Monday, March 17, 2025

दंगलखोर बाहेरहून आले ! :आधारकार्ड आणि वाहने सापडली

वेध माझा ऑनलाइन।
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. काल रात्री महाल परिसरात प्रचंड दगडफेक झाली होती. या भागात हिंसक जमावाकडून क्रेनसह अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे महल परिसरातील रस्त्यावर मोठ्या दगडांचा खच पडला होता. 

दंगलखोर बाहेरुन आले...!
नागपूरच्या कालच्या हिंसाचारानंतर रात्रभर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु होते. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ पसरवणाऱ्या आणि घटनास्थळी दंगल भडकवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 65 संशयित दंगलखोरांना नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे
प्राथमिक माहितीनुसार, महाल परिसरातील हिंसाचारात असणारा अनेकजण उत्तर नागपूरमधील कळमना आणि इतवारी परिसरातील असल्याचे समजते. काल रात्रीपासून पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत. हिंसाचार झाला त्याठिकाणी पोलिसांना काही वाहनं आणि आयकार्ड सापडली आहेत. पोलीस याठिकाणी आल्यानंतर संबंधित दंगलखोर तरुण आपल्या दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. तसेच पळापळीत काही दंगलखोरांच्या खिशातील आधारकार्ड आणि ओळखपत्रं खाली पडली होती. ही ओळखपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत. भालदारपुरा परिसरात हिंसाचाराचा जोर जास्त होता. मात्र, जमावाने आजुबाजूच्या चिटणीस पार्क, हंसापुरी परिसरातही वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक केली. यामध्ये सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागतय : देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली खंत ;

वेध माझा ऑनलाइन।
क्रूरकर्मा मुघल सम्राट औरंगजेबची कबर कायमची नेस्तनाबूत करावी, ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली जात आहे. संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवली नाही तर विश्व हिंदू परिषद कारसेवा करत स्वतः कबर हटवेल, असा इशाही सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे, शासनाकडून सध्या औरंगजेबाच्या कबरीला अधिकच संरक्षण देण्यात आलंय. याप्रकणावरुन राज्यात गदारोळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 
भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, येथील कार्यक्रमातून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागत असल्याची खंत बोलून दाखवली. मात्र, औरंग्याचं महिमामंडन होऊ देणार नाही, असं वचनही त्यांनी दिलं.

धक्कादायक बातमी ! लाडकी बहीण योजनेचे पैसे दारुवर उडवले; काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाइन
राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत निर्णयात्मक ठरली. लाडक्या बहि‍णींमुळे राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने प्रस्थापित झाल्यान महायुतीमधील तिन्ही पक्षाचे प्रमुख समाधानी आहेत. मात्र, लाडकी बहीण योजनेची स्क्रुटीन सुरू करण्यात आली असून फोर व्हिलर असलेल्या कुटुंबातील महिलांची नावे वगळण्यात येत आहेत. आत्तापर्यंत विविध कारणास्तव या योजनेतील 9 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करण्यात आलं आहे. एकीकडे ही योजना महिलांना आर्थिक बळ देत असल्याने योजनेचं कौतुक होत असताना, दुसरीकडे या योजनेतून महिलांना मिळणाऱ्या पैशांची मागणीही काही दारुड्या नवऱ्यांकडून महिलांना होत आहे. त्यातून घरगुती कलही निर्माण झाल्याचं पाहायाला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात अशीच एक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.लाडक्या बहिणीचे पत्नीच्या खात्यात आलेले पैसे पतीने दारूवर उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे महिलेनं पतीला जाब विचारताच पतीने बायकोवरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यात घडली आहे. पत्नीच्या लाडक्या बहिण योजनेच्या पैशावर पतीने डल्ला मारला. पत्नीच्या बँक खात्यातून परस्परपणे लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढून दारूवर खर्च केले. त्यामुळे, पत्नीने याबाबत जाब विचारताच पतीने पत्नीवर चक्क कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे. माढा तालुक्यातील लोणी गावातील ही घटना असून पती आणि सासूवर आरोप करण्यात आले आहेत. 

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले...राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येणार :

वेध माझा ऑनलाइन।
राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे. त्यामुळे, नागरिकांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होईल. यासंदर्भात अधिवेशनात आज विधानसभेत चर्चा झाली. अर्ज केल्यानंतर 15 दिवसांत वाळू न दिल्यास कारवाई करणार का? रेती संदर्भात अनेक अधिकारी हे ध्रुतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे जे लोक गाडी पकडून देतील, त्यांना वाहन बक्षीस देईल का? याबाबत आपण पोर्टल करणार आहात का?, असे अनेक प्रश्न भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विचारले होते. मुनगंटीवारांच्या या प्रश्नांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका मांडली. पुढील 8 दिवसांत राज्यात वाळू धोणार येणार आहे. त्यानुसार, अर्ज केल्यापासून 15 दिवसांत घरकुलधारकांना वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.

आजची मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे आदेश;

वेध माझा ऑनलाइन। 
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी असून आता शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपीची रक्कम देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रक्कमीच द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्य शासनाचा यासंदर्भातला आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणारे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाची एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. मात्र, आता न्यायालयाने शासनाचा हा निर्णय रद्द ठरवला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील ऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पवार कुटुंबावर शोककळा - सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचे निधन-

वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाऊजय भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. 18) दुपारी 12 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. भारती पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या निधनाची माहिती देत शोक व्यक्त केला आहे.

उड्डाणपूल उभारणीच्या कामात सावधानता बाळगाआ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सक्त सूचना

वेध माझा ऑनलाइन।
कराड येथे कोल्हापूर नाक्याजवळ सुरू असलेल्या महामार्ग उड्डाणपुलाचा सेगमेंट बसविताना अचानक निसटल्याने २ कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन उड्डाणपूल उभारणीच्या कामाची पाहणी केली. तसेच उड्डाणपूल उभारणीच्या कामात सावधानता बाळगण्याच्या सक्त सूचना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्या.

यावेळी बोलताना आ. डॉ. भोसले म्हणाले, की पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत कराड येथे उड्डाणपूल उभारला जात असून, याठिकाणी १२२३ सेगमेंट बसविले जात आहेत. आत्तापर्यंत १०९० सेगमेंट बसविले गेले असून, फक्त १३३ सेगमेंट बसवायचे राहिले आहेत. अशावेळी शनिवारी (ता. १५) रात्री सेगमेंट बसविताना क्रेनमधील तांत्रिक बिघाडामुळे सेगमेंट अचानक निसटल्याने मोठा आवाज झाला. याठिकाणी काम करणारे मजूर बाजूला   पळून जाताना त्यांना ईजा झाली. या मजुरांवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

भविष्यात अशी कुठलीही घटना घडू नये, तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी उड्डाणपूल उभारणीच्या कामात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी आणि संबंधित ठेकेदार कंपनीने सावधानता बाळगावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या मुदतीत उड्डाणपूलाचे काम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. तसेच उड्डाणपुलाच्या कामाच्या निमित्ताने जो एरिया प्रतिबंधित करण्यात आला आहे, अशा एरियात संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी पायी अथवा वाहनाने जाऊ नये, असे आवाहनही आ. डॉ. भोसले यांनी केले. 

Sunday, March 16, 2025

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या ; राजकारणात खळबळ

वेध माझा ऑनलाइन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील मोगा क्षेत्राचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांना गोळ्या घालून संपवण्यात आलंय. त्यामुळे पंजाबमधील शिवसेनेत खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दु:ख व्यक्त केलं असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कर्मयोगी च्या संपादिका सौ मंगलताई लोखंडे कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित ;

वेध माझा ऑनलाइन
दैनिक कर्मयोगी च्या संपादिका सौ मंगलताई लोखंडे यांना कर्तृत्ववान महिला पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले आहे
पत्रकारिता क्षेत्रातील बहुमोल व यशस्वी योगदानाबद्दल सौ लोखंडे यांचा हा गौरव करण्यात आला आहे

 येथील शिवाजी शिक्षण संस्था वेणूताई चव्हाण कॉलेज व वेणूताई चव्हाण स्मारक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने वेणूताई चव्हाण  जन्मशताब्दी निमित्त कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा नुकताच येथील वेणूताई चव्हाण स्मारक येथे नुकताच संपन्न झाला यावेळी सौ लोखंडे याना गौरवण्यात आले 
बारामतीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ सुनंदा पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले माजी आमदार बाळासाहेब पाटील हे अध्यक्षस्थानी होते

सौ मंगलताई लोखंडे यांनी दोन दशकांपूर्वी पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याचे ठरवत एकप्रकारे त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली आणि एकुणच वाढलेल्या भांडवलशाही वातावरणातील पत्रकारिता क्षेत्रात उतरत असताना प्रतिकूल परिस्थितीत सौ लोखंडे व त्यांचे पती नंदकुमार लोखंडे यांनी दैनिक कर्मयोगी ची स्थापना केली कोणतीही पत्रकारितेची पार्शवभूमी नसताना केवळ सामाजिक कार्याची आवड व भान राखून या दाम्पत्यानी ही सुरुवात केली त्यासाठी त्यांना अनेक संघर्षाला व स्पर्धेला सामोरे जावे लागले मात्र तो संघर्ष पार करत कर्मयोगीने गेल्या दोन दशकात जिल्ह्यात अग्रगण्य स्थान मिळवले आणि त्याचमुळे सध्या पत्रकारिता क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून कर्मयोगी कार्यरत आहे अनेक सामाजिक आवश्यक ते बदल आपल्या लेखणीच्या माध्यमातून  घडवण्यासाठी कर्मयोगीचे योगदान अतुलनीय आहे संपादिका सौ मंगलताई लोखंडे यांच्या संपादनाची सुस्पष्ट भूमिका यासाठी निर्णायक ठरते  कर्तृत्ववान महिला पुरस्काराने आज सौ लोखंडे याना सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्या कर्तृत्वाचाच हा गौरव झाला आहे 
कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करू नका या कर्मयोगी वृत्तीचाच हा गौरव असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने संपूर्ण जिल्ह्यातून व्यक्त होत आहे

Saturday, March 15, 2025

शिवेंद्रसिंहराजे काँग्रेसवर बरसले... म्हणाले...काँग्रेसने छत्रपतीं शिवाजी महाराजांना म्हणाव तेवढं महत्व दिले नाही...

वेध माझा ऑनलाइन।
लोकांना गृहीत धरून आपल्यापुरते काम करायचे ही काँग्रेसची नीती आहे जी समाजाला घातक आहे त्यामुळे भाजप शिवाय राज्यात आणि देशात पर्याय नाही लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे देशाचा अभिमान पंतप्रधान मोदी आहेत असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज व्यक्त केलं
यावेळी काँग्रेसने छत्रपतींना जेवढं महत्व द्यायला पाहिजे तेवढं महत्व दिले नाही....भाजपने मात्र छत्रपतींना योग्य ते महत्व देत गडकिल्याच्या संवर्धनासाठी महत्वाची तरतूद करून सन्मान केला असल्याचेही ते यावेळी म्हणाले...

आज विंग (ता; कराड) जि प गटातील काँग्रेस कार्यकरत्यानी आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते

ते पुढे म्हणाले आमदार नसताना अतुल भोसले यांनी कराड दक्षिणेसाठी साडेसातशे कोटी एवढा निधी आणला त्यामुळे मागील पराभवानंतर देखील ते सतत कामात राहिले आणि म्हणून कार्यसाम्राट आमदार म्हणून कराड दक्षिण ने त्यांना 40 हजार मतांनी निवडून दिले आता थांबू नका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अतुल बाबांच्या बरोबर राहून कराड दक्षिण मध्ये
सर्वच ठिकाणी भाजपमय वातावरण तयार करा माथाडी कामगारांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले

अतुलबाबा देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आमदार ...
अतुलबाबा देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आमदार आहेत त्यामुळे आजच्या कार्यक्रमात मला अतुलबाबा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रण देताच मी लग्गेच हो म्हटलो...कारण 25 वर्षे आमदार असून आताच राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे...त्यात मी जर अतुलबाबा यांचे हे आमंत्रण नाकारलं असत...तर माझा 6 महिन्यात कार्यक्रम लागला असता...त्यामुळे मी लग्गेच हो म्हटलो...असे म्हणताच सभेच्या ठिकाणी एकच हशा पिकला...

सातारा जिल्हा भाजप चा बालेकिल्ला...
सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता हा भूतकाळ झाला...मात्र अतुल भोसले यांच्यासह उदयनराजे असतील मनोज घोरपडे असतील जयकुमार गोरे असतील मी स्वतः असेन...आम्ही सर्वांनी मिळून भाजपमय वातावरण केलं आहे त्यासाठी लोकांनी व सर्व कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली आहे हे विसरून चालणार नाही...त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजपमय
वातावरण तयार झाले असल्याचेही ते म्हणाले

Wednesday, March 12, 2025

मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या निर्धाराला उदयनराजे भोसले यांचा घरचा आहेर ; काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाइन
मात्सोद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या निर्धाराला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घरचा आहेर दिला आहे. “
मी नितेश राणे यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. पण, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो. त्यांनी हिंदू-मुस्लीम असा कधी भेदभाव केला नाही. राणे यांनी जे वक्तव्य केले आहे. त्यावर एवढं म्हणणें कि मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं, असे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हटले
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मंत्री नितेश राणेंना असं म्हणायचे असेल की औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे, ते खोदून काढा. मी तर किती वेळा तरी सांगितलं आहे की, तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो, हे विसरू नका. त्याचा अर्थ तसा काढू नका, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे

अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला / बातमी...

वेध माझा ऑनलाइन
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पापाठोपाठ गोरेगावमधील मोतीलाल पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला आहे. 143 एकरवर असलेल्या या प्रकल्पासाठी अदानी समूहाने सर्वाधिक 36 हजार कोटींची बोली लावली आहे.
या प्रकल्पाच्या निविदेतील अटीनुसार एकूण क्षेत्राच्या 13.29 टक्के क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर 3 लाख 83 हजार चौरस मीटर क्षेत्रावर घरे बांधून देणाऱ्या कंपनीस कंत्राट बहाल केले जाणार होते. त्यानुसार अदानी प्रॉपर्टीजने 13.78 टक्के अर्थात 3 लाख 97 हजार 100 चौ. मीटर जागेवर म्हाडास घरे बांधून देण्याची तयारी दर्शविली.
या प्रकल्पाच्या निविदेतील अटीनुसार एकूण क्षेत्राच्या 13.29 टक्के क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर 3 लाख 83 हजार चौरस मीटर क्षेत्रावर घरे बांधून देणाऱ्या कंपनीस कंत्राट बहाल केले जाणार होते. त्यानुसार अदानी प्रॉपर्टीजने 13.78 टक्के अर्थात 3 लाख 97 हजार 100 चौ. मीटर जागेवर म्हाडास घरे बांधून देण्याची तयारी दर्शविली.या पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून अदानी समूहाला विक्रीसाठी 18 लाख 80 हजार चौ. मीटर क्षेत्र उपलब्ध होईल.


मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात?, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी,

वेध माझा ऑनलाइन
 मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात?, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी असेही पंकजा मुंडे एका मुलाखतीत म्हटल्या आहेत

12 डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यास निघाले असता अर्ध्या रस्त्यात असतानाच धनंजय देशमुखांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिला. ते म्हणाले की, आमच्या भावाला तुम्ही न्याय द्या. आज तुम्ही आलात आणि तुमच्याशी कोणी चुकीचे वर्तन केले, तर आम्हाला आवडणार नाही. त्यामुळे मी मागे फिरले, असा खुलासाही पंकजा मुंडे यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे.
मागच्या तीन वर्षे राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यावेळी धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि सुरेश धस आमदार होते. त्यावेळी देखील वाल्मिक कराड काम करत होता. त्याच्या विषयीची एकही तक्रार सुरेश धस यांनी या तिघांकडे का केली नाही?, असा सवालही पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला
मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात?, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली आहे.
सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट गपचूप का घेतली याचे उत्तर सुरेश धस यांनी द्यावे, अशंही पंकजा मुंडे या मुलाखतीमध्ये म्हणाल्या.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर आज पहिली सुनावणी होत आहे. 


लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? याच अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का... आमदार रोहित पवार, वरुण सरदेसाई यांचा सवाल /

वेध माझा ऑनलाइन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? याच अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का असा सवाल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंना केला...यावर आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही असं म्हटलं. 

आमदार रोहित पवार यांनी अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले त्यांचं मानधन दिलं नसल्याचं म्हटलं. याशिवाय नमो शेतकरी कृषी सन्मान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेगळी ठेवावी. याशिवाय 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये कधी करणार का याचं पॉइंटेड उत्तर द्या, असं रोहित पवार म्हणाले.  तुम्हाला कृषी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या माहीत असतानाही तुम्ही त्यांना निवडणूक काळात पैसे दिले मात्र आता त्यांना देत नाही याचा अर्थ निवडणूक साठी त्याचा वापर केला का, असा सवाल रोहित पवार यांनी केला. 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 26 जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना इन्सेटिव्ह देण्याच्या संदर्भात प्रक्रिया सुरु आहे, असं म्हटलं. ⁠नमो शेतकरी योजनेतून 1 हजार रुपये मिळतात. ⁠लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय पाहिला तर त्यात नमूद केलं आहे की 1500 पेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही . त्यामुळे त्यांना वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून देत आहे. ⁠जो आकडा कमी झाला तो विभागाने दिला नाही.  ⁠तर मिडीयाने हा आकडा आणला आहे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

सैफ अली खानवर उपचार झालेल्या रुग्णालयात सुरू आहेत काळ्या जादूचे प्रयोग ? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरावर 16 जानेवारी 2025 मध्ये हल्ला झाला. अचानक एक व्यक्ती अभिनेत्याच्या घरात घुसला. मुलांना आणि घरातील महिलांना वाचवण्यासाठी सैफ अली खान आणि हल्लेखोरामध्ये हाणामारी झाली. तेव्हा अभिनेता गंभीर जखमी झाला. तेव्हा अभिनेत्याला रात्र तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या रुग्णालयात अभिनेत्याला दाखल करण्यात आलं, त्या रुग्णालयाबाबत धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. रुग्णालयात काळी जादू होत असल्याची माहिती समोर येत आहे. लिलावती रुग्णालयात अभिनेत्याला दाखल करण्यात आलं होतं.
लिलावती रुग्णालयाचे ट्रस्टी प्रशांत मेहता यांनी दावा केला की, माजी ट्रस्टींनी रुग्णालय परिसरात नव्या ट्रस्टी बोर्ड विरोधात काळी जादू केली. आता परमबीर सिंग, जे लीलावती हॉस्पिटल ट्रस्टचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी प्रशांत बसलेल्या खोलीत काळी जादू केल्याचं त्याने उघड केलंय.

फ्री प्रेस जर्नलमधील वृत्तानुसार, प्रशांत यांच्या कार्यालयाच्या जमिनीखाली आठ कलश आढळून आले ज्यात मानवी केस, कवटी, हाडे आणि तांदूळ होते… असे परमबीर यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साक्षीदारांच्या उपस्थितीत व्हिडीओग्राफी करताना पूर्ण खबरदारी घेत संबंधित जागा खोदण्यात आली.
खोदल्यानंतर जमिनीतून आठ कलश सापडले आहेत. ज्यात काही मानवी अवशेष, केस आणि हाडे होती. अशा वस्तू काळ्या जादूसाठी वापरल्या जात असल्याचं आढळून आलं आहे. रिपोर्टनुसार, रुग्णालयाचे माजी ट्रस्टी आणि अन्य संबंधीत व्यक्तींना 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप नव्या ट्रस्टने केलाय.

याप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. आणि महाराष्ट्र कायद्यान्वये काळी जादू आणि दुष्कृत्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला.

‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,’ ; जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या ;

वेध माझा ऑनलाइन।
शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईत आंदोलन झाले. मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहचले. त्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांचा समावेश होता. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना खळबळजनक विधान केले. ते म्हणाले, ‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,’ जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्या वक्तव्याचा अर्थ काय, त्यांचा रोख कोणाकडे यासंदर्भात स्पष्टपणे काहीच जयंत पाटील भाषणात बोलले नाही. मात्र, यावेळी राजू शेट्टी यांनी आपले ऐकले असते तर ते खासदार राहिले असते, असे वक्तव्य केले.लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाहीत. त्यांनी माझे ऐकले असते तर ते खासदार राहिले असते. , असे  जयंत पाटील यांनी म्हटले.

पंकजा मुंडे प्रथमच सुरेश धस यांच्याविषयी जाहीरपणे बोलल्या, काय म्हणाल्या?

वेध माझा ऑनलाइन
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी पक्षातील नेतेच आमने-सामने आले आहेत. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. आता आमदार पंकजा मुंडे प्रथमच सुरेश धस यांच्याविषयी जाहीरपणे बोलल्या आहेत.

“वृत्तपत्रातील एका पत्रकाराने माझी मुलाखत घेतली. त्यांनी मला जे प्रश्न विचारले, त्यावर मी त्यांना सांगितलं, मी यावर उत्तर देणार नाही, कारण प्रश्नच मान्य नसल्याने उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही” असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज द्यावी, असं तुम्ही बोललात का? त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. “ते माझ नाव घेऊन जी चर्चा करतायत, त्यावर मी माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. ज्या विषयाशी कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं, टिप्पणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित नाही. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहूच नये, म्हणून मी चार-पाच महिने गप्प बसले, पण आता पक्षश्रेष्ठींना विनंती केलीय की, त्यांना समज द्यावी” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
विधान सभेला तुम्ही पक्षविरोधी भूमिका घेतली असा त्यांचा आरोप आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी प्रचार केलाय की नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा . या राज्यात अनेक लोक भाजपशी निगडीत होते, ते अपक्ष उभे राहिले. मंचावर जाऊन मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे” “त्यांनी असा आरोप करायला नको होता. प्रचार करताना त्यांनी माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे निकाल लागल्यावर असे आरोप करणं, जो व्यक्ती 75 हजार मतांनी निवडून आलाय, काम केलं नाही, तर कसं शक्य होईल याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं” असं पंकजा मुंडे म्हणाल्या

कराडात स्व चव्हाणसाहेबांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन ;

वेध माझा ऑनलाइन
दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती असून त्यांच्या समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी उपस्थित राहून अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजितदादा कराडला येणार असल्याने अनेक राजकीय घडामोडी घडणार हे निश्चित मानले जात होते. दरम्यान, समाधीस्थळी अजितदादांच्या गटासोबत खासदार शरद पवार गटातील नेते मंडळी देखील एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. खासदार शरद पवार यांच्या गटातील नेते माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी देखील उपस्थित राहत याठिकाणी अभिवादन केले. 

कराड येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजप आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज आदींनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उपस्थित राहून अभिवादन केले. 
यावेळी शरद पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील हे देखील उपस्थित दिसले


Thursday, March 6, 2025

शेवटच्या दिवशी एकूण 157 अर्ज दाखल ; सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक अपडेट ;

वेध माझा ऑनलाईन –  सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी  एकूण 157 अर्ज पत्र दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर 234 उमेदवारांचे एकूण 251 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.
गट /मतदार संघ निहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे- गट क्रमांक 1 – कराड मधून एकूण 14 उमेदवारांचे 18 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. गट क्रमांक 2- तळबीड 32 उमेदवारांचे 34 नामनिर्देशन पत्र दाखल, गट क्रमांक 3- उंब्रज 30 उमेदवारांचे 31 नामनिर्देशन पत्र दाखल, गट क्रमांक 4– कोपर्डे हवेली 46 उमेदवारांचे 49 नामनिर्देशन पत्र दाखल, गट क्रमांक 5- मसूर 40 उमेदवारांचे 42 नामनिर्देशन पत्र दाखल. गट क्रमांक 6- वाठार किरोली  28 उमेदवारांचे 33 नामनिर्देशन पत्र दाखल.अ. जा. /अ. ज. राखीव – 9 उमेदवारांचे 9 नामनिर्देशन पत्र दाखल. महिला राखीव – 14 उमेदवारांचे 14 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
इ.मा.व. राखीव मधून 11 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. वि. जा. /भ.ज./वि.मा.वर्ग राखीव मधून 10 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. त्यामुळे पाच दिवसांत 234 उमेदवारांचे 251 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक संजयकुमार सुद्रिक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक राहूल देशमुख, संजय जाधव, उपनिबंधक अपर्णा यादव काम पहात आहेत.


Tuesday, March 4, 2025

जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान ; नवी दिल्ली येथे झाला सन्मान ;

वेध माझा ऑनलाइन
धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन, उच्च दर्जाची साखर निर्मिती करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया या सर्वोच्च संस्थेकडून ‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘जयवंत शुगर्स’ला मिळालेला हा १७ वा पुरस्कार असून, या सन्मानामुळे जयवंत शुगर्सच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जयवंत शुगर्स’ने नेहमीच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करत, साखर उद्योग क्षेत्रात मोलाची कामगिरी बजाविली आहे. ‘जयवंत शुगर्स’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत साखरेच्या उत्पादनातील वाढ, अन्य उपपदार्थांची निर्मिती व वाढत्या साखर उताऱ्यात सातत्य राखून, साखर उद्योगात उत्तुंग भरारी घेत एक आदर्श निर्माण केला आहे. कारखान्याच्या या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेत, राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर युनिफॉर्म मेथड्स ऑफ शुगर अ‍ॅनालिसिस’च्यावतीने भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात, अध्यक्ष डॉ. मार्टिजन लीजडेकर्स, जनरल सेक्रेटरी डॉ. डायर्क मार्टिन व असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय अवस्थी यांच्या हस्ते जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासमवेत कारखान्याचे चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाला वसंतदादा शुगर्स इन्स्टिटयूटचे डायरेक्टर जनरल संभाजीराव कडू-पाटील, मार्क लॅबच्या डॉ. वसुधा केसकर, डॉ. एस. एस. निंबाळकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय किर्तीचे तंत्रज्ञ, तसेच भारतातील साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित होते. 

या पुरस्काराबद्दल कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले, मार्गदर्शक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, श्री. विनायक भोसले यांनी ‘जयवंत शुगर्स’चे सर्व सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार अशा सर्वांचे अभिनंदन केले आहे. 
 

Monday, March 3, 2025

अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा : राज्याच्या राजकारणात खळबळ

वेध माझा ऑनलाईन

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर धनंजय मुंडे यांनी आज (4 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळं राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या बातमीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्टी दिली आहे.
दरम्यान सोमवारी (3 मार्च) रात्री संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोंडींना वेग आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच 'देवगिरी' या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल दीड तास या सर्वांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले.

Monday, February 24, 2025

कराड पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारेंनी ठराविक ठेकेदारांना टेंडर भरता येईल अशी प्रक्रिया राबवली ; अनूनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या सचिन पाटील यांचा थेट आरोप ; म्हणाले...या भानगडीमागचे गौडबंगाल काय ? चौकशीची मागणी ;

वेध माझा ऑनलाईन।
निविदा प्रक्रिया सर्व कंत्राटदारासाठी खुली असून त्यात स्पर्धा होणे आवश्यक आहे. स्पर्धा झाल्यास चांगली कामे होऊन त्यातून नगरपालिकेचा फायदा होतो. असे असताना
माझी वसुंधरा अभियानांतर्गत कराड नगरपालिकेला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून सुमारे ५ कोटी रुपयांची झाडे लावण्याबाबतची इ नाविदा प्रक्रिया मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या नियंत्रणाखाली राबवण्यात येत आहे. ही निविदा 'लिमिटेड' केली आहे. त्यामुळे ठरावीक ठेकेदारांना निविदा भरता येत असून इतरांना डावलले जात आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी अनुनी भागीदार इनफा इन्फ्रास्ट्रक्चरचे सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

याबाबत नगरपालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून न्यायालयातही दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे मुख्याधिकारी खंदारे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

माजी वसुंधरा अभियानांतर्गत झाडे लावण्यासाठी सुमारे ५ कोटी रकमेच्या एकूण ५ निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या निविदा लिमिटेड करण्यात आल्या आहेत. याबाबत नगरपालिकेत माहिती विचारली असता सदर निविदा जाहीर झाल्याबद्दल ज्या कंत्राटदारास ई मेल आला आहे, तोच कंत्राटदार ही निविदा भरू शकतो. इतर कंत्राटदार ही निविदा भरू शकत नाहीत. ही निविदा सर्वांसाठी खुली ठेवलेली नाही. याबाबत मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना भेटून सदरची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावेळी त्यांनी अभियंता काकडे यांना या संदर्भात भेटण्यास सांगितले, तर काकडे यांनी या संदर्भात आम्ही आमच्या टेंडर क्लार्कला विचारून सांगतो, अशी उडवाउडवीची उत्तरे दिलेली आहेत.
 
सदर निविदा लिमिटेड करणे हे आदर्श ई-निविदा नियमावलीची पायमल्ली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धा होणार नाही. त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आमची आनुनी इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी गेली 17 वर्षे गव्हर्मेंट निविदा भरत असून विविध कामे करत आहे. नगरपालिकेच्या निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी पात्र आहे तरीसुद्धा आम्हाला यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत कामे करण्यासाठीची निविदा गेल्या वर्षी जानेवारी 2024 मध्येही सुरू करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही या निविदा भरल्या होत्या, मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही निविदा प्रक्रिया त्यावेळी रद्द केली होती. त्यानंतर वर्षांनी पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र ती  ठराविक कंत्राटदारांसाठीच करून इतरांना त्यात डावलण्यात आले आहे. या मागचे गौडबंगाल काय आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे, असे सचिन पाटील यावेळी म्हणाले 


Thursday, February 20, 2025

कराडमध्ये बंदिस्त गटर बांधण्यास प्राधान्य देणार; राजेंद्रसिंह यादव; शुक्रवार पेठेत सव्वा कोटींच्या रस्ते कामाचा शुभारंभ

वेध माझा ऑनलाइन
कराड शहरवासीयांना नागरी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. गटर्सबाबात सतत येणाऱ्या तक्रारी पाहता यापुढील काळात शहरात बंदिस्त गटर बांधण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून प्राप्त झालेल्या निधीतून व नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बंदिस्त गटर बांधण्यात येत असल्याची माहिती शिवसेना व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिली.

येथील शुक्रवार पेठेत विविध ठिकाणी सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये किंमतीच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी राजेंद्रसिंह यादव बोलत होते.

ते म्हणाले की, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या माध्यमातून कराडला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. यातून कराड फेज टूमधील‌ कामे सुरू आहेत. जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीतून विविध प्रभागात रस्ते, गटर्स व इतर कामे सुरू आहेत. रस्ते करत असताना त्या भागातील गटर्स बंदिस्त करण्यात येत आहेत. हे गटर्स ड्रेनेज पाईपला जोडण्यात येते आहेत. या संकल्पनेमुळे आरोग्य विभागावरील ताण कमी होण्यास मदत होत आहे.

यावेळी माजी सभापती स्मिता हुलवान, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, सुधीर एकांडे, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, विनोद भोसले, प्रीतम यादव, ओमकार मुळे, दिनेश यादव, ऋतुराज मोरे, रुपेश कुंभार, नुरुल मुल्ला, राहुल खराडे, दिनेश यादव, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र माने, प्रकाश पवार, शिवाजी माळी, अशोक पवार, विनायक चौकर, भैय्यासाहेब तवर, जयभारत, ओम व महारुद्र हनुमान मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

या विकास कामांत आझाद चौक ते सात शहीद चौक रस्ता बीएमबीसी करणे 28 लाख 32 हजार, मोरे घर ते माने घर रस्ता डांबरीकरण करणे 16 लाख 28 हजार, रंगार वेस महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरणाचे लोकार्पण 32 लाख 64 हजार, मारुती मंदिर ते जयभारत कमान रस्ता डांबरीकरण करणे 29 लाख 23 हजार, मडकी घर  ते गुरसाळे ज्वेलर्स रस्ता बीएमबीसी करणे 18 लाख 34 हजार आदी कामांचा समावेश आहे.

मोठं संकट धडकणार; आयमडीने दिला इशारा ; 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार ?काय आहे बातमी?


वेध माझा ऑनलाइन
पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाला आहे, हवामान विभागाकडून देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे.
 
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं असून, या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळामुळे उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
यासोबतच अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार वीजा आणि मेघगर्जनेची देखील शक्यता आहे, असंही आयएमडीनं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


पूर्वोत्तर भारतामधील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये पुढील सात दिवस मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
उत्तर भारतामध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मध्यम पावसासोबतच बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार पुढील काही दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव राहणार असून, काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढू शकतो.

स्पॅनिश शहरातच्या लास पाल्मासच्या सुमद्र किनाऱ्यावर आढळला दुर्लभ डुम्सडे मासा ; पसरली घबराट ; काय आहे बातमी...

वेध माझा ऑनलाइन
अटलांटिक महासागराच्या कॅनरी बेटावरील स्पॅनिश शहरातच्या लास पाल्मासच्या सुमद्र किनाऱ्यावर एक दुर्लभ मासा डुम्सडे आढळला आहे. या माशाला प्रलयाचा मासा म्हटले जाते. या माशाचे दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची नांदी म्हटले जाते. हा मासा अचानक समुद्रातून तडफडत किनाऱ्यावर आला आणि तो मृत पावला. ओअरफिश सहसा पाण्याच्या बाहेर दिसत नाही. अशी मान्यता आहे की हा मासा जेव्हा समुद्राच्या बाहेर पडतो तेव्हा काही तरी वाईट घडणार असल्याचे म्हटले जाते. या मासा दिसल्यानंतर भूकंप येत असल्याचा दावा देखील केला जात असतो, त्यामुळे घबराट पसरली आहे.

धनंजय मुंडेंना सलग 2 मिनिटं बोलणंही कठीण, मुंडेंना 'या' दुर्मिळ आजाराचं निदान ;

वेध माझा ऑनलाइन
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न-नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृती संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना एका दुर्मिळ आजाराचं निदान झालं असून त्या दुर्मिळ आजाराचं नाव बेल्स पाल्सी असे आहे. बेल्स पाल्सी या नावाच्या दुर्मिळ आजारामुळे धनंजय मुंडे यांना सलग दोन मिनिटंही व्यवस्थित बोलणं देखील कठीण झालं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर या आजाराचं निदान झाल्यामुळे त्यांच्यावर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे कॅबिनेट आणि जनता दरबार कार्यक्रमला अनुपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता या दुर्मिळ आजाराचं निदान झालं असून त्याच्यावर मुंडे उपचार घेत आहेत.

यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं असून त्यात त्यांनी असं म्हटलं की, माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी घोटाळ्याचे आरोप...

वेध माझा ऑनलाइन
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी घोटाळ्याचे आरोप केले. मंत्रिमंडळाच्या परवानगीविना मुंडेंकडून पैसे वर्ग करण्याचे आदेश दिले असं म्हणत २०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेत. तर अंजली दमानिया यांच्या आरोपांवर आता मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कॅबिनेटमध्ये कृषी विभागातील खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता होती, असं धनंजय मुंडे म्हणाले. अंजली दमानिया ज्याला पत्र म्हणतायत ते पत्र नसून टिपण आहे असून टिपणावर दिनांक टाकण्याचा प्रघात नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कृषी विभागाच्या खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता आहे. कॅबिनेट निर्णयाद्वारे मान्यता प्राप्त झालेली खरेदी अद्यापही झालेली नाही, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. दमानियांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे केलेले आरोप खोटे असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत ते आरोप फेटाळून लावले आहेत. तर अंजली दमानिया फक्त मिडीया ट्रायलसाठी आरोप करत आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. तर आम्ही खोटी कागदपत्र तयार केली असतील तर योग्य त्या मंचावर तक्रार करावी असं थेट आव्हान देखील धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलंय. बदनामीबद्दल अंजली दमानिया यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देखील मुंडे यांनी दिली.

Wednesday, February 19, 2025

शिवजयंतीचे औचित्य साधून कराड बॅडमिंटन क्लबच्या वतीने शालेय बॅडमिंटन स्पर्धां उत्साहात ;

वेध माझा ऑनलाइन
शिवजयंतीचे औचित्य साधून कराड बॅडमिंटन क्लबच्या वतीने शालेय बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा दिनांक 15 व 16 फेब्रुवारी रोजी  छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे नुकत्याच पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन श्री किशोर कुलकर्णी व राहुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले 
सदर स्पर्धसाठी 229 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती ही स्पर्धा 6 वयोगटात खेळवण्यात आली यामध्ये कराड तालुक्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला तसेच सर्व क्रीडा शिक्षकांनी यामध्ये मोलाची मदत केली 

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
    मुली--
1 ली ते 4 थी 
1 शरयू कदम
2 विभावरी कांबळे
3 मियारा मोरे व विभावरी गायकवाड 
5 वी ते 7 वी 
1 श्रद्धा इंगळे
2 अदिती आदमने
3 मानसी महाडिक व मिरा तोडकर.
8 वी ते 10वी 
1 देवांशी पाटील
2 आर्या देशमुख 
3 गायत्री कदम व अनन्या पाटील 
    
 मुले 
1 ली ते 4 थी 
1 विराज आरजूकडे
2 शौर्य पावसकर
3 गोयम मूथा व भार्गव पाटील
5 वी ते 7 वी 
1 कनक जोशी 
2 परम रसाळ 
3 शर्विल बानुगडे व चैत्र शहा 
8 वी ते 10वी 
1.राजवीरसिंह डूबल
2 अर्जुन जाधव
3 मनिष पाटील व पियूष   पाटील 
स्पर्धेचा बक्षीस समारंभ श्री अतुल पाटील (ॲथलेटिक्स राष्ट्रीय कोच)यांच्या हस्ते पार पडला बक्षीस समारंभास श्री किशोर कुलकर्णी,राहुल कुलकर्णी, निलेश फणसळकर,ओंकार पालकर, अतुल पाटील तुषार गद्रे प्रकाश गद्रे आदी उपस्थित होते..

Monday, February 17, 2025

विद्यार्थ्यांनो पुस्तकांशी मैत्री करा ; कल्याण कुलकर्णी सरांचा विद्यार्थ्यांना सल्ला ;

वेध माझा ऑनलाइन।
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची दिशा ठरवली पाहिजे. मी कोण होणार? हे आत्ताच ठरवा. जर भविष्याचा वेध घेतला तरच जीवनात यश मिळू शकते. त्यासाठी आपल्या जीवनात मोबाईलचा वापर कमी करा,पुस्तकांशी मैत्री करा असे प्रतिपादन हौसाही विद्यालयाचे शिक्षक श्री कुलकर्णी यांनी केले 
ते दिगंबर काशिनाथ पालकर माध्यमिक विद्यालय येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या "सेंड ऑफ" कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते

ते म्हणाले ज्या शाळेने चांगले संस्कार, जीवन घडवण्याची प्रेरणा आपणास दिली त्या शाळेला कदापिही विसरू नका भारतीय संस्कृती ही आदर्श संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये आई, वडील यांच्यानंतर शिक्षकांचे महत्त्व आहे, शिक्षक हा तुमचे जीवन घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर रहा त्यामुळे आपण आपले खेळ संस्कृती, आपली नाती विसरत चाललो आहोत. त्यामुळे वाचाल तर वाचाल या संकल्पनेप्रमाणे पुस्तकांशी दोस्ती करा. असेही ते म्हणाले

कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नीलम मिश्रा यांची फेरनिवड ;

वेध माझा ऑनलाईन 
कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नीलम मिश्रा यांची फेरनिवड करण्यात आली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी दिली. डॉ. मिश्रा यांची सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

कृष्णा विद्यापीठाने कुलगुरु निवडीसाठी रितसर शोध समिती गठीत केली होती. नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर ॲन्ड बिलीरी सायन्सेसचे कुलगुरू डॉ. दीपक टेम्पे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या या समितीमध्ये, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी सदस्य प्रा. ई. सुरेश कुमार आणि वर्धा येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थेचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांचा समावेश होता. 

या शोध समितीने ३ नावे निश्चित करुन, ती कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे सोपविली. त्यातून कुलपती डॉ. भोसले यांनी डॉ. नीलम मिश्रा यांच्या नावाची निवड करत, त्यांची कुलगुरुपदी फेरनियुक्ती केली. २८ जानेवारीला त्यांना नियुक्तीचा आदेश देण्यात आला 

लाडकी बहीण योजना ; महत्त्वाची अट टाकल्याने बहुतांश अर्ज बाद होणार ;काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या उधळपट्टीला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकार योजनेसाठीच्या निकषांची कठोर अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे सध्या लाभ घेत असलेल्या अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत.

विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या आणि ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की नाही, हे शोधून काढण्यासाठी प्राप्तीकर विभागाची मदत घेतली जाणार आहे.
विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या आणि ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे. महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे की नाही, हे शोधून काढण्यासाठी प्राप्तीकर विभागाची मदत घेतली जाणार आहे.
आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी द्यावे लागणार आहेत. तसेच हयातीचा दाखला म्हणजे लाईफ सर्टिफिकेटही महिलांना जमा करावे लागणार आहे. यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात पाठवले जातील.

लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील तब्बल 2 कोटी 63 लाख लाडक्या बहि‍णींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या होत्या. अजूनही 11 लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे. ज्यांचे आधार कार्ड कनेक्ट होणार नाही, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत.
राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवले होते. यापैकी अनेक महिलांनी सरकारचे नियम कठोर झाल्यानंतर स्वत:हूनच आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, असे अर्ज केले होते.
संजय गांधी निराधार योजना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांचाही लाभ घेत असलेल्या 2.3 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते.
याशिवाय, सरकारच्या विविध योजनांमधून 1500 किंवा त्यापेक्षा अधिक आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांना आता लाडक्या बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील तब्बल साडेसहा लाख लाभार्थी हे नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजना, या दोन्ही योजनांचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. नमो शेतकरी योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना 1000 रुपये मिळतात. त्यामुळे आता संबंधित लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचे केवळ 500 रुपयेच देण्यात येतील.
लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आधीच्या महिन्यांचा म्हणजे जुलैपासूनच लाभ न देता अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील महिन्यापासून पैसे मिळतील.



सुरूवात तुम्ही केली पण नियतीने तुमचा शेवट केला’, मंत्री जयकुमार गोरे यांचा रामराजेंना टोला ;

वेध माझा ऑनलाइन।
सुरूवात तुम्ही केली पण नियतीने तुमचा शेवट केला’, असं वक्तव्य करत भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नाव न घेता माजी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. रामराजे नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय संबंध पूर्ण सातारा जिल्ह्याला सर्वश्रूत आहेत. सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करणं किंवा टीका करण्याची एकही संधी दोघंही सोडत नाही. फलटणमधून रामराजेंच्या उमेदवाराचा विधानसभेला पराभव असून त्याचा संदर्भ घेऊन मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकरांवर चांगलाच निशाणा साधला. ‘मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी सातत्याने केला, आज तेच स्वतः संपलेले आहेत. गेली २० वर्षे ज्यांनी मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना नियतीने चोख उत्तर दिलेले आहे’, असं वक्तव्य जयकुमार गोरेंनी करत परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष घणाघात केला. पुढे ते असेही म्हणाले, अजितदादांनी उमेदवारी जाहीर केली ती उमेदवारी नाकारून दुसरीकडे उमेदवारी घेतली गेली. सत्तेशिवाय माणसं जगू शकत नाहीत, असं म्हणत जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांना खोचक टोला लगावला आहे.

दबाव टाकून भाजपवाल्यांना कर्जे द्यायला लावली,स्वत:ची जागा भाड्याने देऊन लाखो कमावले? 'त्या' आरोपांवर राम कदमांचं स्पष्टीकरण

वेध माझा ऑनलाइन।
मुंबईतील अनेक सामान्य माणसांचे पैसे अडकून पडलेल्या न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात भाजप आमदार राम कदम यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आला होता. राम कदम यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजर हितेश मेहता याच्यावर दबाव टाकून त्याला नियमबाह्य पद्धतीने कर्ज द्यायला भाग पाडले. ही कर्जे भाजपशी संबंधित असलेल्या लोकांना देण्यात आली. या कर्जांची कधीही परतफेड करण्यात आली नाही. तसेच राम कदम यांनी न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखांसाठी स्वत:च्या मालकीचे चेंबूर, घाटकोपर आणि मुंबई उपनगरातील गाळे अव्वाच्या सव्वा दराने भाड्याने दिले. या सगळ्यामुळे बँक डबघाईला आली, असा आरोप झाला होता. या सगळ्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना आमदार राम कदम यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

माझ्याबाबत वक्तव्य करताना जबाबदारीने बोला, अन्यथा कारवाईला तयार राहा. न्यू इंडिया सहकारी बँकेमध्ये अनेक खातेदारांचे पैसे अडकले आहेत. या बँकेचा मी सुद्धा एक खातेदार असून त्यामुळे माझे सुद्धा पैसे याच बँकेत अडकले आहेत. माझ्यासह माझ्या कुटुंबातीलही काही जणांचे खाते याच बँकेत आहे. त्यांचेही पैसे बँकेत अडकले आहेत. या परिस्थितीत, मी या प्रकरणातील पीडित व्यक्ती आहे, याची सर्व माध्यमांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणामध्ये, माझ्यासह प्रत्येक खातेदाराला त्यांनी बँकेत ठेवलेला पैसा परत मिळावा यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्नशील असल्याचे राम कदम यांनी सांगितले.कोणतीही सत्यता पडताळून न पाहता माझ्याविरोधात काहीजणांनी विनाकारण बडबड सुरू केली आहे. यावर, आधारित बातम्या सुद्धा प्रसिद्ध होतील असे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की, या घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही आणि उलट फसलेल्या हजारो लोकांना मदत करण्याची माझी भूमिका नेहमी आहे आणि भविष्यातही राहील. तरीसुद्धा विनाकारण या घोटाळ्याशी माझे नाव जोडले गेल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरणार नाही.  न्यू इंडिया सहकारी बँकेच्या घोटाळ्याशी माझे नाव जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात मी कायदेशीर कारवाई सुरू करत आहे. तरी कृपया " असत्य "  बातम्या  आणि तशी वक्तव्य सुद्धा करताना वरील बाब लक्षात असू द्यावी. माझी सरकारकडे आग्रही मागणी आहे की  सर्व पीडितांना न्याय मिळावा आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक पेक्षा अति कडक कारवाई व्हावी, असे राम कदम यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले आहे.

नवी मुंबईच्या भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विष प्यायलं, वाल्मिक कराडचं नाव घेत काय म्हणाला...वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन
नवी मुंबईतील जिल्ह्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.  माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या  माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच विषप्राशन केले. भरत जाधव असे या नगरसेवकाचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. भरत जाधव यांनी विष पिण्याच्या आधी आपली फसवणूक झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, नेमक्या कोणत्या प्रकरणामुळे नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप समजू शकलेले नाही. विष प्यायल्यानंतर भरत जाधव यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तातडीने नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

भरत जाधव यांनी काय म्हटलंय?

मी आज प्रचंड मानसिक तणावात हे पाऊल उचलत आहे. कारण समाजामध्ये वाल्मिक कराडच्या सारखी प्रवृत्ती इतकी वाढत चालली आहे की, तुम्ही प्रामाणिकपणे कामच करु शकत नाही. मी प्रामाणिकपणे व्यवसाय करत होतो, त्यामध्ये मला त्रास झाला. 25 वर्षांच्या राजकारणात इतर राजकारण्यांप्रमाणे मी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले, असे कोणीही सांगून दाखवावे. चार-पाच वर्षांपूर्वी कर्जत-जामखेड तालुक्यात बिल्डींगचं काम सुरु केलं. रमेश आसबे, युनुस सय्यद, बेबीचंद धनावडे आणि मी. रमेश आसबेचं आणि सचिन घायवळ व निलेश घायवळचा काय वाद झाला मला माहिती नाही. मात्र, अडीच-तीन वर्षे  त्यांनी दहशतीच्या जोरावर बिल्डींगचं काम बंद पाडले आहे.  निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांच्या दोन-तीन गाड्या साईटवर येतात, 30-40 पोरं उतरतात. त्यामुळे या बिल्डींगचं एकही बुकिंग होत नाही. आज जवळपास तीन-चार कोटी टाकून, बँकेचे कर्ज घेऊन मी नुकसान सहन करत आहेत. सहन होत नाही, अशी ही गोष्ट झाली आहे. बँकेचे कर्ज आणि व्याज हे सुरु आहे.  जामखेडच्या भूम तालुक्यात एक प्लांट आहे. हे लोक आपल्याला त्रास देतील, हे मला माहिती आहे, म्हणून मी तिकडे काम सुरु केले. एका कामात बीडचे मुन्नाभाई आणि संदीप आगमने यांना पार्टनर म्हणून घेतलं, त्यांनी 90 लाख रुपये लावले आणि दहा-बारा महिन्यांत 60 लाख रुपये नफा घेतला. पाच-दहा लाखांवरुन भांडणं, मारामाऱ्या केल्या, माझ्या दुसऱ्या पार्टनरला मारहाण केली. मी म्हणालो, देऊन टाका, भांडण नको. त्यानंतर जीएसीटीची बिलं देताना त्यांनी बोगस बिलं दिली. त्यामुळे आमच्या कंपनीला त्रास सहन करावा लागत आहे, आमची काहीही चूक नसताना.असे जाधव यांनी म्हटले आहे

Monday, February 10, 2025

आमदार श्रीकांत शिंदेंच्या डिनरला जाणार?;

वेध माझा ऑनलाइन 
महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित आमदारांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज (10 फेब्रुवारी) रात्री घरी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत यंदा 78 आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 6 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नवोदित आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदारांसह महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत शिंदेंनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार का?, अशी चर्चा रंगली आहे. दिल्लीमध्ये विधानसभा सचिवांकडून विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आली आहे. विधीमंडळ सचिवालयाने आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी 78 आमदार दिल्लीत आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीतील घरी महाराष्ट्राच्या नवोदित आमदारांना घरी जेवणाचे निमंत्रण दिल्याचं सांगितलं जात आहे. 

Saturday, February 8, 2025

रस्ता सुरक्षा मॅरेथॉन फलकाचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण ;

वेध माझा ऑनलाईन।
राज्याचे कॉमन मॅन उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते व गुरूवर्य एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे रस्ता सुरक्षा मॅरेथॉनचे आयोजन आज रविवारी ९ रोजी करण्यात आले आहे. या मॅरेथॉनच्या फलकाचे अनावरण ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. उद्योजक सचिन पाटील यांची उपस्थिती होती. एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेची माहिती घेऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कराड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक रणजीतनाना पाटील मित्र परिवार व कराड आरटीओ विभाग यांच्या वतीने रस्ता सुरक्षा मॅरेथॉनचे आयोजन आज करण्यात आले. ही मॅरेथॉन निःशुल्क असून नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारअखेर सुमारे 3 हजार जणांनी स्पर्धेसाठी नोंदणी केल्याचे रणजित पाटील म्हणाले. 
आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही दिल्या शुभेच्छा
आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही मॅरेथॉन तयारीचा आढावा रणजीतनाना पाटील यांच्याकडून घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा मॅरेथॉन मध्ये स्पर्धकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. भोसले यांनी केले. मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजन कराडमध्ये करण्याचा प्रयत्न तसेच कराडला हेल्थ हब बनवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले.

Thursday, January 16, 2025

चोर लिफ्ट ने सैफच्या घरात आला; मात्र...लिफ्ट चा एक्सेस फक्त घरच्या लोकांना माहीत होता, मग चोराला अक्सीस कसा मिळाला; पोलिसांचा त्या ड्रीष्टीने तपास सुरू :

वेध माझा ऑनलाइन
अभिनेता सैफ अली खानच्या घरात आलेला चोर हा इमारतीतील प्रायव्हेट लिफ्टच्या माध्यमातून आत आला असल्याचं समोर आलं आहे. प्रायव्हेट लिफ्टचा अॅक्सेस हा फक्त सैफच्या घरातील व्यक्तींनाच माहीत आहे. अॅक्सेसशिवाय ही लिफ्ट ऑपरेट होत नाही. त्यामुळे घरातीलच व्यक्तीने हा हल्ला केला की काय असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. सैफ अली खानच्या घरी चोराने प्रवेश केला आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली असून त्यांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. 

सैफ अली खानच्या इमारतीमध्ये दोन लिफ्ट असल्याची माहिती आहे. एक कॉमन लिफ्ट आहे तर एक सैफच्या परिवारासाठीची प्रायव्हेट लिफ्ट आहे. प्रायव्हेट लिफ्टमधून थेट सैफच्या घरामध्ये प्रवेश मिळतो.  पण या प्रायव्हेट लिफ्टमध्ये प्रवेश करण्यासाठी अॅक्सेस कार्डची गरज असते. त्याशिवाय ही लिफ्ट ऑपरेट होत नाही. 
चोराने या प्रायव्हेट लिफ्टच्या माध्यमातून सैफच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरीनीशी त्याचा सामना झाला. या प्रायव्हेट लिफ्टचा अॅक्सेस चोराला कसा मिळाला हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. त्यामुळे चोराला घरातीलच कोणत्या व्यक्तीने मदत केली की काय असाही संशय व्यक्त केला जात आहे.

Wednesday, January 15, 2025

वाल्मिक कराड चे सिमकार्ड विदेशात रजिस्टर !धक्कादायक माहिती आली समोर;

वेध माझा ऑनलाइन
सुदर्शन घुले व त्याचे साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांच खून केला आहे. याकाळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मीक कराड यांचे घटनेच्या अगोदर, नंतर का घटनेदरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआरवरुन दिसत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचे सीडीआरवरुन दिसून येत आहे, असे मुद्दे एसआयटीने न्यायालयात मांडले. दरम्यान, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

 सिमकार्ड अमेरिकेत रजिस्टर झाले!...

वाल्मिक कराडचे जे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यामधील काही सिमकार्ड हे अमेरिकेत रजिस्टर झाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या विशिष्ट काळामध्ये याच सिमकार्डवरुन काही लोकांना फोन केले गेले, असा एसआयटीला संशय आहे. त्यामुळे हे फोन का केले गेले, कोणती कारणं होती, याबाबत एसआयटीला तपास करायचा आहे.

सुप्रिया सुळे यांचा फोन,...म्हणाल्या । बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता...काळजी घ्या. मी काही मदत करु शकत असेन तर मला सांगा,

वेध माझा ऑनलाइन
सैफ अली खानवर रात्री अडीच वाजता हल्ला झाल्याचा प्रकार घडला या घटनेची माहिती समोर आली तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात होत्या. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सैफच्या कुटुंबीयांना फोन केला.
सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले की, बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता. काय होतंय, ते मला सांगत राहा. काळजी घ्या. मी काही मदत करु शकत असेन तर मला सांगा, असे सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले. हा फोन ठेवल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी याबाबत फार बोलण्यास नकार दिला. मात्र, सैफ अली खानवरील हल्ला धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले

सैफ अली खान च्या मानेवर 10 सेमी ची जखम ;

वेध माझा ऑनलाइन
वांद्रे येथील राहत्या घरात अभिनेता सैफ आली खानवर काल रात्री मध्यरात्री चाकू हल्ला झाला. अज्ञाता व्यक्तीनं चाकू हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं. त्यानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरीच्या उद्देशानं घरात शिरलेल्या व्यक्तीनं तब्बल दोन ते तीनवेळा सैफवर वार केल्याची माहिती मिळत आहे. चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या व्यक्तीनं दोन ते तीनवेळा वार केल्याची माहिती मिळत आहे. 

सैफ अली खान आणि करिना कपूर वांद्रे येथे राहतात. याच घरात रात्री अडीचच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती घुसली. धक्कादायक बाब म्हणजे, सैफची लहान मुलं ज्या रुममध्ये झोपलेली, त्याच रुमच्या बाल्कनीमधून त्या अज्ञात व्यक्तीनं सैफच्या रुममध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. सैफच्या घरात काम करणाऱ्यांनी त्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर घरातील सर्वांना जाग आली. सैफ अली खान तातडीनं उठून रुममधून बाहेर येत होता. त्यावेळी घरात घुसलेली व्यक्ती आणि सैफ आमने-सामने आले. त्यानंतर त्या व्यक्तीनं हातातल्या धारदार शस्त्रानं सैफवर वार केला. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. सैफच्या मानेवर तब्बल 10 सेमीची जखम झाली आहे. सैफ अली खानच्या पाठीवरही घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीनं वार केले. सैफच्या पाठीत त्या व्यक्तीनं धारदार शस्त्र खुपसलं. सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शस्त्रक्रिया करुन त्याच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यात आलं. पाठीत घुपसलेलं शस्त्र धारदार आणि टोकेरी होतं. सैफच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

सैफ अली खानवर शस्त्राने हल्ला ; पोलिसांना महिलेवर संशय ; कोण आहे ही महिला ?

वेध माझा ऑनलाइन
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री 2.30 (16 डिसेंबर) एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हा प्राणघातक हल्ला केला. अज्ञाताच्या चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा वार झाला. तसेच सैफ अली खानचा हात आणि पाठीवरही जखम झाली. या हल्ल्यात सैफ अली खानच्या पाठीत शस्त्र रुतलेलं होतं. रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी लिलावती रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लिलावती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. 

सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात टीम कामाला लागली आहे. क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस तपास करत आहे. याचदरम्यान पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सैफ अली खानच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे. घराकाम करणाऱ्या एका महिलेच्या भूमिकेबद्दल पोलिसांना संशय आहे.  घरकाम करणाऱ्या महिलेच्या वैद्यकीय उपचारानंतर जबाब नोंदवला जाईल. याशिवाय सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांमधील 3 जणांचे जबाब नोंदवले जात आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार महिला कर्मचाऱ्याला भेटण्यास अज्ञात व्यक्ती घरात आल्याचं सांगण्यात येत आहे. सैफ अली खानच्या घरात असणाऱ्या महिला मदतनीसानेच आरोपीला घरात एन्ट्री दिली. तसेच या अज्ञात व्यक्तीने सदर महिला मदतनीसावर हल्ला केला. या वादात सैफ अली खान पडल्याने अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला.

खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली; एसआयटीचा न्यायालयात दावा ; बातमी;

वेध माझा ऑनलाइन
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशामुळे झाली, या हत्येमागे कोणाचा हात आहे, गेल्या महिनाभरापासून राज्यातील जनेतला हा प्रश्न पडला आहे. मात्र, या घटनेचा तपास ज्या सीआयडीकडे देण्यात आला आहे, त्या एसआयटीने आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केले असता महत्त्वाची माहिती दिली. खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगत खंडणीप्रकरणामुळेच ही हत्या झाल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. अवादा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या खंडणीला अडथळा ठरत असल्यानेच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने न्यायालयात माहिती देताना सांगितले. त्यामुळे, याप्रकरणाच्या आणखी तपासासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याचं सांगत आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. त्यानुसार, वाल्मिक कराडला 7 दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीने बीड न्यायालयात दिलेल्या माहितीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. वारंवार अवादा कंपनीकडे आरोपींकडून खंडणी मागण्यात येत होते, पण कंपनीने दिली नाही. त्यावेळी, संतोष देशमुख हेच खंडणीसाठी अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं एसआयटीने न्यायालयात म्हटलं आहे. एसआयटीने आज न्यायालयात 7 दावे केले आहेत. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला आहे.

धंनजय मुंडे अचानक मुंबईहून परळीला का रवाना झाले ;मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार मागणी;

वेध माझा ऑनलाइन
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला चांगलीच गती आली आहे. देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयाखाली वाल्मिक कराड यांच्यावर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाल्मिक कराड हे राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. 

वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर मंगळवार संध्याकाळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. अवघ्या 10 मिनिटांची चर्चा झाल्यानंतर धनंजय मुंडे या बैठकीतून बाहेर पडले. यानंतर धनंजय मुंडे थेट परळीच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे इतका महत्त्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे परळीला का गेले, यावरुन आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

वाल्मिक कराडने रुग्णालयाबाहेर येताच रोहित कुठंय... असा प्रश्न केला ; हा रोहित आहेतरी कोण?

वेध माझा ऑनलाइन
खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराड यांना मंगळवारी मोठा झटका बसला. केज सत्र न्यायालयाने काल (14 जाने.) वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून वाल्मिक कराडला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात  आले. 

न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी वाल्मिक कराडची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली. त्यामुळे रुग्णालयात त्याची ईसीजी देखील करण्यात आली. रुग्णालयातील सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर वाल्मिक कराडला पुन्हा बीड कारागृहात नेण्यात आले. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर बाहेर पोलिसांची व्हॅन उभी होती. तसेच पोलीस आणि माध्यमांचा गराडा देखील मोठ्या प्रमाणात रुग्णालयाबाहेर होता. यावेळी वाल्मिक कराड रुग्णालयाबाहेर येताच रोहित कुठंय?, असा प्रश्न केला. साधारण दोन ते तीन वेळा रोहित कुठेय, असं वाल्मिक कराडने विचारले. त्यामुळे वाल्मिक कराड विचारत असलेला रोहित नेमका कोण आहे?, याची चर्चा सध्या रंगली आहे.

वाल्मिक कराडला कोर्टातून पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना कोर्टाबाहेर राडा ; वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाइन।
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार, बीड सत्र न्यायलायाने मकोका गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर, आरोपी कराडला कोर्टातून पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना कोर्टाबाहेर चांगलाच राडा पाहायला मिळाला. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ अनेकांनी घोषणाबाजी केली, तर काहींनी वाल्मिक कराडला विरोधाही घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या अॅड. हेमा पिंपळे यांनी घोषणाबाजी करत गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात यावं, असं म्हटलं. तर, काही वकिलांनीही संविधानाचा दाखला देत वाल्मिक कराडवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हटलंय. त्यामुळे, बीडच्या कोर्टाबाहेरच राडा पाहायला मिळाला. 
बीड सत्र न्यायालयाने वाल्किम कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली असून 22 जानेवारीपर्यंत पीसीआर देण्यात आली आहे. न्यायालयातील सुनावणीनंतर एसआयटी पथकाने वाल्मिक कराडला न्यायालयातून बाहेर आणल्यानंतर कोर्टाबाहेर राडा झाल्याचं पाहायला मिळालं. कोर्टाबाहेर वकिलांचेच दोन गट दिसून आले, त्यापैकी एका महिला वकिलाने वाल्मिक कराडवर आरोप करत फाशीची शिक्षा द्या म्हणत घोषणाबाजी केली. तर, एका वकिलाने वाल्मिक कराड यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचं म्हणत त्यांचे समर्थन केले, तसेच आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचं म्हटलं. त्यानंतर, पोलीस व इतर सुरक्षा रक्षकांनी संबंधित आंदोलकांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं.

लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्‍यक्ष, उपाध्‍यक्षांनी तडकाफडकी दिले राजीनामे; काय आहे बातमी ?

 वेध माझा ऑनलाइन
लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीमा वैभव खरात यांनी आज ऐन संक्रांतीच्या सणादिवशीच नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे दिला, तर उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांनीही आज आपल्या पदाचा राजीनामा नगराध्यक्षा सीमा खरात यांच्याकडे दिल्याने लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले आहे. त्यामुळे आता कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे
लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जाती सर्वसाधारण जागेसाठी राखीव झाल्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी सुरुवातीला प्रभाग सातमधून विजयी झालेल्या मधुमती गालिंदे-पलंगे यांना नगराध्यक्षपदाची, तर प्रभाग नऊमधून विजयी झालेले शिवाजीराव शेळके- पाटील यांना उपाध्‍यक्षपदाची संधी दिली होती. त्याच वेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत सव्वा सव्वा वर्षाच्या फॉर्म्युल्याचा ठराव करण्यात आला होता.
त्या ठरावानुसार नगराध्यक्षा सीमा खरात यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे, तर उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर यांनी नगराध्यक्षा सीमा खरात यांच्याकडे आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या वेळी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर व शिवाजीराव शेळके- पाटील, नगरसेवक सचिन शेळके, गणिभाई कच्छी, सागर शेळके, भरत बोडरे, तसेच अॅड. गणेश शेळके, ॲड. गजेंद्र मुसळे, सागर गालिंदे, असगरभाई इनामदार आदी उपस्थित होते.
लोणंद नगरपंचायतीच्या १७ पैकी १० जागा जिंकून राष्ट्रवादी कॉँग्रेसने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली, तर काँग्रेस व भाजपला प्रत्येकी तीन तर एका जागेवर अपक्ष विजयी झाले होते. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या मधुमती गालिंदे, शिवाजीराव शेळके- पाटील यांना, त्‍यानंतर सीमा खरात व रवींद्र क्षीरसागर यांना संधी मिळाली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान बरीच राजकीय समीकरणे बदलली आहेत.
काँग्रेसच्या दीपाली नीलेश शेळके व प्रवीण व्हावळ यांनीही महाविकास आघाडीला तिलांजली देत महायुतीचे काम पसंत केले, तर भाजपच्या दीपाली संदीप शेळके, तृप्ती घाडगे व ज्योती डोणीकर यांनी जागेवरच ठाम राहून महायुतीचा धर्म पाळत पक्षादेशानुसार आमदार मकरंद पाटील यांचेच काम केले, तसेच अपक्ष नगरसेविका राजश्री शेळके यांनीही आमदार पाटील यांचेच काम केल्‍याने काँग्रेसच्या आसिया बागवान या एकमेव एक नगरसेविका विरोधी बाकावर राहिल्या आहेत.

वाल्मिक कराडला धक्का ; वाईन शॉप च लायसन रद्द ;

वेध माझा ऑनलाइन
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणावरुन वादंग उठल्यानतंर खंडणीप्रकरणात आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर सीआयडीच्या विशेष पथकाकडे त्याचा ताबा देण्यात आला असून कोणालाही दयामाया दाखवू नका, याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले . त्यानंतर, आरोपी वाल्मिक करडावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढत असून वाल्मिकला 24 तासांत तिसरा धक्का देण्यात आलाय. वाल्मिक कराडच्या केजमधील वाईन शॉपसाठी देण्यात आलेलं ना हरकत प्रमाणपत्र आता रद्द करण्यात आलंय. दरम्यान, खंडणीप्रकरणी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आरोपी वाल्मिकला सीआयडी पोलिसांना मकोका अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक केली आहे.

एसआयटीने वाल्मिक कराडच्या गुन्ह्याचा पाढा वाचला ; वाल्मिक अडचणीत ;

वेध माझा ऑनलाइन
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका लागलेल्या वाल्मिक कराड याला बुधवारी बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाचे अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम मांडला.


9 डिसेंबरला केज तालुक्यात संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. 3 ते 3.15 दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण झाले होते. त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले होते, अशी माहिती एसआयटी अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टाला दिली. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ मिळतीजुळती असल्याचेही अनिल गुजर यांनी सांगितले. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड  या तिघांमध्ये 9 डिसेंबरला काय तपास झाला, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याची 10 दिवसांसाठी पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एसआयटीने केली आहे. यावर आता न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 गुन्ह्यांची यादी न्यायालयात सादर
वाल्मिक कराडवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची लिस्ट कोर्टात सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आली. इतर आरोपींविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती दिली. MCOCA कसा लावण्यात आला याचा संदर्भ एसआयटीकडून देण्यात आला. इतर आरोपीविरोधही दाखल गुन्ह्यांची माहिती एसआयटीने न्यायालयात दिली. वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशीही संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा धक्कादायक दावा देखील एसआयटीने केला आहे. वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीने 9 ते 10 ग्राउंडस मांडली. दरम्यान कोर्टातला युक्तिवाद हा ऑन कॅमेरा सुरु आहे. कोर्टरूममध्ये केवळ दोन्ही पक्षाचे वकील, आरोपी, तपासअधिकारी हेच उपस्थित आहेत.

अल्पवयीन मुलांना गाडी घेऊन देऊ नका ; पालकांवर गुन्हा दाखल होतो ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
१६ वर्षांच्या आतील मुला-मुलींना वाहन चालवण्यास देऊ नये याची कायद्यात तरतूद आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार १८ वर्षांच्या आतील मुला-मुलींना वाहन चालवता येत नाही; परंतु बरेच पालक हौसेखातर मुलांच्या हातात गाडीची चावी देऊन कौतुक केले जात आहे. अशा कौतुक करत अल्पवयीन मुलांना दुचाकी चारचाकी गाडी चालवण्यास देणाऱ्या पालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या वर्षभरात सातारा जिल्ह्यामध्ये चार पालकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे

Tuesday, January 14, 2025

कराडच्या माजी नगराध्यक्षा उमा हिंगमीरे यांच्या घरात चोरी ; तक्रार दाखल

वेध माझा ऑनलाइन
कराड येथील माजी नगराध्यक्षांच्या घरात भर दुपारी कुलूप उघडून चोरट्यांनी कपाटातील सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केले. मार्केट यार्ड परिसरात माजी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे यांच्या घरात सोमवारी दुपारी चोरी झालेली घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. उदय हिंगमिरे यांनी याबाबत शहर पोलिसांत फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  सोमवारी सकाळी श्री. हिंगमिरे त्यांच्या ऑफिसला गेले. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे याही नोकरीच्या ठिकाणी गेल्या. घराबाहेर जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास उमा हिंगमिरे घरी परतल्या. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास उदय हिंगमिरे घरी आले. त्यानंतर रात्री जेवण करून झोपी गेले मंगळवारी सकाळी उमा हिंगमिरे यांना संक्रांतीनिमित्त परिधान करण्यासाठी दागिने हवे होते, त्यामुळे त्यांनी घरातील कपाट उघडून पाहिले असता, कपाटात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती पती उदय हिंगमिरे यांना दिली. दोघांनी कपाटात पाहिले असता, कपाटातील ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे साडेपाच तोळे वजनाचे मंगळसूत्र, १ लाख २० हजार रुपये किमतीचे २ तोळ्याचे नेकलेस आणि ६० हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाच्या बांगड्या चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Monday, January 13, 2025

गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या नेतृत्वाखाली कराड शहरातील विविध ठिकाणच्या विकासकामांचा शुभारंभ ;

वेध माझा ऑनलाइन
कराड नगरपरिषदेचे मा.उपनगराध्यक्ष गटनेते व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य मा.राजेंद्रसिह यादव यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन कराड शहरातील विविध विकास कामांसाठी मंजुर झालेल्या निधीमधुन कराड शहरातील विविध ठिकाणच्या विकासकामांचा शुभारंभ आज मा.राजेंद्रसिह यादव यांच्या नेतृत्वाखाली धुमधडाक्यात संपन्न झाला.

कराड शहरातील शनिवार पेठ चिगळे सर्जिकल ते श्रीराम हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण,डाॅ.सुहास पाटील ते यश एम्पायर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण,महाराष्र्ट ट्रान्सपोर्ट ते शिवाप्पा खांडेकर घरापर्यंत रस्ता काॅक्रिटीकरण,वाखाण भागातील मुख्य रस्त्यापासुन दक्षिणेकडे महापुरे यांच्या घरापर्यत काॅक्रिटीकरण या कामांचा शुभारंभ करण्यात आला यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्या-त्या परिसरातील ज्येष्ठ नागरीकांच्या हस्ते ही कामे सुरु करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्मिता हूलवान,निशांत ढेकळे,ओमकार मुळे,किरण पाटील, गजेंद्र कांबळे,विनोद भोसले,विजयसिंह यादव भाऊ सुधीर एकांडेकाका,नुरुल मुल्ला,राहुल खराडे,सचिन पाटील,शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र माने तसेच येथील स्थानिक रहिवासी उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष शिवसेना नेते मा श्री राजेंद्रसिंह  यादव (बाबा) यांच्या पाठपुराव्यामुळे कराड शहरात होत असलेल्या विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजुर करुन आणुन विकास कामांचा शुभारंभही होत आहे कराड शहरातील नागरिक यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा व यशवंत विकास आघाडीला धन्यवाद देत आहेत.

Saturday, January 11, 2025

कराड तालुक्यातील तासवडे येथील एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट: परप्रांतीय मजुराचा मृत्यू;

वेध माझा ऑनलाईन।
केमिकलचे बॅरेल कापत असताना भीषण स्फोट होऊन एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील तासवडे येथील एमआयडीसीमध्ये घडली आहे. यामध्ये एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. स्फोटामुळे तासवडे एमआयडीसीचा परिसर हादरून गेला.

बिकेश कुमार रंजन (वय 25, मूळ रा. बिहार) असे या कामगाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून तळबीड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तासवडे एमआयडीसी मध्ये सौरभ श्रीकांत कुलकर्णी यांची डिप्स बायोटिक नावाची जनावरांचे औषध बनवणारी कंपनी आहे.
या कंपनीला लागूनच त्यांची दुसरी कंपनी असून त्या ठिकाणी औषधाच्या गोळ्या ठेवण्यासाठी प्लास्टिक बरण्या तयार केल्या जात होत्या. या कंपनीच्या लोखंडी गेटचे काम सातारा येथील राणा यादव या ठेकेदारास दिले होते. त्यांनी गेटच्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी बिकेश कुमार आणि एका मजुरास सांगितले होते.
तेथेच डीप्स बायोटेक कंपनीचे बांधकाम सुरू असून पाणी साठवण्यासाठी बॅरेलची आवश्यकता होती. त्यामुळे कंपनीतील कामगाराने केमिकल कंपनीतून पत्र्याचा बॅरेल आणून तो बिकेश कुमारकडे कापण्यासाठी दिला होता. बिकेशकुमार ग्राइंडरने हे बॅरेल कापत होता. मात्र बॅरेलमध्ये शिल्लक असलेल्या केमिकलमुळे गॅस तयार झाला आणि अचानक मोठा आवाज होत बॅरेलचा स्फोट झाला. या स्फोटात बिकेश कुमार बाजूला फेकला गेला. आणि गंभीर जखमी झाला. त्याच्या सोबत काम करत असलेल्या कामगाराने बिकेश कुमारला उपचाराकरिता कराड येथे हलवले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला.



जरांगे-पाटील धंनजय मुंडेंना म्हणाले...तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आजा धाराशिव जिल्ह्यात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, खासदार बजरंस सोनवणे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक आमदार स्थानिक लोकप्रतिनीधींनी आक्रमक भाषण करत आपली भूमिका मांडली. आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी खासदारांनी केली. तर, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यावर हल्लाबोल केला. या मोर्चात सर्वात शेवटी भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर  जोरदार हल्लाबोल केला. 
धनंजय मुंडेंबाबत जरांगे म्हणाले
मनोज जरांगे यांनी धाराशिव जिल्ह्यातील काही गुन्हेगारी घटनांचा उल्लेख करत गृहमंत्री व धनंजय मुंडेना लक्ष्य केलं. धनंजय मुंडे हा मनोज जरांगे भीत नसतो, तुझ्या गुंडाना शांत कर. जर तुझ्यामुळे मराठा, दलित, मुस्लिम ओबीसीला त्रास झाला तर 25 जानेवारी नंतर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा शब्दात जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. दरम्यान, बीड सरपंच हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या सर्वच आरोपींवर आज पोलीस प्रशासनाकडून मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्‍यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार आरोपींविरुद्ध आज मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दारू होणार महाग ; राज्य सरकार लवकरच घेणार निर्णय?

वेध माझा ऑनलाइन।
सध्या राज्य सरकारचा महसूल विभाग कोणकोणत्या विभागामधून वाढीव महसूल मिळू शकतो हे तपासात आहे. आणि आपल्याला माहितीच असेल की मद्य व्यवसायामधून सरकारला मोठा महसूल मिळत असतो. म्हणूनच सरकार दारूवरील कर वाढवण्याचा विचार करत आहे महसूल वाढीसाठी अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत त्यामुळे कर आणि शुल्क मध्ये वाढ केली तर मध्यप्रेमींना आर्थिक चटका सहन करावा लागू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार विशेष म्हणजे महसूल विभागाच्या वतीने दारू वरील करवाडी संदर्भात सूचना देण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आलेली आहे दोन महिन्यात ही समिती राज्य सरकारला काही सूचना आणि निर्देश करणार आहे आणि त्या माध्यमातून महसूल वाढीसाठी कुठल्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याबद्दल ही समिती सरकारला सूचित करणार आहे.

मद्य व्यवसायातून राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी सरकारने गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती गठित केली आहे इतर राज्यातील मध्य निर्मिती धोरण परवाने उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास ही समिती करणार आहे त्यानंतर ही समिती दोन महिन्यानंतर राज्य सरकारला आपला अहवाल सादर करेल आणि मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी या निर्णयावर मोठी टीका केली होती राज्य सरकारने आता हा शासन निर्णय काढून समिती स्थापन केली आहे.

धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ; अंनिसचे कार्यकर्ते अमावस्येला गावातच थांबणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील धामोरी गावात भुताची अफवा पसरल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते गावकऱ्याचं प्रबोधन करणार आहेत. अंनिसचे कार्यकर्ते अमावस्येला गावातच थांबणार आहेत. कोपरगाव तालुक्यातील धामोरी ते सिन्नर तालुक्यातील शिरवाडे रस्त्यावरील नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसले. भुताने त्या चालकाला मारहाण केली अशा आशयाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ एडिट केल्याचं निरीक्षणाअंती स्पष्ट झालं. या व्हायरल घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने घेतली असून जगात भूत अस्तित्वात नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये अस आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केलं आहे. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते अमावसेच्या रात्री सदर ठिकाणी राहून दाखवणार असून नागरिकांच्या मनातील भीती घालवण्याचे प्रयत्न करणार आहेत. ही अफवा असून रहिवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये अस आवाहन अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे आणि धामोरी गावच्या पोलिस पाटील संगिता ताजणे यांनी केलं आहे.

ठाकरे गटाची महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाची भाषा ; शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत म्हणाले...त्यांचं काय चाललंय हे राज्यातील मतदारांना कळेना झालंय ;

वेध माझा ऑनलाईन
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना एक मोठी घोषणा केली. राजकीय वर्तुळात लगेच त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची खासदार संजय राऊत यांनी घोषणा केली आहे. ठाकरे गटाकडून ही घोषणा झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया आली आहे. “त्यांच्यामध्ये काय चाललं आहे, हे जसं तुम्हाला कळत नाही, तसं महाराष्ट्राच्या मतदाराला सुद्धा कळत नाही” असं मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणाले.

“2019 ला जनमताचा कौल मिळालेला असताना काँग्रेससोबत जाणं. त्यानंतर काँग्रेसच्या हाताच प्रचार करणं. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं, भविष्यात शिवसेनेकडून हाताचा प्रचार कधीही होऊ शकत नाही. त्या काँग्रेसचा प्रचार केला. भाषणात हिंदूह्दय सम्राट शब्द न वापरणं, याचे सगळ्याचे फटके बसले असतील. म्हणून कदाचित हा निर्णय घेतला असेल” असं उदय सामंत म्हणाले.
ठाकरे गट योग्य वळणावर येतोय का? या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की, “योग्य वळणावर येतोय का, हे त्यांनाच माहित. काही गोष्टींची त्यांना जाणीव झाली असेल. म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडत असतील” अपेक्षित यश मिळेल का? ’15 वर्ष तरी आम्हाला चिंता करण्याची गरज नाही’ असं उत्तर उदय सामंत यांनी दिलं. “पक्ष टिकवायचा असेल, कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवायचा असेल, तर त्यांना नावीन्यपूर्ण प्रयोग करावे लागतील. त्यालाच त्यांचं प्राधान्य असेल. हे प्रयोग केले नाहीत, तर ते राजकरणात टिकणार कसे?” असं उदय सामंत म्हणाले
उदय सामंत म्हणाले की, काल परवाची त्यांची भूमिका आणि आजची भूमिका यातून दिसतय प्रचंड असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलय, सर्वसामान्यांचा नेता जनतेमध्ये गेला, तर यश मिळवू शकतो”

महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा ; काय म्हणाले संजय राऊत?

वेध माझा ऑनलाईन
राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांनतर आता महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वत: त्याबद्दलची घोषणा केली आहे
संजय राऊत काय म्हणाले?
“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले.

Friday, January 10, 2025

घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराडात अटक;चोरट्यास कार्वे नाक्यावर पकडले

वेध माझा ऑनलाईन
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील घरफोडी प्रकरणातील
आरोपीस वडुज पोलिस ठाण्यातील पोलीसांनी आज अटक केली. कराड येथील कार्वे नाका येथे पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले.

इब्राहीम शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील रमेश मारुती बागल यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी उघडुन आरोपीने आतमध्ये प्रवेश करुन घरातील कपाटाचे लॉकर तोडून अंदाजे ६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच दि. १५ रोजी दुपारी तडवळे येथील नवनाथ मूरलीधर ढोले यांच्या बंद घराचा कोयंडा तोडुन घरात प्रवेश केला.
कपाटातील ३ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरुननेल्याने अज्ञात चोरट्यां विरूध्द वडुज पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते. सदर घरफोडीची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. तांत्रिक आणि गोपणीय माहितीच्या आधारे तपासादरम्यान सदरचा गुन्हाआरोपी इब्राहीम अबास अली शेख याने केले असल्याची माहिती प्राप्त झाली. वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने कराड, कडेगाव याठिकाणी सतत 3 दिवस अहोरात्र सध्या वेशातील संशयीत इब्राहीम शेख याचा नवीन राहण्याचा पत्ता व बसण्याच्या ठिकाणाची माहिती प्राप्त करुन सदरचा आरोपी हा त्याचे मोटार सायकलवरुन त्याचे मूळ गावी विजापूर राज्य – कर्नाटक येथे जात असल्याची माहिती मिळाली.
त्याचा कराड येथील कार्वे नाका परिसरात पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवून सखोल  विचारपूस केली. त्यानंतर त्याने दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यास अटक करुन चोरीस गेलेले मणी मंगळसूत्र, सोन्याचा हार, सोन्याची बोरमाळ, कानातील सोन्याचे झूमके व वेल, दोन सोन्याच्या अंगठया व रोख रक्कम आणि सोन्याची बोरमाळ, दोन सोन्याच्या अंगठया व रोख रक्कम असा गुन्हयातीलएकूण ९ तोळे सोन्याचा ऐवज व ७०००/ – रोख रक्कम असा दोन्ही गुन्हयातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अजितदादा म्हणाले/ माझ्या विरोधात सर्व खानदान प्रचारात उतरले होते मात्र बारामती माझ्या पाठिशी राहिली ;

वेध माझा ऑनलाइन
राज्यातील राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणात बारामतीचे महत्व आहे. वर्षनुवर्ष पवार कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघावर पवार कुटुंबामध्येच वर्चस्वाची लढाई सुरु आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बारामतीकर कोणासोबत आहे? याचे उत्तर लोकसभेला वेगळे आणि विधानसभेला वेगळे मिळाले. आता अजित पवार यांनी बारामती आपल्या पाठिशी असल्याचा दावा केला आहे.
लोकसभा निवडणुकीत आम्हाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. लाडकी बहीण योजनेमुळे मी म्हणणाऱ्यांना घरी बसावे लागले. राज्यात आजपर्यंत सर्वात जास्त जागा महायुतीला मिळाल्या आहेत.

  अजितदादा म्हणाले
पुणे जिल्ह्यातील लिंगाळी विविध विकास सोसायटीचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना माझ्याविरोधात माझ्या पुतण्यास उभे केले. त्यावेळी मी माझ्या भावाला निरोप पाठवला, माझ्याविरोधात त्या पोराला नको पोराला उभे करू, तेव्हा त्याने ऐकले नाही. तो म्हणाला, साहेबाच्या मागे बारामती आहे. परंतु त्याला काय माहीत साहेबांच्या नंतर बारामती दादांच्या मागे उभी आहे. त्यावेळी माझ्या विरोधात सर्व खानदान प्रचारात उतरले होते. मी मात्र शांत राहिलो. बारामती माझ्या पाठिशीच राहिली.

शरद पवार महाविकास आघाडीत नाराज ! काय आहे कारण ?

वेध माझा ऑनलाइन।
महाविकास आघाडी समन्वयाचा अभाव असल्याने शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्यात. या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अनपेक्षित बहुमत मिळवत आपली सत्ता कायम टिकवली आणि राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं. मात्र या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पराभवावर चिंतन आणि मंथन करण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांची बैठक झाली नाही. यासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महापालिका निवडणुकांबाबत महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. मुंबई पालिका निवडणूक ठाकरे गट स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे, असं शरद पवार गटाचं मत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकत्रित बैठक आणि चर्चा होत नसल्याने शरद पवार महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर महाविकास आघाडीची घडी पुन्हा बसली पाहिजे आणि महाविकास आघाडीमध्ये समन्वय वाढला पाहिजे, असं शरद पवार यांचं मत आहे. बैठकांसाठी शरद पवार आग्रही आहेत पण नेत्यांचा पुढाकार नसल्याने मविआमध्ये नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

Thursday, January 9, 2025

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले ; आर एस एस बद्दल ठाकरे चांगले बोलू लागले... त्याबद्दल एकनाथ शिंदे काय म्हणाले ;

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्रात सध्या भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात सलोखा होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक होत आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत चांगल्या गोष्टी ठाकरे यांची शिवसेना बोलू लागली आहे. त्यावरुन शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.


काय म्हणाले एकनाथ शिंदे
शिवसेना नेते एकनाथ शिंदे म्हणाले की, जे घटनाबाह्य सरकार, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणत होते, मुख्यमंत्री देवेंद्रजींना यांना फडतूस म्हणत होते, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील, अशी टोकाची भाषा बोलणारे एवढ्या लवकर रंग बदलतील असे वाटले नव्हते. सरडा रंग बदलतो पण अशा प्रकारची नवीन जात मी पहिल्यांदा बघितली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांनी ज्यांना झिडकारल, लोकांच्या, बाळासाहेबांच्या, हिंदुत्वाच्या विचारांची प्रतारणा केली, त्यांना जनतेने जागा दाखवून दिली, मतदारांनी त्यांचा कचरा केला. ‘तुम लढो हम कपडे सांभालते’ हे तसे ‘तुम लढो हम बुके देके आते’ असे करत आहेत.

वाईत एटीएम फोडले ; 17 लाख केले लंपास ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
वाईतील एमआयडीसी मधील एटीएम चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडून १७ लाखांची रोकड लंपास केली. वाईच्या एमआयडीसीतील मुख्य चौकात श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारी एटीएम आहे. हे एटीएम दररोज सकाळी सात वाजता उघडून रात्री ११ वाजता शटरला कुलपे लावून बंद केले जात होते
मंगळवारीच्या पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने एटीएम मशिन फोडून त्यातील १७ लाख रुपयांची रोकड लंपास केली. घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला.

सुरेश धस अन् अजित पवारांमध्ये ‘मुन्नी वॉर’ ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विविध ठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. आज पैठणमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेवरही निशाणा साधला. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी अनेकजण मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सुरेश धस यांनी मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत, असं वक्तव्य केलं आणि एकच चर्चांना उधाण आलं. दरम्यान, सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी नेमकी कोण? असा सवाल केला जात आहे. तर सुरेश धस यांनी मुन्नी नेमकी कोण? याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. “मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही. राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. मी जे बोललो आहे ते त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेले आहे. फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नी बदनाम अगोदरच झालेली आहे. मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिये…, ही जी डार्लिंग आहे या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे माझ्याकडे आहेत”, असे सुरेश धस म्हणाले. सुरेश धस यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला असता दादा म्हणाले मुन्नी कोण हे आमदार धस यांनाच विचारा..त्यामुळे ही मुन्नी कोण? याची चर्चा आता सुरू झाली आहे

गेमचेंजर किंगमेकर- रामकृष्ण वेताळ साहेब....

वेध माझा ऑनलाइन।
स्वतःला काही मिळवण्यासाठी अनेक जण आज राजकारणामध्ये प्रवेश करतात. मात्र इतरांना काही देण्यासाठी समाजाचे,ऋण फेडण्यासाठी राजकारणामध्ये प्रवेश करणारे लोक अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच आज शिल्लक आहेत. यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना खरा समाजकारणी म्हणून रामकृष्ण वेताळ साहेब यांचा चेहरा समाजापुढे येत आहे....
देणाऱ्याने देत जावे 
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हातही घ्यावे...
 अशी सुंदर चारोळी महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध आहे.ही चारोळी अनेकांची पाठ आहे. परंतु या चार ओळी प्रमाणे जीवन जगणे खूप अवघड असल्याने त्याप्रमाणे जगण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे खूप अवघड असते.म्हणून अनेक जण पोहणे सोडून देतात.मात्र रामकृष्ण वेताळ साहेब यांनी हाच मार्ग  त्यांनी आपल्या जीवनाची दिशा बनवला आहे.
    त्यामुळे काही मिळवण्यासाठी नाही तर फक्त इतरांना देण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.त्याचे एक साधेसुधे उदाहरण आहे.मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते स्वतः निवडणूक लढवत होते.त्याचबरोबर इतरांचा भारही ते उचलत होते.कराड उत्तर हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे.आणि या मतदारसंघांमध्ये इतरांना यश मिळणारच नाही!अशी अनेकांची धारणा होती.या धारणेला प्रथम मूठमाती देण्याचे काम रामकृष्ण वेताळ यांनी करून दाखवणे.
   त्यांच्याच नेतृत्वाखाली कराड उत्तर मध्ये एक जिल्हा परिषद सदस्य,दोन पंचायत समिती सदस्य भाजपा च्या कमळ चिन्हावर निवडून आले. त्याचबरोबर प्रत्येक मतदार संघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी लक्षात राहतील अशी घवघवीत मते मिळाली.याच घटनेने त्यांची ओळख गेम चेंजर किंग मेकर अशी झाली. 
    यानंतर ज्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही.स्वतःसाठी काही मिळवायचे आहे.असा प्रयत्न त्यांनी केला नाही.जे हवे आहे ते इतरांसाठी यासाठीच ते धडपडत राहिले.स्वतःच्या व्यवसायाची घोडदौड अबाधित राखत त्यांनी राजकारणामध्ये यशस्वी मजल मारण्याचा प्रयत्न केला.लग्न,वाढदिवस,सुखदुःखाचे प्रसंग,यात्रा या सर्वांना हजेरी लावत त्यांनी लोकसंग्रह करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत निवडणुका,सोसायटीच्या निवडणुका यामध्ये गावागावात सक्षम नेतृत्वाची फळी निर्माण करून त्यांना सहाय्य केले.प्रसंगी पदारमोडे केली. यामुळे कराड उत्तर मतदार संघातील वातावरण हळूहळू बदलत गेले. गावागावात ग्रामपंचायतचे,सोसायटीचे सदस्य भाजपाचे दिसू लागले आणि भाजपांला उत्तरेत नवी उभारी मिळत गेली. त्यांनी आपल्या कार्य कौशल्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मरळी भगतवाडी रस्ता,शिवडे भवानवाडी रस्ता सुर्ली ते कामथी पाचुंद रस्ता, गजानन हाउसिंग सोसायटी विरवडे करवडी रस्ता असे हजारो कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यामध्ये आपले सक्रिय योगदान दिले आहे.त्याचबरोबर शामगाव शेती पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपसा जलसिंचन योजना कशी राबवता येईल याबाबत सविस्तर माहिती शासन स्तरावर पुरवली असल्याने ही कामे सध्या गतिमान असल्याचे पाहायला मिळते.
    भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे त्यांना सरचिटणीस पद मिळाले.या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरले.अनेक युवकांना किसान मोर्चाशी जोडून विविध पदे मिळवून दिली.मानाच्या आणि लोकहिताचे काम होत असलेल्या पदावरती अनेकांना काम करण्याची संधी देऊन त्यांनाही नावलौकिक प्राप्त करून दिला.यावर्षी पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक त्यांनी या मतदारसंघात प्रयत्नांची पराठा केली. राजकारणामध्ये रामकृष्ण वेताळ साहेब यांचे आयडॉल हे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आहेत आणि खासदारकीच्या निवडणुकीत आपल्या राजकीय आयडालला सहकार्य करण्याची संधी त्यांना मिळाली.या संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. गावोगावी गाठीभेटी आणि दौरे करून महाराजांच्या यशामध्ये खारीचा वाटा उचलला.त्यामुळे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रामकृष्ण वेताळ यांचे कार्य कौशल्य जाण त्यांना आपले शिलेदार बनवले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक त्यांनी कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार म्हणून दादा घोरपडे यांच्या विजयासाठी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला आहे.या वेळेस हेवेदावे विसरून एकत्र राहणे कसे गरजेचे आहे.यश मिळाले तर किती आनंद होईल आणि किती दिवसाच्या परिश्रमाचे साफल्य होईल हे त्यांनी युवकांना,मध्यमवर्ग यांना पटवून दिले.मी स्वतःच उमेदवार आहे असे समजून काम करीत रहा.हे लोकांना पटवून दिले.त्यांनीच बूथ कमिट्या,पन्ना प्रमुख यासारखे अनेक पदाधिकारी निर्मिती केली. प्रत्येकाशी वैयक्तिक लोकसंपर्क ठेवला होता.त्यामुळे निवडणुकीच्या अखेरपर्यंत ते सक्रिय राहून विजयी वाटचाल यशस्वी करण्यात अग्रेसर राहिले. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढत आहे.परिणामी समाजकारणामध्ये गेम चेंजर किंग मेकर अशी त्यांची प्रतिमा दिवसेंदिवस वाढत गेली आहे.गावागावात लहान मुलांपासून पोरांच्या तोंडी त्यांचे नाव सातत्याने येत आहे.यासाठी फक्त त्यांनी घेतलेले परिश्रम हे एकच तत्व उपयोगी पडले आहे.म्हणूनच मागील 60 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात परिवर्तन घडवणे शक्य झाले आहे.या मतदारसंघात परिवर्तन कधी होणारच नाही अशीच अनेकांची धारणा होती.परंतु प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे.... याची पूर्ण जाणीव असलेले रामकृष्ण वेताळ थांबायला तयार नाहीत. त्यांनी मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पराभूत करता येते हे हे समाजाला आपल्या परिश्रमाने दाखवून दिले.जिद्द,चिकाटी,परिश्रम यापुढे कोणतेही यश अशक्य नाही.याची जाणीव त्यांना लहानपणापासूनच आहे.याच जाणीवे नुसार ते आज पर्यंत काम करीत आहेत. हार होईल अथवा जीत होईल.हार झाली तर खचून जायचे नाही आणि जीत मिळाली तर हुरळून जायचे नाही.आपले काम खंड चालू ठेवायचे. असा त्यांचा खाक्या असल्यामुळे आज पर्यंत ते यशस्वी मार्गावरून वाटचाल करत आहेत. त्यांच्या यशाचे गमक आज अनेकांनी जाणल्यामुळे कराड उत्तर मतदार संघातील लोकांच्या मते त्यांची प्रतिमा गेम चेंजर किंग मेकर अशीच बनवली आहे.भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते सध्या किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विचार आणि कार्य लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमी कार्यरत असतात.ते सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,ग्राम विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात आणि विशेषता कराड उत्तर मतदार संघामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत.वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सूचनेनुसार पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवून आपली किंगमेकर ही ओळख अबाधित ठेवण्यात त्यांना यश मिळेल यात तिळमात्र शंका नाही. अशा या सर्व काही झोकून देणाऱ्या समाजकारणी नेत्याचा 10 जानेवारी हा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा होत आहे.या वाढदिवसानिमित्त त्यांना जनतेकडून आणि श्रीमंत रामकृष्ण वेताळ प्रेमी नागरिकांच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

शब्दांकन संदीप कोरडे

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ;

वेध माझा ऑनलाइन
सरकारी विभाग व कार्यालयांची वेबसाईट अद्ययावत करावी. ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करावे. शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवावी. नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. शासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. दरम्यान, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते.  मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत सूचना केल्या. या सूचनांवर काय कार्यवाही केली याबाबत 15 एप्रिल 2025 रोजी आढावा घेतला जाणार आहे.

यावेळी साताऱ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे. माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी. संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करावे. शासकीय कार्यालयांची स्वच्छता करावी. अनावश्यक कागदपत्रे काढून टाकावीत. खराब आणि वापरात नसलेली वाहने निर्लेखित करावीत. शासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. अधिकार्‍यांच्या अचानक भेटी होतील, त्यावेळी प्रसाधनगृह स्वच्छ असावे. नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर (ईज ऑफ लिव्हिंग) व्हावे यासाठी दोन सुधारणा, नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवण्यात यावेत.


प्रलंबित कामांची संख्या शून्यावर कशी येईल, यासाठी प्रयत्न करावा. अधिकारी व नागरिकांना आवश्यक माहिती फलकावर नमूद करावी. नागरिकांचे स्थानिक पातळीवर सुटू शकणारे प्रश्न, समस्या या तालुका व जिल्हास्तरावरच सोडवावेत. पण असे होत नसल्याने मंत्रालयात गर्दी होते. यासाठी लोकशाही दिन यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील विविध महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजनांना भेटी दिल्या पाहिजेत. तसेच तालुका, गाव पातळीवर भेटी झाल्याच पाहिजेत. शाळा, अंगणवाडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी झाल्या पाहिजेत. त्याचे वेळापत्रक निश्चित करावे. संबंधित जिल्हा पालक सचिवांनी आपल्या जिल्ह्यात सूचनांची अंमलबजावणी केली जात आहे का याबाबत लक्ष ठेवावे, अशी सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महाबळेश्वरला १२.९ किमान तापमानाची नोंद ;

वेध माझा ऑनलाइन
सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. दरम्यान, बुधवारी 
सातारा शहरात १४.९, तर महाबळेश्वरला १२.९ किमान तापमानाची नोंद झाली.
दरम्यान मागील चार दिवसांपूर्वी महाबळेश्वरपेक्षा साताऱ्यात थंडीची परिणामकारकता अधिक होती.  सायंकाळी सहा वाजलेनंतरच थंडी जाणवायला सुरुवात होते. रात्री दहानंतर तर कडाक्याची थंडी पडत आहे. सकाळी नऊ वाजले तरी अंगातून थंडी जात नाही, अशी स्थिती आहे.  यामुळे दुपारी १२ नंतरही अंगाला गारवा झोंबत असल्याचे चित्र आहे. अजूनही काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.