सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत साताऱ्याचे नूतन खासदार म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे या जिल्ह्याला काँग्रेस - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटले जायचे याला छेद देत जिल्ह्यातील जनतेने असे म्हणणाऱ्या लोकांना चांगलीच चपराक दिली आहे अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे प्रभारी डॉ अतुल भोसले यांनी दिली आहे आ पृथ्वीराज चव्हाण यांना हा टोला मारल्याची चर्चा सध्या सुरू आहे अतुल भोसले यांनी साताऱ्यात जाऊन उदयनराजे यांचे अभिनंदन केले आहे
यावेळी प्रतिक्रिया देताना डॉ भोसले म्हणाले... लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा झालेला विजय, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा विजय आहे. सातारा लोकसभेतील उदयनराजेंच्या विजयामुळे सातारा जिल्ह्यातील जनतेने नरेंद्र मोदींना देशात पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी पाऊल उचलले आहे. तसेच साताऱ्यात कधीच भाजपचा खासदार निवडून येणार नाही, असे म्हणणाऱ्या प्रवृत्तींना, जिल्ह्यातील समस्त जनतेने या निकालाने सणसणीत चपराक दिली आहे.
No comments:
Post a Comment