येथील हाँकर्सधारकांमधे शेतकर्यांच्या आवक मालावर व्यवसाय करणारे असे अनेक व्यापारी आहेत.शेतकर्यांवर अन्याय म्हणजे हाँकर्सधारकांवर अन्याय आहे असे आम्ही मानतो, त्यामुळे आम्ही उद्या मंगळवार दि 8 रोजी होणाऱ्या भारत बदला व्यवसाय बंद ठेवुन जाहिर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.कराड शहरातील सर्व हाँकर्सधारकांनी हा होणारा भारत बंद पाळावा असे आवाहन हाँकर्स संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी आज येथे हॉकर्स पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात उद्या भारत बंद ची हाक देण्यात आली आहे.त्या बदला पाठिंबा देण्याकरिता येथील हॉकर्स संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी जाहीर केले.
यावेळी संघटनेचे सचिव हरिष बल्लाळ,सल्लागार आनंदराव लादे,उपाध्यक्ष सतिश तावरे,खजिनदार गजानन कुंभार,संघटक आशपाक मुल्ला,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment