वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केली आहे. कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना हा सर्वोच्च सन्मान मिळावा, अशी निलेश लंके यांनी भूमिका व्यक्त करत आग्रही मागणी केली.
दरम्यान, यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांना माध्यम प्रतिनिधींनी सवाल केला असताना त्यांनी हसत त्यावर प्रतिक्रिया दिली. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी या मागणीची खिल्ली उडवत या मागणीवर त्यांनी “भारतरत्न हा काय एखाद्या मंडळाचा पुरस्कार आहे का?” अशा शब्दात टीका करत या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
No comments:
Post a Comment