Thursday, August 14, 2025

डोंबवली बँकेच्या कराड शाखेच्यावतीने पोलसांना राखी बांधून रक्षा बंधन केले साजरे ; व्यवस्थापक विजय देशपांडे यांची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन
डोंबवली नागरी सहकारी बँकेच्या कराड शाखेच्या वतीने बँकेच्या स्टाफकडून कराड शहर पोलीस स्टेशन येथे पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले याबाबतची माहिती व्यवस्थापक विजय देशपांडे यांनी वेध माझा ला बोलताना दिली

ते म्हणाले रक्षाबंधन हा सण विश्वासाचा सण आहे पोलीस हे खऱ्या अर्थाने समाजाचे रक्षणकर्ते आहेत त्यांच्या कर्तव्यप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या ऋणात राहणे व त्यांच्या पाठीशी नागरिक म्हणून खंबीर उभे राहण्यासाठी म्हणून आम्ही डोंबवली बँक कराड शाखेकडून त्यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून आमच्या त्यांच्याबद्दलच्या असलेल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या

यावेळी शाखा व्यवस्थापक विजय देशपांडे तसेच उमेश महाडिक दत्तात्रय माळी स्वाती बोराटे श्वेता लाड प्रियांका गवाते आदी स्टाफ उपस्थित होता

कराड शहरातील मतदार यादीत बाहेरील भागातील नावे समाविष्ठ झाल्याचे निष्पन्न - याबाबत योग्य ती कारवाई करा: सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पेंढारकर, दीपक पाटील,अजय उंडाळकर व विक्रम जाधव यांची मागणी ; प्रांतांना निवेदन सादर ;

वेध माझा ऑनलाईन
परगावातील परजिल्ह्यातील तसेच शहर भागातील दुसऱ्या पेठेतील मतदारांची नावे कराड दक्षिण मतदार संघांतर्गत असणाऱ्या कराड शहरातील मतदार यादीत समाविष्ठ झाल्याचे निदर्शनास आले असल्याने याबाबतची योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील व अजय उंडाळकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे

निवेदनात म्हटले आहे की चुकीच्या भागात नोंद झालेली नावे त्याठिकाणहून वगळून योग्य त्या ठिकाणी नोंद व्हावीत जेणेकरून त्याही लोकांचा मतदान हक्क अभाधित राहील 
तसेच काही स्थलांतरित मतदारांसह दुबार व मयत मतदारांची  नावे देखील
संबंधित यादीत आहेत याबाबत देखील योग्य तो बदल व्हावा
ऑनलाइन नोंदणीमुळे चेकलिस्टला पडणारी नावे चेक करून त्यानंतर नावे संबंधित लिस्टमध्ये समाविष्ट करावी
बाहेरील नावे अजूनही लिस्ट मध्ये नोंद होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे
संबंधित मतदार यादीत 30 ऑक्टोबर  2006 पूर्वी जन्म झालेल्यांची नावे नोंद होताना दिसत आहेत मात्र 1 नोव्हेम्बर  नंतर जन्म झालेल्याची नावे या यादीत नोंद होत नाहीत तसेच 18 वर्षे पूर्ण झालेल्यांची नावे देखील या मतदार यादीत नोंद होत नाहीत  याकडे लक्ष देऊन संबंधित प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशीही मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे
दरम्यान सदर मागण्यांचे निवेदन माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, अजय उंडाळकर व विक्रम जाधव यांनी कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे  याना आज दिले

Tuesday, August 12, 2025

नामदेवराव पाटील म्हणाले ... कराड विमानतळासाठीचा प्रशासकीय परवानगी पासून ते निधी मिळेपर्यंतचा पूर्ण पाठपुरावा पृथ्वीराजबाबांचाच...

वेध माझा ऑनलाइन
 स्व यशवंतराव चव्हाण साहेब यांचे स्वप्न आणि धोरण होते की प्रत्येक तालुकास्तरावर विमानतळ असले पाहिजे. त्यानुसार कराड येथे विमानतळाची स्थापना झाली. त्यानंतर कालांतराने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर कराड चे सुपुत्र श्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त कराड साठी विशेष निधीची तरतूद केली. त्याचवेळी कराड विमानतळाचे विस्तारीकरण भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असे जाणून यासाठी पृथ्वीराज बाबांनी तरतूद करीत नियोजन केले. कराड विमानतळाचे विस्तारीकरण हे माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचे काम असून त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील हा एक महत्वाचा उपक्रम आहे. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीने मुख्यमंत्री पदाच्या काळापासून कराडच्या विमानतळाचे विस्तारीकरण साठी सर्व प्रशासकीय परवानगी पासून ते निधी मिळेपर्यंत पूर्ण पाठपुरावा केलेला आहे. कराडच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी १७.१६ कोटींच्या निधीबाबत जो श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला त्याबाबतची सत्यता व माहिती देणे महत्वाचे असल्याने हे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडत आहे. 

वास्तविक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हे कराड विमानतळाच्या विस्तारीकरण साठी मुख्यमंत्री काळापासून आग्रही आहेत. विस्तारिकरण बाबतच्या सर्व परवानगी आणि प्रशासकीय मान्यता पृथ्वीराज बाबांच्या पाठपुराव्याने पूर्तता झाल्यानंतर निधी प्राप्त व्हायला सुरुवात झाली. 2023-24 साली २२१.५१ कोटी इतका निधी मंजूर झाला. ४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन आदेशात स्पष्ट नमूद केले आहे कि, कराड विमानतळाच्या विस्तारीकरण कामासाठी २८ ऑगस्ट २०१२ च्या शासन निर्णयान्वये रु. ९५.६४ कोटी इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच उक्त शासन निर्णयातील कामांसाठी २९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु. २२१.५१ कोटी इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. 

तसेच या शासन निर्णयामध्ये असे आहे कि, २९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे वळतीकरण करणेकरीता रु. ८.५० कोटी इतक्या खर्चासाठीची रक्कम हि. २८ ऑगस्ट २०१२ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे ठेवण्यात आली आहे. शासन आदेश स्पष्ट वाचला की समजून येईल. शासन आदेशात स्पष्ट आहे कि, २९ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयातील अ.क्र. ९ मधील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजेनच्या पाईपलाईनचे स्थलांतर करण्याकरिता रु. १७.१६ कोटी इतक्या खर्चास द्वितीय सुधारित मान्यता देण्यात येत आहे. असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. 

तसेच विमानतळ बाधितांना मोबदला मिळण्यासाठी व पुनर्वसनाकरिता भूसंपादनाची कार्यवाही व भैरवनाथ पाणीपुरवठा योजेनच्या पाइपलाइनचे स्थलांतर करणे या विषयावर माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै २०२४ रोजी मिटिंग सुद्धा झाली होती. 

यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी कराडच्या विकासासाठी दूरदृष्टीचा विचार करून कराडच्या विमानतळ विस्तारीकरणसाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे तसेच निधी सुद्धा मंजूर करून आणला आहे. पृथ्वीराज बाबांनी कराडचा सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे दुरदृष्टीने विकास केला आहे. पृथ्वीराज बाबांनी केलेल्या कामांचे उदघाटन तसेच त्यांनी आणलेला विकासनिधी बाबत कोणताही श्रेयवाद न करता कराड दक्षिणची आजपर्यंतची गरिमा राखली पाहिजे.

Sunday, August 10, 2025

फडणवीसांनी दिले शरद पवारांना उत्तर ; म्हणाले... हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम ;

वेध माझा ऑनलाइन
आजपर्यंत राहुल गांधी यांनी अनेकदा ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केली असली तरी शरद पवार तसं कधीच बोलले नव्हते. किंबहुना शरद पवार साहेबांनी अनेकदा स्पष्ट भूमिका घेतली होती की, ईव्हीएमला दोष देणे अयोग्य आहे. मात्र, आता राहुल गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार अचानक मतदानप्रक्रियेतील फेरफाराविषयी बोलू लागले आहेत. हा राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतोय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांनी आजच एका पत्रकार परिषदेत खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी  दिल्लीत दोन जण आपल्याला भेटायला आले होते. या दोघांनी आपल्याला 160 मतदारसंघांमध्ये हमखास विजय मिळवून देतो, असे सांगितले होते. मात्र, आम्ही पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवारांच्या सर्व आरोपांचे खंडन केले.

विरोधकांनी कितीही संभ्रम निर्माण केला तरी भारताइतक्या पारदर्शक आणि मुक्त पद्धतीने निवडणुका कुठेच होत नाहीत. ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्यावर आरोप करणारी मंडळी जनतेत बोलतात. पण निवडणूक आयोगाने बोलावल्यावर जात नाहीत. शपथपत्र द्यायला तयार नाहीत. सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. पण संसदेतील शपथ सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात चालते का? त्यांना माहिती आहे की, आपलं खोटं पकडलं गेलं तर उद्या तुमच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं, असे हे पळपुटे लोक आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपूरमध्ये शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट :

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोकांनी भेट घेतली होती त्यांनी 160 जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली होती. निवडणूक आयोगाबाबत शंका नसल्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं, असं शरद पवार म्हणाले. त्या दोन लोकांची भेट राहुल गांधी यांच्यासोबत देखील घालून दिली होती. आम्ही दोघांनी जनतेत जाऊन जो कौल मिळेल तो स्वीकारण्याचं ठरवलं त्या माणसांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले. 

शरद पवार म्हणाले की, मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो.  मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे, त्यांनी जे जे गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्विकारु असं ठरवलं.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत ;

 वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर कराड मध्ये प्रथमच आगमन झाले. शिरवळ पासून  कराड या दरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिवराज दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा शिवराज दादा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी काँग्रेस एकसंघाची हाक दिली.
तासवडे टोल नाका येथे कराड उत्तर काँग्रेस कमिटीकडून शिवराज मोरेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. 

शिवराज मोरे यांचे कराड शहरात आगमन होताच त्यांनी कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन करून दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन केले. यानंतर शिवराज मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सद्याच्या काँग्रेसच्या आव्हानात्मक परिस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण होते मात्र शिवराज मोरेंची झालेली निवड व त्यांचे कराड मधील आगमनाने वेगळाच माहोल तयार झाला. जोशाने भरलेले कार्यकर्ते गाड्यांची मोठी रॅली चौकाचौकात क्रेनला लटकणारे मोठ मोठाले हार आणि आमचा नेता शिवराज दादा अशा घोषणाबाजी करण्यात आल्या.

Wednesday, August 6, 2025

कराडमधील वार्ड क्रमांक दोन मध्ये विनायक कदम यांनी राबवली रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मोहीम - तेथील रहिवाश्यांनी व्यक्त केले समाधान ;

वेध माझा ऑनलाइन
अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक युवा नेते विनायक कदम यांच्या प्रयत्नाने व कराड नगरपरिषद प्रशासनाच्या सहकार्याने वार्ड क्रमांक 2 मधील रस्त्यातील खड्याना बुजवण्याची मोहीम नुकतीच राबविण्यात आली विनायक कदम यांनी स्वतः त्याठिकाणी थांबून ही कामे त्यांनी करून घेतली त्यानिमित्ताने त्यांच्या वार्ड क्रमांक 2 मधील लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे
सामाजिक कार्यकर्ते विनायक कदम हे भाजप व आमदार डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात ते विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर दिसतात त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे त्यांनी कोरोनात केलेल्या कामाची नेहमीच मोठी चर्चा होत असते नुकतेच त्यांनी वार्डातील नवमतदार नोंदणीचा यशस्वि कार्यक्रम घेत पक्ष नेतृत्वाकडून वाहवा मिळवली 
त्यांनी वार्डातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी पालिकेत जाऊन मागच्या आठवड्यात निवेदन दिले होते त्यानंतर पालिकेने तत्काळ त्याठिकाणच्या कुत्र्यांची धरपकड करत त्यांची नसबंदि केली होती 
नुकतीच त्यांनी वार्ड क्रमांक 2 मधील रस्त्यात असणारे खड्डे बुजवण्याची मोहीम राबवली आहे त्याठिकाणी असलेल्या खड्ड्यामुळे तेथिल  लहान मुले महिला व वयस्कर लोकांना रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे व तेथील खड्यामुळे येता जाताना चांगलीच कसरत करावी लागत होती किरकोळ अपघात देखील त्याठिकाणी होत होते त्यामुळे वादविवादाला त्याठिकाणी अनेकांना तोंड द्यावे लागत होते
मात्र आज विनायक कदम यांनी त्याठिकाणी सुरू केलेल्या रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या मोहिमेमुळे तेथील रहिवाश्यानी समाधान व्यक्त केले आहे