Wednesday, March 4, 2020

कराडच्या राजकीय नेत्यांची अतिक्रमणे असतील तर ती काढा; अन्यथा हायकोर्टात धाव घेणार...गोरख शिंदें

कराड
शहरातील अतिक्रमणे काढण्याचं काम हे खरच कौतुकास्पद आहे.प्रशासनाला याकामी आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.मात्र नगरसेवक विनायक पावसकर यांनी या अतिक्रमण मोहिमेबद्दल आता अचानक हस्तक्षेप करण सुरू केलं आहे,
ते त्यांनी थांबवाव.पावस्करांचे शहराच्या विकासासाठी आज पर्यंत काय योगदान आहे? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते गोरख शिंदे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. दरम्यान शहरातील काही राजकीय नेत्यांनी अतिक्रमणे जर असतील तर ती अद्याप का काढली नाहीत,  प्रशासनाने ती काढून घेतली पाहिजेत अन्यथा आपण हाय कोर्टात या प्रश्नी धाव घेणार असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमे बद्दल आपली भूमिका मांडताना ते आज येथील शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले,ही मोहीम खरच कौतुकास्पद आहे. शहर स्वच्छ झाले पाहिजे अशी सर्वांचीच भूमिका असली पाहिजे.त्या करीता प्रशासनाला आपण सहकार्य केले पाहिजे. मात्र ज्याच्यावर अन्याय झाला त्यांच्या बाजूने एकही लोकप्रतिनिधी आला नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल.सध्या नगरसेवक विनायक पावसकर जे या प्रकरणी हस्तक्षेप करत आहेत तो केवळ त्यांच्या राजकीय हेतू पोटी आहे. ही मोहीम चालू असताना त्यांनी का हस्तक्षेप केला नाही?.याचवेळी नेमके ते बाहेर गावी का निघून गेले?आणि आता ते याविषयी राजकारण करत आहेत.त्यांचे शहरातील विकासासाठी योगदान काय?असा सवालही त्यांनी यावेळी केला.
इतरांना एक नियम आणि राजकारण्यांना एक नियम असा दुजाभाव  खरंच होत असेल तर आपण या विषयी हाय कोर्टात धाव घेणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या पाच ते सहा दिवसापासून शहरात अतिक्रमण मोहीम सुरू आहे.ही मोहीम सुरू असल्या पासून वादाच्या भोवऱ्यात आहे.खरतर सगळीकडे या मोहिमेचे कौतुक होत असताना काही ठिकाणी ती राबवताना त्यामध्ये दुजाभाव झाल्याची भावना शहरातून व्यक्त होते आहे.त्यामुळे वादाच्या पिंजऱ्यात शहराचे मुख्याधिकारी डांगे अडकल्याचे चित्र आहे. मोहीम राबवताना येथील व्यापाऱ्यांच झालेलं नुकसान व त्यामुळं व्यापाऱ्यांनी काढलेला शहरातील मोर्चाने शहरातील या मोहीम प्रक्रिया राबवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.एकीकडे असे असताना दुसरीकडे काही सहकारी बँकांच्या मालकीचे बझार,तसेच  शहरातील काही राजकीय नेत्यांची अतिक्रमणे जर असतील तर अद्याप त्याच्यावर कारवाई का नाही ? अशी चर्चा आहे. त्यामुळे ही मोहीम आजही तितकीच चर्चेत आहे. मात्र,अनेक तर्क वितर्कनी गाजलेली ही मोहीम सध्या दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे आणि त्यामागचं कारण काय?याच्याही चर्चा ने सध्या जोर धरला आहे. याच कारणाने येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली याबाबत असलेली भूमिका स्पष्ट केली व प्रशासनाला सर्वांना समान न्याय देण्याबाबत इशारा देत लोकांनाही या मोहिमेस सहकार्य करण्याबाबत आवाहन केले.मात्र ते करताना त्यांनी शहरातील काही राजकारण्यांचे असलेले अतिक्रमण पालिकेने काढले पाहिजे अशी भूमिका घेतली अन्यथा आपण या प्रश्नावर न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.





No comments:

Post a Comment