Tuesday, March 19, 2024

मनसे महायुतीत सामील होणार ? ; राज ठाकरे अमित शहा यांची भेट ;लोकसभेसाठी मनसेला किती जागा मिळणार ?

वेध माझा ऑनलाईन। गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्याच व देशाचं लक्ष दिल्लीतील घडामोडींकडे लागलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच राजकीय भूकंपांनी बेजार झालेल्या महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप पाहायला मिळणार असं  दिसतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजप हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. तेव्हापासूनच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप शिंदे आणि पवार यांच्या महायुतीत आता मनसेही सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता. राज ठाकरेंचा हा प्रस्ताव अमित शहांनी मात्र फेटाळला आहे. केवळ एक जागा देणं निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी राज ठाकरेंना सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असंही अमित शाह राज ठाकरेंना म्हणाल्याची माहिती मिळत आहे.

Sunday, March 17, 2024

माझ्यासाठी हातकणंगले सोडा; आता राजू शेट्टींचा उद्धव ठाकरेंना प्रस्ताव -

वेध माझा ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला असला तरी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार कोण असणार याची शाश्वती अजूनही मतदारांना आलेली नाही. त्यामुळे लढत कशी असणार याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून शाहू महाराज यांचे नाव आणि हातकणंगलेमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव निश्चित असलं तरी त्यांच्या विरोधातील उमेदवार अजूनही ठरलेला नाही. त्यामुळे ही लढत कशी होणार याबाबत अजूनही चर्चा सुरूच आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा
दरम्यान, राजू शेट्टी यांनी दुसऱ्यांदा मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने हातकणंगले मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडावा, अशी मागणी शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उद्धव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र,राजू शेट्टी यांनी गेल्या 25 वर्षांपासून मी पक्षाच्या चिन्हावर लढत असल्याचे सांगत मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली असून आयुष्यात इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली नसल्याचे त्यांनी ठाकरे यांना सांगितले. 

उद्धव ठाकरेंच्या भेटीवर काय म्हणाले?
राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बोलताना सांगितले की, याठिकाणी (हातकणंगले) तुम्ही लढू नका असे त्यांना सांगितले. हातकणंगलेत पाठिंबा मिळाल्यास राज्यात ज्याठिकाणी शिवसेना लढत आहे, त्याठिकाणी पाठिंबा देण्याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांना सांगितल्याचे शेट्टी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल. ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितल्याचे शेट्टी म्हणाले. मला पाठिंबा देण्याबाबत स्थानिक शिवसैनिकांची ईच्छा दिसते. संपर्कात असलेल्या शिवसैनिकांकडून मतविभागणी नको म्हणून मला पाठिंबा देण्यास अनुकूल असल्याचे शेट्टी म्हणाले.

ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढवणार ; सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?

वेध माझा ऑनलाईन। सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील लोकसभा निवडणूक लढणार आहेत. चंद्रहार पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी त्यावेळी मोठं शक्तिप्रदर्शन करत ठाकरे गटात प्रवेश केला होता. दरम्यान, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी 11 मार्च रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी आपला केलेला सन्मान हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.

Saturday, March 16, 2024

आजपासून आचारसंहिता लागू ; सातारा जिल्ह्यातील मतदान कधी होणार ? वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाईन । - लोकसभा निवडणूकीचा बिगूल वाजला आहे आजपासून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. दरम्यान  सातारा, सांगली, कोल्हापूर, माढा, हातकणंगले बारामती येथे तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे अशी माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे.

खालील टप्यात होणार मतदान...
 1) 19 एप्रिल
 गडचिरोली, भंडारा- 
गोदिया, नागपूर, रामटेक, चंद्रपूर,

2) 26 एप्रिल 
 यवतमाळ- वाशिम, वर्धा, 
अमरावती, अकोला, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड,

 3) 7 मे 
सातारा, सांगली, सोलापूर,
 कोल्हापूर, लातूर, माढा, रायगड, धाराशिव, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, बारामती, हातकणंगले

 4) 13 मे
 पुणे, शिरूर, अहमदनगर, 
शिर्डी, बीड, नंदुरबार, रावेर, जालना, छ. संभाजीनगर,   मावळ,

 5) 20 मे 
 कल्याण, ठाणे

आमदार बाळासाहेब पाटील म्हणतात ...निवडणूक आली की बाहेर पडतात अशा लोकांपासून सावध रहा ; काय आहे बातमी ...?

वेध माझा ऑनलाईन। निवडणूक जवळ आली की आपल्या कराड उत्तर विधानसभा संघामध्ये काही लोक येतात व विविध प्रकारच्या वल्गना करतात अशा लोकांपासून सावध रहा असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.

ते किरोली ता. कोरेगाव येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मतदार संघातील सर्व गावे, वाड्या वस्त्यांना समान न्यायाने निधीचे वाटप केले असून त्या माध्यमातून कराड उत्तर विधानसभा मतदार संघात विकास कामांचा झंझावात सुरू आहे. परंतु विरोधक विकास कामांऐवजी भडक बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत, त्यामुळे अशा लोकांपासून सावध रहा असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, कोरेगांव पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतीलाल पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी संभाजीराव गायकवाड, आनंदा कोरे, वसंतराव कणसे, ॲड.अशोकराव पवार, पै.संजय थोरात, सागर पाटील (दादा), अविनाश माने, भागवत घाडगे, विद्याधर बाजारे, संजय कुंभार, विष्णू गायकवाड, हिम्मत माने, राहुल निकम भरत गायकवाड, लालासो जाधव, दादासो गायकवाड, सुरेश उबाळे, श्रीरंग रेवते, पांडुरंग पवार, विलास भोसले, यशवंत चव्हाण, गोरखनाथ काळे, जयहनुमान घाडगे, अंकुश घोरपडे, अमोल चोरगे, सुनील मलवडकर, विजय गायकवाड, प्रशांत घाडगे, किरण जाधव, सौ. सरपंच अर्चना गजानन चव्हाण, उपसरपंच तुषार भिसे, बबन मुगुटराव चव्हाण, विलास चव्हाण, पांडुरंग कोळी, सतिष जाधव, संजय जगताप, अर्जुन चव्हाण, निवास कोठावले, लक्ष्मण चव्हाण, संजय बबन चव्हाण, जनार्धन चव्हाण, यासिन पठाण, कुंडलिक गोसावी, तुषार खजूरे, बाळासो चव्हाण, राजेंद्र चव्हाण, मानसिंग चव्हाण, शामराव कुंभार, हणमंत चव्हाण, नामदेव चव्हाण, दीपक जगताप, जितेंद्र पवार, जालिंदर चव्हाण, रमेश जाधव, सुनील जाधव, दादासो पवार, सुहास चव्हाण,  बजरंग पवार, दयानंद चव्हाण, अमोल भिसे, जोतिराम कुंभार, तानाजी चव्हाण, बापूसो कदम, युवराज जाधव, सागर जाधव, धीरज पवार, तुषार पवार, दादासो चव्हाण, सुनील चव्हाण, सुरज शिंदे, राजकुमार चव्हाण, शेखर पवार, सुरज जाधव, अक्षय पवार, समीर चव्हाण, जितेंद्र चव्हाण, किरण चव्हाण, सत्कारमूर्ती रिटायर्ड आर्मी संदीप आबाजी चव्हाण, माजी सरपंच सौ.प्रतिभा जाधव, सौ.साधना चव्हाण, सौ.रुक्मिणी जगताप, दुर्गा जगताप, रेखा चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता धुमाळ, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता टिकोले, पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता कारंडे तसेच परिसरातील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Sunday, March 10, 2024

सारंग पाटील यांची लोकसभेसाठी चर्चा...कशासाठी ? काय आहेत चर्चा...? वाचा बातमी सडेतोड...

वेध माझा ऑनलाईन।
सातारा लोकसभा मतदार संघातून यावेळी उमेदवार कोण असणार ...या चर्चा सध्या जोर धरू लागल्या आहेत...खरतर लोकशाही मध्ये कोणालाही कोणत्याही निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे, असे असताना खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे.. त्याना थेट लोकांमधून निवडणुका लढवण्याचा स्वतःचा किती अनुभव आहे हा प्रश्न असला...तरी ते पदवीधरचे उमेदवार म्हणून पदवीधर मतदारांपुढे एकदा आले होते...पण चक्क आता खासदारकीसाठी त्यांची चर्चा होतेय याचे आसचर्य सगळीकडेच व्यक्त होताना दिसतंय. त्यांना खुद्द पाटण,कराड सह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या राष्ट्रवादीमधून मोठा विरोध होत आहे अशीही चर्चा आहे...

अनेक राजकारण्यांच्या मुलांना राजकारणात आयत यावं...अस वाटत असते...पण ते समाजासाठी व त्या राजकीय पार्टीसाठी भविष्यात अडचणीचे ठरू शकते...असे अनेकजण आहेत जे पोलिटिकल बॅक ग्राउंड मधून राजकारणात आले आहेत...मग ते उदयसिंह पाटील असोत... किंवा पाटण मधील सत्यजित पाटणकर असोत...असे खूप जण आहेत...मग त्यांची सुरुवात पाहता त्यांनी अगदी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांनी सुरुवात करून ते आमदारकी किंवा खासदारकी साठी आपली इच्छा व्यक्त करतात...
खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांच्याबाबत बोलायचं झालं तर...त्यांची राजकारणातील ओळख म्हणजे...श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव... एव्हढीच आहे...आणि एवढ्या ओळखीवर कोणी...मी खासदार होणार असे म्हणून चालणार नाही...तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणाचा अभ्यास किती?... विधानसभा, जिल्हा परिषद गट किंवा गण अशा ठिकाणी असणाऱ्या सामाजिक समस्या व त्याचे निराकरण कसे होऊ शकते त्यासाठी तेथील नेमकं राजकारण काय आहे... अशा अनेक बाबी असतात की ज्या लोकांच्या समस्यांशी संबंधित असतात... या प्रश्नाबाबत सारंग पाटील यांना किती माहीती आहे...हाही प्रश्न आहे...श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव आहेत ही ओळख खासदार होण्यासाठी पुरेशी नाही... वेळोवेळी होणाऱ्या बाजार समिती, ग्रामपंचायत ,पंचायत समिती जिल्हा परिषद अशा निवडणुकीत त्यांची ठोस भूमिका काय असते.? हाही नेहमीच विचारला जाणारा प्रश्न असतो...त्याचे उत्तर त्यांनी कधी कृतीतून दिलय असे आठवत नाही...
नुकताच काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादी चा मेळावा पार पडला त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या फ्लेक्सबोर्डवर श्रीनिवास पाटील व सारंग पाटील यांचा साधा फोटोही नव्हता...या गोष्टी बरच काही सांगून गेल्या...त्यांना राष्ट्रवादी मधून होणारा विरोध देखील मोठा चर्चेचा विषय आहेच...आणि हा विरोध का होत आहे? याचाही विचार व्हायला हवा...या पक्षात चार- चार वेळा निवडून आलेले अनुभवी आमदार आहेत...ते सर्वजण समाजकार्यात कच्चा अनुभव असणाऱ्या व्यक्तीला कसे काय समर्थन देतील? याशिवाय देखील बरीच कारणे चर्चेत आहेत?...असेही समजते...
त्यांच्या स्वतःच्या पाटण परिसरात तर त्यांचे राष्ट्रवादीसाठी ठोस काम काय? असेही पाटणकर गटाचे सुज्ञ लोक विचारतात ... काही ठिकाणी खासदार साहेबांनी पाटण तालुक्यात विरोधी गटाला निधी दिल्याचे पाटणकर गटाचे लोक सांगतात मग, अशावेळी त्यांना राष्ट्रवादी पक्षाची आठवण का येत नाही ? फक्त खासदार होण्यासाठी पक्षाची आठवण येतेय हे योग्य आहे का? अशी विचारणा देखील तेच लोक करताना दिसतात.
कराड उत्तर, कराड दक्षिण सह संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्याबाबत यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही...यापैकी अनेक ठिकाणी त्यांना स्पष्टपणे आणि उघड विरोध आहे...अशी परिस्थिती असताना... एखाद्याने मला खासदार व्हायचंय...अस म्हणणं कितपत योग्य आहे? 
अशा लोकांनी राजकारण करताना अगदी ग्राउंड लेव्हल वर उतरून  त्यातील बारकावे, समस्या, त्याचे निराकरण कसे करावे हे शिकून घेऊन मगच... खासदारकीचे स्वप्न बघायला हरकत नाही...
पदवीधरची निवडणूक हरल्यानंतरही त्यांनी लोकांशी संबंधित सामाजिक समस्यांबाबत काही उठावदार काम केल्याचेही कधीच ऐकिवात नाही...म्हणजेच...एखाद्याला सायकल चालवायचा अनुभव नसतो ...आणि तो म्हणतो मी विमानच चालवतो...पण... असं म्हणणं कितपत योग्य असते ?...आणि तसंच करायचं झालं तर,... विमानात बसलेल्या प्रवाशांचे काय होईल... हा विचार करायला नको का ?  "समझदार को इशारा काफी है'... असे म्हणत जिल्ह्यात याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत...

यावेळी श्रीकांत शिंदेंना निवडणूक सोपी जाणार का? कुठून लढणार ? वाचा बातमी।

वेध माझा ऑनलाइन। शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी उभी फूट पडल्यानंतर आता लोकसभेच्या कल्याण आणि ठाणे येथील निवडणूकांकडे साऱ्या देशाचे लक्ष लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाणे जिल्ह्यात त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांची निवडणूक महाराष्ट्रात होणाऱ्या हायप्रोफाईल निवडणूकांपैकी एक ठरणार आहे. मात्र जर जागा वाटपात अदलाबदल झाली तर श्रीकांत शिंदे कल्याण ऐवजी ठाण्यातून निवडणूक लढवू शकतात असे म्हटले जात आहे. जर कल्याणमधून 2019 साली निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधूनही जर निवडणूक लढवावी लागली तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुभाष भोईर किंवा सुषमा अंधारे यांना श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. स्वत: श्रीकांत शिंदे यांनी मात्र यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. जर ठाण्यातून श्रीकांत शिंदे यांना निवडणूक लढवावी लागली तर ठाण्यात त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्याशी लढत द्यावी लागेल. तसे झाले तर टफ फाईट होण्याची शक्यता आहे. राजन विचारे यांनी गेल्या निवडणूकीत सात लाख मतांच्या आघाडीने राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. ठाणे आणि कल्याण मतदार संघ कोणाच्या वाटेला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे