वेध माझा ऑनलाईन
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी पक्षाच्या सचिवपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेते अंबादास दानवे यांच्यावर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
लाखे पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले आहेत. 14 महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी जालना लोकसभेचं तिकीट देण्याची हमी दिली होती. मात्र ती तिकीटाची हमी पूर्ण झाली नाही, संजय राऊतांनी सांगलीत संजय पाटलांशी समझोता केला, त्यामुळे सांगतील पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.अंबादास दानवेंनी जालन्याची जिंकणारी जागा पक्षापासून दूर ठेवली, असा आरोप लाखे पाटील यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment