सध्या केंद्रसरकार आणि शेतकरी यांच्या संघर्षाचे पडसाद देशभर उमटत असताना शेतकरी कायद्याला होणारा विरोध हा केवळ राजकारणासाठी केलेला स्टंट आहे असे सांगत.जर शरद पवार साहेबांचे पुस्तक केंद्र सरकारने कृषी नीती म्हणून उपयोगात आणले तर शेतकऱ्यांनाचे प्रश्न सुटतील असा खोचक्र टोला सदाभाऊ खोत यांनी आज येथे लगावला
येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते दरम्यान सभ्य प्रिथ्वीराजबाबा सत्तेत असताना मात्र अन्यायकारक आहेत असे सांगत त्यांनी आपला निशाणा साधला
दरम्यान 2012 - 2013 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या उसदरवाढी च्या आंदोलनाच्या निमित्ताने राजू शेट्टी सदाभाऊ यांच्यावर 47 केसेस दाखल केला होत्या त्यातून या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली व त्यांना दोषमुक्त करण्यात आले,त्याबाबत माहिती देण्याकरिता या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आली होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, उपाध्यक्ष मुसद्दीक आंबेकरी
कराड तालुकाध्यक्ष अशोक लोहार,बजरंग भोसले,आरिफ मुल्ला आदी उपस्थित होते.
खोत पुढे म्हणाले, ज्यांना सभ्य म्हटले जाते ते सत्तेत आल्यानंतर अन्याय कसे करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे पृथ्वीराज बाबा यांच्या सत्तेचा कालावधी असे म्हणावे लागेल.ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून शेतकऱ्यांचे भले होईल अशी अपेक्षा होती मात्र अपेक्षा भग झाला. आम्ही त्याठीकाणी हजर नसतानादेखील आम्हाला केसेस ना सामोरे जावे लागले.2012 - 2013 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या उसदरवाढी च्या आंदोलनाच्या निमित्ताने आमच्यावर 47 केसेस दाखल केल्या गेल्या.सभ्य म्हणून ओळख असणारे सत्तेत असल्यावर असा अन्याय करतात हे राज्याला माहिती झाले.
दरम्यान,ज्यांना शेतीतली काही अक्कल नाही ,ज्यांचा शेती आणि शेतकरी यांचा काही सम्बन्ध नाही अशा प्रवरुत्ती शेतकरी कायद्याला विरोध करत आहेत आणि हे बरोबर नाही,केवळ मोदी ना विरोध हा या कायद्याला विरोध करणार्याचा हेतू असल्याने केंद्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शेतकरी हितासाठी आपले प्रयत्न चालूच ठेवावे. शरद पवार साहेबांचे शेती विषयक असणारे जे पुस्तक आहे त्याचा कृषी नीती म्हणून या प्रश्नी सरकारने उपयोग करून घ्यावा म्हणजे सगळे प्रश्न सुटतील असा टोलाही खोत यांनी यावेळी लगावला.
No comments:
Post a Comment