ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने आगळीक केली असून त्याने भारतावर ड्रोन हल्ले केले. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर, पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅकआऊट करण्यात आलं असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे.
भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने लागोलाग उत्तर दिलं असून थेट इस्लामाबाद आणि लाहोरवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला आहे
No comments:
Post a Comment