वेध माझा ऑनलाईन
तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळगम (टी व्ही के)प्रमुख आणि अभिनेत्यापासून नेते बनलेले विजय यांच्या मोठ्या राजकीय सभेत प्रचंड गर्दी झाली. हजारो लोक जमल्याने परिस्थिती बिघडली आणि चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. यात किमान 33 लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेकजण बेशुद्ध पडले आणि त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासली. या घटनेत 58 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
गर्दीमुळे त्यात काही मुलेसुद्धा, काही लोक बेशुद्ध पडली. विजय यांनी अचानक आपलं भाषण थांबवलं आणि “पोलिसांनी मदत करा” अशी हाक दिली. लोक बेशुद्ध पडल्यावर त्यांनी पाणी बाटल्या प्रेक्षकांत टाकल्या आणि रुग्णवाहिका बोलावून श्वास गुदमरलेल्या लोकांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली.
No comments:
Post a Comment