Monday, February 24, 2025

कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारेंनी ठराविक ठेकेदारांना टेंडर भरता येईल अशी प्रक्रिया राबवली ; अनूनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या सचिन पाटील यांचा थेट आरोप ; म्हणाले...या भानगडीमागचे गौडबंगाल काय ? चौकशीची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।
निविदा प्रक्रिया सर्व कंत्राटदारासाठी खुली असून त्यात स्पर्धा होणे आवश्यक आहे. स्पर्धा झाल्यास चांगली कामे होऊन त्यातून नगरपालिकेचा फायदा होतो. असे असताना
माझी वसुंधरा अभियानांतर्गत कराड नगरपालिकेला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून सुमारे ५ कोटी रुपयांची झाडे लावण्याबाबतची इ नाविदा प्रक्रिया मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या नियंत्रणाखाली राबवण्यात येत आहे. ही निविदा 'लिमिटेड' केली आहे. त्यामुळे ठरावीक ठेकेदारांना निविदा भरता येत असून इतरांना डावलले जात आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी अनुनी भागीदार इनफा इन्फ्रास्ट्रक्चरचे सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

याबाबत नगरपालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे मुख्याधिकारी खंदारे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

माजी वसुंधरा अभियानांतर्गत झाडे लावण्यासाठी सुमारे ५ कोटी रकमेच्या एकूण ५ निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदा लिमिटेड करण्यात आल्या आहेत. याबाबत नगरपालिकेत माहिती विचारली असता सदर निविदा जाहीर झाल्याबद्दल ज्या कंत्राटदारास ई मेल आला आहे, तोच कंत्राटदार ही निविदा भरू शकतो. इतर कंत्राटदार ही निविदा भरू शकत नाहीत. ही निविदा सर्वांसाठी खुली ठेवलेली नाही. याबाबत मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना भेटून सदरची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावेळी त्यांनी अभियंता काकडे यांना या संदर्भात भेटण्यास सांगितले, तर काकडे यांनी या संदर्भात आम्ही आमच्या टेंडर क्लार्कला विचारून सांगतो, अशी उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत.
 
सदर निविदा लिमिटेड करणे हे आदर्श ई-निविदा नियमावलीची पायमल्ली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धा होणार नाही. त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आमची आनुनी इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी गेली 17 वर्षे गव्हर्मेंट निविदा भरत असून विविध कामे करत आहे. नगरपालिकेच्या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी पात्र आहे तरीसुद्धा आम्हाला यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत कामे करण्यासाठीची निविदा गेल्या वर्षी जानेवारी 2024 मध्येही सुरू करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही या निविदा भरल्या होत्या, मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही निविदा प्रक्रिया त्यावेळी रद्द केली होती. त्यानंतर वर्षांनी पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र ती  ठराविक कंत्राटदारांसाठीच करून इतरांना त्यात डावलण्यात आले आहे. या मागचे गौडबंगाल काय आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे सचिन पाटील यावेळी म्हणाले 


Thursday, February 20, 2025

कराडमध्ये बंदिस्त गटर बांधण्यास प्राधान्य देणार; राजेंद्रसिंह यादव; शुक्रवार पेठेत सव्वा कोटींच्या रस्ते कामाचा शुभारंभ

वेध माझा ऑनलाइन
कराड शहरवासीयांना नागरी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. गटर्सबाबात सतत येणाऱ्या तक्रारी पाहता यापुढील काळात शहरात बंदिस्त गटर बांधण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून प्राप्त झालेल्या निधीतून व नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बंदिस्त गटर बांधण्यात येत असल्याची माहिती शिवसेना व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

येथील शुक्रवार पेठेत विविध ठिकाणी सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये किंमतीच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी राजेंद्रसिंह यादव बोलत होते.

ते म्हणाले की, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या माध्यमातून कराडला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून कराड फेज टूमधील‌ कामे सुरू आहेत. जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीतून विविध प्रभागात रस्ते, गटर्स व इतर कामे सुरू आहेत. रस्ते करत असताना त्या भागातील गटर्स बंदिस्त करण्यात येत आहेत. हे गटर्स ड्रेनेज पाईपला जोडण्यात येते आहेत. या संकल्पनेमुळे आरोग्य विभागावरील ताण कमी होण्यास मदत होत आहे.

यावेळी माजी सभापती स्मिता हुलवान, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, सुधीर एकांडे, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, विनोद भोसले, प्रीतम यादव, ओमकार मुळे, दिनेश यादव, ऋतुराज मोरे, रुपेश कुंभार, नुरुल मुल्ला, राहुल खराडे, दिनेश यादव, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र माने, प्रकाश पवार, शिवाजी माळी, अशोक पवार, विनायक चौकर, भैय्यासाहेब तवर, जयभारत, ओम व महारुद्र हनुमान मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

या विकास कामांत आझाद चौक ते सात शहीद चौक रस्ता बीएमबीसी करणे 28 लाख 32 हजार, मोरे घर ते माने घर रस्ता डांबरीकरण करणे 16 लाख 28 हजार, रंगार वेस महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरणाचे लोकार्पण 32 लाख 64 हजार, मारुती मंदिर ते जयभारत कमान रस्ता डांबरीकरण करणे 29 लाख 23 हजार, मडकी घर  ते गुरसाळे ज्वेलर्स रस्ता बीएमबीसी करणे 18 लाख 34 हजार आदी कामांचा समावेश आहे.

मोठं संकट धडकणार; आयमडीने दिला इशारा ; 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार ?काय आहे बातमी?


वेध माझा ऑनलाइन
पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे, हवामान विभागाकडून देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे.
 
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं असून, या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळामुळे उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
यासोबतच अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार वीजा आणि मेघगर्जनेची देखील शक्यता आहे, असंही आयएमडीनं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


पूर्वोत्तर भारतामधील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये पुढील सात दिवस मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
उत्तर भारतामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम पावसासोबतच बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार पुढील काही दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव राहणार असून, काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढू शकतो.

स्पॅनिश शहरातच्या लास पाल्मासच्या सुमद्र किनाऱ्यावर आढळला दुर्लभ डुम्सडे मासा ; पसरली घबराट ; काय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाइन
अटलांटिक महासागराच्या कॅनरी बेटावरील स्पॅनिश शहरातच्या लास पाल्मासच्या सुमद्र किनाऱ्यावर एक दुर्लभ मासा डुम्सडे आढळला आहे. या माशाला प्रलयाचा मासा म्हटले जाते. या माशाचे दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची नांदी म्हटले जाते. हा मासा अचानक समुद्रातून तडफडत किनाऱ्यावर आला आणि तो मृत पावला. ओअरफिश सहसा पाण्याच्या बाहेर दिसत नाही. अशी मान्यता आहे की हा मासा जेव्हा समुद्राच्या बाहेर पडतो तेव्हा काही तरी वाईट घडणार असल्याचे म्हटले जाते. या मासा दिसल्यानंतर भूकंप येत असल्याचा दावा देखील केला जात असतो, त्यामुळे घबराट पसरली आहे.

धनंजय मुंडेंना सलग 2 मिनिटं बोलणंही कठीण, मुंडेंना 'या' दुर्मिळ आजाराचं निदान ;

वेध माझा ऑनलाइन
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न-नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना एका दुर्मिळ आजाराचं निदान झालं असून त्या दुर्मिळ आजाराचं नाव बेल्स पाल्सी असे आहे. बेल्स पाल्सी या नावाच्या दुर्मिळ आजारामुळे धनंजय मुंडे यांना सलग दोन मिनिटंही व्यवस्थित बोलणं देखील कठीण झालं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर या आजाराचं निदान झाल्यामुळे त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे कॅबिनेट आणि जनता दरबार कार्यक्रमला अनुपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता या दुर्मिळ आजाराचं निदान झालं असून त्याच्यावर मुंडे उपचार घेत आहेत.

यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं असून त्यात त्यांनी असं म्हटलं की, माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी घोटाळ्याचे आरोप...

वेध माझा ऑनलाइन
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी घोटाळ्याचे आरोप केले. मंत्रिमंडळाच्या परवानगीविना मुंडेंकडून पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले असं म्हणत २०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेत. तर अंजली दमानिया यांच्या आरोपांवर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कॅबिनेटमध्ये कृषी विभागातील खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता होती, असं धनंजय मुंडे म्हणाले. अंजली दमानिया ज्याला पत्र म्हणतायत ते पत्र नसून टिपण आहे असून टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कृषी विभागाच्या खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता आहे. कॅबिनेट निर्णयाद्वारे मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. दमानियांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप खोटे असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत ते आरोप फेटाळून लावले आहेत. तर अंजली दमानिया फक्त मिडीया ट्रायलसाठी आरोप करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. तर आम्ही खोटी कागदपत्र तयार केली असतील तर योग्य त्या मंचावर तक्रार करावी असं थेट आव्हान देखील धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलंय. बदनामीबद्दल अंजली दमानिया यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील मुंडे यांनी दिली.

Wednesday, February 19, 2025

शिवजयंतीचे औचित्य साधून कराड बॅडमिंटन क्लबच्या वतीने शालेय बॅडमिंटन स्पर्धां उत्साहात ;

वेध माझा ऑनलाइन
शिवजयंतीचे औचित्य साधून कराड बॅडमिंटन क्लबच्या वतीने शालेय बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा दिनांक 15 व 16 फेब्रुवारी रोजी  छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे नुकत्याच पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन श्री किशोर कुलकर्णी व राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले 
सदर स्पर्धसाठी 229 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती ही स्पर्धा 6 वयोगटात खेळवण्यात आली यामध्ये कराड तालुक्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला तसेच सर्व क्रीडा शिक्षकांनी यामध्ये मोलाची मदत केली 

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
    मुली--
1 ली ते 4 थी 
1 शरयू कदम
2 विभावरी कांबळे
3 मियारा मोरे व विभावरी गायकवाड 
5 वी ते 7 वी 
1 श्रद्धा इंगळे
2 अदिती आदमने
3 मानसी महाडिक व मिरा तोडकर.
8 वी ते 10वी 
1 देवांशी पाटील
2 आर्या देशमुख 
3 गायत्री कदम व अनन्या पाटील 
    
 मुले 
1 ली ते 4 थी 
1 विराज आरजूकडे
2 शौर्य पावसकर
3 गोयम मूथा व भार्गव पाटील
5 वी ते 7 वी 
1 कनक जोशी 
2 परम रसाळ 
3 शर्विल बानुगडे व चैत्र शहा 
8 वी ते 10वी 
1.राजवीरसिंह डूबल
2 अर्जुन जाधव
3 मनिष पाटील व पियूष   पाटील 
स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्री अतुल पाटील (ॲथलेटिक्स राष्ट्रीय कोच)यांच्या हस्ते पार पडला बक्षीस समारंभास श्री किशोर कुलकर्णी,राहुल कुलकर्णी, निलेश फणसळकर,ओंकार पालकर, अतुल पाटील तुषार गद्रे प्रकाश गद्रे आदी उपस्थित होते..