येथील जुन्या पुलावरून किती क्षमतेची वाहने जाऊ शकतात याची तपासणी नुकतीच केली आहे त्यानुसार या पुलावरून या आठवड्याभरात हलकी चारचाकी वाहनांची दुतर्फा वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिली.त्यामुळे वाढलेल्या येथील अपघाताचे प्रमाण कंट्रोल मध्ये येण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे नेते ऍड उदयसिह पाटील, झाकीर पठाण,शिवराज मोरे, नगरसेवक अप्पा माने, पोलीस निरीक्षक बी आर पाटील, राहुल चव्हाण,ज्ञानेश्वर राजापूरे सिद्धार्थ थोरवडे, रमेश वायदंडे, बांधकाम विभाग अधिकारी,तसेच नगरपलिका अभियंता एन एस पवार आदि मान्यवर उपस्थित होते...
No comments:
Post a Comment