सध्या साताऱ्यात वेगळ्याच घडामोडी घडत आहेत. 2019 लोकसभेला शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचा उदयनराजे भोसले यांनी 1 लाख 26 हजाराच्या मताने पराभव केला होता. त्या माथाडी कामगार नेते तथा शिवसेना नेते नरेंद्र पाटील यांनी सातारा मतदारसंघातून मला उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपाकडे केली आहे. उदयनराजे यांच्या मागोमाग आता नरेंद्र पाटील यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘गेल्यावेळी मी शिवसेनेकडून लढलो होतो. उदयनराजेंविरोधात लढायला कुणीच तयार होत नव्हता. पण मी लढलो आणि चार लाखांच्यावर मते घेतली होती. आमच्या दोघांच्या मतांमध्ये फक्त ३० ते ३५ हजारांचा फरक होता. सातारा लोकसभा मतदार संघात माझी चांगली पकड आहे. भाजपच्या चिन्हावर मला ही संधी मिळावी, अशी इच्छा आहे. खासदार म्हणून मला चांगली काम करण्याची संधी मिळेल. ग्रामीण भागासह शहरी भाग, राज्यात माझा चांगला जनसंपर्क आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे मला न्याय देतील अशी आशा आहे.
सातारा निवडणूक जागेसाठी पेच निर्माण झालेला आहे. मात्र, पक्षाचा निर्णय हाच अंतिम निर्णय असतो. मग तो निर्णय कोणाच्या बाजूने लागेल सांगता येत नाही. पण केंद्रात मोदी यांच्या बाजूने 405 खासदार देण्यासाठी आम्ही संयुक्तपणे काम करू. उदयनराजे हे मागील तीन दिवसांपासून दिल्लीत मुक्कामी आहेत. मात्र, त्यांना भेट मिळत नाही हे खूप वाईट आहे. उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवे, पक्ष जो निर्णय देईल तो मान्य करायला हवा, असे देखील नरेंद्र पाटील यांनी म्हंटले
No comments:
Post a Comment