वेध माझा ऑनलाईन।
बाराडबरे परिसरात असलेल्या कचरा डेपोला आग लागल्यानंतर येथील रहिवाशांचे जगणे मुश्किल होते. अशा कचरा डोपोनजिक नगरपालिकेने उर्दु शाळा बांधण्याचा घाट घातला आहे. विद्यार्थांच्या आरोग्याचा विचार करून योग्य जागेत शाळा बांधावी. तसेच संविधानभवनच्या ईमारतीचे कामही चुकीच्या पद्धतीने चालले आहे. या विरोधात स्वतंत्र्यदिनी कराड नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा ईशारा भिमशक्ती सामाजीक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष आंनंदराव लादे यांनी दिला आहे.
तर यावेळी अकिल आंबेकरी यांनी नकाशा प्रमाणे हे काम होत नाहीये त्यामुळे कोणाच्या हट्टासाठी असे चुकीचे काम होणार असेल तर कराड नगरपरिषदेवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करणार, न्यायालयातही जाणार असल्याचे सांगितले
पालिकेच्या वतीने चुकिच्या पद्धतीने सुरू असलेल्या उर्दुशाळा व संविधानभवनच्या कामाची माहिती देण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, आनंदराव लादे, आकिल आंबेकरी, रविंद्र बेंद्रे, आसिफ मुलाणी, अमजद आंबेकरी, प्रा.श्रीरंग पाटील व नागरीक उपस्थित होते.
आनंदराव लादे व अकील आंबेकरी यावेळी पुढे म्हणाले...
बाराडबरे परिसरात पालिकेचा कचरा डेपो, सांडपाणी निस्सारण प्रकल्प व जैववैद्यकीय कचरा निमृलन प्रकल्प आहे. ये कचरा डेपोला वारंवार आग लागण्याची घटना घडत असल्याने येथील रहिवाशांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर अन्य दोन प्रकल्पामुळेही परिसरात दुर्गंधी पसरत असते. याबाबत येथील रहिवाशांकडून पालिकेकडे वारंवार तक्रारीही करण्यात आल्या आहेत.
असे असताना येथील कचरा डेपो नजीकच पालिकेकडून उर्दु शाळा बांधण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थांच्या आरोग्यचा गंभिर प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने अन्य ठिकाणी योग्य जागेत उर्दु शाळा बांधावी अशी मागणी करण्यात आली आहे. वास्तवीक शाळा ईमारत बांधण्यासाठी उच्च न्यायालयाचे काही नियम आहेत मात्र हि शाळा बांधताना पालिकेने उच्च न्यायालयाचे सर्व निर्देश पायदळी तुडवले असल्याचे लादे म्हणाले.
कराडला सहा गुंठे जागेत संविधन भवन बांधण्यासाठी सुमारे 67 लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. कचरा डेपो नजीक असलेला पालिकेचा कोंडवाडा पाडून व येथील 40 फुट रूंदिच्या रस्त्यात 20 फूट अतिक्रमण करून बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
डिपीनुसार मंजूरी असलेल्या रस्त्यात पालिका अतिक्रमण करून हा रस्ता कचरा डेपोतून वळवण्याचा घाट घालत आहे. अध्याप मंजूरीची प्रक्रिया पुर्ण झालेली नसतानाही चुकीच्या पद्धतीने पालिकेने काम सूरू केले आहे. याविरोधात जिल्हाअधिकारी कार्यालयाकडे रितसर तक्रार करण्यात आली आहे. तरीही पालिकेचे काम सुरूच असल्याने स्वातंत्र्यदिनी पालिकेसमोर आंदोलन करण्याचा ईशारा आनंदराव लादे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment