Saturday, July 12, 2025

मतदार यादीमध्ये घोळ; काँग्रेसच्या आरोपावर मंत्री शंभूराजे देसाई यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान ;

वेध माझा ऑनलाईन- भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणुका जिंकल्या असा आरोप करत काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे  मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे त्यामुळे या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम यापुढे ही गठीत केलेली समिती करणार आहे...या विषयी बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले अस काही होत नसत... निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे...त्यामुळे काँग्रेसचे हे सर्व आरोप चुकीचे आहेत...पृथ्वीराज चव्हाण यांना मी आव्हान देतो की त्यानी या विषयावर माझ्याशी समोरासमोर बोलण्याची तयारी ठेवावी...मी चर्चेसाठी कधीही कुठेही यायला तयार आहे...अस म्हणत मंत्री देसाई यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आव्हान दिले आहे 
कराडमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना त्यांनी हे आव्हान दिले आहे
यावेळी त्यांनी बऱ्याच राजकीय विषयांना हात घालत दिलखुलास चर्चा केली 

यावेळी ते म्हणाले नाना पटोले यानी चुकीचे वागत विधानसभा अध्यक्षांचा अपमान केला तो त्यांनी हौस चा ही अपमान केला आहे अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणे चूकच आहे त्यामुळे त्यांचे  एकदिवसीय निलंबन करण्यात आले

ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र आले आहेत मात्र त्यांची राजकीय भूमिका एकत्र असणार का यावर अजूनतरी प्रश्नचिन्ह आहे कारण राज ठाकरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबत माझ्या परवानगीशिवाय माध्यमातून बोलू नका अस त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हटलं आहे त्यामुळे ते जेव्हा त्यांची भूमिका स्पष्ट करतील त्यानंतर आम्ही त्या दोघांच्या एकत्र येण्यावर बोलू अस मंत्री देसाई यावेळी म्हणाले

मंत्री मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्याकडे असणाऱ्या वीज खात्यावर नुकतीच टीका केली होती याविषयी विचारले असता मंत्री देसाई म्हणाले त्यांनी टीका केली नाही तर त्याविषयीची माहिती देत त्या खात्यातील त्रुटी दाखवत सूचना केल्या आहेत त्यांना तुम्ही पत्रकारांनी टीका म्हणू नका असही ते म्हणाले

 उबाठा गटाचे नेते अनिल परब याना मंत्री शंभराज देसाई ...तू बाहेर ये तुला बघतो...अस म्हणणारा व्हीडिओ राज्यात व्हायरल झाला आहे...याबाबत पत्रकारांना स्पष्टीकरण देताना मंत्री देसाई म्हणाले..आमच्या गटातील कोणीही  गद्दार म्हटलेलं ऐकून घेणार नाही...मात्र माझं ते बोलणं रागाच्या भरात होत...मी याविषयी काल माध्यमातून सविस्तर बोललो आहे...

पाटण विधानसभा मतदार संघातील मंत्री देसाई यांचे विरोधक सत्यजित पाटणकर भाजपमध्ये गेले आहेत... त्याबद्दल एकेकाळचे विरोधक आता तुमच्या मित्रपक्षात गेल्यामुळे आता ते तुमचे तुमचे मित्र झाले आहेत का?... तुम्हाला  आनन्द झालेला आहे का?... तुमची त्यांच्या प्रवेशाबद्दलची प्रतिक्रिया काय?...याबद्दल बोलताना ते म्हणाले...मी माझी प्रतिक्रीया ज्या संबंधिताना द्यायची आहे त्यांना त्याचवळी दिली आहे...

याबाबत पत्रकाराना पण प्रतिक्रिया द्या ना...तुम्हाला त्यांच्या प्रवेशामुळे आनन्द झाला आहे असं तरी म्हणा ना...खरतर तुम्ही आता खुशच दिसताय...अस पत्रकारांनी छेडले असता...मग मी काय गंभीर चेहरा करून बसू का ? अस म्हणत... मंत्री देसाई यांच्यासह उपस्थित सर्वांच्यातच त्याठिकाणी एकच हशा पिकला...

No comments:

Post a Comment