वेध माझा ऑनलाइन । मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे. गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे आणि हि अतिशय चिंताजनक बाब आहे.महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस ह्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे अशी मागणी आ.पृथ्वीराज बाबा विचारमंचचे
अध्यक्ष.सचिन विलासराव पाटील यांनी केली आहे
दरम्यान दुसरी घटना मुंबईतील महिला वसतिगृहामध्ये घडलेला बलात्कार आणि हत्येची दुर्दैवी घटना आहे महिला सुरक्षिततेच्या बाबत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील सरकार गंभीर नाही हे आता सर्व जनतेला दिसत आहे
राज्यातील भाजप सरकारने महिला वसतिगृहांच्या भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने कॅमेरा आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे. काही दिवसांपासून मुली व महिलांसोबत घडणाऱ्या घटनांबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेमुळे सत्ताधारी फार गंभीर आहेत असे दिसत नाही, हे दुर्दैवी आहे, मुंबईतील या घटनेनंतर महिला वसतिगृहात मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या सर्व सुविधा प्राधान्याने करण्यावर सरकारने लकवर निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे...
No comments:
Post a Comment