Tuesday, August 9, 2022

राज्याच्या स्त्री-शक्तीवर अन्याय - सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया...तर काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं....अशी अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया...

वेध माझा ऑनलाइन - स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं...." असं अजित पवार 
दरम्यान,काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं...." असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ज्यांच्याबद्दल काही बोललं जातं..., ज्यांना क्लिनचीट मिळाली नाही... त्यांनाही मंत्रिमंडळात घेतलं जातं... ते टाळलं असतं तर बरं झालं असतं"... असं अजित पवारांनी एबीपी माझा ला आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. 
मात्र त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही

No comments:

Post a Comment