Tuesday, July 15, 2025

संजय दत्तने सांगितले असते तर मुंबईत बॉम्बस्फोट टाळता आले असते…; उज्ज्वल निकम यांचा दावा ;

वेध माझा ऑनलाईन
वरीष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी असा दावा केला आहे की, जर संजय दत्तने पोलिसांना माहिती दिली असती, तर 1993 मध्ये मुंबईत झालेले बॉम्बस्फोट टाळता आले असते. त्यांनी हेही सांगितले की, ते संजय दत्तला निर्दोष मानतात.


1993 च्या बॉम्बस्फोटांसह अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी प्रकरणांमध्ये सरकारी वकील राहिलेले उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले की, “अबू सलेमने बॉम्बस्फोटाच्या एक दिवस आधी संजय दत्तच्या घरी शस्त्रांनी भरलेली व्हॅन आणली होती. अभिनेत्याने त्यातून काही हँड ग्रेनेड आणि बंदुका घेतल्या होत्या, पण त्याने फक्त एके-47 बंदूक स्वतःकडे ठेवली आणि बाकी सर्व परत केले. जर संजय दत्तने पोलिसांना त्या शस्त्रांनी भरलेल्या व्हॅनबद्दल माहिती दिली असती, तर पोलिसांनी तपास केला असता आणि 12 मार्च 1993 रोजी झालेले बॉम्बस्फोट थांबवता आले असते.”

No comments:

Post a Comment