ओळखले जातात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते मदतीसाठी नेहमी पुढे असतात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजपचे आमदार डॉ अतुल भोसले यांचा जोमाने प्रचार केल्याचे दिसले

त्यांचे समाजकार्य देखील अनेकवर्षं सातत्याने प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुरू आहे कोविड मध्ये त्यांनी स्वतः त्या परिसरात प्रतिबंधक औषध फवारणी केली होती शहरात पाणी टंचाई झाली असता स्वतःच्या खर्चाने टँकर ने त्या भागात पाणीपुरवठा केला होता  लसीकरण मोहीम असेल तसेच मतदार नोंदणी मोहीम असेल तसेच परिसरातील महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी त्याठिकाणी राबवले आहेत तसेच विविध  शासकीय योजनांचा जनतेला लाभ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न दिसले आहेत 
त्यांच्यासह त्यांच्या पत्नीचा सहभाग देखील त्याठिकाणी त्यांच्या बरोबरीने अनेक सामाजिक कार्यात दिसला आहे

गेल्या 2 पिढ्यांपासून त्यांचा भेळ पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय आहे त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत त्यातूनच आर्थिक बचत करत सामाजिक कार्यासाठी ते आपली तरतूद करून स्वखर्चाने अनेक सामाजिक उपक्रमांना मूर्त स्वरूप देताना दिसतात त्यांना असणारी सामाजिक कार्याची आवड एवढंच त्यामागाचे कारण आहे ओबीसी समाजासाठी देखील त्यांचे काम मोठे आहे सोमवैशिय क्षत्रिय समाजाच्या युवक मंडळाचे अध्यक्ष म्हणून  देखील ते सक्रिय काम पहात आहेत

त्यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी मिळाल्यास भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे

Tuesday, October 21, 2025

जरांगेंचा सरकारवर निशाणा, काय दिला इशारा?

वेध माझा ऑनलाईन-मनोज जरांगे पाटलांनी सरकार शेतकऱ्यांना फक्त तात्पुरता आनंद देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, सरकारच्या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांचे काहीही भले होणार नाही. सरकारचे धोरणच असे आहे की, लोकांना केवळ आशेला लावून फसवणूक करायची. सणासुदीच्या काळातही सरकार शेतकऱ्यांशी आणि जनतेशी जाणूनबुजून खेळत असल्याचे जरांगे पाटलांनी म्हटले आहे.पुढे जरांगे पाटील असेही म्हणाले की,  शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजनं काहीही साध्य होत नाही, तो फक्त क्षणिक दिलासा असतो, ज्याचा अर्थ शेवटी फसवणूकच होतो. सध्या दिवाळी, भाऊबीज आणि पाडवा हे सणांचे दिवस सुरू असल्याने, या काळात तात्पुरती गर्दी टाळण्यासाठी जरांगे पाटलांनी आपल्या पुढील योजना पुढे ढकलल्या आहेत. पाडव्यानंतर राज्यातील शेतकरी अभ्यासक, तज्ज्ञ आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून भविष्यातील आंदोलनाची तारीख जाहीर केली जाईल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

शिवसेना पक्ष कोणाचा ? ऍड असीम सरोद म्हणालेे ; उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल देताच येणार नाही, आणि एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागणारच नाही,

वेध माझा ऑनलाईन।
शिवसेना पक्ष चिन्ह आणि नावाबाबतची सुनावणी १२ नोव्हेंबरपासून सुरु होते आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. २०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले. कारण निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंचं आहे असा निकाल दिला होता. त्यानंतर बऱ्याच तारखा पडल्या पण हे प्रकरण प्रलंबित राहिलं. आता शिवसेना कुणाची याबाबत सुनावणी सुरु होते आहे. दरम्यान याबाबत ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे.

ते म्हणाले...
वारंवार तारीख देण्याची जी प्रक्रिया आहे ती वाईट पातळीला पोहचली आहे. न्यायाला उशीर होणं हा अन्यायच आहे. तारीख देण्याच्या माध्यमातून अन्याय होत असेल, अन्यायाला खतपाणी मिळत असेल तर हा मुद्दा गंभीर आहे. उद्धव ठाकरेंची बाजू संवैधानिक पातळीवर अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे जो निर्णय आहे तो न्यायालयाने त्वरित द्यावा असं मला वाटतं अस ऍड सरोदे यांनी म्हटले आहे
उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल देताच येणार नाही. कारण त्यांची बाजू मजबूत आहे. जो काही निकाल द्यायचा आहे तो निकाल लवकरात लवकर न्यायालयात द्यावा अशी माझी मागणी आहे. एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागला तर काय? हा प्रश्नच काल्पनिक आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागणारच नाही. हे माझंच म्हणणं नाही ज्यांना कायदा कळतो, संविधान कळतं ते कुणीही हे सांगतील. एकनाथ शिंदेंचा प्रवास ज्यांना कळला आहे त्यांनाही हे माहीत आहे. कारण एकनाथ शिंदेंनी पक्ष चोरला आहे. निष्ठा विकली आहे. त्यांनी संविधानाची मोडतोड करुन अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदही गाजवलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य आहे. कायदेशीर आणि संवैधानिक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच लागू शकतो असेही ऍड सरोदे यांनी सांगितले

रायगडमध्ये तटकरेंच्या राजकारणाला मोठा धक्का ;

वेध माझा ऑनलाईन
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये रायगडमधील संघर्ष चांगलाच पेटला आहे. पालकमंत्री पदावरून सुरू झालेली राजकीय कुरघोडी आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी तीव्र झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी दिवाळीतच मोठा धमाका केला आहे. रायगडमध्ये गोगावले यांनी सुनील तटकरे यांना धक्का दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथीची सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सुनील तटकरे आणि अजितदादा पवार यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे विकास गायकवाड यांनी आज अधिकृतपणे शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. 
मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या घटनाक्रमामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

शरद पवार यांचे विश्वासू आमदार राजीव देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

वेध माझा ऑनलाईन
विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
 त्यांच्या निधनामुळे चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे

मी भाजपात येतोय मला घ्यायला सांगा…

वेध माझा ऑनलाईन।
मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाच्या काही नेत्यांबाबत महत्त्वपूर्ण दावा केला आहे. सामंत यांच्या मते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्नशील आहेत. विशेषतः, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांच्यामार्फत हे नेते भाजपमध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधत असल्याचे सामंत यांनी बोलून दाखवले. या संदर्भात बोलताना उदय सामंत यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

उदय सामंत म्हणाले की, एकीकडे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे सांगणारे नेते भाजपमध्ये प्रवेशासाठी का प्रयत्न करत आहेत, हा प्रश्न निर्माण होतो. सामंत यांनी अशा नेत्यांना त्यांच्या सध्याच्या पक्षातच काम करण्याचा सल्ला दिला. राजकारणातील या दुहेरी भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रत्नागिरीतील स्थानिक राजकारणाचा संदर्भ देत सामंत यांनी त्यांच्यावर चार वेळा विरोधकांनी निशाणा साधल्याचे नमूद करत, आपण सक्षम असल्याचेही स्पष्ट केले. ही राजकीय घडामोड महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणात नवीन चर्चांना वाव देत आहे.

माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे जेष्ठ बंधू जयसिंगराव पाटील यांचे निधन ;


वेध माझा ऑनलाईन।
रयत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांचे जेष्ठ बंधू जयसिंगराव बाळकृष्ण पाटील (बापू )वय ९५ यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या निधनाने उंडाळे परिसरावर शोककाळा पसरली असून येथील व्यापाऱ्यांनी ऐन दिवाळीत सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जयसिंगराव पाटील यांचा जन्म १० ऑक्टोबर १९३१ साली उंडाळे येथे झाला १९५२ मध्ये ते उंडाळे गावचे पहिले सरपंच झाले तर तालुक्यातील शेती उत्पन्न बाजार समिती कराड तालुका देखरेख संघ कराड पाटण तालुका सुपरवायझिंग युनियन गजानन हाउसिंग सोसायटी या संस्थांवर ही त्यांनी काम केले. डोंगरी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी १९६६ मध्ये स्थापन झालेल्या ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्षपदी त्यांनी दीर्घकाळ पार पाडले त्यांच्या काळामध्ये संस्थेचा मोठ्या प्रमाणावर शाखा विस्तार झाला . पुढे डोंगरी भागात रयत सहकारी साखर कारखाना उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता रयत कारखान्याचे चेअरमन पदही त्यांनी दीर्घकाळ सांभाळले उंडा ळे विभागातील ते एक चालते बोलते लोकन्यायालय होते विभागातील कोणतेही तंटे ते पोलीस स्टेशन बाहेरच मिटवत त्यामुळे त्यांचा विभागात दरारा होता त्यांना शासनाचा दलित मित्र पुरस्कार दिल्लीचा राष्ट्रीय रत्न पुरस्कार विजय दिवस समारोह कराडचा जीवनगौरव पुरस्कार यासह विविध पुरस्कार मिळाले होते भारदस्त आवाज उत्तम वक्तृत्व आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर डोंगरी विभागातील स्थानिक प्रश्न बंधू विलासराव पाटील उंडाळकर यांच्या माध्यमातून सोडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता प्रचंड लोक संग्रह व विभागाची जाण असणारा नेता म्हणून ते विभागात ओळखले जात होते. लोकनेते स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या राजकीय जीवनात ते त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे राहिले जयसिंगराव पाटील यांचा 10 ऑक्टोबर 2025 रोजी 95 वा वाढदिवस संपन्न झाला यावेळी त्यांनी आपल्या आप्तेष्ट व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा ही स्वीकारल्या होत्या. दहाच दिवसापूर्वी शुभेच्छा दिलेल्या नेत्याला आज निरोप देण्याची वेळ आल्याने कार्यकर्त्यांना शोक अनावर झाला होता त्यांच्या पश्चा त चिरंजीव व ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे चेअरमन अँड. आनंदराव पाटील (राजाभाऊ), पुतणे रयत साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील उंडाळकर, हायकोर्ट चे वकील अँड. विजयसिंह पाटील, दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे .

Monday, October 20, 2025

राज ठाकरेंचे थेट निवडणूक आयोगाला आव्हान ;

वेध माझा ऑनलाईन।
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवत भाजपला सवाल केला. तर, दुसरीकडे मनसे अध्यक्षांनी मतदार यादीवरून थेट निवडणूक आयोगाला आव्हान दिले आहे. मतदारयादीबाबतचे आक्षेप दूर होत नाही तोपर्यंत निवडणुका होता कामा नये असे राज ठाकरे यांनी म्हटले.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, स्थानिक पक्ष संपवून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्याकडे आलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, जवळपास 96 लाख मतदार यादीत घुसवले आहेत. प्रत्येक शहरात लोकं घुसवले आहेत असे होणार असेल तर निवडणुका कश्यासाठी घेता, कशासाठी मतदान घेता. तुम्ही मतं द्या, नाही तर नका देऊ मॅच फिक्स असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. हे कोणत्या ना कोणत्या प्रकारचे हे षडयंत्र आहे ही कोणत्या प्रकारची निवडणूक आहे. जर मतदार याद्या सेट असतील तर तुम्ही मतदान करा नाही तर नका करू, याकडे ही राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, मी निवडणूक आयोगावर बोलतो तर तुम्हाला का जळतय. मला कळत नाही सत्ताधारी पक्षाची लोकं का चिडत आहेत. हीच माणसं जेंव्हा विरोधी बाकावर गेले तेंव्हा हेच बोलत होते. राज ठाकरे यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2014 च्या निवडणूक प्रचारातील भाषण दाखवले. या भाषणात नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर शंका उपस्थित करत सवाल केले होते.

कृष्णा नर्सिंग’च्या ६४ विद्यार्थ्यांची ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निवड : कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मिळाली नोकरीची सुवर्णसंधी:

वेध माझा ऑनलाईन।
येथील कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील ६४ विद्यार्थ्यांना ठाण्यातील सुप्रसिद्ध ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये नुकत्याच झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली असून, यामध्ये ५५ मुली व ९ मुलांचा समावेश आहे. 

या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी ज्युपिटर हॉस्पिटलच्या डेप्युटी नर्सिंग अधिकारी मंगला लोखंडे, नर्सिंग को-ऑर्डिनेटर हकीम सिंग, नर्स एज्युकेटर साहस आवळे, व्यवस्थापिका पूजा रासल आणि  वरिष्ठ मॅनेजर कांचन केदार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कृष्णा विश्व विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलच्या प्रमुख डॉ. युगांतरा कदम व कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी नर्सिंग पदवी, पदव्युत्तर, पदविका व जी.एन.एम. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या ६४ विद्यार्थी-विद्यार्थीनींची मुलाखतीद्वारे स्टाफ नर्स पदासाठी निवड करुन, त्यांना तत्काळ ऑफर लेटर प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. कदम म्हणाल्या, की सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी १९८३ साली कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाची स्थापना केली. आप्पासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा आज कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वटवृक्ष झाला आहे. 
सद्य:स्थितीत कृष्णा नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये जी.एन.एम. नर्सिंग, बी.एससी. नर्सिंग, पोस्ट बी.एससी. नर्सिंग, नर्स प्रॅक्टिशनर इन क्रिटीकल केअर, एम.एससी. नर्सिंगसह पी.एचडी. अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यार्थी प्रवेश घेतात. विशेषत: ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना या संस्थेमुळे नर्सिंग शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. या संस्थेत शिक्षण घेतलेले दोन हजारहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थींनी ब्रिटन, आखाती देशांसह देशविदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलने नर्सिंग स्टाफच्या भरतीसाठी कृष्णा नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन, या महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रशंसा केली असल्याचे उद्‌गार डॉ. मोहिते यांनी काढले.
याप्रसंगी प्लेसमेंट सेलचे तेसज भोसले, प्रकाशे नरेगल, अफसाना मुल्लाणी यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सेना भवनाच्या पायरीवर डोकं ठेवले, त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
: मनसे नेते बाळा नांदगावकर हे तब्बल 24 वर्षानंतर शिवसेना भवनात पोहोचले होते, निमित्त होतं पत्रकार परिषदेचं. मात्र, यानिमित्ताने त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील आठवणींना उजाळा मिळाला. ऐन दिवाळीच्या सणात दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षातील आठवणींनी त्यांचा कंठ दाटून आला होता. यावेळी, शिवसेना भवनाच्या आणि बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत डोळ्यातून अश्रू आले. शिवसेना भवनमध्ये येताच, त्यांनी पायरीवरच माथा टेकवत दर्शन घेतले. तसेच,  दोन भाऊसुद्धा शिवसेना भवनात आपल्याला एकत्र पाहायला मिळतील, असेही त्यांनी म्हटले. 

मुंबई महापालिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. तब्बल 22 वर्षानंतर उद्वव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरुन एकत्र आल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. त्यानंतर, ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी झाला असून सातत्याने भेटीगाठी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या मनसेच्या दीपोत्सव 2025 कार्यक्रमाचे उद्घाटनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले. त्यामुळे, या दोन प्रमुख नेत्यांसह कार्यकर्तेही एकत्र आले आहेत. त्यातच, मी दोन भावांना एकत्र आणणार हा शब्द बाळासाहेबांना दिलाय, असे म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली होती. आता, त्यांचे ते शब्द लवकरच खरे ठरत असल्याचं दिसून येत आहे. कारण, आज दादर येथील सेना भवनात आल्यानंतर पुन्हा एकदा बाळा नांदगावकर यांना अश्रू अनावर झाले होते. तसेच, दादर भवनात लवकरच दोन्ही भाऊ एकत्र येतील, असेही यावेळी बाळा नांदगावकर यांनी म्हटलं. 
या सेना भवनाच्या अनेक आठवणी आहेत, राजकारणाचे धडे या वास्तूत आम्ही घेतले आणि त्यामुळे मी पायरीच्या पाया पडलो आणि आतमध्ये प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या अनेक आठवणी सेना भवनात आहेत आणि त्यामुळे मी भावनिक झालो. दोन भाऊ एकत्र यावे, यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि प्रत्येकवेळा ते बोलायचो. त्यामुळे, दीपोत्सवावेळेस दोन भाऊ एकत्र आले आणि त्या दोघांनी मला पुष्पगुच्छ दिला, असे सांगताना बाळा नांदगावकर भावूक झाले होते. आज सेना भवनांमध्ये पुन्हा एकदा मला पत्रकार परिषदेसाठी स्वतः राज ठाकरे यांनी जायला सांगितलं. त्यामुळे आम्ही सगळे नेते सेना भवनात आलो. ज्याप्रमाणे मी सेना भवनात आलो, तसेच दोन भाऊ सुद्धा सेना भवनात आपल्याला एकत्र पाहायला मिळतील, असा आशावाद नांदगावकर यांनी व्यक्त केला.

Sunday, October 19, 2025

आज कराडात डॉ अतुल भोसलेंची जाधव गटाबरोबर झाली बैठक ? या महिनाखेरीस अरुण जाधव शारदाताई जाधव व आशुतोष जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार ? माजी नगरसेवक अतुल शिंदे यांची मध्यस्थी ...

वेध माझा ऑनलाईन
कराडच्या राजकारणात ऐन दिवाळीत आता रंग भरू लागले आहेत शहरात नगराध्यक्ष पदासाठी ओपन आरक्षण पडले असल्याने या निवडणुकीत अनेकजण इच्छुक आहेत त्यातच माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव यांच्या समवेत माजी नगरसेवक अतुल शिंदे यांच्या मध्यस्थीने आज बैठक पार पडली आमदार डॉ अतुल भोसले हे स्वतः बैठकीस हजर होते असे समजते बैठकीतील चर्चेनंतर या महिन्याच्या अखेरीस जाधव गट भाजप मध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे

कराडच्या नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे नगराध्यक्ष पदासाठी ओपन आरक्षण पडले आहे त्यामुळे भाजप सहित शिवसेना व काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी आहे बरीच नावे चर्चेत आली आहेत त्यामध्ये या रेसमध्ये किती जण राहतात व कितीजण नुसतीच चर्चा करतात हे लवकरच कळणार आहे त्यातच शहरांतील जाधव गटाची एन्ट्री भाजप मध्ये होणार अशीही चर्चा बरेच दिवस होत आहे आणि आज भाजप बरोबर जाधव गटाची बैठक होऊन या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भाजप प्रवेश होईल अशी खात्रीलायक माहिती मिळत आहे 

अरुण जाधव शारदाताई जाधव व आशुतोष जाधव यांनी भाजप मध्ये यावे यासाठी स्वतः आमदार डॉ अतुल भोसले प्रयत्नशील व  इच्छुक आहेत त्यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे माजी नगरसेवक अतुल शिंदे यांच्यावर जाधव यांच्या भाजप प्रवेशाची जबाबदारी असल्याचे समजते आज अतुल शिंदे यांच्या मध्यस्थीने यासंबंधीची बैठक पार पडली या बैठकीत काय नेमकी चर्चा झाली हे समजू शकले नाही मात्र ही बैठक यशस्वीपणे झाल्याने या महिन्याच्या अखेरीस जाधव गट भाजप मध्ये प्रवेश करेल असे खात्रीलायक समजते
 

Saturday, October 18, 2025

राजेंद्रसिंह यादव यांचा झंझावात सुरूच... दिवाळी शुभेच्छा देत लोकांच्या थेट गाठी-भेटी घेण्यावर यादव यांचा भर ;

वेध माझा ऑनलाईन।
कराडच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांचा कराड शहरातून गाठी-भेटीवर जोर देत लोकसंपर्क ठेवण्याचा झपाटा सध्या सुरू आहे यातून त्यांचा एकप्रकारे प्रचाराचा झंझावातच शहरातून सुरू असल्याचे चित्र दिसत आहे...दरम्यान लग्न, कार्य, वाढदिवस अशा कार्यक्रमाना उपस्थिती लावत तसेच दिवाळी शुभेच्छा देत यादव सध्या थेट लोकसंपर्कात दिसत आहेत 

गेली दोन दशके नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांची सेवा करत शहरातील सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे तसेच पालिकेत सभापती पदासह उपनगराध्यक्ष पद भूषविलेले यादव आता नगराध्यक्षपदाच्या होणाऱ्या निवडणुकीत उमेदवार म्हणून सज्ज आहेत... 
त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे... हिंदू- मुस्लिम तसेच सर्वच धर्मीयांमध्ये त्यांचा सन्मान आहे... 24x7 त्यांचे लोककार्य चालूच असते... 
राजेंद्रसिंह यादव यांनी गेल्या दोन दशकात शहराची सेवा केली आहे... सर्व धर्मातील सण साजरे होताना त्यांचे सहकार्य व मदतीचा हात कायमच देत त्यांनी आपली बांधीलकी नेहमीच जपली आहे... 
कोविड मध्ये देखील त्यांनी शहरात खूप मोठं काम केलं आहे...
पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोट्यवधी रुपयेचा निधी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून खेचून आणला...शहरातील सुविधा आणखी प्रगल्भ करण्यासाठी त्यांनी आजही प्रयत्न सुरू ठेवले आहेत...बेरोजगार युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी "जॉबफेअर' मेळाव्याचे आयोजन करत सातत्याने ते प्रयत्नशील असतात ...शिक्षण, आरोग्य, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यात त्यांचा हातभार व सहकार्य नेहमीच असते... त्यांची नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार म्हणून शहरात चर्चा आहे...

Tuesday, October 14, 2025

माजी नगरसेविका स्मिता हुलवान भाजप मध्ये दाखल ;

वेध माझा ऑनलाईन।
आज माजी नगरसेवक इंद्रजित गुजर ,अप्पा माने नगरसेविका स्मिता हुलवान व सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांचा आज मुंबईत भाजप मध्ये प्रवेश झाला आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांनी प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मलकापूर येथील काँग्रेस चे काही नगरसेवक भाजपमध्ये गेल्याचे दिसले तसेच अनेक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य देखील डॉ अतुल भोसलेंच्या नेतृत्वाला मानून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत
कराड शहरातील विविध राजकीय पार्ट्यांमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असणारे अनेकजण कोणत्याही पार्टीत असले तरी दिसतात मात्र...अतुलबाबांबरोबर...
त्यातच आज या 4 जणांनी भाजप प्रवेश केल्याने भाजप चे पारडे या नगरपरिषदेच्या राजकारणात जड झाल्याचे दिसत आहे

Monday, October 13, 2025

इंद्रजित गुजर, अप्पा माने यांचा आज भाजपमध्ये प्रवेश - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार प्रवेश -

वेध माझा ऑनलाईन।
आज मुंबईत माजी नगरसेवक इंद्रजित गुजर व अप्पा माने यांचा भाजप मध्ये प्रवेश होणार आहे आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली या दोघांचा आज प्रवेश होत आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे प्रवेशानंतर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चहा पान देखील होणार असल्याची माहिती आहे

दरम्यान आज या दोघांच्या प्रवेश होण्याअगोदरपासून मलकापूरचे काँग्रेस नेते मनोहर शिंदे त्याठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर हजर असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांचा आज प्रवेश होणार नाही असेही समजते...

दरम्यान आमदार डॉ अतुल भोसले यांचा करिष्मा कराडमध्ये जोरदार सुरू आहे झालेल्या विधानसभा निवडणुकीत कराडकरांनी डॉ भोसले यांना अक्षरशः डोक्यावर घेत तब्बल 40 हजाराच्या फरकाने निवडून देत चमत्कार घडवला त्याची परतफेड करण्यासाठी कटिबद्ध असणारे डॉ भोसले यांनी देखील निवडणुकीत दिलेली आश्वासने निवडून आल्यावर सत्यात उतरवत आपला दिलेला शब्द पाळण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू ठेवला आहे त्याचेच प्रत्यंतर म्हणून अनेक नेते भाजप मध्ये प्रवेशकर्ते होताना दिसत आहेत
मलकापूर येथील काँग्रेस चे काही नगरसेवक भाजप मध्ये थोड्या दिवसापूर्वी गेले तसेच अनेक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य देखील डॉ अतुल भोसलेंच्या नेतृत्वाला मानून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले 
कराड शहरातील विविध राजकीय पार्ट्यांमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असणारे अनेकजण कोणत्याही पार्टीत असले तरी दिसतात मात्र डॉ अतुलबाबांबरोबर...आणि..."कृष्णा ट्रस्टवर'...

म्हणजेच डॉ अतुलबाबा यांचे नेतृत्व शहरातील काही राजकीय पार्ट्यांमधील नेत्यांना देखील मान्य असल्याचे यातून दिसून येते...तसेच एखादा नगरसेवक मग तो कोणत्याही पार्टीचा असला तरी त्या नेत्याच्या फ्लेक्सवर झळकतात डॉ अतुल भोसलेच... असा हा करिष्मा सध्या सगळीकडे पहायला मिळतोय...

एकेकाळचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर व अप्पा माने आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश करत आहेत आमदार डॉ भोसले यांच्यावर विश्वास टाकून भाजप मध्ये सुरू असलेले असे सर्वच भागातील हे भाजप प्रवेश अतुलबाबांवरील लोकांचा असणारा अतूट विश्वास अधोरेखित करत आहे... अशी यानिमित्ताने चर्चा आहे...
दरम्यान आज या दोघांच्या प्रवेश होण्याअगोदरपासून मनोहर शिंदे त्याठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मुंबई येथील बंगल्यावर हजर असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांचा आज प्रवेश होणार नाही असेही समजते...
कराडच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची नावे रोज पुढे येत आहेत पण काँग्रेस व राष्ट्रवादी कडून आद्यपही ठोस असे कोणी उमेदवार समोर येताना दिसत नाही मात्र काँग्रेस चे पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादी चे बाळासाहेब पाटील हे दोघे या निवडणुकीत एकत्र आले तर मात्र भाजप व सेनेला तगडे आव्हान देत कराड शहरात कदाचित बदलाचा चमत्कार देखील पहायला मिळेल असे जाणकार सांगताना दिसत आहेत

कराडच्या पालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून निवड होणार आहे त्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत ओपन आरक्षण पडल्यामुळे थेट नगराध्यक्ष पदासाठी चुरस असणार आहे या निवडणुकीत ज्याचा दम आहे तो लढले आणि ज्याचा तो घासच नाही तो कोंप्रमाईज करणार असे दिसत आहे

शिवसेना भाजप कडून अनेक उमेदवारांच्या नावाच्या चर्चा गावात सुरू आहेत मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी कडून या प्रमुख पदासाठी उमेदवार म्हणून फारसे कोणी चर्चेत का नाही?अशीच सध्या चर्चा होताना दिसत आहे
माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील यांचे राजकीय सख्य झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून सर्वानाच माहीत आहे या दोघांच्या जिरवाजीर्वी च्या राजकारणाने कराड उत्तर व दक्षिण मध्ये भाजप निवडून आलं याची जाणीव आता या दोघांच्याही कार्यकर्त्यांना होताना दिसत आहे त्यातच आता होणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ही चूक सुधारण्याची संधी देखील आली आहे त्यासाठी काय केलं पाहिजे हे पाहणे गरजेचे आहे
पालिका निवडणुकीत भाजप जोरदार तयारीच्या बेतात आहे तर शिवसेना आपला उमेदवार जाहीर करत भाजप च्या बरोबरीत रहायला बघत आहे या दोघांचीही ताकद सत्ताधारी म्हणून सेना-व भाजप ने आपापला विकास निधी आणत दाखवली आहे राहिला प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी चा या दोघांची स्वतन्त्र ताकद गावात भाजप सेने च्या तुलनेत बरीच म्हणायची अशी आहे मात्र हे दोघे एकत्र आले तर मात्र या दोन्ही ताकदी अनेक प्रकाराने सरस ठरू शकतात असे चित्र बनू शकते
तुलनेत पहायला गेलं तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडे मुस्लिम व मागासवर्गीय मतदार अधिक प्रमाणात दिसतोतर हिंदू मताचा टक्का भाजप सेनेकडे तुलनेत अधिक दिसतो काँग्रेस राष्ट्रवादी कडे  हिंदू मतांची बेरीज देखील असल्यामुळे या मतांमध्ये एकूणच डिव्हायडेशन होणार हे स्पष्ट दिसते पण मुस्लिम व मागासवर्गीय मतांमध्ये या तुलनेत विभागणी परिणामकारक होईल असे नाही आणि या दोन्ही मतांची गठा बेरीज केल्यास काँग्रेस राष्ट्रवादी कडे मतांचा मोठा कौल दिसतो मात्र या दोन पार्ट्यांमध्ये फूट पडली तर मात्र भाजप सेना सत्तेत आरामात येताना दिसते आहे हे सिम्पल गणित आहे म्हणजेच दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास कराडात बदलाचा चमत्कार दिसेल असे जाणकार ठामपणे सांगताना दिसत आहेत
मागील निवडणुकीत मुस्लिम मतांमध्ये विभागणी झाली व भाजप ची शीट निवडून आली याचा अर्थ भाजप ची मते शहरात खूप आहेत असा त्याचा अर्थ होत नाही लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना कराड शहरात अधिक मते पडली आहेत म्हणजेच जरी पराभव झाला तरी शिंदे यांनी शहरात भाजप विरोधात असणारी पारंपरिक मुस्लिम व मागासवर्गीय मते गठय्याने मिळवली याच मतात विभागणी झालेली दिसली नाही म्हणजेच ही मते विभागली गेली नाही तर चमत्कार घडवू शकतात हे यातून स्पष्ट झाले नगरपालिका निवडणुकीत याच चमत्काराचा पहायचे असेल तर दोन्ही आमदारांनी आपले राजकीय जे काही असतील ते हेवेदावे बाजूला ठेवत नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी आवश्यक ती तडजोड करणे गरजेचे आहे ही तडजोड यशस्वी झाल्यास कराडात बदलाचा चमत्कार होणार हे नक्की!

काँग्रेसचे मुस्लिम (अल्पसंख्याक) समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाकीर पठाण म्हणाले... काँग्रेस ने तिकीट दिल्यास मी कराडच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक :

वेध माझा ऑनलाईन।
सध्या शहरात नगराध्यक्ष कोण होणार?याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत चौका चौकात चर्चा सुरू आहेत कोण निवडून येणार? कोण पडणार ? याही चर्चा रंगल्या आहेत असं असताना काँग्रेसचे मुस्लिम समाजाचे (अल्पसंख्याक) पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष युवा नेते झाकीर पठाण  हे काँग्रेस कडून नगराध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत
काँग्रेस ने तिकीट दिल्यास आपण ही निवडणूक लढणार आणि जिंकणार असेही ते म्हणाले आहेत...निवडून येण्याचे गणित मांडताना ते म्हणाले...काँग्रेस च्या पाठीशी असणाऱ्या हिंदू बांधवांचे सहकार्य त्याच बरोबर मुस्लिम व मागासवर्गीय पडणाऱ्या मतांची बेरीज कॉंग्रेस चा नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे असे पठाण म्हणाले...

झाकीर पठाण हे माजी  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात... कराडच्या शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी खूप वर्षे काम पाहिले आहे...  त्यांचे वडील कबड्डी खेळाडू म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन म्हणून परिचित होते... झाकीर पठाण हे देखील राज्याचे कबबडी प्लेअर म्हणन परिचित आहेत...1986, 87 ला एन एस यु आयला झाकीर पठाण जॉईन झाले...काँग्रेसच्या विचाराला प्राधान्य देत त्यांनी युथ काँग्रेस चे जवळजवळ 12 वर्षे काम पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केले... झाकीर पठाण यांचे यशस्वी काम पाहून त्यांना अल्पसंख्याक विभागाचे काँग्रेसने जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली...ती जबाबदारी यशस्वी पार पाडत कार्यकर्त्यांची वाढ त्यांनी केली...त्यानंतर पठाण यांची वर्णी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून लागली...
दरम्यान झाकीर पठाण यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे...सर्व धर्मीयांमध्ये त्यांचा सन्मान आहे...कोविड मध्ये त्यांनी मोठं काम केलं आहे...कोविड मध्ये धान्य वाटप करण्यात त्यानी  शहरात पुढाकार घेतला होता... त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या दी कराड सिटी को ऑप क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे ते चेअरमन म्हणून काम पाहत आहेत...पतसंस्थेच्या माध्यमातून ते समाजकार्यात कायमच कार्यरत दिसतात... आतापर्यंत त्यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, तसेच छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ..
त्यांचे कराड दक्षिण व उत्तर मध्ये परिचित लोकांचे मोठे जाळे आहे...त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नुकत्याच झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीवेळी महत्वाची भूमिका बजावत पहील्या फळीतील काम पाहीले आहे... 
सध्या शहराच्या नगराध्यक्षपदासाठी ओपन आरक्षण पडले आहे... शहरात विविध राजकीय पक्षातून अनेकजण इच्छुक असताना पठाण यांनी काँग्रेस कडून मागितलेली उमेदवारी चर्चेची झाली आहे...
सर्वांच्यात त्यांची प्रतिमा आपला माणूस अशी आहे... आणि म्हणूनच शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा काँग्रेसचे इच्छुक उमेदवार व मुस्लिम समाजाचे नेते म्हणून जोरदार सुरू आहे...

Sunday, October 12, 2025

कराडच्या यशवन्त बँकेत कोट्यवधींचा घोटाळा ; खोट्या नोंदी आणि दस्तावेजात फेरफार - शेखर चरेगावकर व त्यांच्या नातेवाईकांसह 50 जणांवर गुन्हा दाखल ; लवकरच होणार अटक !

वेध माझा ऑनलाईन
यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत 112 कोटी 10 लाख 57 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि फलटणचे माजी आमदार दिवंगत कृष्णचंद्र भोईटे यांचा मुलगा नरेंद्र भोईटे यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ, पाच वरिष्ठ अधिकारी आणि चरेगावकरांच्या नातेवाईकांसह ५० जणांवर शनिवारी रात्री उशिरा कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे 
कराड येथील यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेच्या लेखापरीक्षणात बोगस कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, कराड शाखेतील कर्ज विभागाचे शाखा व्यवस्थापक आणि शेखर चरेगावकर यांच्या नातेवाईकांविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान यशवन्त बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याने तसेच खोट्या नोंदी आणि दस्तावेजात फेरफार जाणीवपूर्वक केला गेला असल्याने शेखर चरेगावकर व त्यांच्या नातेवाईकांसह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला असून संबंधितांना लवकरच अटक होणार आहे असे समजते!

कोट्यवधींचा अपहार आणि कोट्यवधी चा घोटाळा ; तसेच खोट्या नोंदी आणि दस्तावेजात फेरफार - 

यशवंत को-ऑप. बँक लि.कराड या बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, 5 अधिकारी, संचालक मंडळ आणि तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे 9 नातेवाईक, अशा 50 जणांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान करुन संगनमताने 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रूपयांचा अपहार केला आहे. बोगस कर्ज प्रकरणासाठी बनावट कागदपत्रे तयार करून तारण न घेता हेतुपुरस्सर कर्ज वितरण केले. जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नवीन खाती उघडून निधीचा उद्देशबाह्य विनियोग करून अन्यत्र निधी वळवला. तसंच दस्तावेजात फेरफार आणि खोट्या नोंदी केल्या. पदाचा गैरवापर करून बँकेच्या ठेवीदार व संभासदांच्या हितास बाधा निर्माण केली आहे.

आता अटक होणार?
लेखापाल मंदार देशपांडे यांच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 61, 316 (2),316 (4), 318 (4), 336 (3), 338, 339,340 (2),3(5) प्रमाणे बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्षांसह एकूण ५० जणांवर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या दरम्यान यशवंत को-ऑप बँक लि. कराड याठिकाणी हा गुन्हा घडला असल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे. या गुन्ह्याचा तात्पुरता तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्याकडे देण्यात आला आहे मात्र लवकरच या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार  आहे.

Saturday, October 11, 2025

"आपला माणूस' म्हणून ओळख असलेले नेते अतुल शिंदे कराडच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत ; तिकीट मिळाल्यास अतुल शिंदे भाजपकडून इच्छुक ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भाजप कडून अनेक नावे समोर येत आहेत त्यातच युवा नेते अतुल शिंदे यांचे नाव देखील अग्रक्रमाने शहरात चर्चेत आहे... वेध माझा शी बोलताना ते म्हणाले...भाजप कडून तिकीट मिळाल्यास मी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून  इच्छुक आहे...

सध्या शहरात नगराध्यक्ष कोण होणार?याबाबत तर्क वितरक लावले जात आहेत चौका चौकात चर्चा सुरू आहेत कोण निवडून येणार? कोण पडणार ? याही चर्चा रंगल्या आहेत असं असताना युवा नेते अतुल शिंदे हे देखील भाजप च्या गोटातूननगराध्यक्षपदाच्या चर्चेच्या शर्यतीत पुढे आहेत
अतुल शिंदे हे आमदार डॉ अतुल भोसले व उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचे निकटवर्तीय मानले जातात... शहरातील जनशक्ती आघाडीचे ते उपाध्यक्ष आहेत त्यांनी या त्यांच्या पदाचा राजीनामा देत सम्पूर्णपणे भाजप चे काम स्वीकारले आहे... ते भाजप चे अधिकृत सदस्य देखील आहेत... तसेच ते स्वीकृत नगरसेवक म्हणून देखील शहराला परिचित आहेत... त्यांचे वडील नगरसेवक आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष म्हणून सर्वांना परिचित होते...
त्यांच्या मातोश्री नगरसेविका म्हणून दोन वेळा निवडून येत यापूर्वी शहराला परिचित होत्या... त्यांचे कराड दक्षिण व उत्तर मध्ये परिचित लोकांचे मोठे जाळे आहे... अतुल शिंदे यांनी आमदार भोसले यांच्या नुकत्याच झालेल्या आमदारकीवेळी महत्वाची भूमिका बजावत पहील्या फळीतील काम पाहीले आहे... आणि त्यांना आमदार होण्यासाठी शहरात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे...  
सध्या शहराच्या नगराध्यक्षपदासाठी ओपन आरक्षण पडले आहे... आणि भाजप कडून सर्वाधिक इच्छुक उमेदवार रिंगणात उतरू इच्छित आहेत... मात्र युवा नेते अतुल शिंदे  यांची "राजकीय पाटी' अद्याप 'कोरी" आहे असल्याने भाजप मधून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे...अर्बन बँकेच्या माध्यमातून  लोकांना सर्वतोपरी सहकार्य करत त्यांचे सामाजिक कार्य समाजात सुरूच आहे...
अनेक गणेश मंडळे तसेच सर्वच समाजातील सण उत्सवासाठी त्यांचे सर्वतोपरी सहकार्य नेहमीच असते... त्यांचा मित्रपरिवार राजकारण विरहित आणि खूप मोठा आहे... सर्वांच्यात त्यांची प्रतिमा आपला माणूस अशीच आहे... आणि म्हणूनच शहरातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा भाजप गोटात जोरदार सुरू आहे...

आता आमचा नवा पक्ष, कबुतर आमचं पक्षचिन्ह, चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री, जैन मुनींची घोषणा ;

वेध माझा ऑनलाईन
मुंबईमध्ये कबूतर खाण्याचा प्रश्न गाजतोय. या आंदोलनादरम्यान काही कबुतरांचा मृत्यू झालाय आणि त्यांच्या आत्मशांतीसाठी आज (11 ऑक्टोबर) जैन धर्मियांकडून मुंबईमध्ये धर्मसभा भरविण्यात आली होती. या धर्मसभेनंतर उपस्थित असणाऱ्या सर्व जैनमुनींनी एकत्र पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली. 

सरकारला माझा नाही, सनातन धर्माचा इशारा आहे. महाराष्ट्राचा मराठी माणूस कबुतरांना विरोध करत नाहीय. त्यांना राजकारणासाठी कबूतर आणायचे आहे. आम्ही आमचा धर्म विसरणार नाही, असं जैनमुनी निलेशचंद्र विजय म्हणाले. तसेच जैन समाज सर्वाधिक टॅक्स भरतो, असंही निलेश मुनी यांनी सांगितले. आता आमची देखील संघटना असणार आहे. आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू...कबुतरांची पार्टी पाहिजे, शिवसेनेतही वाघ होता, असं म्हणत निलेश मुनींकडून जन कल्याण पार्टीची घोषणा करण्यात आली. आमच्या पार्टीचं चिन्ह कबूतर असेल, अशी घोषणा निलेशचंद्र विजय यांनी केली. ही फक्त जैनांची पार्टी नाही, ही गुजराती मारवाडीची पार्टी, असं निलेश मुनी यांनी सांगितले. तसेच आमच्या जन कल्याण पार्टीत चादर-फादर सोडून सर्वांना एन्ट्री असल्याचंही निलेशचंद्र विजय म्हणाले.

Friday, October 10, 2025

वेध माझा शी बोलताना श्री पेंढारकर म्हणाले... नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी मागणी करणार ; कराडातील भाजपचे निष्ठावन् कार्यकर्ते श्री पेंढारकर यांची रिंगणात उतरण्याची तयारी ;

वेध माझा ऑनलाईन
 भाजप चे निष्ठांवत कार्यकर्ते व माजी नगरसेवक घन:श्याम  उर्फ श्री पेंढारकर कराड नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असे त्यांनी वेध माझा शी बोलताना सांगितले त्यांच्या या उमेदवारीची मागणी ते पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचेही ते म्हणाले

कराडातील भाजपचे निष्ठावान नेते म्हणून ओळख असलेले श्री पेंढारकर यांनी संघ स्वयंसेवक म्हणून शालेय जीवनापासून सामाजिक कार्याची सुरुवात केली.  त्यानंतर जनसंघाचे पणती या चिन्हावर काम केले नंतर जनता पार्टीच्या हलधर या चिन्हावर काम केले. आणि आता भाजपाच्या स्थापनेपासून भाजपच्या विचाराने कमळ या चिन्हावर काम करत आहेत. 

तसे पाहिले तर कराड शहरांमधील भाजपामध्ये काम करणाऱ्या जुन्या, एकनिष्ठ, हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. भाजपा विरोधीपक्षाची भूमिका बजावत असताना अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. कधीही भाजप च्या विचारांशी फारकत त्यांनी घेतली नाही. काही काळासाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांना संधी मिळाली त्यात त्यांनी शहरातील अनेक कामे करत त्या संधीचे सोने केले सोशल मिडीया माध्यमाचा देखील आपल्या सामाजिक कामासाठी त्यांनी उपयोग करत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचे निरसन केले व त्यांच्या अडचणी सोडवल्या 

प्रत्यक्षात देखील अडचणीच्या ठिकाणी जाऊन ते तक्रारीचे निरसन करताना नेहमीच दिसतात त्यासाठी ते 24 x7 गावात हजर असतात आजही त्यांचे हे काम अविरत चालू आहे . लोकांना आपलंच वाटणार आणि साधी राहणी असणारे व्यक्तिमत्व नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरणार असल्याने त्यांच्या आतापर्यंतच्या एकूणच सामाजिक बांधीलकीचा विचार करून त्यांना शहराच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी मागणी ते भाजप नेतृत्वाकडे करणार आहेत असेही ते म्हणाले आहेत

Thursday, October 9, 2025

कराडच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून नवा चेहरा रिंगणात उतरणार !!

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या रिंगणात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अनेकजण शड्डू ठोकून उमेदवारीसाठी तयार आहेत भाजप मात्र या निवडणुकीत नवीन कोर पान काढून सर्वांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे तो नवीन चेहरा कोण?याचीच चर्चा यानिमित्ताने शहरात सुरू आहे
दरम्यान ओपन नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत असल्याने कोणतीच पार्टी किंवा राजकीय पक्ष युती किंवा आघाडी करण्याच्या मनस्थितीत नाहीये कारण प्रत्येकाला या पदासाठी निवडणूक लढवायची आहे... कारण एखाद्या पार्टीकडे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार नसेल... तर ती नामुष्कजनक बाब असल्याने प्रत्येकाला यात स्वतंत्रपणे उतरावे लागणार आहे

दरम्यान शहरातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना,लोकशाही आघाडी तसेच एम आय एम काँग्रेस व भाजप स्वतंत्र लढणार आहेत त्यामुळे यासाठी इच्छुक उमेदवारांची नावे देखील पुढे आली आहेत त्यातील कोण उमेदवार चालेल हे आताच सांगू शकत नाही, आता या उमेद्वारांबद्दल शहरात फक्त चर्चा सुरू आहेत त्यात आता भाजप कडून एका नव्या चेहऱ्याला उमेदवार म्हणून पुढे करून धक्कातंत्र अवलंबल जाईल ? अशी शक्यता  आहे 
भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक उमेदवार इच्छुक आहेत जिल्ह्यात खासदार भाजप चा... सर्वाधिक आमदार भाजप चे... अशी अवस्था आहे... आणि माजी नगराध्यक्षा देखील बऱ्यापैकी भाजपच्याच होत्या... असे असल्यामुळे एकूण जिल्ह्यात भाजप कडून या पदासाठी क्लेम सांगितला जात आहे....सत्ताधारी शिवसेना देखील आपला क्लेम या पदावर करत आहेच... 
कराडात भाजप कडून याच धर्तीवर राजकीय ड्रीष्ट्या नवी कोरी पाटी असलेला उमेदवार  जाहीर होणार अशी दाट शक्यता आहे
भाजप ने अनेक ठिकाणी असे प्रयोग करत राज्यभरात नवीन चेहरे दिले आणि निवडूनही आणले आहेत...
ही स्टेटजी राबवताना भाजप ने अनेक स्थानिक स्वराज संस्थेत व इतर निवडणुकीतदेखील यापूर्वी हा प्रयोग ऐनवेळी केलाय आणि धक्काही दिला आहे...असाच प्रयोग कराड पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत भाजप करेल अशी अशी माहिती मिळत आहे...आमदारकी आणि खासदरकीच्या निवडणुकीला देखील भाजपने हीच स्टेटजी बऱ्याच ठिकाणी  अवलंबली आहे
कराड चे भाजप शहर अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी पेच निर्माण झाला असता तो निर्णय बराच काळ प्रलंबित ठेवला गेला त्यानंतर मात्र राष्ट्रवादी च्या नगराध्यक्षा म्हणून कराडमध्ये ज्यांनी यापूर्वी  यशस्वीपणे काम पाहिले आहे अशा सौ सुषमा लोखंडे यांची अचानकपणे वर्णी लावून भाजप ने शहराला धक्काच दिला...असाच धक्का शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबद्दल भाजप  यावेळी देणार असेही वृत्त आहे

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली, पुढे काय ?

वेध माझा ऑनलाइन -
गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली. या खटल्यावर 8 ऑक्टोबरला निकाल अपेक्षित असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणामुळे न्यायालयाने इतर प्रकरणांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता 12 नोव्हेंबरला शिवसेना पक्ष-चिन्हांसोबत आमदार अपात्रतेबाबत देखील सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   
8 ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्ष व चिन्हाच्या मुद्द्यावर निर्णय येईल, अशी चर्चा होती. मात्र, सशस्त्र सुरक्षा दलांशी संबंधित एक महत्त्वाचे प्रकरण ऐनवेळी सुनावणीला आल्याने इतर खटल्यांची सुनावणी तातडीने आटोपण्यात आली. परिणामी, शिवसेना प्रकरण पुन्हा पुढे ढकलण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला आधीच सूचित केले होते की, त्यांच्या प्रकरणाची सुनावणी संक्षिप्त असेल. यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जर आज सुनावणी शक्य नसेल, तर लवकरात लवकर पुढील तारीख द्यावी, अशी विनंती केली. त्यावर न्यायालयाने 12 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे.

ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे यांना नाशिक पोलिसांनी केली अटक ;

वेध माझा ऑनलाईन
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित नाशिक दौऱ्याच्या काही तास आधीच नाशिक पोलिसांनी मोठी अ‍ॅक्शन घेतली आहे. नुकतेच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद मानली जात असून, नाशिक गुन्हे शाखेकडून त्यांची तब्बल 15 तास कसून चौकशी करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेकडून राज्यातील ‘या’ चार बँकांवर निर्बंध :

वेध माझा ऑनलाईन।
रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील चार सहकारी बँकांवर कठोर निर्बंध लादले आहेत. या बँकांना रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय कर्ज देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ठेवीदारांचा पैसा वेळेवर परत करण्यास बँका असमर्थ ठरल्यामुळे ही मोठी आणि महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. या निर्बंधांमुळे प्रभावित झालेल्या बँकांमध्ये जिजामाता महिला सहकारी बँक, सातारा. समर्थ सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर. समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, धाराशिव आणि द शिरपूर मर्चंट्स सहकारी बँक लिमिटेड, शिरपूर यांचा समावेश आहे.रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि अनियमितता आढळल्याने हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि एकूणच बँकिंग प्रणालीमध्ये विश्वासार्हता व स्थिरता राखण्यासाठी घेण्यात आला आहे. संबंधित बँकांना आता पुढील वाटचाल RBI च्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांनुसार करावी लागणार आहे. या कारवाईमुळे सहकारी बँकांच्या कामकाजावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि आर्थिक शिस्त पाळण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

नवी मुंबई विमानतळाला मोदींचे नाव देणार!… राऊतांच्या दाव्यानं खळबळ

वेध माझा ऑनलाईन।
नवी मुंबई येथे एका आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नुकतेच उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  करण्यात आले, मात्र त्याला अद्याप कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.  दि.बा. पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पक्षाने विरोध दर्शवला आहे. तसेच, गौतम अदानी यांचाही दि.बा. पाटील यांच्या नावासाठी विरोध असल्याचे राऊतांकडून सांगण्यात आले आहे.
राऊत पुढे असेही म्हणाले,  या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत भाजपांतर्गत चर्चा, सूचना आणि मागणी सुरू झाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नामांतर होऊन ते नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले, याचा दाखलाही या संदर्भात दिला जात आहे. गौतम अदानी यांच्या मागणीमुळे आणि भाजपमधील एकमतामुळे विमानतळाचे लोकार्पण दि.बा. पाटील यांच्या नावाशिवाय झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या या विमानतळाला नरेंद्र मोदींचे नाव देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही म्हणाले

Wednesday, October 8, 2025

माजी मंत्री शामराव अष्टेकर यांचे निधन ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड उत्तरचे माजी आमदार,माजी क्रिडा मंत्री शामराव बाळकृष्ण अष्टेकर (वय ९१) यांचे पुणे येथे दुःखद निधन झाले.
आज सायंकाळी त्यांच्यावर पुणे येथे  अंत्यसंस्कार होणार आहेत .पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल उभारणीमध्ये महत्त्वाचं योगदान असलेले शामराव आष्टेकर हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.

Saturday, October 4, 2025

माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक जयंत बेडेकर यांच्या शुभेच्छा फ्लेक्सवर बाळासाहेबांबरोबर आमदार अतुलबाबाही झळकले ...

वेध माझा ऑनलाईन।
माजी आ बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक व लोकशाही गटाचे सक्रिय कार्यकर्ते जयंत बेडेकर यांनी नवरात्रीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी शहरात फ्लेक्स लावले होते त्यावर नेते माजी आ बाळासाहेब पाटील यांच्या फोटोसह आमदार डॉ अतुलबाबा यांचाही फोटो  होता  त्यामुळे होणाऱ्या शहरातील नगरपालिका निवडणुकीत या दोन नेत्यांचे मनोमिलन होणार असल्याचे यातुन संकेत मिळत आहेत का? अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे 

सामाजिक कार्यकर्ते जयंत बेडेकर हे  माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे निष्ठावन्त म्हणून ओळखले जातात केवळ वार्डातच नाही तर संपूर्ण शहरात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते नेहमीच 24x7 मदतीसाठी पुढे असतात त्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या या प्रवृत्तीचा अनेकांना  सामाजिक फायदा झालेला दिसूनही येतो
त्यांच्या पत्नी सौ बेडेकर या कराड पालिकेच्या मागील एका झालेल्या निवडणुकीतून  नगरसेविका म्हणून पालिकेत निवडून गेल्या होत्या मात्र यावेळी सोमवार पेठेतून लोकशाही आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून जयंत बेडेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे ..नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत जयंत बेडेकर यांनी भाजपचे आमदार डॉ अतुल भोसले यांचा प्रचार केल्याचे ते स्वतःउघडपणे सांगतात  दरम्यान अतुल भोसले यांना लोकशाही गटातील अनेकांनी या निवडणुकीत मदत केल्याची चर्चाही शहरात असते.. आमदार भोसले यांच्या गावातील अनेक कार्यक्रमातून लोकशाही गटाचे काही माजी नगरसेवक उपस्थित असलेले दिसतात.. त्यामुळे या एकूणच शहरातील वातावरणामुळे होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी चे नेते बाळासाहेब पाटील व भाजप चे अतुल भोसले हे पक्षीय झूल बाजूला ठेवून गटपार्टीचे राजकारण करत एकमेकाला मदत करणार का? अशा चर्चा यानिमित्ताने आहेत ...
माजी नगरसेवक सुहास पवार यांनीही याच दोन नेत्यांचे फोटो आपल्या फ्लेक्सवर लावत शहरात जोरदार आखाडी साजरी केली होती त्यावेळी देखील अशीच चर्चा पालिका निवडणुकीच्या निमित्ताने झाली होती.....त्याचे कारण असे की...माजी नगरसेवक सुहास पवार तसेच जयंत बेडेकर हे दोघेही माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर व पहिल्या फळीतले समर्थक आहेत... आणि अशा कट्टर समर्थकांच्या फ्लेक्स बोर्डवर जर... आमदार अतुलबाबा झळकत असतील तर मग  होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर यातूनच पडद्याआड मनोमिलनाचे राजकारण शिजतय का ? अशी शंका घेण्यासाठी वाव आहे अशीही गावात चर्चा आहे...

कृष्णा विश्वविद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त आ डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक अभिषेक भोसले मित्रपरिवाराच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ; मोफत शासकीय सेवांचाही नागरिकांना दिला लाभ ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा विश्वविद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त आ डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक व भाजपचे शहर उपाध्यक्ष अभिषेक भोसले यांच्या मित्रमंडळच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते तसेच काही शासकीय योजनांचा लाभ देखील यावेळी अभिषेक भोसले मित्रपरिवाराच्या वतीने नागरिकांना देण्यात आला
कराडच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक नगरपरिषद शाळा क्रमांक १० मध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी १५० हुन अधिक नागरिकांनी या सर्व आरोग्य व शासकीय अशा एकूणच सर्व उपलब्ध सेवांचा लाभ घेतला.

यावेळी अभिषेक भोसले मित्रपरिवाराच्या वतीने लाडकी बहीण KYC अपडेट, वय वंदना, आयुष्मान भारत,कास्ट सर्टिफिकेट, डोमासेल, रेशनकार्ड अपडेट अश्या सर्व शासकीय योजना येथील नागरिकांसाठी राबवण्यात आल्या या सर्व योजनांचा लाभ गरजू नागरिकांनी यावेळी घेतला 
त्यासोबतच यावेळी मोफत सर्व रोगनिदान शिबीरामध्ये सर्जरी,स्त्रीरोग बालरोग कान नाक घसा,नेत्ररोग त्वचारोग दंत चिकित्सा तसेच फिजिओथेरपी,मानसोपचार आदी आजारावर मोफत उपचार तपासणी व मोफत औषधे देण्यात आली.या शिबिरास कृष्णा चारिटेबल ट्रस्ट कडून डॉक्टर्स आणि औषधे मोफत सेवा देण्यात आली.
यावेळी स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला १५० हुन अधिक नागरिकांनी यावेळी उपलब्ध सेवांचा लाभ घेतला.
भाजपा कराड शहर अध्यक्ष मा. सौ. सुष्मा लोखंडे, ऍड. सौ. तबस्तुम मुल्ला, सौ. काटवटे व भाजपा पदाधिकारी त्या सोबत कराड दक्षिणचे आमदार मा. डॉ. अतुलबाबा भोसले जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा. श्री. दिलीप जाधव आणि सागर माने, ओंकार ढेरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमेटी अध्यक्ष मा.श्री.राहूल भोसले, श्री. सुदेश थोरवडे मा. श्री. सुनिल थोरवडे, श्री. शिवराज इंगवले, श्री. भावेश शहा, श्री. किशोर आठवले, श्री. सागर लादे, श्री. विवेक भोसले, श्री. नितीन भोसले,श्री. वाजीद मुल्ला, श्री. संतोष मुटेकर, श्री. विकी वाघमारे, मा. सुमित कांबळे, वैभव आवळे,मंगेश वीर, अतिश थोरवडे, निखिल साळुंखे, राहूल थोरवडे, रोहित कांबळे, अनिकेत वास्के
तसेच विविध पदाधिकारी आणि वेगवेगळ्या स्थानिक कमेटी, बचत गटातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी भेट दिली.


Wednesday, October 1, 2025

माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांचे सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यावर आरोप ; काय म्हणाले...


वेध माझा ऑनलाईन।
सह्याद्री कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सामान्य सभासदांचे म्हणणे ऐकून न घेता सत्ताधाऱ्यांनी मनमानी केली. सभासदांचे हक्क पायदळी तुडविले.सहकाराच्या नियमांचे पालन करूनच मी सह्याद्रीचा सभासद म्हणून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्ये ५ वर्ष रखडलेल्या कारखान्याच्या विस्तार वाढीचाही प्रश्न होता. त्यामध्ये नवीन विस्तारीकरणासाठी किती कंपन्यांनी सहभाग घेतला होता? कोणत्या कंपन्यांनी टेंडर भरली होती? कोणाला काम 
देण्यात आले त्याची कॉपी, प्रोसिडिंग नक्कल व करारनामा मागितले होते. मात्र या प्रश्नाबाबत टुकार उत्तर देऊन सभा गुंडाळण्याचे काम अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले अशी टीका माजी जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांनी केली. 

कराड येथे बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद निवास थोरात बोलत होते. यावेळी शैलेश चव्हाण, भरत चव्हाण आनंदराव थोरात, विश्वास जाधव आदींची उपस्थिती होती. 

ते पुढे म्हणाले सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचा दावा अध्यक्ष बाळासाहेब पाटील करतात. मग वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणे का टाळता? प्रश्न विचारणाऱ्या सभासदांचा बोलताना माईक का बंद करता?असा सवाल करत त्यामुळे प्रश्न संपणार नाहीत. मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता  अध्यक्षांनी केलेली चिडचिड म्हणजे 'खाई त्याला खवखवे' अशीच परिस्थिती असल्याचा टोलाही निवास थोरात यांनी यावेळी लगावला माझ्या व्यक्तिगत कर्जाबाबत टीका टिप्पणी केली व तुम्हाला जी माहिती पाहिजे ती साखर आयुक्तालय येथून घ्या असे मुजोर उत्तर दिले. हा प्रकार लांच्छनास्पद आहे याशिवाय मयत वारसदार सभासदांच्या प्रश्नावरही त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेले नाही ही बाब चुकीची आहे असेही ते म्हणाले

खरंतर या सर्व प्रकाराबाबत मी साखर आयुक्तांकडे केलेल्या मागणीनुसार साखर आयुक्तांनी कारखाना प्रशासनाला लेखी पत्र देऊन ही माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरी देखील ती माहिती दिलेली नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत विचारले असता त्याचेही उत्तर देत नाहीत. ही दडपशाही आम्ही कदापि सहन करणार नाही असेही थोरात म्हणाले. 

वेध माझा ऑनलाईन।
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असल्याचा दावा अध्यक्ष बाळासाहेब पाटील करतात. मग वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणे का टाळता? प्रश्न विचारणाऱ्या सभासदांचा बोलताना माईक का बंद करता?असा सवाल करत त्यामुळे प्रश्न संपणार नाहीत. मी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता  अध्यक्षांनी केलेली चिडचिड म्हणजे 'खाई त्याला खवखवे' अशीच परिस्थिती असल्याचा टोला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निवास थोरात यांनी पत्रकार परिषदेत लगावला. 

कराड येथे बुधवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माजी जिल्हा परिषद निवास थोरात बोलत होते. यावेळी शैलेश चव्हाण, भरत चव्हाण ,आनंदराव थोरात, विश्वास जाधव आदींची उपस्थिती होती. 

निवास थोरात म्हणाले, सह्याद्री कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र या सभेत सामान्य सभासदांचे म्हणणे ऐकून न घेता सत्ताधाऱ्यांनी मनमानी केली. सभासदांचे हक्क पायदळी तुडविले.सहकाराच्या नियमांचे पालन करूनच मी सह्याद्रीचा सभासद म्हणून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामध्ये ५ वर्ष रखडलेल्या कारखान्याच्या विस्तार वाढीचाही प्रश्न होता. त्यामध्ये नवीन विस्तारीकरणासाठी किती कंपन्यांनी सहभाग घेतला होता? कोणत्या कंपन्यांनी टेंडर भरली होती? कोणाला काम 
देण्यात आले त्याची कॉपी, प्रोसिडिंग नक्कल व करारनामा मागितले होते. मात्र या प्रश्नाबाबत टुकार उत्तर देऊन सभा गुंडाळण्याचे काम अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले. उलट माझ्या व्यक्तिगत कर्जाबाबत टीका टिप्पणी केली व तुम्हाला जी माहिती पाहिजे ती साखर आयुक्तालय येथून घ्या असे मुजोर उत्तर दिले. हा प्रकार लांच्छनास्पद आहे .

खरंतर याबाबत मी साखर आयुक्तांकडे केलेल्या मागणीनुसार साखर आयुक्तांनी कारखाना प्रशासनाला लेखी पत्र देऊन ही माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरी देखील ती माहिती दिलेली नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत विचारले असता त्याचेही उत्तर देत नाहीत. ही दडपशाही आम्ही कदापि सहन करणार नाही. याशिवाय मयत वारसदार सभासदांच्या प्रश्नावरही त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेले नाही ही बाब चुकीची आहे.

कराडात काँग्रेसकडून भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांचा निषेध ; प्रशासनाला निवेदन सादर;

वेध माझा ऑनलाईन
लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांना जीवंतपणे छातीत गोळ्या घालण्याची धमकी भाजपाचे प्रवक्ता पिंटू महादेवन यांनी केरळमधील एका भाषणात उघडपणे दिली होती. या अमानुष व लोकशाहीला गळा घालणाऱ्या वक्तव्याचा कराडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला.या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे केरळचे मा. मुख्यमंत्री यांना संबंधित प्रवक्त्याला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील,  राजेंद्र चव्हाण, माजी जि. प. सदस्य निवासराव थोरात, पाटील, अधिकराव गरुड, दिग्विजय सूर्यवंशी,  सुभाषराव पाटील, विठ्ठलराव शिखरे, नानासो जाधव, दीपक पाटील, गजानन आवळकर, संजय माळी, दत्तात्रय काशीद, शशिकांत महापुरे, नितीन पाटील, आनंदराव जाधव, शंकरराव पवार, कराड चे माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, संतोष जगताप, पंकज पिसाळ, भीमराव पाटील, शब्बीर मुजावर, देवदास माने, जयवंतराव पाटील, सुरेश भोसले, सयाजी पाटील आदिसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह देशमुख म्हणाले, “विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी संपूर्ण देशामध्ये संविधान बचावासाठी चळवळ उभी केली आहे. मात्र, या विचाराला दडपून टाकण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. याचाच प्रत्यय भाजप प्रवक्ते पिंटू महादेवन यांच्या वक्तव्याने झाला आहे. महात्मा गांधींजींची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने राहुल गांधींची हत्या करण्याचा कट त्यांनी व्यक्त केला, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. संविधान वाचवण्याचा विचार देशभर राहुल गांधी करत असताना भाजप त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व कराड दक्षिण काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो.

"त्या' भाजपा प्रवक्त्याला अटक करा ; कराड तालुका काँग्रेसकडून निवेदन सादर; कराड तालुक्यात काँग्रेसने तडकाफडकी तालुकाध्यक्ष का बदलले ? कराड दक्षिणमध्ये वाढलेली मते व त्याबाबतचे पत्रकारांना पुरावे देण्याचं काय झाले? काँग्रेस नेत्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देणे का टाळले ; पत्रकारांच्यात चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन।
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जिवंतपणी गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजपा प्रवक्त्याला अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने कराडचे मा. तहसीलदार यांना देण्यात आले.दरम्यान माजी तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांची यावेळी उपस्थिती नव्हती याची चर्चा पत्रकारांच्यात पुन्हा झाली यावेळी पत्रकारांनी याच काही संदर्भातील विचारलेल्या प्रश्नाबाबत उत्तरे देणे उपस्थित नेत्यांनी टाळले

यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील,  राजेंद्र चव्हाण, माजी जि. प. सदस्य निवासराव थोरात, पाटील, अधिकराव गरुड, दिग्विजय सूर्यवंशी,  सुभाषराव पाटील, विठ्ठलराव शिखरे, नानासो जाधव, दीपक पाटील, गजानन आवळकर, संजय माळी, दत्तात्रय काशीद, शशिकांत महापुरे, नितीन पाटील, आनंदराव जाधव, शंकरराव पवार, कराड चे माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, संतोष जगताप, पंकज पिसाळ, भीमराव पाटील, शब्बीर मुजावर, देवदास माने, जयवंतराव पाटील, सुरेश भोसले, सयाजी पाटील आदिसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान नुकतेच काँग्रेसने कराड तालुक्यात नामदेव पाटील यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र ही नेमणूक अचानक का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
माजी तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे  विश्वासू मानले जात होते. तथापि, शिंदे सध्या भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, त्यामुळेच त्यांना डावलून काँग्रेसने तातडीने नूतन अध्यक्ष नेमल्याचे बोलले जात आहे.
याबाबत पत्रकारांनी आज उपस्थित काँग्रेस नेत्यांना विचारणा केली असता आजचा तो विषय नाहीये त्यावर नंतर बोलू असे म्हणत नेत्यांनी उत्तर देणे टाळले 
तसेच कराड दक्षिणमध्ये 40 हजारांनी मते वाढल्याचा दावा काँग्रेसचे ओबीसी नेते भानुदास माळी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. याबाबत पुरावे सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र पत्रकारांनी याच संदर्भात विचारले असता काँग्रेसच्या नेत्यांनी याचेही उत्तर देण्याचे सरळसरळ टाळले. “हा प्रश्न काँग्रेसनेच उपस्थित केला आहे, आम्ही फक्त स्पष्टीकरण मागतो आहोत” असे पत्रकारांनी स्पष्ट सांगितले तरीही या नेत्यांनी विषयांतर करत उत्तर देणे टाळले.
दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने पत्रकारांच्यात चर्चा आणखी रंगली. शिंदे हे भाजप आमदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आणि त्याच वेळी तालुकाध्यक्षपदाची तडकाफडकी झालेली नवीन नेमणूक या दोन्ही चर्चा सध्या शहरात जोरदार सुरू आहेत... 
दरम्यान यावेळी उपस्थित काँग्रेस नेत्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न दिल्यामुळे... जर आरोप व दावे खरे असतील तर उत्तरे का दिली नाहीत? अशी चर्चा सुरू झाली आहे.