वेध माझा ऑनलाइन।
बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी मिळेनासी झाली आहे. बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदांनी स्मशानभूमीत दफन करण्यास मनाई केली आहे. तर, कोर्टाने येत्या सोमवारपर्यंत अक्षयवर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले आहेत. पण स्मशानभूमीच मिळत नसल्याने पंचाईत झाली आहे. या पार्श्वभूमीवर अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांनी खदखद व्यक्त केली आहे. या देशात दहशतवादी याकूब मेमनचं दफन करण्यासाठी जागा मिळते. पण गुन्हा सिद्ध झालेला नसतानाही अक्षयच्या दफनविधीसाठी जागा मिळत नाही, अशी खदखद कटारनवरे यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment