वेध माझा ऑनलाइन।
महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, तयारी ही झाली होती. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.
भरत गोगावले म्हणाले की, मविआच्या काळात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचे होते, तयारी देखील झाली होती. एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. मविआतील काही आमदार एअरपोर्टला गेले होते, त्यांना घेऊन आले होते, असा दावा त्यांनी केलाय.
बाळासाहेबांनी कोणतेही पद घेतले नाही, ते देखील मनोहर जोशी किंवा नारायण राणे यांच्यावेळी पद घेऊ शकले असते. बाळासाहेबांप्रमाणे उद्धव साहेब हे पद घेणार नाही, असे वाटत होते. पण त्यांनी पद स्वीकारले, त्यासोबतच आदित्य ठाकरेंना देखील मंत्रिपद दिले. आदित्य ठाकरेंना रश्मी वहिनींमुळे मंत्रिपद दिले. स्त्री हट्टापुढे उद्धव ठाकरे काय करणार, असेही भरत गोगावले यांनी म्हटले आहे. तर केंद्रात आता श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद दिले असते, आम्ही देखील बोललो द्या. पण, त्यांनी तसे केले नाही, असे देखील गोगावले यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment