सध्या मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने पुराचा धोका भविष्यात दिसून येत आहे म्हणूनच अल्लमट्टी धरणाचा धोका सांगली, कोल्हापूरच्या सामान्य जनतेला भविष्यात होऊ नये म्हणून त्याबद्दलचा योग्य तो तोडगा राज्य सरकारने काढायचा आहे...
15 ऑगस्ट नंतर त्याठिकाणी पाणी अडवले तरी चालेल... मात्र जुलै महिन्यात होणारा पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यापूर्वी पाणी अडवू नये... अशी आमची या प्रश्नावर मुख्य मागणी आहे...याविषयी माझी प्राथमिक बोलणी राज्य शासनाबरोबर झाली आहेत त्याबाबत आवश्यक त्या आणखी काही मागण्याबाबत आम्ही आग्रही आहोत... जर आमच्या या भूमिकेकडे शासनाने लक्ष दिले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत... असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला
त्याच विषयाचा धागा पकडत, सांगली जिल्ह्यातील शासनाच्या विरोधातील इतर राजकीय नेत्यांना तुम्ही बरोबर घेणार का... या वेध माझाच्या प्रश्नाचे उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले जे कोणी आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊ पण सरकारला ते नेते घाबरले नाही पाहिजेत...
हा तुमचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत आहे का असे विचारले असता राजू शेट्टी म्हणाले ते तुम्हीच ठरवा...मी कोणाचे नाव घेतले नाही ...तुम्ही काय काढायचा तो अर्थ काढा...अस म्हणत हा टोला त्यांनी जयंत पाटील यांनाच लगावल्याचे त्यांनी अप्रत्यक्ष पत्रकारांना सुचवले...
दरम्यान राजू शेट्टी यांनी यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण झाली तर अलमट्टी धरणाचा सांगली जिल्ह्याला धोका होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या जाऊ शकतात असे सांगत त्यापैकी काही उपाययोजना त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सुचवल्या...
याबाबत राज्य शासनाशी प्राथमिक चर्चा केली आहे, पण कर्नाटक सरकारशी चर्चा झाली नाही असेही ते म्हणाले...
No comments:
Post a Comment