Monday, March 25, 2024

सातारा जिल्ह्यात लोकसभेचा "गुलाल' कोणाच्या नशिबात ? चर्चेला जोर ;

वेध माझा ऑनलाईन। सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या उदयनराजे यांचे नाव चर्चेत आहे त्यांना भाजपचे तिकीट मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष आहे अजितदादा गट देखील याठिकाणी आपला क्लेम सांगत आहे... दुसरीकडे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या चिरंजीवांना शरद पवारांच्या गटाची उमेदवारी मागण्याबाबत चर्चा रंगली...मात्र त्यांना जिल्ह्यातच राष्ट्रवादी अंतर्गत विरोध झाल्याचे पहायला मिळाले...स्वतः श्रीनिवास पाटील यांनादेखील याठिकाणी निवडणूक लढवणे पहिल्यासारख सोपं राहिलेलं नाहीये... मग या मतदार संघात नेमकं काय होणार... या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत

खासदार श्री निवास पाटील यांना पहिल्यांदाच सातारा लोकसभा मतदार संघातील सध्याची निवडणूक अवघड जाण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत पाटणकर गटाने यावेळी श्रीनिवास पाटील यांना ओपनली विरोध दर्शवला आहे तसेच कराड उत्तरच्या आमदारांचा खासदार पाटील यांना विरोध असल्याचीही मतदार संघात चर्चा झाली... दरम्यान राष्ट्रवादी च्या झालेल्या जिल्ह्यातील मेळाव्यादरम्यान चक्क जिल्ह्याच्या खासदारांचा फोटोच राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या फ्लेक्स वरून गायब झाल्याचे सर्वांनी पाहिले... त्याचवेळी श्रीनिवास पाटील यांना कराड पाटणसह जिल्ह्यातूनच विरोध असल्याचे समोर आले...

त्यानंतर त्यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना याठिकाणी तिकीट मिळावे असे मनसुबे आखले जाऊ लागले...मात्र त्यांनाही विरोध झाला... मग आता मतदार संघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कडून कोण?  हा प्रश्न उभा राहिला...तो आजपर्यंत तसाच आहे...

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे झालेले दोन तुकडे राष्ट्रवादी च्या बालेकिल्ल्याच्या ताकदिला तडा देणारे ठरल्याने आता शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादाची राष्ट्रवादी अशी "शकले' पहायला मिळत आहेत... या सर्व घडामोडी भाजपच्या पथ्यावर किंवा अजितदादा यांच्या राष्ट्रवादी च्या पथ्यावर कशा पडतील याबाबत प्लॅनिंग करताना भाजप व अजितदादा दिसत आहेत... त्याचेच प्रत्यंतर म्हणून याठिकाणी भाजप बरोबर अजितदादा यांनी देखील मतदार संघावर आपला क्लेम करत आपले उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत हे दोन्ही पक्ष आहेत...

यापूर्वी राष्ट्रवादी एकत्रित असताना जिल्ह्यातील सर्व आमदार एकमुखाने शरद पवारांच्या आदेशाने श्रीनिवास पाटील यांना निवडून द्यायचे मात्र, खासदार म्हणून आजपर्यंतचे त्यांचे कोणतं काम जिल्ह्यात प्रभाव टाकणारे ठरले आहे ? किती संस्था त्यांनी उभ्या केल्या ? किती उद्योग जिल्ह्यात त्यांनी आणले ? महिला,शेतकरीवर्ग तसेच बेरोजगारांसाठी त्यांनी कोणते उठावदार काम केले ? वाढत्या गुन्हेगारी विरोधात ठोस उपाययोजना करण्यासाठी त्यांनी कोणकोणते प्रयत्न केले... हे... आणि असे अनेक प्रश्न जिल्ह्यातील जनतेत चर्चेत असतात...या प्रश्नांची उत्तरे देणे ऐन निवडणुकीत थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीला कितपत परवडणार ? अशीही चर्चा असते...

सध्या राष्ट्रवादी दोन भागात विभागल्याचे चित्र आहे त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास... जिल्ह्यातील कोण कोणत्या युत्या आणि आघाड्या एकत्रित येऊन कोणते राजकीय गणित कसे जुळवुन आणतात...यावरून कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून देणार... हे स्पष्ट कळणार आहे...मात्र अद्याप हे दोन्ही गट जिल्ह्यात एकमेकांच्या डावपेचाकडे लक्ष देऊन आहेत...भाजप- शिंदे गट- आणि अजितदादा यांचा जिल्ह्यातील गट सध्या एकत्रितपणे ज्या उमेदवारांला उचलून धरतील त्याचे पारडे जड होईल असे सध्याचे राजकीय गणित सांगते... दुसरीकडे श्रीनिवास पाटील हे शरद पवार गटाचे उमेदवार असतील तर, त्यांना त्याच गटातून कितपत मदत होणार...की विरोध होऊन विरोधी उमेदवाराचा फायदा होणार...हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे आहे...दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेस- व राष्ट्रवादीचे सख्य सर्वानाच परिचित आहे...त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस या निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका बजावेल असेच दिसते...उद्धव ठाकरे गट जिल्ह्यात फारसा नसला तरी मतांच्या बेरीज- वजाबाकीसाठी याही गटाची मदत महत्वपूर्ण ठरेल असेही राजकीय जाणकार सांगतात... 

दरम्यान याठिकाणी कोणत्याच पार्टीने आपले उमेदवार अद्यापतरी जाहीर केलेले नाहित...मतदारसंघात एका बाजूची उमेदवारी शरद पवार गटाकडे असेल...तर दुसरीकडे अजितदादा व भाजप यांच्यापैकी कोणत्या गटाकडे उमेदवारी जाते हेही कळणे महत्वाचे ठरेल... तरीदेखील उदयनराजे भाजप कडून तिकिटासाठी आग्रही आहेत...त्यासाठी ते दिल्लीत 3 दिवसापासून होते...श्रीनिवास पाटील यांना होणारा अंतर्गत विरोध, भाजपची जिल्ह्यातील जोरदार मुसंडी आणि मित्रपक्षांची त्यांना मिळणारी साथ... या सर्व बाबींमुळे उदयनराजेना ही निवडणूक यावेळी सोपी जाणार का? अशी चर्चा आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाने ऐनवेळी एखादा चालणारा नवीन उमेदवार दिल्यास जिल्ह्यात थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीला पुन्हा गुलाल मिळणार का? अशाही  चर्चा जोर धरू लागल्या आहेत...पाहूया पुढे काय होतंय ते...

No comments:

Post a Comment