Thursday, May 23, 2024

बारामतीत विजयाची खात्री आहे का? काय म्हणाले शरद पवार ?

वेध माझा ऑनलाईन ।
महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडाळी आणि राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक निकालांकडे लागलं आहे. अशातच निवडणुकीच्या घोषणेपूर्वीपासूनच महाराष्ट्रातील एका मतदारसंघाची जबरदस्त चर्चा रंगलेली. तो म्हणजे, बारामती मतदारसंघ बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच, बारामती, हे समीकरण जणू दृढ झालेलं. पण यंदा याच निवडणुकीत पवार विरुद्ध पवार रंगलेल्या सामन्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा बारामतीकडे वळल्यात. अशातच शरद पवारांनी बारामती लोकसभा निकालांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतचं पार पडलंय. या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचं वातावरण या आणि अशा अनेक मुद्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. 

काय म्हणाले शरद पवार? 
बारामतीत विजयाची खात्री आहे का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही. यापूर्वी बारामतीत निवडणुकीत पैशाचा वापर कधीच व्हायचा नाही, पण या निवडणुकीत पैशाचा वापर झाला, असं लोक सांगतात पण त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येणार नाही

No comments:

Post a Comment