वेध माझा ऑनलाइन।
गेल्या काही दिवसांपासून निशिकांत दुबे यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात हिंदी-मराठी वाद चर्चेत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी दुबे यांचे स्वागत करण्याचे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात संताप आहे. विरोधी पक्षनेत्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार निशिकांत दुबे हे सातत्याने चर्चेत आहेत. महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वाद शिगेला पोहोचलेला असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी भाषेवरुन टीका केली होती. राज ठाकरे जर महाराष्ट्राबाहेर किंवा उत्तर भारतीय राज्यांमध्ये आले, तर त्यांना पटक-पटक कर मारेंगे असे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते. राज ठाकरेंनी दुबेच्या धमकीवर खोचक टोला देत प्रतिक्रिया दिली होती. आप मुंबई आइए. मुंबई के समंदर में डुबो-डुबोकर मारेंगे, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्यातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबेंबद्दल एक विधान केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच एका चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांचं महाराष्ट्रात आले तर संविधानिकरीत्या त्यांचे स्वागत करू, असे म्हटले आहे. यावरुन आता एकच गदारोळ सुरु आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या स्वागताच्या विधानावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते संजय राऊत आणि मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
No comments:
Post a Comment