कराड
येथील पालिकेचे मुख्याधिकारी डांगे यांनी आमच्या पार्टीची अक्षरशः वाट लावली. आमचे एकमेकाचे फोन रेकॉर्डिंग करून याचे त्याला ऐकवायचे प्रकार करून लावलाव्या केल्या, पार्टीचा सगळं इस्कुट केला. आता यापुढं आमचं काय जुळत नाय.आता निवडणुकीला राहिलंय वर्ष, दिडवर्ष,आम्हाला काय फरक पडत नाय.आमची काम व्यवस्थित चालू आहेत. अशा शब्दात उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत डांगे यांच्यावर तोंडसुख घेत पालिकेतील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केल व आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, 80 लाखाचा खर्च डांगे यांनी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये टेंडर शिवाय केला, त्याचे टेंडर नंतर काढलं तेव्हा आम्हाला या भानगडीबद्दल समजले.पहिले मुख्याधिकारी जसे हिटलर होते त्यांचाच कित्ता हे गिरवत आहेत.पालिका सध्या डांगेच चालवत आहेत असच दिसतंय.
मी उपनगराध्यक्ष असून मला कोणत्याही मिटींगला ऐन वेळी फोन करून बोलावले जाते.मध्ये व्यापाऱ्यांबरोबर झालेल्या मीटिंग चा मला निरोपच नव्हता,अशी आमच्या पार्टी अंतर्गत अवस्था व्हायला डांगेच जबाबदार आहेत. त्यांनी आमच्यात गैरसमज पसरवले.
त्यांचं पहिल्या वर्षी शहरासाठी दीलेलं योगदान चांगलंच होत.आम्ही सगळ्यांनी त्यावेळी त्यांचं कौतुकच केलं .देशात पहिला नंबर येण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील लोकांनीही मोठा सहभाग नोंदवलाही होता. मात्र आत्ता शहरातील अतिक्रमण त्यांनी ज्या पद्धतीने काढली आणि गावच,व्यापाऱ्यांच नुकसान झालं त्याच आम्ही समर्थन करत नाही.आम्ही वाहतुकीस अडथळा येणारे रस्त्यातील अतिक्रमण काढण्याबाबत पालिका म्हणून त्यांना परवानगी दिली होती पण त्यांनी शहरातील अतिक्रमण नावाखाली गावचे पुरते नुकसान केलं.असेही जयवंत पाटील म्हणाले.
दरम्यान बारा डबरी परिसरामध्ये पालिकेने बांधलेल्या घरकुलची अवस्था दैनिय झाली आहे.काही दिवसांपूर्वीच बांधलेल्या या संकुलाची अवस्था एवढ्यात अशी का होते? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
येथील पालिकेचे मुख्याधिकारी डांगे यांनी आमच्या पार्टीची अक्षरशः वाट लावली. आमचे एकमेकाचे फोन रेकॉर्डिंग करून याचे त्याला ऐकवायचे प्रकार करून लावलाव्या केल्या, पार्टीचा सगळं इस्कुट केला. आता यापुढं आमचं काय जुळत नाय.आता निवडणुकीला राहिलंय वर्ष, दिडवर्ष,आम्हाला काय फरक पडत नाय.आमची काम व्यवस्थित चालू आहेत. अशा शब्दात उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत डांगे यांच्यावर तोंडसुख घेत पालिकेतील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केल व आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, 80 लाखाचा खर्च डांगे यांनी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये टेंडर शिवाय केला, त्याचे टेंडर नंतर काढलं तेव्हा आम्हाला या भानगडीबद्दल समजले.पहिले मुख्याधिकारी जसे हिटलर होते त्यांचाच कित्ता हे गिरवत आहेत.पालिका सध्या डांगेच चालवत आहेत असच दिसतंय.
मी उपनगराध्यक्ष असून मला कोणत्याही मिटींगला ऐन वेळी फोन करून बोलावले जाते.मध्ये व्यापाऱ्यांबरोबर झालेल्या मीटिंग चा मला निरोपच नव्हता,अशी आमच्या पार्टी अंतर्गत अवस्था व्हायला डांगेच जबाबदार आहेत. त्यांनी आमच्यात गैरसमज पसरवले.
त्यांचं पहिल्या वर्षी शहरासाठी दीलेलं योगदान चांगलंच होत.आम्ही सगळ्यांनी त्यावेळी त्यांचं कौतुकच केलं .देशात पहिला नंबर येण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील लोकांनीही मोठा सहभाग नोंदवलाही होता. मात्र आत्ता शहरातील अतिक्रमण त्यांनी ज्या पद्धतीने काढली आणि गावच,व्यापाऱ्यांच नुकसान झालं त्याच आम्ही समर्थन करत नाही.आम्ही वाहतुकीस अडथळा येणारे रस्त्यातील अतिक्रमण काढण्याबाबत पालिका म्हणून त्यांना परवानगी दिली होती पण त्यांनी शहरातील अतिक्रमण नावाखाली गावचे पुरते नुकसान केलं.असेही जयवंत पाटील म्हणाले.
दरम्यान बारा डबरी परिसरामध्ये पालिकेने बांधलेल्या घरकुलची अवस्था दैनिय झाली आहे.काही दिवसांपूर्वीच बांधलेल्या या संकुलाची अवस्था एवढ्यात अशी का होते? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
No comments:
Post a Comment