Tuesday, May 13, 2025

भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी आ डॉ अतुल भोसले ; डॉ अतुलबाबा म्हणाले...सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहणार ;

वेध माझा ऑनलाइन
 सातारा जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ.अतुल भोसले यांची मंगळवारी निवड जाहीर करण्यात आली. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी ही निवड जाहीर केली. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी यापूर्वी भाजप प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. गत लोकसभा निवडणुकीच्या वेळी लोकसभा मतदारसंघाचे  प्रमुख म्हणून त्यांनी चांगले काम करून दाखवले होते.त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्माई मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली होती. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मोठ्या मताधिक्याने कराड दक्षिण मधून विजय संपादन केला आहे.या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करूनच त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे मानले जात आहे.

खरंतर जिल्हाध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये मी कोठेही नव्हतो.मात्र पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम करण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. अशी प्रतिक्रिया डॉ.अतुल भोसले यांनी दिली आहे

दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ अतुलबाबांची झालेली निवड महत्त्वाची मानली जाते.

Sunday, May 11, 2025

युद्धबंदी जाहीर, तरी ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार ; कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं भारतीय वायुसेनेच आवाहन :

वेध माझा ऑनलाइन
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावात अमेरिकेने मध्यस्थी केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानने काल (10 मे) सायंकाळी युद्धबंदी जाहीर केली. मात्र युद्धबंदीनंतरही भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार असल्याचं भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही, अशी अधिकृत भूमिका भारतीय वायुसेनेकडून स्पष्ट करण्यात आली आहे. आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायूदलानं चोखपणे बजावली आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देखील भारतीय वायुसेनेने म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले...पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील; अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर नव्हे तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
पाकिस्तानमधून गोळ्या झाडल्या तर भारतातून तोफगोळे डागले जातील असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ऑपरेशन सिंदूर थांबणार नसून ते सुरुच असल्याचं भारताने स्पष्ट केलं. तसेच अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर नव्हे तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याची माहिती आहे. 
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानवर अशा जखमा केल्या आहेत ज्या भरून येण्यास बराच वेळ लागेल. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने 100 हून अधिक दहशतवाद्यांना नरकात पाठवले आणि 9 दहशतवादी तळ आणि पाकिस्तानचे लष्करी पायाभूत सुविधा नष्ट केल्या.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने जगभरातील मित्र राष्ट्रांशी चर्चा केली होती. या संभाषणात ऑपरेशन सिंदूरबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी, भारताने ज्या देशांशी चर्चा केली त्या सर्व देशांना स्पष्टपणे सांगण्यात आले की यावेळी कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात भारताची भूमिका अगदी स्पष्ट होती.

100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल,: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वेध माझा ऑनलाइन।
मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, राज्यभरातून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. संतापाची लाट पाहून सरकारने लवकरच पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल, असे म्हटले होते. त्यानुसार, आज सिंधुदुर्गातील मालवण किल्ल्यावर छत्रपतींचा नवा पुतळा दिमाखात उभा राहिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण झाले. सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केलाय. जर वादळं आली, त्या इन्टेन्सिटीचा अभ्यास करत हा पुतळा उभा करण्यात आला आहे. किमान 100 वर्षे कुठल्याही वातावरणात हा पुतळा टिकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळा अनावरण सोहळ्यानंतर बोलताना दिली.

100 हून जास्त दहशतवाद्यांचा खात्मा / 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांसह अनेक अधिकारीही मारले गेले;

वेध माझा ऑनलाइन।
पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरिदके, भावलपूरसह नऊ ठिकाणी हल्ले करुन 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. पाकिस्तानच्या दहशतवादाला उद्ध्वस्त करणे हेच ऑपरेशन सिंदूरचे ध्येय असल्याचंही ते म्हणाले. भारतीय सेनेच्या कारवाईत 35 ते 40 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा झाला असून त्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे अशी माहिती देण्यात आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यासाठी लष्कराच्या तीनही दलांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ही माहिती देण्यात आली.

" ब्रह्मस्त्र ' न केलीे दहशतवादी तळांची राखरांगोळी ; पाकिस्तानला भारताचा स्पष्ट इशारा

वेध माझा ऑनलाइन
 भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय देखील समाविष्ट होते. ते नष्ट करण्यासाठी भारताने त्याचे सर्वात शक्तिशाली शस्त्र वापरले.
वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला भारताविरोधात बळ दिलं. त्यामुळेच भारताला त्यावर कडक उपाययोजना करत त्याच्या सर्वात शक्तिशाली शस्त्राचा वापर करावा लागला. पण हे सर्वात शक्तिशाली अस्त्र कोणतं हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. संरक्षण मंत्री राजनाथ यांनी रविवारी संवाद साधताना काही संकेत दिले. ते म्हणाले की, "भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी ब्राह्मोसचा वापर केला. ब्राह्मोसचा आवाज रावळपिंडीपर्यंत ऐकू येत होता."

Thursday, May 8, 2025

दहशतवाद खपऊन घेणार नाही : सुधरा नाहीतर संपवून टाकू ; भारताचा पाकिस्तानला इशारा ;

वेध माझा ऑनलाइन
भारत हल्ला करत असल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा असून भारत दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असल्याचं भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केलं. यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं.गेल्या 65 वर्षांमध्ये सिंधू कराराचं पालन करणे ही भारताची सहनशिलता आहे. यापुढे भारत आपल्या हक्काचे पाणी वापरणार असंही या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आलं. 
पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याला भारताने चोख उत्तर देत लाहोरसह अनेक ठिकाणच्या एअर डिफेन्स सिस्टिम निष्क्रिय केल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. पाकिस्तानने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताने तो हल्ला उधळून लावला आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या रडार यंत्रणा निष्क्रिय करुन दिला असल्याची माहिती देण्यात आली. भारताच्या या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र खात्याचे अधिकाऱ्यांनी दिली