कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय. मात्र, तरुण मुलाच्या आत्महत्येच्या धक्याने वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यातच आईलाही हृदयविकाराचा झटका आल्याचा ह्रदयद्रावक प्रकार घडल्याने गावात शोककळा पसरली आहे. अवघ्या 27 वर्षाच्या युवा शेतकऱ्याने कर्ज आणि नापिकीला, आर्थिक संकटाला कंटाळून मृत्युला कवटाळले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे ही घटना घडली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी पीडित कुटुंबीयांना आधार देत पुढाकार घेतला आहे. मात्र, ग्रामस्थ करुन करुन काय करणार आहेत, आता शासनानेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देऊ करावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
No comments:
Post a Comment