सर्किट हौस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी पालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
वाटेगावकर पुढे म्हणाले...यशवंतराव चव्हाण हे आमचे व सर्व राज्याचे दैवत आहे त्यांच्या समधीलगत होणाऱ्या नेकलेस रोड साठी अतुलबाबांनी मोठा निधी आणला आहे तिथून होणार हा मार्ग शहराच्या विकासात भर घालणारा ठरणार आहे अनेक ठिकाणी अतुलबाबांच्या माध्यमातून शहरात निधी येत असताना सत्ताधारी मात्र खोटे आरोप करत तो निधी शहरांसाठी वापरण्याचे टाळत आहेत यामध्ये विकासापेक्षा राजकारण दिसत आहे आणि हे शहराच्या भविष्यासाठी योग्य होणार नाही आपल्या आसपास असणाऱ्या अनेक पालिकेच्या विकासाचा रेशीओ पहिला तर कराड पालिका खूप मागे असल्याचे दिसते हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले
घनकचरा प्रकल्पाच्या घोटाळ्याचा पुनरुचार करत त्यांनी सध्या देखील याच भ्रष्टाचाराची पुनरावृत्ती चालू असल्याचे आताच्या कामकाजावर टीका करत पटवून दिले
ते म्हणाले...माझ्यावर खंदारे यांच्या गाडीत बसून जाण्याचा आरोप होतो तो पूर्ण खोटा आहे मी त्या खंदारे च्या तोंडाकडे पण पहात नव्हतो... गाडीत बसण्याचा प्रश्नच येत नाही
अतुल बाबांना तुम्ही खोटी माहिती देता...या आरोपावर बोलताना वाटेगावकर म्हणाले...नगराध्यक्षनी काही आरोप केले तरी स्वतः अतुलबाबा याबाबत कधी काही बोलले आहेत का? असे खोटे आरोप करून नगराध्यक्ष शहराला भरकटवत आहेत...
शहरातील उर्दू शाळा, असेल किंवा 40 फुटी रस्त्याचा विषय असेल तसेच अनेक अशा शहरातील अनेक चर्चेच्या विषयांना हात घालत आपण कराडच्या विकासासाठी नेहमीच आग्रही राहणार असून त्यासाठी ज्यावेळी बोलायची गरज भासेल तेव्हा नक्कीच बोलणार असेही त्यांनी ठणकावून सांगितले
नगरसेवक अजय पावसकर म्हणाले...सोमवार पेठेतील त्या वादग्रस्त रस्त्याबाबत तोडगा काढू असे सांगत नगराध्यक्ष यादव यांनी मला सांगितलं होतं पण चर्चेला बसू बसू अस करत त्यांनी वेळ घालवला व त्यानंतर हा विषय सभेत पार पडला
नगरसेवक शिवाजी पवार व आशुतोष दुबल यांनीही चर्चेत सहभागी होत सत्ताधारी पार्टीच्या आरोपांना फेटाळले व पालिकेतील भाजप पार्टी अतुलबाबांच्या नेतृत्वात शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले
आभार शहराध्यक्ष सुषमा लोखंडे यांनी मानले
No comments:
Post a Comment