Sunday, March 16, 2025

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या ; राजकारणात खळबळ

वेध माझा ऑनलाइन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील मोगा क्षेत्राचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांना गोळ्या घालून संपवण्यात आलंय. त्यामुळे पंजाबमधील शिवसेनेत खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दु:ख व्यक्त केलं असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कर्मयोगी च्या संपादिका सौ मंगलताई लोखंडे कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित ;

वेध माझा ऑनलाइन
दैनिक कर्मयोगी च्या संपादिका सौ मंगलताई लोखंडे यांना कर्तृत्ववान महिला पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले आहे
पत्रकारिता क्षेत्रातील बहुमोल व यशस्वी योगदानाबद्दल सौ लोखंडे यांचा हा गौरव करण्यात आला आहे

 येथील शिवाजी शिक्षण संस्था वेणूताई चव्हाण कॉलेज व वेणूताई चव्हाण स्मारक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने वेणूताई चव्हाण  जन्मशताब्दी निमित्त कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा नुकताच येथील वेणूताई चव्हाण स्मारक येथे नुकताच संपन्न झाला यावेळी सौ लोखंडे याना गौरवण्यात आले 
बारामतीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ सुनंदा पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले माजी आमदार बाळासाहेब पाटील हे अध्यक्षस्थानी होते

सौ मंगलताई लोखंडे यांनी दोन दशकांपूर्वी पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याचे ठरवत एकप्रकारे त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली आणि एकुणच वाढलेल्या भांडवलशाही वातावरणातील पत्रकारिता क्षेत्रात उतरत असताना प्रतिकूल परिस्थितीत सौ लोखंडे व त्यांचे पती नंदकुमार लोखंडे यांनी दैनिक कर्मयोगी ची स्थापना केली कोणतीही पत्रकारितेची पार्शवभूमी नसताना केवळ सामाजिक कार्याची आवड व भान राखून या दाम्पत्यानी ही सुरुवात केली त्यासाठी त्यांना अनेक संघर्षाला व स्पर्धेला सामोरे जावे लागले मात्र तो संघर्ष पार करत कर्मयोगीने गेल्या दोन दशकात जिल्ह्यात अग्रगण्य स्थान मिळवले आणि त्याचमुळे सध्या पत्रकारिता क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून कर्मयोगी कार्यरत आहे अनेक सामाजिक आवश्यक ते बदल आपल्या लेखणीच्या माध्यमातून  घडवण्यासाठी कर्मयोगीचे योगदान अतुलनीय आहे संपादिका सौ मंगलताई लोखंडे यांच्या संपादनाची सुस्पष्ट भूमिका यासाठी निर्णायक ठरते  कर्तृत्ववान महिला पुरस्काराने आज सौ लोखंडे याना सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्या कर्तृत्वाचाच हा गौरव झाला आहे 
कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करू नका या कर्मयोगी वृत्तीचाच हा गौरव असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने संपूर्ण जिल्ह्यातून व्यक्त होत आहे

Saturday, March 15, 2025

शिवेंद्रसिंहराजे काँग्रेसवर बरसले... म्हणाले...काँग्रेसने छत्रपतीं शिवाजी महाराजांना म्हणाव तेवढं महत्व दिले नाही...

वेध माझा ऑनलाइन।
लोकांना गृहीत धरून आपल्यापुरते काम करायचे ही काँग्रेसची नीती आहे जी समाजाला घातक आहे त्यामुळे भाजप शिवाय राज्यात आणि देशात पर्याय नाही लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे देशाचा अभिमान पंतप्रधान मोदी आहेत असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज व्यक्त केलं
यावेळी काँग्रेसने छत्रपतींना जेवढं महत्व द्यायला पाहिजे तेवढं महत्व दिले नाही....भाजपने मात्र छत्रपतींना योग्य ते महत्व देत गडकिल्याच्या संवर्धनासाठी महत्वाची तरतूद करून सन्मान केला असल्याचेही ते यावेळी म्हणाले...

आज विंग (ता; कराड) जि प गटातील काँग्रेस कार्यकरत्यानी आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते

ते पुढे म्हणाले आमदार नसताना अतुल भोसले यांनी कराड दक्षिणेसाठी साडेसातशे कोटी एवढा निधी आणला त्यामुळे मागील पराभवानंतर देखील ते सतत कामात राहिले आणि म्हणून कार्यसाम्राट आमदार म्हणून कराड दक्षिण ने त्यांना 40 हजार मतांनी निवडून दिले आता थांबू नका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अतुल बाबांच्या बरोबर राहून कराड दक्षिण मध्ये
सर्वच ठिकाणी भाजपमय वातावरण तयार करा माथाडी कामगारांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले

अतुलबाबा देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आमदार ...
अतुलबाबा देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आमदार आहेत त्यामुळे आजच्या कार्यक्रमात मला अतुलबाबा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रण देताच मी लग्गेच हो म्हटलो...कारण 25 वर्षे आमदार असून आताच राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे...त्यात मी जर अतुलबाबा यांचे हे आमंत्रण नाकारलं असत...तर माझा 6 महिन्यात कार्यक्रम लागला असता...त्यामुळे मी लग्गेच हो म्हटलो...असे म्हणताच सभेच्या ठिकाणी एकच हशा पिकला...

सातारा जिल्हा भाजप चा बालेकिल्ला...
सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता हा भूतकाळ झाला...मात्र अतुल भोसले यांच्यासह उदयनराजे असतील मनोज घोरपडे असतील जयकुमार गोरे असतील मी स्वतः असेन...आम्ही सर्वांनी मिळून भाजपमय वातावरण केलं आहे त्यासाठी लोकांनी व सर्व कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली आहे हे विसरून चालणार नाही...त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजपमय
वातावरण तयार झाले असल्याचेही ते म्हणाले

Wednesday, March 12, 2025

मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या निर्धाराला उदयनराजे भोसले यांचा घरचा आहेर ; काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाइन
मात्सोद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या निर्धाराला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घरचा आहेर दिला आहे. “
मी नितेश राणे यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. पण, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो. त्यांनी हिंदू-मुस्लीम असा कधी भेदभाव केला नाही. राणे यांनी जे वक्तव्य केले आहे. त्यावर एवढं म्हणणें कि मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं, असे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हटले
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मंत्री नितेश राणेंना असं म्हणायचे असेल की औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे, ते खोदून काढा. मी तर किती वेळा तरी सांगितलं आहे की, तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो, हे विसरू नका. त्याचा अर्थ तसा काढू नका, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे

अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला / बातमी...

वेध माझा ऑनलाइन
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पापाठोपाठ गोरेगावमधील मोतीलाल पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला आहे. 143 एकरवर असलेल्या या प्रकल्पासाठी अदानी समूहाने सर्वाधिक 36 हजार कोटींची बोली लावली आहे.
या प्रकल्पाच्या निविदेतील अटीनुसार एकूण क्षेत्राच्या 13.29 टक्के क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर 3 लाख 83 हजार चौरस मीटर क्षेत्रावर घरे बांधून देणाऱ्या कंपनीस कंत्राट बहाल केले जाणार होते. त्यानुसार अदानी प्रॉपर्टीजने 13.78 टक्के अर्थात 3 लाख 97 हजार 100 चौ. मीटर जागेवर म्हाडास घरे बांधून देण्याची तयारी दर्शविली.
या प्रकल्पाच्या निविदेतील अटीनुसार एकूण क्षेत्राच्या 13.29 टक्के क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर 3 लाख 83 हजार चौरस मीटर क्षेत्रावर घरे बांधून देणाऱ्या कंपनीस कंत्राट बहाल केले जाणार होते. त्यानुसार अदानी प्रॉपर्टीजने 13.78 टक्के अर्थात 3 लाख 97 हजार 100 चौ. मीटर जागेवर म्हाडास घरे बांधून देण्याची तयारी दर्शविली.या पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून अदानी समूहाला विक्रीसाठी 18 लाख 80 हजार चौ. मीटर क्षेत्र उपलब्ध होईल.


मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात?, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी,

वेध माझा ऑनलाइन
 मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात?, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी असेही पंकजा मुंडे एका मुलाखतीत म्हटल्या आहेत

12 डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यास निघाले असता अर्ध्या रस्त्यात असतानाच धनंजय देशमुखांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिला. ते म्हणाले की, आमच्या भावाला तुम्ही न्याय द्या. आज तुम्ही आलात आणि तुमच्याशी कोणी चुकीचे वर्तन केले, तर आम्हाला आवडणार नाही. त्यामुळे मी मागे फिरले, असा खुलासाही पंकजा मुंडे यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे.
मागच्या तीन वर्षे राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यावेळी धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि सुरेश धस आमदार होते. त्यावेळी देखील वाल्मिक कराड काम करत होता. त्याच्या विषयीची एकही तक्रार सुरेश धस यांनी या तिघांकडे का केली नाही?, असा सवालही पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला
मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात?, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली आहे.
सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट गपचूप का घेतली याचे उत्तर सुरेश धस यांनी द्यावे, अशंही पंकजा मुंडे या मुलाखतीमध्ये म्हणाल्या.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर आज पहिली सुनावणी होत आहे. 


लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? याच अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का... आमदार रोहित पवार, वरुण सरदेसाई यांचा सवाल /

वेध माझा ऑनलाइन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? याच अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का असा सवाल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंना केला...यावर आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही असं म्हटलं. 

आमदार रोहित पवार यांनी अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले त्यांचं मानधन दिलं नसल्याचं म्हटलं. याशिवाय नमो शेतकरी कृषी सन्मान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेगळी ठेवावी. याशिवाय 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये कधी करणार का याचं पॉइंटेड उत्तर द्या, असं रोहित पवार म्हणाले.  तुम्हाला कृषी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या माहीत असतानाही तुम्ही त्यांना निवडणूक काळात पैसे दिले मात्र आता त्यांना देत नाही याचा अर्थ निवडणूक साठी त्याचा वापर केला का, असा सवाल रोहित पवार यांनी केला. 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 26 जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना इन्सेटिव्ह देण्याच्या संदर्भात प्रक्रिया सुरु आहे, असं म्हटलं. ⁠नमो शेतकरी योजनेतून 1 हजार रुपये मिळतात. ⁠लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय पाहिला तर त्यात नमूद केलं आहे की 1500 पेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही . त्यामुळे त्यांना वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून देत आहे. ⁠जो आकडा कमी झाला तो विभागाने दिला नाही.  ⁠तर मिडीयाने हा आकडा आणला आहे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.