वेध माझा ऑनलाईन।
पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कधीकाळी बंगालमध्ये सत्तेत असणारा तेथील माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची शकलं झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 80 आमदारांपैकी 50 पेक्षा जास्त आमदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडली आहे. 19 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांचा उरलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवूननी देणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही काँग्रेस पक्षात विलीन होण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी राष्ट्रवादीच्या पवार गटाला काँग्रेसचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तशी माहिती मिळाली आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती समोर आल्याने आता हालचाली वाढल्या आहेत.
No comments:
Post a Comment