वेध माझा ऑनलाइन
पाकिस्तानच्या आगळीकतेनंतर भारताने लाहोरमधील रडार यंत्रणा उद्ध्वस्त करुन त्या देशाला इशारा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन देशभर सायरनचा वाजवण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना हाय अलर्टचे निर्देश दिले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या सीमाभागात जाऊ नका, लाहोरमध्ये लपण्यासाठी सुरक्षित आश्रय शोधा, तसेच देश सोडण्यासाठी सर्व कागदपत्रं तयार ठेवा असे आदेश अमेरिकेने दिले आहेत. पाकिस्तानमधील पंजाबच्या लाहोरमधील अमेरिकन नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. अमेरिकेच्या लाहोरस्थित वाणिज्यदूतावासातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेने त्यांच्या पाकिस्तानमधील नागरिकांना दिलेल्या या सूचनांनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध अटळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी लाहोरमध्ये कुठेही फिरू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. लाहोरच्या विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर हा रिकामा केला जाऊ शकतो असंही अमेरिकेने सांगितलं आहे. पाकिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी प्लॅन तयार करा, सर्व आवश्यक कागदपत्रं तयार ठेवा असंही अमेरिकेने सांगितलं आहे. कुणाच्याही मदतीच्या भरवशावर थांबू नका. स्थानिक माध्यमांतील बातम्यांवर लक्ष ठेवा असंही सांगण्यात आलं आहे.
No comments:
Post a Comment