Tuesday, June 30, 2026

शासनाकडून कराड नगरपरिषदेला जेटिंग मशीन व फायर व्हेईकलची भेट; नगराध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण

वेध माझा ऑनलाईन  : 
शहरातील स्वच्छता व्यवस्था आणि अग्निसुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने कराड नगरपरिषदेला शासनाकडून जेटिंग मशीन व लहान आकाराचे फायर व्हेईकल अशी दोन महत्त्वाची वाहने प्राप्त झाली आहेत. या वाहनांचे लोकार्पण नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले की, शहरातील भुयारी गटारांची प्रभावी स्वच्छता करण्यासाठी नव्याने प्राप्त झालेली जेटिंग मशीन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या मशीनची क्षमता ८ हजार लिटर असून तिची किंमत सुमारे १ कोटी रुपये आहे. तसेच लहान रस्ते, बोळ आणि अरुंद भागांमध्ये आग लागल्यास तातडीने पोहोचून आग विझवण्यासाठी नव्याने मिळालेले फायर व्हेईकल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या वाहनाची किंमतही सुमारे १ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय भविष्यात ३ हजार लिटर क्षमतेची आणखी एक जेटिंग मशीन तसेच मोठ्या क्षमतेचे फायर व्हेईकलही नगरपरिषदेला उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गटारांची स्वच्छता, साचलेल्या पाण्याचा निचरा आणि आपत्कालीन अग्निशमन सेवेसाठी ही दोन्ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वासही नगराध्यक्ष यादव यांनी व्यक्त केला.
लोकार्पण कार्यक्रमास नगरसेवक, नगरसेविका, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, June 28, 2026

राज्यात पुन्हा होणार राजकीय खळबळ!आता फुटणार 24 आमदार ?

वेध माझा ऑनलाईन -
राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू आहेत, नुकतीच शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडल्याचं पहायला मिळालं, ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या मतदारसंघात खासदारांनी बंडखोरी केली, त्या -त्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडका सुरू आहे. दरम्यान ज्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती,  या बैठकीला 4 आमदारांनी दांडी मारली होती, त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं

दरम्यान त्यानंतरची मोठी बातमी म्हणजे महाविकास आघाडीने आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला 24 आमदार गैरहजर असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आता मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीची मुंबईमध्ये जी बैठक झाली त्यानंतर ऑपरेशन आमदार याची चर्चा सुरू आहे. या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते,  या आमदारांच्या मनात नक्की काय आहे?हे विचारलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरती सगळे नाराज आहेत,  स्वतःहून जर कोणी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत असतील तर त्याला आम्ही कशाला नाही म्हणू,  24 आमदार गैरहजर राहिले त्यांच्याशी आम्ही चर्चा करू त्यांची नाराजी काय आहे ते जाणून घेऊ असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

Saturday, June 27, 2026

कराड उत्तरला 286 कोटींचा विकासनिधी मंजूर रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड काँक्रीट रस्त्याला ऐतिहासिक मंजुरी ;

वेध माझा ऑनलाईन। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड या महत्त्वाच्या रस्त्याला काँक्रीटीकरणासाठी तब्बल 286 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या या निधीमुळे कराड उत्तरमधील प्रवास वेगवान होणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. सदर रस्ता काँक्रीट झाल्याने स्थानिक नागरिकांसह शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

पाठपुरावा यशस्वी

कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मतदारसंघातील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.याबत बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, कराड उत्तर हा भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ आहे. ग्रामीण भागातील दळणवळण वेगवान व्हावे, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी या रस्त्याचे काँक्रीटीकरण अत्यावश्यक होते. 286 कोटींच्या निधीमुळे कराड उत्तरच्या विकासाला नवी दिशा मिळेल.” तसेच उर्वरित रस्त्यांच्या निधीसाठी प्रयत्नशील आहेया काँक्रीट रस्त्यामुळे वेळेची बचत होणार असून अपघाताचे प्रमाणही कमी होणार आहे. ग्रामीण भागातील कृषी माल बाजारपेठेपर्यंत जलद पोहोचल्याने शेतकण्यांना आर्थिक फायदा होणार आहे. तसेच पर्यटकांचा ओघ वाढल्याने स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळणार आहे.कराड उत्तरच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध असून यापुढेही विकासकामांचा धडाका सुरूच राहणार असल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले.



पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पुराच्या पाण्याचा निचरा तसेच नालेसफाई व्यवस्थापन आतापासूनच चोख ; कृष्णा नदीच्या सध्याच्या प्रदूषण सदृश स्थितीचा शहराच्या पाणी व्यवस्थेशी संबंध नाही; नागरिकांनी घाबरू नये ; नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांची स्पष्टोक्ति ;


वेध माझा ऑनलाइन। 
पावसाळा सुरू झाला आहे त्या पार्श्वभूमीवर कराड शहरात जर भविष्यात पुर परिस्थिती निर्माण झालीच तर त्या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन केले आहे तसेच गटर, ओढे व नालेसफाई करून शहराच्या दळणवळणाला कोणतीही अडचण येणार नाही अशी चोख व्यवस्था शहरासाठी आतापासूनच आम्ही करून ठेवली असल्याने शहरवासीयांना कसल्याही प्रकारच्या अडचणीला पावसाळ्यात तोंड द्यायची वेळ येणार नाही अशी ग्वाही शहराचे नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी वेध-माझा शी बोलताना दिली
तसेच कृष्णा नदीच्या पाण्यात सध्या प्रदूषण सदृश स्थिती निर्माण झाली आहे त्याचा शहरातील पाणी व्यवस्थापनेशी कसलाही संबंध नाही कारण शहरासाठी पिण्याचे पाणी कोयना नदीतून आणले जाते त्यामुळे "कृष्णे'च्या प्रदूषण स्थितीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम नाहीये त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही अशी स्पष्टोक्तीही नगराध्यक्ष यादव यांनी यावेळी बोलताना दिली

सध्या कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याबाबत नागरिकांनी वारंवार चिंता व्यक्त केली असून  या गंभीर विषयाची अद्याप संबंधित प्रशासनाने दखल घेतलेली नसल्याचे चित्र आहे.
कृष्णा नदी ही नागरिकांच्या जीवनाशी जोडलेली आहे. पिण्याचे पाणी, शेती, पशुपालन आणि विविध उद्योगांसाठी या नदीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याची बाब समोर आल्यानंतर तातडीने या पाण्याची तपासणी होणे अपेक्षित होते. परंतु याबाबतची अधिकृतरीत्या कोणतीही ठोस माहिती प्रशासनाने अजूनही जाहीर केलेली नाही 
त्यामुळे वेध-माझा ने हा विषय उचलून धरला आहे...
दरम्यान या संपूर्ण विषयावर बोलताना नगराध्यक्ष यादव यांनी कृष्णे'च्या प्रदूषण स्थितीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम नाहीये कारण शहरासाठी पिण्याचे पाणी कोयना नदीतून आणले जाते
त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही अशी स्पष्टोक्तीही याबाबत बोलताना दिली आहे


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पुराच्या पाण्याचा निचरा तसेच नालेसफाई व्यवस्थापन आतापासूनच चोख ; कृष्णा नदीच्या सध्याच्या प्रदूषण सदृश स्थितीचा शहराच्या पाणी व्यवस्थेशी संबंध नाही; नागरिकांनी घाबरू नये ; नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांची स्पष्टोक्ति ;

वेध माझा ऑनलाइन। 
पावसाळा सुरू झाला आहे त्या पार्श्वभूमीवर कराड शहरात जर भविष्यात पुर परिस्थिती निर्माण झाली तर पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन केले आहे तसेच गटर, ओढे व नालेसफाई देखील करून शहराच्या दळणवळणाला कोणतीही अडचण येणार नाही अशी चोख व्यवस्था शहरासाठी आतापासूनच आम्ही करून ठेवली असल्याने शहरवासीयांना कसल्याही प्रकारच्या अडचणीला पावसाळ्यात तोंड द्यायची वेळ येणार नाही अशी ग्वाही शहराचे नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी वेध-माझा शी बोलताना दिली

तसेच कृष्णा नदीच्या पाण्यात सध्या प्रदूषण सदृश स्थिती निर्माण झाली आहे त्याचा शहरातील पाणी व्यवस्थापनेशी कसलाही संबंध नाही कारण शहरासाठी पिण्याचे पाणी कोयना नदीतून आणले जाते त्यामुळे "कृष्णे'च्या प्रदूषण स्तिथीचा शहराच्या पिण्याच्या पाण्यावर कोणताही परिणाम नाहीये त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही अशी स्पष्टोक्तीही नगराध्यक्ष यादव यांनी यावेळी बोलताना दिली




Friday, June 26, 2026

कृष्णा नदीच्या रंगबदलाची चौकशी कधी? प्रशासनाचे मौन का ? त्यामागचे कारण काय ? नागरिक संतप्त' ;वेध माझा'चा सलग पाठपुरावा सुरूच राहणार ;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या अनेक दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत असतानाही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचे चित्र कायम आहे. अद्याप नदीच्या पाण्याची अधिकृत तपासणी, अहवाल किंवा कारणमीमांसा जाहीर करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.त्यामुळे वेध माझा' हा विषय लावून धरणार आहे...कारण प्रश्न लोकांच्या आरोग्याचा आहे...

कृष्णा नदीवर परिसरातील लाखो नागरिकांचे पिण्याचे पाणी, शेती, पशुपालन आणि विविध उद्योग अवलंबून आहेत. अशा महत्त्वाच्या नदीच्या पाण्याचा रंग अचानक बदलल्यानंतर तातडीने वैज्ञानिक तपासणी होणे अपेक्षित होते. मात्र अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नदीकाठच्या विविध भागांत अजूनही पाण्यावर हिरवट थर दिसून येत असल्याचे नागरिक सांगत आहेत. काही ठिकाणी पाणी पूर्णपणे निळसर-हिरव्या रंगाचे दिसत असल्याने जलप्रदूषण, शैवालांची वाढ, रासायनिक घटकांचे प्रमाण किंवा औद्योगिक अथवा सांडपाण्याचा परिणाम अशा विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र याबाबत कोणताही अधिकृत खुलासा नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे.विशेष म्हणजे, इतका संवेदनशील विषय समोर आल्यानंतरही आमदार खासदार  लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी करून प्रशासनाकडून अहवाल मागविल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे "नदीचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा नाही, तर जनतेच्या आरोग्याचा आहे," अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

पर्यावरणप्रेमी, शेतकरी आणि नदीकाठच्या ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे तातडीने पाण्याचे नमुने तपासून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, तसेच रंगबदलामागील नेमके कारण जाहीर करून आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.

दरम्यान, 'वेध माझा'कडून या गंभीर विषयाचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

कराडच्या समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उत्साहात ;


वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्था यांच्या वतीने नुकताच सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा शास्त्रोक्त पद्धतीने पार पडला. या प्रसंगी बटूंना उपनयन संस्कार देण्यात आले.यावेळी उपस्थित ब्रह्मवृंदांनी बटूंना आशीर्वाद दिले. 

ब्राह्मण समाजात उपनयन संस्काराला अत्यंत महत्त्व असून हा संस्कार व्यक्तीच्या धार्मिक, सांस्कृतिक व वैदिक जीवनाचा प्रारंभ मानला जातो. वेदाध्ययनाची सुरुवात, शिस्त, संस्कार आणि कर्तव्यबुद्धी यांचा पाया या संस्कारातून घातला जातो. त्यामुळे उपनयन संस्कार हे समाजाच्या परंपरेचे आणि संस्कृतीचे जतन करणारे एक अत्यंत आवश्यक व महत्त्वपूर्ण संस्कार आहे.
समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्था, कराड ही संस्था समाजोपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबवत असून समाजातील सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक परंपरा जपण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. प्रतिवर्षी संस्था समाजहिताचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करून समाजबांधवांना एकत्र आणण्याचे कार्य करत आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री. जयंत बेडेकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच उपाध्यक्ष श्री. विकास देशपांडे, सचिव श्री. ओंकार आपटे गुरुजी खजिनदार श्री. प्रशांत कुलकर्णी या सर्व पदाधिकाऱ्यांच्या  योगदानाने विविध उपक्रम यशस्वीपणे पार पाडले जातात
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असून भविष्यातही असेच उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवले जातील, असे यावेळी संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

कराडच्या प्रीतिसंगम बागेत...लोकांचा वावर कमी...गाढवांचाच वावर जास्त !...बागेतील दोन दिवसांपासूनची परिस्थीती !


वेध माझा ऑनलाईन।
काल पासून कराडच्या प्रीतिसंगम बागेत गाढवांचा वावर अचानक वाढलेला दिसला.हा वावर वाढल्याने शहरातील नागरिकांनी असचर्य व्यक्त करत बागेच्या व्यवस्थापनेबाबत चिंता व्यक्त केली आहे असे चालू राहिल्यास शहरातील लोकांसाठी ही बाग आहे की गाढवांसाठी?  असा प्रश्न यानिमित्ताने लोकांना पडला आहे

प्रीतिसंगम बाग हा शहराच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्याठिकाणी स्व यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे त्याठिकाणी पावित्र्य राखणे जितके गरजेचे आहे तितकेच त्याठिकाणी चोख व्यवस्थापन असणे देखील  गरजेचे आहे 
दुपारपासून तेथे अनेकजण जेवणासाठी डबे घेऊन सहकुटुंब येत असतात... असे बऱ्यापैकी रोजचेच चित्र असते...सकाळी देखील लोकांची त्याठिकाणी फिरण्यासाठी गर्दी असते. ...संध्याकाळी तर पाय ठेवायला जागा उरत नाही इतकी त्याठिकाणी गर्दी होत असते...त्यामुळे त्याठिकाणचे व्यवस्थापन व्यवस्थित व चोख असणे गरजेचे आहे... जेणेकरून त्याठिकाणी नागरिकांना सुरक्षित आणि आनंदी वाटेल... पण तसे होताना दिसत नाही...

येथील प्रीतिसंगम बाग ,टाऊन हॉल, आणि स्व पी डी पाटील उद्यान या एकूण 3 ठिकाणचे व्यवस्थापन पालिकेकडून दिले गेले आहे...त्यापैकी प्रीतिसंगम बाग येथे काल अचानकपणे कळपाने गाढवं जमल्याचे दिसल्याने त्याठिकाणचे व्यवस्थापन ढिसाळ का असावे? अशी यानिमित्ताने चर्चा आहे...
याविषयी विरोधी गट आपला आवाज उठवेल तेव्हा उठवू दे...पण...कराडकर नागरिक वेध माझा शी संपर्क करून या विषयाला तोंड फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि  याठिकाणचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत...

ही परिस्थिती यापुढे बदलली गेली पाहिजे जेणेकरून त्याठिकाणी असलेले ढिसाळ व्यवस्थापनाचे चित्र संपूर्ण शहरासमोर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे...कारण प्रीतिसंगम बाग शहराचे नाक आहे...अनेक परिसरातून त्याठिकाणी विविध सहली तसेच अभ्यास दौऱ्यासाठी अनेक लोक विविध भागातून येत त्याठिकाणी असतात...याचे भान प्रशासनाला असले पाहिजे... 
त्यामुळे  पालिका प्रशासन यापुढे अशा चुका येथे होऊ देणार नाही आणि बागेमधील माणसांचा वावर कमी...आणि गाढवांचा वावर जास्त...अशा परिस्थितीला आळा घालण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल अशी लोकांना अपेक्षा आहे...

कृष्णा नदीच्या रंगबदलाकडे अजूनही दुर्लक्ष; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : बातमी प्रसिद्ध होऊनही ना पाहणी, ना अहवाल; नागरिकांमध्ये वाढत चालली चिंता ; वेध माझा हा विषय लावून धरणारच;

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याबाबत नागरिकांनी वारंवार चिंता व्यक्त केली असून  या गंभीर विषयाची अद्याप संबंधित प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी दखल घेतलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कृष्णा नदी ही परिसरातील लाखो नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहे. पिण्याचे पाणी, शेती, पशुपालन आणि विविध उद्योगांसाठी या नदीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याची बाब समोर आल्यानंतर तातडीने तपासणी होणे अपेक्षित होते. परंतु अनेक दिवस उलटूनही अधिकृतरीत्या कोणतीही ठोस माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
त्यामुळे वेध माझा ने हा विषय उचलून धरला आहे...कारण, प्रश्न नागरीकांच्या जीवाचा आहे...

नदीकाठच्या विविध भागांत अजूनही पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवट थर दिसून येत असून काही ठिकाणी पाणी पूर्णपणे निळसर-हिरव्या रंगाचे असल्याचे नागरिक सांगत आहेत. या प्रकारामुळे जलप्रदूषण, शैवालांची वाढ, रासायनिक घटकांचे प्रमाण वाढणे किंवा सांडपाण्याचे मिश्रण अशा विविध शक्यतांबाबत चर्चा सुरू आहे. मात्र अधिकृत तपासणी अहवाल नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.
विशेष म्हणजे, हा विषय सार्वजनिक चर्चेत आल्यानंतरही स्थानिक आमदार, खासदार किंवा इतर प्रमुख लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. "नदीच्या आरोग्याचा प्रश्न हा राजकारणापलीकडचा आहे. या विषयावर सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे," अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे तातडीने पाण्याचे नमुने तपासून अहवाल जाहीर करावा, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. तसेच नदीच्या रंगबदलामागील नेमके कारण आणि त्याचा पर्यावरण व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत स्पष्ट माहिती देण्याचीही मागणी होत आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना संबंधित यंत्रणांची शांतता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जागे होऊन या विषयावर ठोस भूमिका घेणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Thursday, June 25, 2026

कृष्णा’तील ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे अभिनंदन ; कृष्णा कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य करणार ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

वेध माझा ऑनलाईन।
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवत अभूतपूर्व यश मिळविले. या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे मुंबईत विशेष अभिनंदन केले. 

कृष्णा कारखान्यातील ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा केल्यानंतर आ.डॉ. अतुलबाबा भोसले पावसाळी अधिवेशनासाठी पुन्हा मुंबईत पोहचले. यावेळी विधान भवनातील दालनात मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा देत कृष्णा कारखाना, ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्व सभासदांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी स्पष्ट ग्वाही दिली. तसेच सहकार क्षेत्रात कृष्णा कारखान्याने केलेली वाटचाल उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनीही आ.डॉ. अतुलबाबांचे अभिनंदन केले. तसेच पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनीदेखील आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांना श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची मूर्ती आणि मानाचे उपरणे देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, पंढरपूर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, निळोबाराय देवस्थानचे विश्वस्त अशोक सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, June 24, 2026

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलची विजयाची हॅट्रिक ; १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय;

वेध माझा ऑनलाईन।
महाराष्टाचे लक्ष लागून राहिलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलने तब्बल १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजयाची हॅट्रिक साधली. या देदीप्यमान विजयामुळे कारखाना परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यस्थळावर चेअरमन डॉ. सुरेश भोसले  यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

कृष्णा कारखान्याच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीच्या निकालात चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखालील जयवंतराव भोसले सहकार पॅनलने सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधी संस्थापक पॅनलचा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक यशानंतर कारखाना परिसरात कार्यकर्ते, सभासद आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, आज सकाळी चेअरमन डॉ. सुरेश भोसले व श्री. विनायक भोसले यांचे कारखाना कार्यस्थळावर आगमन होताच त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि अभिनंदनाच्या वर्षावात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, हा विजय कारखान्याच्या प्रगतीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सभासद आणि कार्यकर्त्यांचा आहे. येत्या काळात कृष्णा कारखान्याला आणखी प्रगतीपथावर नेऊन राज्यातील आदर्श सहकारी साखर कारखाना म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यावेळी नवनिर्वाचित संचालक बाबासो शिंदे, छबन कांबळे, संग्राम पाटील, बाजीराव थोरात, सत्यजित पाटील, बाळासो जगताप, माजी संचालक संजय पाटील, विलास भंडारे, दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संजय पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, कराड पं. स. सभापती नंदाताई यादव, जिल्हा परिषद सदस्या शैलजा शिंदे, कराडच्या माजी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, शिवाजीराव थोरात, राजेंद्र माने, प्रकाश पाटील, प्रकाश देसाई, धनाजी जाधव, रमेश मोहिते, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, एम. के. कापूरकर यांच्यासह कराड, वाळवा व कडेगाव परिसरातील कार्यकर्ते व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कृष्णा नदीच्या रंगबदलाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संताप,; अनेक दिवसांपासून चर्चेत असतानाही लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केली नसल्याची खंत ; तातडीच्या कारवाईची मागणी

वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून निळसर-हिरवा होत असल्याची बाब समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र या गंभीर प्रश्नावर अद्यापही स्थानिक आमदार, खासदार आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेतलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कृष्णा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी मानली जाते. शेती, पिण्याचे पाणी, उद्योगधंदे आणि दैनंदिन वापरासाठी मोठ्या प्रमाणावर या नदीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत नदीच्या पाण्याचा रंग अचानक बदलणे ही गंभीर बाब मानली जात असतानाही प्रशासन आणिलोकप्रतिनिधींकडून अपेक्षित गांभीर्य दिसून येत नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, नदीच्या रंगबदलाचा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत असतानाही लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केलेली नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. "नदीचे आरोग्य धोक्यात आले तर त्याचा परिणाम संपूर्ण परिसरावर होणार आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे," अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.

नदीकाठच्या अनेक भागांमध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवट थर दिसत असून, काही ठिकाणी पाण्याचा रंग पूर्णपणे निळसर-हिरवा झाल्याचे चित्र आहे. यामुळे जलप्रदूषण, शैवालांची वाढ किंवा सांडपाण्याचे मिश्रण याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र अद्याप अधिकृत तपासणी अहवाल समोर आलेला नाही.

स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून पाण्याचे नमुने तपासावेत, अशी मागणी केली आहे. तसेच तपासणी अहवाल सार्वजनिक करून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याच्या रंगबदलामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही या विषयात लक्ष घालून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

आता प्रशासनाची तपासणी, लोकप्रतिनिधींची भूमिका आणि पुढील उपाययोजना याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे याविषयी संबंधीत यंत्रणेशी बोलणे करून आपण लवकरच ही अडचण दूर करू... वेध माझा शी बोलताना दिले आश्वासन ; वेध माझाच्या बातमीची दखल ;

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक निळसर-हिरवा दिसू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीच्या पाण्यात झालेल्या या अनपेक्षित बदलामुळे प्रदूषणाची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान आमदार अतुलबाबांनी वेध माझा च्या या बातमीची दखल घेत... याविषयी संबंधीत यंत्रणेशी बोलणे करून ही अडचण दूर करू... असे वेध माझा शी बोलताना त्यांनी सांगितले आहे.

कृष्णा कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आले असता त्याठिकाणी गर्दी असूनही त्यांनी हा पाण्याचा विषय जाणून घेत स्वतःहून याविषयी लक्ष घालून संबंधित यंत्रणेशी बोलून ही अडचण लवकर दूर करू असे आश्वासन वेध माझा ला दिले

दरम्यान नदीच्या विविध घाटांवर आणि किनारी भागांमध्ये पाण्याचा रंग पूर्वीपेक्षा वेगळा दिसतोय काही ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवट थरही दिसून येत असल्याने जलचरांवर तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान "कृष्णा नदी ही परिसरातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. पाण्याचा रंग अचानक बदलणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे."
पर्यावरण अभ्यासकांच्या मते, पाण्यातील शैवालांची वाढ, औद्योगिक किंवा सांडपाण्याचे मिश्रण, तसेच पाण्याच्या गुणवत्तेतील बदल यांसारख्या कारणांमुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलू शकतो. 
मात्र याबाबत अधिकृत तपासणी झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होऊ शकते.
दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी संबंधित प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा विभागाने त्वरित पाहणी करून पाण्याची गुणवत्ता तपासावी व अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होण्यामागील कारण काय, याबाबत आता प्रशासनाच्या तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपासणी अहवालानंतरच या रंगबदलामागील नेमके कारण आणि त्याचे संभाव्य परिणाम स्पष्ट होणार आहेत.


विधानपरिषद निवडणुकीत जरी धैर्यशील कदमांचा विजय, तरी अभयसिंह जगतापांनी वाढवली राजकीय उत्सुकता ; धैर्यशील कदम यांना अपेक्षेपेक्षा कमी मते! महायुतीत चिंतन होणार का? ;

वेध माझा ऑनलाईन।
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला असला, तरी निकालाने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कदम यांना ५९३ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली. संख्याबळाच्या तुलनेत महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा अधिक मते मिळाल्याने महायुतीची सुमारे १०० मते फुटल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

निवडणुकीपूर्वी उपलब्ध असलेल्या पक्षनिहाय संख्याबळानुसार भाजपकडे ३२५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २०५, शिवसेना (शिंदे गट) ११६ अशी महायुतीची एकूण ६४६ मते होती. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १२०, काँग्रेस ७४ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १ असे मिळून महाविकास आघाडीकडे १९५ मते होती.
याशिवाय स्थानिक आघाड्या आणि अपक्षांची ५४ मते होती. यापैकी बहुतांश मते महायुतीच्या बाजूने जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला सहज विजय मिळेल, असा अंदाज होता.

निकालात मात्र वेगळे चित्र दिसून आले. अभयसिंह जगताप यांना मिळालेली २९२ मते ही महाविकास आघाडीच्या मूळ संख्याबळापेक्षा लक्षणीय अधिक आहेत. त्यामुळे महायुतीतील काही सदस्यांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा रंगू लागली आहे. अंदाजे ९० ते १०० मते महायुतीतून फुटल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
धैर्यशील कदम यांचा विजय झाला असला तरी अपेक्षित मतांपेक्षा कमी मते मिळाल्याने महायुतीसमोर अंतर्गत नाराजी, स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि मतदारांच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. दुसरीकडे पराभव होऊनही अभयसिंह जगताप यांनी मिळवलेली अतिरिक्त मते महायुतीला विचार करायला लावणारी आहेत.

हा निकाल केवळ जय-पराभवाचा नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याचा संकेत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली अतिरिक्त मते भविष्यातील राजकारणासाठी महत्त्वाची ठरतील, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.


Tuesday, June 23, 2026

काही गटात नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी होती... भाकरी फिरवायला पाहिजे होती", कृष्णा कारखाना निवडणुकीची मतमोजणी करताना मलकापूरचे नेते मनोहर शिंदे यांना सापडली मतपेटीत चिट्ठी ;

वेध माझा ऑनलाईन /
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेदरम्यान एक वेगळीच घटना घडली. मतदानासाठी आलेल्या एका सभासद मतदाराने आपले मत नोंदवल्यानंतर मतपेटीत कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश भोसले अतुल भोसले यांच्यासाठी एक हस्तलिखित चिठ्ठी टाकल्याची माहिती मलकापूरचे भाजपचे नेते मनोहर शिंदेंनी पत्रकारांना दिली 
त्यातील मचकूर वाचल्यानंतर  पत्रकारांना चिट्ठीतील आशय समजला 

सदर चिठ्ठीत मतदाराने आपले मत व्यक्त करताना, "कारखान्याच्या विकासात जुन्या संचालकांचे योगदान महत्त्वाचे असले तरी आता नवीन चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे होते... भाकरी फिरवायला हवी होती... असा आशय व्यक्त केल्याचे समजले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदाराने मतपेटीतूनच आपली भावना व्यक्त केल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. 
दरम्यान, संबंधित चिठ्ठीबाबत कोणतीही अधिकृत माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आलेली नसली, तरी मतदान केंद्रावर उपस्थित सभासद आणि कार्यकर्त्यांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा रंगली.
दरम्यान मतमोजणी सुरू असताना अचानक मतपेटीत ही चिट्ठी डॉ अतुल भोसले व डॉ सुरेश भोसले यांच्या नावे लिहून ठेवल्याची त्याठिकाणी मलकापूरचे भाजप नेते मनोहर शिंदे यांना सापडली त्यांनी ती पत्रकारांना आणून दिली 
त्यातील मजकूर वाचल्यानंतर  पत्रकारांना आशय समजला 
दरम्यान निवडणुकीतील निकाल काहीही लागला तरी मतदारांच्या मनातील बदलाची अपेक्षा या घटनेतून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

Monday, June 22, 2026

कृष्णा नदीचे पाणी झाले हिरवे; नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण ; पाण्याच्या रंगबदलामुळे प्रदूषणाची भीती; प्रशासनाकडून नमुने तपासणीची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।
गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक निळसर-हिरवा दिसू लागल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीच्या पाण्यात झालेल्या या अनपेक्षित बदलामुळे प्रदूषणाची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान आमदार अतुलबाबांनी वेध माझा च्या या बातमीची दखल घेत विधानसभेत या विषयी संबंधी मंत्र्यांशी बोलणे करून आपण याबाबत लवकरच तोडगा काढू असे वेध माझा शी बोलताना सांगितले आहे

दरम्यान नदीच्या विविध घाटांवर आणि किनारी भागांमध्ये पाण्याचा रंग पूर्वीपेक्षा वेगळा दिसतोय काही ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवट थरही दिसून येत असल्याने जलचरांवर तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान "कृष्णा नदी ही परिसरातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. पाण्याचा रंग अचानक बदलणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे."

पर्यावरण अभ्यासकांच्या मते, पाण्यातील शैवालांची वाढ, औद्योगिक किंवा सांडपाण्याचे मिश्रण, तसेच पाण्याच्या गुणवत्तेतील बदल यांसारख्या कारणांमुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलू शकतो. 
मात्र याबाबत अधिकृत तपासणी झाल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होऊ शकते.

दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी संबंधित प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जलसंपदा विभागाने त्वरित पाहणी करून पाण्याची गुणवत्ता तपासावी व अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग निळसर-हिरवा होण्यामागील कारण काय, याबाबत आता प्रशासनाच्या तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपासणी अहवालानंतरच या रंगबदलामागील नेमके कारण आणि त्याचे संभाव्य परिणाम स्पष्ट होणार आहेत.


म.वि. आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची तब्बल १०० मते फोडली? :

वेध माझा ऑनलाईन
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला. त्यांना ५९३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी २९२ मते मिळवली त्यांनी महायुतीची सुमारे १०० मतं फोडून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. 
दरम्यान सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजप ३२५, राष्ट्रवादी (अ. प.) २०५, शिवसेना (शिंदे गट) ११६, राष्ट्रवादी (श. प.) १२०, काँग्रेस ७४, शिवसेना उबाठा १, स्थानिक आघाड्या आणि अपक्ष ५४, असं पक्ष निहाय संख्याबळ होतं. महायुतीच्या मतांचा आकडा ६४६ होता, तर महाविकास आघाडीकडे १९५ मते होती. स्थानिक आघाड्या आणि अपक्षांपैकी बहुतांश मते ही महायुतीच्या गोटातील होती. तरी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची तब्बल १०० मते फोडल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे.

कृष्णा’मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ‘दुहेरी कक्ष लीडलेस पेसमेकर’ प्रत्यारोपण यशस्वी : सुमारे १७ लाखांची अत्याधुनिक शस्त्रक्रिया ई.सी.एच.एस. योजनेतून पूर्णपणे मोफत

वेध माझा ऑनलाईन।
पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अत्याधुनिक दुहेरी कक्ष (ड्युएल चेंबर) लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे, साधारणपणे १७ लाख रुपयांपर्यंत खर्चाची ही शस्त्रक्रिया संबंधित रुग्णावर माजी सैनिक अंशदान आरोग्य योजना (ई.सी.एच.एस.) अंतर्गत कृष्णा हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत करण्यात आली.

कराड येथील ७१ वर्षीय माजी सैनिक रुग्णाला संपूर्ण हृदय अवरोध म्हणजेच कम्पलीट हार्ट ब्लॉक असल्याने पूर्वीच कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्यात आला होता. पण कालांतराने पेसमेकर बसविण्यात आलेल्या छातीच्या दोन्ही बाजूंना वारंवार संसर्ग होऊ लागल्याने त्याच्यावर उपचाराचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या संसर्गामुळे रुग्णावर दोनदा पेसमेकरशी संबंधित शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या होत्या. अशा परिस्थितीत पुन्हा पारंपरिक पेसमेकर बसविणे धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने, अत्याधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे होते. 

संबंधित रुग्ण कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात तपासणीसाठी दाखल झाला असता, योग्य चाचण्यानंतर त्याच्यावर दुहेरी कक्ष लीडलेस पेसमेकर प्रणालीचा पर्याय निवडण्यात आला. या तंत्रज्ञानामध्ये छातीवर कोणतीही चिरफाड न करता, मांडीतील रक्तवाहिनीतून कॅथेटरच्या सहाय्याने थेट हृदयामध्ये सूक्ष्म उपकरणे बसविली जातात. या ‘ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर’ प्रणालीमध्ये हृदयाच्या वरच्या व खालच्या कक्षात दोन स्वतंत्र उपकरणे बसविण्यात आली. ही उपकरणे वायरलेस तंत्रज्ञानाद्वारे परस्पर समन्वय साधून हृदयाची नैसर्गिक गती अबाधित ठेवतात. त्यामुळे पारंपरिक पेसमेकरमधील तारा, छातीवरील शस्त्रक्रिया आणि पेसमेकर पिशवीतील संसर्गाशी संबंधित गुंतागुंत टाळणे शक्य झाले. उपचारानंतर रुग्णात संसर्गाचा धोका कमी झाला असून, कमी वेदनांमध्ये जलद पुनर्वसनास मदत झाली. या रुग्णाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यामध्ये डॉ. सोमनाथ, डॉ. प्रशांत पवार, डॉ. रमेश कवडे, कॅथलॅबमधील तांत्रिक कर्मचारी व परिचारिका यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच, ई.सी.एच.एस. योजनेअंतर्गत आवश्यक प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. एस. ए. माशाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले; ज्यामुळे रुग्णावर सुमारे १७ लाखांची ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली. 

याबाबत बोलताना कृष्णा हॉस्पिटलचे हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके म्हणाले, लीडलेस पेसमेकर तंत्रज्ञान हे पेसमेकर उपचार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विशेषतः पेसमेकरशी संबंधित संसर्ग झालेले रुग्ण, रक्तवाहिन्यांमधील अडथळे असलेले रुग्ण, वारंवार पेसमेकर बदलण्याची आवश्यकता असलेले रुग्ण किंवा पारंपरिक पेसमेकरमुळे गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असलेल्या निवडक रुग्णांमध्ये ही पद्धत अधिक सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय ठरू शकते. 



‘कृष्णा’ : प्रगत इलेक्ट्रोफिजिओलॉजी सेवांचे महत्वपूर्ण केंद्र
कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेल्या ११ वर्षांपासून स्वतंत्र इलेक्ट्रोफिजिओलॉजी विभाग कार्यरत असून, हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा येथे उपलब्ध आहेत. या विभागाच्या माध्यमातून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांबरोबरच उत्तर कर्नाटक आणि गोवा येथील रुग्णांनाही सेवा पुरविण्यात येतात. या विभागात इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी, रेडिओफ्रिक्वेन्सी एब्लेशन, आयसीडी प्रत्यारोपण, सीआरटी उपकरणे, अत्याधुनिक पेसमेकर प्रणाली तसेच जटिल हृदय गतीविकारांवरील विविध उपचार परवडणाऱ्या खर्चात उपलब्ध आहेत. सुसज्ज कॅथलॅब, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आणि दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे कृष्णा हॉस्पिटलने प्रगत हृदयविकार उपचारांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.


Sunday, June 21, 2026

सातारा- सांगली विधानपरिषद निवडणूक ; धैर्यशील कदम विजयी ; कार्यकर्त्यांचा जल्लोष ;

वेध माझा ऑनलाईन।
सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय झाला आहे. धैर्यशील कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा 301 मतांनी पराभव केला. भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम हे विजय झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची अतिषबाजी करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

महावितरणच्या "स्मार्ट मीटर' च्या विरोधात कराडमध्ये उद्या (सोमवारी) जनआक्रोश आंदोलन/

वेध माझा ऑनलाईन।
स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत राज्यभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कराडमध्ये सोमवारी (दि. २२ जून) महावितरणविरोधात जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. वीज ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे, पूर्वकल्पना न देता वीज कनेक्शन खंडित करणे आणि ग्राहकांच्या शंकांचे समाधान न करणे या मुद्द्यांवर विविध सामाजिक, शेतकरी व राजकीय संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर सकाळी ११ वाजता हे आंदोलन होणार असून कराड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी केले आहे. वीज ग्राहकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महावितरणकडून स्मार्ट मीटरमुळे वीज वापराचे अचूक मोजमाप, बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणि तांत्रिक व्यवस्थापनात सुधारणा होईल, असा दावा केला जात आहे. मात्र या दाव्यांबाबत सर्वसामान्य ग्राहकांमध्ये अजूनही अनेक प्रश्न उपस्थित होत असून स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
अनेक भागांमध्ये ग्राहकांची पूर्ण संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याशिवाय मीटर बसविल्यानंतर अचानक वीजपुरवठा खंडित होणे, तक्रारींवर तत्काळ कार्यवाही न होणे आणि ग्राहकांशी पुरेसा संवाद न साधणे यामुळे असंतोष वाढत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
कराड शहरातील काही ग्राहकांचे वीज कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रासासह दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्राहकांना विश्वासात न घेता राबविण्यात येणाऱ्या धोरणांविरोधात लोकांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही संघटनांनी सांगितले.
स्मार्ट मीटरमुळे भविष्यात प्रीपेड वीज प्रणाली लागू होणार का, ग्राहकांना आगाऊ रक्कम भरून वीज वापरावी लागणार का, तसेच यामुळे वीज बिलांमध्ये वाढ होणार का, अशा अनेक प्रश्नांबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. शासन आणि महावितरणने या विषयावर अधिकृत भूमिका जाहीर करून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्मार्ट मीटरची सक्ती थांबविणे, आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर हटवून पारंपरिक मीटर पुन्हा बसविणे, ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय कोणतीही कारवाई न करणे आणि पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन खंडित करण्याची पद्धत बंद करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 

या जनआक्रोश आंदोलनाला भीमशक्ती सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी युवा काँग्रेस, जान फाउंडेशन तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे लढा उभारण्यासाठी या संघटना पुढे सरसावल्या आहेत. या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, मनसेचे सागर बर्गे, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे आनंदराव लादे, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू घराळ, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे प्रशांत यादव तसेच जान फाउंडेशनचे जावेद नायकमडी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.


ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य ; ओमराजेंच्या निर्णयाबाबत उत्सुकता वाढली ;

वेध माझा ऑनलाईन।
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान दौंडमध्ये महत्त्वपूर्ण घडामोड घडल्याची माहिती समोर आली आहे. दौंड येथील चतुर्थी हॉटेलमध्ये ओमराजे निंबाळकर आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची भेट झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. शिवसेनेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीत निंबाळकर यांनी पक्षातच राहावे, यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, शिंदे गटाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील ओमराजे निंबाळकर यांच्या ताफ्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे. नाना भानगिरे हे देखील त्यांच्या ताफ्यासोबत धाराशिवकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत हे पुण्याहून धाराशिवकडे रवाना झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेतील सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या हालचालींमध्ये तानाजी सावंत यांची महत्त्वाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याआधी खासदार ओमराजे निंबाळकर यांना विशेष विमानाने दिल्लीला नेण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

Friday, June 19, 2026

पृथ्वीराजबाबाबांचा अविनाश मोहितेना पाठिंबा...पण...।

वेध माझा ऑनलाईन।
नुकतीच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडली त्यांनी यावेळी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत आपण अविनाश मोहितेंना सर्व ताकदीने पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले... खरतर निवडणुकीला फ़क्त 2 दिवस बाकी असताना सगळ्या ताकदीने पाठिंबा देणार म्हणजे... नेमकं काय करणार... हे त्यांनी सांगितलेच नाही...यावेळी त्यांनी भोसले यांच्यासह  भाजप व मोदिंवर टीका केली... लाडकी बहीण योजनेची देखील त्यांनी खिल्ली उडवली...पण ही पत्रकार परिषद  अविनाश मोहितेना पाठिंबा देण्यासाठी घेतली असताना केवळ राजकीय स्टेटमेंट व त्यांचा भाजप विरोध दिसून आला...पाठिंबा कशासाठी ? आपल्या पुढाकारात या पॅनलचे शेतकरी सभासदांसाठी काय नवीन प्लॅन्स आहेत?कारखान्याचे उत्पन्न वाढीसाठी काय  करणार?अशा कोणत्याही विषयावर त्यांचे भाष्य नव्हते...यावरून त्यांनी फक्त दोन दिवस अगोदर पाठिंबा दाखवत भोसले व भाजप ला विरोध करण्यासाठी ही एक संधी समजून अविनाश  मोहितेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप व भोसलेंना निशाण्यावर घेतले आहे का  ?अशी यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे...

या पत्रकार परिषदेत बाबांना पत्रकारांनी विचारले...
अविनाश मोहितेंच्या काळात त्यांनी कारखान्याची अवस्था बिकट करून ठेवली असा आरोप होतो... त्यांनी कामगार संख्या 1 हजार हुन अधिक दाखवून त्यांच्या पगारापोटीची दरमहा रक्कम ही 50 लाख दाखवली... मात्र हे कामगार मस्टरवरच नाहीत...मग ...हे पाच वर्षांचे पैसे गेले कुठे...हा घोटाळा करण्यासह...बोगस सह्या घोटाळा.. .तसेच कृषी कॉलेज बंद करून टाकले, अल्कोहोलचे प्रोडक्शन बंद करून टाकले, कोणतेच उत्पादन नसल्याने व अवाढव्य खर्च करत बसल्याने कारखाना अडचणीत येऊन बंद पडेल किंवा विकावा लागेल अशा परिस्थितीत आला...
अविनाश मोहिते तुरुंगात गेले...ते सध्या जामिनावर बाहेर आहेत...या भोसलेंच्या टिकेवर काय सांगाल ? 
या प्रश्नाचे काहीही उत्तर न देता त्यांनी हा विषय भाजपवर टीका करण्याकडे नेला..

डॉ सुरेश बाबा यांनी हा कारखाना त्यानंतर स्वतः ताब्यात घेऊन पुन्हा सुस्थितीत आणला... अविनाश मोहितेंच्या काळात बंद पडलेले सर्व बाय प्रोडक्टचे प्रोडक्शन पुन्हा सुरू झाले...विस्तारीकरण झाले...नुतनीकरण झाले...चांगला दर मिळू लागला... कारखाना राज्यात दोन नंबरवर गेला...पुरस्कार मिळाले... असेही भोसले सांगतात...  मग... या दोन्ही अध्यक्षांच्या कारकीर्दविषयी तुमचे मत काय ? असे विचारले असता...
पृथ्वीराजबाबा म्हणाले... 
या कारखान्यात लिकेजेस करत भोसलेंनी आपल्या राजकारणासाठी याठिकाणच्या सत्तेचा उपयोग करून घेतला...याला चाप बसवण्यासाठी आपण अविनाश मोहितेना पाठिंबा देत आहोत...
पण अविनाश मोहितेंच्या वादग्रस्त कारकीर्दीवर कोणतेच मत त्यांनी व्यक्त केले नाही...

120 किलो साखर देण्याबाबत केलेल्या अश्वासनाबाबत विचारले असता...हो तेवढी साखर देता येते असे ते म्हणाले...पाणीपट्टी माफ केली...आणि बाहेर जाणारा ऊस थांबवला... तर ते शक्य असल्याचे ते म्हणाले ...पण टेक्निकली हे कसे इमलीमेण्ट होऊ शकते  हे  त्यांना सांगता आले नाही...ते सभेत बोलू असे सांगून त्यांनी यावेळी मोदी सरकारवर टीका करण्याकडे विषय फिरवला... 
लाडकी बहीण योजनेवर टीका करायला सुरुवात केली... चालू पत्रकार परिषदेशी या विषयाचा काहीही संबंध नव्हता...

कारखान्याचा उपयोग आमदार खासदार होण्यासाठीच होतोय... विचाराचे राजकारण आता राहिले नाही...असे सांगायला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना विचारले... असे असेल तर तुम्ही का कारखाना काढला नाही, पतसंस्था, बँका, शिक्षण संस्था असे काहीच तुम्ही एवढ्या वर्षात का काढू शकला नाही?यावर बोलताना त्यांनी पहिल्यांदा माझी चूक झाली...काढायला पाहिजे होता...असे म्हटले..
आणि काही वेळातच... तसे नाही केलं तेच बर केलं..कारण त्यामुळे मी दिल्लीत राजकारण करू शकलो असेही ते म्हणाले... सहकारात राजकारण आणू नये...या इंद्रजित मोहितेंनी केलेल्या विधानाचे त्यांनी खंडन केले, कारखाना निवडणुकीच्या राजकारणात कोण राजकारणी भाग घेत नाहीत ते दाखवा असे ते म्हणाले...
माझा अविनाश मोहितेना पाठिंबा आहे असे सांगत... कृष्णा कारखान्याचा मी सभासद नाही असेही ते म्हणाले ... 
मात्र कारखान्यात काही अडचण आली तर मी आहे असा विश्वास देखील त्यांनी दिला...
यावर पॅनेलचे पालकत्व तुम्ही घेता का ? असे विचारले असता.. नाही असे उत्तर त्यांनी दिले...

एकूणच..
त्यांच्या पाठिंबा देण्यामागे सभासद शेतकऱ्यांच्या भविषयासाठीचे कोणतेही भाष्य त्यांनी केले नाही... 
ही राजकीय विषयाबाबत पत्रकार परिषद नसताना या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीका केली,लाडकी बहीण या योजनेची खिल्ली उडवली भोसलेंवर  टीका केली... पण कारखान्याचे प्रश्न, शेतकरी सभासदांचे प्रश्न, त्यावरील तोडगा काय? किंवा आपला या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कसा सहभाग असणार ? यावर ते काहीच बोलले नाहीत...मात्र त्यांनी अविनाश मोहितेंच्या खांद्याचा पुरेपूर वापर करत या निवडणुकीला संधी समजून भाजप व भोसलेंवर यावेळी संधान साधले हे नक्की!...
त्यांच्या पाठिंब्यामुळे अविनाश मोहितेना काय मिळेल हे निकलादिवशी कळेलच!... मात्र  बऱ्याच गॅपनंतर  इथल्या राजकारणात आपले यशस्वीरीत्या "कम बॅक' झाल्याचे त्यांनी कृष्णा निवडणुकीत भाग घेऊन  प्रभावीपणे दाखवले... 
आणि एवढेच या पत्रकार परिषदेचे फलित म्हणावे लागेल...बाकी काहीच नाही...
अशी काही पत्रकारांच्यात त्यांनतर चर्चा रंगली होती...

Wednesday, June 17, 2026

कराड/प्रतिनिधी : - 

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना केवळ ऊस उत्पादक न ठेवता महाराष्ट्रातील सर्वांत समृद्ध शेतकरी बनविण्याचे ध्येय समोर ठेवून कारखान्याच्या १७ पाणीपुरवठा योजनांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सोलर फिडरच्या माध्यमातून विजबिलमुक्ती, कमी पाणीपट्टी, ठिबक सिंचनाचा व्यापक वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकरी १५० ते २०० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काले (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन दयानंद पाटील, ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते, गीतांजली पाटील, उमेदवार नयन पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितले की, २०१५ मध्ये सहकार पॅनेलकडे कारखान्याची सत्ता आली तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. कामगारांचे वेतन देण्यासाठीही निधी उपलब्ध नव्हता आणि तब्बल ५८ कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र पुढील ११ वर्षांच्या कालावधीत कारखान्याची आर्थिक घडी सावरण्यात यश आले. सभासदांना ७८ कोटी रुपयांची साखर मोफत देण्यात आली, तर थकबाकी शून्यावर आणण्यात यश मिळाले. विरोधकांकडे आजही विकासाचा कोणताही अजेंडा नसून, त्यांच्या मनगटीवर बसलेले १०० कोटींचे भूत उतरवण्यासाठीच त्यांना सत्ता हवी असल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला काही लोकांनी तडा दिल्याची टीका करत त्यांनी सभासदांना विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.

कारखान्याच्या भविष्यातील योजनांचा ऊहापोह करताना त्यांनी वाकुर्डे योजनेवर ४५ मेगावॅट क्षमतेचा सोलर फिडर उभारण्याचा मानस व्यक्त केला. या माध्यमातून वीजनिर्मिती, तसेच ऊर्जास्वावलंबन साध्य करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पावसाळी अधिवेशनात यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी, कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेताना, यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने प्रगतीची वाटचाल केल्याचे सांगितले. आपल्या कार्यकाळात सभासदांच्या ठेवींमध्ये वाढ झाली आणि त्यांना चांगला परतावा मिळाला, अशी या सुवर्णकाळाची आठवण त्यांनी करून दिली. कारखाना चालविण्यासाठी अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकरी सभासदांना “एकदा झालेली चूक पुन्हा करू नका,” असे आवाहन केले. 

ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते यांनी, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने स्थैर्य आणि प्रगती साधल्याचा दावा केला. संस्थापक पॅनेल आणि कारखान्याच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनातील दृष्टिकोनात मोठा फरक असल्याचे सांगत त्यांनी सहकार पॅनेलला मिळालेल्या रयत संघटनेच्या पाठिंब्याचे स्वागत केले. 

व्हाईस चेअरमन दयानंद पाटील यांनी, संस्थापक पॅनेलच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कारखान्याची आर्थिक स्थिती खालावण्यास त्यांचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला. तोडणी-वाहतूक निधी, कर्जवाढ आणि आर्थिक व्यवहारांबाबत विरोधकांनी मौन का बाळगले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मनोगतात गीतांजली पाटील यांनी शेतकरी आणि सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली दूरदृष्टी भोसले नेतृत्वाकडे असल्याचे सांगितले. डॉ. सुरेश सुकरे यांनी, गुऱ्हाळही न चालवलेले लोक निवडणुकीत पॅनल टाकत असल्याची टीका केली. तर डॉ. अतुल भोसले यांनी ऐन उन्हाळ्यात वाकुर्डे योजनेचे पाणी देऊन शेतकऱ्यांना तारल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे आभार अशोक माळी यांनी मानले. सभेस सुनीता शेवाळे, गोविंद गावडे, ॲड आत्माराम पाटील, प्रमोद पाटील, वैभव थोरात, बाळासाहेब गलांडे, शंकरराव थोरात, मारुती पाटील, प्रकाश पाटील, सुनील यादव आदींसह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

चौकट : 

प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विरोधी पॅनेलवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. विरोधकांनी कारखान्याच्या विकासापेक्षा विविध घोटाळ्यांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळविल्याचा दावा करत त्यांनी पाला-पाचोळा घोटाळा, खाजगी साखर विक्री व्यवहार, तोडणी-वाहतूक घोटाळा, इमारतींवरील कर्जे, बोगस कामगार मानधन, वाहन खर्च, विश्रामगृह खर्च आणि इंधन वापरातील अनियमितता यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख केला. कारखान्याच्या हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ जपणाऱ्या नेतृत्वापासून सभासदांनी सावध राहावे, असे आवाहन करत त्यांनी निवडणुकीत विकास आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

Tuesday, June 16, 2026

अविनाश मोहितेंनी अक्षरशः कारखान्याच्या पाला-पाचोळ्यात सुद्धा घोटाळा केलाय... ; त्यांचे इतर घोटाळे वेगळेच...त्यांना तुम्ही विचारा तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं ? अतुल भोसलेंचा घणाघात ;


वेध माझा ऑनलाईन।
काल काले येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विरोधी पॅनेलवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. अविनाश मोहितेंनी कारखान्याच्या विकासापेक्षा विविध घोटाळ्यांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळविल्याचा दावा करत त्यांनी कारखान्याच्या पाला-पाचोळ्यात सुद्धा घोटाळा केलाय इतर घोटाळे केले ते वेगळेच  त्यांना तुम्ही विचारा तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं?... असा घणाघात डॉ अतुलबाबा यांनी काले येथील सभेत केला.

तसेच त्यांनी खाजगी साखर विक्री व्यवहार, तोडणी-वाहतूक घोटाळा, इमारतींवरील कर्जे, बोगस कामगार मानधन, वाहन खर्च, विश्रामगृह खर्च आणि इंधन वापरातील अनियमितता यांसारख्या मुद्द्यांचाही यावेळी उल्लेख केला. कारखान्याच्या हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ जपणाऱ्या नेतृत्वापासून सभासदांनी सावध राहावे, असे आवाहन करत डॉ अतुलबाबांनी निवडणुकीत विकास आणि विश्वासार्हतेला प्राधान्य देण्याचे यावेळी आवाहन केले.

ते म्हणाले...यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना केवळ ऊस उत्पादक न ठेवता महाराष्ट्रातील सर्वांत समृद्ध शेतकरी बनविण्याचे ध्येय समोर ठेवून कारखान्याच्या १७ पाणीपुरवठा योजनांना नवसंजीवनी देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सोलर फिडरच्या माध्यमातून विजबिलमुक्ती, कमी पाणीपट्टी, ठिबक सिंचनाचा व्यापक वापर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकरी १५० ते २०० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काले (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन दयानंद पाटील, ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते, गीतांजली पाटील, उमेदवार नयन पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना पुढे सांगितले की..., 
२०१५ मध्ये सहकार पॅनेलकडे कारखान्याची सत्ता आली तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. कामगारांचे वेतन देण्यासाठीही निधी उपलब्ध नव्हता आणि तब्बल ५८ कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र पुढील ११ वर्षांच्या कालावधीत कारखान्याची आर्थिक घडी सावरण्यात यश आले. सभासदांना ७८ कोटी रुपयांची साखर मोफत देण्यात आली, तर थकबाकी शून्यावर आणण्यात यश मिळाले. विरोधकांकडे आजही विकासाचा कोणताही अजेंडा नसून, त्यांच्या मनगटीवर बसलेले १०० कोटींचे भूत उतरवण्यासाठीच त्यांना सत्ता हवी असल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला काही लोकांनी तडा दिल्याची टीका करत त्यांनी सभासदांना विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.

कारखान्याच्या भविष्यातील योजनांचा ऊहापोह करताना त्यांनी वाकुर्डे योजनेवर ४५ मेगावॅट क्षमतेचा सोलर फिडर उभारण्याचा मानस व्यक्त केला. या माध्यमातून वीजनिर्मिती, तसेच ऊर्जास्वावलंबन साध्य करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी पावसाळी अधिवेशनात यासाठी धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी चेअरमन मदनराव मोहिते यांनी, कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेताना, कारखाना चालविण्यासाठी अनुभव आणि व्यवस्थापन कौशल्य आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी शेतकरी सभासदांना “एकदा झालेली चूक पुन्हा करू नका,” असे आवाहन केले. 

ज्येष्ठ नेते पै. जगन्नाथ मोहिते यांनी, डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने स्थैर्य आणि प्रगती साधल्याचा दावा केला. संस्थापक पॅनेल आणि कारखान्याच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनातील दृष्टिकोनात मोठा फरक असल्याचे सांगत त्यांनी सहकार पॅनेलला मिळालेल्या रयत संघटनेच्या पाठिंब्याचे स्वागत केले. 

कार्यक्रमाचे आभार अशोक माळी यांनी मानले. सभेस सुनीता शेवाळे, गोविंद गावडे, ॲड आत्माराम पाटील, प्रमोद पाटील, वैभव थोरात, बाळासाहेब गलांडे, शंकरराव थोरात, मारुती पाटील, प्रकाश पाटील, सुनील यादव आदींसह परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




कराडला सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशीर्वचन सोहळा उत्साहात

वेध माझा ऑनलाईन।
रुद्राक्ष धारण करणे म्हणजे एक कोटी गायी दान केल्याचे पुण्य प्राप्त होणे होय. इष्टलिंग हे केवळ दागिना नसून शिवतत्त्वाशी जोडणारा जिवंत दुवा आहे. श्रद्धेने इष्टलिंगाची पूजा केल्यास तेहतीस कोटी देवतांच्या पूजेइतके पुण्य लाभते असे प्रतिपादन केदार पिठाचे जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामी यांनी केले.

कराड येथील कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर केदार जगद्गुरु भिमाशंकरलिंग महास्वामी यांच्या उपस्थितीत सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशिर्वचन सोहळा उत्साहात झाला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवलिंग शिवाचार्य, डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य म्हैसाळकर, महादेव शिवाचार्य वाईकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कराडच्या भूमीत धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्कारांचीही समृद्ध परंपरा जपली जात आहे. या परंपरेचेच दर्शन घडविणारा वीरशैव लिंगायत समाजाचा सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशीर्वचन सोहळा रविवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. विशेषतः नव्या पिढीला आपल्या धर्मातील तत्त्वज्ञान, संस्कार आणि आचार-विचारांची ओळख करून देणारा हा सोहळा ठरला.

भस्माचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, शरीरावरील विविध ठिकाणी लावले जाणारे भस्म हे केवळ धार्मिक प्रतीक नसून मानवी शरीर हेच एक ब्रह्मांड असल्याची जाणीव करून देणारे तत्त्वज्ञान आहे. एका बाजूला कुबेराची संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला भस्म ठेवले तरी भस्माचे महात्म्य श्रेष्ठ आहे असा उल्लेख धर्मग्रंथांत आढळतो, असेही त्यांनी नमूद केले.

 डॉ. शिवयोगी शिवाचार्य स्वामी (म्हैसाळ) म्हणाले की, संपत्ती, नाव, कीर्ती आणि मान-सन्मान माणूस आयुष्यात मिळवू शकतो; मात्र जीवनाचा शेवटचा प्रवास करताना त्याच्यासोबत केवळ त्याचे संस्कार आणि शिवभक्तीच जाते. ज्याच्या गळ्यात इष्टलिंग आहे तो जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहे.

वीरशैव लिंगायत धर्मातील इष्टलिंग पूजा ही केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धी, समता, श्रमप्रतिष्ठा आणि शिवभक्ती यांचे प्रतीक मानली जाते. समाजातील प्रत्येक व्यक्तीने धर्माबद्दल आत्मीयता बाळगून त्यामागील तत्त्वज्ञान समजून घेतले पाहिजे, असा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.

विनायक विभुते,अनिल खुंटाळे यांच्या हस्ते महास्वामी यांचा सत्कार करण्यात आला.राजू शेटे, शिवानंद डुबल, भरत शेटे,चंद्रशेखर नखाते, विजय पट्टणशेट्टी या ५ दांपत्यांचे हस्ते इष्टलिंग महापूजेला सुरुवात करण्यात आली.नंदकुमार बटाणे,संजय शेटे, सुनील महाजन, धनंजय विभूते,सुनील चिंगळे, विजय भागवत, राजू खलीपे, गुरुनाथ कचरे,अशोक संसुद्दी, दिलीप चिंचकर,राजन धोकटे,गणेश शेटे यांनी उपस्थित शिवाचार्यांचे व मान्यवरांचे स्वागत केले.प्रा.प्रमोद सुकरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.


Monday, June 15, 2026

खासदारांच्या फुटीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...जे जातील त्यांना पश्चाताप होईल - ...

वेध माझा ऑनलाईन
पक्षातील खासदारांच्या संभाव्य फुटीवर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार बंड करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हे खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता याच पक्षफुटीबाबत दिल्लीमध्ये मोठ्या हलाचाली वाढल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या या पहिल्या प्रतिक्रियेचे अनेक अर्थ काढले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी खासदरांच्या फुटीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना जायचं आहे, त्यांनी खुशाल जावं, त्यांच भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही. पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जो सोडून जाईल, त्यांना एक दिवस नक्की पश्चात्ताप होईल, असे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी सहन करायला शिकावे, असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळेदेखील ठाकरे यांच्या पक्षातील फुटीबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण ;

वेध माझा ऑनलाईन 
कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांना आंदोलनादरम्यान काही अज्ञातांकडून मारहाण झाल्याची व त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे, जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडली आहे. आंदोलन सुरू असताना एका अज्ञात तरुणाने अचानक अभिजीत दीपके यांच्यावर हल्ला केला. त्या तरुणाने अभिजीत यांना एकामागून एक कानशि‍लात लगावल्या. या घटनेनंतर अभिजीत यांच्या समर्थकांनी तात्काळ संबंधित तरुणाला पकडले आणि त्याला मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी धावपळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांचे काही खासदार नवा गटा स्थापन करण्याच्या तयारीत !;

वेध माझा ऑनलाईन।
उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. कालच ठाकरे यांच्या खासदारांची ठाकरे यांच्या खासदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर आमचे सर्वच खासदार आमच्यासोबत आहेत. ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. ऑपरेशन टायगर काहीही नाही. आता आम्हीच ऑपरेशन लांडगा सुरू करणार आहोत, असे राऊत म्हणाले होते. परंतु आता ठाकरे यांचे काही खासदार थेट नवा गटा स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, असे म्हटले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंचे काही खासदार हे लोकसभा अध्यक्षांना एक पत्र देण्याची शक्यता आहे. ठाकरे यांचे काही खासदार हे दिल्लीमध्ये शिंदे यांच्या पक्षाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना भेटले आहेत. त्यामुळे लवकरच हे खासदार नवा गट स्थापन करू शकतात, 

शंभुराज देसाई यांचा भाजपला इशारा; म्हणाले, आम्हाला वेगळा विचार करावा लागेल ; देसाईंनी समन्वय बैठकीला भाजपमंत्र्यांनी प्रतिसाद न दिल्याची खदखद ;

वेध माझा ऑनलाईन।
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत, विशेषतः भाजप आणि शिंदे गटात, बिनसल्याचं दिसत आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. "आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल," असे म्हणत देसाईंनी समन्वय बैठकीला भाजपमंत्र्यांनी प्रतिसाद न दिल्याची खदखद व्यक्त केली.

सातारा-सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीवरून मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असं सांगतानाच नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी तुम्ही प्रतिसाद दिला का? आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे, असा कडक इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला आहे.
राज्याचे पर्यटन आणि खनिकर्म मंत्री शंभुराज देसाई हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपला सज्जड इशारा दिला आहे. सांगली- सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप त्यांचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींना एकत्र पर्यटनासाठी नेणार आहे. मी त्याची माहिती घेतली नाही. आमची कोअर कमिटीची बैठक काल झाली. त्याप्रमाणे उद्या आमच्या सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आम्ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत जे होईल ते वरिष्ठांना सांगितलं जाईल आणि त्यानंतर मुंबईत याचा निर्णय वरिष्ठ घेतील, असं शंभुराज देसाई म्हणाले.
कराडमध्ये झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीला शंभूराजे देसाई उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता, पालकमंत्री म्हणून मी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवेळी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. पालकमंत्री समन्वय करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्ही येत नाही आणि समन्वय बैठकीच्या वेळीच तुम्ही जाहीर करता भाजप स्वबळावर लढेल. तुमचा जर असा प्रतिसाद असेल तर आम्हाला ही विचार करावा लागणार आहे, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला. देसाई यांनी मनातील खदखद व्यक्त करत आलेल्या परिस्थितीला भाजपला सामोरे जावे लागणार आहे, असा सूचक इशाराही दिला आहे.

दरम्यान, 13 तारखेला कराडमध्ये सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीकडे शिंदे गट आणि राष्ट्रवादीने पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कराडमध्ये भारतीय जनता पार्टीने बोलावलेल्या बैठकीला उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल बाबा भोसले आणि चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. या महायुतीच्या बैठकीला मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील उपस्थित नव्हते. तर राष्ट्रवादीनेही बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीत अलबेल नसल्याचं समोर आलं आहे.


Sunday, June 14, 2026

सातारा- सांगली विधानपरिषद निवडणूक अपडेट ; भाजप नगरसेवकाना "गोवा ट्रिप' ? ; आजच झाले रवाना; !!

वेध माझा ऑनलाईन।
विधान परिषद निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागल्याने सातारा- सांगली मतदार संघात आपल्या   विजयासाठी भाजपने मतांची जमवाजमव करण्यास जोरदार सुरुवात करत त्या प्रयत्नात प्राथमिक यश देखील मिळवलं असलयाचे दिसते आहे
त्याची सुरुवात म्हणून  सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आपल्या मतदारांना गोव्याला एका रिसोर्टमध्ये आजच पाठवलं गेलं आहे? अशी माहिती मिळते आहे
त्यांना आता थेट निवडणुकीदिवशी मतदान केंद्रावर हजर करण्यात येणार आहे असेही समजते 
यापुढेदेखील इतर आणखी काही संबंधित मतदार नगरसेवक पुढील दिवसात काही गोव्यालाच रवाना केले जाणार आहेत असेही समजते

रोहित पवारांची मंत्री महाजन लवकरच भेट घेणार...रोहित पवार म्हणाले...जोपर्यंत महाजन येत नाहीत तोपर्यंत मी सलाइन, ग्लुकोज लावणार नाही, कारण सरकारशी चर्चा होणं गरजेचं आहे.

वेध माझा ऑनलाईन।
सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान रोहित पवार यांच्या रक्तातील साखर कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. रोहित पवार आंदोलन करत असलेल्या ठिकाणी रोहित पवारांच्या पत्नी कुंती त्यांच्या भगिनी आणि त्यांच्या मोतोश्री दाखल झाल्या 
यावेळी रोहित पवारांची अवस्था पाहुन त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले .

दरम्यान रोहित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, 
त्यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला होता. ते जळगावहुन रवाना झाले आहेत आणि लवकरच रोहित पवारांना भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुढे रोहित पवार म्हणालेत, जोपर्यंत महाजन येत नाहीत तोपर्यंत मी सलाइन, ग्लुकोज लावणार नाही, कारण सरकारशी चर्चा होणं गरजेचं आहे.

रोहित पवारांची तब्येत खालावली; बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती ; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांची घेतली भेट ;

वेध माझा ऑनलाईन।
सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. परंतु त्यामध्ये अशी एक अट आहे, की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असेल त्यांना आधी ही उर्वरीत रक्कम भरावी लागणार आहे, त्यानंतरच शेतकऱ्यांना या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. मात्र ही अट सरकारने रद्द करावी आणि सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे, त्यांनी आपल्या या मागणीसाठी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे, आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची तब्येत खालावली आहे, बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पंढरपूर येथे रोहित पवार यांची भेट घेतली आहे.

शेतकरी वाचला नाही तर राज्य, देश कसा चालणार? असा सवाल यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दरम्यान पुढे बोलताना तुम्ही कितीही पोटतिडकीनं आंदोलन केलं तरी लोकं त्याला राजकारणच समजणार.  या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पाहिलं पाहिजे, शेतकरी म्हणून रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा.  रोहित पवारांनी जीआरमध्ये शब्दचा खेळ कसा असतो ते दाखवून दिलं. मी इथे आलो, त्यामुळे आता काही लोक  मला  रोहित पवारांचा माणूस म्हणून बोलायला लागतील असेही ते म्हणाले

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी ; भीषण अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू ; काय आहे बातमी?


वेध माझा ऑनलाईन

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहन विहिरीत कोसळून 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. 

Just breaking...


जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; जोरदार चर्चा! ;

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट दिली. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही सदिच्छा भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

जितेंद्र आव्हाड हे सकाळी शिवतीर्थ येथे दाखल झाले. त्यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच काही वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली. मात्र या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या भेटीकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे म्हणून पाहिले जात आहे

Saturday, June 13, 2026

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले...महायुती एकसंघच आहे ; धैर्यशील कदम मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,;

वेध माझा ऑनलाईन।
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना सर्व मित्र पक्षांचा भक्कम पाठिंबा असून, ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. 
आज हॉटेल फर्न येथे महायुतीची पत्रकार परिषद पार पडली दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी यावेळी बैठकही झाली यावेळी मंत्री जयकुमार गोरे, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती . 
दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी आम्ही महायुती म्हणून सगळे  सक्रिय आहोत. मात्र आमच्यात मतभेद असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे 


सुरेश भोसले म्हणाले...; अविनाश मोहितेंची ओळख... "घोटाळेबाज' म्हणूनच ... ; अविनाश मोहितेंनी केलेल्या घोटाळ्यांच्या पैशांतून नवा कारखाना निघाला असता ; ऍड उदयदादा म्हणाले...सहकार पॅनेलला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या ;

वेध माझा ऑनलाइन।
विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना डॉ. सुरेश भोसले यांनी कार्वे येथे झालेल्या कालच्या सभेत सांगितले की अविनाश मोहितेंच्या काळात तोडणी-वाहतूक संघटनेत सुमारे ६० कोटी रुपयांचा घोटाळा झाला. तसेच ७७८ सभासदांच्या कथित बनावट सह्यांद्वारे कर्जप्रकरणे, ३२०० कामगारांची भरती आणि नोंदणी नसलेल्या १४०० कामगारांवर दरमहा सुमारे ५० लाखांचा खर्च झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या व्यवहारांमधील कोट्यवधी रुपयांचा हिशेब अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगत, ‘या घोटाळ्यांच्या पैशांतून एक नवा साखर कारखाना उभा राहिला असता,’ अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान कारखाना आमच्या ताब्यात आला तेव्हा आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. राज्यभर झालेली बदनामी दूर करून कारखाना पुन्हा उभा करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागल्याचेही सुरेशबाबांनी सांगितले 

अविनाश मोहितेंची ओळख  घोटाळेबाज म्हणूनच संपूर्ण परिसरात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्वे (ता. कराड) येथे आयोजित जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन मदनदादा मोहिते व माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते

यावेळी बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, की २०१५ साली जेव्हा आम्ही कारखाना ताब्यात घेतला तेव्हा व्यापाऱ्यांची देणी देण्याकरता ही पैसे नव्हते. पण गेल्या ११ वर्षांत आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे कारखान्याने नवी उंची गाठली असून, आर्थिक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. येणाऱ्या ५ वर्षात सिंचन योजनांचे आधुनिकीकरण करायचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे. कार्यक्षेत्रातील सर्व पाणंद रस्ते पूर्ण करायचे आहेत. तसेच ऊसदरातही एक नंबरला आम्ही राहू, अशी खात्री देतो. 

गेल्या 5 वर्षात आपल्या काळात कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश मिळाले आहे उच्चांकी ऊसदर आम्ही दिला आहे  कामगारांना वेळोवेळी पगारवाढ दिली आहे सभासदांना सर्वतोपरी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आहे तसेच कारखान्याचे एक्सपानन्शन केले आहे  गाळप क्षमता वाढवली आहे विस्तारीकरण तसेच नूतनीकरण देखील कारखान्यात केलेलं आहे अशा अनेक बाबींमुळे कारखाना आजच्या घडीला राज्यात अववल क्रमांकावर आहे . मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत सहकार पॅनलचा मोठ्या मताने विजय होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला

Friday, June 12, 2026

अविनाश मोहितेंनी त्यांच्या काळात फक्त घोटाळे केले,... दुसरं काय केलं? सुरेश भोसलेंचा सवाल

वेध माझा ऑनलाईन।
थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते (भाऊ) आणि सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या मार्गदर्शनातून आणि अनुभवातून कारखाना उत्तम पद्धतीने कसा चालवावा हे आम्ही शिकलो. त्यामुळेच आज कारखाना प्रगतीपथावर नेता आला. पण अविनाश मोहितेच्या सत्तेच्या काळात घोटाळ्यांच्या पलीकडे त्यांनी काय केले?,
निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने कशाला देता? असा थेट सवाल य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केला. वाठार (ता. कराड) येथे जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. 

व्यासपीठावर आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दत्तात्रय देसाई, लिंबाजी पाटील, संभाजी पाटील, दयानंद पाटील, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी बोलताना डॉ. भोसले पुढे म्हणाले, की २०१५ साली जेव्हा आम्ही कारखाना ताब्यात घेतला तेव्हा व्यापाऱ्यांची देणी देण्याकरता ही पैसे नव्हते. पण गेल्या ११ वर्षांत आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे कारखान्याने नवी उंची गाठली असून, आर्थिक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल कारखान्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. येणाऱ्या ५ वर्षात सिंचन योजनांचे आधुनिकीकरण करायचे आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच जमीन क्षारपडमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे. कार्यक्षेत्रातील सर्व पाणंद रस्ते पूर्ण करायचे आहेत. तसेच ऊसदरातही एक नंबरला आम्ही राहू, अशी खात्री देतो. 

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने पारदर्शक कारभार केला. त्यामुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. पण विरोधक आज खोट्या वल्गना करत आहेत. ते आज १२० किलो मोफत साखर देण्याची घोषणा करत आहेत. पण मग जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती तेव्हा का मोफत साखर दिली नाही? आज निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने कशाला देता? आज कृष्णा कारखाना चांगल्या पद्धतीने सुरू आहे. गेल्या ११ वर्षात कारखान्याला १४ पुरस्कार मिळाले असून, त्यापैकी ८ पुरस्कार ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत व्ही.एस.आय.च्या माध्यमातून मिळाले आहेत. विरोधकांकडे कोणताही अजेंडा नाही. त्यांनी स्वतःच्या ५ वर्षात काय दिवे लावले हे सभासदांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे सभासद त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. 

राजेश पाटील-वाठारकर म्हणाले, भाऊ - आप्पांनी ज्या कल्पकतेने हा कारखाना उभारला, त्याला आज बदलत्या काळानुसार प्रगतीपथावर नेण्याचे काम डॉ. सुरेशबाबांनी केले आहे. राज्यातील नामांकित कारखान्यामध्ये आज कृष्णा कारखान्याचे नाव अभिमानाने घेतले जाते. 

संचालक दत्तात्रय देसाई यांनी डॉ. सुरेशबाबांनी शेतकरी हिताचे धोरण राबवित कारखान्याला महाराष्ट्रात अव्वलस्थानी केल्याचे सांगून, सभासदांनी सहकार पॅनेलला भक्कम साथ द्यावी, असे आवाहन केले. 

यावेळी जयवंतराव भोसले सहकार पॅनलचे उमेदवार अरविंद पाटील, बाळासाहेब जगताप, सुनीता शेवाळे, सुजाता जाधव, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका साळुंखे, माजी सदस्या शामबाला घोडके, महेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्या मनिषा पाटील, शिवाजीराव थोरात, वसंतराव शिंदे यांच्या विविध गावातील मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सोबत फोटो :

Thursday, June 11, 2026

शरद पवार राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार ! जोरदार हालचाली सुरू !

वेध माझा ऑनलाईन।
पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कधीकाळी बंगालमध्ये सत्तेत असणारा तेथील माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची शकलं झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 80 आमदारांपैकी 50 पेक्षा जास्त आमदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडली आहे. 19 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांचा उरलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवूननी देणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही काँग्रेस पक्षात विलीन होण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी राष्ट्रवादीच्या पवार गटाला काँग्रेसचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तशी माहिती मिळाली आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती समोर आल्याने आता हालचाली वाढल्या आहेत.

Wednesday, June 10, 2026

राज्यात मॉन्सूनचा पाऊस लांबणीवर ;


वेध माझा ऑनलाइन।
मॉन्सून केरळमध्ये दोन दिवस उशिरा दाखल झाला. मात्र, त्यानंतर चांगली वाटचाल केली. आता मॉन्सून रेंगाळताना दिसत आहे. राज्यात मॉन्सून दाखल होण्याकरिता उशिरा लागत आहे. ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पेरण्या रखडल्या आहेत.
राज्यात मोसमी पाऊस लांबणीवर पडला आहे. ज्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.  पुढील 3 ते 4 दिवसात आणखीन काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. देशातील ईशान्येकडील भागांसह पश्चिम बंगालमधील काही भागात मोमसी पावसाने वाटचाल केली आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून राज्यात मॉन्सूनचा पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे येथे स्थिर असून मॉन्सूनचा पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मॉन्सून पुढे सरकत नसल्याने एक संकट निर्माण झाले. त्यामुळे राज्यात मॉन्सूनचा पाऊस काहीसा लांबण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील इतर भागात मॉन्सून पाऊस दाखल होण्याची स्थिती अनुकूल आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणासह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मॉन्सूनचा पाऊस दाखल होण्याचा सरासरी कालावधी हा साधारणपणे 7 ते 11 जून मानला जातो.
राज्यात वादळी पावसाचा प्रभाव कमी होणार असल्याची चिन्हे आहेत. मात्र, आजही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील काही भागात मॉन्सून दाखल झाला असून काही भागात मान्सून पूर्व पावसाची नोंद होत असून जवळपास भागात वादळी पावसाची स्थिती आहे. पुढील काही दिवसात राज्यातील वादळी पावसाचा प्रभाव कमी होण्याचा अंदाज आहे. तसेच काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मान्सूनची वाटचाल संथगतीने होत असून पुढील 3 ते 4 दिवसात राज्याच्या आणखीन काही भागात मान्सून दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सध्या दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची नोंद होत आहे.  मुंबईतही नागरिकांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे.
मॉन्सून 6 जून रोजी तळकोकणात दाखल झाला असून सध्या मॉन्सूनची उत्तर सीमा कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरमधील काही भागात स्थिर आहे. मॉन्सूनची राज्यातील वाटचाल काहीशी संथगतीने सुरु असून पुढील काही दिवस नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भातही पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवत असून शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई शहरात अद्याप पावसाची इंट्री झाली नाहीये. प्रचंड ऊकाडा आणि हवेतील आर्द्रता वाढल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. आज उपनगरांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस आणि 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.


कृष्णा कारखाना निवडणूक ; सहकार पॅनेलला ‘कप-बशी’ तर संस्थापक पॅनेलला ‘नारळ’ हे चिन्ह ;

वेध माझा ऑनलाइन।
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून सहकार पॅनेलला ‘कप-बशी’ तर संस्थापक पॅनेलला ‘नारळ’ हे चिन्ह मिळाले आहे. कारखान्याच्या २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख पॅनेलचे उमेदवार निश्चित झाले असून आता प्रचाराच्या रणधुमाळीला वेग येणार आहे.
सहकार पॅनेलकडून गट क्रमांक १ मध्ये धोंडीराम जाधव, जगदीश जगताप व आनंद खबाले, गट क्रमांक २ मध्ये अरविंद पाटील, दयाराम पाटील व बाजीराव थोरात, तर गट क्रमांक ३ मध्ये दत्तात्रय देसाई, लिंबाजी पाटील व संभाजीराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गट क्रमांक ४ मध्ये जयवंत मोरे, सत्यजीत पाटील व सुनील पाटील, गट क्रमांक ५ मध्ये बाबासो शिंदे व संग्राम पाटील, तर गट क्रमांक ६ मध्ये सुरेश भोसले व बाजीराव निकम हे निवडणूक रिंगणात आहेत.
महिला राखीव गटातून सुजाता जाधव व सुनिता शेवाळे, अनुसूचित जाती-जमाती गटातून छबन कांबळे, भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून अविनाश खरात आणि इतर मागास प्रवर्ग गटातून बाळासो जगताप यांना सहकार पॅनेलने उमेदवारी दिली आहे.
संस्थापक पॅनेलकडून गट क्रमांक १ मध्ये आनंदा तुकाराम जगताप, प्रताप धोंडीराम जगताप व दुर्योधन खबाले, गट क्रमांक २ मध्ये संतोष थोरात, प्रतापराव पाटील व शांताराम पाटील, तर गट क्रमांक ३ मध्ये सुरेश बाबुराव पाटील, सुभाष पाटील व किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गट क्रमांक ४ मध्ये जयकर शिंदे, महेश पवार, महेश पाटील व उदयसिंह शिंदे, गट क्रमांक ५ मध्ये सुरेश पाटील व माणिकराव मोरे, तर गट क्रमांक ६ मध्ये अविनाश मोहिते व दीपक कणसे हे उमेदवार आहेत. महिला राखीव गटातून अर्चना मोहिते व विजया पाटील, अनुसूचित जाती-जमाती गटातून सुधीर रोकडे, भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून दिलीप गलांडे आणि इतर मागास प्रवर्ग गटातून प्रकाश श्रीखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, गट क्रमांक १ मधून विश्वास जाधव यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. 

कराडच्या वीरपुत्राला कर्तव्य बजावताना वीरमरण :

वेध माझा ऑनलाईन।
कराड तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात कराड तालुक्यातील शहापूर येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव हे शहिद झाले आहेत. या दुर्घटनेत आणखी एका जवानालाही वीरमरण आले आहे. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अर्जुन जाधव यांनी सर्वोच्च बलिदान दिल्याने शहापूर गावासह संपूर्ण कराड तालुक्यावर शोककळा पसरली आहे. 

आर्जून चव्हाण यांच्या पश्चात पत्नी सायली, आई- वडिल, 11 महिन्याचे बाळ सर्वेश, दोन भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. आर्जूनचा धाकटा भाऊ इंडियन नेव्हीमध्ये आहे. अर्जून आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसासाठी 15 दिवसानी येणार होता. 25 जूनला मुलाला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, त्याअगोदरच चिमुकल्याचा बाबा शहिद झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

आगामी १५ दिवसांत पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याचे रोहित पवारांनी दिले संकेत ;

वेध माझा ऑनलाईन।
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी आगामी १५ दिवसांत पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, महागाई व शेतमालाच्या मुद्द्यावरून ते सरकारवर सातत्याने टीका करत आहेत।पक्षातील आगामी बदलरोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षात संघटनात्मक बदल केले जातील। यामध्ये नव्या चेहऱ्यांना आणि राजकारणाशी थेट संबंध नसलेल्या विविध क्षेत्रांतील तरुणांना पक्षात संधी दिली जाणार आहे।

तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार ? ममता बॅनर्जी यांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांची काँग्रेसकडे मागणी ; केली आहे.; सध्या मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ;

वेध माझा ऑनलाईन
काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला. राज्यात भाजपची सत्ता आली. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे. 58 पेक्षा अधिक आमदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सडोली आहे. त्यांनी वेगळा गट स्थापना केला, आणि या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार 20 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना तृणमूल पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी या हा प्रस्ताव स्विकारण्यास तयार आहेत. परंतु त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी त्यासाठी एक अट ठेवली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधींकडे मल्लिकार्जुन खरगे यांचं पद मागितलं आहे.
काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना राज्यसभेवर पाठवावं आणि त्यांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसकडे केली आहे. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र त्यासाठी त्यांनी आता ही अट घातल्यामुळे काँग्रेस ही अट मान्य करणार का? आणि तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या असे समजते

तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होणार ? ममता बॅनर्जी यांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांची काँग्रेसकडे मागणी ; केली आहे.; सध्या मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ;

वेध माझा ऑनलाईन
काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला. राज्यात भाजपची सत्ता आली. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे. 58 पेक्षा अधिक आमदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सडोली आहे. त्यांनी वेगळा गट स्थापना केला, आणि या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार 20 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना तृणमूल पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी या हा प्रस्ताव स्विकारण्यास तयार आहेत. परंतु त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी त्यासाठी एक अट ठेवली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधींकडे मल्लिकार्जुन खरगे यांचं पद मागितलं आहे.
काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना राज्यसभेवर पाठवावं आणि त्यांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसकडे केली आहे. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र त्यासाठी त्यांनी आता ही अट घातल्यामुळे काँग्रेस ही अट मान्य करणार का? आणि तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या असे समजते

शरद पवार म्हणाले,... आता महागाईविरोधात पक्ष थेट रस्त्यावर उतरणार ;

वेध माझा ऑनलाईन।
आज राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते शरद पवार यांनी दिनविशेष वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी अनेक विषय अधोरेखित केले. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी भाषणाच्या अखेरमध्ये मोठ्या एल्गारााची घोषण केली.

शरद पवार म्हणाले, आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम. मला मोठी गंमत वाटली. पक्षाची जाहिरात सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर पाहिली. आजपर्यंत मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर जाहिरात पाहिली नव्हती. कारण पहिल्या पानावर जाहिरात द्यायची म्हणजे त्याची किंमत किती असते मला माहित आहे. त्यामुळे मी त्या रस्त्याने कधी गेलो नाही. पण आज जाहिरात पाहिली नाही असे शरद पवार म्हणाले. इतकेच नाही तर त्यांनी अनेक विषय प्रकाश झोतात आणले.

शरद पवार पुढे म्हणाले, आज खतासाठी शेतकऱ्यांना रांगा लावाव्या लागत आहेत. सर्वसामान्य महागाईचा सामना करत आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी (शदर पवार गट) रसत्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे

Sunday, June 7, 2026

कराडमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली ; नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन/

वेध माझा ऑनलाईन।
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कराड शहरात शुक्रवारी सायंकाळी पर्यावरण संवर्धनाचा जागर घडवून आणणारी सायकल रॅली उत्साहात पार पडली. एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लब आणि कराड नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, सायकलप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. 

दत्त चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, नरेंद्र लिबे, माजी नगरसेवक सौरभ पाटील, फारूक पटवेकर, अतुल शिंदे, अशोकराव पाटील, सुरेश पाटील, अर्बन बँकेचे संचालक समीर जोशी, एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

चावडी चौक, कन्या शाळा, नगरपालिका परिसर आणि कॉटेज हॉस्पिटल मार्गे मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी उद्यान येथे झाला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि हवामान बदलांविषयी जनजागृती करणारे संदेशफलक हातात घेतले होते. 'एक व्यक्ती-एक झाड, प्रदूषणमुक्त हवा, निसर्गाचा खरा श्वास, स्वच्छ हवा-निरोगी जीवनाचा पाया आणि पर्यावरण जपा, पृथ्वी वाचवा' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. 

गेल्या १९ वर्षांपासून एन्व्हायरो नेचर फ्रेंड्स क्लबकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सातत्याने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. यावर्षीच्या सायकल रॅलीतून इंधन बचत, पर्यावरणपूरक वाहतूक आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. यावेळी आम्ही कागदी पिशवी वापरण्यास कटिबद्ध आहोत, अशा आशयाच्या स्ट्रिप्स दुकानदारांना देऊन त्या दुकानांमध्ये लावण्याचे आवाहन करण्यात आले.

नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. रॅलीत सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, स्केटिंग ग्रुप, विविध सायकलपटू संघटना, पीडिलाईट इंडस्ट्रीज, रॅपटॉक्स इंडस्ट्रीज (तासवडे), अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, शालेय विद्यार्थी तसेच अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करत या रॅलीने कराडकरांना हरित भविष्यासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला.

खासदार उदयनराजे, आमदार अतुलबाबा, मनोज घोरपडे यांच्याकडून पुलाच्या कामाची पाहणी ; अद्यापही काही कामे प्रलंबित ? येत्या 20 तारखेला उद्घाटन होणार का?

वेध माझा ऑनलाईन।
कराड येथील उड्डाणपुलाची  खासदार उदयनराजे यांच्यासह  आमदार अतुलबाबा व मनोज घोरपडे आणि अन्य मान्यवरांनी आज पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.या पाहणीत उड्डाणपुलावरील काही कामे अद्याप सुरू असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले. संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदार कंपनीला कामात गती आणून उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. 

मात्र... सदर प्रलंबित कामे वेळेत पूर्ण न झाल्यास उड्डाणपूल वीस जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार की नाही? अशी शंका उपस्थित होत आहे





Saturday, June 6, 2026

बायको आणि मेहुण्याने अभियंता नवऱ्याची सुपारी देऊन केली हत्या ! कराड पोलिसांनी फक्त 12 तासांत केला घटनेचा उलघडा ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरातील शिंदे हॉस्पिटलसमोर शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातामागे थरारक खुनाचे षड्यंत्र असल्याचे उघड झाले आहे. जलसंपदा विभागातील अभियंताच्या मृत्यूला सुरुवातीला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र कराड शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश करत मृताची पत्नी आणि मेहुण्यालाच कटाचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न केले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, वैवाहिक वादातून पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने एक महिन्यापूर्वीच पतीच्या खुनाचा कट रचल्याचे समोर आले आहे. यासाठी दोन जणांना सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहितीही तपासातून पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि मेहुण्यास अटक केली असून कॉन्ट्रक्ट किलरचा शोध सुरू आहे. त्याच्या शोधासाठी कराड शहर पोलीस ठाण्याची तीन पथके व स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाली आहेत.
लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय 54, रा. मनव, ता. कराड) असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. तर पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (वय 36, रा. मनव, ता. कराड) व मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण (वय 40 रा. सुरूल पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत लक्ष्मण मंडले व पत्नी सुरेखा मंडले यांचेमध्ये कौटुंबिक वाद होता. पती आपणास त्रास देत आहे ही बाब मनात ठेवून सुरेखा मंडले हिने एक महिन्यापूर्वी भावाच्या मदतीने मुंबई येथे जाऊन पतीचा काटा काढायचा प्लॅन केला होता. त्यानुसार शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास शिंदे हॉस्पिटलसमोर एका व्यक्तीला चारचाकी वाहनाने उडवल्याची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लक्ष्मण मंडले हे गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृताच्या पत्नीने पोलिसांना ही अपघाताची घटना असल्याचे सांगितले. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीतून पोलिसांना संशय आला. तपासात असे आढळले की, एक अल्टो कार मंडले यांच्या पाठीमागून आली, त्यांना उडवून दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील बॅग आणि साहित्य घेऊन पळ काढला. इतकेच नव्हे तर काही वेळाने पुन्हा अल्टो कार घटनास्थळी येऊन जखमी अवस्थेत पडलेल्या मंडले यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे मृत लक्ष्मण मंडलेची पत्नीस चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिला खाक्या दाखविताच तिने भावाच्या मदतीने पतीला मारण्यासाठी दोघांना सुपारी दिल्याची निष्पन्न झाले. पोलिसांनी याप्रकरणी मृत लक्ष्मण मंडलेची पत्नी व मेहुण्यास अटक केली असून आणखी सुपारी घेणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांच्या शोधासाठी कराड शहर पोलीस ठाण्याची तीन पथके व स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाली आहेत.
पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे करीत आहेत.